जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
निवृत्त प्रमुख, रेडिओ केमिस्ट्री विभाग, भाभा अणुसंशोधन केंद्र
फिरोजशहा मेरवानजी मेहता एल्फिन्स्टन कॉलेजमधून एम्.ए. होऊन इंग्लंडला बॅरिस्टर होण्यासाठी गेले. तेथील चार वर्षांच्या वास्तव्यात त्यांच्यावर दादाभाई नौरोजींचा प्रभाव पडला. ते बॅरिस्टर होऊन १८६८ मध्ये हिंदुस्थानात आले आणि मुंबईस त्यांनी वकिली सुरू केली. १८६९ साली त्यांनी दादाभाईंच्या ईस्ट इंडिया असोसिएशनची शाखा म्हणून बाँबे असोसिएशन मुंबईत सुरू केली. गोऱ्या लोकांच्या मिरासदारीविरुद्ध त्यांनी प्रभावी प्रचार केला.
डॉ. पां. रा. किनरे हे ठाणे-मुंबई भागातील कामगार चळवळीत गेली ५० वर्षे चमकणारे नाव. कामगारक्षेत्रात अनेकजण काम करतात; पण किनरे म्हणजे तत्त्वनिष्ठ कार्याचा आदर्श वस्तुपाठ होता. रा. स्व. संघात त्यांची जडणघडण झाली. कामगार चळवळीच्या रचनात्मक व संघर्षात्मक कामात झोकून देताना त्यांचे हे वैचारिक अधिष्ठान आयुष्यभर पक्के राहिले. गिरणगावातील कामगार चळवळ तसेच सामाजिक व राजकीय कार्याशी त्यांचा जिताजागता संबंध अजूनही आहे. मुंबईच्या भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे कामगिरी बजावली.
कामगार चळवळीत काम करताना त्यांनी गरीब, झोपडपट्टीधारक, असंघटित मजूर आणि कोकणवासीयांच्या प्रश्नांना न्याय मिळवून दिला. माझगाव डॉक, ग्लॅक्सो, पिरामल, अलकेम, मुकंद, डंकन, महाजन सिल्क मिल, इंडियन एक्सप्रेस अशा अनेक ठिकाणी त्यांनी कामगारांचे यशस्वी नेतृत्व केले.
कामगार चळवळीत कामगार गरीबच राहतो ; नेता गब्बर बनतो असा अनेक ठिकाणचा अनुभव अनेक कामगारांच्या पाठीशी होता. या पार्श्वभूमीवर किनरे यांचे ' एक रुपयाचे व्हाऊचर कुठे दिसणार नाही ' उठून दिसणारे आहे. त्यांनी कोणतेही पद, समिती सदस्यत्व वा अधिकार स्वीकारले नाहीत. सरकारी योजना, सवलतींचा फायदा उठवला नाही. शिवसेना-भाजप युतीच्या राज्यात या निष्ठावान, कर्तृत्ववान, अभ्यासू व निःस्वार्थी कार्यकर्त्याला कोणते तरी पद मिळेल अशी अनेक सहकार्यांना आशा होती पण भाजपने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, याची सल अनेकांच्या मनात आहे. बगाराम तुळपुळे, यशवंत चव्हाण, प्रकाश आंबेडकर, मनोहर कोतवाल अशा विविध विचारसरणीच्या नेत्यांबरोबर त्यांनी काम केले. कामगार भागात २५ वर्षे त्यांनी गरिबांची सेवा केली.
१९६९ ते १९९५ या काळात लहान मुलांसाठी दर दिवशी दीडरुपयात, तर ज्येष्ठ नागरिकांना दोन रुपयांत औषधोपचार केले. २५ टक्के रुग्णांना मोफत औषधोपचाराचा वसा त्यांनी कायम ठेवला. ' महाराष्ट्र टाइम्स ' सह अनेक प्रमुख वर्तमानपत्रांतून त्यांनी आपल्या आवडत्या विषयावर विपुल लेखन करून वाचकाला सजग केले. ' आर्थिक मंदी ' व ' दरिद्री नारायणाचे अर्थकारण ' ही पुस्तके त्यांच्या नावावर जमा आहेत.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
आज मराठी चित्रपट दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांचा वाढदिवस.
उमेश कुलकर्णी यांचा जन्म ६ डिसेंबर १९७६ रोजी झाला.
समाजातील घटनांवर तिरकस कटाक्ष टाकत विनोदाची शैली हाताळणारा उमदा दिग्दर्शक म्हणजे उमेश कुलकर्णी. वळू’, ‘विहीर’, ‘देऊळ’ सारख्या आशयसंपन्न चित्रपटांचे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी केलेले आहे. वळू’ हे नाव देऊन चित्रपटातून बैलाबरोबरच त्यांनी गावाची गोष्ट मांडली. त्यांच्या चित्रपटातील रंजकता हेच त्यांच्या यशाचे रहस्य आहे. ‘विहीर’, ‘देऊळ’,हायवे,आरपार या त्यांच्या चित्रपटांनी इंटरनॅशनल फिल्म फेस्ट्रीवल मधील सारी महत्वपूर्ण बक्षिसे पटकावली. ‘आरभाट कलाकृती या नावाने गिरीश - उमेश कुलकर्णी संस्था चालवतात. ‘देऊळ’हा आशयघन आणि वेगळ्या धाटणीचा चित्रपट होता. ‘देऊळ’ या चित्रपटासाठी गिरीश - उमेश कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय ‘सुवर्ण कमळ’ पुरस्कार मिळाला. मराठी चित्रपटसृष्टीत ज्यांच्या नावावर चित्रपट चालतो अशा कलाकारांमध्ये लेखक - दिग्दर्शक म्हणून उमेश कुलकर्णी यांचे नाव आघाडीवर असून दर्जेदार आणि वेगळ्या वाटेवरचे चित्रपट निर्माण करून ते रसिकांपर्यंत पोचविण्यात ही जोडी विशेष प्रवीण आहे. चाकोरीबाहेरचे काहीतरी करतानाच मनोरंजनाचा बाज न बिघडवता चित्रपट रंगवण्यात त्यांचा हातखंडा आहे. मा.जया बच्चतन यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांचा अभिनय आणि त्यांच्याडतील कौशल्य सर्वप्रथम हेरलं आणि या चित्रपटाच्या निर्मितीस होकार दिला. उमेश कुलकर्णी गेली काही वर्षे लघुपटनिर्मितीसाठी चित्रपटकर्मीना प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे. लघुपटांवर उमेश कुलकर्णी यांचे खास प्रेम आहे. त्यांची दिग्दर्शक म्हणून ओळखही याच माध्यमातून झाली होती. त्यामुळे एक प्रकारे लघुपटनिर्मितीची चळवळच त्यांनी सुरू केली असून लघुपटनिर्मितीचे प्रशिक्षण देणारी कार्यशाळा ते घेतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
संख्याशास्त्रात कारकीर्द करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या राम प्रधान यांनी वर्गमित्र स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन थेट वरिष्ठ पदावर विराजमान झाल्यानेच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि १९५२ साली भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) प्रवेश केला.
शेवते यांच्या ‘ऋतुरंग’ प्रकाशनाने काढलेल्या ‘नापास मुलांची गोष्ट’ या पुस्तकाच्या चाळीस आवृत्त्या निघाल्या. ‘नापास मुलांची गोष्ट’ मुंबई विद्यापीठात अभ्यास क्रमात सामील केले आहे.
पुण्यात स्थायिक झाल्यावर आपल्या ज्ञानाचा गोरगरीबांना उपयोग करवून देण्याचं ठरवलं. कारण विलायतेहून आल्यावर त्यांना महा. पं. मदनमोहन मालवीय यांनी ‘आपल्या गरीब देशाला तुमच्या ह्या ज्ञानाचा उपयोग कसा होईल?’ विचारलेला हा प्रश्न कायम त्यांच्या कानात गुंजारव करीत होता.
ब्लॅक अँड व्हाइट चित्रपटाच्या जमान्यात रवी पटवर्धन यांनी अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. आपल्या उमेदीच्या काळात त्यांनी रिझर्व्ह बँकेत नोकरी करून अभिनय श्रेत्रात पाऊल ठेवले.
प्रिया तेंडुलकरांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेट्रेसची नोकरी करून केली. ती नोकरी सोडून देऊन त्या नाट्यसृष्टीमध्ये शिरल्या. त्यांनी गिधाडे, ती फुलराणी, एक हट्टी मुलगी या नाटकांमध्ये काम केले होते. त्यांनी त्यांचा पहिला चित्रपट इ.स. १९७३ साली आलेला दिग्दर्शक शाम बेनेगल यांचा अंकुर हा हिंदी चित्रपट. यांव्यतिरिक्त त्यांनी गोंधळात गोंधळ, धाकटी जाऊ आणि तूच माझी राणी यासारख्या मराठी चित्रपटांमध्येही काम केले होते.
प्रिया तेंडुलकर ह्या भारतातील पहिल्या टीव्ही-स्टार म्हणून ओळखल्या जातात. त्यांची 'रजनी' ही मालिका खूपच गाजली. त्यांच्या इतर मालिकांमध्ये प्रिया तेंडुलकर शो, ज़िम्मेनदार कौन, किस्से मियाँ बीवी के, हम पांच या हिंदी, तर 'दामिनी' या मराठी मालिकेचा समावेश होतो. त्या लेखिकाही होत्या. त्यांनी अनेक लघुकथा लिहिल्या आहेत. त्यांचे 'ज्याचा त्याचा प्रश्न' हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
नाटककार विजय तेंडुलकर हे त्यांचे वडील.
प्रिया तेंडुलकरांनी यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९५४ रोजी झाला . त्यांचे १९ सप्टेंबर २००२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
भारतीय शास्त्रीय संगीतातील एक विख्यात गायक.
Copyright © 2025 | Marathisrushti