लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. इयत्ता सातवीत असताना त्यांनी ‘मोरूची मावशी’ नाटकात मावशीची भूमिका साकारली.
१८९५ पासून त्यांच्या मृत्युपर्यंत २४ वर्षे टिळकांनी ख्रिश्चन धर्मप्रसारक म्हणून काम केले. या काळात त्यांनी १०० हून अधिक भक्तीगीते, ओव्या, अभंगांची रचना केली तसेच त्यांनी २,१०० हून अधिक कविता आणि ख्रिस्तायन नावाचे महाकाव्य लिहिले.
सामाजिक कार्याचा जन्मजात वारसा लाभलेले आणि मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून ६० व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतलेले श्रीराम कृष्ण नानिवडेकर हे ठाण्यातलं एक महत्वाचं व्यक्तिमत्व!
जसे प्रत्येक शहरात सामाजिक बांधिलकी मानून निरपेक्षपणे सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते असतात, त्याचप्रकारे माणूसकीच्या नात्याने ठाण्यात समाजकार्याचा वसा श्रीराम नानिवडेकर यांनी जपला आहे. मूळचे मेकॅनिकल इंजिनिअर असलेले भाऊ घरच्या परंपरेप्रमाणे सामाजिक कार्यातही सहभागी झाले. २०/२५ वर्षे महाराष्ट्राबाहेर नोकरी करुन १९८४ सालापासून भाऊ ठाण्यातील गणेशवाडी भागात वास्तव्य करत आहेत.
भाऊंचे वडील महात्मा गांधींच्या आश्रमात ३ वर्षे राहून आलेले ! तसेच १९४२ साली स्वातंत्र चळवळीत त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. असा सामाजिक कार्याचा जन्मजात वारसा घेऊन आलेले भाऊ, लहानपणापासूनच सामाजिक कार्यात सहभागी होत आले आहेत. भाऊ स्वत: नेहमीच महाराष्ट्र मंडळ व इतर सामाजिक उपक्रमांत भाग घेत असत. अशा या भाऊंनी “आनंदवन स्नेही मंडळ” “विद्यादान सहाय्यक मंडळ” अशा सामाजिक संस्थांची स्थापना केली. ज्या संस्थांचं ठाण्यातील सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान आहे.
२००३ साली बाबा आमटे यांच्या आनंदवनासाठी काम करणारे “आनंदवन स्नेही मंडळ” त्यांनी स्थापन केलं. आज मंडळाचे सुमारे १०० कार्यकर्ते मुंबई व सर्व उपनगरांत कार्य करीत आहेत. त्याचप्रमाणे २००८ साली स्थापन केलेल्या “विद्यादान सहाय्यक मंडळा” द्वारे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली जाते. आज संस्थेने ७६ विद्यार्थी (आठवीपासून बी.ई. / एम्.बी.ए. पर्यंतचे) दत्तक घेतले असून त्यांच्यासाठी संस्थेने १०-११ लाख रुपयांचं अंदाजपत्रक केलं आहे. अशा या विविध सामाजिक उपक्रमातून भाऊंनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.
त्यांचे विशेष संशोधन म्हणजे गर्भाच्या खांद्याच्या (अॅ्ण्टिरियर शोल्डर) हालचालीवरून प्रसूतीच्या प्रगतीचा अंदाज घेणे. गर्भाशयाच्या स्खलनाची शस्त्रक्रिया त्यांनी सुधारली.
“पवित्र रिश्ता”, “बडे अच्छे लगते है”, सहित सहा हिंदी आणि अठरा मराठी मालिकांचे लेखन करणारे गिरीष लाटकर हे ठाण्यातील आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व. ठाण्याच्या सरस्वती सेकंडरी स्कूल आणि त्यानंतर बेडेकर महाविद्यालयातून लाटकर यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयात असतानाच एकांकिका स्पर्धांतून अभिनेता म्हणून त्यांनी कला क्षेत्रात पदार्पण केले.
गोस्वामी संत तुलसीदासाचे जन्मगाव उत्तर प्रदेशातील राजापुरा असावे असा अंदाज आहे. ‘रत्नावली‘ या सौंदर्यशालिनीशी त्यांचा विवाह झाला. तिच्यावरील प्रेमाने तो पागल झाला. तिचा विरह त्याला सहन झाला नाही. ते गंगानदी पोहून मृत सर्पाची दोरी करून तिच्या माहेरी तिला भेटला, ‘एवढं प्रेम ईश्वरावर केलेत तर.... ?‘ तिने त्यांना विचारले., तेव्हा त्यांना उपरती झाली. तो रामभक्तीत लीन झाला. भक्तीमार्गाचे उपासक असलेल्या तुलसीदासांना लहानपणी काशीच्या नरहरीदास स्वामींनी सांभाळलेले होते. वेद, उपनिषदे, पुराणे, अठरा शास्त्रे इत्यादी प्राचीन ग्रंथांचे ज्ञान त्यांना शिकविले होते. रत्नावलीच्या ईश्वर, राम शब्दाने केवढे परीवर्तन घडवून आणले याची तिलाही कल्पना आली नाही. हिंदु समाजात त्यांच्या काव्यग्रंथाने प्रचंड परीवर्तन घडवून आणले, ‘रामचरितमानस‘ हा श्रीरामाच्या आदर्शांचे सूक्ष्म दर्शन घडवितो. तत्कालिन बहूजन समाजाच्या लोकभाषेत हे काव्य लिहले आहे. इस्लामी लोक ‘कुराण‘ वाचतात, ख्रिश्चन लोक ‘बायबल‘ वाचतात, त्याच भक्तीभावानेने हिंदु लोक ‘रामचरितमानस‘ वाचतात. अकबराच्या उदारमतवादी दृष्टीकोन स्वीकारणारा राजा मानसिंग हा तुलसिदासाचा निस्सीम भक्त होता.
तुलसीदासांच्या रामचरितमानसात तात्त्विक चिंतनासमवेतच हिंदी भाषेचा डौल आहे. शब्दालकार, अर्थालंकार, नवरसयुक्त मधुर शब्दांचे भांडार आहे. हिंदू धर्मातील पावित्र्य व धार्मिक निष्ठा मुस्लिम आक्रमणामुळे ढेपाळल्या होत्या. स्वच्छंदीपणा, स्वैराचार बोकाळळा होता. अज्ञानाचा सागर पसरला होता; परंतु तुलसीदासाने हे सामाजिक परिवर्तन घडवून आणले. जनसामान्यांच्या भाषेत सांस्कृतिक-मानस परिवर्तन केले. माणसाने ‘मर्यादापुरूषोत्तम राम‘ आदर्श मानला. रामभक्तीत सदाचरणाचे, श्रध्देचे धडे आहेत. हिंदी साहित्यसागरातील तुलसीचे ‘रामचरितमानस‘ हा कौस्तुभमणी आहे. जगभर भारतीय संस्कृतीच्या आध्यात्मिक ज्ञानासाठी या ग्रंथाचा अभ्यास केला जात आहे.
युगप्रवर्तक हिंदी महाकवी . त्यांची जन्मतिथी, जन्मस्थान, जात, गुरु, मातापिता या सर्वाबद्दल मतभिन्नता आढळते. हाजीपूर, तारी, राजापूर, सोरो सूकर क्षेत्र अयोध्या इ. गावांची नावे गोस्वामी तुलसीदासांचे जन्मस्थान ठरविताना पुढे आली आहेत. पंडित रामदत्त भारद्वाज यांनी या सर्व संशोधनांचा अभ्यास करुन तुलसीदासांचा जन्म सारो या स्थानाजवळच रामपूर येथे झाला. असे निश्चित केले आहे. ते सवरिया, सारस्वत, सरयू पारीण, सनाढय आणि कान्यकुब्ज या ब्राम्हण जातींपैकी निश्चित कोणत्या जातीचे होते याबद्दल मतभेद आहेत. ते ब्राम्हण नसावेच, असेही एक मत पुढे आले आहे. जगन्नाथदास, रामदासजी, नहर्यानंद, नरहरिदास, नृसिंह अशी त्यांच्या गुरुची नावे दिली जातात. बहुसंख्य विद्वान त्यांचा विवाह झाला होता, असे मानतात.
त्यांच्या जन्मतिथीसंबंधी सहा संवत तिथी सामान्यतः पुढे आल्या आहेत. त्या अशा संवत १५५४, १५६० , १५६८, १५८३, १५८९ आणि १६०० बहुसंख्य विद्वान भाद्रपद शुध्द एकादशी मंगळवार, संवत १५८९ म्हणजे इ.स. १५३२ ही तिथी मान्य करतात. मृत्यू मात्र संवत १६८० श्रावण वद्य तृतीया, शनिवार या तिथिला म्हणजे १६३२ मध्ये झाला, याविषयी सामान्यतः एकमत आहे.
इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका व पुणे येथील सिम्बॉयसिस संस्थेसाठी त्यांनी दृककला विषयात भरीव कामगिरी केली आहे. जागतिक रंगकला व तंत्रज्ञान या क्षेत्रातील तज्ञ म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
वामन पंडित हा रामदासाचा समकालीन असून पंडीत संप्रदायाचा प्रातिनिधिक कवी होय. त्याचा कालखंड इ.स. १६३६ ते १६९५ असा मानला जातो. तो संस्कृत पंडित होता. प्रारंभी त्याने संस्कृत भाषेत रचना केली होती, परंतु पुढे रामदासस्वामींच्या सांगण्यावरुन त्याने मराठीत ग्रंथरचना केली. त्याच्या ग्रंथांमध्ये निगमसार, गीतेवरील समश्लोकी टीका, यथार्थदीपिका, कर्मतत्व इत्यादींचा समावेश होतो.
तथापि, वामन पंडित प्रसिध्द आहे तो त्यांच्या आख्यान कवितांमुळे राम व कृष्ण यांच्या जीवनावरील महत्वाच्या प्रसंगांवर ही आख्याने आहेत. वामन पंडिताची आख्याने विविध श्लोकवृत्तात्मक असून प्रत्येक आख्यानाच्या प्रारंभी मंगलाचरण आहे आणि त्या मंगलाचरणातच त्या आख्यानाचे सारही सांगितले आहे. विविधता, विदग्धता आणि विपुलता यांनी त्याचे काव्य नटलेले आहे. यमक आणि प्रसाचा हव्यास हे त्याच्या शैलीचे वैशिष्टय सांगता येईल. त्याच्या रचनेतील यमकाच्या अतिरेकामुळे त्यास खमक्या वामन असे म्हटले जाते.
छत्रपती शाहूमहाराज व भारताचे स्वातंत्र्य यांचे अतूट नाते होते. छत्रपती शाहूमहाराजाचा जन्म २६ जुलै, १८७४ साली कागल थोरली पातीचे जहागीरदार श्रीमंत जयसिंगराव घाटगे यांच्या घराण्यात झाला. योगायोगाने ते छत्रपती झाले. कोल्हापूरच्या महाराणीने त्यांना दत्तक घेतले. राजकोट येथील संस्थानिकांच्या मुलांसाठी असलेल्या विद्यालयात त्यांच शिक्षण झाले. तेथील फ्रेझर या गुरूच्या शिक्षणाचा त्यांच्यावर प्रभाव पडला.
२ एप्रिल, १८९४ साली त्यांनी कोल्हापूरच्या प्रशासनाची सूत्रे हाती घेतली. २८ वर्षे त्यांनी कोल्हापूरचा कायापालट करण्यात घालविली. १९२२ साली त्यांनी इहलोक सोडला. त्या काळात देशभर कडवे क्रांतिकारक बंड करण्याच्या तयारीत होते. इंग्रज सशस्त्र होते. विवेकानंदांची व्याख्याने अमेरिकेत गाजत होती. पण हा छत्रपती गोरगरीबांचा, दीनदलितांचा राजा होता, विव्दानांचा चाहता होता, कलावंतांचा त्राता होता, समाजसुधारकांचा दाता होता. विव्दानांचा चाहता होता, समाजसुधारकांचा दाता होता, शिक्षणाचा भोक्ता होता, स्थिर चित्ताने धोरण आखणारा नेता होता. उच्चवर्णीय समाजाच्या गुलामगिरीतून गरीबांना मुक्त करणारा सत्ताधीश होता. त्यांने क्षात्रजगदगुरूचे धर्मपीठ स्थापन केले. कुलकर्णी वतन नष्ट करून तलाठी पद निर्माण केले. बलुतेपध्दती नष्ट केली. पूर्वाश्रमीच्या गुन्हेगारांना मुक्त केले.
महाराष्ट्राच्या इतिहासात ज्या महापुरूषांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते त्यामध्ये राजर्षी शाहु महाराज अग्रभागी आहेत. महाराजांनी मानवतावादी दृष्टीकोन ठेवला. समता प्रस्तापित करण्यासाठी जीवनभर अथक प्रयत्न केले. शेती सुधारणेला प्राधान्य दिले. शेतकर्यांना सवलती दिल्या. नोकरी व्यवसायाच्या संधी सामान्यांना उपलब्ध करून दिल्या. उद्योगधंदे उभे केले.
२६ जुलै १८७४ हा राजर्षी शाहु महाराज यांचा जन्मदिवस. हा कालखंड इंग्रजी राजवटीचा. स्वातंत्र्यप्रेमाने भारावलेल्या समाजात सुधारणासाठी तळमळीने कार्य करणारे शाहु महाराज हे कोल्हापुर संस्थानातील निःस्पृह, निर्भय आणि लोककल्याणकारी राजे होते. त्यांनी लोकशिक्षणासाठी अनेक संस्था उभारल्या आणि समाजिक सुधारणेच्या चळवळीत जीव ओतला. जनतेचे कल्याण हिच ईश्वर पुजा मानणार्या शाहु महाराजांनी जनतेला वेठीस धरणारी वेठबिगार आणि बलुतेदार पध्दती बंद केली. राखीव घटकासाठी आदेश काढुन राखीव जागांची तरतुद केली.
शाहु महाराजांनी महार आणि कुलकर्णी वतने नष्ट केली. दुष्काळग्रस्तांना आधार दिला. शेतकर्यांना सर्वोतोपरी मदत केली. तलाव दुरूस्ती केली. पाटबंधारे योजना हाती घेतल्या. आरोग्य केंद्राची निर्मिती केली. विविध जातीतील विद्यार्थीसाठी वस्तीगृहाची सोय केली. राजा हा सर्वव्यापक असावा. त्याला आपल्या राज्यांची संपुर्ण माहिती असावी या विचारांचा पगडा असलेल्या महाराजांनी सामाजिक सुधारणेबरोबर शेतीची सुधारणा करणे छोटे उद्योगधंदे उभारणे शेतकर्यांना सवलती देणे. नोकरी व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणे. यासारखी लोकोपयोगी कामे मोठया तळमळीने केली. केवळ राजा म्हणून ते वागले नाहीत, तर प्रजेचा मित्र म्हणून त्यांनी कार्य केले. शिक्षण हा विकासाचा पाया आहे. हे सुधारणेचे मुलतत्व शाहु महाराजांनी जाणले होते.
ग्रामीण उपयोजीत तंत्रज्ञानाचे एक गाढे अभ्यासक आणि दोनदा अॅश्डेन पुरस्कारप्राप्त (२००२ आणि २००६) भारतीय शास्त्रज्ञ
Copyright © 2025 | Marathisrushti