(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • लहू (काळू) खाडे

    लहू संभाजी खाडे, अर्थात मराठी वगनाट्यांत गाजलेल्या काळू-बाळू जोडीतील काळू यांचा जन्म १६ मे १९३३ या दिवशी झाला होता. लहू खाडेंनी मराठी तमाशा कलावंत, अभिनेते म्हणून आपली छाप रसिक मनांवर उमटवलीच! पण ते स्वत:तमाशा फडाचे मालक होते. घरात तीन पिढ्यांची तमाशा परंपरा होती व तीच परंपरा त्यांनी पुढे सुरू ठेवली. दरवर्षी ठिकठिकाणच्या यात्रा-जत्रांमधून ते तंबू लावून तमाशा फड गाजवायचे.

  • सेतुमाधवराव श्रीनिवास पगडी

    इतिहासाच्या अभ्यासात, संशोधनात तसंच सनदी सेवेसाठी योगदान देणार्‍या सेतुमाधवराव पगडी यांचा जन्म २७ ऑगस्ट १९१० साली झाला.इतिहासाचे संशोधक म्हणून ख्याती मिळवण्यासोबतच, त्यांनी विपुल प्रमाणात स्फुट व ग्रंथलेखन केले. उर्दुचा गाढा आभ्यास असल्यामुळे आशयाला धक्का न लावता इकबालच्या उत्तम व रसभरीत कविता, फिरदौसीचा जाहीरनामा त्यांनी मराठीत आणला. शिवाजी महाराजांवर लिहिलेले यांचे संशोधित पुस्तक आजही प्रमाण मानले जाते. हे पुस्तक नॅशनल बुक ट्रस्ट या नवी दिल्लीतील प्रकाशनाने मराठी भाषेत प्रकाशित केले आहे. “भारतीय मुसलमानः शोध आणि बोध“ व “१८५७चे आणखी काही पैलू“ ही त्यांची दोन पुस्तके परचुरे प्रकाशन संस्थेनी प्रसिध्द केली आहेत.

    सेतु माधवराव पगडी हे १९६० ते१९६९ या काळात महाराष्ट्राच्या गॅझेटिअर विभागाचे सचिव म्हणून काम पाहिले होते. १९५१ साली औरंगाबाद जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून व त्यापूर्वी ते हैदराबाद संस्थानमध्ये सनदी अधिकारी होते.

    मुंबईत वास्तव्यास असताना पगडी यांनी तेरा वर्षांत किमान तेराशे गंथ अभ्यासले. त्यांच्याकडे आत्मचरित्र लिहिण्याचा आग्रह धरला गेला तेव्हा त्यांनी विविध भाषेतील किमान शंभर आत्मचरित्रे वाचून काढली. इंग्रजी, मराठी, उर्दू, फारसी, बंगाली, अरबी, तेलुगू, कन्नड अशा जवळपास सतरा भाषा त्यांना अवगत होत्या. राष्ट्रपती डॉ. राजेंदप्रसाद औरंगाबादेत आले तेव्हा पगडींनी एक तास अस्खलित उर्दूमधून सूफी संप्रदायावर भाषण दिले. ते राष्ट्रपतींना इतके आवडले की, त्यांनी 'अ मोस्ट लनेर्ड पर्सन' या शब्दात पगडी यांची प्रशस्ती केली. “मराठवाडा साहित्य परिषद“ , “इंदूर साहित्य सभा“, “मराठी वाड्मय परिषद“चे अध्यक्षपद सेतुमाधवराव पगडींनी भुषविलेले आहे.

    मराठवाडा विद्यापीठाने डॉक्टरेट ही मानाची पदवी प्रदान करून त्यांच्या कार्याचा उचित सन्मान केला होता . पगडी यांच्या “जीवनसेतु“, “छत्रपती शिवाजी“ या त्यांच्या माहितीपर ग्रंथाना राज्य पुरस्कार, मराठा मंदिरातर्फे चरित्रकार पदक आणि न. चिं. केळकर पारितोषिक प्राप्त झाले.

    भारत सरकारच्या पद्मभुषण पुरस्काराने सेतुमाधवराव पगडी यांना गौरविण्यात आले आहे.

    १४ ऑक्टोबर १९९४ रोजी सेतुमाधवराव पगडी यांचे निधन झाले.

  • दत्ता टोळ

    बालसाहित्याची एकूण ७५ पुस्तके त्यांची प्रकाशित. जादू संपली, गोड्या पाण्याचे बेट या कादंबर्‍या.

  • डॉ. भाऊ दाजी लाड

    (१८२४-१८७४)

    एकोणिसाव्या शतकातील मुंबईच्या सामाजिक जीवनात समरस झालेले एक प्रमुख व्यक्तिमत्व. व्यवसायाने डॉक्टर. त्यांच्या प्रयत्नामुळे मुंबईत ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना. लोकांमध्ये स्वत्वाची भावना जागवण्याचे कार्य तळमळीने केले.

    महाराष्ट्रातील एक प्राच्यविद्या पंडित, समाजसेवक व कुशल धन्वंतरी. त्यांचे पूर्ण नाव रामकृष्ण विठ्ठल लाड. त्यांच्या वडिलांना दाजी म्हणत व मित्र परिवारात ते भाऊ या नावाने परिचित होते. त्यामुळे पुढे भाऊ दाजी हे नाव रुढ झाले. त्यांचा जन्म आजोळी गोव्यातील मांजरे (पेडणे तालुका) या गावी झाला. वडील पार्से (गोवा) येथे शेती तसेच कारकुनीचे काम करीत. व्यवसायानिमित्त लाड कुटूंब मुंबईला गेले (१८३२). तिथे विठ्ठलराव मातीच्या बाहुल्या करुन विकत असत. भाऊ दाजींचे प्राथमिक शिक्षण नारायणशास्त्री पुराणिकांच्या मराठी शाळेत झाले. पुढे एलिफन्स्टन विद्यालयात व कॉलेजमधून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. खाजगीरीत्या त्यांनी संस्कृतचे अध्ययन केले. त्यांची एल्फिन्स्टन विद्यालयात अध्यापक म्हणून नियूक्ती झाली. (१८४३). या सुमारास त्यांचा पार्वतीबाई या मुलीबरोबर विवाह झाला. त्यांना विठ्ठल व द्वारकानाथ हे दोन मुलगे होते. द्वारकानाथ तारुण्यातच निधन पावला. वडिलांनी संन्यास घेऊन एलेफंटा (घरापूरी) येथे वास्तव्य केले.
    भाऊंनी कच्छ, काठेवाड या गुजरातच्या विभागातील बालकन्या हत्येच्या प्रथेवर इंग्रजी व गुजराती अशा दोन्ही भाषंात एक निबंध लिहिला. निबंध स्पर्धेत त्यांना ६०० रुपयांचे पारितोषिक मिळाले आणि त्यांच्या चिकित्सक अभ्यासू संशोधनवृत्तीला चालना मिळाली. डॉ. जॉन विल्सन यांनी आपल्या ग्रंथात यातील मजकूर उदधृत केला आहे.

  • छत्रपती शाहू महाराज

    छत्रपती शाहूमहाराज व भारताचे स्वातंत्र्य यांचे अतूट नाते होते. छत्रपती शाहूमहाराजाचा जन्म २६ जुलै, १८७४ साली कागल थोरली पातीचे जहागीरदार श्रीमंत जयसिंगराव घाटगे यांच्या घराण्यात झाला. योगायोगाने ते छत्रपती झाले. कोल्हापूरच्या महाराणीने त्यांना दत्तक घेतले. राजकोट येथील संस्थानिकांच्या मुलांसाठी असलेल्या विद्यालयात त्यांच शिक्षण झाले. तेथील फ्रेझर या गुरूच्या शिक्षणाचा त्यांच्यावर प्रभाव पडला.

    २ एप्रिल, १८९४ साली त्यांनी कोल्हापूरच्या प्रशासनाची सूत्रे हाती घेतली. २८ वर्षे त्यांनी कोल्हापूरचा कायापालट करण्यात घालविली. १९२२ साली त्यांनी इहलोक सोडला. त्या काळात देशभर कडवे क्रांतिकारक बंड करण्याच्या तयारीत होते. इंग्रज सशस्त्र होते. विवेकानंदांची व्याख्याने अमेरिकेत गाजत होती. पण हा छत्रपती गोरगरीबांचा, दीनदलितांचा राजा होता, विव्दानांचा चाहता होता, कलावंतांचा त्राता होता, समाजसुधारकांचा दाता होता. विव्दानांचा चाहता होता, समाजसुधारकांचा दाता होता, शिक्षणाचा भोक्ता होता, स्थिर चित्ताने धोरण आखणारा नेता होता. उच्चवर्णीय समाजाच्या गुलामगिरीतून गरीबांना मुक्त करणारा सत्ताधीश होता. त्यांने क्षात्रजगदगुरूचे धर्मपीठ स्थापन केले. कुलकर्णी वतन नष्ट करून तलाठी पद निर्माण केले. बलुतेपध्दती नष्ट केली. पूर्वाश्रमीच्या गुन्हेगारांना मुक्त केले.

    महाराष्ट्राच्या इतिहासात ज्या महापुरूषांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते त्यामध्ये राजर्षी शाहु महाराज अग्रभागी आहेत. महाराजांनी मानवतावादी दृष्टीकोन ठेवला. समता प्रस्तापित करण्यासाठी जीवनभर अथक प्रयत्न केले. शेती सुधारणेला प्राधान्य दिले. शेतकर्यांना सवलती दिल्या. नोकरी व्यवसायाच्या संधी सामान्यांना उपलब्ध करून दिल्या. उद्योगधंदे उभे केले.

    २६ जुलै १८७४ हा राजर्षी शाहु महाराज यांचा जन्मदिवस. हा कालखंड इंग्रजी राजवटीचा. स्वातंत्र्यप्रेमाने भारावलेल्या समाजात सुधारणासाठी तळमळीने कार्य करणारे शाहु महाराज हे कोल्हापुर संस्थानातील निःस्पृह, निर्भय आणि लोककल्याणकारी राजे होते. त्यांनी लोकशिक्षणासाठी अनेक संस्था उभारल्या आणि समाजिक सुधारणेच्या चळवळीत जीव ओतला. जनतेचे कल्याण हिच ईश्वर पुजा मानणार्या शाहु महाराजांनी जनतेला वेठीस धरणारी वेठबिगार आणि बलुतेदार पध्दती बंद केली. राखीव घटकासाठी आदेश काढुन राखीव जागांची तरतुद केली.

    शाहु महाराजांनी महार आणि कुलकर्णी वतने नष्ट केली. दुष्काळग्रस्तांना आधार दिला. शेतकर्यांना सर्वोतोपरी मदत केली. तलाव दुरूस्ती केली. पाटबंधारे योजना हाती घेतल्या. आरोग्य केंद्राची निर्मिती केली. विविध जातीतील विद्यार्थीसाठी वस्तीगृहाची सोय केली. राजा हा सर्वव्यापक असावा. त्याला आपल्या राज्यांची संपुर्ण माहिती असावी या विचारांचा पगडा असलेल्या महाराजांनी सामाजिक सुधारणेबरोबर शेतीची सुधारणा करणे छोटे उद्योगधंदे उभारणे शेतकर्यांना सवलती देणे. नोकरी व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणे. यासारखी लोकोपयोगी कामे मोठया तळमळीने केली. केवळ राजा म्हणून ते वागले नाहीत, तर प्रजेचा मित्र म्हणून त्यांनी कार्य केले. शिक्षण हा विकासाचा पाया आहे. हे सुधारणेचे मुलतत्व शाहु महाराजांनी जाणले होते.

  • दामोदर गणेश पुजारे

    लाकडासारख्या कठीण वस्तूमध्ये इतकी जिवंत जादू असावी हा एक चमत्कारच! हा चमत्कार प्रत्यक्ष उतरवणारे ठाण्यातील एक प्रसिद्ध कलावंत म्हणजे दामोदर गणेश पुजारे. पुजारे ह्यांचा जन्म ११ जुलै १९३४ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातला वालावलचा. पुढे त्यांनी उच्च कलाशिक्षणासाठी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला आणि १९६२ साली ते आर्ट मास्टर झाले.

  • श्रीनिवास कुलकर्णी

    उजव्या कोप-यात गंगाखेड, परभणी असे लिहिलेले भरगच्च मजकुराचे पोस्टकार्ड उभ्याआडव्या महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणच्या कोणत्याही क्षेत्रात चळवळ्या असलेल्या कोणाहीकडे आले की ते श्रीनिवास कुलकर्णी यांचेच आहे हे क्षणात उमगायचे. वास्तविक श्रीनिवासचे मूळ गाव लातूर. तरुण वयातच आईवडिलांचे छत्र हरपले. पण व्यक्तिगत दु:खात ते कधीच हरवले नाहीत.

    वेठबिगार प्रथेविरोधात देशव्यापी आंदोलन छेडलेल्या स्वामी अग्नीवेश यांचे नाव सत्तरच्या दशकात गाजत होते. १९७३ साली औराद शहाजनी येथे झालेल्या आर्य युवक परिषदेच्या शिबिराच्या निमित्ताने श्रीनिवासांना स्वामीजींशी संपर्क साधता आला. त्यानंतर आपले पुढील आयुष्य दलित कष्टकरी वर्गातील अन्यायाविरोधात पणाला लावायचे हे त्यांनी पक्के ठरवून टाकले.

  • आदित्य रामदास सांगवेकर

    आदित्य हा एक नावाजलेला जलतरणपटू आहे ज्याने आशियाई स्तरावर भारतासाठी १ सुवर्ण व १ कांस्य पदक संपादित केले आहे.

  • संजय सूर्यकांत मिस्त्री

  • अशोक शेवडे

    अशोक शेवडे यांचा साहित्य, शिक्षण, राजकारण अशा विविध क्षेत्रात अफाट जनसंपर्क होता या सर्वांपेक्षा सुद्धा प्रत्येकाशी मैत्रीचे संबंध जोडणारे, माणुसकीच्या नात्याने वागणारे संयमी, सुहास्यवदन, संवेदनाशील सौजन्याने ओतप्रोत भरलेले व्यक्तिमत्व होते.