(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • डॉ. के. एन. दस्तुर

    हृद्य ही मानवाला मिळालेली सर्वात अमुल्य व कलात्मक भेट आहे. सामान्य माणसाला कवित्व देणारे, विवीध भावनांचे पितृत्व स्वीकारणारे, यंत्रांच्या गर्दीमध्ये हरवत चाललेल्या व्यक्तींना संवेदनांचे व हळुवार जाणीवांचे शहारे देऊन त्याला माणुस म्हणून जगण्यास प्रवृत्त करणारे, व त्याच्यातील ‘दर्दीपण’ जोपासणारे हृद्य जेव्हा त्याच्या तांत्रिक बाबींमध्ये गुरफटते तेव्हा नश्वर देहाची परलोक यात्रा सुरू होते. परंतु आज वैद्यकीय क्रांतीमुळे दुर्मिळ हृद्यविकारांवर देखील औषधे व शस्त्रक्रिया जन्मास आल्या आहेत.

  • सुरेश खानापूरकर

    धुळे जिल्ह्यात जिथे अवर्षण नित्याचे झाले होते, त्या भागात आता लोक वर्षाला तिसर्‍या पिकाचा विचार करु लागल्याचे चित्र शिरपूर पॅटर्नमुळे तयार झाले. भूगर्भाच्या अचूक अभ्यासाने जमिनीची अॅंजिओप्लास्टी करण्याचे अभिनव तंत्र भूगर्भशासस्त्रज्ञ सुरेश खानापूरकर यांनी इथे विकसित केले. शिरपूर पॅटर्न नावाने ओळखली गेलेली या जलक्रांतीचा प्रसार आता राज्यभर होतो आहे.

    शिरपूर पॅटर्नचा जनक

  • बॅ. विठ्ठलराव गाडगीळ

    विठ्ठलराव गाडगीळ हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी होते. ते संसदीय काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी, १९७१ आणि १९७६ मध्ये राज्यसभा सदस्य होते.

  • चंद्रकांत सरदेशमुख

    संगीत हे केवळ कर्णसंपुटांना समाधान देणारे साधन नाही, तर संगीताचा प्रत्येक स्वर आणि त्यापासून निर्माण होणारी ध्वनिकंपने शारीरिक समाधान आणि प्रफुल्लित चित्तवृत्तींचे उगमस्थान असतात, ही आता केवळ समजूत राहिलेली नाही. भारतीय संस्कृतीने शतकांच्या सखोल साधनेतून सिद्ध केलेल्या या वास्तविकतेला पुन्हा जनमानसात रुजविण्याची गरज ओळखून स्वार्थनिरपेक्ष काम करणारे

    पं. डॉ. चंद्रकांत सरदेशमुख यांच्या निधनाने संगीतसाधनेच्या परंपरेतला एक अलौकिक दुवा निखळला आणि शरीर, मन व संगीत यांच्या नात्याची वैज्ञानिक उकल करण्याचे एक ‘संशोधनव्रत’ खंडित झाले. केवळ आंतरराष्ट्रीय ख्यातीचा उत्कृष्ट सतारवादक, एवढीच पं. सरदेशमुखांची ओळख नाही, तर संगीतविश्व हा मानवाच्या असंख्य भावविश्वांना सांधणारा प्रभावी दुवा आहे, हे ओळखून संगीतप्रसाराचा ध्यास घेतलेला एक आधुनिक मनस्वी माणूस अशी त्यांची खरी ओळख आहे. भारतीय संस्कृतीत संस्कृत मंत्रोच्चारांचे स्थान अढळ आहे, पण मंत्रोच्चार किंवा मंत्रपठण हा ‘पठडीबाज परंपरावाद’ असल्याचे अर्धज्ञान आजही उजळले जाते.

    संस्कृत श्लोकांचे संगीतशास्त्रीय पठण मानवी आयुष्याला परमोच्च समाधानाचे क्षण प्राप्त करून देते, मानसिक जाणिवा पराकोटीच्या प्रगल्भ करते आणि जीवन समृद्ध करते. संस्कृत श्लोकपठणातील ध्वनिलहरींच्या कंपनांतून शारीरिक व्याधींचे समूळ उच्चाटन होते, दुष्प्रवृत्ती दूर होतात आणि मनाला आपोआपच माणुसकीचा स्पर्श होतो. अशा तऱ्हेने, मंत्रपठण ही समृद्ध आयुष्यासाठीची एक तप:साधना बनते, हे पं. सरदेशमुखांच्या संशोधनाचे सार! वयाच्या चौथ्या वर्षीपासूनच्या कठोर संगीत साधनेतून साधलेला हा साक्षात्कार समाजास अर्पण करण्याच्या भावनेतून पुढे, संगीत हे आरोग्य आणि मानसिक समाधानप्राप्तीचे साधन ठरावे, यासाठी पं. सरदेशमुख यांचे संशोधन सुरू झाले. वसंत बहरला, की कोकिळेच्या कंठातील अलौकिक सूर माणसाला मोहवून टाकतात. त्या सुरांच्या स्वर्गीयतेची जाणीव त्या कोकिळेला असेलच असे नाही, पण संगीताचा ‘स्वर’ ओळखणारा आणि जोखणारा जाणकार कान प्रकृतीने माणसालाच बहाल केला आहे. हाच ‘जाणता कान’ जोपासावा, यासाठी पं. सरदेशमुख सतत तळमळले.

    कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात आणि पुणे विद्यापीठातही संगीत साधना सुरू झाली, हे त्या तळमळीचेच फलित होय. याच तळमळीतून त्यांनी अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि कर्मभूमी जपानमध्ये भारतीय संगीताचे स्वर अजरामर केले. संगीत क्षेत्रातील नव्या दिशांचा शोध आणि वेध घेत नव्या पिढीसाठी संगीतात संशोधन करणाऱ्या पं. सरदेशमुख यांना त्यांच्या वडिलांचा आणि कुटुंबाचा आयुर्वेदाचा वारसा मिळाला होता, पण तो केवळ व्यावसायिकतेसाठी न वापरता, मानवी आरोग्य आणि मनाच्या संपन्नतेसाठी आयुर्वेद आणि संगीतोपचारांची सुरेख सांगड घालणारे संशोधन पं. सरदेशमुखांनी सुरू केले. म्हणूनच, भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञानाची खरी ओळख झालेल्या या ज्ञानवंताने आपल्या अध्र्यामुध्र्या आयुष्यात केलेल्या कामाचे महत्त्व मोठे आहे.

  • सुनिता पुरुषोत्तम देशपांडे

    सुनिता देशपांडे ह्यांनी पु. ल. देशपांडेंच्या जीवनपटलावरती धावती नजर फिरवणारे, व त्यांच्या व्यक्तीमत्त्वातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे “आहे मनोहर तरी” या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. या आत्मचरित्राची तमाम मराठी साहित्यप्रेमींकडून दाद मिळाली.

    १२ जुन १९४६ साली पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पुलं सोबत विवाहबध्द होउन पुढे संसाराची धुरा आनंदाने व यसस्वीरित्या पेलली “सोयरे सकाळ”, “प्रिय जी.ए.”, “समांतर जीवन”, “मण्यांचीमाळ”, याशिवाय “मनातलं अवकाश” हा सुनिता देशपांडे यांचा लेखसंग्रह, २००४ ते २००६ दरम्यान विविध वर्तमान पत्र तसेच दिवाळी अंकांमधुन प्रसिध्द झालेल्या लेखाचं पुस्तकही वाचकांच्या पसंतीस उतरले.

    यासोबतच अनेक विषयावरील दर्जेदार पुस्तके व कादंबर्‍या लिहून सुनिता देशपांडे यांनी चौकस व प्रतिभावंत लेखिका म्हणुन स्वत:ची ओळख मिळविली आहे .

    ७ नोव्हेंबर २००९ रोजी सुनिता देशपांडे यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.

    (लेखन व संशोधन - सागर मालडकर)

    अधिक माहितीसाठी खालील लिंक्स क्लिक करा.

    सुनीता देशपांडे (7-Nov-2016)

    लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या सुनीता देशपांडे (3-Jul-2017)

    मराठी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या सुनीता देशपांडे (3-Jul-2018)

  • बाळ कुडतरकर

    पूर्वीच्या काळी विविध उत्पादनांच्या जाहिराती, चित्रपटगृहात चित्रपट सुरू होण्यापूर्वी दाखविले जाणारे माहितीपट, शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या जाहिराती, आकाशवाणीवरील कार्यक्रम असो किंवा चित्रपटाचे डबिंग असो. या सर्व ठिकाणी बाळ कुडतरकर यांनी आपल्या भारदस्त आणि दमदार आवाजाच्या जोरावर जगावर राज्य निर्माण केले.

  • प्रा. राजेंद्र विठ्ठल (राजाभाऊ) शिरगुप्पे

    राजाभाऊ या नावाने परिचित असेलेले प्रा. राजेंद्र विठ्ठल शिरगुप्पे यांची नाटककार, कवी, साहित्यिक म्हणूनही ओळख आहे. कोल्हापूर. सावंतवाडी, गडहिंग्लज येथे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.

    निपाणी येथील महिला बिडी कामगार व शेतकर्‍यांच्या तंबाखू आंदोलनापासून ते संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाले. शिरगुप्पे यांचे “सडक” हे नाटक व त्यातील कविता आजही आंदोलकांच्या तोंडी आहेत.

    विद्रोही सांस्कृतिक चळवळीशी ते गेली दहा वर्षे जोडले गेले आहेत. धरणग्रस्त, देवदासी प्रथा निर्मूलनाच्या लढ्यातही ते सहभागी झाले होते. त्यांनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांत भाग घेतला आहे. नाट्यलेखन व दिग्दर्शन म्हणून त्यांची अनेक नाटके गाजली आहेत.

    तुकोबांच्या पत्नीच्या जीवनावरील “तिच्या नवर्‍याचे वैकुंठगमन”, “कपान”, “होते कुरुप वेडे”, “उंटावरचा शहाणा”, “आम्ही क्रांतिसिंह आहोत”, “हा आणि बारावा” अशी नाटकांचे लेखनही त्यांनी केले.

    किशोर, मासिक ऋग्वेद, लोकमत वगैरेंमध्येही त्यानी विपुल लेखन केले आहे. हिंदू-मुस्लिम समस्येवर आधारित “षड्यंत्र” या माहितीपटाची निर्मितीही त्यांनी केली होती. बसवाण्णांच्या तत्वज्ञानाचे ते गाढे अभ्यासक आहेत.

    सांगली येथे झालेल्या दहाव्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद राजाभाऊ शिरगुप्पे यांनी भुषविले आहे.

    ## Shirguppe, Rajendra Vitthal (Rajabhau Shirguppe)
    ## Shirguppe, (Prof) Rajendra Vitthal

  • डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे

    डॉ. श्रीकांत शिंदे हे ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. ते लोकसभेत शिवसेनेचे प्रतिनिधित्व करतात.

    डॉ. श्रीकांत शिंदे हे ठाण्याचे आमदार आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या धडाडीच्या कार्यपद्धतीमुळे ते मतदारसंघात लोकप्रिय आहेत.

    त्यंचा जन्म ४ फेब्रुवारी १९८७ रोजी झाला. ते MS Orthopaedic आहेत. च्या केवळ २८ व्या वर्षी त्यांनी १६व्या लोकसभेचे खासदार म्हणून जबाबदारी स्विकारली.

    वेबसाईट : http://drshrikanteknathshinde.in/

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

  • रामनाथ पारकर

    भारतातर्फे दोन कसोटी सामने खेळलेले त्यांचे दोन्ही सामने इंग्लंडविरुद्धच होते. गुणवत्ता असूनही पारकर यांच्या वाटयाला केवळ दोनच कसोटी सामने आले. ७०च्या दशकात सुनील गावस्कर यांचे सलामीचे साथीदार म्हणून पारकर यांना पुरेशी संधी मिळाली नाही.

  • डॉ. वसुधा सहस्त्रबुध्दे

    भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागातर्फे बिगरहिंदी भाषक हिंदी लेखक पुरस्कार योजनेचा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार ठाण्याच्या डॉ. वसुधा सहस्रबुद्धे यांना मिळाला आहे.

    स्वातंत्र्य संग्रामात पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवून सर्वसामान्य महिलांनीदेखील शौर्य गाजवले. या पराक्रमाची गाथा देशाच्या कानाकोपर्‍यात पोहचवायची असेल तर ती हिंदीत अनुवादित करायला हवी, हे डॉ. सहस्रबुद्धे यांनी ओळखले होते. त्यांचे माहेर कोकणातले. घरात संस्कृत भाषेचा दरवळ कायमच. विवाहानंतर कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडताना शिकण्याच्या उर्मीने त्यांनी एम. ए. केले. एम. ए. साठी हिंदीची निवड केली. त्याहीपुढे जात ' डॉ. शंकरशेष का नाट्य साहित्य ' या विषयात त्यांनी चाळीसाव्या वर्षी डॉक्टरेट मिळवली. त्याच दरम्यान त्यांनी त्रिपुरारी शर्मा यांच्या ' दहलिज ' या मालिकेचा व भीष्म सहानींच्या ' माधवी ' या नाटकाचा रेडिओसाठी मराठीत अनुवाद केला. यानंतर मात्र त्यांना अनुवादाची गोडी लागली व ' स्वातंत्र्योत्तर कालीन मुंबई का हिंदी रंगमंच ' आणि ' प्रयोगशील रंगमंचीय आंदोलन में आविष्कार का योगदान ' या शोधप्रबंधांतून त्यांनी आपल्यातील अनुवादकाच्या प्रगल्भतेची चुणूक दाखवली. या शोधप्रबंधांसाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न त्यांना पु. ल. देशपांडे यांची शाबासकी देऊन गेले.

    मुंबईतील एसएनडीटी महाविद्यालयात अध्यापनाचे काम करताना त्यांचा परिचय राज्यशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. रोहिणी गवाणकर यांच्याशी झाला. आझाद हिंद सेनेच्या महिला पलटणीचे नेतृत्व करणाऱ्या कॅप्टन लक्ष्मी व मानवती पांडेय, जानकी दावर, पी. नारायण कुट्टी, शकुंतला गांधी, बेला मुखर्जी, प्रतिभा पाल यांच्यासारख्या वीर महिला सैनिकांनी गाजवलेला पराक्रम व त्यांच्यात ओतप्रोत भरलेल्या कर्तव्यभावनेची ओळख देशभरातील जनतेला व्हावी, यासाठी गवाणकर यांच्या पुस्तकाचा त्यांनी हिंदीत अनुवाद केला. कोणताही मोबदला न घेता अनुवादाची जबाबदारी स्वीकारण्याचे एका अर्थाने धाडस डॉ. सहस्रबुद्धे यांनी त्यावेळी केले. संहितेच्या अनुवादातून मिळणारा पैसा हे एकमेव उद्दिष्ट न मानता सृजनाचा आनंद मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहस्रबुद्धे यांनी हे आव्हान पेलवून दाखवले. पुढे महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीने दिलेल्या अनुदानातून ते २००३ मध्ये कोलकात्यात प्रसिद्ध झाले.

    डॉ. वीणा गवाणकर यांनी लिहिलेल्या ' कॅप्टन लक्ष्मी व झाशी रेजिमेंट - एक अकथित कथा ' या पुस्तकाच्या हिंदी अनुवादासाठी या राष्ट्रीय गौरवाला त्या पात्र ठरल्या आहेत. भाषेची चौकट व मोबदल्याच्या चौकटीत जखडून न राहता उगवत्या पिढीला देशाच्या स्वातंत्र्यसमरातील महिलांच्या योगदानाची माहिती देणार्‍या या अनुवादाबद्दल त्यांचा झालेला हा गौरव सार्थ म्हणायला हवा.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)