(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • रा. श्री. जोग

    साहित्य मीमांसक, कवी आणि एक विचारवंत म्हणून रा. श्री. जोगांची ओळख आहे. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज या गावी १५ मे १९०३ रोजी झाला. त्यांचे वडील श्रीपाद बाजी जोग हे संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. रा. श्री. जोग यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून झाले.

  • रंजन रघुवीर जोशी

    इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका व पुणे येथील सिम्बॉयसिस संस्थेसाठी त्यांनी दृककला विषयात भरीव कामगिरी केली आहे. जागतिक रंगकला व तंत्रज्ञान या क्षेत्रातील तज्ञ म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

  • वसंत रामजी खानोलकर

  • डॉ. दीप्ती देवबागकर

    जीवतंत्रज्ञानासारख्या आधुनिक विषयातील संशोधनात स्वत:चे आगळे स्थान निर्माण करणार्‍या पुणे विद्यापीठाच्या प्राणीसास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. दीप्ती देवबागकर विज्ञान प्रसारकही आहेत. विज्ञान लोकाभिमुख करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. जनुकाचे कामकाज बदलल्यामुळे कॅन्सरच्या पेशंटांवर होणारे परिणाम कसे कमी करता येतील, यावर त्या महत्वपूर्ण संशोधन सध्या करीत आहेत.

    डॉ. दीप्ती देवबागकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला विज्ञानप्रसाराचा डीएनए हा लेख पुढील पानावर वाचा.

    डॉ. दीप्ती देवबागकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला विज्ञानप्रसाराचा डीएनए हा लेख वाचा.

    devbagkar-dipti-modified

  • अरुण बाळकृष्ण कोलटकर

    अरुण कोलटकर हे महाराष्ट्रातील बहुभाषिक कवी होते. त्यांनी मराठीबरोबरच हिंदी व इंग्लिश भाषेत कविता लिहिल्या आहेत.

  • कमलाकर विश्वनाथ सातपुते

    अभिनेता म्हणून गेली १४ वर्षे या क्षेत्रात आहे. मामा वरेरकर पुरस्कार (सर्वोत्कृष्ट अभिनेता), हास्यसन्मान पुरस्कार, दोन वेळा अल्फा गौरव साठी नॉमीनेशन. एकदा कला संस्कृतीसाठी नामांकित.<

  • गणेश नाईक

    सरुवातीला शिवसेना पक्षातून आमदार त्यानंतर युती सरकारच्या कार्यकाळात कॅबिनेटमंत्रीपद, पुढे युतीने महाराष्ट्रातील सत्ता गमावल्यानंतर १९९९ साली शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करुन ठाणे व नवीमुंबई भागात या पक्षाचे स्थान बळकट करण्यात नाईक यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. १९९९ साली राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आल्यावर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व विविध मंत्रीपद गणेश नाईक यांनी भुषविली आहेत. त्यानंतर २००९ च्या लोकसभा निवडणुकीत गणेश नाईक प्रथमत: खासदार म्हणुन निवडून आले.

    त्यांची राजकीय कारकीर्द त्यांच्या दुरदृष्टीमुळे वा माणसे ओळखण्याच्या त्यांच्या विलक्षण कसबामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यांमध्ये भरणारी अशीच राहिली आहे. आपल्या कार्यकाळात नाईक यांनी जव्हार, मोखाडा, कल्याण, उल्हासनगर, पालघर, वसई, मिरा-भाईंदर, विक्रमगड, ठाणे शहर व नवी मुंबई अशा अनेक ठिकाणी जनता दरबार आयोजित करून सामान्य जनतेचे मुलभूत प्रश्न व असंख्य समस्यांना नाईक यांनी मोठ्या कौशल्याने सोडवले होते.

    कामगार मंत्री असताना अनेक गिरणी कामगारांना न्याय, बालकामगारमुक्त महाराष्ट्र, बालकामगारांचे पुनर्वसन, राज्यातील असंख्य सुरक्षा कामगारांना वेतन हमी, असंघटित कामगारांसाठी समान वेतनाची तरतुद, कंत्राटी कामगारांच्या समस्या अशा प्रकारचे कामगार हिताचे निर्णय त्यांनी घेतले होते. विशेष म्हणजे कामगार मंत्री असताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राट कामगारांना पालिकेत चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांप्रमाणे वेतन देण्याची तरतूद करून त्यांनी आपल्या देशापुढे माणुसकीचे अनोखे उदाहरण सादर केले होते. पर्यावरण व वनमंत्री असताना वन कर्मचार्‍यांना पाचवा वेतन आयोग लागू करणाचे, व वन्य जीवांपासून संरक्षण करण्याकरिता लागणारी शस्त्रे त्यांना पुरविण्याचे काम त्यांच्या पाठपुराव्यामुळे साकार झाले होते. तसेच उत्पादन शुल्क मंत्री म्हणून देखील त्यांनी राज्याच्या महसुलामध्ये मोठी भर घातली होती. भूगर्भातील उष्णतेवर तयार करण्यात येणरा विद्युतप्रकल्प ठाणे जिल्ह्यात सर्वप्रथम उभारण्यात यावा हे त्यांचे स्वप्न त्यांच्या वेगळेपणाविषयी बरेच काही सांगून जाते.

    गणेश नाईक यांचा राजकारणाचा व समाजकारणाचा वारसा त्यांचे दोन्ही पुत्र म्हणजे नवीमुंबईचे महापौर सागर नाईक व आमदार संजीव नाईक हे चालवत आहे. नवीमुंबई म्हणजे नाईक मुंबई अशी ओळख निर्माण ते यशस्वी झाले असा सूर उपरोधक पणे तर कधी मिश्कीलरित्या माध्यामातुन किंवा जनतेतुन निघत असतो.

    २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गणेश नाईक यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला होता.

  • राजा राजवाडे

    राजा राजवाडे यांचा त्यांच्या मित्रावर खूप लोभ.म्हणूनच त्यांच्या ‘दोस्ताना’ या व्यक्तिचित्रण संग्रहात त्यांनी आरती प्रभू, नारायण सुर्वे, रमेश मंत्री, वसंत सावंत, श्याम जोशी, मधु मंगेश कर्णिक या मित्रांबद्दल खूप प्रभावीपणे लिहिले आहे.

  • अंजना ठमके

    चीनमधील नानजिंगमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई युवा क्रिडा स्पर्धेत नाशिकच्या अंजना ठमके हिने ८०० मीटरच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. नाशिकच्या आदिवासीबहुल गणेशगावातून आलेल्या अंजनाची ही धाव सोन्यासारखी लकाकती ठरली आहे.

    अंजनाचा सुवर्णवेध

  • जगन्नाथ कुंटे तथा स्वामी अवधूतानंद

    तीन वेळा परिक्रमा केल्यानंतर त्यांनी ‘नर्मदे हर हर’ हे पुस्तक लिहिले. या परिक्रमेत त्यांना आलेले अनुभव अत्यंत रोमांचक आणि अचंबित करणारे आहेत. लेखकपणाचा कोणताही आव न आणता फक्त घटनेशी भिडण्याच्या त्यांच्या शैलीने वाचक मंत्रमुग्ध झाले. त्यांचे काही चमत्कारांचे अनुभव बुद्धीला पटणारे नसले, तरी कुंटे यांची शोधक वृत्ती आणि मानवी स्वभावाची निरीक्षणशक्ती यांमुळे त्यांच्या पुस्तकाच्या चाहत्यांची संख्या वाढतच गेली.