(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • कमल श्रीकृष्ण गोखले

    शिवपुत्र संभाजी या ग्रंथाच्या कर्त्या . सत्यकथा मासिकातून पुस्तक परीक्षणे, कथा, व्यक्तिचित्रे तसेच तात्कालिक वाङमयीन घडामोडींवर त्यांनी लेखन केले.

  • रामचंद्र विष्णू गोडबोले उर्फ सदगुरु स्वामी स्वरूपानंद

    आधुनिक काळातील संत आणि कवी सदगुरु स्वामी स्वरूपानंद यांचा जन्म १५ डिसेंबर १९०३ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पावस या गावी झाला.

    त्यांचे जन्मनाव रामचंद्र विष्णू गोडबोले. त्यांचे प्राथमिक शिक्षण पावस येथे, तर माध्यमिक शिक्षण रत्नागिरी येथे झाले. ते पुढील शिक्षणाकरता मुंबईला ‘आर्यन एज्युकेशन सोसायटी’च्या आंग्रेवाडीतील विद्यालयात गेले. त्यांचे वाङ्मयविशारद पदवीचे शिक्षण पुण्याच्या ‘टिळक महाविद्यालया’त झाले. शिक्षण काळातच वयाच्या विसाव्या वर्षी त्यांना सद्गुरु गणेश नाथ महाराज यांचा अनुग्रह झाला. त्यांनी ब्रिटीश सत्तेच्या विरोधात असहकार आंदोलनात भाग घेतला. त्यात त्यांना पुण्यातील येरवडा कारागृहात तुरुंगवास सोसावा लागला. येथे त्यांनी अखंड सोsहं साधना केली. त्यामुळे त्यांच्या देहाचे आणि मनाचे अमुलाग्र परिवर्तन झाले.

    कारागृहातच त्यांना एस. एम. जोशी, अच्युतराव पटवर्धन, शंकरराव पटवर्धन यासारखे त्यांना स्वामी म्हणून संबोधू लागले. स्वामी स्वरूपानंदांनी त्यांच्या महासमाधीपर्यंत म्हणजे जवळजवळ १९३४ ते १९७४ असे चाळीस वर्षे वास्तव्य आंबेवाले देसाई यांच्या घरात ‘अनंत निवास’मध्ये एका खोलीत केले. तेथेच त्यांना निर्गुण-निराकार श्रीमहाविष्णूच्या सगुण रूपाचा साक्षात्कार १९४२ साली झाला. त्यांनी अनंत निवासमधील वास्तव्य काळातच ‘श्रीमत् अभंग ज्ञानेश्वरी’, ‘श्रीभावार्थगीता’, ‘श्रीअभंग अमृतानुभव’, ‘संजीवनी गाथा’ (अभंग संग्रह), ‘चांगदेव पासष्टी’ यांसारखे प्रासादिक अनुवादित ग्रंथ लिहिले.

    स्वामी स्वरूपानंद यांनी आयुष्यभर ज्ञानेश्वरीतील आध्यात्मिक विचार सुबोधपणे साधकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. " मृत्यू पावलो आम्ही " या शब्दात स्वतःच्या मृत्यूचा अनुभव तारखेनिशी नोंदवला. भगवान विष्णूचे त्यांना साक्षात दर्शन झाले होते. १५ ऑगस्ट १९७४ रोजी स्वामी स्वरूपानंद पावस येथे समाधिस्त झाले. रत्नागिरी जवळ पावस येथे त्यांचे आज भव्य मंदिर आहे. मंदिर अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे. स्वामींचे चैतन्यारुपात अखंड वास्तव्य आहे असे मानले जाते. मंदिरात भक्तनिवास आणि प्रसादाची सोय आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • कॅ. संजय कर्वे

    युद्धनौकांवर दिवसा आणि रात्री हेलिकॉप्टरचे लॅंडिंग आणि टेक ऑफ पाहतानाच त्यांच्या मनाने नक्की केले की, हे हेलिकॉप्टरच आपल्या करिअरच्या पंखात हवा भरेल. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीद्वारे नौदलात दाखल झालेले कॅप्टन संजय कर्वे यांच्या गाठीशी ३३ वर्षे आणि साडेपाच हजार तास इतका उड्डाणाचा अनुभव आहे. गेल्या सात वर्षांपासून ते राज्याचे नागरी हवाई उड्डाण संचालक आहेत...

    महाराष्ट्राची हवाई धुरा

  • अच्युत पालव

    १९८३ साली अच्युत पालव यांनी उल्का शिष्यवृत्तीसाठी मोडी लिपीचा पंधराव्या ते सतराव्या शतकांतील इतिहास, तसेच मोडी लिपीची विविध वळणे व अक्षररुपे यांवर कलात्मक दृष्ट्या संशोधन करुन प्रबंध लिहिला. मोडी व आजची देवनागरी यांच्या दृश्य समन्वयातून ‘धृतनागरी’ तयार केली. तिला ‘मुक्त लिपी’ असे नाव दिले. या लिपीचा त्यांनी सुलेखनातून कलात्मक आविष्कार घडवून ह्या प्रयोगाची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख करुन दिली.

  • प्रगल्भ प्रतिभेचे नौशाद

    एका नामांकित लेखक-समीक्षकाने, "बलवत्तर भाग्याचे नौशाद" अशा शीर्षकाचा लेख आपल्या एका पुस्तकात लिहीला आहे. नौशादजी 'Top' ला जाण्यात त्यांच्या 'गुणवत्तेपेक्षा' त्यांच्या 'भाग्याचा' वाटा मोठा आहे असे सूचन करणारे हे शीर्षक व हा लेख आहे. आता, नौशादांची गाणी त्या त्या काळात लोकप्रिय झालीच पण साठ सत्तर वर्षांनंतरदेखील ती जनप्रिय आहेत याला निव्वळ 'भाग्य' म्हणणे म्हणजे विनोदच आहे.

    अर्थात नौशादांवर टीका करणारे अनेक आहेत . भप्पी लहिरीने सुद्धा त्यांना झोडपले होते. एका पत्रकाराने भप्पीला विचारले की 'तुम्ही चालींची चोरी करता' या आरोपाबाबत काय सांगाल? तशी भप्पी म्हणाला की ' चोरी कोण करत नाही ? नौशाद नाही का शास्त्रीय संगीतातले राग चोरत?' आता चालींची 'उचलेगिरी' करणे आणि एखादा राग कलात्मकतेचा शिडकावा करून विविध स्वरूपात मांडणे यातील फरक त्याला समजत नसेल काय? पण वेळ मारून नेली ना? मग झालं तर!

    नौशादजी एका वेळी एकच चित्रपट करत याचीही कुचेष्टा होत असे. पण मला तरी हे कलाकाराच्या मनस्वीपणाचं व नम्रतेचं निदर्शक वाटतं. एक विषय हातात घेतला की त्यावर अधिकाधिक परिश्रम घेऊन, स्वतःच्या कुवतीनुसार त्याला पूर्ण न्याय देऊन त्यातून बाहेर पडायचे व मगच दुसऱ्या विषयात प्रवेश करायचा यात चुकीचे काय? The secret of good writing is re-writing असे म्हणतात. 'प्रतिभेच्या पहिल्याच उमाळ्यात सुचले तेच अंतिम' असे मानण्यापेक्षा , ते अधिकाधिक उत्तम व निर्दोष कसे करता येईल यावर जोर देणे ही एक प्रकारची विनम्रताच आहे.

    त्यांचे आत्मचरित्र प्रौढी मिरवणारे आहे अशीही टीका झाली. परंतु त्यात इतर कोणाला कमी लेखले आहे असे मला तरी आढळले नाही. मला तरी ते स्व-कर्तृत्वाचे सार्थ (पण अनाठायी नव्हे) अभिमानाने केलेले विस्तृत कथन वाटले.

    "भाग्याचीच" गोष्ट म्हणायची तर 'सैगल' व 'नूरजहाँ' या दोन्ही शिखरस्थ कलाकारांना संगीत देण्याचे भाग्य नौशादजीना लाभले. ते अन्य कोणालाच प्राप्त झाले नाही. आणि महत्वाचे म्हणजे 'शहाजहाँ' व 'अनमोल घडी' यातली गाणी अनुक्रमे सैगल व नूरजहाँ यांच्या करीअर मधली माईलस्टोन गाणी ठरली. शिवाय सैगल व नूरजहाँ या दोघांनी नौशादजींकडे फक्त एकेकच चित्रपट केला होता हे ही लक्षात घेण्याजोगे !

    मेहबूब, करदार, सनी, विजय भट्ट, के आसीफ यासारखे मोठे निर्माते नौशादजीनाच घेत ही केवळ 'योगायोगाची' गोष्ट नव्हती तर ती त्यांच्या गुणवत्तेची पावतीच होती.

    'कलात्मक' संगीत देणा-या संगीतकारात त्यांचे स्थान खूप वरचे आहे. त्यांच्या संगीतातील 'कोरस'चा वापर या एकाच विषयावर एक मोठा लेख लिहीता येईल. एकाच ओळीसाठी दोन चाली - मुख्य गायकासाठी एक व कोरससाठी एक- हे त्यांचे मुख्य वैशिष्ट्य! त्यातही एक चाल आरोही असेल तर दुसरी अवरोही अश्या रचना ! कधीकधी दोन्ही चाली एकाच दिशेने जाणा-या!

    कधी गाण्याची चाल 'नाजूक' असेल तर त्याला 'भारदस्त' कोरसची 'भक्कम' चौकट तर कधी उलट - म्हणजे 'रांगड्या' चालीला 'नाजूक' कोरसची कलात्मक नक्षी ! उडन खटोला मधील 'मोरे सैय्याजी उतरेंगे पार' म्हणजे तर कोरसमधील सृजनशीलतेची परिसीमाच! यात prelude व interlude म्हणून फक्त कोरसच वापरला आहे. 'हैय्या हो हैय्या रे हैय्या' हे शब्द किती वेगवेगळ्या प्रकारे दिले आहेत ते प्रत्येकाने मोजून बघायला हवेत. शिवाय कोरस दोन वेगवेगळ्या स्केल मध्ये वापरला आहे. त्यामुळे 'अंतराचा' आभास निर्माण होतो.

    "ज्यांचा गळा गायनासाठी फारसा 'तयार' नाही अशा कलाकारांकडून अजरामर गाणी गाऊन घ्यायची" हे त्यांच्या प्रतिभेचं आणखी एक द्योतक! उमादेवी ( अफसाना लिख रही हूँ), श्याम (तू मेरा चांद), करण दिवाण ( जब तुमही चले परदेस आणि सावनके बादलो), मंजू (अंगडाई तेरी है बहाना) या सगळ्यांना 'गायकाचा' मान नौशादजीनीच मिळवून दिला.

    माझे एक नौशादप्रेमी मित्र म्हणतात की रविंद्र संगीत , बंगाली संगीत याप्रमाणेच "नौशाद संगीत" ही एक स्वतंत्र व समृद्ध संगीत शाखा आहे. मला तरी यात काही अतिशयोक्ती वाटत नाही. मात्र या प्रगल्भ प्रतिभेच्या संगीतकाराच्या संगीताचा बारकाईने अभ्यास करता येईल असे सांगितीक ज्ञान माझ्याकडे नाही याची खंत मात्र सतत वाटते .

    -- धनंजय कुरणे
    08.05.2017

  • ललिता पवार

    ललिता पवार यांच्या व्यक्तिमंत्त्वात एकप्रकारचा नैसर्गिक खानदानी रुबाब असल्यामुळे त्यांच्या आवाजात हुकमी लय आहे आणि चेहर्‍यावरील विशिष्ट प्रकाराचा भाव असल्यामुळे खानदानी, तडफदार, सोजवळ तसेच प्रेमळ आणि खाष्ट अशा विरोधी भूमिकांही त्या यशस्वीपणे साकार करू शकल्या व त्यामध्ये नैसर्गिकता देकील पहायला मिळली.

  • (डॉ.) उदय सखाराम निरगुडकर

    ठाण्यातील एक हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देणारं पहिलं कॉल सेंटर सुरु करुन डॉ. निरगुडकरांनी एक नवा वस्तुपाठच घालून दिला आहे. तसेच संपूर्ण भारतातील ६०,००० अर्धशिक्षित तरुणांना स्वयंरोजगारासाठी क्षमतावृद्धीचे शिक्षण देऊन रोजगारासाठी समृद्ध केलं.

  • चरित्र अभिनेते नाना पळशीकर

    नाना पळशीकर हे केवळ आपल्या मुद्राअभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारे असामान्य चरित्र अभिनेते होते. मध्य प्रदेशात जन्म झाल्यामुळे त्यांच्यावर मराठीपेक्षा हिंदी भाषेचे संस्कार खूप होते. नाना पळशीकर यांनी १०० हून अधिक हिंदी व ४ मराठी चित्रपटात कामे केली. त्यांनी चित्रपटसृष्टीत नेहमी चरित्र भूमिका केल्या होत्या.

  • प्रभावी वक्ते व उत्तम लेखक शंकर धोंडो तथा मामा क्षीरसागर

    सुमारे ४०० वर्षांपूर्वी गोव्यातील सक्तीने ख्रिश्चन केलेल्या हजारो गावकऱ्यांचे शुद्धीकरण केले. या शुद्धीकरण आंदोलनात मामांचा सिंहाचा सहभाग होता. या घटनेचे सांगोपांग विवेचन करणारा ‘गोमंतक शुद्धीचा इतिहास’ हा ४०० पानांचा स्वतंत्र विस्तृत ग्रंथ मामांनी लिहिला. विशेष म्हणजे या ग्रंथाला, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची सुंदर प्रस्तावना लाभली.

  • एका जिद्दीचा प्रवास

    स्त्रियांना वर्ज्य असणार्‍या क्षेत्रातच एखादी स्त्री पाय रोवून उभी असेल तर नवल वाटेल ना! आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. त्याचप्रमाणे मर्चंट नेवीसारख्या कठीण समजल्या जाणार्‍या क्षेत्रात तरी महिला मागे कशा राहतील? या क्षेत्रात कामगिरी केलेल्या रेश्मा मुरकर या तरुणीचा हा जिद्दीचा प्रवास आपण अनुभवूया.

    p-34264-reshma-murkarएकतर आकाशात उडायचं किंवा पाण्यातून प्रवास करायचा अशी रेश्माची स्वप्नं होती. या स्वप्नांना साकार करण्यासाठी केवळ जिद्द लागते. जिद्दीशिवाय खडतर स्वप्न साकार करणं कठीणच. त्यातही सर्वसामान्य घरात जन्मलेल्या महिलांना तर ते त्याहून कठीण. लहानपणापासूनच विविध क्षेत्रांत आपलं नाव उमटवणा-या रेश्माला एका अशा क्षेत्रात काम करायचं होतं जिथे स्त्रियांनी जाण्याचं स्वप्नही पाहिलं नसेल.

    बारावी झाल्यावर नक्की कोणतं क्षेत्र निवडायचं याविषयी तिच्या मनात खलबतं सुरू होती. खरं तर तिला पायलट व्हायचं होतं. मात्र त्यावेळेस पायलटसाठी तिला प्रवेश मिळाला नाही. मात्र तिने हिरमुसून न जाता एका वेगळ्या करिअरचा शोध घेत राहिली. याच शोधात असताना र्मचट नेवीविषयी माहिती सांगणा-या व्याख्यानाबद्दल तिला कळलं. र्मचट नेवी हे क्षेत्र रेश्माला वेगळं वाटलं, त्यामुळे हे व्याख्यान ऐकण्याची तिची इच्छा झाली. व्याख्यानात या क्षेत्राविषयी तिने ऐकलेली माहिती तिला फार आवडली.

    काहीतरी आव्हानात्मक, कठीण, अशक्य करण्याची तिची धडपड या र्मचट नेवीच्या करिअरमुळे पूर्ण होणार होती. त्यामुळे आता याच क्षेत्रात तिला जाण्याची इच्छा झाली. या क्षेत्रात आल्यावर स्वत:चं वैयक्तिक आयुष्य लांब होतं. घरच्यांपासून वर्षानुवर्षे दूर राहावं लागतं. अथक परिश्रम आणि अभ्यास करावा लागतो. लहानपणापासून खेळ, नृत्य अशा गोष्टींमध्ये अव्वल असणारी रेश्मा आता मरिन क्षेत्रात जाऊ पाहत होती. आपली मुलगी इतरांच्या पावलांवर पाऊल न ठेवता स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण करतेय हे तिच्या पालकांना जाणवलं आणि त्यांनीही तिच्या या निर्णयाचं स्वागत केलं.

    मुळातच अभ्यासू विद्यार्थी असल्याने प्रत्यक्ष शिक्षणाला सुरुवात करण्याआधी तिने या क्षेत्रात येणा-या सर्व गोष्टी तपासल्या. म्हणजेच शिक्षण झाल्यावर नोकरी कशी मिळते, पगार किती असतो, सर्वात वरची पोस्ट कोणती? त्यासाठी किती अभ्यास लागतो? त्या अभ्यासाला किती वर्षे जातात? या सा-या गोष्टींची खातरजमा करून तिने अभ्यासाला सुरुवात केली.

    या मुलाखतीत ती बोलताना तिने सांगतिलं की, ‘मला एकतर आकाशात उडायचं होतं किंवा पाण्यावर राहायचं होतं. वस्तुत: जमिनीवर नसतानाही तिचे पाय आजही जमिनीवरच आहेत. वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी ती र्मचट नेवीमध्ये चिफ ऑफिसर आहे. नेहमीच्या मार्गावर चालून, १० ते ५ नोकरी करून घर-संसार सांभाळायचा एवढया माफक अपेक्षा मुलींच्या असतात. मात्र या अपेक्षांना छेद देत आपण मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे असं तिला वाटतं.

    या क्षेत्रात काम करण्याविषयी आणि काम करताना आलेल्या अडचणींविषयी तिला विचारलं असता ती म्हणाली की, ‘मुळातच या क्षेत्रात आजही पुरुषांची मक्तेदारी फार आहे. शिवाय आपल्या या क्षेत्रात महिलांनी प्रवेश करावा अशी काही लोकांची इच्छाही नसते. पुरुषांच्या समुदायात राहून त्यांच्यासोबत मिळून-मिसळून काम करणं फार कठीण आहे. त्यांच्यात समरस होण्यासाठीच फार वेळ लागतो. कठीण काम असल्यामुळे महिलांना एखादं काम जमणारच नाही अशी समजूत पुरुषांमध्ये असते. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करून त्यांचा विश्वास संपादन करणं सर्वप्रथम काम मानलं जातं. आपल्या सहका-यांचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रत्येकीला मानसिक, शारीरिक आणि भावनिकदृष्टया सक्षम राहणंही तितकंच गरजेचं आहे.’ पुढे ती म्हणाली, ‘शिपमध्ये असल्यामुळे निसर्गातले अनेक चमत्कार मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहेत. सूर्य क्षितिजाला जाताना त्याचा होणारा लालबुंद रंग म्हणजे नैसर्गिक जादूच वाटते. असे विविध निसर्गातील चमत्कार नेहमी अनुभवता आले.’

    ‘जेव्हा मी पहिल्यांदाच बोर्ड-शिपवर गेले तेव्हा प्रत्येक ऑफिसर मला एकच प्रश्न विचारत होते की, का तू र्मचट नेव्हीमध्ये यायचं ठरवलंस? या निर्थक प्रश्नांमुळे मी कधीकधी खूप डिस्टर्ब व्हायचे, शिवाय माझ्यातला आत्मविश्वासही कमी व्हायचा. आजही महिलांना त्यांना आवडत्या क्षेत्रात जाण्यासाठी जर कष्ट पडत असतील तर महिलांनी केवळ चूल आणि मूल याच संकल्पनेत रमायचं का?’ असं ती म्हणते.

    ‘र्मचट नेवीमध्ये करिअर करण्याचा माझा निर्णय किती चुकीचा आहे असं काहींनी मला येथे जाणवून दिलं. मात्र या टिपिकल संकल्पनेतून मला समाजाला बाहेर काढायचं होतं. कालांतराने माझं काम पाहून माझ्या वरिष्ठांनी माझ्यावर विश्वास ठेवला. पुरुषांप्रमाणे मीही काम करू शकते, असं त्यांना जाणवलं आणि अल्पावधीतच माझे वरिष्ठ माझ्यावर विश्वासाने काम सोपवू लागले. र्मचट नेवीमध्ये पुरुषांची मक्तेदारी आहे हे सिद्ध करण्यासाठी दुसरं उदाहरण द्यायचं झालंच तर मी जेव्हा तिकडे रुजू झाले त्यावेळेस माझ्या मापाचे युनिफॉर्म तिथे उपलब्धच नव्हते,’असं रेश्मा सांगत होती.

    रुळलेल्या वाटेवरून न जाता स्वत:ची वेगळी वाट निर्माण करणं खरं तर फार अवघड काम आहे. वेगळी वाट धरणा-या महिलांच्या आयुष्यात अनेक संकटंही येतात; मात्र ती संकटं दूर सारून त्यातूनही नवा दृष्टिकोन साधून जी स्त्री नैया पार करते तिलाच आजची खरी सक्षम स्त्री म्हणायला हवं, त्यामुळे रेश्मा मुरकरही त्यापैकीच एक आहे. आज ती र्मचट नेवीमध्ये चीफ ऑफिसर पदावर आहे.

    विचार केला नसेल अशा सुख-सुविधा तिच्या पायाशी लोळतायत. या सा-या यशामागे तिच्या आई-वडिलांनी तिला मोलाची साथ दिली म्हणून ती पुढे जाऊ शकली असं ती अभिमानाने सांगते. खेळ, कला आणि अभ्यास अशा सा-या गोष्टींचा यथासांग मेळ घालत तिने तिची सारी स्वप्नं पूर्ण केलीत. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात रेश्माने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली हे आजच्या महिला दिनाच्या दिवशी सांगणं म्हणजे फार कौतुकाची गोष्टच ठरेल ना!

    -- स्नेहा कोलते