(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • महेश आरस

    कोलगेट-पामोलिव्ह कंपनीचे बिझनेस अॅनालिस्ट महेश आरस यांनी चेस मॅनहॅटन कंपनीत इंटरव्ह्यू दिला. त्यावेळी त्यांना सांगण्यात आले... “तुमचे नक्की असेल, तर पुढचे इंटरव्हयू थांबवतो”. बॅडमिंटन, क्रिकेटपासून नाट्य कलाक्षेत्रापर्यंत सर्व क्षेत्रात रस असलेले महेश आरस यांनी गेल्या २३ वर्षांत जे.पी. मॉर्गन बॅंकेचा आलेख उंचावत नेला आहे.

    महेश आरस यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला नॉलेज सेन्टर हा लेख पुढील पानावर वाचा.

    महेश आरस यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला नॉलेज सेन्टर हा लेख वाचा.

    aras-mahesh-modified

  • गायिका डॉ. वीणा सहस्रबुद्धे

    ख्याल गायिकी आणि भजनगायनासाठी त्या ओळखल्या जात होत्या. संगीताबरोबरच संस्कृत आणि इंग्रजीतील पदवीही कानपूर विद्यापीठातून प्राप्त केली होती. त्यानंतर ‘संगीत अलंकार’ ही पदवी मिळविली होती.

  • बेडेकर (डॉ.) वासुदेव ना

    डॉ. वा ना बेडेकर हे ठाणे शहरातील एक पितृतुल्य व्यक्तिमत्त्व. ठाण्याच्या विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक असलेले डॉ. बेडेकर हे ठाणे शहराचे एक भूषण होते.

  • अतुल भोसेकर

    कामासाठी देशभर भ्रमंती करताना प्राचीन ऐतिहासिक स्थाळांनी त्यांच्या मनावर मोहिनी घातली. इतिहासाला आपल्याशी बोलायचय, मात्र आपण त्याची भाषा समजून घेत नाही, हे जाणवल्यावर अतुल भोसेकर यांनी प्राचीन लिपींच्या जतनाचा ध्यास घेतला. आठ राज्यांतला व्यवसाय सांभाळताना प्राचीन लिपींचे नमुने गोळा केले. या लिपींचे शिक्षण शाळा, कॉलेज व विद्यापीठांत देण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे.

    इतिहासाचा दूत

  • निरंजन उजगरे

    निरंजन उजगरे यांनी एक मुख्य काम केले ते म्हणजे कवी-संपादन-अनुवादाच्या कार्यासाठी भारतभर भ्रमण केले , आणि त्यांच्या महत्वाकांक्षी ‘ काव्यपर्व ‘ या पुस्तकांची निर्मिती झाली. . स्वातंत्र्योत्तर भारतीय कविता -२१ भाषा आणि १७० कवींच्या कविता त्यात आहेत.

  • भाई माधवराव बागल

    (1896-1981)

    महात्मा फुले व शाहु महाराज यांच्या विचारांचा वारसा चालवला सत्यशोधक चळवळीचा प्रमुख नेता. अस्पृश्यता व जातीभेद यांना विरोध करण्यासाठी दक्षिण महाराष्ट्रात त्यांनी सातत्याने चळवळी केल्या. आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार केला. चित्रकार, पत्रकार व मार्क्सवादी विचारांचे लेखन म्हणून प्रसिध्द. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांना दलित मित्र पदवी देऊन गौरवले.

  • गायक पं. त्र्यंबकराव जानोरीकर

    भेंडीबाजार घराण्याचे गायक पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांचा जन्म १३ जुन १९२१ रोजी झाला. वयाच्या आठव्या वर्षी पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांनी ग्वाल्हेर घराण्याचे प्रख्यात गायक पं. विनायकराव पटवर्धन यांचेकडे पुणे येथील गंधर्व महाविद्यालयात संगीत शिकण्यास सुरुवात केली. त्यापुढील बारा वर्षे त्यांनी प्रचंड मेहनत घेतली व संगीताचा कसून रियाझ केला. पटवर्धनबुवांच्या सांगण्यावरून ते तबला, हार्मोनियम व इतर वाद्येही शिकले. तसेच अहमदनगमध्ये व रत्नागिरीत संगीतप्रसार करण्याचा त्यांनी नेटाने प्रयत्न केला. १९४६ मध्ये त्यांनी मुंबई येथे भेंडीबाजार घराण्याचे पं. शिवकुमार शुक्ला यांचा कार्यक्रम ऐकला, आणि त्यांच्या सांगीतिक आयुष्याला वेगळेच वळण मिळाले.

    पं. शिवकुमारांच्या गाण्याने व भेंडीबाजार घराण्याच्या गायनशैलीने प्रभावित होऊन पं. जानोरीकर भेंडीबाजार घराण्याचे उस्ताद अमान अली खाँ यांचे गंडाधारी शागीर्द बनले. उस्तादांच्या निधनानंतर १९५३ मध्ये पं. जानोरीकरांनी त्याच घराण्याच्या प्रख्यात गायिका श्रीमती अंजनी मालपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपली संगीत साधना कायम ठेवली. या दोन्ही संगीत गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करताना पं. जानोरीकरांच्या गायकीला वेगळेच पैलू प्राप्त झाले. पं. जानोरीकरांनी भारतभर आपले कार्यक्रम केले, तसेच संगीताचा अभ्यास करणाऱ्या नव्या पिढीलाही त्यांनी तयार केले. १९६० ते ७०च्या दशकात ही विशिष्ट गायकी नामशेष होण्याच्या मार्गावर असताना जानोरीकरांनी देशभर मैफिली करून ती सर्वदूर पोहोचवली आणि लोकप्रियही केली. कोलकाता येथील आयटीसी संगीत संशोधन अकादमीत १९८९ च्या नोव्हेंबरापासून इ.स. १९९१ च्या जूनपर्यंत त्यांनी संगीत गुरू म्हणून काम पाहिले. त्यांच्या भेंडीबाजार घराण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीविषयी सप्रात्यक्षिक व्याख्यानांसाठी ते विशेष लोकप्रिय होते.

    जानोरीकर बुवांचा वल्लभ संप्रदायाशी जवळचा संबंध होता. त्यांनी रचलेल्या बंदिशींमध्ये हिंदू देवी-देवतांची सुरेख वर्णने आढळतात. पंडित जानोरीकरांनी अनेक शिष्य तयार केले. डॉ. साधना जोशी, डॉ. सुहासिनी कोरटकर, शरद करमरकर, पद्माकर कुलकर्णी, श्रीकांत पारगावकर, अनुराधा कुबेर, किशोरी जानोरीकर, केदार बोडस, कुमुदिनी मुंडकर आणि अनुराधा मराठे ही त्यांतली काही ठळक नावे आहेत. त्यांच्या शिष्या किशोरी जानोरीकर या सध्याच्या पिढीतील प्रतिभावंत गायिका आहेत.

    पं.त्र्यंबकराव जानोरीकर यांचे २३ नोव्हेंबर २००६ रोजी निधन झाले.

    अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

    #PtTrimbakraoJanorikar #TrimbakraoJanorikar

  • रघुवेल लुक्स जोशी उर्फ र. ल्यु. जोशी

    रघुवेल लुक्स उर्फ र. ल्यु. जोशी यांनी काव्यलेखनाला तुलनेने खुप उशीरा सुरूवात केली. ताप येण्याचे निमित्त झाले आणि त्या काहिलीत काव्यलेखनाची स्फूर्ती होऊन त्यांनी खंडकाव्यच लिहून पूर्ण केले! त्यांच्या लेखनाची सुरूवात बायबलच्या विषयातून झाली. दांभिकपणा, पारतंत्र्य, राष्ट्रप्रेम, मायबोलीचे प्रेम ह्या विषयांवर त्यांनी सहजस्फूर्तीने, आवेशपूर्ण आणि भावपूर्ण लेखन केले आहे. वामन टिळकांना ते गुरूस्थानी मानत होते.

  • डॉ. मोहन भागवत (सरसंघचालक)

    मोहन भागवत हे २००९ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक झाले आहेत. ते ब्रह्मचारी आहेत व त्यांनी भारत व विदेशात भरपूर भ्रमण केले आहे.

  • रीमा लागू

    ७०-८० च्या दशकात मराठी रंगभूमीवर व नंतर मराठी, हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका केल्या.