कथा, कादंबरी, प्रवासवर्णन, नाटके असा लेखणीसंचार ताकदीने करणारे जयवंत द्वारकानाथ दळवी. साहित्यक्षेत्राला विनोदी फटके लगावणारा “ठणठणपाळ” या टोपण नावानेही त्यांनी लेखन केले.
बुद्धिबळावर ज्यांनी १०० च्यावर पुस्तकं लिहिली आहेत, असे रशियाचे प्रसिद्ध खेळाडू युरी अवेरबाख भारतात आले असताना, ते एकाच वेळी २५ अव्वल खेळाडूंशी खेळतील असं जाहीर करण्यात आलं. त्यांपैकी २४ खेळाडूंना त्यांनी हरवलं. त्यांची एकच मॅच बरोबरीत सुटली. तो प्रतिस्पर्धी होता प्रवीण ठिपसे, वय वर्ष १५.
दिपाली सय्यद म्हणजेच दिपाली भोसले लग्ना नंतर ती दिपाली सय्यद झाली. तिचा जन्म १ एप्रिल १९७८ रोजी पाटणा, बिहार येथे झाला. सुरवातीपासुनच एक अभिनेत्री होण्याचे तिचे स्वप्न होते. दिपाली सय्यदचे बालपण मुंबईत गेले. दिपालीने नालंदा विद्यापीठातुन फाईन आर्ट्सची पदवी संपादन केलेली आहे. अभिनय क्षेत्रातील तिचा प्रवास मालिकांमधुन सुरु झाला. बंदीनी, समांतर या तिच्या अभिनय कारकिर्दीतील सुरवातीच्या मालिका. त्यानंतर अनेक चित्रपट, मालिका, शोज, नाटक, टिव्ही शोज, जाहिराती यातुन ती सातत्याने झळकत राहिली.
दिपाली जाऊ तिथे खाऊ, चश्मेबहाद्दर, लग्नाची वरात लंडनच्या दारात या चित्रपटांमधील तिच्या भुमिकांसाठी विशेष करुन ओळखली जाते. मात्र तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता जत्रा चित्रपटातील ये गो ये मैना.. या गाण्यातून मिळाली. करायला गेलो एक, लाडी गोडी, होऊन जाऊ दे, मला एक चानस हवा, ढोलकीच्या तालावर, वेलकम टु जंगल, हे मिलन सौभाग्याचे, माझ्या नवर्याची बायको, उचला रे उचला, काय करु न कसं करु, दुर्गा म्हंत्यात मला, काळशेकर आहेत का ?, मास्तर एके मास्तर, मुंबईचा डबेवाला, सासु नंबरी जावई दस नंबरी हे तिचे तिने अभिनय केलेले इतर चित्रपट. तर दुर्वा, अफलातुन या हिंदी मालिकांमधुनही ती चमकली आहे. याशिवाय तिने आतापर्यंत पाच सहा भोजपुरी चित्रपटातून भूमिका साकारल्या आहेत.
३१ मे २००८ रोजी दिपाली दिग्दर्शक बॉबी खान यांचेबरोबर विवाहबध्द झाली असुन लग्नानंतरचे तिचे नांव सोफीया जहांगीर सय्यद असे आहे. दिपालीने अहमदनगर मतदार संघातुन सन २०१४ मध्ये निवडणुक लढवलेली होती. दिपाली सय्यदने नगर जिल्ह्यातील “गुंडेगाव ” या ठिकाणी ‘दिपाली सय्यद-भोसले फाऊंडेशन’च्या माध्यमातून वृद्ध आणि अनाथ मुलांसाठी आश्रम उभारले आहे.
#DipaliSayyad
माने, श्रीकांत
सार्वजनिक क्षेत्रामध्ये उच्च पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये सामाजिक भान आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार यांचे प्रमाण कमी होत चालले असताना आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या आणि प्रामाणिक सेवेच्या जोरावर कर्तृत्वाचा मोठा आलेख निर्माण करणारे वीजमंडळातील अभियंत्यांचे नेते श्रीकांत माने यांचे निधन संवेदनशील मनांना चटका लावून जाणारे आहे.
त्यांच्या निधनाने वीजमंडळातील अभियंत्यांना सन्मानाचे स्थान मिळवून देणारे एक कुशल नेतृत्व केवळ काळाच्या पडद्याआड गेले असे नाही तर भ्रष्टाचाराने पोखरलेल्या राज्य वीज मंडळातील हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार निर्भीडपणे बाहेर काढणाऱ्या एका समर्पित अभियंत्याला देश मुकला आहे. माने हे मूळचे महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवरील संकेश्वरचे. गुलबर्गा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्युत अभियांत्रिकी या शाखेत प्रथम श्रेणीमध्ये पदवी संपादन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य वीजमंडळात १९७६ साली ते कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरीत रुजू झाले. सलग ३० वर्षांच्या कालावधीत त्यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता या पदापर्यंत झेप घेतली. या प्रवासात त्यांनी वीजमंडळाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि अभियंत्यांच्या संघटनांसाठी जे योगदान दिले, ते विसरता येणार नाही. ते जेव्हा वीजमंडळाच्या सेवेत दाखल झाले, तेव्हा मंडळाच्या अभियंत्यांचे साध्या सन्मानाच्या वागणुकीपासून ते वेतनश्रेणीपर्यंत अनेक प्रश्न प्रलंबित होते. मंडळातील सबऑर्डिनेट इंजिनीअर्स असोसिएशन या संघटनेला माने यांचे कुशल नेतृत्व मिळाले आणि मंडळाच्या इतिहासात १९८२ मध्ये न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाचा २७ दिवसांचा संप झाला. कधी भूमिगत राहून तर कधी हजारो अभियंत्यांच्या मोर्चाचे नेतृत्व करीत माने यांनी लढा दिला, त्यामुळेच कदाचित पुढे वीजमंडळातील अभियंत्यांना सन्मानाचे दिवस पाहता आले. माने यांनी वीज मंडळातील सिंगल फेज या अव्यवहार्य प्रकल्पाविरुद्ध दिलेल्या लढय़ामुळे मंडळाला आपले धोरण बदलणे भाग पडले. त्याहीपेक्षा त्यांनी मंडळात खरेदी केल्या जाणाऱ्या कोटय़वधी रुपयांच्या ट्रान्सफॉर्मर्स, कपॅसिटर्स, केबल्स यांच्या दर्जाविषयी जो लढा दिला, त्याचे मोलही नाकारता येणार नाही. निकृष्ट दर्जाची यंत्रसामग्री पुरविणाऱ्या ठेकेदारांनी राज्य वीजमंडळात काही बगलबच्च्यांना हाताशी धरून मंडळाला हजारो कोटी रुपयांचा चुना लावण्याचा धंदा वर्षांनुवर्षे सुरू ठेवला होता, त्याला कुलूप लावण्याचे काम माने यांनी केले. एका ट्रान्सफॉर्मरची चाचणी घेऊन शेकडो निकृष्ट दर्जाचे ट्रान्सफॉर्मर मंडळात दाखल करून घेण्याचे एक मोठे रॅकेटच त्यांनी जिवाची तमा न बाळगता उघडकीस आणले. त्यांनी या प्रकरणातून अंग बाहेर काढावे यासाठी भल्या मोठय़ा कंपन्यांनी कोटय़वधी रुपये कोऱ्या चेकद्वारे त्यांना देऊ केले. पण या नि:स्वार्थी अभियंत्याने त्याला लाथ मारून सर्वसामान्यांशी असणाऱ्या आपल्या निष्ठेला अधिक प्राधान्य दिले. या कार्याबद्दल त्यांच्या गळ्यात राष्ट्रीय सन्मान पडणे आवश्यक होते. तो मिळाला नसला तरी पुढे मंडळाला उपकरणांच्या दर्जानिश्चितीसाठी आपली पद्धत बदलावी लागली, ही मोठी देणगी त्यांनी सर्वसामान्यांना दिली आहे.
अभ्यासू समीक्षक वसंत दिगंबर कुलकर्णी यांचा जन्म २३ ऑगस्ट १९२३ रोजी झाला.
“लीळाचरित्र : एक अभ्यास”, “केशवसुतांचे अंतरंग”, “अर्वाचीन मराठी सारस्वतकार”, “संतसाहित्याची संकल्पना” ही त्यांची उल्लेखनीय पुस्तके.
Vasant Digambar Kulkarni
ज्येष्ठ सिनेपत्रकार देवयानी चौबळ यांचा जन्म १९४५ मध्ये झाला.
असे म्हणतात देवयानी चौबळ या अत्यंत फटकळ सिनेपत्रकार होत्या. तिच्या जिभेच्या तडाख्यात भलेभले सापडले होते. त्या बॉलीवूड मध्ये देवी या नावाने प्रसिद्ध होत्या. खरे तर त्यांना फिल्मस्टार व्हायचं होतं. घरात सगळे पोलीसखात्यात नोकरीला. त्यांचे वडील सुप्रसिध्द वकील होते. त्यांना हिरोईन म्हणून सगळीकडे मिरवायचं होतं. दिसायलाही त्या देखणी होती. छोट्या मोठ्या सिनेमात सहज काम मिळाले असते.
देवयानी या शाळा संपण्यापूर्वीच दिलीपकुमार यांच्या प्रेमात पडल्या होत्या. त्यांच्याशी लग्न करायचं होतं. पण दुर्दैव दिलीप कुमारने देवयानी यांना नकार दिला. त्या मुळे देवयानी बिथरल्या. आधीच ती फटाकडी होती त्यात डोक्यात राग. सिनेमामध्ये करीयर सुद्धा झालं नाही. मग लिखाणाकडे वळल्या. अंगात भिनलेला सगळा जहर ती आपल्या लेखातून बाहेर काढू लागली. इंग्लिश वर तिची कमांड होतीच पण गरज पडेल तिथे हिंदी शब्द वापरून हिंग्लिश लिखाणाची पहिली सुरवात तिने भारतात केली. दिलीपकुमार यांच्या विरुद्ध लिहिण्यासाठी त्यांनी ज्युनियर रिपोर्टर म्हणून 'स्क्रीन' जॉइन केले, पण त्यांच्या वागणुकीने तीन दिवसांत नोकरीच्या बाहेर करण्यात आले आणि त्यांना नोकरी गमवावी लागली. पण, त्यांनी हार मानली नाही. त्या काळी 'स्टार अँड स्टाईल' नावाचे एक नवीन मासिक आले होते आणि त्यात महिला पत्रकारांची गरज होती तेथे देवयानी यांना नोकरी मिळाली आणि लवकरच त्या 'फ्रँकली स्पिकिंग' या नावाचा स्वतःचा स्तंभ देवी या नावाने लिहू लागल्या.
नावाप्रमाणेच बिनधास्त खुसखुशीत लेख, त्यातल्या तिखट जाळ गॉसिप गप्पा थोड्याच दिवसात पॉप्युलर झाल्या. लोक आवडीने या लेखांची वाट पाहू लागले आणि बॉलीवूड? बॉलीवूड तिच्या नावाने खडे फोडू लागले. यात सगळ्यात आघाडीवर होता सुपरस्टार दिलीप कुमार ज्यांनी देवयानी यांना नाही म्हणायची हिंमत केली होती. देवयानी आपल्या प्रत्येक लेखात त्याला उभा आडवा सोलायच्या. तो म्हातारा होत चाललाय, त्याची जादू संपलीय याच्या चर्चा करायची. त्याने मुलगा व्हावा म्हणून आस्मा नावाच्या बाईशी दुसरा निकाह केला ही बातमी सुद्धा तिने फोडली. दिलीप कुमार वैतागले. त्यांनी आपल्या फिल्मइंडस्ट्रीमधल्या सगळ्या दोस्तांना बजावलं की देवयानीला मुलाखत द्यायची नाही. पण ही अघोषित बंदी खूप काळ चालू शकली नाही. किती जरी नाव ठेवली तरी फिल्म इंडस्ट्रीला देवयानी चौबळ सारख्या पत्रकाराची गरज होतीच. देवयानी एकीकडे आणि बाकीचे फिल्म मगझीन एकीकडे. सगळ्यांच्यात ठसठसीत उठून दिसणाऱ्या देवयानीशी आपले संबंध चांगले राहावेत यासाठी सगळे फिल्मस्टार प्रयत्न करायचे.
आज जी फिल्मी पत्रकारिता प्रचलित आहे याचा देवयानी चौबळ यांनी शुभारंभ केला होता. आजकाल हे फंडे सिनेमा चे प्रमोशन करण्यासाठी सर्रास वापरले जातात, पण त्याकाळी लोकासाठी हे सर्व नवीन होते.
आराधना या सिनेमावेळी देवयानीची आणि राजेश खन्नाची ओळख झाली. या भेटीत त्याने काय जादू केली माहीत नाही पण देवयानी अगदी त्याच्या प्रेमात पडली. तसं पाहायला गेलं तर अख्ख्या देशातल्या पोरी तेव्हा राजेश खन्नाच्या प्रेमात होत्या, पण यात देवयानीचा मोठा हात होता.
इतरानां कायम शिव्या घालणारी फटाकडी देवयानी राजेश खन्नाबद्दल बोलताना मात्र नुसता कौतुक, विशेषणांचा भडीमार करायच्या. त्याला सुपरस्टार ही उपाधी पहिल्यांदा देवयानी यांनीच दिली. तिच्या लेखात येणाऱ्या सुपरस्टार, सुपरस्टार या उल्लेखामुळे सगळे राजेश खन्नाला सुपरस्टार म्हणू लागले. देवयानी अगदी बिनधास्त होती. राजेश खन्नाबरोबरची मैत्री, त्याच्यावरच प्रेम कधी लपवायची नाही. आपण आयुष्यात एकाच पुरुषाबरोबर रात्र घालवली आहे तो म्हणजे राजेश खन्ना असं रोखठोक सांगायची. राजेशने मात्र अंजू महेंद्रू बरोबर देवयानी चौबळला सुद्धा गंडा घालून लग्न केलं तरुण डिम्पल कपाडिया बरोबर आणि ही बातमी पहिल्यांदा सांगितली देवयानीलाच.
पण राजेश खन्नावर चिडणे त्यांना शक्य नव्हते. तो त्यांच्यासाठी देव होता. राजेशने देखील तिच्यावरचा आपला कृपाशीर्वाद कधी काढून घेतला नाही. असं म्हणतात की देवयानी चौबळ ने आनंद चित्रपट बघितल्यावर त्याला सांगितलेलं की या सिनेमात त्याच्याबरोबर काम केलेला अमिताभ बच्चन पुढे जाऊन त्याची खुर्ची काढून घेऊ शकतो.
त्यांनी त्या काळी अमिताभ यांच्याबद्दल एक भविष्य वर्तवले होते. ‘अमिताभ बच्चन हा असा नट आहे की तो प्रसिद्धीच्या शिखरावर जाईल. पण तो इतरांसारखा तिथून खाली कोसळणार नाही; तर एक एक पायरी उतरत आपली स्वतःची अशी वेगळी जागा बनवेल...’ आजवरचा या महानायकाचा प्रवास पाहता ते खरंच झालेलं दिसतं आहे!
देवयानी चौबळ यांचा हिंदी चित्रपटसृष्टीत गॉसिप कॉलमला कमालीचं ग्लॅमर मिळवून देण्यात यांचा खूप मोठा हातभार होता. त्यांच्या लेखणीबरोबरच त्यांची बिनधास्त अॅटिट्यूड, बोलणं, दिसणं या सर्वच गोष्टी चर्चेचा विषय असायच्या.
देवयानी चौबळ यांनी पत्रकारितेचे धडे आचार्य अत्रे यांच्या कडे गिरवले होते. शिरिष पै व देवयानी यांची खास मैत्री होती. एका दिपावली अंकात ताईनी "देवी" नावाचा तिच्या जीवनावर व आठवणी वर एक लेख लिहिला होता. एवढी वर्षे झाली तरी राजेश खन्ना विषयीच तीच एकतर्फी प्रेम कमी झालं नाही. त्याच्या साठी तिने डायट सुरु केलं होतं. पण याचा परिणाम तिच्या तब्येतीवर झाला आणि त्यात पॅरालीसीसच्या अटॅकमुळे ती अगदीच गारद झाली. त्यातूनही तिने आपले फटाकेदार लिखाण चालूच ठेवले होते. या काळात धर्मेंद्र आणि सुनील दत्त यांनी तीला मदत केली.
असं म्हणतात की शेवटपर्यंत ती राजेश खन्नाच्या प्रेमातचं जगली. येणाऱ्या जाणाऱ्याना सांगायच्या, की राजेश मला रोज फुलं पाठवतो. त्याच्यासाठी मी बरी होणार.
देवयानी चौबळ यांचे १३ जुलै १९९५ रोजी निधन झाले.
#DevyaniChaubal
ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांनी अनेक वर्षे अभिनयविश्वात काम करूनही त्यांना छोट्या छोट्या भूमिकाच मिळत गेल्या. मात्र त्यांच्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका त्यांनी जीव ओतून साकारली. महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ या चित्रपटातून नांदलस्कर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
‘कट्यार काळजात घुसली’ नाटकात पं. वसंतराव देशपांडे यांच्यासमवेत भूमिका साकारण्याची संधी पं. दिनकर पणशीकरांना लाभली. ‘आडा चौताला’ सारख्या कमी प्रचलित तालात त्यांनी रचलेल्या २०० बंदिशी हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रासाठी बहुमूल्य ठेवा मानला जातो.
हिंदुस्तानी शास्त्रीय गायनातील ग्वाल्हेर घराण्याच्या ख्याल शैलीतील बंदिशींच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवणा-या एक प्रयोगशील गायिका नीला भागवत यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९४२ रोजी पुणे येथे झाला.
कृष्णराव पंडीत व शरच्चंद्र आरोलकर हे त्यांचे गुरु. त्यांची मीराबाई व कबीराच्या भजन गाण्याबद्धल विशेष प्रसिद्ध आहेत. जयपूर आणि ग्वाल्हेर अशा दोन्ही घराण्यांमधली गायकी त्या शिकल्या, ती आत्मसात केली आणि अवलंबलीही, मात्र ग्वाल्हेर घराण्याच्या ख्याल (खयाल-कल्पना) गायकीमध्ये त्या मनापासून रमल्या. ग्वाल्हेर घराण्यात बोलाला सर्वाधिक महत्त्व आहे. बोलात सगळंच अंतर्भूत असतं, या कल्पनेनं झपाटलेल्या नीला यांनी ख्यालाचा मूळ पिंड कधीच सोडला नाही. त्या व्यवसायाने प्राध्यापक व भाषांतर कार आहेत. आजही पारंपरिक गायिकीसोबतच जीवनातील अनुभव बंदिशींमधून मांडत नवता, प्रयोगशीलताही त्या जपत आहेत. शास्त्रीय रागांसह ‘पियानो’सारख्या पाश्चिमात्य वाद्याबरोबरही त्या जितक्या एकरूप होतात, तितक्याच परदेशी मूकबधिर मुलांना गायन शिकवतानाही होतात.
संत कबीर, मीराबाई, चोखामेळा, संत तुकाराम, महात्मा फुले ते अगदी महात्मा गांधी यांसारख्या संत आणि महापुरुषांच्या विचारांवर, काव्यांवर बंदिशी बांधून त्यांचं सांगीतिक चित्र समाजापुढे मांडत आहेत. आज वयाच्या पंच्याहर्या वर्षीही नीला भागवत यांचा नवनिर्मितीचा, सृजनशीलतेचा उत्साह कायम आहे. त्यांना एसएनडीटी विद्यापीठ आणि वायएमसीए संस्था यांच्यातर्फे ‘कॉन्ट्रिब्युशन टू विमेन्स कल्चर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच
केंद्र सरकारतर्फे संगीतातील संशोधनासाठी मानद शिष्यवृत्ती त्यांना देण्यात आली आहे.
नीला भागवत यांचे साहित्य.
मोनोग्राफ ऑन कृष्णराव शंकर पंडित (१९९२)
तिहाई (कवितासंग्रह) (१९९२-९३)
कबीर गाता गाता (२००४)
शरच्चंद्र आरोलकर – लेणे प्रतिभेचे (२०१२)
https://www.youtube.com/watch?v=0WLgyPkL5dI
https://www.youtube.com/watch?v=Ukghy6LIqlA
#NeelaBhagwat
कथा,कदंबरी,प्रवासवर्णन,ललित असे विविध साहित्य प्रकार हाता़ळणारे,विविधांगी लेखन करुन आपल्या प्रतिभेचा साक्षात्कार करुन देणारे प्रख्यात शैलीदार ललित लेखक रवींद्र पिंगे यांनी ‘प्राजक्ताची फांदी’,’मोकळ आकाश’,’मुंबईचं फुलपाखरु’,’आनंदपर्व’, ‘आनंदाच्या दाही दिशा’ देवाघरचा पाऊस’ असे ३२ पुस्तकांचे लेखन त्यांनी केले होते.
Copyright © 2025 | Marathisrushti