बाबूरावांना चित्रपटांपेक्षा चित्रकलेत अधिक स्वारस्य होते, तसेच त्यांच्या चित्रपटनिर्मितीत व्यावसायिक बाबींचा अभाव होता. परिणामत: त्यांचे सहकाऱ्यांशी मतभेद झाले व त्यांपैकी काहीजण कंपनीतून बाहेर पडले. पुढे बाबूरावांनी “लंका” या चित्रपटानंतर आणखी तीन चित्रपटांची निर्मिती केली. त्यानंतर मात्र महाराष्ट्र फिल्म कंपनी कायमचीच बंद झाली.
पाप्युलर या मराठी साहित्यविश्वामधील अग्रणी समजल्या जाणार्या पुस्तक प्रकाशन संस्थेचे रामदास भटकळ हे संस्थापक आहेत. रामदास भटकळ यांचा जन्म ५ जानेवारी १९३५साली झाला. त्यांचे शालेय शिक्षण रॉबर्ट मनी हायस्कूल, तर एलफिन्स्टन महाविद्यालयातून पदवी, चर्चगेटच्या गव्हर्नमेन्ट लॉ कॉलेज येथे एल.एल.बी त्यानंतर मुंबई विद्यापीठून राज्यशास्त्र विषयातून एम.ए.पूर्ण केले.
१९५२ मध्ये पॉप्युलर बुक डेपोच्या मराठी प्रकाशनाचे रामदास भटकळ यांनी कामाला सुरूवात केली. तर १९५८ पासून इंग्रजी प्रकाशनाच्या कामाला सुरुवात केली. १९६१ साली प्रकाशन व्यवसायासंबंधी प्रशिक्षणासाठी लंडनच्या “इंग्लिश युनिव्हर्सिटीज प्रेस”मध्ये तीन महिन्याची नोकरी करुन प्रकाशन कामाचा अनुभव घेतला. त्यानंतर इंग्लंडच्या ग्रंथव्यवहाराचा अभ्यास देखील. १९६५ रोजी यु.एस.स्टेट डिपार्टमेन्टच्या निमंत्रणावरुन अमेरिकन ग्रंथव्यवहाराचा अभ्यास केला.
“बॉम्बे बुकसेलर्स अॅण्ड पब्लिशर्स असोशिएशन” व “कॅपेक्सिल” या निर्यातदारांच्या संस्थेच्या “बुक्स अॅन्ड पब्लिकेशन पॅनेल”चे अध्यक्षपद रामदास भटकळ यांनी भुषविले आहे.
“द पोलिटिकल आल्टर्नेटिव्हस इन इंडिया”, “जिगसॉ”, “मोहनमाया”, “जगदंबा”, “रिंगणाबाहेर” या पुस्तकांचे रामदास भटकळ यांनी लेखन केले आहे. “फ्रँकफुर्ट” येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात पाच वेळा सहभाग देखील नोंदवला आहे. महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट प्रकाशनाच्या पहिल्या पुरस्काराचे भटकळ मानकरी आहेत.
अमृता सुभाष कुलकर्णी म्हणजेच अमृता सुभाष हिने चित्रपट, मालिका आणि नाटक या माध्यमात काम करणारी अभिनेत्री आहे, यासोबतच लेखिका, गायिका आणि संगीतकार म्हणून देखील तीने काम केले आहे.. तिचा जन्म १३ मे रोजी झाला.
अमृता सुभाष यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
http://www.marathisrushti.com/articles/amruta-subhash/
कलेचं शिक्षण आणि सामाजिक भान या दोन्हीचं एकत्रीकरण करणार्या ठाण्यातल्या कलाकार म्हणजे रुपाली मदन.
लेखक, समीक्षक आणि लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. प्रभाकर भानुदास मांडे यांचा जन्म १६ डिसेंबर १९३३ रोजी झाला.
लोककथा व लोकगीते यांचा विपुल संग्रह असणार्या मांडे यांनी “लोकसाहित्याचे अंत:प्रवाह, गावगाड्याबाहेर, सांकेतिक आणि गुप्त भाषा, परंपरा व स्वरुप, दलित साहित्याचे निराळेपण” या पुस्तकांसह “महानुभवीय पद्यपुराण, लोकरंगकला आणि नागर रंगभूमी अशी संपादने केली.
## Dr Padmakar Bhanudas Mande
भालजींपासून यशवंत भालकरांपर्यंत ३६ दिग्दर्शक आणि वसंत पवारांपासून शशांक पोवारांपर्यंत ४४ संगीतकार आणि सुधीर फडकेंपासून अजित कडकडेंपर्यंत ३४ गायकांसमवेत खेबूडकर यांनी काम केले. या अफाट कामांद्वारे अनेक कलाकृतींवर जगदीश खेबूडकरांचा अस्सल गावरान ठसा उमटला. त्यांनी ३५० चित्रपटांसाठी २७०० गीते लिहिली तर ३५०० कविता लिहिल्या. अलीकडे त्यांनी रचलेल्या ‘मोरया, मोरया’ या गणेशस्तुतीने तमाम आबालवृद्धांना वेडे केले.
कुशल संघटन कौशल्य आणि हजरजबाबीपणा या गुणांवर कॉर्पोरेट जगताला मॅनेटमेंटचे धडे देणारे आणि मुंबईतल्या प्रसिध्द अश्या डबेवाला संघटनेचे अध्यक्ष असलेले गंगाराम तळेकर हे मूळचे पुणे जिल्ह्यातील गडद येथील.
संगीतकार तसेच गायक म्हणून प्रसिद्ध असलेले विनय राजवाडे हे ठाणेकर आहेत व आजच्या आणि उद्याच्या ठाण्याबद्दलच्या त्यांच्या कल्पना ह्या अगदी साध्या परंतु महत्वाच्या आहेत.
(१८ ऑगस्ट १७००-२८ एप्रिल १७४०)
दुसरा पेशवा व मराठेशाहीतील एक श्रेष्ठ सेनानी बाळाजी विश्वनाथ भट या पहिल्या पेशव्याचा ज्येष्ठ मुलगा. आईचे नाव राधाबाई बाजीरावाचे मुळ नाव विसाजी बाजीराव बल्लाळ व थोरला बाजीराव या नावांनीही तो इतिहासात प्रसिद्ध आहे. बालपणी वडिलांच्या बरोबर स्वारी शिकार्यांत राहिल्याने युद्धकलेचे व राजकारणचे ज्ञान त्यास लाभले सय्यद बंधूच्या मदतीस दिल्लीला गेलेल्या १७१८ मराठी सैन्यातील एक तुकडी बाजीरावाच्या हाताखाली होती छत्रपती शाहुंनी त्याची कर्तबगारी ओळखून इतर ज्येष्ठ सरदारांच्या विरोधास न जुमानता १७ एप्रिल १७२० रोजी त्यास पेशवेपदाची वस्त्रे दिली.
बाजीराव पेशवा झाला त्या वेळी मराठी राज्याला चोहोबाजुंनी शत्रुंनी वेढले होते. दख्खनचा सुभेदार निजामुल्मुल्क १७२४ मध्ये दिल्ली सोडुन दक्षिणेस कायमचे ठाण मांडून बसला होता. त्याचा बंदोबस्त करणे त्याच्याकडून दख्खनच्या चौथा सरदेशमुखीस संमती मिळविणे हे पेशव्याचे पहिले काम होते त्याशिवाय मिरज अहमदनगरसारखी ठाणी ताब्यात होती. तसेच पश्चिमेकडील प्रदेश सिद्धी आणि पोर्तुगीज यांनी बळकावला होता. तो मूक्त करणे आवश्यक होते.
Copyright © 2025 | Marathisrushti