(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी

      December 15, 2010


  • अजय देवगण

    “सिंघम’ मुळे अजय देवगणचे मार्केट वाढले. आता माझी सटकली हा अजयचा मराठी डायलॉग खूप हिट झाला.

      June 17, 2022


  • डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी

    आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून मार्च १८८६ मध्ये आनंदीबाईना एम् डी ची पदवी मिळाली. एम् डी साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता, ‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’.

      June 12, 2017


  • (शाहीर) आत्माराम पाटील

    आपल्या दैनंदिन जीवनात ज्या घटना घडतात त्या टीपकागदासारख्या टिपून घेत त्यावर भाष्य करणारे अस्सल शाहीर म्हणजे आत्माराम पाटील. ‘संयुक्त महाराष्ट्र उगवतोय माझ्या सरकारा, खुशाल कोंबडं झाकून धरा’ शाहीर आत्माराम पाटलांचा हा पोवाडा शाहीर अमरशेख यांनी शिवाजी पार्कातल्या जाहीर सभेत खडय़ा आवाजात गायला आणि क्षणार्धात अवघ्या वातावरणात एक चैतन्य सळसळलं.

    सगळ्या घटनांवर वास्तववादी पोवाडे रचणाऱ्या शाहीर आत्माराम पाटील यांचे मुंबईत प्रभादेवी येथे एका खाजगी इस्पितळात हृदयविकाराच्या झटक्याने बुधवारी निधन झाले. ते केवळ गाणारे शाहीर नव्हते तर लिहिणारे शाहीर म्हणून त्यांची ख्याती होती. ते उत्तम भाष्यकार होते. रोज सर्व वर्तमानपत्रे वाचून त्यावर कवने करण्यात त्यांचा हातखंडा होता.

    गोवा मुक्ती संग्रामाचा लढा असो किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळ, शाहीर आत्माराम पाटील यांचे योगदान फारच मोठे होते. शाहिरांच्या पोवाडय़ांमध्ये, कवनांमध्ये अतिशय वास्तववादी आणि व्यक्तींना योग्य न्याय देणाऱ्या रचना असत. पोवाडे, लावण्या, समरगीते, समूहगीते, स्मरणगीते अशा स्वरूपाचे विपुल लिखाण त्यांनी केले. अभंगापासून ते लावण्यांपर्यंत वेगवेगळे प्रकार त्यांनी पोवाडय़ांमध्ये हाताळले. शाहीर हे पुरोगामी विचारसरणीचे होते.

    फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारसरणीच्या मुशीत ते तयार झाले होते. दैववाद, सांप्रदायिकता त्यांना मान्य नव्हती. त्यांची शाहिरी ही सर्वसामान्यांची शाहिरी होती. ‘एका धरतीच्या पोटी नाना प्राणी जन्म घेती. तेथे माणसावानी जात पुन्हा मिळायची नाय’ हा आणि ‘मिसळ झाली मुंबई रे बाबा मिसळ झाली मुंबई’ हे त्यांचे मुंबईवरचे कवन प्रचंड गाजले होते. जाती विसर्जनाबद्दलच्या लावणीमध्ये त्यांनी महाराष्ट्रातल्या ११८ जातींचे वर्णन करून आपले सुक्ष्म निरीक्षण नोंदविले होते. उतारवयात त्यांनी नव्या पिढीसाठी शाहिरीच्या जतन-संवर्धनाचे काम हाती घेतले होते.

    महाराष्ट्रातल्या अनेक शाहिरांचे संघटन करून त्यांनी सबंध महाराष्ट्रभर प्रचार फेऱ्या काढल्या. त्यांच्या ‘शाहिरी फुलोरा’ या कार्यक्रमाचे शेकडो प्रयोग झाले. नवोदित शाहिरांना त्यांनी आपली कवने देऊन टाकली आणि त्यासाठी कधीही पैशांची अपेक्षा केली नाही. अशा स्वभावामुळेच शाहीर आयुष्यभर उपेक्षित जीवन जगले. इतर लोककलावंतांप्रमाणे त्यांनी शासनदरबारी कधीच हुजरेगिरी केली नाही आणि म्हणून अनेक सन्मानांपासून त्यांना वंचित रहावे लागले.

    शाहीर अमरशेख पुरस्काराने आणि राज्य शासनाच्या सांस्कृतिक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. साहित्य संस्कृती मंडळाची गौरववृत्ती त्यांना मिळाली होती. ठाणे जिल्ह्यातील कपासे खेडेगावातील शेतकरी कुटुंबात ९ नोव्हेंबर १९२४ रोजी आत्माराम पाटलांचा जन्म झाला. लोअर परळ रेल्वे वर्कशॉपजवळील कवळी कंपाऊंडमधल्या एका चाळीत शाहीर राहात होते. निधनाच्या २४ तास अगोदर त्यांनी निवडक मित्रांसोबत ८६ वा वाढदिवस साजरा केला होता.

    भायखळा येथील मंडईत भाजी विकता विकता त्यांनी एकापेक्षा एक अशी सरस गाणी लिहिली. ‘भाजीत कमावलं आणि जीजीत गमावलं’ असे त्यांची मित्रमंडळी नेहमी चेष्टेने म्हणायचे. आपली लेखणी त्यांनी नेहमी भांडवलदारांविरुद्ध वापरली. मंडईत भाजीचा व्यवसाय करताना उगीचच व्यापाऱ्यांचा रोष नको म्हणून ते कधीकधी ‘धरतीनंदन’ या टोपणनावानेदेखील लिहायचे.

    आणीबाणीच्या काळात वसंतदादा पाटील यांनी शाहिरांना २० कलमी कार्यक्रमावर आधारीत गाणी लिहायला सांगितली होती. दादा शाहिरांच्या घरी गेले, तेव्हा तिथे वीजही नव्हती. दादांनी ते चित्र पाहून तुम्हाला सरकारी कोटय़ातून घर देतो असे आश्वासन दिले. मात्रशाहिरांनी सरकारी घर स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला. ‘मुंबईचा भाजीबाजार’ हे त्यांचे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर असून प्रभाकर ओहोळ लिखित ‘एका शाहिराची कथा’ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकात त्यांच्या आयुष्याची चित्तरकथा रेखाटण्यात आली आहे.

      August 5, 2017


  • नारायण गंगाराम सुर्वे

    नारायण सुर्वे यांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून समाजातील दलित व उपेक्षित वर्गामध्ये राहणार्‍या, व असंख्य वेदना निमुटपणे सोसणार्‍या जनतेचे आयुष्यभर अगदी समर्थपणे प्रतिनिधीत्व केले.

      January 24, 2015


  • संत मीराबाई

    संत मीराबाई ह्या थोर कृष्णभक्त कवयित्री होती. मीराबाईंनी स्वतःच्या जीवनात खुप दुःखं भोगलं. त्यांचा जन्म राजघराण्यात झाला परतूं त्यांचा छळ झाल्यामुळे त्यांची विरक्तवृत्ती वाढत गेली आणि त्या कृष्णभक्तीकडे ओढल्या गेल्या. मीराबाईंच्या रचनांबद्दल निश्चित माहिती नाही. “पदावली“ ही मीराबाईंची एकमेव, प्रमाणभूत काव्यकृती आहे. त्यांची रचना अतिशय भावरसपूर्ण आहे. त्यांच्या दुःखाचं प्रतिबिंब काही पदामध्ये पडलेलं आहे.

      March 12, 2015


  • स्नेहप्रभा प्रधान

    नाट्यसिने अभिनेत्री व लेखिका स्नेहप्रभा प्रधान यांचे स्नेहांकिता हे आत्मचरित्र गाजले, वादग्रस्तही ठरले

      January 4, 2021


  • मंजूषा कुलकर्णी-पाटील

    सवाई गंधर्व संगीत महोत्सव, ग्वाल्हेरचा तानसेन समारोह, चंदीगढचे आकाशवाणी संगीत संमेलन, धारवाडचे उस्ताद रहमत खाँसाहेब महोत्सव अशा देशभरातील विविध ठिकाणच्या मान्यताप्राप्त संगीत महोत्सवांमध्येही त्यांनी आपले गायन सादर केले आहे.

      July 13, 2022


  • एल.पी उर्फ लक्ष्मीकांत

    लक्ष्मीकांत यांचे पूर्ण नाव लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर. संगीत देणे हे त्यांनी व्यवसाय म्हणून स्विकारले होते आणि शेवटपर्यंत या व्यवसायाशी ते ईमानदार राहीले.

      May 7, 2022


  • जयप्रकाश जोशी

    भारतीय बाजारपेठांमध्ये “मेड इन चायना” लेबलने घुसखोरी केली असतानाच जयप्रकाश जोशी यांच्या उत्पादनाने मात्र मेड इन इंडिया लेबलवर चीनसह १२ देशांमध्ये ओळख निर्माण केली आहे. नाशिकजवळ सय्यद-पिंप्री गावातून शहराकडे नोकरीच्या शोधात आलेल्या जयप्रकाश जोशी यांनी मोठी डिग्री नसताना गायडिंग व्हिल्सच्या उत्पादनात जोरदार मुसंडी मारली...

    उद्योगाचे धावते चक्र

      July 24, 2015