(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • उपेन्द्र लिमये

    उपेन्द्र लिमये हे मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक आहेत. २००९ साली प्रदर्शित झालेल्या “जोगवा” मधील “तायप्पा”च्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोकृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.

  • छत्रपती संभाजी महाराज

    जानेवारी १६८१ मध्ये संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी उदार अंतःकरणाने अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना माफ केले आणि त्यांना अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले. मात्र काही काळानंतर अण्णाजी दत्तो आणि सोयराबाईंनी पुन्हा संभाजीराजांविरूध्द कट केला आणि त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा घाट घातला. तेव्हा संभाजीराजांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकार्यांना हत्तीच्या पायी देऊन मारले.

  • डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस

    भारत व चीन या दोन देशांमध्ये मैत्रीचे ऋणानुबंध निर्माण करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. दुसर्‍या चीन जपान युध्दाच्या पार्श्वभूमीवर, भारताने चीनमध्ये आपत्ग्रस्त वैद्यकीय सुविधेसाठी पाठविलेल्या ५ वैद्यकीय तज्ञांपैकी ते एक होते. अचूक वैद्यकिय कौशल्ये, प्रसंगवधानी स्वभाव, व असामान्य नेत्तृत्वगुणांमुळे कित्येक जखमी चिनी नागरिकांन व सैनिकांना पुनर्जीवन मिळाले होते.

  • कृष्णराव गणेश फुलंब्रीकर (मास्टर कृष्णराव)

    कृष्णराव गणेश फुलंब्रीकर म्हणजेच मराठी नाट्यसंगीतावर अमीट ठसा उमटवणारे “मास्टर कृष्णराव”. 

  • संदीप अवचट

    संदीप अवचट हे नामांकित व विश्वासार्ह मानले जाणारे प्रसिध्द ज्योतिषी, व प्राचीन ज्योतिर्विद्या तसेच अर्वाचीन अंकशास्त्राचे गाढे आभ्यासक व चिकीत्सक आहेत.

  • सुमन कल्याणपूर

    मूळच्या बंगालच्या असणार्‍या सुमन कल्याणपूर यांचा जन्म, आजच्या बांगलादेशाची राजधानी ढाक्का येथे २८ जानेवारी १९३७ साली झाला. सुमन हेमाडी हे त्यांचे माहेरचे नाव. रामानंद कल्याणपूर यांच्याशी विवाहबध्द झाल्यावर त्या मुंबईत आल्या. दहा वर्ष वेगवेग़ळ्या गुरूंकडून संगीत शिकत असतांनाच अनेक कार्यक्रमांतून गायनाची संधीही सुमन कल्याणपुर यांना मिळत गेली.

  • संजीव दयाळ

    पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पाकिस्तान दौऱ्यावर असताना ठरलेल्या कार्यक्रमानुसार लाहोर किल्ल्याला भेट देणार होते. मात्र त्याचवेळी पंतप्रधानांच्या विशेष सुरक्षा गटातील एका अधिकाऱ्याने त्यास आक्षेप घेतला. रस्त्याची सुरक्षा तपासणी होत नाही तोपर्यंत पंतप्रधानांचा ताफा निघणार नाही, असे या अधिकाऱ्याने ठामपणे सांगितले. या पवित्र्यामुळे राजनैतिक अधिकाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली. त्यातही एका पोलीस अधिकाऱ्याने पंतप्रधानांचा ताफा रोखून धरल्याचे वास्तव त्यांना सहनच झाले नव्हते.

    परंतु आक्षेप डावलणेही शक्य नव्हते. त्या रस्त्यावर पोलीस पथक पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आणि लपून बसलेल्या स्थानिक दहशतवाद्यांनी या पथकावर हल्लाबोल केला. या घटनेनंतर मात्र ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याची चांगलीच वाहवा झाली. तो अधिकारी म्हणजे दुसरे-तिसरे कोणी नसून, ते आहेत मुंबईचे नवे पोलीस आयुक्त संजीव दयाळ!

    मितभाषी, प्रामाणिक, कर्तव्यदक्ष दयाळ प्रसारमाध्यमांपासून नेहमीच दूर राहिले. १९७७ च्या तुकडीतील दयाळ यांचा आयपीएस वर्तुळातही चांगलाच दबदबा आहे. व्यवस्थापनातील त्यांच्या वादातीत कौशल्यामुळे त्यांना सहकाऱ्यांनी ‘चाणक्य’ ही पदवी दिल्याचे बोलले जाते. ‘आपले काम बरे’ अशा भावनेतून ३३ वर्षांत ते ज्या ठिकाणी नियुक्तीत होते तेथे त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. दिल्लीजवळच्या गुरगावात त्यांचे बालपण गेले.

    एमएस्सीपर्यंत शिक्षण घेतलेल्या दयाळ यांची, महाराष्ट्राचे केडर मिळाल्यानंतर पहिली नियुक्ती नाशिकचे अतिरिक्त अधीक्षक म्हणून झाली. त्यानंतर १९८२ मध्ये मुंबईत येण्याआधी नांदेड, अमरावती येथे ते अधीक्षक होते. ज्युलिओ रिबेरो हे तेव्हा मुंबईचे पोलीस आयुक्त होते. धारावीत वरदराजन मुदलियार ऊर्फ वरदाभाईची प्रचंड दहशत होती. यादवराव पवार यांनी उपायुक्त म्हणून वरदाभाईची चांगलीच कोंडी केली होती. रिबेरो यांनी पवार यांच्या जागी दयाळ यांना नेमले.

    दयाळ यांनी कसलाही गाजावाजा न करता वरदाभाईला सळो की पळो करून सोडलेच पण धारावीतले मटक्याचे, दारूचे अड्डे साफ उध्वस्त करून टाकले. त्यानंतर त्यांनी इंटेलिजन्स ब्युरोत उपसंचालक म्हणून जाणे पसंत केले. १९८८ ते ९२ पर्यंतचा काळ प्रतिनियुक्तीवर काढल्यानंतर १९९३ मध्ये पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून शासनाने त्यांची नियुक्ती केली. त्यावेळी पश्चिम प्रादेशिक विभाग हा वांद्रे ते दहिसपर्यंत पसरलेला होता. त्यावेळीही त्यांनी मटक्याच्या व दारूच्या अड्डय़ांवर लक्ष केंद्रित केले होते. दोन वर्षांचा कालावधी अर्थातच कुठलीही प्रसिद्धी न मिळविता त्यांनी गाजविला. त्यानंतर इतर पोलीस अधिकाऱ्यांप्रमाणे मुंबईतच ठाण मांडून न राहता ते केंद्रात प्रतिनियुक्तीवर पंतप्रधानांच्या विशेष सुरक्षा गटात सामील झाले.

    तब्बल सात वर्षे ते एसपीजीत होते. तेथून त्यांची नियुक्ती मुंबई पोलीस दलाच्या प्रशासन विभागाचे सहआयुक्त म्हणून झाली. येथेही त्यांनी आपल्या वेगळ्या कार्यपद्धतीने ठसा उमटविला. पोलीस शिपायांच्या भरतीत मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होत होता आणि तो रोखण्याची कोणाचीच तयारी नव्हती. राजकारणी मंडळी या भरतीत हस्तक्षेप करीत होते. दयाळ यांनी राजकारण्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी भरतीची प्रक्रियाच बदलून टाकली. उमेदवारांच्या नावापेक्षा त्याला विशेष ओळख क्रमांक देण्याची पद्धत दयाळ यांनी रूढ केली ती आजतागायत. तेव्हापासून खरेतर दयाळ यांच्या मि. क्लीन प्रतिमेचा गवगवा झाला. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती व्हावी यासाठी प्रयत्न करणाऱ्यांपैकी ते कधीच नव्हते.

    नियम आणि कायद्यावर बोट ठेवून प्रसंगी राजकारण्यांनाही सुनावणारे दयाळ सत्ताधारी पक्षाला तसे भारीच पडले असते. त्यामुळे दयाळ हे मुंबईचे पोलीस आयुक्त होतील, असे कुणीही ठामपणे सांगत नव्हते. तरीही आयत्यावेळी दयाळ यांचे नाव घोषित करून सत्ताधारी पक्षाने धक्का दिल्याची चर्चा सुरू आहे. आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांनी त्यांना राजकारण्यांच्या हस्तक्षेपाबद्दल छेडले असता ते शांतपणे उद्गारले की, ‘कायदा आणि घटनेत स्पष्ट तरतुदी आहेत. त्यापेक्षा मोठे कुणीही नाही. आपण नेहमी त्याचाच आदर करतो.’ केंद्रातील गृहमंत्रालयाने २६/११ संबंधातील राम प्रधान समितीने केलेला अहवाल विचारात घेऊन दयाळ यांची नियुक्ती सुचविली, हे उघड आहे. महाराष्ट्र सरकारचा २६/११च्या वेळचा कारभार आणि व्यवहार फारसा आश्वासक नव्हता हेच या नेमणुकीने अप्रत्यक्षपणे अधोरेखित केले आहे.

  • रवींद्र मंकणी

    रविंद्र मंकणी यांनी अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच झाशीची राणी या ऐतिहासिक हिंदी मालिकेतही त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.

  • ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल 

    प्राध्यापक, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल हे इंग्रजीचे प्राध्यापक होते. तोरडमल यांना ‘मामा’ या नावाने संबोधले जायचे.

    कमलाकर तोरणे दिग्दर्शित ‘ज्योतिबाचा नवस’ हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर ‘सिंहासन’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘आपली माणसं’, ‘आत्मविश्वास’, ‘शाब्बास सूनबाई’ हे मराठी चित्रपटही त्यांनी केले.

    प्रा. मधुकर तोरडमल यांनी ‘ऋणानुबंध’, ‘किनार’, ‘गगनभेदी’, ‘गाठ आहे माझ्याशी’, ‘गुलमोहोर’, ‘झुंज’, ‘भोवरा’, ‘मगरमिठी’, ‘म्हातारे अर्क बाईत गर्क’, ‘लव्ह बर्ड्‌स’, ‘विकत घेतला न्याय’ या नाटकांतूनही अभिनय केला होता.

    तब्बल पाच दशकांहून अधिक काळ रंगभूमीच्या माध्यमातूनप्रेक्षकांना सतत हसवत ठेवणा-या ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या त्यांच्या व्यावसायिक नाटकाने ५००० प्रयोगांची यशस्वी घौडदौड केली. तोरडमल स्वतः या नाटकात प्रोफेसर बारटक्क्यांची भूमिका करत. या नाटकाविषयी एका समीक्षकाने ठळकपणे म्हटले होते की, ‘सुशिक्षित, सुसंस्कृत आणि विशेषत: पांढरपेशा स्त्रियांनी हे नाटक अजिबात बघू नये’. पण झाले उलटेच. त्यानंतर रसिकांची उत्सुकता वाढली आणि सुशिक्षित महिला, मुली यांनी अक्षरश: रांगा लावून बुकिंगमध्येच नाटक हाऊसफुल्ल केले.

    धों. कर्वे यांनी लिहिलेल्या ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ या इंग्रजी लेखसंग्रहाचे मराठी भाषांतर त्यांनी केले होते. अगाथा ख्रिस्ती या लेखिकेच्या २७ इंग्रजी कादंबऱ्यांचा मराठी अनुवादही त्यांनी केला आहे. त्याशिवाय, २० पुस्तके लिहिली आहेत.
    ‘उत्तरमामायण’ या पुस्तकात त्यांनी आपल्या नाट्यविषयक आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या ‘तिसरी घंटा’ या आत्मचरित्राचा उत्तरार्ध म्हणायला हवा.

    दि. २ जुलै २०१७ रोजी त्यांचे दिर्घ आजारपणामुळे मुंबईत निधन झाले. मुत्यूसमयी ते ८५ वर्षांचे होते.

    ## Toradmal, Madhukar

    ## Madhukar Toradmal

    तोरडमल, मधुकर - First published on 15 Dec 2010. updated on 2 July 2017

    प्रा. मधुकर तोरडमल यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.

    ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. मधुकर तोरडमल (20-Jul-2017)

    रंगकर्मी प्रा. मधुकर तोरडमल (24-Jul-2017)

    ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल (24-Jul-2021)

    ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांचा स्मृतिदिन (2-Jul-2021)

  • गोपाळ मेखले

    चार वर्षात केवळ एक एकर जमिनीवरील फुलशेतीतून ३०-४० लाखांचा टर्नओव्हर करणार्‍या आयटी स्पेशालिस्ट गोपाळ मेखले यांनी आपल्या गावात बचतगट, डेअरी, यासारखे यशस्वी प्रोजेक्टही राबवले आणि त्याची दखल हॉवर्ड युनिव्हसिर्टीने घेतली.

    गोपाळ मेखले शिक्षणाने इन्फमेर्शन टेक्नॉलॉजिस्ट, पण सध्या करतोय शेती. वाचून कुणालाही आश्चर्य वाटेल. चार वर्षांपूर्वी 'डेल' या आयटी क्षेत्रातील मोठ्या कंपनीतील लठ्ठ पगाराची नोकरी सोडूऩ त्याने़ शेतात राबायचा निर्णय घेतला, तेव्हा असंच सगळ्यांना आश्चर्य वाटलं होतं. पण थोड्याच अवधीत त्याने एक मोठी हॉर्टीकल्चर इंडस्ट्री उभी केली आणि सगळ्यांनी त्याच्या यशाचं व त्याने घेतलेल्या निर्णयाचं कौतुक करायला सुरुवात केली.

    सध्याच्या पिढीचा आपला 'सीव्ही फ्लरीश' करुन सतत कंपन्या बदलण्याकडे कल असताना, काहीतरी वेगळं करायचं, घरची जबाबदारी सांभाळायची अशा विचारानं चाळीशीच्या आतील गोपाळ मार्च २००८ मध्ये लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातल्या आपल्या सुगाव गावी आला. स्वत:च्या ३० एकर शेतीत हायटेक फ्लोरिकल्चर डेव्हलप केलं आणि दरसाल चक्क २०-३० लाखांचा टर्नओव्हर घेऊ लागला, हा त्याचा प्रवास नक्कीच वेधक आहे. पण त्यामागे त्याची बुध्दी आणि कठोर मेहनतही आहे. खरंतर गोपाळ २००२ ते २००८ या कालावधीत पूण्याला नोकरी करत होता. नोकरीत चांगलं चाललं होतं. नोकरीत स्थिरस्थावर झाल्यावर आईवडिलांनी पुण्यात कायमचं आपल्याकडे यावं, असं त्याला वाटलं. पण मुलाकडे राहायची इच्छा असतानाही गोपाळच्या आईवडिलांना पुण्यात नकोसं वाटलं. सुगाव सारख्या लहान गावात आयुष्य काढलेल्यामुळे त्यांना शहराचं आकर्षण होतं, मुलगा सोबत असणार म्हणून आनंदही झाला होता. परंतु पूर्णपणे पुण्यात स्थायिक होणं त्यांना पचलं-आवडलं नाही. शिवाय गावाकडे असलेल्या ३० एकर शेतीचं काय, असा प्रश्न गोपाळच्या आईवडिलांना भेडसावत होता. शेवटी मातीची माया वरचढ ठरली आणि त्यांनी सुगावातच राहण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे म्हाताऱ्या आईबाबांकडे कोण लक्ष देणार, ते ३० एकराची शेती कशी पाहणार, असे विचार गोपाळला छळायला लागले. त्याचं कामावरुन लक्ष उडालं. अन् एके क्षणी त्याच्या डोक्यात विचार आला- आपणच सुगावला गेलं तर! पण पुण्यासारख्या शहरात आठ वर्षं नोकरी केलेल्या गोपाळसाठी गावी परतण्याचा निर्णय घेणं सोपं नव्हतं. किंबहुना भविष्य खेड्यात काढायचं या कल्पनेने त्याला जणू काही फ्रस्ट्रेशनच आलं. पण शहर की गाव, आपलं भविष्य की कर्तव्य या संघर्षात अखेर वरचढ ठरलं ते मुलगा म्हणून करायचं कर्तव्य! आणि तडक सात वर्षांची नोकरी सोडून, पुण्यातील गाशा गुंडाळून गोपाळ सुगावला परतला.

    सुगावला येताच गोपाळचं पुन्हा नव्यानं स्ट्रगल करणं सुरु झालं. यावेळी स्ट्रगल जरा वेगळं होतं. एकीकडे शेती करण्याचं प्लॅनिंग सुरु असतानाच, पुण्यात नोकरीला असताना सुरू झालेली लग्नाची बोलणी एकदम बंद झाली. स्थळं येणं बंद झालं. घरी येणारा लठ्ठ पगारही बंद झाला. पण एव्हाना काय करायचं त्याचं चित्र त्याच्या डोळ्यासमोर होतं. त्याने सुगावातच बचतगट स्थापनं करणं, डेअरी प्रोजेक्ट आखणं, हॉटीर्कल्चर फार्मसाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारणं ही कामं करायला सुरुवात केली. दरम्यान एक स्थळ येऊन त्याचं लग्नही झालं. त्याच्या आईवडिलांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पण गोपाळला अजून खरा टप्पा गाठायचा होता. त्याचं लक्ष होतं, फ्लोरिकल्चर युनिटकडे. इथे तळेगाव दाभाडे येथे हॉटीर्कल्चरचं घेतलेलं शिक्षण उपयोगी आलं.

    एकूण ३० एकर पैकी १ एकरात गोपाळचे प्रयोग सुरु झाले. एक एकर शेतात जरबेराचं उत्पादन घेण्याचं ठरलं. काही लाखांची स्वत:ची गुंतवणूक व कॅनरा बॅंकेकडून घेतलेलं कर्ज या बळावर त्याने, 'इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट'करावी तशी शेतीत इन्व्हेस्टमेंट सुरु केली. शेती कोरडवाहू, त्यात अनेक अडचणी. ग्रीनहाऊस, फ्लोरिकल्चर हाऊस कसं उभारावं हा प्रश्न. पण हा प्रश्नही सोडवला गेला तो गावातीलच १२ जणांना घेऊन. गोपाळने़ १२ जणांना रोजगार दिला. मेहनत सुरु झाली. कोरडवाहूत एक पॉलीहाऊस उभारलं गेलं. ऊस, सोयाबीन, तूर यासारखी पीकंही फ्लोरिकल्चरच्या जागे व्यतिरिक्त पारंपरिकपणे घेणं गोपाळने सुरु ठेवलं. लागवडीनंतर रोज किमान ४ हजार जरबेराची फुलं येऊ लागली. त्यामुळे आता त्याच्या माकेर्टिंगची जबाबदारी आली. लातूर, औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली, पुणे आदी ठिकाणी माल जाऊ लागला पहिल्या वर्षी जेवढी इनव्हेस्टमेंट केली तेवढी काढणंही कठीण झालं. पण कधीही न संपणारा अनुभव पाठीशी आला. पहिल्या वर्षी झालेल्या चुका टाळण्यात करण्यात दुसर्‍या वर्षी यश आलं. पहिल्या वर्षीचा अनुभव गाठीशी आल्यानं २००९-२०१० साली १० लाख, त्याच्या पुढील वर्षी २० लाख तर, तर यंदा तब्बल ४० लाखावर उलाढाल गेली. अर्थात फुलांच्या धंद्यात चढउतार नसतात, असं नाही.कधी जरबेराच्या एका फुलाला अडीच, तर कधी ८ रुपये दरही आला. ह्यातून अॅग्रिकल्चर ही एक 'इंडस्ट्री' म्हणून गोपाळने याला 'ट्रीट' केलं. माकेर्टिंग, पॅकेजिंग, अशा टेक्निकल बाबी शिकून घेतल्या. दिल्लीपर्यंत फुलांची बाजार नेल्यानंतर, आता गोपाळ दुबई, अमेरिकेची स्वप्न पाहू लागला आहे. तब्बल बारा जणांच्या बळावर आता ही फुलशेती हायटेक होऊ लागली आहे.

    आधुनिक काळात ज्या ज्या म्हणून तांत्रिक बाबी गावात यायला हव्यात, त्या-त्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात गोपाळला यश आलं आहे. गावात डेअरी फार्म, ज्वारी-गव्हाच्या पीठाचा कारखाना, बचत गट, भाजीपाला उत्पादन, अत्याधुनिक शेतीकडे युवकांना अॅग्रिकल्चर ही एक इंडस्ट्री म्हणून पाहायला भाग पाडणे, त्या दृष्टीने प्रबोधन करणं, लातूरमध्ये डेअरी फार्म मधून म्हशीचं प्युअर दूध मिळवून देणं, आदी प्रोजेक्टही हळूहळू सुरू करण्यात गोपाळला यश आलं आहे.

    नुकतंच हॉवर्ड युनिर्व्हसिटीचं एक डेलिगेशन खास त्याचे हे प्रयोग पाहायला त्याच्या शेतात येऊन गेलं. बॅंकेचं पाठबळ, दुर्दम्य इच्छा शक्ती आणि 'आऊट ऑफ बॉक्स थिकिंग'ने केलेल्या हायटेक फुलशेतीच्या जोरावर, गोपाळ मराठवाड्याच्याच काय राज्यातील मुलांसाठी एक युथ आयकॉन ठरला आहे.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)