(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • पुरुषोत्तम श्रीपत काळे

    पुरुषोत्तम श्री काळे यांना जवळचे लोक अण्णा म्हणत असत. ललितकलादर्श’चे कल्पक चित्रकार आणि नेपथ्यकार म्हणून पु.श्री. काळे यांची ओळख होती. मराठी लेखक व.पु. काळे यांचे हे वडील होत. व.पु. काळे यांनी आपल्या वडिलांच्या वर “वपु सांगे वडिलांची कीर्ती” हे पुस्तक लिहिले आहे.

  • य. गो. जोशी

    य.गो. जोशी यांची ’एक रुपया दोन आणे’ ही पहिली कथा यशवंत या मसिकात १९२९ साली प्रसिद्ध झाली. आणि याच मासिकाच्या कथास्पर्धेत य.गो. जोशींच्या ’शेवग्याच्या शेंगा’ या कथेस पहिले पारितोषिक मिळाले.

  • मोरेश्वर घैसास गुरुजी

    मोरेश्वर घैसास गुरुजी यांचे वडील प्रसिद्ध ऋग्वेदी, घनपाठी वेदमहर्षी विनायकभट्ट हरिभट्ट गुरुजी यांनी आपल्या पुढील पिढीलाही वेदांच्या अध्ययनाचा वारसा दिला पाहिजे, या विचारातून त्यांनी पुण्यात राहण्याचे निश्चित केले. सदाशिव पेठेत स्वतःच्या राहत्या खोलीत त्यांनी वेदपाठशाळा सुरू केली. दोन विद्यार्थ्यांना घेऊन १५ ऑक्टोबर १९४५ मध्ये त्यांचे अध्यापन सुरू केले.

  • माधव केशव काटदरे

    हिरवे तळकोकण’ लिहिणारे निसर्गकवी माधव केशव काटदरे हे अर्थातच कोकणातील होते. पण त्यांचे बरेचसे आयुष्य नोकरीनिमित्त मुंबईत गेले. माधव काटदरे यांनी केवळ निसर्गकविताच लिहिली, असे नाही. ऐतिहासिक कविताही त्यांनी विपुल लिहिली. छत्रपती शिवाजीमहाराज, शाहूमहाराज, सवाई माधवराव, मस्तानी अशा विविध व्यक्तिरेखा त्यांनी काव्यबद्ध केल्या. याशिवाय शिशुगीते, विनोदी कविताही त्यांच्या लेखणीतून झरल्या.

  • खंडेराव त्र्यंबक सुळे

    खंडेराव त्र्यंबक सुळे हे त्यांच्या प्रखर देशभक्तीला व समाजवादी विचारसरणीला, आपल्या दर्जेदार लिखाणाद्वारे वाट करून देणारे प्रतिभावंत लेखक व स्वातंत्र्य सेनानी होते. स्वातंत्र्यपूर्वकाळात जन्मलेल्यायाखंडेराव सुळे यांच्यावर मार्क्सवादी विचारांचा प्रभाव होता. त्यामुळेच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यत व सत्याग्रहांमध्ये सक्रीय सहभाग घेतला होता. आपल्या जाज्वल्य देशाभिमानामुळे व समाजवादी मागण्यांसाठी त्यांना अनेकदा तुरूंगात देखील पाठवण्यात आले होते. खंडेराव सुळे यांचे प्राथमिक शिक्षण बी.जे. हायस्कुल ठाणे येथे झाले. पुढे म्हणजेच १९१८ साली उच्च शिक्षणासाठी त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश मिळविला. १९२१ साली महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या गुजरात विद्यापीठामधून त्यांनी विज्ञानविशारद ही पदवी संपादन केली. त्यानंतर “महर्षी अरविंदां”नी सांगितलेल्या आध्यात्मिक मार्गाचा काही काळ मार्गक्रमणा केली. १९३० साली त्यांना केवळ स्वातंत्र्य व समानतेच्या तत्त्वांवर उभा असलेला भारतीय समाज पाहण्याची, त्यासोबतच आपण देशासाठी पाहिलेली स्वप्ने साकार करण्यासाठी कम्युनिस्ट पक्षामध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून प्रवेश केला. सुळे यांच्या प्रखर देशभक्तीची समाजाच्या विविध स्तरांतून ज्याप्रमाणे कौतुक झाले, त्याचप्रमाणे ज्ञान व कला क्षेत्रांमधील त्यांचा व्यासंग व योगदान देखील कधीही न विसरता येण्याजोगे आहे. त्यांना अनेक ज्ञानशाखांत रस होता. संस्कृत, व साहित्य हे त्यांच्या विशेष जिव्हाळ्याचे विषय होते. भेदक, चिकित्सक, डौलदार परंतु वास्तवाची धार असलेली परिणामकारक लेखनशैली ही त्यांना मिळालेली नैसर्गिक देणगीच होती. खंडेराव सुळेंनी “शेष” या नावाने ललित लेखन केले, तर “स्कंद” नावाने राजकीय स्वरूपाचे मार्मिक लेखन केले. वीणा मासिकामधून त्यांनी प्रकाशित केलेल्या अनेक लेखांनी गुलामगिरीची झापडे लावलेल्या, भारतामध्ये एकच खळबळ माजवून दिली होती. "ज्योत्स्ना" मासिकातून व इतर नियतकालिकांमधून देखील त्यांच्या अनेक कथा प्रकाशित झाल्या. लेखनासोबतच समीक्षा, हे त्यालाच समांतर असलेले परंतु मनाच्या एका वेगळ्याच विचारशील व संवेदनशील कप्प्याची परीक्षा पाहणारे क्षेत्रदेखील त्यांनी आजन्म आपलेसे केले होते. सुळेंचे कित्येक टीकालेख हे आजही, शुध्द पक्षपातीपणाचे व आभ्यासपुर्ण उत्खननाचे द्योतक मानले जातात. त्यांच्या समीक्षालेखांवर प्रखर मार्क्सवादी तत्व प्रणालीचा प्रभाव दिसून येतो. ख्रिस्तोफर कॉडवेलची सौंदर्य मीमांसा, जनतेचा कवी, बोरिस पॅस्टर नॅक आणि त्याची झिवॅगो इत्यादी प्रसिध्द लेख त्यांच्या मार्मिक व अष्टपैलू वाड्.मयदृष्टीची ग्वाही देतात. १९३८ साली झालेल्या ठाणे जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद खंडेराव सुळेंनी भुषविले होते .

    दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

  • मंदार फणसे

    मंदार फणसे हे राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या नैसर्गिक शैलीमुळे व बहारदार व्यक्तिमत्वामुळे प्रसिध्द पावलेले एक अनुभवी व तरूण पत्रकार आहेत. हिंदी व मराठी वृत्त देणारे डेस्कवरचे पत्रकार व प्रादेशिक जबाबदार्‍यांची सुत्रे सांभाळण्याची सुत्रे त्यांच्या अखत्या पत्रकारिता या क्षेत्रातील त्यांचा अनुभव दांडगा असून शिक्षण क्षेत्रातले त्यांचे विशेष कौशल्य, व संशोधक तसेच चौकस वृत्ती सर्वज्ञात आहे.

  • समीर धर्माधिकारी

    उत्तम शरीरयष्टी, देखण्या व रुबाबदार अदा यामुळे समीर धर्माधिकारी यांचं व्यक्तिमत्व नायक, खलनायक यासह सर्वच भूमिकांना शोभेल असंच आहे. निर्मला मच्छिंद्र कांबळे, दिल क्या करे, सत्ता, रेनकोट, मनोरंजन-द एंटरटेन्मेंट, अग्नीपंख, मुंबई मेरी जान, गेम, रंग रसिया, सिटी ऑफ गोल्ड अश्या हिंदी तर; रेसटॉरंट, लालबाग परळ, मॅटर, बाबुरावला पकडा, समांतर, मात अश्या मराठी चित्रपटातून समीर धर्माधीकारींनी मध्यवर्ती भूमिका साकारल्या आहेत.

  • संत नरहरी सोनार

  • योगेश्वरी मिस्तरी

    धुळ्यात योगासनाची फारशी क्रेझ नाही. हौसेन योगाभ्यास करावा. असेहि काही नाही. मात्र इथलीच योगेश्वरी मिस्तरी नावाची एक चुणचुणीत मुलगी फ्रान्समधील जागतिक योगस्पर्धेत तीन सुवर्णपदकांसह तब्बल ७ पदके जिंकून आली. खर्‍या अर्थाने योगाची योगेश्वरी झालेल्या या मुलीचा थक्क करणारा हा प्रवास...

    योगेश्वरी मिस्तरी यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला योगेश्वरी ... योगाची हा लेख पुढील पानावर वाचा.

    योगेश्वरी मिस्तरी यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला योगेश्वरी ... योगाची हा लेख वाचा.

    mistery-yogeshwari-modified

  • मधू दंडवते

    हिंदी तसंच इंग्रजी अश्या दोन्ही भाषांवर असल्यामुळे दंडवतेंनी लोकसभेच्या कामकाजावर आपला ठसा उमटवला होता.आपल्या अगदी साध्या राहणीबद्दल ते ख्यातनाम होते.मधू दंडवतेच्या पत्नी प्रमिला दंडवते भारतातील समाजवादी चळवळीतील प्रमुख नेत्या होत्या.