(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • अनंत माधव क्षीरसागर

    अनंत माधव क्षीरसागर हे मिशीगनमध्ये आपल्या कर्तुत्वाचा झेंडा मानाने फडकविणारे व मराठी पाण्याची गोडी आणि खोली यांची जाणीव सातासमुद्रापार पोहोचविणारे एक अत्यंत बुधिमान व विचारशील व्यक्तिमत्व आहे. त्यांचा जन्म 16 ऑगस्ट, 1931 रोजी झाला. स्वातंत्र्यपुर्व काळात जन्मलेल्या अनंत यांनी भारताचा तो स्वातंत्र्यसंग्राम अगदी जवळून पाहिला आहे.

  • दत्तप्रसन्न नारायण कारखानीस

    कुणा आवडतो मोर पिसार्‍याचा' या कवितेचे कवी दत्तप्रसन्न नारायण कारखानीस यांचा जन्म १७ ऑगस्ट १९०८ साली झाला.

    त्यांच्या कवितांचे 'क्षितिजावर' व 'काव्यविलास' असे दोन संग्रह निघाले. त्यांच्या अनेक कविता मराठी क्रमिक पुस्तकांमध्ये समाविष्ट झाल्या.

    ## Dattaprasanna Narayan Karkhanis

  • रघुनाथ पंडित

    मराठी पंडित कवी. त्याची चरित्रविषयक माहिती निश्चित स्वरुपात उपलब्ध नाही. तो कोण असावा, हयाबद्दल पाच मते आढळतात ः (1) तो कारवारकडील चंदावर गावचा सारस्वत ब्राम्हण असावा. (2) तो तंजावरचा असावा आणि मोरोपंतांचा समकालीन असावा. (3) तो मुळात रायगड जिल्हयातील चौलचा आणि त्याचे आडनाव मनोहर. तो पुढे कर्नाटकात स्थायिक झाला. त्याने वैद्यविलास, कविकौस्तुभ, छंदोरत्नावलि, चिकित्सामंजरी व नाडीज्ञानविधी ही साहित्यविषयक व वैद्यकविषयक प्रकरणे संस्कृतात लिहिली. प्रसिध्द दमयंतीस्वयंवरही त्यानेच लिहिले. (4) तो शिवाजी महाराजांचा अष्टप्रधानांपैकी एक असून `पंडितराव ` हया पदावर होता. (5) शिवकालातील राजव्यवहारकोश लिहिणारे रघुनाथ नारायण हणमंते हेच रघुनाथपंडित होत. दमयंतीस्वयंवर किंवा नलोपाख्यान हे त्यांनीच लिहिले. हया सर्व मतांचा विचार करुन , शं. गो. तुळपुळे हयांनी हा कवी तंजावरचा होता व तो राजकारणपटूही होता, असा निष्कर्ष काढला आहे.

  • (डॉ.) एन. जे पवार

    शेतकरी कुटुंबातील मुलगा उच्चशिक्षण घेतल्यानंतर कशी कर्तृत्वभरारी घेऊ शकतो, याचा आदर्श कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. नामदेव जगन्नाथ तथा एन. जे. पवार यांच्या कामगिरीतून महाराष्ट्राला मिळत आहे. भारतीय सायन्स काँग्रेसचा युवाशास्त्रज्ञ पुरस्कार, ब्रिटिश कौन्सिलची प्रतिष्ठित संशोधनवृत्ती सलग दोनदा पटकाविणारा अभ्यासू विद्यार्थी, पुणे विद्यापीठाच्या भूशास्त्र विभागाचे प्रमुख आणि आता कुलगुरू!

    सांगली जिल्हय़ातील ऐनवाडी या छोटय़ाशा गावात हे संशोधन बीज पेरले गेले. पवार यांच्या कुटुंबीयांपैकी महाविद्यालयाचा ‘कॅम्पस’ अनुभवणारे ते पहिलेच! कोल्हापूर विद्यापीठात विशेष श्रेणीने पदवी प्राप्त केल्यानंतर पुणे विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. संपादन केली. त्यानंतर भूशास्त्र, भूजलशास्त्र, पर्यावरणीय भू-रसायनशास्त्र आदी विषयांमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे काम केले. प्रयोगशाळेतील संशोधनाची ‘काळय़ा आई’शी नाळ जोडण्यासाठी ते झटत राहिले. म्हणूनच ब्रिटन व जपानमधील ओसाका विद्यापीठात संशोधनाची संधी मिळूनही त्यांना ओढ होती ती मायभूमीचीच! पुणे विद्यापीठात विभागप्रमुख म्हणून काम करताना भारतीय संशोधन संस्था, तेल व नैसर्गिक वायू महामंडळ, केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान विभाग आदींच्या माध्यमातून कोटय़वधींची अनुदाने मिळवीत डॉ. पवार यांनी सहकाऱ्यांनाही संशोधनासाठी प्रोत्साहित केले.

    भूशास्त्रातील या प्रगत प्रयोगांच्या माध्यमातून त्यांनी सार्वजनिक आरोग्य, बदलते पर्यावरण, जलसंपत्तीचे संरक्षण व संवर्धन अशा अत्यंत मूलभूत क्षेत्रांमध्ये पथदर्शी कार्य केले. ‘जनतेची विज्ञान काँग्रेस’ म्हणून ओळखल्या गेलेल्या पुण्यातील अधिवेशनात भूशास्त्रीय संशोधनाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्यात डॉ. पवार यांचा मोलाचा वाटा होता. कोल्हापूरच्या श्रमशक्ती प्रतिष्ठानचे वैज्ञानिक सल्लागार या नात्याने जलनियोजन, ग्रामविकासाकरिता काम करीत सामाजिक बांधिलकीचाही ते प्रत्यय देत आहेत. ‘कोल्हापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी अर्ज करू नये,’ असा जाहिरातींमधील स्पष्ट उल्लेख सहन करीत या विद्यापीठाला एकेकाळी अवहेलना सोसावी लागत होती. त्याच मातीचा सुपुत्र आता कुलगुरुपदी विराजमान झाला आहे. ‘शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षणाचे महाद्वार मी खुले करून देणार आहे. तसेच कृषी-सहकार या स्थानिक बलस्थानांच्या माध्यमातून उच्चशिक्षणाची समाजाशी नाळ जोडणार आहे. हे प्रकल्प सिद्धीस गेल्यास विद्यापीठाचा लौकिक नक्कीच वाढेल,’ असा विश्वास डॉ. पवार व्यक्त करतात.

  • नारायण सीताराम फडके

    फडके १९४० सालातल्या रत्नागिरीस भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

  • पिल्लू रिपोर्टर

    पिलू रिपोर्टर हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सुप्रसिद्ध पंच.

    ठाणे येथे स्तव्य असलेल्या पिलू रिपोर्टर यांनी १९८४-१९८५ च्या मोसमात कसोटी पंच म्हणून पदार्पण केले. आजगायत त्यांनी अनेक स्थानिक, व राष्ट्रीय सामने तसेच आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट सामन्यांचे, त्यांच्या अचूक व प्रसंगवधानी निर्णयकौशल्यांच्या बळावर समर्थपणे पंचत्व केले आहे.

    त्यांच्या पंचगिरीला ५० वर्षे पुर्ण झाल्याचे औचित्य साधून त्यांना ठाणे भुषण ही मानाची उपाधी देवून महापालिकेने त्यांचा यथोचित गौरव केला.

  • विनोबा भावे

    थोर गांधीवादी आचार्य व भूदान चळवळीचे प्रवर्तक. जन्म रायगड जिल्ह्यातील गागोदे या गावी. आजोबा आणि आईकडून विनोबांना बालपणापासूनच धर्मपरायणतेचे संस्कार मिळाले.

  • योसेफ दाविद पेणकर

    पेणकर, योसेफ दाविद - 0459

    ३१ ऑक्टोबर १८७२
    १८७२> बेने इस्रायली मराठी नाटककार योसेफ दाविद पेणकर यांचा जन्म. “मक्काबी वीरांचे शौर्य”, “राजपुत्र आबशालोम”, “एस्तर राणी”, “रोमन राजा टेटस” ही अख्यानवजा मराठी नाटके त्यांच्या नावावर आहेत.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

    पेणकर, योसेफ दाविद - 0475

    ६ सप्टेंबर १९४९
    १९४९> “रशियातील बहुदी कन्या” हे नाटक लिहुन त्यांनी बेने इस्रायली धर्मकथांचा परिचय महाराष्ट्राला करुन दिला. “दाविदाख्यान”, आणि “महाराणी एस्तरचे बुद्धिचातुर्य” आदी मराठी कीर्तनाच्या पद्यावली त्यांनी रचल्या होत्या.

    mss

  • मधुरा कामत

    तिच्या बोटात चित्रांची जादू आहे, समोरच्या माणसाला ती आपल्या चित्रांतून व्यक्त करते. शिवाय लहान मुलांसाठी चित्रकलेचे क्लासही चालवते. आपल्या या कलेबद्दल सांगतेय मधुरा कामत.

    मधुराच्या चित्रकलेची सुरूवात इतर मुलांप्रमाणेच घराच्या भिंतीपासून झाली. पण तिची ही गिरबिट थोडी निराळी आहे, हे तिच्या पालकांना कळत होतं. म्हणूनच त्यांनी तिला चित्रकलेच्या वर्गात घातलं. लहानपणीची ही आवड मधुरा कामतचं मोठेपणीचं तिचं पॅशन ठरलीय. ज्युनिअर कॉलेजनंतर तिने जे. जे. स्कूल ऑफ आर्ट आणि रचना संसद या दोनही विद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया दिल्या. त्यामधून तिला रचना संसदच्या अप्लाइड आर्ट अँड क्राफ्टसाठी प्रवेश मिळाला. वेगवेगळ्या असाइनमेंटसोबत तिचं पेंटींगही कायम सुरूच असतं. तिला फाइन आर्टमध्ये जास्तं रस आहे. आणि सरावाचे तिच्या पद्धतीही वेगवेगळया आहेत. कल्याणला तिचं घर आहे. कल्याण ते दादर, किंवा सीएसटी या लोकलप्रवासात ती चक्क समोरच्या सहप्रवाशांची चित्रं रेखाटते. यामुळे अभ्यासही होतो, वेग वाढतो आणि गंमतही येते हा तिचा फंडा. शिवाय आपलं चित्रं काढल्याने बायका खुश होतात ते वेगळंच. रेल्वे स्टेशन, बसस्टॉप, कॉलेज कॅम्पस असो किवा तिच्या वडिलांचे दुकान कुठेही गेली तरी मधुराची हात आणि पेन्सीलची गाठ काही सुटत नाही.

    तिचे वडील वेशभूषा पुरवण्याचा व्यवसाय करतात. त्यामुळे या कामातही आपली कला आणि कल्पकता मधुरा वापरत असतेच. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्टं म्हणजे, तिला मिळालेलं कलाज्ञान, इतरानाही मिळावं यासाठी ती परिसरातील छोट्या मुलांसाठी चित्रकलेचा क्लासही घेते. मधुराच्या शिकवण्याच्या हातोटीमुळे तिच्या क्लासना मुलांची आणि पालकांचीही पसंती असते. भविष्यात तिला भारताबाहेर जाऊन पारंपरिक भारतीय कला प्रकार जगासमोर मांडण्याचा तिचा मानस आहे.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


  • मनोज जोशी

    मनोज जोशी यांनी सर्फरोश या चित्रपटातून बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. सरफरोश, चांदनी बार, हंगामा, देवदास, हलचल, पेज 3, फिर हेरा फेरी से, चुप चुप के, गरम मसाला, गोलमाल, भागम भाग, भूलभुलैया, मेरे बाप पहले आप, बिल्लू, दे दना दन खट्टा-मीठा हे त्यांचे काही हिंदी चित्रपट होत.