जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
मराठी साहित्यक्षेत्रात आपल्या कवितांनी एक वेगळा ठसा उमटवलेले कवी डॉ. महेश वासुदेव केळूसकर हे ही ठाण्याचेच रहिवासी आहेत. मुळचे सिंधुदुर्गचे असणारे केळूसकर ठाण्यातील साहित्य – सांस्कृतिक क्षेत्रात ग्रंथालय चळवळीसाठी भरीव योगदान देत आहेत.
पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी होते. पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी हे अर्धे शहाणे समजले जात. त्यांचा जन्म १२ फेब्रुवारी १७४२ रोजी सातारा येथे झाला. नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील होते. बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना मिळाले. वयाच्या २० व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले. आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. इंग्रजांचा पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले. थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी महादजी शिंद्यांच्या मदतीने त्यांनी पुन्हा रूळावर आणली आणि दक्षिणेतील मराठी सत्तेचं वर्चस्व टिकवून ठेवले. पुण्याचे वैभव वाढवले. सवाई माधवराव पेशव्यांच्या अपघाती निधनानंतर सात-आठ महिने नानांनी तुरुंगवासही भोगला. वाई येथे नाना फडणीसांचा वाडा आजही आहे.
नाना फडणवीस यांची नऊ लग्ने झाली होती. नानांचे पहिले लग्न दहाव्या वर्षी झाले होते या स्त्रीचे नाव यशोदाबाई. नानांच्या नऊ बायकांपैकी सात त्यांच्या हयातीत वारल्या. नाना फडणवीस यांचे १३ मार्च १८०० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
सागर सादर करत असलेले ‘चला हवा येऊ द्या’ मधील पोस्टमन काका हे प्रेक्षकांच्या मनातील हळवा कोपरा आहेत. हे पोस्टमन काका प्रेक्षकांच्या अश्रूंना वाट मोकळी करून देतात. हीच खऱ्या अर्थानं सागरमधील अभिनेत्याला मिळालेली दाद आहे…
एस.एम. यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची सुरुवात स्वातंत्र्य चळवळीतूनच झाली. काही विशिष्ट ध्येये, जीवनमूल्ये आणि निष्ठा घेऊनच एस.एम. जोशी यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला.
थोरले माधवराव पेशवे हे त्यांचे नाटक मराठीतले पहिले इतिहासाधारित नाटक आणि मराठीतील पहिली शोकांतिका मानले जाते. या दोन नाटकांनी नाट्यसृष्टीत त्यांना मानाचे पान देण्यात आले.
आपल्या भारत देशाने जगाला अनेक गणितज्ञ आणि खगोल वैद्यानिक दिले आहेत. अश्या थोर असामी पैकी एक आहेत डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर. डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर हे एक थोर शास्त्रज्ञ तर आहेतच पण उत्तम लेखकही आहेत. त्यांनी फक्त विज्ञान विषयावर गंभीर पुस्तकेच नाही लिहिली तर विज्ञानाची छटा असलेल्या कादंबऱ्या सुद्धा लिहिल्या आहेत. जयंत विष्णू नारळीकर यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या.
अभिनयापासून नाट्यस्पर्धांच्या आयोजनापर्यंत अनेक भूमिकांत रमणारे अनंत घोगळे हे एक वल्ली आहेत. नाट्यचळवळीची गौरवशाली परंपरा अखंड सुरू राहावी म्हणून अनेकजण धडपडत असतात. काही पडद्या समोर तर काही मागे! जे सतत प्रकाश- झोतात असतातत्यांना प्रसिद्धीचं वलय लाभतं, पडद्या-मागचे कलाकारांच योग्दान मात्र दुर्लक्षितच राहतं. ‘औट घटकेच्या’ या नाट्यावकाशात काही मंडळींनी ही तफावत मनोमन स्वीकारलेली असते. त्यांच्या दृष्टीने नाट्यसेवा हे एक प्रकारचं व्रत असतं. घेतला वसा टाकणार कसा, असाच त्यांचा बाणा असतो.
शिवपुत्र संभाजी या ग्रंथाच्या कर्त्या . सत्यकथा मासिकातून पुस्तक परीक्षणे, कथा, व्यक्तिचित्रे तसेच तात्कालिक वाङमयीन घडामोडींवर त्यांनी लेखन केले.
अनुपम खेर यांचे वडील सरकारी क्लार्क होते. मा.खेर यांचे प्राथमिक शिक्षण सिमला येथील D.A.V प्रशालेत झाले. त्यांचा जन्म ७ मार्च १९५५ रोजी झाला.नंतर महाविद्यालयीन शिक्षण दिल्ली विद्यापीठातून केले. कलेची आवड असल्यामुळे नाटक व रंगमंचाची आवड त्यांना होती. अभिनयात करियर करण्याच्या हेतूने ते मुंबईला आले. हॉलीवूड, बॉलीवूड दोन्ही आघाडय़ांवर कार्यरत राहून निर्माता, दिग्दर्शक, शिक्षक आणि अगदी लेखकाच्या भूमिकेतूनही वावरणाऱ्या अभिनेता अनुपम खेर यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरवात १९८२ साली “आगमन” या चित्रपटाने झाली. पण १९८४ सालचा महेश भट्ट दिग्दर्शित ‘सारांश’ या चित्रपटाने मा.अनुपम खेर यांचे नाव झाले. ‘सारांश’मध्ये बी. व्ही. प्रधान या शाळेच्या निवृत्त झालेल्या मुख्याध्यापकांची भूमिका करायची होती. या भूमिकेसाठी निर्मात्यांना कोणी तरी प्रसिद्ध आणि अनुभवी कलाकार हवा होता. त्या वेळी या भूमिकेच्या मानाने तरुण असलेल्या अनुपम खेर यांनी ही भूमिका आपण उत्तम वठवू शकू, असा विश्वास दिला होता. अनेक घडामोडींनंतर अखेर ही भूमिका त्यांच्या पदरी पडली आणि त्यांची कारकीर्द सुरू झाली. बॉलीवूडमध्ये ‘हम आपके है कौन’, ‘डॅडी’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ सारख्या व्यावसायिक चित्रपटांपासून ते ‘वेनस्डे’, ‘स्पेशल २६’, ‘खोसला का घोसला’, ‘मैने गांधी को नही मारा’सारख्या वेगळ्या वाटेवरच्या चित्रपटांमधूनही त्यांनी भूमिका केल्या आहेत. बॉलीवूडप्रमाणेच हॉलीवूडमधलीही त्यांची वाट जुनीच आहे. ज्या वेळी ओम पुरी, नसीरुद्दीन शहा यांच्यासारखे मोजकेच कलाकार हॉलीवूडमध्ये काम करत होते त्याच वेळी अनुपम खेर यांनी तिथली वाट धरत ‘बेंड इट लाईक बेकहॅम’, अँग लीचा ‘लस्ट, कॉशन’ आणि वूडी अॅडलनचा ‘यू विल मीट अ टॉल डार्क स्ट्रेंजर’ अशा हॉलीवूडपटांमधून काम केलं होतं. अकॅडमी अॅशवॉर्ड विजेता ठरलेला रॉबर्ट डी निरो यांचा ‘सिल्वर लाइनिंग्ज प्लेबुक’ हा त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरलेला हॉलीवूडपट आहे. त्याशिवाय, हॉलीवूड अभिनेता गेरार्ड बटलर बरोबर ‘द हेडहंटर कॉलिंग’ या मार्क विल्यम दिग्दर्शित हॉलीवूडपटातही त्यांनी काम केलं असून हे दोन्ही चित्रपटाही त्यांनी काम केले आहे. अनुपम खेर यांनी ५०० हून अधिक चित्रपटात व १०० हून अधिक नाटकात काम केले आहे. पाचशेव्या चित्रपटाचं नाव ‘द बिग सिक’ असं असून मायकेल शोवॉल्टर दिग्दर्शित या चित्रपटात ऑस्कर विजेता अभिनेता हॉली हंटर, झो काझन आणि रे रोमानो हे हॉलीवूड कलाकार काम केले आहे. मा.अनुपम खेर यांना ५ वेळा बेस्ट कॉमिक रोल साठी फिल्मफेयर चा अवार्ड मिळालेला आहे. चित्रपट विजय साठी त्यांना बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर चा फिल्मफेयर अवार्ड मिळाला आहे. एक अभिनेता असण्यासोबत ते भारतीय सेन्ट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टीफिकेशन नेशनल स्कूल ऑफ ड्रामा इंडिया चे अध्यक्ष पण राहिले आहेत. हिंदी सिनेमा आणि कला क्षेत्रात अमूल्य योगदानासाठी भारत सरकारने २००४ मध्ये त्यांना पदमश्री व वर्ष २०१६ मधेच पद्मभूषण देवून सन्मानित केले आहे. त्यांचे संपूर्ण परिवार अभिनय क्षेत्रात आहे. त्यांची पत्नी एक उत्कृष्ट अभिनेत्री व चंदिगढ येथून संसद सदस्य आहेत. त्यांचा मुलगा सुद्धा हिंदी सिनेमात अभिनेता आहे.
अनुपम खेर भारतीय फिल्म सेंसर बोर्ड चे अध्यक्ष सुद्धा राहिले आहेत. ते भारतीय नेशनल स्कूल ऑफ ड्रामा चे अध्यक्ष सुद्धा होते. १९७८ मध्ये याचे ते विद्यार्थी सुद्धा होते. २००७ मध्ये अनुपम खेर यांचे प्रिय मीटर सतीश यांच्या सोबत मिळून करोल बाग फिल्म प्रोडक्शन कंपनी स्थापन केली. या प्रोडक्शन खाली तेरे संग हि पहिली फिल्म होती. २०११ मध्ये मल्याळम अभिनेता मोहनलाल आणि अभिनेत्री जयाप्रदा सोबत मल्याळम भाषी रोमांटिक ड्रामा प्राणायाम चित्रपट सुरु केला होता. त्यांनी मराठीतही अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. याशिवाय पंजाबी, कश्मीरी, मल्याळम भाषांच्या विविध अंगाने अभिनय केला आहे. २००९ मध्ये कार्ल फ्रेड्रिंकसन यांच्यासाठी उडी मधील अनिमेशन मधील बांगलादेश निर्मिती वरील ड्रामा फिल्मसाठी करारबद्ध केले गेले आहे. २०१६ मध्ये ABP न्यूज वरील भारताच्या इतिहासाची ओळख सांगणाऱ्या डॉक्युमेंटरीचे सूत्र संचालन केले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
बा.सी. मर्ढेकर हे मराठी कवी, लेखक होते
Copyright © 2025 | Marathisrushti