(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अरुण फडके

    अरूण फडके हे ठाण्यामधील नावाजलेले शब्दकोशकार व व्याकरणतज्ज्ञ आहेत.

      April 18, 2011


  • वसंतराव नाईक

    वसंतराव नाईक यांची मुख्यमंत्री म्हणून एक तपाची कारकीर्द स्थैर्य व गतिमान विकास यासाठी उल्लेखनीय ठरली. दोन युद्धे, तीन मोठी राज्यव्यापी अवर्षण यासारख्या संकटांना तोंड देतानाच त्यांनी शेतीचा अमूलाग्र विकास करुन महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत जवळजवळ स्वयंपूर्ण बनविला; म्हणूनच त्यांना महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे प्रणेते मानले जाते.

      August 30, 2010


  • अभिनेते दामूअण्णा मालवणकर

    नाटक आणि चित्रपट या दोन्ही माध्यमात विनोदी अभिनेते दामूअण्णा यांनी विशिष्ट प्रकारे हसण्याची लकब, तिरळा डोळा आणि प्रभावी शब्द फेक याद्वारे आपले विशिष्ट स्थान निर्माण केले होते. त्यांचा जन्म ८ मार्च १८९३ रोजी निपाणी येथे झाला.

    दामूअण्णा मालवणकर यांचे पूर्ण नाव दामूअण्णा बापूशेठ मालवणकर. त्यांच्या वडिलांचा सोनारकामाचा पिढीजात व्यवसाय होता. त्यामुळे दामूअण्णांनी त्यातच लक्ष घालावे अशी त्यांचे वडील बापूशेठ यांची अपेक्षा होती. पण त्यांना लहानपणापासूनच नाटकांचे वेड होते. घरातून या नाटकवेडाला विरोधच होता. त्यामुळे दामूअण्णा चोरून नाटके पाहत असत. तारुण्यात नाटकांच्या ध्यासामुळे त्यांनी घरातून पळून जाऊन महाराष्ट्र कंपनीत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र वडिलांनी त्यांना परत आणून सोनारकामात लक्ष घालण्यास भाग पाडले. मात्र १९१३ साली ते पुन्हा एकदा घरातून बाहेर पडले आणि सांगलीला चित्ताकर्षक मंडळीत गेले. तिथे त्यांना बिनपगारी नोकरी मिळाली.

    चित्ताकर्षक कंपनीत दामूअण्णांना नाटकांच्या जाहिरातींचे फलक ढकलगाडीवर घालून रस्त्यावरून ङ्गिरवून आणण्याचे काम दिले गेले. पडतील ती कामे करण्यात त्यांचा वेळ जात असे. काही काळानंतर चित्ताकर्षक मंडळीच्या ‘त्राटिका’ या नाटकात दामूअण्णांना शिंप्याची भूमिका दिली गेली. ती भूमिका अगदी छोटी होती, मात्र त्यामध्ये त्यांनी प्रेक्षकांना भरपूर हसवले. हे साल होते १९१५. पुढे १९१६ साली चित्ताकर्षक कंपनी बंद पडली आणि दामूअण्णा लोकमान्य नाटक मंडळीत गेले. तिथे त्यांनी मामा वरेरकर लिखित ‘हाच मुलाचा बाप’ या नाटकात डॉ. पशूची भूमिका अगदी तडङ्गेने केली. त्यामुळे त्यांचा नावलौकिक होण्यास सुरुवात झाली. १९१८ साली दामूअण्णा मालवणकर केशवराव भोसले यांच्या ललितकलादर्श मंडळीत गेले. तेथे त्यांना काम मिळाले नाही, तेव्हा ते दीनानाथ मंगेशकरांच्या बलवंत नाटक मंडळीत गेले. त्या कंपनीत त्यांनी ‘पुण्यप्रभाव’, ‘मृच्छकटिक’, ‘भावबंधन’, ‘विद्याहरण’, ‘उग्रमंगल’, ‘सन्यस्त खड़्ग’, ‘वेड्यांचा बाजार’ वगैरे नाटकात भूमिका करून चांगलीच प्रसिद्धी मिळवली. पुढे १९३३-३४ साली बलवंत नाटक कंपनी बंद पडली आणि त्याचेच चित्रसंस्थेत रूपांतर झाले. त्यामुळे दामूअण्णा दीनानाथ मंगेशकरांकडेच राहिले.

    १९३४ साली आलेल्या ‘कृष्णार्जुन युद्ध’ या चित्रपटात त्यांना छोटीशी भूमिका देण्यात आली. चित्रपटातल्या त्यांच्या कामांची हीच सुरुवात होती. पुढे ३-४ वर्षात ‘लक्ष्मीचे खेळ’, ‘सत्याचे प्रयोग’, ‘ठकीचे लग्न’ वगैरे चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या.

    त्यानंतर १९३८ साली ते कोल्हापूरला आले आणि त्यांनी मा. विनायक यांच्या ‘ब्रह्मचारी’ चित्रपटात आश्रम चालकाची भूमिका केली. या भूमिकेमुळे त्यांना चांगले नाव मिळाले. मा. विनायक यांच्या चित्रपटातच त्यांच्या अभिनयाला चांगला वाव मिळाला. विनोदी चित्रपटांचे नवे दालनच उभे करण्यात मा. विनायक यांना दामूअण्णा मालवणकरांनी मदत केली. १९३९ साली प्रदर्शित झालेल्या ‘ब्रँडीची बाटली’ या चित्रपटात त्यांनी नायकाची भूमिका साकारली. ‘बगाराम’च्या भूमिकेत त्यांना आपल्या विनोदी अभिनयाला पूर्ण वाव देता आला आणि ही भूमिका लोकप्रिय झाली. त्यानंतर ‘लग्न पहावं करून’, ‘सावकारी पाहुणे’, ‘गजाभाऊ’ या चित्रपटांतूनही त्यांनी नायकाच्या भूमिका साकारल्या आणि आपल्या विनोदी अभिनयाचा प्रेक्षकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला.

    त्यानंतर विनायक यांच्याकडे ‘माझं बाळ’, ‘चिमुकला संसार’, ‘अर्धांगी’, ‘अमृत’, ‘सुखाचा शोध’, ‘संगम’, ‘पहिली मंगळागौर’ या मराठी चित्रपटांत, तसेच ‘सुभद्रा’, ‘बडी मॉं’ या हिंदी चित्रपटात विविध भूमिका केल्या. मा.विनायक यांच्या प्रत्येक चित्रपटात त्यांच्यासाठी खास विनोदी भूमिका असायचीच. १९४७ साली मा. विनायक यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी ‘चूल आणि मूल’ या चित्रपटातून भूमिका केली. पुढे ‘मोरूची मावशी’ (१९४८), ‘ब्रह्मघोटाळा’ (१९४९), ‘गळ्याची शपथ’ (१९४९), ‘बायको पाहिजे’ (१९५०), ‘देव पावला’ (१९५०) या चित्रपटांत त्यांनी नायक म्हणून भूमिका केल्या आणि खर्याी अर्थाने विनोदी अभिनेता म्हणून स्वत:चे आगळेवेगळे स्थान निर्माण केले. त्याशिवायही अनेक मराठी, हिंदी चित्रपटांतून त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या. सुरुवातीच्या काळात बिनपगारी, त्यानंतर दोन आणे रोजगारावर काम करत दामूअण्णा दोन हजार रुपये घेऊन भूमिका करीत असत. चित्रपटातील लोकप्रियता शिगेला पोहोचली, तरीसुद्धा दामूअण्णांना नाटकाची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. राजाराम नाटक मंडळीत गंगाधरपंत लोंढे दामूअण्णांना ‘भावबंधन’मधल्या ‘गोकुळ’च्या भूमिकेसाठी खास बोलावून घेत.

    त्या वेळी ते ३५० रुपये नाईटवर काम करत. १९४४ साली लोंढे यांचे निधन झाल्यावर दामूअण्णांनी ‘प्रभाकर नाटक मंडळी’ ही स्वत:ची संस्था सुरू केली आणि वीर माधव जोशी यांचे ‘उधार-उसनवार’ हे नाटक रंगमंचावर आणले. चित्रपटसृष्टीतले काम सांभाळून त्यांनी आठ वर्षे सार्या महाराष्ट्रभर नाटकांचे प्रयोग केले. १९५२ साली ही नाटक कंपनी बंद पडल्यावर दामूअण्णांनी चित्रपट याच आपल्या कार्यक्षेत्रावर पुन्हा भर दिला. राम गणेश गडकरी यांचा ‘तिंबूनाना’, चिं.वि. जोशींचा ‘चिमणराव’ आणि ना.धों. ताम्हणकर यांचा ‘दाजी धडपडे’ हे तिन्ही मानसपुत्र साकार करत दामूअण्णांनी त्या व्यक्तिरेखांना अजरामर केले. त्यांनी जवळपास ७५ हिंदी-मराठी चित्रपटांतून व अंदाजे ५० नाटकांतून विनोदी भूमिका केल्या.

    भारती मंगेशकर म्हणजेच ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर यांच्या पत्नी ह्या दामुअण्णा मालवणकर यांची कन्या. पु.ल नी एकदा भारती मंगेशकर यांना बघितले तेव्हा म्हणाले होते " ही मुलगी बापाचा डोळा चुकवुन जन्माला आली आहे !!!"

    दामूअण्णा मालवणकर यांचे निधन १४ मे १९७५ रोजी झाले.

    अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

    #DamuAnnaMalvankar

      May 4, 2022


  • गजानन यशवंत माणिक (ताम्हणे) ऊर्फ माणिकराव

    अवघ्या एकोणिसाव्या वर्षी तीन हजार दंड, पाच हजार बैठका आणि सात तास कुस्तीचा सराव करणा-या माणिकरावांचे अस्थिसंस्था, युनानी वैद्यक व शस्त्रास्त्रविद्येवरही प्रभुत्व होते.

      June 25, 2022


  • संत नानामहाराज – श्रीगोंदेकर

    श्री नानामहाराज यांचे मूळ नाव नारायण बळवंत नाचणे. त्यांचा जन्म मरूड-जंजिरा येथे झाला. श्री गणपती हे त्यांचे उपास्यदैवत होते.

      April 28, 2010


  • डॉ. प्रकाश आमटे

    आदिवासी क्षेत्रात काम करणारे सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे हे सुप्रसिद्ध समाजसुधारक बाबा आमटे यांचे द्वितीय पुत्र आहेत. ते त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोक बिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवतात.

      December 15, 2010


  • सुचेता कडेठाणकर

    कडेठाणकर, सुचेता

    सुचेता कडेठाणकर या पुणेकर युवतीच्या नावापुढे आता ‘पहिली भारतीय व्यक्ती’ असे विशेषण लागले आहे. जे भल्याभल्यांना जमणार नाही असे आव्हान तिने यशस्वीरीत्या पेलले- ते म्हणजे जगातील सर्वात मोठे थंड वाळवंट असलेले मंगोलियातील गोबी वाळवंट पार करण्याचे!

    इनमीन पाच फूट उंचीची मूर्ती, पण आपल्या कामगिरीद्वारे तिने स्वत:ची खरी उंची दाखवून दिली. एखाद्या गोष्टीसाठी झोकून देऊन, तिचा सातत्याने पाठपुरावा केल्यावर सर्वकाही साध्य आहे, हे तिने या कामगिरीतून सिद्ध केले. गोबीच कशाला? कोणत्याही वाळवंटातून चालण्यासाठी शरीराचा तर कस लागतोच आणि मनाच्या कणखरपणाचीही कसोटी लागते. अथांग पसरलेल्या गोबी वाळवंटात- जिथे चुकूनच कधीतरी माणसाचे दर्शन होते- सलग ५२ दिवस चालून सुचेताने या दोन्ही कसोटय़ा लिलया पार केल्या. सुचेता तशी मध्यमवर्गीय संस्कृतीत वाढलेली. पुण्यात कसबा पेठेतील वाडय़ात आई, वडील आणि लहान बहीण अशा कुटुंबात वाढली. इतिहास, संस्कृत, मराठी व पत्रकारिता या विषयांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. सुरुवातीला दोन वर्षे ‘लोकसत्ता’ साठी काम केले, नंतर मुक्त पत्रकार म्हणून लिहू लागली. पुढे चांगले पैसे मिळवून देणाऱ्या ‘टेक्निकल रायटिंग’ मध्ये प्रवेश केला. विविध आयटी कंपन्यांसाठी ती असे लेखन करू लागली. त्यातून चांगले अर्थार्जन होत असल्याने अशा प्रकारचे छंद पूर्ण करणे सोपे गेले. शाळेत असल्यापासूनच भटकंती, डोंगरवाटा पालथ्या घालणे आणि शरीराचा कस लागणाऱ्या साहसी क्रीडाप्रकारांची आवड! त्यातूनच सह्य़ाद्रीचे कडे-कपारी, हिमालयाच्या रांगा व एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत तिने अशी भटकंती केली. लांब अंतराच्या सायकल स्पर्धा तसेच, पुणे, दिल्ली, मुंबई येथे भरल्यिा जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या मॅरेथॉन्समध्ये तिने अनेकदा भाग घेतला आहे. पुण्यातील खडतर अशा ‘एन्डय़ुरो अ‍ॅडव्हेंचर रेस’ चे एकदा विजेतेपदही मिळविले. लेखन व वाचनाच्या छंदाबरोबरच साहसी क्रीडाप्रकारांची आवड जोपासणेही सुरू होते. तिचे करिअर स्थिर होत असतानाच वडिलांचे निधन झाले. त्यांच्याशी तिची खूप मानसिक जवळीक असल्याने तिला हा मोठा आघात होता, पण त्यातून उभी राहून सुचेताने टेक्निकल लेखनाचे करिअर वाढविले. सुरुवातीला ‘एअरटाईट नेटवर्क्‍स’ व नंतर ‘सिमॅन्टेक’मध्ये तिने विविध पदांवर काम केले. सध्या ती ‘प्रिन्सिपल इन्फर्मेशन डेव्हलपर’ या पदावर तिथे आहे. मधल्या काळात मागे पडलेली साहसी क्रीडाप्रकारची आवड तिने गेल्या काही वर्षांमध्ये वाढविली आणि गोबी मोहिमेची तयारी सुरू केली. त्यासाठी बरेच कष्ट घेतले आणि अखेर एक स्वप्नपूर्ती करून दाखविली. हे सर्व करून दाखविणारी सुचेता अतिशय शांत आहे. तिच्या स्वभावात बडेजाव मिरविणे नाही. त्यामुळे कितीही उंचीवर पोहोचली तरी तिचे पाय जमिनीवरच असतात, मित्र-मैत्रिणींमध्ये ती तितकीच मिळून-मिसळून, खळखळून हसणारी असते. आता आणखीही काही आव्हाने तिच्या मनत घोळत आहेत. ती निश्चितपणे त्यांचा वेध घेईलच.. त्यासाठी सुचेताला भरपूर शुभेच्छा!

      August 5, 2017


  • प्रमोद पारखी

    पारखी, प्रमोद

    जेव्हा औद्योगिकीकरणाचे वारे जोरात वाहत नव्हते, मध्यम आणि लहान आकाराच्या कंपन्यांना कंपनी सेक्रेटरी या नावाची व्यक्ती आवश्यक वाटत नव्हती, तेव्हा प्रमोद पारखी यांनी एक उत्तम कंपनी सेक्रेटरी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. उद्योगांच्या विकासात आवश्यक असणाऱ्या या पदावरील व्यक्तीचे महत्त्व त्यांच्यामुळे लक्षात येऊ लागले.

    पारखी यांनी आपल्या व्यवसायात जी सचोटी आणि कार्यक्षमता दाखवली, त्यामुळेच तर त्यांना द इन्स्टिटय़ूट ऑफ कॉस्ट अ‍ॅण्ड वर्क्‍स अकौंटंट्स ऑफ इंडिया या राष्ट्रीय संस्थेचे अध्यक्षपद १९८८ मध्ये भूषवता आले. कंपनी सेक्रेटरी म्हणून देशातील अनेक नामांकित कंपन्यांचे सल्लागार म्हणून काम करण्यापूर्वी पारखी यांनी भारत फोर्जसारख्या कंपनीत काही काळ याच पदावर नोकरीही केली. त्यांचा मूळचा पिंड अभ्यासकाचा असल्याने पुण्याच्या गोखले अर्थशास्त्र संस्थेत त्यांनी सुरुवातीला काही काळ कामही केले. परंतु त्यानंतरच्या काळात आपली ही भूमिका निभावण्यासाठी त्यांनी अध्यापनाचे क्षेत्र निवडले. व्यवस्थापनशास्त्राच्या अनेक संस्थांमध्ये त्यांनी अनेक वर्षे अध्यापनाचे कार्य केले. विषय समजावून सांगण्याची त्यांची पद्धत आणि तंत्र यामुळे पारखी हे एक लोकप्रिय ‘सर’ झाले. कॉस्ट अ‍ॅण्ड मॅनेजमेंट अकौंन्टसी, फायनान्स मॅनेजमेंट अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी अभ्यासवर्ग घेतले. पुणे विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीही प्रमोद पारखी यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. कॉसमॉस सहकारी बँकेच्या प्रगतीमध्ये पारखी यांचा मोठा वाटा राहिला आहे. राज्यातील एक महत्त्वाची बँक म्हणून तिला नावारूपाला आणण्यासाठी पारखी यांनी खूप कष्ट घेतले. १९७८ पासून शेवटपर्यंत ते या बँकेच्या संचालक मंडळावर होते आणि या काळात आठ वेळा त्यांनी बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली. सामान्यांच्या मनात या बँकेविषयी विश्वास निर्माण होईल, इतकी पारदर्शकता निर्माण करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. देशातील दुसऱ्या क्रमांकाची सहकारी बँक म्हणून या बँकेला आज जे महत्त्व प्राप्त झाले आहे, त्यामागे पारखी यांचे कष्ट कारणीभूत आहेत. या बँकेचे संगणकीकरण आणि विकास यासाठी त्यांनी आपली सारी बौद्धिक क्षमता उपयोगात आणली. बँकिंग क्षेत्रातील एक तज्ज्ञ म्हणून त्यांनी अनेकांना विश्वासाने सल्ला दिला आणि मदतीचा हात पुढे केला. महाराष्ट्रातील सहकारी बँकिंगच्या क्षेत्रातील त्यांचे हे योगदान भरीव स्वरूपाचे आहे, यात शंका नाही. पुणे स्टॉक एक्स्चेंजच्या कार्यकारी समितीचे सदस्य, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या नियामक मंडळाचे सदस्य, पुणे विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य अशा अनेक पदांवर त्यांनी काम केले. जगातील २९ देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या कॉन्फिडरेशन ऑफ पॅसिफिक अ‍ॅण्ड एशियन अकौंटन्टस या संस्थेच्या कार्यकारी समितीचे सदस्य होण्याचा बहुमानही पारखी यांनी मिळवला. त्यामुळे जगातील अनेक देशांत होणाऱ्या विविध परिषदांमध्ये सहभागी होण्याची संधीही त्यांना मिळाली. पारखी यांच्या निधनाने एक अभ्यासू बँकर आणि तज्ज्ञ काळाच्या पडद्याआड गेला आहे.

      August 5, 2017


  • बाबासाहेब घोरपडे

    बाबासाहेब घोरपडे हे मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी झटणारे लेखक होते. मराठी ग्रंथकारांचे उत्तम ग्रंथ प्रकाशित व्हावेत यासाठी त्यांनी “इचलकरंजीकर ग्रंथमाला” नावाचा प्रकाशन-यत्न सुरु केला.

      August 23, 2017


  • मल्हारराव होळकर

    छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य, निष्ठेने वाढविण्याची जबादारी सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. मराठी साम्राज्य वाढविण्याकामी मल्हारबांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि मराठी साम्राज्याच्या सीमा, सिंधू नदी पर्यंत वाढविल्या. आयुष्यामध्ये जी काही प्रगती झाली ती जेजुरीच्या खंडेराया मुळेच अशी त्यांची धारणा असल्याने त्यांनी कधीही या दैवताचा विसर पडू दिला नाही.

      January 22, 2010