डॉक्टर रमेश सीताराम सुर्यवंशी हे संशोधक वृत्तीचे शिक्षक, व आदिवासी बोली भाषांमधले तज्ञ मानले जाणारे एक बहुरंगी व बहुढंगी व्यक्तिमत्व आहे. शिक्षण, भाषाशास्त्र, व लोकसाहित्याचे गाढे आभ्यासक, तसेच प्रतिभावंत लेखक म्हणून त्यांनी समाजात त्यांच्या नावाचा आदरयुक्त दबदबा निर्माण केला आहे. आजवरच्या त्यांच्या शैक्षणीक प्रवासावरूनच, डॉक्टरांच्या असामान्य बौध्दिक क्षमतांची व आभ्यासु व्रुत्तीची झेप आपल्या त्वरीत लक्षात येईल, अशा कौतुकास्पद तर्हेने त्यांनी ही कारकिर्द घडवली आहे.
नाशिक जिल्ह्यातील कुंभारी गावी जन्मलेल्या रामनाथ मोते यांनी ठाणे जिल्ह्यात उदरनिर्वाहासाठी येवून नावलौकिक मिळविले. आभ्यासवृत्ती, परिश्रम, व शिक्षण विकासाच्या आंतरिक तळमळीमुळे मोतेंनी दोन वेळा कोकण विभागाच्या शिक्षक मतदार संघाची निवडणूक प्रचंड मतधिक्याने जिंकली. कोकण विभागातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. शिक्षकाची समस्या, व वेदना ती आपली वेदना असे मानून तश्या भावनेने व तीव्रतेने वागण्याचे संस्कार त्यांच्यावर महाराष्ट्र शिक्षक परिषदेने केले.
पहिल्या टर्ममध्ये मोतेंनी अनेक शिक्षकहिताचे प्रलंबित प्रश्न अत्यंत कल्पकतेने मार्गी लावले होते. शिक्षण क्षेत्रातील शासन स्तरावर असा एकही प्रश्न राहिलेला नाही, की ज्यांना त्यांचा परिसस्पर्श लागायचा राहिला आहे. कायम विनाअनुदानित धोरणातील कायम शब्द काढण्यासाठी शिक्षक परिषदेच्या माध्यमातून तसेच विधी मंडळात त्यांनी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत; ज्यामध्ये मागासवर्गीयांच्या आरक्षणात वाढ करणे, अल्पसंख्यांकांसाठीच्या सोयी सवलती मिळवून देणे, शिक्षक-शिक्षकेतरांना ६ वा वेतन आयोगातील त्रुटी दूर करून तो तत्काळ लागू करणे, त्रिस्तरीय वेतनश्रेणी, अनुकंपा तत्वावरील नेमणूका करणे, वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीमध्ये सुधारणा करणे, शिक्षकांना दिली जाणारी सगळी अशैक्षणिक कामे बंद करावीत, अंध अपंगांना शाळा, तसेच तंत्रशिक्षण संस्था व त्यातील कर्मचारांच्या समस्यांबाबत, आश्रमशाळा कर्मचार्यांवर होणारे अन्याय, शालेय विद्यार्थ्यांना मिळाणार्या शिष्यवृत्तीधारकांच्या संख्येत वाढ करणे, शिक्षण विभागातील अधिकार्यांकडून होणार्या भ्रष्टाचाराला आळा घालणे अशा सर्वच विषयांबाबत ते जागृत राहिले असून विधीमंडळामध्ये त्यांनी या समस्यांना वारंवार वाचा फोडून सरकारला त्याबाबतीत काही ठोस योजना व धोरणे आखण्यास प्रवृत्त केले आहे.
त्यांच्या या कामांचे अहवाल सात खंड निवडणूकी दरम्यान शिक्षक परिषदेने प्रकाशित केलेले आहेत. या कामाशिवाय पत्रकारांना सुरक्षितता, पोलिस कर्मचार्यांचे प्रश्न, प्रदुषण, दुरचित्रवाणी वाहिन्यांवरून प्रक्षेपित होणार्या अश्लिल व हिंसाचारी कार्यक्रमांवर बंदी घालणे, बेरोजगारी, भ्रष्टाचार, गुन्हेगारी अनाधिकृत बांधकामे असे अनेक समाजहिताचे विषयही विधीमंडळामध्ये उपस्थित करून त्यावर चर्चा घडवून त्यावर उपाययोजनाही सुचविल्या आहेत. राष्ट्रकुल मंडळाने महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते विधीमंडळातील उत्कृष्ठ आमदार हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
भास्कर चंदावरकर यांची संगीतातले उत्तम जाणकार, देशी वाण सांभाळणारा पण परदेशी संगीताची जाण असणारा संगीतकार म्हणून ओळख कायम राहणार आहे.‘ घाशिराम कोतवाल ’ हे नाटक, ‘ सामना ’ , ‘ सिंहासन ’ सारखे चित्रपट अजरामर करण्यामध्ये भास्कर चंदावरकर यांच्या संगीताचा अविभाज्य वाटा आहे.
शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षणविषयक ग्रंथाचे लेखक गणेश विनायक अकोलकर यांचे निधन २३ नोव्हेंबर १९८३ रोजी झाले. माध्यमिक शिक्षण, शैक्षणिक तत्वज्ञानाची रूपरेषा, शैक्षणिक समाजशास्त्राची रूपरेषा हे त्यांचे शिक्षणशास्त्राचे सैद्धांतिकस्वरूप स्पष्ट करणारे ग्रंथ, तसेच माध्यमिक शिक्षणाची पुनर्घटना, शैक्षणिक मूलतत्वे, शैक्षणिक मनोविज्ञान, व्यक्तिमत्व विकास या ग्रंथासह लोकशाही व शिक्षण आणि शिक्षणाची अधुनिक तत्वज्ञाने हे अनुवादित ग्रंथही त्यांच्या नावावर आहेत.
## Ganesh Vinayak Akolkar
‘लगे रहो मुन्नाभाई’ मधील ‘खटय़ाळ म्हातारा’ प्रधानांनी रंगविला. भूमिका छोटीशीच असली तरी ते आपली छाप पाडून गेले. ‘जब वुई मेट’मधील त्यांच्या ‘स्टेशन मास्तर’ही प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. पण हिंदी चित्रपट आणि तेथील वातावरणात ते फारसे रमले नाहीत.
बापूसाहेब पेंढारकरांच्या कानी या बालनटाची कीर्ती पडली. त्यांनी भार्गवरामांचे गाणे ऐकले आणि आपल्या संस्थेत दाखल करून घेतले. ललितकलादर्शन मधील १९२५ ते १९३७ ही बारा वर्षे म्हणजे भार्गवराम आचरेकरांच्या नाट्य जीवनाची चढती कमान होती.
स्टार प्रवाह वरील “लक्ष्य” या मालिकेतील सलोनी देशमुख भूमिकेनी त्यांना खुप प्रसिद्धि मिळवून दिली.
श्रीरंग मनोहर दिवाण हे नागपुरमधील प्रसिध्द ज्योतिषी, प्रवचनकार, व वास्तुदोषनिवारण तज्ञ आहे. वास्तुशास्त्राच्या काही निकषांवर तसेच सिध्दांतांवर आज आधुनिक विज्ञानही विश्वास ठेवित असल्यामुळे आज अगदी सर्वच व्यवसायांमधील नवीन वास्तु बांधणारे लोकं, वास्तुशास्त्राप्रमाणे निर्दोष मानल्या गेलेलं घर बांधण्याकडे आपला कल ठेवतात.
गणितशास्त्र या विषयातील केंब्रिज विद्यापिठातील रँग्लर ही सर्वोच्च पदवी मिळवलेले कुशाग्रबुध्दीचे अभ्यासक.
ब्रोकरेज फर्म्स' राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावतात आणि आजकालच्या बिझनेस युगात सर्वांनाच त्यांची गरज असते. 'ब्रोकरेज बिझनेस' हा सचोटीने, कायद्याच्या चौकटीत राहून चोखपणे करता येतो हे जाणणार्या लोकांची संख्या मात्र कमीच असेल. आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यापारातील एक आघाडीचा मालवाहतूक व्यावसायिक कंपनीसमूह म्हणून ओळखल्या जाणार्या, मुंबईच्या आणि मराठी मालक असलेल्या 'एटीसी ग्रुप'चे व्यवस्थापकीय संचालक शंतनू भडकमकर यांची 'इंन्टरनॅशनल फेडरेशन ऑफ कस्टम्स ब्रोकर्स असोसिएशन' ('आयएफसीबीए') या संघटनेच्या अध्यक्षपदी झालेली निवड ही सर्व मराठी माणसांना अभिमानास्पद वाटेल यात शंका नाही.
मुंबई विद्यापीठाची 'बी.एस्सी.' पदवी मिळविल्यानंतर भडकमकरांनी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेतील 'हार्वर्ड बिझनेस स्कूल'ची (बोस्टन) 'ओनर्स प्रेसिडेन्ट्स मॅनेजमेन्ट', 'रूल नाइन' (कस्टम्स एक्झॅमिशन क्वॉलिफाइड), 'फेडरेशन ऑफ इन्टरनॅशनल फ्रेट फॉरवर्डर्स असोसिएशन' या परीक्षा उतीर्ण केल्या. वडील श्रीराम मोरश्वर भडकमकर यांनी १९५७ साली मुंबईत स्थापन केलेल्या 'इन्टरनॅशनल फ्रेट फॉरवर्डिंग' व्यवसायाची सूत्रे शंतनू यांनी १९८१ साली हाती घेतली.
आजमितीला १० कंपन्यांचा विस्तार असलेला 'एटीसी ग्रुप' देशातील एक प्रमुख 'फुल सर्व्हिस इन्टरनॅशनल फ्रेट फॉरवर्डर' म्हणून ओळखला जातो. 'डोअर टू डोअर इन्टरनॅशनल लॉजिस्टिक्स'मध्ये 'एटीसी'चे स्पेशलायझेशन आहे. शंतनू भडकमकर यांनी 'इन्टरनॅशनल फेडरेशन ऑफ कस्टम ब्रोकर्स असोसिएशन'चे मॅनेजिंग डायरेक्टर, 'काऊन्सिल ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेन्ट प्रोफेशनल्स'च्या भारतीय शाखेचे अध्यक्षपद, 'फेडरेशन ऑफ फ्रेट फॉरवर्डर्स असोसिएशन्स इन इंडिया'चे अध्यक्षपद, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीचे उपाध्यक्षपद, 'असोसिएशन ऑफ मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स इन इंडिया'चे उपाध्यक्षपद आणि 'चायना इन्टरनॅशनल लॉजिस्टिक्स प्रोफेशनल नेटवर्क'चे उपाध्यक्षपद अशा विविध जबाबदार्या चोखपणे पार पाडल्या आहेत व पाडत आहेत.
'एटीसी ग्रुप'च्या व्यवसायाचा व्याप देशभरातील १५ शहरांतील २० कार्यालयांद्वारे सांभाळला जात असून, युनायटेड स्टेट्समध्ये एक 'ओव्हरसीज ऑफिस' कार्यरत आहे. 'मराठी माणूस व्यवसाय, उद्योगात मागे असतो, त्याला बिझनेस कळत नाही' असे म्हणणे आता इतिहासजमा झाले.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
Copyright © 2025 | Marathisrushti