(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • रेखा कामत

    गेली ६० वर्षे सिनेमा, नाटक, मालिका, जाहिरातींमधून अथकपणे अभिनयाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या रेखा कामत. वय वर्षे ८० चा टप्पा गाठूनही कार्यमग्न असलेल्या रेखा कामतांसाठी अभिनय म्हणजे लाखामोलाची गोष्ट म्हणता येईल.

  • विश्राम चिंतामण बेडेकर

    जन्म- ऑगस्ट १३ १९०६

    मृत्यू- १९९८

    विश्राम बेडेकर हे मराठीतले लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक होते. एक झाड आणि दोन पक्षी याला १९८५ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. त्यांनी १९८८ साली मुंबई येथे झालेल्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले.

    अधिक माहितीसाठी खालील लिंक्स क्लिक करा.

    मराठी लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक विश्राम बेडेकर (2-Nov-2016)

    मराठी लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक विश्राम बेडेकर (14-Nov-2017)

  • नाना पाटेकर

    नाना पाटेकर लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत

  • जयसिंग चव्हाण

    नाट्यनिर्माता म्हणून सत्तर ते ऐंशीच्या दशकात जे रंगकर्मी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उदयाला आले आणि आपला छोटासा का होईना पण गडद ठसा उमटवून गेले, त्यात जयसिंग चव्हाण यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल.

  • एल.पी उर्फ लक्ष्मीकांत

    लक्ष्मीकांत यांचे पूर्ण नाव लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर. संगीत देणे हे त्यांनी व्यवसाय म्हणून स्विकारले होते आणि शेवटपर्यंत या व्यवसायाशी ते ईमानदार राहीले.

  • नाना साहेब पेशवे

    शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेला शिवनेरी किल्ला १६३६ ते १७५७ दरम्यान स्वराज्यात नव्हता. नानासाहेब पेशव्यांनी मुत्सद्दीपणाने कोणत्याही लढाई शिवाय शिवनेरी स्वराज्यात घेतला. तसेच, लष्करी कारवाई करून निजामाच्या ताब्यातील खानदेश, जुन्नर, अहमदनगर, नाशिक, सोलापूर हे जिल्हे देखील स्वराज्यात आणले.

  • सिनेपत्रकार दिलीप ठाकूर

    ज्येष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर यांचा जन्म २० एप्रिल १९६० रोजी अलिबाग तालुक्यातील चौल गावी झाला. दिलीप ठाकूर यांचे बालपण, शालेय आणि महाविद्यालयीन जीवन मुंबईत गिरगावातील खोताची वाडीतील अवघ्या दहा बाय दहाच्या खोलीत गेले. जीवन घडताना एकीकडे दक्षिण मुंबईतील अनेक चित्रपटगृहात स्टाॅलच्या तिकीटात सतत नवे जुने चित्रपट पाहणे आणि त्या काळातील अनेक साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंक वाचणे यात घडले. शिवाय गल्ली क्रिकेट आणि गल्ली चित्रपट यातून जनसामान्यांशी नाळ जुळली होतीच. त्यांनी गिरगावातील हिंद विद्यालय हायस्कूलमध्ये शालेय तर चौपाटीच्या भवन्स कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतले. यातूनच विद्यार्थी दशेतच त्यांनी विविध नियतकालिकांमधून वृत्तपत्र लेखन सुरु केले. एकाद्या लेखावरचे मत अथवा एकाद्या ताज्या घडामोडीवरचे आपले मत 'वाचकांच्या पत्रा'तून प्रसिद्ध होत आहेत या त्यांच्यासाठी खूपच मोठा उत्साहाचा भाग होता.

    मार्मिक, रसरंग, चित्रानंद, सोबत, लोकप्रभा, क्रीडांगण अशा साप्ताहिकातून आपली पत्रे तर कधी लेखही प्रसिद्ध होत असल्याने त्यांचा लेखनातील कल वाढला. १९८२ साली त्यांनी नवशक्ती दैनिकात प्रूफ रिडर म्हणून रुजू झाले आणि त्याबरोबरच रविवार नवशक्तीत चित्रपटविषयक सदरही लिहायला मिळाले. १९८६ साली त्यांना संपादकीय विभागात बढती देण्यात आली. ऐशी आणि नव्वदच्या दशकात त्यांनी खूपच मोठ्या प्रमाणावर अनेक दैनिके आणि साप्ताहिकात विविध टोपणनावाने चित्रपटविषयक सदर लेखन केले. राजा दिलीप, स्पॉटबॉय, पिक्चरवाला, सिनेमावाला, राजा चौलकर, राजा फिल्मीस्तानी वगैरे वगैरे टोपणनावानी खूपच मोठ्या प्रमाणावर लेखन केले.

    मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रत्यक्षात शूटिंग रिपोर्टीगसाठी सेटवर जाणे, चौफेर निरीक्षण आणि लहान मोठ्या स्टार्ससह अनेक प्रकारचे तंत्रज्ञ आणि कामगार यांच्याशी संवाद साधणे यातून त्यांच्याकडे वेगळी माहिती, संदर्भ, तपशील, आठवणी यांची जमा होत गेली. याचीच पुढची पायरी म्हणून २००३ सालापासून त्यांचे चित्रपटविषयक लेख संग्रह प्रसिद्ध होत आहेत. आतापर्यंत त्यांची चाळीसपेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात स्थित्यंतरातील सिनेमा, क्लॅप, पैसा वसूल, यादगार पल, फस्ट डे फर्स्ट शो, काॅर्नर सीट, सिनेमा घर, ओपन थिएटर, बारा ते तीन तीन ते सहा, गल्ला पेटी, सिनेमा मसाला मिक्स इत्यादी पुस्तकांचा समावेश आहे. २००९ सालापासून ते मुक्त पत्रकार आणि लेखक म्हणून कार्यरत आहेत. जनसामान्य रसिकांना समजतो आणि आवडतो अशाच पारंपरिक मसालेदार मनोरंजक चित्रपटांवर आणि त्या विश्वावर त्यांनी कायमच फोकस ठेवला. आणि त्यातूनच त्यांच्या मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत सर्व स्तरांवर खूप ओळखी झाल्या. इसाक मुजावर आणि शिरीष कणेकर हे त्यांचे विशेष आवडते लेखक आहेत. विशेष म्हणजे, चित्रपती व्ही शांताराम फाऊंडेशनच्या 'शतक महोत्सवी मराठी चित्रपट ' या शंभर वर्षातील मराठी चित्रपटांची तपशीलवार माहिती दिलेल्या सूचीच्या संपादनाची संधी त्यांना मिळाली.

    चित्रपटविषयक माहिती आणि अनुभवाचा त्यांना जवळपास सर्वच मराठी तसेच काही हिंदी वृत्तवाहिन्यांवर प्रतिक्रिया देताना, एकाद्या चर्चेत सहभाग घेताना कायमच फायदा होत असल्याचे दिसतेय. टाईम्स ऑफ इंडिया सारख्या इंग्रजी वृत्तपत्रातही त्यांची चित्रपटसृष्टीतील एकाद्या घटनेवर सातत्याने प्रतिक्रिया येत असते. त्यांना या वाटचालीत अनेक पुरस्कार प्राप्त होत आहेत. विशेष उल्लेखनीय पुरस्कार म्हणजे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने देण्यात आलेला चित्रकर्मी पुरस्कार, मराठी पत्रकार संघाच्या वतीने जयहिंद पुरस्कार आणि प्रमोद नवलकर स्मृती पुरस्कार, संस्कृती कलादर्पणच्या वतीने उल्लेखनीय पत्रकार पुरस्कार, इंडिवूड मिडिया एक्सलन्स अॅवाॅर्ड, शिवसेना गिरगाव शाखा पुरस्कार, 'मी गिरगावकर ' दक्षिण मुंबई शिवसेना शाखा पुरस्कार, थर्ड बेल एन्टरटेन्मेन्ट कलातीर्थ पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कारांचा समावेश होतो. त्यांचे 'आऊट फोकस ' हे पुस्तक प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे.

    जुन्या चित्रपटाच्या फोटोंचा त्यांच्याकडे उत्तम संग्रह आहे.

    अधिक माहितीसाठी खालील लेख वाचा

    https://www.marathisrushti.com/articles/film-critic-dilip-thakur/

    #DilipThakur

  • ज्ञानेश्वर गणपत नाडकर्णी

    वयाच्या नवव्या वर्षापासून अखंड वाचन आणि वयाच्या अठराव्या वर्षापासून अखंड लेखन अशी साधना करणारे लेखक आणि कलासमीक्षक ज्ञानेश्वर गणपत नाडकर्णी. कलासमीक्षा, साहित्यसमीक्षा आणि स्वत:चे लेखन यासाठी अठराव्या वर्षी हाती घेतलेली लेखणी नाडकर्णींनी ६४ वर्षे खाली ठेवली नाही.

  • अविनाश नारकर

    अविनाश नारकर हे मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रतिष्ठित नाव आहे. चित्रपट , मालिका , नाटकं ह्या क्षेत्रात कित्येक वर्षांपासून अविनाश नारकर कार्यरत आहेत. अगदी black and white च्या जमान्यापासून ते आताच्या रंगीत काळापर्यंत त्यांचा अभिनय प्रवास सुरूच आहे.

  • संगीत समीक्षक आणि लेखक दत्ता मारुलकर

    आता ती मैफलही सुनीसुनी!
    बऱ्याच वर्षांपूर्वीची संध्याकाळ. शास्त्रीय संगीताच्या एका मैफलीत एक उंच, सावळे व्यक्तिमत्व दाखल झाले. चालणे, डौल ‘नमवी पहा भूमी हा चालताना’ असे. कुतूहल चाळवले ते मैफलीत दाद देण्याची रीत पाहून. लहान-सहान जागांनाही जाणकारीने पण हळुवारपणे तर कधी ‘क्या बात है.’ अशी मोकळी दाद. मैफल संपल्यावर जेवणाआधीच्या ‘मैफली’त ओळख झाली- मी दत्ता मारुलकर! त्यांचे स्फुट लिखाण अनेकदा वाचले होते. थोडय़ाच वेळात ‘अरे-तुरे’वर आलो. नंतर दत्ता घरचाच झाला.

    माणसे त्यांना जास्त आवडायची का संगीत हा प्रश्नच. सदैव गप्पांचा फड जमवण्याची आवड व जागरण करण्याची अमर्याद ताकद. सैन्यातली नोकरी त्याने प्रामाणिकपणे केली पण साहित्य-संगीतापासून दूर असणाऱ्या जगात तो रमू शकला नाही. १०/११ वर्षांतच त्याने सैन्यातून बाहेर पडत खासगी नोकरी पत्करली. त्या निमित्त दिल्ली, इंदूर, मुंबई, अहमदाबाद व शेवटी पुणे अशी भटकंती केली. पुण्यात मात्र तो स्थिरावला. नोकरीत कसूर नाही पण उरलेला वेळ गाणी ऐकणे, त्या समुदायात वावरणे, पुस्तके वाचणे असा ‘आनंदी आनंद गडे.’ वाचन, विशेषत: ललित मराठी वाचन हे दत्ताने प्रयत्नपूर्वक जपले होते.कादंबरी, नाटक, कथा, कविता अशा ललित साहित्याच्या प्रांगणात तो सुजाण वाचक म्हणून वावरायचा, त्यातली सौंदर्यस्थळे गप्पांच्या बैठकीत दाखवायचाही. मुळात तल्लख पण परिस्थितीमुळे महाविद्यालयीन जीवनाला पारखा असल्याने इंग्रजी ललित-वैचारिक लेखनापासून आपण बाजूला पडलो, ही त्याला खंत होती. ती उणीव भरून काढायला असे वाचन असलेल्या मित्रांकडून तो कुतूहल शमवायचा. कुतूहल लहान मुलांमध्ये असते तसे, सदैव जागरूक असे. दत्तामध्ये लपलेले हे ‘बालक’ कधी जागे होईल याचा अंदाज कधीच आधी येत नसे. मात्र अशा प्रसंगी त्रागा, वैताग या बरोबर ‘माता दिसली समरी विहरत’ याचा प्रत्यय येत असे. दत्ताचा कुठलाच मित्र, या ‘गेट आऊट’ ते ‘पुन्हा तोंड पाहणार नाही’ अशा रॅपिड फायर वर्षांवापासून वाचला नसेल. त्यातल्या त्यात सौम्य म्हणणे ‘आय अ‍ॅम सॉरी पण.’ असे यायचे. हे क्षणिक आहे, पुढच्या २/३ मिनिटांत गाडी पुन्हा रुळावर अशी खात्री- अनुभव गाठीशी असल्याने दत्ताशी मैत्री तुटणे अशक्य होते.

    ‘गाणे ऐकणे’ या नादापायी त्याने किती प्रवास केला, त्या क्षेत्रातल्या एकेका शिखरासोबत संवाद साधला, अनेक ठिकाणी जवळीकही झाली याची मोजदाद त्यालाही अशक्य होती. ललित साहित्याच्या डोळस वाचनाने, त्याही क्षेत्रात व्यक्तिगत ओळखी असल्याने प्रसन्न शैली त्याने कमावली होती. त्याच्या लेखनाचे संग्रह प्रकाशित झाले. संगीतावर जाणकारीने लिहिणारा-बोलणारा अशी प्रतिष्ठाही दत्ताला मिळाली. नोकरीच्या ठिकाणी घडलेल्या मालक-मजूर तंटय़ामागच्या तणावामधले नाटय़ रंगवणारी कादंबरी हे त्याचे पहिले स्वतंत्र ग्रंथलेखन.

    कुठेतरी, केव्हातरी ‘संगीत’ या त्याच्या पंचप्राणाशी संबंधित स्वतंत्र ग्रंथनिर्मितीवर हा प्रवास त्याला घेऊन जाणार होता. तो योग आला आणि ‘गानसरस्वती’सारखे लक्षणीय पुस्तक आले. मात्र या निर्मितीनंतरचा अनुभव त्याला एकीकडे मनस्ताप देणारा तर दुसरीकडे आर्थिक नुकसान करणारा ठरला. या सर्व प्रकरणातले क्लेश त्याने पचवले. तिथे जन्म झाला ‘स्वरहिंदोळे’ या पुस्तकाचा. भारतीय संगीतविश्वातल्या सात शिखरांची शब्दचित्रे रेखाटताना दत्ताची लेखणी बहरली.

    नंतर श्रीनिवास खळ्यांच्या सांगीतिक चरित्राला हात घातला गेला. यासाठी खूप धावपळ, परिश्रम केले पण ग्रंथ प्रकाशित झालेला पाहण्यास तो नाही.

    एकदा माणूस आपला म्हटला, की त्याच्यासाठी दत्ता खस्ता खायला नेहमीच तयार असायचा. ओळखीच्या कुणाच्या आयुष्यातला, कुटुंबातला जीवघेणा प्रसंग कळला तर तो विव्हल होत असे. हे हळवेपण त्याच्या निखळ माणूसपणाचा भाग होते, पारदर्शी होते. एक-दोन वेळा आलेल्या अनुभवांमुळे असे वाटले होते की, आजाराला दत्ता हळवा आहे. प्रसंग किरकोळ होते. मात्र ही समजूत त्याच्या शेवटच्या आजारात खोटी ठरली. मधुमेह सोबती होता. बऱ्याचदा प्रकरण मर्यादेबाहेरही जाई.

    दत्ताच्या सैन्य सोडल्यानंतरच्या आयुष्यातल्या अनेकानेक जागा फुलल्या त्या पुष्पावहिनींमुळे. शेवटची अनेक वर्षे घरची आर्थिक आवक, घर सांभाळणे, मुलींची लग्ने, दत्ताचा लोकसंग्रह असा सर्व व्याप शांतपणे सांभाळत पुन्हा स्वत:चे वाचन-महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थिती असे सर्व करायला लागणारी ऊर्जा वहिनींकडे कुठून येत होती हे मला आजही कोडेच आहे.

    दत्ताचा उल्लेख संगीत समीक्षक म्हणून व्हायचा. व्याख्यानांमध्ये त्याची शैली हरिदासी कीर्तन परंपरेच्या सर्व वैशिष्टय़ांसह प्रकट व्हायची. असे चित्रदर्शी लिखाणही त्याचे वैशिष्टय़. वसंतराव देशपांडय़ांवरील लेखात दत्ताने, ‘स्वर्गात भरलेल्या संगीतसभेत वसंतराव नसल्याने रंग भरेना म्हणून ब्रह्मदेवाच्या आज्ञेने वसंतरावांना तिकडे बोलावून घेतले गेले’, असे चित्र रंगविले होते. अशा सभा सध्या तिथे वारंवार भरत असणार. दत्ताचे श्वास असलेले कुमार गंधर्व, माणिकताई, मोगूबाई कुर्डीकर, जितेंद्र अभिषेकी, शोभा गुर्टू. असे गायक व पु.ल., रामूभय्यांसारखे रसिक जाणकार यांच्या सभेत वसंतराव गात आहेत आणि एका जीवघेण्या ‘जागेवर’ मंडपातून दाद निनादताना ‘बहोत अच्छे’, ‘क्या बात है’ अशी उंच आवाजात ‘ठाण्’ स्वरात साद घातली जाईल ती या ‘हरितात्या’चीच असेल. ती जाणवून आजही त्याच्याशी बोलावे म्हणून अनेकदा हात फोनपर्यंत जातोच. दत्ता मारुलकर यांचे १२ फेब्रुवारी २००८ रोजी निधन झाले.

    अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

    #DattaMarulkar