(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • अभिनेते दादा कोंडके

    दादा कोंडके हे अत्यंत लोकप्रिय मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते होते. त्यांनी मराठी वगांतून व चित्रपटांतून अभिनय केला. विनोदी ढंगातील द्वि-अर्थी संवादफेक हे त्यांचे वैशिष्ट्य. त्यांच्या जवळपास सर्वच भूमिका लोकप्रिय झाल्या.

  • रत्नाकर तारदाळकर

    रत्नाकरांच्या कलापैलूत आणखीन भर टाकणारी गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे लेखन कौशल्याची.

  • पांडुरंग सदाशिव साने तथा साने गुरुजी

    साहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक पांडुरंग सदाशिव तथा साने गुरुजी यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी झाला.

    कला म्हणजे काय?, मानव जातीची कथा, राष्ट्रीय हिंदूधर्म, दिल्ली डायरी, ना खंत ना खेद याशिवाय भारताचा शोध, अनेक चरित्रपुस्तके, गोड गोष्टी, १४ अनुवादित ग्रंथ, भारतीय संस्कृती हा लेखसंग्रह. सुंदर पत्रे, पत्री तसेच श्यामची आई हे इतिहास घडवणारे पुस्तक, अशी त्यांची ग्रंथसंपदा.

    ११ जून १९५० रोजी त्यांचे निधन झाले.

    पांडुरंग सदाशिव साने तथा साने गुरुजी यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.

    पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी (3-Jan-2017)

    मराठी साहित्यिक पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी (11-Jun-2017)

    पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी (26-Dec-2017)

    Pandurang Sadashiv Sane alias Sane Guruji

  • नर्गिसबानू चिखलीकर

    नर्गिसबानू यांचा जन्म निपाणीजवळच्या चिखली या छोट्या गावामध्ये झाला. कलावंतांचं कुटुंब असल्यामुळे कलेचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी चिमुकल्या नर्गिसने कथ्थक शिकायला सुरुवात केली होती. इतरांना थक्क करून टाकणारी तिची ही नृत्य कला बाबासाहेब मिरजकर या तिच्या रत्नपारखी गुरूंनीही त्यावेळी चांगलीच ओळखली होती. त्याकाळी कोल्हापुरात लावणी-लोकनाट्याने लोकप्रियतेचा उच्चांक गाठल्याने अशा नतिर्कांना नेहमीच मागणी असे. उत्तम बांधा, आकर्षक व्यक्तिमत्त्व व नृत्यकौशल्यात पारंगत असणार्‍या नगिर्स यांच्यात अभिनयगुणांचीसुध्दा बिलकुल कमतरता नव्हती. त्यांनी प्रथम लोकनाट्यातून रंगमंचावर पाऊल ठेवलं.

  • पुरुषोत्तम भास्कर भावे

    ६ नाटके, २ प्रवासवर्णन, २ व्यक्तिचित्रे, २८ कथासंग्रह, १८ लेखसंग्रह, निवडक कथा संग्रहाचे दोन भाग इतके त्यांचे साहित्य प्रसिद्ध झाले.

  • राहुल सोलापूरकर

    महाविद्यालयीन काळात सलग पाच वर्षे पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत सहभाग आणि अनेक बक्षिसे पटकाविली आहेत. त्याच काळात महाराष्ट्र आणि बाहेरील मिळून एकूण ६५ वक्तृत्व आणि कथाकथन स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळविले आहेत. राज्य नाट्य स्पर्धेत ८ वर्ष सहभाग आणि अनेक बक्षिसे मिळवत २२ हौशी नाटकातून त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.

  • राजीव पाटील

    आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून पाटील यांनी गावरान विषय, सामाजिक प्रश्न तसंच वास्तवता मांडली. ‘सावरखेड-एक गाव’ , ‘जोगवा’, ‘७२ मैल एक प्रवास’, ‘पांगिरा’, ‘सनई चौघडे’, ‘ऑक्सिजन’, ‘ब्लाईंड गेम’; असे वैविध्यपूर्ण विषय दिग्दर्शित करुन प्रेषकाचं पुरेपूर मनोरंजन होईल याची खात्री घेतली.

  • चंद्रशेखर गाडगीळ

    रसिकांना आपल्या पहाडी तसंच खणखणीत स्वरांनी संगीतानुभव देणार्‍या चंद्रशेखर गाडगीळ यांचा जन्म पुण्याचा. लहानपणापासूनच राकट पण तितकाच श्रवणीय आवाज लाभलेल्या चंद्रशेखर गाडगीळ यांचे त्याकाळी बालगंधर्व यांनी भरभरुन कौतुक केले होते. पंडित हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, पंडित गोविंदप्रसाद जयपूरवाले, पंडित मनोहर चिमटे, पंडित सदाशिवराव जाधव यासारख्या दिग्गजांकडे त्यांनी गायनाचे शास्त्रोक्त धडे घेतले होते. ऑर्केस्ट्रा क्षेत्रमध्ये त्यांनी आपल्या गायना कारकीर्दीची सुरुवात केली. एका कार्यक्रमात संगीतकार राम कदम आलेले असताना त्यांनी गाडगीळ यांचा आवाज ऐकून ,चित्रपटात पाश्र्वगायनाची त्यांना संधी दिली.

    पुढे अनेक हिंदी-मराठी चित्रपटांमधून एकापेक्षाएक सुरेल गाणी सादर करुन कानसेनांना अक्षरश: मंत्रमुगध केले. त्यांचे “कुदरत” चित्रपटातील “सुखदुख की हर एक माला” आणि “अशांती” चित्रपटातील “शक्ती दे मां” ही गीतं आज देखील रसिकांच्या मनात घर करुन आहे. तर मराठीत “निसर्गराजा ऐक सांगतो”, “कोण होतीस तू, काय झालीस तू”, “अजून आठवे ती रात पावसाळी”’, “अरे कोंडला कोंडला देव”, “दूर का तू साजणी”, “जाई ग जाई पांडोबा”, “पांडोबा पोरगी फसली पांडोबा ”, “माणसं रे माणसं”, “देवमानुस देवळात आला”, “अन्‌ हल्लगीच्या तालावर”, “अरूपास पाहे रूपी तोच भाग्यवंत निसर्गात भरूनी राहे अनादि अनंत” ही गाडगीळ यांची आवाजातील गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली! तसंच ‘अष्टविनायक’ या मराठी चित्रपटातील “अष्टविनायका तुझा महिमा कसा” या गीतातील दोन कडवी गाडगीळ यांनी स्वरबद्ध केली होती.

    मराठीमध्ये राम कदम तर हिंदीत आर.डी.बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, रवींद्र जैन अश्या संगीतकारांबरोबर त्यांनी काम केले आहे. केवळ गायक म्हणूनच नव्हे तर संगीतकार म्हणूनही चंद्रशेखर गाडगीळ यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. हिंदी चित्रपटांमध्ये राजेश खन्ना यांच्यावर चित्रीत झालेल्या अनेक गाण्यांना गाडगीळ यांनी स्वरसाज चढवला आहे. मन्ना डे आणि महमद रफी यांच्या गायनातील सुरांची सर्फा आपल्याही गळ्यात यावी, यासाठी अभिजात संगीताबरोबरच उच्चार आणि शब्दफेक यांचा त्यांनी अभ्यास केला होता .

    गायिका रश्मी समवेत त्यांनी “रश्मी ऑर्केस्ट्रा”ची स्थापना केली. पुढे चंद्रशेखर गाडगीळ यांनी ‘स्कूल ऑफ म्युझिक’ या संस्थेची स्थापना केली. युवा संगीतकारांना, गायकांना त्यांनी व्यासपीठ मिळवून दिले. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी कॉपीराईट्स, रॉयल्टी या संकल्पना युवा कलाकारांना पटवून सांगितल्या.

    “माणसापरिस मेंढरं बरी” या चित्रपटातील एका गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून चंद्रशेखर गाडगीळ यांना राज्य शासनाच्या पुरस्काराने, तर २०१० यावर्षीच्या “राम कदम कलागौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे

    खासदार विजय दर्डा यांच्या पत्नी आणि लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्षा स्व.ज्योत्स्ना दर्डा यांच्या भजनांची ‘महावीर नमन’ ही कॅसेट चंद्रशेखर गाडगीळ यांनी संगीतबद्ध केली होती. या कॅसेटमधील भजने वैशाली सामंत, सुरेश वाडकर, साधना सरगम, आर. जैन आदी गायकांनी गायली आहेत. ही त्यांची शेवटची कॅसेट ठरली.

    २ ऑक्टोबर २०१४ या दिवशी चंद्रशेखर गाडगीळ त्यांच्या वयाच्या ६७व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात निधन झाले.

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

    ( लेखन व संशोधन - सागर मालाडकर )

  • वीरेंद्र भांडारकर

    भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) औरंगाबाद केंद्राचे सहायक संचालक वीरेंद्र भांडारकर यांनी त्यांच्या उमेदीत उत्कृष्ट बास्केटबॉलपटू व हॅंडबॉलपटू म्हणून नाव कमावले. पण केवळ यशात न रमता त्यांनी उत्तम खेळाडूंची पिढी घडविण्यासाठी गेली दोन दशके योगदान दिले. औरंगाबाद व मुंबईची साईची केंद्रे विकसित करुन देशाला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू दिले.

    खेळाची मशागत

  • शकुंतलाबाई परांजपे

    संतती नियमनाच्या प्रचारकार्यात उघडपणे स्वत:ला झोकून देणार्‍या शकुंतलाबाई परांजपे या देशातल्या पहिल्या महिला कार्यकर्त्या होत्या.