दूरदर्शनवर त्यांनी ‘माध्यम चित्रवाणी’ नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकाला राज्य सरकारचा सवरेत्कृष्ट पुरस्कारही मिळाला. त्याचबरोबर बालसाहित्यिक म्हणून त्यांची वेगळी ओळख होती. त्यांनी मुलांसाठी सुमारे ३०० पुस्तके लिहिली.
शैलेश भागवत यांचे आकाशवाणी वरून अनेक वेळा सनई वादनाचे कार्यक्रम झाले आहे. त्यांनी भारताबरोबरच दुबई,अमेरिका, युरोप आणि श्रीलंका येथे ही अनेक कार्यकम केले आहेत. शैलेश भागवत यांनी अनेक मोठ्या कलाकारांच्या बरोबर सनईच्या जुगलबंदीचे कार्यक्रम केले आहेत.तसेच परीक्षक म्हणून शैलेश भागवत यांनी अनेक स्पर्धेसाठी काम केले आहे.
उदय गंगाधर सप्रे हे व्यवसायाने तांत्रिक बाजूंवर काम करणारे अभियांत्रिक असले तरी आयुष्यभर विवीध कलांमध्ये बेधुंदपणे रमणारा, व हौशीपणाने प्रत्येक कलेमधील सुप्त सौंदर्याचा रसास्वाद घेणारा प्रतिभावंत कलाकार त्यांचा नेहमीच कानोसा घेत आलाय. बी. ई. केमिकल, व डीप्लोमा इन इंटेरिअर डिझाईन अँड डेकोरेशन ह्या पदव्या संपादन करणार्या सप्रे यांना लहानपणापासूनच विविध कलाकौशल्यांमध्ये झळकायची, व त्यांना पुर्णपणे आत्मसात करण्याची खुमखुमी होती. चित्रकला व उत्तम रंगसंगतींची जाण तसेच कुठलीही गोष्ट सुबक, रेखीव व उठावदार होण्यासाठी काय करावे लागते, याचे अचुक, उपजत ज्ञान त्यांच्यात मुबलक असल्यामुळे इंटेरिअर डिझाईनिंग व डेकोरेशन या वेगळ्या वाटेकडे वळण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला व तो यशस्वीही करून दाखविला.
मराठी कादंबरीक्षेत्रात आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणार्या श्रीपाद नारायण पेंडसे म्हणजेच श्री. ना. पेंडसे यांचा जन्म ५ जानेवारी १९१३ साली झाला. पेंडस्यांची चैतन्यपूर्ण कादंबरी म्हणजे ‘तुंबाडचे खोत’. ‘गारंबीचा बापू’, ‘राजे मास्तर’, ‘यशोदा’, ‘संभुसांच्या चाळीत’, ‘असं झालं उजाडलं’, ‘चक्रव्यूह’, ‘रथचक्र’ ह्या त्यांच्या नाटकांनी रंगभूमीवरही यश प्राप्त केलं.
माधुरी ही ख-या अर्थाने सौंदर्य, अभिनय आणि नृत्य यांचा अभूतपूर्व एकत्रित संगम आहे. तिच्या आधीच्या सर्व सुपरस्टार या कुठे ना कुठे कमी होत्या. अपवाद फक्त रेखाचा. मधुबालाला नृत्यात मास्टरी नव्हती तर हेमा मालिनी सौंदर्यवती असली तरी अभिनयात डावी होती.
विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ समाजसुधारक, महिला सबलीकरणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचणारे धोंडो केशव उर्फ अण्णा साहेब उर्फ महर्षी कर्वे यांचा जन्म ८ एप्रिल १८५८ ला कोकणातील मुरुड या गावी झाला. शालेय शिक्षण मुरुड आणि रत्नागिरी येथे पूर्ण झाल्यावर एलफिनस्टन महाविद्यालयातून गणित विषय निवडून पदवी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं.
लोकोत्तर पुरुषांच्या पश्चात त्यांच्या वंशजांवर काळाचा दबाव नकळत निर्माण होत असतो. विशेषत: बौद्धिक क्षेत्रातील अशा महान व्यक्तींच्या पुढील पिढय़ांना ती क्षमता टिकवून ठेवता येतेच असे नाही. परंतु अशाही स्थितीत आपण स्वकर्तृत्वाने अपवाद ठरावे, असे बहुधा डॉ. सदानंद मोरे यांनी ठरवले असावे. महाराष्ट्राच्या तार्किक आणि बौद्धिक परंपरेतील मुकुटमणी असलेल्या संत तुकाराम महाराज यांच्या घराण्यात जन्मलेल्या डॉ. मोरे यांनी गेल्या पस्तीस वर्षांमध्ये संतपरंपरेचा अभ्यास करून जो अन्वयार्थ लावला, तो त्यांच्यातील अभ्यासकाचे दर्शन घडवणारा आहे.
महाराष्ट्रातील लोकव्यवहाराचा त्यांचा अभ्यास केवळ तत्त्वज्ञान आणि अध्यात्माच्या अंगाने केलेला नाही. राजकारण, समाजकारण आणि संस्कृतीकारण या क्षेत्राचीही जोड त्यांच्या अभ्यासाला मिळाल्यामुळे तो अनेकांगी आणि परिपूर्णतेकडे जाणारा ठरला आहे. ‘लोकमान्य ते महात्मा’ या त्यांच्या ग्रंथातून त्यांचा हा अभ्यास जसा लक्षात येतो, तसाच ‘ज्ञानोबा तुकाराम’, ‘पालखी सोहळा-उगम आणि विकास’, ‘अमृतानुभवाची वासुदेवी टीका’, ‘तुकाराम गाथेची देहू प्रत’ , ‘मंथन’, ‘त्रयोदशी’ या सारख्या लिखित आणि संपादित ग्रंथांमुळे लोकव्यवहारातील गुंतागुंत अधिक सोपी करून सांगण्याचा त्यांचा प्रयत्नही अभ्यासकांच्या मनात ठसतो. तत्त्वज्ञान विषयाचे गेली ३५ वर्षे अध्यापन करणारे डॉ. मोरे हे पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानदेव व संत तुकाराम अध्यासनांचे प्रमुख होते. अध्यापन हा जरी त्यांचा धर्म असला तरीही सतत चिंतन आणि त्याचे विश्लेषण हा त्यांचा स्वभाव आहे. नाशिक येथे या आठवडय़ात होत असलेल्या संत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची झालेली निवड म्हणजे त्यांच्या आजवरच्या विविधांगी अभ्यासाचा गौरव आहे, असे म्हटले पाहिजे. मराठी माणसांचा देशपातळीवरील पहिला जनसमुदाय म्हणून महाराष्ट्राचा जो उल्लेख होतो, त्याचे कारण महाराष्ट्रातल्या संतपरंपरेने येथील जनतेला आत्मभान आणि राष्ट्रभान दिले हे आहे, त्यामुळेच संत नामदेव पंजाबपर्यंत जाऊ शकले आणि मराठय़ांनी पानिपतापर्यंत विस्तार करण्याचे स्वप्न पाहिले, असे मत डॉ. मोरे आवर्जून मांडतात. मोरे यांच्या निवडीमुळे संतसाहित्याच्या अभ्यासाला नवी दिशा मिळू शकेल, यात शंका नाही.
--------------------------------------------------------------------------
MSS - 0042
मोरे, (डॉ.) सदानंद श्रीधर
२५ जून १९५२
१९५२ > लेखक, गाढे अभ्यासक आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉ. सदानंद श्रीधर मोरे यांचा जन्म. त्यांच्या अभ्यासाची साक्ष देणार्या अनेक पुस्तकांपैकी ‘मंथन’ हे पहिले तर ‘त्रयोदशी’ हे ज्ञानेश्वरांविषयीचे. ‘तुकाराम दर्शन’ या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. ‘लोकमान्य ते महात्मा’, ‘कृष्ण : द मॅन अॅंड हिज मिशन’ ही इंग्रजी पुस्तकं, तीन काव्यसंग्रह अशी त्यांची ग्रंथसंपदा.
प्राच्यविद्या संशोधनात त्यांना रस होता. १८७४ साली लंडन येथे आणि १८८६ साली व्हिएन्ना येथील प्राच्य विद्या परिषदात त्यांनी निबंध वाचले होते. ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते.
अमोल गुप्ते हे सुप्रसिध्द अभिनेते, दिग्दर्शक आहेत. त्याचबरोबर ते अतिशय चांगले पटकथालेखक आहेत.
प्राचीन मराठी वाङ्मयाचे संशोधक पांडुरंग नारायण कुलकर्णी यांचा जन्म २५ ऑक्टोबर १९२२ रोजी झाला.
“संशोधन धारा” या ग्रंथातून त्यांनी प्राचीन कवींच्या कवितांवर तोपर्यंत झालेल्या संशोधनातील चुका दाखवून निर्णायक मत व्यक्त केले. याशिवाय “नागेशमाहात्म्य” चे संपादन त्यांनी केले.
Pandurang Narayan Kulkarni
Copyright © 2025 | Marathisrushti