(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • आंतरराष्ट्रीय पंच बिली बावडन

    किस्सा असा आहे की बिली बावडनला झालेला तो आजार म्हणजे rheumatoid arthritis म्हणजेच संधिवात. बिलीला संधिवाताने ग्रासले अणि त्याला स्नायूंच्या हालचाली करणे अवघड जाऊ लागले. त्यामुळे त्याला इतक्या तरुण वयात क्रिकेट सोडावे लागले. पुढे बिली अंपायर झाला अणि तिथे सुद्धा त्याला संधिवाताचा त्रास होऊ लागला. त्याला पटकन हात वरती करता येत नाहीत, एकाच ठिकाणी स्तब्ध उभे राहिले की त्याला परत हालचाल करणे कठीण जाते. अंग दुखू नये म्हणून त्याला थोड्या थोड्यावेळाने स्ट्रेचिंग करण्याचे डॉक्टरांचे निर्देश आहेत. आता बिली परत त्याचे काम सोडू शकत नव्हता. यावेळेस त्याने लढायचे ठरवले आणि त्याने त्याच्या अंपायरिंग मध्ये कराव्या लागणाऱ्या हालचालींमध्ये काही कल्पक बदल केले.

  • महादेव नामदेव अदवंत

    समीक्षक महादेव नामदेव अदवंत यांचा जन्म ६ जून १९१४ रोजी झाला.

    लघुकथाकार म्हणून कारकीर्द सुरु केलेल्या अदवंतांचे नाव झाले ते “माणुसकीचा धर्म”, “मनाची मुशाफिरी”, अशा लघुनिबंध संग्रहांमुळे. सहा शाहिरांचे “पैंजण”, “विनायकांची कविता”, “दहा कथाकार” अशी संपादने त्यांनी केली.

    # Adawant, Mahadev Namdev
    # अदवंत, महादेव नामदेव

  • प्रिती प्रदीप मोकाशी

    चीन येथे झालेल्या ज्युनिअर सर्कीट स्पर्धेत भारतातर्फे प्रतिनिधीत्व करुन देणारी जागतिक क्रमवारीत भारताला ५ वे स्थान मिळवून देण्याची किमया करणारी ठाण्याची प्रिती प्रदीप मोकाशी म्हणजे ठाण्याचा गौरवच आहे.

  • ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे

    ढेरे यांच्या लेखनाचा प्रारंभ झाला तो साधारण १९४८ मध्ये, वयाच्या अठराव्या वर्षी कवितेतून. पुढे दोनच वर्षांत, १९५० मध्ये त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरील पुस्तिका प्रकाशित केली.

  • कृष्णकांत दळवी

  • व. ह. पिटके

    ग्रामीण कादंबरी लेखन या प्रांतामध्ये अग्रक्रमाने घेतले जाणारे नाव म्हणजे व. ह. पिटके . ग्रामीण जीवनाची स्पंदने अचूकपणे रेखाटणार्‍या तसंच १९६० नंतर महाराष्ट्रातल्या खेडयांतील राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक पटलांवर औद्योगिकरणाचे झालेले मुलभूत व महत्त्वपूर्ण बदल, रसिकांपर्यंत पोहोचविणे हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. आभ्यासपुर्ण कल्पकतेने व संशोधनपूर्वक उमटवलेली लेखणी हा त्यांच्या प्रत्येक पुस्तकाचा गाभा होता.

    “शिदोरी“ ही त्यांची, १९६९ साली प्रकाशित झालेली व ग्रामीण भागातील नव्याने उदयास आलेली सत्तास्पर्धा रोमांचकपणे उलगडून दाखविणारी कादंबरी, सृजनशीलतेचं उत्तम उदहारण म्हणता येईल. त्याकाळात वाचकवर्गाने या कादंबरीचे भरभरुन प्रतिसाद दिला होता.

  • क्रिकेटपटू चंदू बोर्डे

    बोर्डे सर म्हटले की डोळ्यासमोर एक नाव येते ते म्हणजे विजय हजारे यांचे कारण विजय हजारे यांच्या शैलीमध्ये ते खेळायचे .

  • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू

    शाळेत असल्यापासून आरती प्रभू या नावानेच कविता करत होते आणि त्यांची पहिली कविता श्री. पू. भागवत यांनी सत्यकथेत छापली होती. त्यांचा जन्म ८ मार्च १९३० रोजी कुडाळ येथे झाला. आरती प्रभू यांच्या आईंचे कुडाळला ‘विणा गेस्ट हाऊस ’होतं, आणि खानावळ होती. कोकणातील गावी त्यांच्या मातोश्री खानावळ चालवीत. तेथे गल्ल्यावर बसुन मा.आरती प्रभू कविता करत. त्यांच्या खानावळीत जेवायला येणार्या काही मंडळींनी त्यांच्या कवितेचे काही कागद चोरून त्या कविता आरती प्रभू या नावाने 'मौज' मधे छापण्यास पाठवुन दिल्या. मौज' च्या अंकात आपल्या कविता प्रकाशित झाल्याचे बघून मा.आरती प्रभू बावरून गेले. प्रथम लोणावळ्याच्या वसतीगृहात ते नोकरीला होते. बहुतेक त्यावेळीच त्यांनी कर्जतला जागा घेतली. लोणावळ्याची नोकरी सुटली. मग काही वर्षे त्यांनी आकाशावाणीत नोकरी केली. ते काही वर्षे युनिव्र्हसिटीत होते, मात्र कुठल्याच नोकरीत त्यांनी स्वत:ला अडकवून घेतलं नव्हतं. नोकरी सोडताना आपल्या कुटुंबाचे अथवा स्वत:चे त्यांना भान नसायचे. त्यांच्यातील कवी निसर्गात आकंठपणे बुडालेला होता. त्यामुळे त्यांच्या बहुतेक सर्व कवितांमध्ये निसर्गच चित्रित केलेला असत. अशा त्यांच्या या कवितांचा कवितासंग्रह जोगवा मौज प्रकाशनाने प्रकाशित केला. क्षणात प्रतिभेचे तेजनृत्य तर क्षणात विक्षिप्त स्वभावाची कतृत्त्वावर मात, असा नियतीचा सतत चाललेला खेळ त्यांना सातत्याने अनुभवावा लागला. श्री. पु. भागवत, मंगेश पाडगांवकर, मधु मंगेश कर्णिक, विजय तेंडुलकर यांच्यासारख्या प्रतिभावंत मित्रांनी खानोलकरांच्या प्रतिभेचा चमत्कार ओळखून त्यांना सतत मदत केली. त्यांच्या गीतांना चाली लावण्यासाठी स्वतः हृदयनाथ मंगेशकर पुढे आले आणि या दोन प्रतिभावंताच्या किमयेतून ‘ये रे घना', ‘नाही कशी म्हणू तुला’सारखी गीते अमर झाली. सतत कवितेच्या धुंदीत वावरणारा या माणूसाने ‘रात्र काळी घागर काळी’ सारखी कादंबरी लिहिली ‘ माकडाला चढली भांग ’नाटकाला त्यांना अंत्र्याकडून शाबासकीही मिळवली. आधुनिक नाटककारांबद्दल काही माहिती नसताना केवळ अभिजात प्रतिभेने ‘एक शून्य बाजीराव’ सारखे त्यांनी नाटक लिहिले आणि रंगायन सारख्या संस्थाने ते रंगभूमीवर आणले. कोंडूरा या त्यांच्या कादंबरीचा विषय अजब होता आणि त्या कादंबरीवर मा. सत्यजित रे यांना पण चित्रपट काढवा असे वाटते. त्याच्या चानी या कादंबरी ही मा.व्ही.शांताराम यांना मोहात टाकते व ते चानी हा चित्रपट काढतात. त्यांचे अजब न्याय वर्तुळाचे या नाटकाचे प्रयोग जर्मनी पण झाले. "नक्षत्रांचे देणे" साठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळाला. आरती प्रभू यांचे २६ एप्रिल १९७६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    आरती प्रभू यांच्या कन्या सौ. हेमांगी नेरकर यांच्याशी साधलेल्या संवादातून आरती प्रभू यांचे व्यक्तिमत्त्व प्रहार मधील लेख वाचण्यासाठी क्लिक करा.

    http://prahaar.in/%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%B2/

  • ज्येष्ठ चित्रकार आर.व्ही. ऊर्फ बाबा पाठक

    बडोद्याहून इ.स. १९४० मध्ये मुंबईत आल्यानंतर बॉम्बे आर्ट सोसायटी गॅलरीमध्ये बाबा पाठक यांनी भरविलेले प्रदर्शन खूप गाजले होते. हा काळ स्वातंत्र्यसमराचा होता. त्यापासून अलिप्त राहणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी पुण्यात आल्यावर स्वातंत्र्यचळवळीत उडी घेतली. त्यांच्या अटकेचे वॉरंट निघाल्यावर बाबा काही वर्ष भूमिगत राहिले.

  • निर्माता, दिग्दर्शक,कथा व पटकथा लेखक एन. चंद्रा

    एन. चंद्रा हे मुळचे गोव्याचे, एन.चंद्रा यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर नार्वेकर, रोजगारासाठी एन.चंद्रा यांचे वडील मुंबईत गेले व तिथेच स्थायिक झाले.

    एन चंद्रा हे मराठी मध्यमवर्गीय कुटुंबातील. त्यांचा जन्म ४ एप्रिल १९५२ रोजी झाला.एन चंद्रा यांची आई बृहन्मुंबई महानगरपालिकेत क्लार्क तर वडील फिल्म सेंटर लॅबमधील ब्लॅक अँड व्हाइट डिपार्टमेंटचे प्रमुख. आईला प्रवासाची अत्यंत आवड. शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी सायन्स साइडला कॉलेजात प्रवेश घेतला व नंतर वडिलांच्या मदतीने फिल्म सेंटर लॅबमध्ये त्या काळातील प्रसिद्ध चित्रपट संकलक वामन भोसले व गुरुदत्त यांचा सहाय्यक म्हणून संकलन डिपार्टमेंटमध्ये नोकरी केली. त्यादरम्यान वामन भोसले ‘मेरे अपने’ या गुलजार दिग्दर्शित चित्रपटाचं संकलन करीत होते व एन चंद्रा त्यांना सहाय्य करीत होते.

    एडिटिंगच्या काळात बऱ्याचदा गुलजार साहेब लॅबमध्ये येत असत. ‘मेरे अपने’चं एक शेडय़ुल सुरू होतं तेव्हाचा हा प्रसंग. शॉटची सर्व तयारी झाली. गुलजारनी ‘स्टार्ट साऊण्ड’ असं म्हटलं परंतु शॉट सुरू होण्यापूर्वी क्लॅप द्यावा लागतो तो क्लॅपर बॉयने दिलाच नाही. ‘अरे, क्लॅपर बॉय कुठे आहे?’ अशी सेटवर शोधा शोध सुरू झाली. तर क्लॅपर बॉय सेटवर नव्हता व क्लॅपही नव्हता. काही क्षणांतच कळलं की क्लॅपर बॉय स्टुडिओच्या कँटीनमध्ये ज्युनिअर आर्टिस्ट मुलीशी गप्पा मारत बसला आहे. बस्स्, हे कळल्यावर गुलजार यांच्या रागाचा पारा इतका चढला की त्यांनी त्याच क्षणी क्लॅपर बॉयची हकालपट्टी केली. ही गोष्ट ‘फिल्म सेंटर’मध्ये एन चंद्रा यांच्या कानावर आल्यावर त्यांनी गुलजार यांना क्लॅपर बॉय म्हणून काम करण्याबाबत विचारायचं ठरवलं. व ते गुलजार यांना क्लॅपर बॉयचे काम करू लागले.

    ‘मेरे अपने’नंतर गुलजार यांनी ‘परिचय’ हा चित्रपट सुरू केला. त्यात एन चंद्रा यांनी गुलजार यांचे असिस्टंट म्हणून काम केले. नंतर एन चंद्रा यांनी १०-११ वर्षे गुलजार यांच्या बरोबर ‘आंधी’, ‘कोशिश’, ‘खुशबू’, ‘मौसम’, ‘किनारा’, ‘किताब’, ‘नमकीन’, आदी चित्रपट केले.

    एन. चंद्रा यांनी चित्रपटसृष्टीत संकलक, दिग्दर्शक, निर्माता, कथा व पटकथा लेखक अशा विविधांगी भूमिका पार पाडल्या आहेत. त्यांचे सामाजिक, राजकीय निरीक्षण सूक्ष्म असून ते परिणामकारकरित्या कथा, पटकथेत गुंफतात. त्यामुळे त्यांचे सुरवातीचे प्रतिघात, अंकुश, तेजाब हे चित्रपट आजही अपील होतात.

    एन चंद्रांची खरी ओळख म्हणजे ‘अंकुश’ हा चित्रपट. वर्तमानकालिन सामाजिक परिस्थितीचा योग्य वापर करून त्याचा कुशल उपयोग चंद्रांनी चित्रपटात केला.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    एन. चंद्रा यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट
    प्रतिघात, अंकुश, तेजाब, नरसिंहा, तेजस्विनी, युगांधर, हमला, बेकाबू, वजूद, स्टाईल, एक्सक्यूज मी, शिकारी, कगार-लाईफ ऑन द एज

    Chandrashekhar Narvekar, N. Chandra