राष्ट्रीय संस्कृत पंडित असणार्या कविश्वर श्रीदत्तात्रेय धुंडिराज कविश्वर यांनी निंबाकाचार्यांच्या ब्रह्मसूत्रावरील टीकेचे वेदान्त पारिजात सौरभ चे संशोधनाचे काम पाहिले होते.
माधवाचार्यांच्या सर्वच दर्शनसंग्रहवर विस्तृत टीका लिहिली. कामकोटी पीठाने सुवर्णपदक मिळवुन देत द्वारकेच्या श्री. शंकराचार्य ह्यांनी महामहोपाध्याय ही पदवी देऊन तर भारत सरकारकडून राष्ट्रीय संस्कृत पंडित हे सन्मानपत्र देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान केला होता .
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
अधिक माहितीसाठी पहा ..
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे जन्मलेल्या महाबळेश्वर मोरजे यांचे प्राथमिक शिक्षण वेंगुर्ला, हुबळी आणि पार्ल्यातील पार्ले टिळक विद्यालयात झाले. चर्चगेट येथील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून ते १९६४ मध्ये एल.एल.एम. झाले. याशिवाय एम.कॉम. (कॉस्टिंग) ही पदवीही त्यांनी संपादन केली होती. त्यांनी लंडनच्या इन्शुरन्स व चार्टर्ड सेक्रेटरी या पदविका घेतल्या होत्या. ज्येष्ठ वकील आर. सी. बेलोसे, रामराव आदिक व न्या. जी. एन. वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वकिली व्यवसायाचे धडे घेतले. त्यांनी मुंबई, मराठवाडा आणि शिवाजी विद्यापीठांत अध्यापनाचे काम केले. जगभरातील फ्लॅटओनर्स व रेंट अॅक्ट याच्या शोधनिबंधाबद्दल त्यांना १९६७ मध्ये पुरस्कार मिळाला. त्यांनी कायद्याच्या अभ्यासानिमित्त लंडन, अमेरिका येथे दौरे केले. १९७८ मध्ये ते सरकारी वकील; तर १९८७ मध्ये बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा याचे सदस्य होते. 'आय लव्ह मुंबई' या समितीचे ते ट्रस्टी होते.
मुंबईचे माजी शेरीफ नाना चुडासामा व तत्कालिन राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्वच्छ मुंबई व तिच्या सुशोभीकरणासाठी प्रयत्न केले. पर्यावरण व वृक्षारोपण कामाबद्दलही त्यांचा गौरव झाला होता. महाराष्ट्र विधानसभा बरखास्ती, इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान आणि आणीबाणीच्या काळातील खटल्यांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. हाऊसिंग पॉलिसी ऑफ इंडिया, पंचायत राज, एन्व्हायर्नमेंट लॉ आदी पुस्तके त्यांनी लिहिली. इंग्रजी-मराठी वृत्तपत्रांतून त्यांनी कायदेविषयक विपुल लेखन केले. जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या सुकथणकर कमिटीचे ते सदस्य होते.
मुंबईतील जुन्या चाळींचा प्रश्न व फ्लॅटओनर्सच्या समस्या हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. सामान्य माणसाचे फ्लॅटचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी १९८३ मध्ये फ्लॅट ओनर्स असोएशिनची स्थापना केली. सामान्यांची फसवणूक करणार्या बिल्डर व डेव्हलपर यांच्यावर महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅटओनर्स अॅक्टअंतर्गत कारवाई करण्यासाठी सरकारला कायदेविषयक मार्गदर्शन केले. मुंबईतील पार्किंगच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते. मुंबईकरांच्या न संपणार्या समस्यांचा कायद्याच्या दृष्टीने अभ्यास करणार्या या ज्येष्ठ कायदेतज्ज्ञाला मुंबई हायकोर्टाने त्यांच्या कर्तृत्वाचा बहुमान म्हणून सिनीअर कौन्सिलचा सन्मानही दिला होता.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
विष्णू हरी औंधकर हे नट आणि नाटककार होते. बेबंदशाही, आग्र्याहून सुटका या ऐतिहासिक नाटकांसह 'महारथी कर्ण' हे पौराणिक नाटकही त्यांनी लिहिले. १७ डिसेंबर १९४२ रोजी विष्णू हरी औंधकर यांचे निधन झाले.
## Vishnu Hari Aundhkar
(जन्म १९४२)
जागतिक कीर्तीचे पर्यावरण शास्त्रज्ञ. मुंबईच्या विज्ञान संस्थेमधून १९६५ मध्ये एम.एस्सी. आणि हार्वर्ड विद्यापीठाची १९६९ मध्ये पीएच.डी. पश्चिम घाट, राजस्थान, हिमालय, पनामा, पूर्व आफ्रिका, अमेरिका इथल्या पर्यावरणाचा प्रत्यक्ष अभ्यास. भारतांतील बायोस्फिअर रिझर्व्ह यांच्या कक्षा ठरवून त्यांचे नियम करण्यासाठी व निलगिरी बायोस्फिअर रिझर्व्हच्या घाटीत प्रत्यक्ष फिरून धोरण आखण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. सस्तन प्राण्यांची वागणूक पद्धती, आदिवासी जमातींच्या पर्यावरणाला अनुकूल जीवनपद्धती आणि वा. द. वर्तक यांचेबरोबर अभ्यासलेले देवरायांचे महत्त्व, हे त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे. माधव गाडगीळ यांना भटनागर पुरस्कार, भारतातील वैज्ञानिक संस्थांचे सदस्यत्व, भारत सरकारची पद्मश्री इत्यादी सन्मानप्राप्त झालेले आहेत. बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथून निवृत्त झाल्यावर ते पुण्यात स्थायिक झाले आहेत. १९८३ साली लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे भरलेल्या मराठी विज्ञान संमेलनाचे ते अध्यक्ष हते.
माहितीस्त्रोत - (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोष
कुसुमाग्रजांनी त्यांना ‘जनकवी’ ही उपाधी दिली होती. ‘गंगा-यमुना’ हा त्यांच्या गीतांचा संग्रह पुस्तकरुपाने प्रसिध्द झाला आहे.
मराठी चित्रपटातील खाष्ट सासू आणि करारी स्त्री, थोडी आधुनिक तर कधी हेखेखोर अशा भूमिकांची आठवण होताच डोळ्यासमोर नाव उभं रहातं अभिनेत्री “दया डोंगरे” यांचं. कोणतीही व्यक्तिरेखा समर्थपणे साकारणा-याची हातोटी दया डोंगरे यांना चांगलीच अवगत होती.
कवी, पत्रकार, संपादक आणि मराठी गझल साहित्याचे मानदंड समजले जाणारे गझलकार सुरेश श्रीधर भट. १५ एप्रिल १९३२ रोजी अमरावती येथे सुरेश भटांचा जन्म झाला. शिक्षण अमरावती येथे झाले. बी. ए. ची पदवी त्यांनी विदर्भ महाविद्यालय येथून प्राप्त केली. त्यानंतर अनेक वृत्तपत्रातून ते लिखाण करू लागले. तरुणभारत, लोकसत्ता इ. वृत्तपत्रातून वार्ताहर म्हणून त्यांनी काम पाहिलं. ‘बहुमत’ या साप्ताहिकाचे ते काही वर्ष संपादकही होते.
भारतरत्न सचिन तेंडुलकर सहित अजित आगरकर, अमोल मुजुमदार, विनोद कांबळी, प्रवीण आमरे, चंद्रकांत पंडित, बलविंदर सिंग संधू, समीर दिघे यांच्यासारख्या महान क्रिकेटपटूसह असंख्य नामवंत क्रिकेटपटू घडवणारे आणि पद्मश्री व द्रोणाचार्य या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले ऋषितुल्य प्रशिक्षक श्री रमाकांत आचरेकर हे खर्या अर्थाने क्रिकेटचे महागुरू होते.
ठाण्यातील एक हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देणारं पहिलं कॉल सेंटर सुरु करुन डॉ. निरगुडकरांनी एक नवा वस्तुपाठच घालून दिला आहे. तसेच संपूर्ण भारतातील ६०,००० अर्धशिक्षित तरुणांना स्वयंरोजगारासाठी क्षमतावृद्धीचे शिक्षण देऊन रोजगारासाठी समृद्ध केलं.
लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्याबरोबर वयाच्या आठव्या वर्षी नंदेश रंगमंचावर गायला उभा राहिला. परिणामी ‘ये दादा आवार ये…’ म्हणणाऱ्या कोळणीपासून ते ‘नाय बा किस्ना असून उपकाल, संगत तुजी नाई बली ले’ म्हणणाऱ्या पेंद्याच्या बोबड्या गवळणीपर्यंत लोकशाहिरांची गायकी नंदेशने सहीसही उचलली.
Copyright © 2025 | Marathisrushti