(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • राजकीय स्त्रिया –भंवरी देवी

    बालविवाह रोखण्याच्या तिच्या प्रयत्नांमुळे संतप्त झालेल्या पुरुषांनी सामूहिक बलात्कार केला होता . त्यानंतर पोलिसांनी तिला दिलेली वागणूक आणि न्यायालयाने आरोपींना निर्दोष सोडल्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांचे लक्ष वेधले गेले आणि ते भारतातील महिला हक्क चळवळीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरले.

      November 21, 2025


  • मराठी शाहीर व लोककलाकार विठ्ठल उमप

    मराठी शाहीर व लोककलाकार विठ्ठल उमप यांचा जन्म १५ जुलै १९३१ रोजी झाला. आपल्या भारूडाने समस्त मराठी रसिकांना वेड लावणा-या विठ्ठल उमप यांनी आपल्या बहुआयामी कलासाधनेने अवघ्या महाराष्ट्रावर मोहिनी घातली होती. राज्याच्या लोककलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यामध्ये लोकशाहीर विठ्ठल उमप यांचं मोठं योगदान आहे.
    विठ्ठल उमप यांचा मूळचा गळा विदर्भाचा असला, तरी नगर जिल्ह्यातील एका खेड्यात त्यांच्या घराण्याने भेदिकाची परंपरा सुरू ठेवली. विठ्ठल उमप यांचे वडील भेदिकाचे गायक पण उमप यांच्यावर भेदिकापेक्षा आंबेडकरी जलसा आणि सत्यशोधकी तमाशाचा विशेष प्रभाव पडला होता. मुंबईला उदरनिर्वाहासाठी आलेल्या उमप यांनी कामगार वस्तीत मेळ्यातून कामे केली. विठ्ठल उमप हे लोकशाहीर असले तरी त्यांना 'कवाल' म्हणूनच लोक पूर्वी ओळखत. पण नंतर मात्र त्यांनी वेगवेगळे प्रयोग करून, एक समर्थ लोककलावंत, अशी आपली ओळख निर्माण केली. लोकरंगभूमी, रंगभूमी, कव्वालीचे व्यासपीठ, काव्य संमेलने, रुपेरी पडदा, दूरचित्रवणीचा छोटा पडदा अशा अनेक माध्यमांमध्ये उमप यांचा सर्वत्र संचार होता.

    'आला कागुद कारभारणीचा' ही लावणी, 'ऐका मंडळी कान देऊनी तुम्हा सांगतो ठेचात कुडी आत्म्याचं भांडण झालं भारी जोरात', 'भूक लागलीया पाठी कशासाठी पोटासाठी', 'माझ्या आईचा गोंधळ', 'आईचा जोगवा', 'आरती श्रीगणेशा जगदीशा', 'वादळ वारा तुफान येऊ द्या', 'ये दादा आवर रे', 'फाटकी नोट मना घेवाची नाय', 'भाता मीठ नही टाक्या' अशा वेगवेगळ्या लोकगीतांच्या गायनाने विठ्ठल उमप यांनी आपला स्वतंत्र ठसा लोकगीताच्या क्षेत्रात उमटविला. 'माझी मैना गावाकडं राह्यली' या गाण्यानं तर अनेकांचे डोळे पाणावले.

    विठ्ठल उमपांनी अनेक कोळी गीते आणि भीम गीते रचली व गायली. त्यांनी लिहिलेल्या "जांभूळ आख्यान" या नाटकाचे आतापर्यंत ५०० हून अधिक प्रयोग झाले आहेत. १९८३ साली विठ्ठल उमप यांनी आयर्लंडमधील कॉर्क लोकोत्सव गाजविला होता. विठ्ठल उमप केवळ लोकगीत गायनापाशी थांबले नाहीत. त्यांनी लोकरंगभूमीसोबतच नागर रंगभूमीवर संचार ठेवला. 'अरे रे संसार', 'अबक दुबक', 'विठो रखुमाय', 'खंडोबाचं लगीन', 'जांभुळाख्यान' या चाकोरीबाहेरच्या नाटकांसोबतच 'हैदोस', 'बुद्धम्‌ शरणम्‌'सारखी नाटके त्यांनी वर्ज्य मानली नाहीत.

    विहीर, टिंग्या, सुंबरान,या चित्रपटांमध्ये व डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटातूनही त्यांनी काम केले होते.लोककलेच्या सेवेसाठी आयुष्य वेचणा-या शाहीर विठ्ठल उमप यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.

    विठ्ठल उमप यांचे चिरंजीव आदेश, नंदेश आणि उदेश आता त्यांची परंपरा पुढे नेत आहेत. विठ्ठल उमप यांचे २६ नोव्हेंबर २०१० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      July 15, 2018


  • सज्जाद हुसेन

    सुगम संगीत काय किंवा चित्रपट संगीत काय, इथे सर्जनशीलता जरुरीची नसते, असे म्हणणारे बरेच “महाभाग” भेटतात!! वास्तविक, सामान्य रसिक (हा शब्दच चुकीचा आहे ,जर रसिक असेल तर सामान्य कसा?) ज्या संगीताशी मनापासून गुंतलेले असतात, ते संगीत सामान्य कसे काय ठरू शकते? त्यातून, स्वरांच्या अलौकिक दुनियेत जरी शब्द “परका” असला तरी ते “कैवल्यात्मक” संगीत जरा बाजूला ठेवले तर, दुसऱ्या कुठल्याही सांगीत आविष्कारात, शब्दांशिवाय पर्याय नाही. तेंव्हा शास्त्रोक्त संगीत वगळता (अर्थात रागदारी संगीतात देखील, शब्दांना महत्व देऊन, गायकी सादर करणारे कलाकार आहेत!!) अन्य कुठल्याही संगीतात, शब्दांचे महत्व नेहमीच महत्वाचे ठरतात.

    आता, सर्जनशीलता हा शब्द जरा फसवा आहे, विशेषत: सुगम संगीतातील सर्जनशीलता, कधीही, सहज जाताजाता,ऐकून समजण्यासारखी नाही. खरतर, हे तत्व सगळ्याचा कलांच्या बाबतीत लागू पडते!! आपल्याला “सर्जनशीलता” हा शब्द ऐकायला/वाचायला आवडतो परंतु याचा नेमका अर्थ जाणून घेण्याची “तोशीस” करीत नाही. इथे या शब्दाची “फोड”करण्याचा उद्देश नाही परंतु, सुगम संगीतातील सर्जनशीलता, हा संशोधनाचा विषय मात्र नक्की आहे, जर सुगम संगीत हे, संगीत म्हणून मान्य केले तर!!

    इथे वेगवेगळ्या पातळीवर सर्जनशीलता वावरत असते, म्हणजे चालीचा मुखडा, वाद्यवृंद, कवीचे शब्द तसेच अखेरीस आपल्या समोर येणारे गायन!! या सगळ्या सांगीतिक क्रियेत, संगीतकाराची भूमिका, नि:संशय महत्वाची!! हल्ली, जरा काही वेगळे ऐकायला मिळाले, की आपण, लगेच “सर्जनशीलता” हा शब्द वापरतो आणि या शब्दाची “किंमत” कमी करतो!! हिंदी चित्रपट संगीतात, असे फारच थोडे संगीतकार होऊन गेले, ज्यांना, खऱ्या अर्थाने, सर्जनशील संगीतकार, ही उपाधी लावणे योग्य ठरेल आणि या नामावळीत, “सज्जाद हुसेन” हे नाव अग्रभागी नक्कीच राहील!! किती लोकांना, या संगीतकाराचे नाव माहित असेल, शंका आहे!!

    हा माणूस, केवळ “अफाट” या शब्दानेच वर्णन करावा लागेल. प्रत्येक वाद्य, सुप्रसिद्ध करताना, त्या वाद्याबरोबर, त्या वादकाचे नाव कायमचे जोडले जाते, जसे, संतूर-शिवकुमार शर्मा, शहनाई-उस्ताद बिस्मिल्ला खान इत्यादी…… मेंडोलीन वाद्य, भारतीय संगीतात रूढ करणारे वादक, म्हणून सज्जाद हुसेनचे नाव घेणे, क्रमप्राप्तच आहे. वास्तविक हे मूळचे भारतीय वाद्य नव्हे, पण तरीही भारतीय शास्त्रीय संगीतात, या माणसाने, या वाद्याची प्रतिस्थापना केली, असे म्हटले तर ते अजिबात चुकीचे ठरू नये. दुर्दैवाने, या माणसाची प्रसिद्धी, अति विक्षिप्त, लहरी आणि अत्यंत तापट म्हणून झाली आणि त्यावरून, नेहमीच शेलक्या शब्दात संभावना केली गेली. माणूस, अतिशय तापट, नक्कीच होता परंतु संगीतातील जाणकारी, भल्याभल्यांना चकित करणारी होती.

    सुगम संगीतात, नेहमी असे म्हटले जाते, गाण्याचा “मुखडा” बनविण्यात खरे कौशल्य असते!! तो एकदा जमला, की पुढे सगळे “बांधकाम” असते. या वाक्याच्या निमित्ताने, आपण, सज्जाद हुसेन यांच्या काही गाण्यांची उदाहरणे बघूया.
    सुमारे ७० वर्षांच्या दीर्घ आयुष्यात केवळ १४ चित्रपट, संख्येच्या दृष्टीने, ही आकडेवारी क्रियाशील सर्जनशीलतेचे उदाहरण ठरत नाही!! परंतु, त्यामागे, चित्रपट क्षेत्रातील राजकारण, व्यक्तीचा स्वभाव इत्यादी गोष्टी अंतर्भूत आहेत. नूरजहानच्या आवाजातील “बदनाम मुहोब्बत कौन करे” हे गाणे बघूया. बागेश्री रागाच्या सावलीत तरळणारी चाल असली तरी, “बदनाम” हा शब्द जसा उच्चारला आहे,तो ऐकण्यासारखा आहे. (पुढे, सी. रामचंद्र यांनी, “मलमली तारुण्य माझे” मधील “मलमली” शब्दामागे हाच विचार केला आहे. अर्थात, हे त्यांनीच सांगितलेले आहे) कुठलेही गाणे, “आपण गाऊ शकतो” असा जर विश्वास ऐकणाऱ्याला झाला, तर ते गाणे प्रसिध्द होऊ शकते!! इथे सुरवातीला असेच वाटते, पण जसे गाणे पुढे सरकते, तशी, चालीतील अंतर्गत “ताण” कुठेच कमी होत नाही आणि स्वरपट्टी मर्यादित तारतेचीच आहे. त्यामुळे, ऐकणारा, आपली उत्कंठा ताणून धरतो!!

    “भूल जा ऐ दिल” हे लताबाईंनी गायलेले गाणे बघूया. हे सुद्धा, बागेश्री रागाचीच “छाया” घेऊन वावरते. गाण्याचे चलन, द्रुत गतीत आहे पण, चाल बांधताना, शब्दांच्या मध्ये आणि शब्दांची शेवटी, चमकदार हरकती असल्याने, चाल अवघड होते तसेच काही ठिकाणी, शब्द निश्चित स्वरांवर न संपविता, त्या दिशेने लय जात आहे, असे नुसते दर्शविले आहे!! हा जो सांगीतिक अनपेक्षितपणा आहे, हेच या संगीतकाराच्या सांगीतिक क्रियेचे व्यवच्छेदक लक्षण मानावे लागेल.
    “ये हवा ये रात ये चांदनी” हे गाणे बघूया. आरंभी धीम्या लयीतले आहे असा भास होतो. वास्तविक संथ लयीत गाणे नसून, कवितेच्या शब्दांची लांबी दिर्श असल्याने, त्याच्या बरोबर जाणारी अशी सुरावट असल्याने, तसा भास होतो. भैरवी रागीणीच्या छायेत वावरत असताना, आपल्या पहिल्या मात्रेस “उठाव” न देणारा ७ मात्रांचा रूपक ताल, यामुळे हे गाणे फारच सुंदर झाले आहे.

    “रुस्तम सोहराब” चित्रपटातील “ऐ दिलरुबा” ऐकताना, असे जाणवते, हा संगीतकार आता अत्यंत वेगळ्या शैलीने गाणी बनवत आहे. कारण एकाच वेळी भारतीय व अरब भूमीची संगीतसंपदा जागवणारी वाटते. आवाजाचे विशिष्ट कंपयुक्त लगाव, आधारभूत घेतलेली स्वरचौकट आणि ओळीच्या मध्येच अनपेक्षितपणे वरच्या स्वरांत लय बदलणे, यामुळे सगळे गाणे अत्यंत उठावदार आणि परिणामकारक होते.

    “जाते हो तो जाओ”, “तुम्हे दिल दिया”,’दिल मी समा गये सजन” ही आणि अशीच बरीचशी गाणी, “चाल” या दृष्टीकोनातून ऐकावी, म्हणजे या संगीतकाराच्या व्यामिश्रतेचे परिमाण समजून घेत येईल.

    वास्तविक इतक्या अफलातून प्रतिभेचा धनी असून देखील, केवळ १४ चित्रपट, यात रसिकांचा तोटा झाला, हे निश्चित. त्यांच्या रचनांचा प्रभाव इतर संगीतकारांवर बराच होता, इतका की बरीचशी गाणी, या चालीच्याच सावलीत वावरतात किंवा त्यांचा प्रभाव टाळू शकत नाहीत. काही उदाहरणे बघूया.

    १] ये हवा ये रात ये चांदनी – तुझे क्या सुनाऊ मैं दिलरुबा (मदन मोहन)
    २] आज प्रीत ने तोड दे बंधन – जीवन मे पिया तेरा साथ रहे (वसंत देसाई)
    ३] कोई प्रेम देके संदेसा – प्रीतम तेरी दुनिया में (मदन मोहन)
    ४] खयालो में तुम हो – (“आह” चित्रपटात Accordion चा तुकडा शंकर/जयकिशन यांनी वापरला)

    अशा सगळ्या संगीतचौर्यामुळे, सज्जाद अधिक तापट झाले, त्यातून, ही गाणी सगळी अमाप प्रसिध्द झाली आणि आपल्या “मूळ” चाली असून, आपल्याला काहीच श्रेय मिळत नाही, यामुळे मनात सतत खंत बाळगली!!

    वास्तविक, हा संगीतकार मेंडोलीन वादक, मेंडोलीनवर सतारीचे सूर काढू शकणारा असामान्य ताकदीचा कलाकार. या वाद्याला प्रतिष्ठा लाभावी, यासाठी त्यांनी अमाप धडपड केली. अगदी, संगीत मैफिलीत देखील ते, फक्त रागदारी संगीतच सादर करीत. अशाच एका मैफिलीत, एका श्रोत्याने, ” ये क्या क्लासिकल बजा रहे हैं आप, कुछ लाईट म्युझिक हो जाय” अशी फर्माईश झाल्यावर, सज्जादनी समोरच्या दिव्याकडे बोट दाखवले आणि उठून नाराजीने चालू पडले!! अशा स्वभावावर काय औषध?

    हाच प्रकार, हिंदी चित्रपट संगीताच्या बाबतीत घडला. संगदिल चित्रपटाची गाणी बनविणे चालू होते आणि तेंव्हा तिथे चित्रपटाचा नायक, दिलीप कुमार आले आणि त्याने काही सूचना केल्या!! झाले, ठिणगी पडली!! सज्जादने तिथल्या तिथे, “तुझ्या चेहऱ्याला ना आरोह, ना अवरोह आणि तू मला संगीताचे धडे देतोस?” आता, असे ऐकविल्यावर पुढे काय घडणार!!

    कारणे अनेक देता येतील, त्यांच्या दोषांवर पांघरून घालता येईल परंतु अशा विक्षिप्त स्वभावाने, त्यांनी चित्रपट क्षेत्रात बरेच शत्रू निर्माण केले!! जेंव्हा आजूबाजूला मित्रांपेक्षा शत्रू अधिक झाले, म्हणजे त्या क्षेत्रातून बाहेर पडण्यावाचून वेगळे काय घडणार!!

    - अनिल गोविलकर

      August 27, 2018


  • प्रदीप कबरे

    कथा, पटकथा, संवाद लेखक व कलाकार प्रदीप कबरे हे मुळातच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. अभिनेता म्हणून त्यांनी नाव कमावलं आहेच, पण लेखक म्हणूनही कामगिरी केली आहे. त्यांनी आत्तापर्यंत दोन नाटकं लिहिली आहेत. तसंच अंदाजे अडीच हजार रेडिओ कार्यक्रम लिहिले आहेत. पाच हजारांहून अधिक रेडिओ कार्यक्रमांचं सादरीकरण केलं आहे. सहा-सात माहितीपटांचं लेखन केलं आहे. शंभरेक जिंगल्स लिहिल्यात. दोन चित्रपटांची कथा-पटकथा-संवाद लिहिले आहेत. एका चित्रपटासाठी गीतलेखनही केलं आहे.

      July 7, 2022


  • मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद

    दिपाली सय्यद म्हणजेच दिपाली भोसले लग्ना नंतर ती दिपाली सय्यद झाली. तिचा जन्म १ एप्रिल १९७८ रोजी पाटणा, बिहार येथे झाला. सुरवातीपासुनच एक अभिनेत्री होण्याचे तिचे स्वप्न होते. दिपाली सय्यदचे बालपण मुंबईत गेले. दिपालीने नालंदा विद्यापीठातुन फाईन आर्ट्सची पदवी संपादन केलेली आहे. अभिनय क्षेत्रातील तिचा प्रवास मालिकांमधुन सुरु झाला. बंदीनी, समांतर या तिच्या अभिनय कारकिर्दीतील सुरवातीच्या मालिका. त्यानंतर अनेक चित्रपट, मालिका, शोज, नाटक, टिव्ही शोज, जाहिराती यातुन ती सातत्याने झळकत राहिली.

    दिपाली जाऊ तिथे खाऊ, चश्मेबहाद्दर, लग्नाची वरात लंडनच्या दारात या चित्रपटांमधील तिच्या भुमिकांसाठी विशेष करुन ओळखली जाते. मात्र तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता जत्रा चित्रपटातील ये गो ये मैना.. या गाण्यातून मिळाली. करायला गेलो एक, लाडी गोडी, होऊन जाऊ दे, मला एक चानस हवा, ढोलकीच्या तालावर, वेलकम टु जंगल, हे मिलन सौभाग्याचे, माझ्या नवर्याची बायको, उचला रे उचला, काय करु न कसं करु, दुर्गा म्हंत्यात मला, काळशेकर आहेत का ?, मास्तर एके मास्तर, मुंबईचा डबेवाला, सासु नंबरी जावई दस नंबरी हे तिचे तिने अभिनय केलेले इतर चित्रपट. तर दुर्वा, अफलातुन या हिंदी मालिकांमधुनही ती चमकली आहे. याशिवाय तिने आतापर्यंत पाच सहा भोजपुरी चित्रपटातून भूमिका साकारल्या आहेत.

    ३१ मे २००८ रोजी दिपाली दिग्दर्शक बॉबी खान यांचेबरोबर विवाहबध्द झाली असुन लग्नानंतरचे तिचे नांव सोफीया जहांगीर सय्यद असे आहे. दिपालीने अहमदनगर मतदार संघातुन सन २०१४ मध्ये निवडणुक लढवलेली होती. दिपाली सय्यदने नगर जिल्ह्यातील “गुंडेगाव ” या ठिकाणी ‘दिपाली सय्यद-भोसले फाऊंडेशन’च्या माध्यमातून वृद्ध आणि अनाथ मुलांसाठी आश्रम उभारले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      April 1, 2019


  • मराठीतील प्रगल्भ अभिनेत्री भक्ती बर्वे

    भक्ती बर्वे केवळ अभिनेत्री नाही, तर उत्तम निवेदिकाही होत्या. त्यांचा जन्म १० सप्टेंबर १९४८ रोजी झाला. त्यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. गणेशोत्सवात छोट्या छोट्या नकलांपासून त्यांच्या अभिनयाला सुरवात झाली, असे म्हणावे लागेल.

    त्यांचे उत्तम पाठांतर असल्याने त्यांना पुढे आकाशवाणीवर काम करण्याची संधी मिळाली. त्या दूरदर्शनवर निवेदन करीत होत्या. त्या उपजत अभिनेत्री असल्यामुळे त्यांनी केलेली जवळजवळ सर्वच नाटके सुपर हिट ठरली. नाटक आणि भक्ती बर्वे हे समीकरणच तयार झाले. त्याकाळी नाटकांना वन्स मोअर मिळत असे. त्यामुळेच मराठी रंगभूमीतील भक्ती बर्वे या एकमेव स्त्री स्टार म्हणावे लागेल.‘‘ आकाशवाणीवर आणि दूरदर्शनवर भक्ती बर्वे निवेदिका होत्या. अशोक हांडे यांच्या 'माणिकमोती' या कार्यक्रमातही त्यांचे निवेदन असे.

    पु.ल.देशपांडे यांच्या ती फुलराणी हे नाटक म्हणजे भक्ती बर्वे यांच्या भूमिकेतील अतुच्य क्षण. ती फुलराणी चे ११११ हून अधिक प्रयोग झाले. आई रिटायर होतेय या नाटकात भक्ती बर्वे यांनी साकारलेली आईची भूमिकाही खूप गाजली. या नाटकाचे एकूण ९५० प्रयोग झाले. मराठी नाट्यक्षेत्रातल्या कामगिरीसाठी ह्यांना १९९० साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हिंदी चित्रपटांतील सहअभिनेते मा. शफी इनामदार यांच्याशी विवाह झाला होता. अशोक हांडे यांच्या माणिकमोती या कार्यक्रमातही त्यांचे निवेदन असे.

    रजनीश जोशी यांनी लिहिलेलं एक होती फुलराणी हे पुस्तक भक्ती बर्वे यांच्या बद्दलच्या खूप छान छान गोष्टींची आठवण करून देते.

    भक्ती बर्वे यांचे १२ फेब्रुवारी २००१ रोजी निधन झाले.

    भक्ती बर्वे यांनी काम केलेली नाटके.
    अखेरचा सवाल, अल्लाउद्दीन व जादूचा दिवा (बालनाट्य), अजब न्याय वर्तुळाचा, आई रिटायर होतेय (मराठी आणि गुजरातीत-बा रिटायर थाय छे), आधे अधुरे(हिंदी आणि मराठी), आले देवाजीच्या मना, कळलाव्या कांद्याची कहाणी (बालनाट्य), गांधी आणि आंबेडकर, घरकुल, चिनी बदाम (बालनाट्य), जादूची वेल (बालनाट्य), टिळक आणि आगरकर, ती फुलराणी, दंबद्वीपचा मुकाबला, पपा सांगा कुणाचे, पळा पळा कोण पुढे पळे तो, पुरुष, पुलं, फुलराणी आणि मी, बाई खुळाबाई, बूटपोलिश, माणसाला डंख मातीचा, मिठीतून मुठीत, रंग माझा वेगळा, रातराणी (मराठी, हिंदी आणि गुजराती), वयं मोठं खोटम् (बालनाट्य), शॉर्टकट, सखी प्रिय सखी, हँड्स अप.
    प्रमुख चित्रपट - जाने भी दो यारों (हिंदी) इ.स. १९८३,बहिणाबाई, ‘हजार चौरासी की माँ’ (हिंदी) इ.स. १९९८

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      September 10, 2017


  • ज्येष्ठ संगीतकार व संगीत संयोजक अनिल मोहिले

    ‘श्रावणात घननिळा बरसला’ या गाण्यातील गोडवा अथवा ‘दिल चीज क्या है आप मेरी जान लिजीये’ या गाण्यातील ठसका योग्य वाद्यमेळाच्या आधारे खुलवून ती अधिक कर्णप्रिय करण्याचे कसब लाभलेले अनिल मोहिले यांना लहानपणापासून संगीताची आवड होती. त्यांना त्यांच्या वडिलांचे मार्गदर्शन आणि तरंगवाद्याचं बाळकडू मिळाले. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद ही पदवी मिळाली. रूपारेल कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच १९६० च्या दशकात त्यांनी आकाशवाणीवर काम केलं. संगीतसंयोजनाची सुरुवात त्यांनी आकाशवाणीवर केली. तेथेच त्यांच्या आयुष्यातील नवे लक्ष्य मिळाले आणि ते शास्त्रीय संगीतापासून भावसंगीताकडे वळले. संगीत संयोजनासाठी शिवकुमार पुंजाणी यांच्याकडे त्यांनी मार्गदर्शन घेतले. नोटेशन वाचून वाजवणं हा प्रकार ते त्यांच्याकडे शिकले. आकाशवाणीवर श्रीनिवास खळे यांची ओळख झाली. नोटेशन लिहिणं, चालीमधल्या जागा गीताच्या चालीला अनुरूप अशा धूनांनी भरणं यासाठी लागणारं ज्ञान त्यांना श्रीनिवास खळे यांच्याकडून मिळाले. ते स्वतः बुलबुल तरंग आणि मेंडोलिन वाजवायचे. स्वतःची नोकरी सांभाळून त्यांनी ही आवड जोपासली होती. वयाच्या सातव्या वर्षी आकाशवाणी मुंबई केंद्रावर त्यांचा ‘गंमत जंमत’ या मुलांच्या कार्यक्रमात एकल तबलावादनाचा कार्यक्रम सादर झाला होता.

    जलतरंग, बुलबुलतरंग, व्हायोलिन, मेण्डोलिन यासारख्या वाद्यांवर कमालीचे प्रभुत्व असणाऱ्या मोहिले यांनी सुमारे ४० मराठी चित्रपटांना संगीत दिले. त्यापूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीत सचिनदेव बर्मन, खय्याम, कल्याणजी-आनंदजी, भप्पी लाहिरी यासारख्या अनेक संगीतकारासोबत त्यांनी संगीत संयोजक तसेच सहाय्यक संगीतकाराची भूमिका पार पाडली. त्यांच्यावर लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतल्या प्यारेलाल शर्मा, शंकर-जयकिशन यांचे म्युझिक अरेंजर सॅबेस्टियन, कल्याणजी आनंदजी यांचे अरेंजर बाळ पार्टे आणि मदनमोहन यांचे अरेंजर सोनिक मास्तर यांचा प्रभाव होता. ८६ हिंदी चित्रपटांचे त्यांनी संयोजन केले आहे. जवळपास ७० हून अधिक संगीतकारांकडे त्यांनी काम केले. लता मंगेशकर यांच्या देश-विदेशातील सर्व संगीत मैफलींमधील संगीत संयोजनाची जबाबदारी मोहिले यांनी अनेक वर्षे सांभाळली होती. इंडस्ट्रीत माझं स्थान पक्कं करण्यात लतादीदींची बहुमोल मदत झाली. किंबहुना त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी आजतागायत घट्ट पाय रोवून आहे, असे अनिल मोहिले नेहमी म्हणायचे.

    अनिल मोहिले आणि अरुण पौडवाल या जोडीने संगीतबद्ध केलेली अनेक गाणी आहेत.त्यानंतर अनिलजींनी स्वतंत्रपणे संगीत दिले. मराठी चित्रपट सृष्टीत अनिल अरुण या जोडीने अष्टविनायक या चित्रपटाला दिलेल्या संगीतामुळे त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. मंगेशकर कुटुंबीयांचा उजवा हात अशी त्यांची प्रसिद्धी होती. संगीताच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कलाकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा उपक्रमही सन २००३ पासून मोहिले यांनी राबविला. तीन पिढ्यांच्या संगीतकारांना जोडणारा दुवा म्हणून अनिल मोहिलेंकडे पाहिले जात होते. मुंबई विद्यापीठात संगीत संयोजनाचा अभ्यासक्रमही त्यांनी सुरु केला होता. त्यातून अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले. थोडीसी बेवफाई, कयामत से कयामत, लेकिन, शराबी, डॉन, अभिमान यांसह ८६ हिंदी चित्रपटांचे संगीत नियोजन त्यांनी केले होते. शुभमंगल सावधान, दे दणादण, थरथराट यांसह अनेक मराठी चित्रपटांचेही संगीत नियोजक तेच होते. अनिल मोहिले यांचे निधन १ फेब्रुवारी २०१२ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      February 1, 2019


  • ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद करणारे पहिले भारतीय गीतकार समीर

    आत्ता पर्यत तब्बल ६५० चित्रपटांसाठी हजारोंच्या संख्येने गीतांचे लेखन करणारा आणि तरीही अंतरंगात कुठे तरी कातर, हळव्या मनाचा कवी अशीच गीतकार समीर अंजान पाण्डेय ऊर्फ शीतल पांडे'' उर्फ मा.समीर यांची ओळख. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९५८ रोजी झाला.ज्येष्ठ गीतकार मा.अंजान हे समीर यांचे वडील. इंडस्ट्रीचा बेभरवशीपणा अनुभवला असल्याने मा.अंजान यांनी मा.समीर यांच्या गीतकार होण्याला विरोध केला. पण समीर यांचा पिंड कवी मनाचाच असल्याने घरच्या विरोधाला जुमानता तो प्रकट होत राहिला. बँक अधिकारी म्हणून करिअरची सुरुवात केलेल्या मा.समीर यांनी बॉलिवूडमध्ये करिअर करायचे या उद्देशाने त्यांनी बँकेतील सुरक्षित नोकरी सोडली आणि सिनेक्षेत्रात गीतकार म्हणून पाऊल टाकले. सुरुवातीला त्यांनी ‘बेखबर’, ‘इन्साफ कौन करेगा’, ‘जबाब हम देंगे’, रखवाला’, ‘महासंग्राम’ आदी चित्रपटांसाठी गाणी लिहिली. मात्र या गाण्यांमुळे त्यांना यश व प्रसिद्धी मिळाली नाही. सातत्याने संघर्ष केल्यानंतर अखेर १९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी’ चित्रपटातील गाण्यांनी समीर यांना प्रसिद्धी मिळवून दिली. ‘सांसो की जरुरत है जैसे’, ‘मै दुनिया भूला दुंगा’, ‘नजर के सामने जिगर के पास’ ही गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. चित्रपट रसिक व श्रोत्यांवर आपल्या शब्दांनी गारूड करणाऱ्या समीर यांनी आपल्या कारकिर्दीत शंभरहून अधिक संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. अन्नू मलिक, आदेश श्रीवास्तव, इलया राजा, ए.आर. रहेमान, जतीन ललित, दिलीप सेन-समीर सेन, नदीम-श्रवण, राजेश रोशन, शंकर एहसान-लॉय आदी संगीतकारांबरोबर समीर यांची जोडी जमली. ‘आँखे’, ’आशिकी’, ’कभी खुशी कभी गम’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कुली नंबर वन’, ‘जुर्म’, ‘तेरे नाम’, ‘दबंग-२’, ‘दिल है की मानता नही’, ‘दिवाना’, ‘देवदास’, ‘धडकन’, ‘धूम’, ‘फिजा’, बेटा’, ‘बोल राधा बोल’, ‘राजाबाबू’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘रावडी राठोड’, ‘शोला और शबनम’, ‘सडक’, साजन’, ‘सावरियाँ’, ‘हम है राही प्यार के’, ‘हीरो नंबर वन’, अशा अनेक चित्रपटांसाठी मा.समीर यांनी लिहिलेली गाणी लोकप्रिय झाली आहेत. मा.समीर यांनी मराठी आणि भोजपुरी चित्रपटांसाठीही गाणी लिहिली आहेत. मा.समीर यांनी फेब्रुवारी २०१६ पर्यंत ६१७ चित्रपटांसाठी ३ हजार ४०० गाणी लिहिली आहेत. सर्वाधिक गाणी लिहिल्याबद्दल त्यांचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंदले गेले आहे. या आधीचे रेकॉर्ड गीतकार मा.आनंद बक्षी यांचे होते; त्यांनी ६२४ चित्रपटांसाठी ३ हजार २०० गाणी लिहिली होती. मा.समीर यांना आपल्या समूहाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    समीर यांची काही गाणी
    आए हो मेरी जिंदगी में
    आखों ने तुम्हारी
    आपके प्यार मे हम
    घुंगट की आड से
    चाहा है तुझको
    जो हाल दिल का
    तुम्हे अपना बनाने की कसम खाई है
    तेरी उम्मीद तेरा इंतजार
    धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना
    धूम मचा ले धूम
    दिल ने दिल से क्या कहा
    दिल है के मानता नही
    देखो जरा देखो

      February 25, 2017


  • वर्षा उसगांवकर

    वर्षा उसगांवकर ही मराठी आणि हिंदी चित्रपटांतील ग्लॅमरस अभिनेत्री आहे. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या वर्षाने केवळ त्यासाठी गोवा सोडून मुंबईत बस्तान बसवले.

    तिची दखल मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीने घेतली ती आचार्य अत्रे लिखित 'ब्रम्हचारी' या नाटकातील बोल्ड नायिकेमुळे.

    नाट्य, दूरचित्रवाणी इत्यादी माध्यमांमध्येही तिने काम केले आहे.

    वर्षा उसगावकरचे काही चित्रपट :

    तुझ्यावाचून करमेना
    गंमत जंमत
    खट्याळ सासू नाठाळ सून
    सगळीकडे बोंबाबोंब
    मज्जाच मज्जा
    रेशीमगाठी
    आत्मविश्वास
    हमाल दे धमाल
    कुठं कुठं शोधू मी तुला
    नवरा बायको
    अफलातून
    भुताचा भाऊ
    पसंत आहे मुलगी
    आमच्या सारखे आम्हीच
    मालमसाला
    उपकार दुधाचे शेजारी शेजारी
    पटली रे पटली
    घनचक्कर
    बाप रे बाप
    डोक्याला ताप नाही
    मुंबई ते मॉरिशस
    ऐकावं ते नवलच
    एक होता विदूषक
    शुभमंगल सावधान

    विकिपिडियावरील माहितीचे पान (इंग्रजी)

    ## Varsha Usgaonkar

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

      April 14, 2010


  • ज्येष्ठ आणि श्रेष्ठ तालवादक लॉर्ड कॉवस

    लॉर्ड कावस हे भारतीय चित्रपटसृष्टीच्या पाऊणशे वर्षांच्या इतिहासाचे ते साक्षीदार होते. त्यांचा जन्म १९११ रोजी पुणे येथे झाला. लॉर्ड कावस यांचा पुण्याच्या सधन पारशी कुटुंबात लॉर्ड कॉवस यांचा जन्म झाला. घरची आíथक परिस्थिती उत्तम. छोटय़ा कॉवसचे सांगीतिक मन तिथे रमत नव्हते. डोळय़ांत स्वप्न आणि डोक्यात फक्त एक विचार, मला सांगीतिक विश्वात करिअर करायचे आहे. आपला छंद जोपासण्यासाठी वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी आई बरोबर मुंबईत मामाच्या घरी स्थायिक होण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला.

    मुंबईत जिथून जसे संगीत शिकता येईल ते शिकण्यास त्यांनी सुरुवात केली. मेजर गुंडलखान या पठाण मिलिटरी अधिकाऱ्याकडून बॅग पाइप वाजविण्यास शिकले. दिवसातून दहा दहा तास ड्रम वाजविण्याचा सराव केला. पारंपरिक भारतीय तालवाद्यांची माहिती असावी म्हणून संगीतकार गुलाम मोहोम्मदकडे तबलाही शिकले. मि. वालिसकडून ट्रम्पेट आणि मि. लुईस मोरेनो या स्पॅनिश कलाकाराकडून कास्टनेट (हे छोटेसे वाद्य स्पॅनिश नर्तक दोन्ही हातांच्या मुठीत धरून वाजवत असत.) वाजविण्यास शिकले. ड्रम्सवर मात्र स्वत: अभ्यास करून प्रावीण्य मिळविले. ‘आलम आरा’ या पहिल्या हिंदी बोलपटाचे संगीतकार होते फिरोजशहा मित्री व बहराम इराणी.

    बहराम हे लॉर्ड कॉवसचे चुलतमामा. त्यांच्याबरोबर कॉवसनी ‘आलम आरा’च्या पाश्र्वसंगीतात ट्रम्पेट वाजवून फिल्मी संगीतात प्रवेश केला. पुढे दोन-तीन वर्षे ब्रिटिश आर्मीमध्ये त्यांच्या बँडपथकात नोकरी केली व कॅप्टनपदापर्यंत पोहोचले. त्यामुळे माìचग ड्रम वाजविण्यात त्यांचा हातखंडा होता. सुनील दत्तच्या ‘उसने कहा था’ फिल्ममधील ‘जानेवाली सिपाही से पुछो’ गाणे आठवते? त्यातील माìचग ड्रम लॉर्ड कॉवस यांनी वाजविला आहे. दुसरे महायुद्ध संपले आणि त्यांची आर्मीमधील नोकरी संपुष्टात आली. त्यांना ब्रिटिश नागरिकत्व मिळाले होते, परंतु त्यांनी ते नाकारून मुंबईत राहणे पसंत केले.

    ४० व्या दशकात काही काळ ताज हॉटेलमध्ये बारमनची नोकरी करत असताना तिथे अनेक विदेशी बॅण्ड पाहायला व ऐकायला मिळाले. त्या वादकांशी दोस्ती करून तीन वर्षांत सर्व प्रकारची लॅटिन अमेरिकन वाद्य्ो ते वाजविण्यास शिकले. इतकेच नव्हे तर त्यांनी मिळेल त्या किमतीत ती वाद्य्ो विकत घेतली. स्वातंत्र्यपूर्व काळात ऑस्टोरिया, व्होल्गा, रिटज, व्हेनिस आदी ठिकाणी बॉलरूम डान्स चालत असे अनेक नाइट क्लब सुरू होते, तिथे पाश्चात्त्य नृत्य चालत असे. नौशादचा ‘जादू’ चित्रपट पाहिला असेल तर त्याची कल्पना येईल! ताजच्या बाजूला त्या काळच्या जाझ संगीतप्रेमींचे अत्यंत आवडते ग्रीन्स हॉटेल होते. इथे मोठमोठय़ाने ड्रम वाजविण्यास मुभा होती. पहाटेपर्यंत चालत असे, लॉर्ड कावस यांनी या हॉटेल्सच्या बॅण्डमध्ये वाजविण्यास सुरुवात केली.

    १९४५ च्या सुमारास गोव्याहून प्रसिद्ध जाझ ट्रम्पेट वादक चिकचॉकलेट (चिको बाज) मुंबईला आले, त्यांनी आपला बॅण्ड चालू केला, लॉर्ड कावस आता त्यांच्या बॅण्डमध्ये वाजवू लागले. अॅककॉíडयनवादक गुडी सिरवाईना कावसनी आपल्या बॅण्डमध्ये बोलावून घेतले. सुट्टीमध्ये ते सर्व मसुरीच्या क्लबमध्ये बॅण्डवादन करत असत. त्यादरम्यान लाहोरहून कुक्कू डान्सर मुंबईत आली. आपल्या नृत्यसंगीताच्या कार्यक्रमांसाठी तीही एका चांगल्या बॅण्डच्या शोधात होती.

    लॉर्ड कावस, जेरी फर्नाडिस व चिको वाजनी ‘जिरोम एॅण्ड हिज जाईव्ह क्लब बॉईज’ हा बॅण्ड तयार केला होता. कुक्कू त्यामध्ये सामील झाली. तिच्या पहिल्या फिल्मी नृत्याचे ध्वनिमुद्रण याच बॅण्डने केले. सी. रामचंद्र म्हणजे कल्पक व तल्लख बुद्धीचे संगीतकार. सतत काही तरी नवे आणि वेगळे संगीत देण्याच्या प्रयत्नात ते असत. जाझ संगीतावर त्यांचे विशेष प्रेम होते. दिवसभर गाण्यांचे ध्वनिमुद्रण करून मध्यरात्री ते बॅण्ड ऐकायला ग्रीन्स हॉटेलमध्ये चिक चॉकलेटकडे येत असत. त्यांना लॉर्ड कॉवस यांचे विविध पाश्चिमात्य तालवाद्यांवर असलेले प्रभुत्व भावले. त्या बॅण्डमधील सर्व कलाकारांना घेऊन पाश्चिमात्य शैलीचे संगीत देण्याचे त्यांनी ठरविले.

    नेमकी त्याच काळात मुंबई इलाख्यात दारूबंदी जाहीर केली गेली. नाइट क्लब बंद झाले. उदरनिर्वाहासाठी काहीतरी करणे आवश्यक होते. लॉर्ड कावस, त्यांचा मोठा मुलगा केरसी, गुडी, जेरी सारे सी. रामचंद्रांच्या वाद्यवृंदात सामील झाले. कावसनी आपल्याबरोबर विविध प्रकारचे जाझ, ड्रम्स, बोंगो, कोंगो, कबास, रेसो, एॅकॉíडयन, कॅस्टनेट, ट्रांगल, खंजिरी, चायनीज ब्लॉक, वूडब्लॉक, व्हायब्रोफोन आदी लॅटिन अमेरिकन वाद्य्ो सोबत आणली आणि या सर्वानी एक नवीन प्रकारचे फिल्मी संगीत तयार केले. आमा ‘आना मेरी जान संडे के संडे,’ ‘जवानी की रेल चली जाएगी’ (शहनाई), ‘गोरे गोरे ओ बांके छोरे’ (समाधी), ‘मोम्बासा मोम्बासा’ (सरगम), ‘मेरे पिया गए रंगून’ (पतंगा) या गाण्यांनी सर्वत्र धमाल उडवून दिली. संगीतकार सी. रामचंद्र प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले. संगीताची ही नवीन शैली यशस्वी होताच सर्व संगीतकार लॉर्ड कावस यांच्या मागे लागले. लॉर्ड कावस यांनी पारंपरिक िहदी फिल्मी संगीताला आपल्या असामान्य वादन शैलीने, कल्पकतेने आधुनिक वळण दिले.

    हॉलीवूडच्या ‘लव्ह ऑफ कारमेन’ चित्रपटावरून कारदारनी ‘जादू’ या वेषभूषाप्रधान चित्रपटाची निर्मिती केली. त्यातील गाण्यांसाठी लॉर्ड कावसनी प्रथमच कॅस्टनेट यामूळ स्पॅनिश वाद्याचा उपयोग केला, गाणे होते ‘जब नन मिले ननों से, लारा लूं, लारा लूं’ आजही फिल्मी संगीतात सिंगल कॅस्टनेट वाजविणारे होमी मुल्लर, वकील बाबा, दीपक बोरकरसारखे काही कलाकार आहेत. परंतु डबल कॅस्टनेट वाजविणारे कलाकार फक्त दोन होते. लॉर्ड कावस आणि त्यांचा धाकटा मुलगा बजी. महमूदच्या ‘शबनम’ फिल्ममध्ये डबल कॅस्टनेट आहे, ‘हर नजर में सौ अफसाने.’ खंजिरीचा उपयोग यापूर्वीही भारतीय संगीतातून केला जात होता. वादक तालासाठी धातूच्या चकत्यांचा वापर करीत. लॉर्ड कावस यांनी खंजिरी वादनात अमेरिकन शैली आणून ते पूर्ण वाद्य वाजविण्यास सुरुवात केली.

    अनेक लोरींमध्ये (अंगाई गीतात) हळुवार घंटानाद ऐकू येतो. फिल्मी संगीतात हा नवीन प्रकार लॉर्ड कावस यांनी आणला. घोडय़ांच्या टापांचा आवाज निर्माण करण्याचे प्रथम श्रेय आर. सी. बोराल व पंकज मलिकला जाते. (चले पवन की चाल) परंतु घोडय़ांच्या टापांचा अस्सल ध्वनी निर्माण करण्याची किमया लॉर्ड कावस यांचीच! दोन रिकाम्या करवंटय़ा फरशीवर वाजवून त्यांनी तो आभास निर्माण केला होता. ‘अनमोल घडी’, ‘उडन खटोला’, ‘नया दौर’, ‘तुमसा नहीं देखा’ आदी चित्रपटांतून त्यांनी वादन केले आहे. केवळ घोडय़ांच्या टापांचाच नाही तर बुटाच्या टापांचा (फूट स्टेपचा) अफलातून ध्वनीही त्यांनी आपल्या कल्पक बुद्धीने निर्माण केला आहे.

    सी. रामचंद्रच्या ‘इना मिना डीका’ (आशा) गाण्यावरील वैजयंतीमालाच्या नृत्यात त्यांनी फूटटॅप डान्ससाठी, तिच्या पायातील बुटांच्या टापांचाही ध्वनी निर्माण केला आहे. काचेवर दोन नाण्यांनी वादन केले. मिष्किलपणा त्यांच्या रक्तातच होता. रेकॉìडगमध्ये ते खूप गमतीजमती करीत असत. ‘दिल का हाल सुने दिलवाला’ (श्री ४२०) मधील ‘चुकचूक’ आवाज ही त्यांचीच कल्पना होती. अलबेलामधील ‘ओ बेटा जी’ गाण्यात त्यांनी किचनमधील भांडी वाजवली तर नोकरीमधील किशोरच्या ‘अर्जी हमारी’ गाण्यात चक्क टाइपरायटर वाजवला आहे. गाईडमधील ‘पिया तोसे नना’मधील घुंघरांची साथही त्यांची होती.

    भगवानचा ‘अलबेला’ त्यातील संगीतामुळे तुफान लोकप्रिय झाला. त्याचे बरेचसे श्रेय लॉर्ड कावस यांना द्यावे लागेल! ‘शोला जो भडके’मधील सुरुवातीचे बेंगो पीस व ‘दिवाना परवाना’मधील पाश्चिमात्य ऱ्हिदम काकांनी दिला. ‘दिवाना परवाना’च्या चित्रीकरणप्रसंगी भगवानदादांनी ते गाणे वाजविणाऱ्या प्रमुख कलाकारांनाही (चिक चॉकलेट, फ्रान्सिस, जेरी फर्नाडिस, सहृद कार) आपल्या समवेत नाचायला लावले आहे. बोंगो, कोंगो, चायनीज ब्लॉक, वूडब्लॉक, ड्रम, व्हायोब्रोफोन वादनात तर त्यांचा हात धरणारा कुणीही कलाकार फिल्मी संगीतात नव्हता. पुढील गाणीच त्याची साक्ष देतील!

    ‘जाने क्या तूने कहीं’ - प्यासा (चायनीज ब्लॉक), ‘आई ए मेहरबां’ - हावडा ब्रिज (बोंगो व वूडब्लॉक), ‘हूं अभी मं जवां ऐ दिल’ - भाई भाई (बोंगो), ‘लो प्यार की हो गई जीत’ - जादू (बोंगो), ‘अंधे जहाँ के अंधे रास्ते’ - पतिता (बोंगो), ’जाता कहा हैं दीवाने‘ - सीआयडी (बोंगो), ‘ये रात ये चांदनी’ - जाल (बोंगो).

    आर.डी.बर्मन यांच्या संगीतामध्ये लॉर्ड फॅमिलीचे प्रचंड योगदान आहे. ‘आराधना’ या चित्रपटातील ‘रूप तेरा मस्ताना’ या गाण्यात बोंगो - कावस लॉर्ड, एकॉíडयन - केरसी लॉर्ड, व्हायब्रोफोन - बजी लॉर्ड यांनी वाजविला आहे.

    १९४० ते १९९० या कालखंडात असा एकही संगीतकार नव्हता की ज्याचे गाणे लॉर्ड कावस यांनी वाजविले नाही. पाश्चात्त्य आणि भारतीय वाद्यांवर त्यांची कमालीची पकड होती. नारळाच्या करवंटय़ा, टाईपरायटर, बुटांच्या टापांच्या आवाजाचा वापर करून त्यांनी सदाबहार गाण्यांना जन्म दिला. कावस म्हणजे हिंदी फिल्मी संगीताचा चालताबोलता इतिहास होता. लॉर्ड कावस यांचे २४ डिसेंबर २००६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट/ अरुण पुराणिक

      December 26, 2017