सुधीर मुनगंटीवार

मुनगंटीवार, सुधीर

सुधीर मुनगंटीवार यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी झालेली निवड म्हणजे भाजपच्या महाराष्ट्रातील महाजन-मुंडे यांच्या एकछत्री वर्चस्वाची अखेर, असाच स्पष्ट संकेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दिला आहे. नितीन गडकरी यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली त्याच दिवशी सुधीर मुनगंटीवार यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्याचे संकेत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्पष्टपणे मिळालेले होते. त्यामुळे प्रसार माध्यमात जेव्हा प्रदेशाध्यक्षपदी ‘मुनगंटीवार की, देवेंद्र फडणवीस की, विनोद तावडे’, अशा बातम्या प्रकाशित होत होत्या तेव्हा या जाणत्यांची चांगलीच करमणूक होत होती.

आता सुधीर मुनगंटीवार आणि पुढील विधानसभा, तसेच लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होईल तेव्हा विनोद तावडे प्रदेशाध्यक्ष होतील, हे या जाणकारांना चांगले ठाऊक होते. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे नुसतेच हाकारे काही रिकामटेकडे राजकारणी पिटत असताना महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी सुधीर मुनगंटीवार यांची निवड, हा काही केवळ राजकीय योगायोग नव्हता. या हाकाटीपासून मुनगंटीवार यांनी स्वत:ला कटाक्षाने दूर ठेवले आणि जेव्हा स्वतंत्र विदर्भाच्या संदर्भात मतप्रदर्शन करण्याची वेळ आली तेव्हा आक्रस्ताळेपणा दाखवला नाही की वचावचा वक्तव्येही केली नाहीत. हे जे राजकीय भान आणि सामंजस्य सुधीर मुनगंटीवार यांनी गेली साडेतीन-चार महिने सातत्याने दाखवले त्यामुळेच पुन्हा एखादा वैदर्भीयच प्रदेशाध्यक्षपदी आरूढ होण्याचा मार्गही आणखी सुकर झाला. केवळ याच एका कारणावरून देवेंद्र फडणवीस यांचे नाव मागे पडले आणि सुधीर मुनगंटीवार नावाच्या धडपडय़ा, कष्टाळू आणि वयाच्या पन्नाशीच्या उंबरठय़ावर असलेल्या, विलक्षण राजकीय आकलन असणाऱ्या अशा या नितीन गडकरींच्या विश्वासू कार्यकर्त्यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली. व्यवस्थापनशास्त्रासह तीन पदव्या तसेच, तीन पदव्युत्तर पदव्या, अशी झळझळीत शैक्षणिक पाश्र्वभूमी असलेल्या आणि महाराष्ट्राच्या एका टोकावर असलेल्या चंद्रपूरसारख्या आदिवासी भागातला प्रसंगावधानी आणि राजकीय महत्त्वाकांक्षा असणारा कार्यकर्ता म्हणून सुधीर मुनगंटीवार यांची संपूर्ण विदर्भाला आणि बहुतांश महाराष्ट्राला ओळख आहे. विद्याथीदशेपासूनच चळवळीत असणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनी १९८१ मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश करून स्थानिक नेत्यांनी दिले ते काम अतिशय नेटाने सांभाळले. या निष्ठेने काम करण्याचे फळ म्हणून त्यांना १९८९ आणि ९१ अशा दोन लोकसभा निवडणुकींत उमेदवारीही मिळाली. काँग्रेसच्या ज्या शांताराम पोटदुखेंसारख्या तुल्यबळ उमेदवारांसमोर या दोन्ही निवडणुकींत मुनगंटीवार यांना पराभव स्वीकारावा लागला तेच शांताराम पोटदुखे आज सुधीर मुनगंटीवार यांच्या राजकीय कर्तृत्वाचे कौतुक मुक्तकंठाने करतात. हे जसे पोटदुखे यांचे मोठेपण आहे, तसेच राजकारणापुरते राजकारण आणि विकासाबाबत व्यापक दृष्टिकोन, वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठांबद्दल आदर, या मुनगंटीवार यांच्या कामाच्या त्रिसूत्रीचे हे यश आहे. या गुणांसोबत व्यापक जनसंपर्क, त्याला प्रभावी वक्तृत्वाची जोड आणि विकासाची तळमळ, असे अनेक पदरही लाभलेले आहेत. मतदारसंघातली कामे करत असताना केवळ आर्थिकदृष्टय़ा बडय़ा किंवा मध्यमवर्गीय मतदारांवरच मुनगंटीवार यांनी लक्ष केंद्रित केले नाही. धडधाकटांसोबतच अंध, अपंग, दीनदुबळय़ांना सुधीर मुनगंटीवार हक्काचा आधार वाटतात. त्यामुळेच मुनगंटीवारांचे वाहन चंद्रपुरातून जात असले की, ‘सुधीरभाऊ’ अशी हाक गल्लीच्या कोणत्याही कोपऱ्यातून हक्काने येते आणि मुनगंटीवार रस्त्यात थांबून त्या माणसाला दिलासा देतात, असे मतदारांशी मुनगंटीवारांचे प्रामाणिक नाते आहे. १९९५ पासून सलग चार विधानसभा निवडणुकींत सुधीर मुनगंटीवार विजयी झाले. मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांशी जोडली गेलेली नाळ किती अतूट आहे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुनगंटीवार यांचे हे सलग चार विजय आहेत. प्रदेशाध्यक्षपद म्हणजे आजवरच्या स्वच्छ आणि निष्ठापूर्वक केलेल्या कामाचे मुनगंटीवार यांना मिळालेले फळ आहे.



मुनगंटीवार, सुधीर

सुधीर मुनगंटीवार यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी झालेली निवड म्हणजे भाजपच्या महाराष्ट्रातील महाजन-मुंडे यांच्या एकछत्री वर्चस्वाची अखेर, असाच स्पष्ट संकेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दिला आहे. नितीन गडकरी यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली त्याच दिवशी सुधीर मुनगंटीवार यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्याचे संकेत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्पष्टपणे मिळालेले होते. त्यामुळे प्रसार माध्यमात जेव्हा प्रदेशाध्यक्षपदी ‘मुनगंटीवार की, देवेंद्र फडणवीस की, विनोद तावडे’, अशा बातम्या प्रकाशित होत होत्या तेव्हा या जाणत्यांची चांगलीच करमणूक होत होती.

आता सुधीर मुनगंटीवार आणि पुढील विधानसभा, तसेच लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होईल तेव्हा विनोद तावडे प्रदेशाध्यक्ष होतील, हे या जाणकारांना चांगले ठाऊक होते. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे नुसतेच हाकारे काही रिकामटेकडे राजकारणी पिटत असताना महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी सुधीर मुनगंटीवार यांची निवड, हा काही केवळ राजकीय योगायोग नव्हता. या हाकाटीपासून मुनगंटीवार यांनी स्वत:ला कटाक्षाने दूर ठेवले आणि जेव्हा स्वतंत्र विदर्भाच्या संदर्भात मतप्रदर्शन करण्याची वेळ आली तेव्हा आक्रस्ताळेपणा दाखवला नाही की वचावचा वक्तव्येही केली नाहीत. हे जे राजकीय भान आणि सामंजस्य सुधीर मुनगंटीवार यांनी गेली साडेतीन-चार महिने सातत्याने दाखवले त्यामुळेच पुन्हा एखादा वैदर्भीयच प्रदेशाध्यक्षपदी आरूढ होण्याचा मार्गही आणखी सुकर झाला. केवळ याच एका कारणावरून देवेंद्र फडणवीस यांचे नाव मागे पडले आणि सुधीर मुनगंटीवार नावाच्या धडपडय़ा, कष्टाळू आणि वयाच्या पन्नाशीच्या उंबरठय़ावर असलेल्या, विलक्षण राजकीय आकलन असणाऱ्या अशा या नितीन गडकरींच्या विश्वासू कार्यकर्त्यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली. व्यवस्थापनशास्त्रासह तीन पदव्या तसेच, तीन पदव्युत्तर पदव्या, अशी झळझळीत शैक्षणिक पाश्र्वभूमी असलेल्या आणि महाराष्ट्राच्या एका टोकावर असलेल्या चंद्रपूरसारख्या आदिवासी भागातला प्रसंगावधानी आणि राजकीय महत्त्वाकांक्षा असणारा कार्यकर्ता म्हणून सुधीर मुनगंटीवार यांची संपूर्ण विदर्भाला आणि बहुतांश महाराष्ट्राला ओळख आहे. विद्याथीदशेपासूनच चळवळीत असणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनी १९८१ मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश करून स्थानिक नेत्यांनी दिले ते काम अतिशय नेटाने सांभाळले. या निष्ठेने काम करण्याचे फळ म्हणून त्यांना १९८९ आणि ९१ अशा दोन लोकसभा निवडणुकींत उमेदवारीही मिळाली. काँग्रेसच्या ज्या शांताराम पोटदुखेंसारख्या तुल्यबळ उमेदवारांसमोर या दोन्ही निवडणुकींत मुनगंटीवार यांना पराभव स्वीकारावा लागला तेच शांताराम पोटदुखे आज सुधीर मुनगंटीवार यांच्या राजकीय कर्तृत्वाचे कौतुक मुक्तकंठाने करतात. हे जसे पोटदुखे यांचे मोठेपण आहे, तसेच राजकारणापुरते राजकारण आणि विकासाबाबत व्यापक दृष्टिकोन, वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठांबद्दल आदर, या मुनगंटीवार यांच्या कामाच्या त्रिसूत्रीचे हे यश आहे. या गुणांसोबत व्यापक जनसंपर्क, त्याला प्रभावी वक्तृत्वाची जोड आणि विकासाची तळमळ, असे अनेक पदरही लाभलेले आहेत. मतदारसंघातली कामे करत असताना केवळ आर्थिकदृष्टय़ा बडय़ा किंवा मध्यमवर्गीय मतदारांवरच मुनगंटीवार यांनी लक्ष केंद्रित केले नाही. धडधाकटांसोबतच अंध, अपंग, दीनदुबळय़ांना सुधीर मुनगंटीवार हक्काचा आधार वाटतात. त्यामुळेच मुनगंटीवारांचे वाहन चंद्रपुरातून जात असले की, ‘सुधीरभाऊ’ अशी हाक गल्लीच्या कोणत्याही कोपऱ्यातून हक्काने येते आणि मुनगंटीवार रस्त्यात थांबून त्या माणसाला दिलासा देतात, असे मतदारांशी मुनगंटीवारांचे प्रामाणिक नाते आहे. १९९५ पासून सलग चार विधानसभा निवडणुकींत सुधीर मुनगंटीवार विजयी झाले. मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांशी जोडली गेलेली नाळ किती अतूट आहे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुनगंटीवार यांचे हे सलग चार विजय आहेत. प्रदेशाध्यक्षपद म्हणजे आजवरच्या स्वच्छ आणि निष्ठापूर्वक केलेल्या कामाचे मुनगंटीवार यांना मिळालेले फळ आहे.

Author