(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • संदीप अवचट

    संदीप अवचट हे नामांकित व विश्वासार्ह मानले जाणारे प्रसिध्द ज्योतिषी, व प्राचीन ज्योतिर्विद्या तसेच अर्वाचीन अंकशास्त्राचे गाढे आभ्यासक व चिकीत्सक आहेत.

  • नरहर रघुनाथ फाटक (न. र. फाटक)

    इतिहास संशोधक आणि चरित्रकार हाच नरहर रघुनाथ फाटक यांचा महाराष्ट्राला परिचय. न. र. फाटकांचा जन्म १५ एप्रिल १८९३ सालचा. कोकणातील कमोद या गावाचे फाटकांचे घराणे. तेथून त्यांचे पूर्वज पुणे जिल्ह्यातील भोर संस्थानातील जांभळी या गावी आले.

  • सरिता मंगेश पदकी

    चतुरस्त्र लेखिका सरिता मंगेश पदकी यांचा जन्म १३ डिसेंबर १९२८ रोजी झाला.

    चैत्रपुष्प (काव्यसंग्रह) बारा रामाचे देऊळ, घुम्मट (कथासंग्रह) बाधा, खून पाहावा करुन, सीता (नाटके) व ब्राझीलच्या झोपडपट्टीत राहणार्‍या करोलिना मारिया डि जीझस यांच्या आत्मनिवेदनाच्या काळोखाची लेख या अनुवादासह चार अनुवादित पुस्तके व भरपूर बालसाहित्य त्यांच्या नावावर आहे.

    ## Sarita Mangesh Padaki

    mss

  • डॉ. शंकर गोपाळ तुळपुळे

    पाच संतकवी, महानुभाव पंथ आणि त्याचे वाङ्मय, लीळाचरित्र, मराठी वाङ्मयाचा इतिहास खंड – १, प्राचीन मराठी शब्दकोश, गुरुदेव रानडे – चरित्र व तत्त्वज्ञान, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

  • सुधीर मुनगंटीवार

    मुनगंटीवार, सुधीर

    सुधीर मुनगंटीवार यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी झालेली निवड म्हणजे भाजपच्या महाराष्ट्रातील महाजन-मुंडे यांच्या एकछत्री वर्चस्वाची अखेर, असाच स्पष्ट संकेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दिला आहे. नितीन गडकरी यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली त्याच दिवशी सुधीर मुनगंटीवार यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्याचे संकेत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्पष्टपणे मिळालेले होते. त्यामुळे प्रसार माध्यमात जेव्हा प्रदेशाध्यक्षपदी ‘मुनगंटीवार की, देवेंद्र फडणवीस की, विनोद तावडे’, अशा बातम्या प्रकाशित होत होत्या तेव्हा या जाणत्यांची चांगलीच करमणूक होत होती.

    आता सुधीर मुनगंटीवार आणि पुढील विधानसभा, तसेच लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होईल तेव्हा विनोद तावडे प्रदेशाध्यक्ष होतील, हे या जाणकारांना चांगले ठाऊक होते. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे नुसतेच हाकारे काही रिकामटेकडे राजकारणी पिटत असताना महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी सुधीर मुनगंटीवार यांची निवड, हा काही केवळ राजकीय योगायोग नव्हता. या हाकाटीपासून मुनगंटीवार यांनी स्वत:ला कटाक्षाने दूर ठेवले आणि जेव्हा स्वतंत्र विदर्भाच्या संदर्भात मतप्रदर्शन करण्याची वेळ आली तेव्हा आक्रस्ताळेपणा दाखवला नाही की वचावचा वक्तव्येही केली नाहीत. हे जे राजकीय भान आणि सामंजस्य सुधीर मुनगंटीवार यांनी गेली साडेतीन-चार महिने सातत्याने दाखवले त्यामुळेच पुन्हा एखादा वैदर्भीयच प्रदेशाध्यक्षपदी आरूढ होण्याचा मार्गही आणखी सुकर झाला. केवळ याच एका कारणावरून देवेंद्र फडणवीस यांचे नाव मागे पडले आणि सुधीर मुनगंटीवार नावाच्या धडपडय़ा, कष्टाळू आणि वयाच्या पन्नाशीच्या उंबरठय़ावर असलेल्या, विलक्षण राजकीय आकलन असणाऱ्या अशा या नितीन गडकरींच्या विश्वासू कार्यकर्त्यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली. व्यवस्थापनशास्त्रासह तीन पदव्या तसेच, तीन पदव्युत्तर पदव्या, अशी झळझळीत शैक्षणिक पाश्र्वभूमी असलेल्या आणि महाराष्ट्राच्या एका टोकावर असलेल्या चंद्रपूरसारख्या आदिवासी भागातला प्रसंगावधानी आणि राजकीय महत्त्वाकांक्षा असणारा कार्यकर्ता म्हणून सुधीर मुनगंटीवार यांची संपूर्ण विदर्भाला आणि बहुतांश महाराष्ट्राला ओळख आहे. विद्याथीदशेपासूनच चळवळीत असणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनी १९८१ मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश करून स्थानिक नेत्यांनी दिले ते काम अतिशय नेटाने सांभाळले. या निष्ठेने काम करण्याचे फळ म्हणून त्यांना १९८९ आणि ९१ अशा दोन लोकसभा निवडणुकींत उमेदवारीही मिळाली. काँग्रेसच्या ज्या शांताराम पोटदुखेंसारख्या तुल्यबळ उमेदवारांसमोर या दोन्ही निवडणुकींत मुनगंटीवार यांना पराभव स्वीकारावा लागला तेच शांताराम पोटदुखे आज सुधीर मुनगंटीवार यांच्या राजकीय कर्तृत्वाचे कौतुक मुक्तकंठाने करतात. हे जसे पोटदुखे यांचे मोठेपण आहे, तसेच राजकारणापुरते राजकारण आणि विकासाबाबत व्यापक दृष्टिकोन, वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठांबद्दल आदर, या मुनगंटीवार यांच्या कामाच्या त्रिसूत्रीचे हे यश आहे. या गुणांसोबत व्यापक जनसंपर्क, त्याला प्रभावी वक्तृत्वाची जोड आणि विकासाची तळमळ, असे अनेक पदरही लाभलेले आहेत. मतदारसंघातली कामे करत असताना केवळ आर्थिकदृष्टय़ा बडय़ा किंवा मध्यमवर्गीय मतदारांवरच मुनगंटीवार यांनी लक्ष केंद्रित केले नाही. धडधाकटांसोबतच अंध, अपंग, दीनदुबळय़ांना सुधीर मुनगंटीवार हक्काचा आधार वाटतात. त्यामुळेच मुनगंटीवारांचे वाहन चंद्रपुरातून जात असले की, ‘सुधीरभाऊ’ अशी हाक गल्लीच्या कोणत्याही कोपऱ्यातून हक्काने येते आणि मुनगंटीवार रस्त्यात थांबून त्या माणसाला दिलासा देतात, असे मतदारांशी मुनगंटीवारांचे प्रामाणिक नाते आहे. १९९५ पासून सलग चार विधानसभा निवडणुकींत सुधीर मुनगंटीवार विजयी झाले. मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांशी जोडली गेलेली नाळ किती अतूट आहे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुनगंटीवार यांचे हे सलग चार विजय आहेत. प्रदेशाध्यक्षपद म्हणजे आजवरच्या स्वच्छ आणि निष्ठापूर्वक केलेल्या कामाचे मुनगंटीवार यांना मिळालेले फळ आहे.

  • प्रविण कारखानीस

    भुंगा जसा चंचलपणे एका फुलावरून दुसरीकडे उडून प्रत्येक फुलामधील मधाचा आस्वाद घेत असतो तश्याच प्रकारे काही व्यक्तींना सतत दुसर्‍या देशांना व अगदी दुसर्‍या टोकांवर असलेल्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्याची हुरहुर लागलेली असते व अशा प्रवासवेड्या कलंदरांमध्ये प्रवीण कारखानीस यांचे नाव आवर्जुन घ्यावेसे वाटते. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे त्यांनी निरनिराळ्या देशांना व तिथल्या ऐतिहासिक स्थळांना आभ्यासपुर्ण भेटी देवून तिथल्या संस्कृतींशी समरस होण्यात, व तिथल्या पारंपारिक कलांचा व पदार्थांचा आस्वाद घेण्यातच आपल्या जीवनातील बराचसा काळ व्यतित केला आहे.

  • रमेश देव

    भिंगरी’ चित्रपटात त्यांनी साकारलेला खलनायक अविस्मरणीयच. मराठीत यापूर्वी खलनायक रूबाबदार असू शकतो ही संकल्पनाच नव्हती. रमेश देव यांनी खलनायकी भूमिकेला ग्लॅमर मिळवून दिले.तरीही त्यांनी स्वतला विशिष्ट परिघात अडकवून न घेता चौफेर मुशाफिरी केली. त्यांनी नायक, सहनायक, चरित्र अभिनेता ते खलनायक अशा सर्वच भूमिका केल्या.

  • गौरीनाथ नथुराम तेलवणे

    ठाण्यात संगीतक्षेत्रात काम करणारे अनेक दिग्गज कलाकार राहतात. यांतीलच एक प्रसिद्ध नाव म्हणजे ज्येष्ठ तबलावादक गौरीनाथ नथुराम तेलवणे हे होते.

  • शोभना समर्थ

    साधना’ (१९३९), ‘सौभाग्य’ (१९४०), ‘भरतमिलाप’, ‘स्वामीनाथ’ (१९४२), ‘रामराज्य’ (१९४३), ‘उर्वशी’ (१९४६), ‘विधरांगणा’ (१९४७), ‘रामबाण’ (१९४८), ‘रामविवाह’ (१९४९), ‘रामायण’ (१९५४). राम-सीतेच्या भूमिकेतील ही जोडी भारतभर पसंतीस उतरली.

  • रत्नाकर धम्मपाल

    गेल्या पाच-सहा वर्षांत धम्मपाल रत्नाकर हे नाव मराठी साहित्यात जोरकसपणे पुढे येऊ लागले होते. त्यांच्या ' हॉटेल माझा देश ' या पहिल्याच काव्यसंग्रहाने भल्याभल्यांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले होते. ' जिथे नसते जात, जिथे नसतो धर्म। जिथं नसतो पंथ, फक्त असतात माणसं। त्या माणसांचा देश! हॉटेल माझा देश!! ' अशा सोप्या ओळींतून त्यांनी हॉटेलचे विश्व उभे केले आणि मराठी साहित्यात अनुभवांचे एक वेगळेच दालन उघडले.

    धम्मपाल यांना पोटासाठी हॉटेलात नोकरी करावी लागत होती. वेटर म्हणून तिथे काम करताना अठरापगड जातीच्या माणसांना सामावून घेणारी, अडल्या-नडल्यांना, उपेक्षितांना काम मिळवून देणारी हॉटेल नावाची व्यवस्था त्यांनी अंतर्बाह्य अनुभवली होती. तिथले हर्ष-विमर्ष, यातना, उपेक्षा, आपुलकी या सार्‍याचे अधिक तपशिलातले चित्रण त्यांच्या ' विसकट ' या कादंबरीत उमटले. हॉटेल माझा देश आणि विसकट या दोन्ही पुस्तकांना अनुक्रमे महाराष्ट्र फाऊंडेशन आणि महाराष्ट्र राज्य वाङ्मयनिर्मिती पुरस्कार मिळाले. परंतु केवळ लेखक-कवी एवढीच त्यांची ओळख नव्हती. ते आंबेडकरी चळवळीतील हाडाचे कार्यकर्ते होते.

    कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील येडगुळ गावी अठराविश्वे दारिद्र्य असलेल्या एका कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आईवडिल शेतमजूर. धम्मपालनीही लहानपणी पडतील ती कामे केली. परंतु शिकण्याची उर्मी मोठी होती. पुढे ते शिकण्यासाठी कोल्हापुरात आले. तेथे त्यांनी हॉटेलात नोकरी केली. तिथे त्यांची जीवनदृष्टी आमूलाग्र बदलून गेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा त्यांच्यापाशी होता. आपण शिकावे आणि समाजाला पुढे न्यावे, जन्मदात्यांचे उतराई व्हावे याचे जागते भान त्यांच्या ठायी शेवटपर्यंत होते. ते एम.ए. झाले व पुढे नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर पीएच.डी. करून डॉक्टरही झाले.

    कोल्हापूरच्या शहाजी महाविद्यालयात ते मराठी शिकवत. त्यांचे कार्यकर्तेपण साहित्य चळवळीतही डोकावे. कोल्हापुरात त्यांनी ' आम्ही ' नावाची साहित्य चळवळ सुरू केली. नंतर दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचेही ते काही काळ कार्यवाह होते. त्यांची कारकीर्द अशी आकार घेत असतानाच त्यांच्यावर काळाने झडप घेतली. कावीळ आणि न्यूमोनियाचे निमित्त होऊन वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी त्यांचे देहावसान झाले. गेल्या काही काळात अरूण काळे, भुजंग मेश्र्राम, ऋत्विज काळसेकर, भारत सातपुते अशा तरुण लेखक-कवींनी आकस्मिकपणे जगाचा निरोप घेऊन साऱ्यांना चटका लावला. धम्मपाल रत्नाकर यांचे जाणेही असेच धक्कादायक आणि मराठी साहित्याचे नुकसान करणारे ठरले.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)