(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • सुभाष परशुराम रासम

    ठाणे शहरात फार थोडी अशी व्यक्तिमत्व आहेत जी अष्टपैलू म्हणून गणली जातात. त्यापैकीच एक म्हणजे सुभाष परशुराम रासम हे होय! बी.ए. पदवीधर, इंटिरीयर डिझायनर, वास्तुशास्त्र पदविका, ज्योतिशास्त्र विशारद अशा विविध क्षेत्रांतील पदव्या आणि पदविका रासम यांनी प्राप्त केल्या आहेत आणि या सर्वच क्षेत्रात ते कार्यरतही आहेत.

  • सुमित्रा महाजन

    सुमित्रा महाजन ह्या विद्यमान लोकसभा सभापती आहेत.

  • सुरेश खानापूरकर

    धुळे जिल्ह्यात जिथे अवर्षण नित्याचे झाले होते, त्या भागात आता लोक वर्षाला तिसर्‍या पिकाचा विचार करु लागल्याचे चित्र शिरपूर पॅटर्नमुळे तयार झाले. भूगर्भाच्या अचूक अभ्यासाने जमिनीची अॅंजिओप्लास्टी करण्याचे अभिनव तंत्र भूगर्भशासस्त्रज्ञ सुरेश खानापूरकर यांनी इथे विकसित केले. शिरपूर पॅटर्न नावाने ओळखली गेलेली या जलक्रांतीचा प्रसार आता राज्यभर होतो आहे.

    शिरपूर पॅटर्नचा जनक

  • सुभाष आंदे

    सुभाष आंदे

    पाणी शुद्ध करण्यासाठी ‘नीरी-झर’ ही गावातल्या माणसालाही पुराचे गढूळ पाणी शुद्ध करता येईल अशी ही सोपी पद्धत त्यांनी विकसित केली.

  • सुरेश साळुंखे

    बैलगाडीला डिस्कब्रेक बसविणे किंवा बुलेटला डिझेलचे इंजिन असे कल्पक तांत्रिक प्रयत्न सांगली जिल्ह्यातील शेतकरी सुरेश साळुंखे करीत असतात. त्यांनी आता ऊसतोडणीसाठी ट्रॅक्टरच्या आकाराचे बहुपयोगी यंत्र बनविले आहे...

    सुरेश साळुंखे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला ऊसतोडणीची यांत्रिक किमया हा लेख पुढील पानावर वाचा.

    सुरेश साळुंखे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला ऊसतोडणीची यांत्रिक किमया हा लेख वाचा.

    salunkhe-suresh-modified

  • सुनीती अरविंद काशीकर

    सुनीती अरविंद काशीकर

    आपल्या मनातील ठाण्याविषयी सौ. सुनिती काशीकर अगदी मन मोकळेपणाने बोलतात. त्या म्हणतात की, त्यांच्या जन्मापासूनच ठाणे अनुभवलं आहे. पूर्वीचं ठाणं हे तलावाचं ठाणं, वेड्यांचं हॉस्पिटल असलेलं ठाणे म्हणून ओळखलं जाई. आजचं ठाणे हे मुंबई पाठोपाठ विकसित झालेलं एक महानगर म्हणून ओळखलं जात आहे.

  • सुरेंद्रनाथ निफाडकर

    मराठी माणसं या मासिकाचे सह-संपादक. १९७१ ची रोमांचक युद्धगाथा या पुस्तकाचे लेखक.

  • सुनीता धुमाळे

    दूरदेशी अमेरिकेत गेल्यावर आपल्या प्रीतीच्या पाखराकडून झालेले अत्याचार किंवा विवाहबंधनात कटू अनुभव आल्यास तेथील महिलांना असहाय वाटते. त्या आत्मविश्वास हरवुन बसतात. अमेरिकेत स्थायिक झालेल्या सुनीता धुमाळे यांनी अशा संकटात सापडलेल्या महिलांना हक्काची मैत्रीण म्हणून हेल्पलाईन सुरु केली. त्या माध्यमातून गेली १४ वर्षांत हजारो मुलींना मदत तर मिळालीच, पण आयुष्यात पुन्हा उभे राहण्याचा विश्वास त्यांच्या मनांत जागा झाला.

    सातासमुद्रापारची 'मैत्रीण'

  • सुधीर भट

    नाट्यनिर्माता संघाचा अध्यक्ष, नाटकांच्या तारखा आणि तिकीविक्री या विषयावर स्वतःची मते ठामपणे मांडणारा निर्माता म्हणून सुधीर भट यांची विशेष ओळख होती व राहील. त्यांनी गोपाळ अलगेरी यांच्या साथीने सुयोग या नाट्यसंस्थेची १ जानेवारी १९८५ मध्ये स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत ८० पेक्षा जास्त नाटके, १६ हजाराहून अधिक प्रयोग आणि एकहजार प्रयोगांचा टप्पा ओलांडणार्‍या आठ नाटकांची निर्मिती त्यांनी केली.

  • सुनील प्रभू

    प्रभू, सुनील

    सर्वसामान्य कुटुंबातील अनेकांना असामान्य पदांवर विराजमान करण्याची किमया शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे. त्यापैकीच एक म्हणजे सुनील प्रभू. अलीकडेच झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप-रिपाइं महायुती यशवंत ठरली असून पुरेसे संख्याबळ पदरी असल्यामुळे महायुतीचे महापौरपदाचे उमेदवार सुनील प्रभू यांचा विजय निश्चित झाल्यात जमा आहे.

    जोगेश्वरी येथील अरविंद गंडभीर शाळेत आणि त्यानंतर इस्माईल युसूफ महाविद्यालयात कला शाखेत बारावीपर्यंत शिक्षण आणि पुढे औद्योगिक तंत्रशिक्षण पदविका मिळविणाऱ्या सुनील प्रभू यांनी स्थानिक पातळीवरील गटनेते पदापासून राजकीय कारकीर्दीस सुरुवात केली. हाती घेतलेले काम जिद्दीने पूर्ण करण्याचे कसब असलेल्या सुनील प्रभू यांची हुन्नरी माजी गृहराज्यमंत्री गजानन कीर्तिकर यांनी हेरली. कीर्तिकरांनी त्यांना विधानसभा निवडणुकीच्या संदर्भातील काम पाहण्याची सूचना केली. या संधीचे सुनील प्रभू यांनी सोने केले. परिणामी शासन यंत्रणेतील कामकाजाचे धडे त्यांना तेथे मिळाले. हे काम करीत असतानाच शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांची त्यांच्यावर नजर पडली आणि त्यांचे नशीब फळफळले. १९९७ मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले. त्या वेळी शिवसेनेने त्यांना उमेदवारी देऊन पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. पक्षाने टाकलेल्या विश्वासाला त्यांनी तडा जाऊ दिला नाही. भरघोस मतांनी ते निवडून महापालिकेत गेले. विधानसभा निवडणूक कामाचा अनुभव गाठीशी होता. त्यामुळे महापालिकेतील कामकाज शिकून घेण्यासाठी त्यांना फारसा अवधी लागला नाही. त्यानंतर महापालिकेच्या सलग चार निवडणुकांमध्ये निवडून येण्याचा मान मिळविला. पक्षाने त्यांच्यावर दोन वेळा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी टाकली आणि ती त्यांनी यशस्वीपणे पेलली. त्यापाठोपाठ महापालिका सभागृह उपनेता, स्थायी समिती अध्यक्षपदाची धुरा तसेच सभागृह नेतेपदाची जबाबदारी प्रदीर्घ काळ सांभाळली. सभागृह नेते असताना विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी त्यांनी परतवून लावल्या. आता ९ मार्च रोजी निवडणुकीची औपचारिकता पूर्ण होताच सुनील प्रभू यांच्या शिरावर महापौरपदाचा मुकुट चढणार आहे.