(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ज्येष्ठ गायक पं. राजाभाऊ कोगजे

    उल्हास कशाळकर, अजय पोहनकर, आशा खाडिलकर आणि इतर कलाकारांचे ते गुरू होत. नागपूर महानगरपालिकेने नागपूरच्या गोकुळ पेठेमध्ये रहात असलेल्या रस्त्यास त्यांचे नाव दिले आहे.

  • अमेरिकन ग्रॅंडमास्टर रॉबर्ट जेम्स बॉबी फिशर

    फिशरचे खेळणे नेहमी आक्रमक असे. त्याने कधीही प्रतिर्स्पध्याने ऑफर केलेला ‘ड्रॉ’ स्वीकारला नाही. तो शेवटपर्यंत झुंजत राही. त्याने भाग घेतलेल्या सगळ्या टुर्नामेंटस मोठ्या फरकाने जिंकल्या. त्याच्याबद्दल कॅस्पोरोव्हने म्हटलं आहे की, ‘फिशर आणि त्याचे समकालीन यांच्यातील फरक वेगवेगळ्या बुद्धिबळ जगज्जेत्यांमधील फरकांपेक्षा मोठा होता.’

  • प्रसिद्ध लेखक अनिल धारकर

    निल धारकर यांनी देबोनायर, मिड-डे, संडे मिड-डे, द इंडीपेंडेंट व द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया मध्ये काम केले होते. अनिल धारकर हे दरवर्षी नोव्हेंबर मध्ये मुंबईत होणाऱ्या लोकप्रिय मुंबई इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलचे संस्थापक होते. दक्षिण मुंबईत आर्ट मुव्ही थिएटर (आकाशवाणी सभागृहात) सुरू करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.

  • आमदार विनायक मेटे

    पाच वेळा विधान परिषद सदस्यत्व मिळविण्याचे रेकॉर्ड एकमेव विनायक मेटे याच्या नावावर आहे.

  • इतिहास संशोधक आणि चरित्रकार नरहर रघुनाथ फाटक

    इतिहास संशोधक आणि चरित्रकार नरहर रघुनाथ फाटक यांचा जन्म १५ एप्रिल १८९३ रोजी झाला.

    इतिहास संशोधक आणि चरित्रकार हाच नरहर रघुनाथ फाटक यांचा महाराष्ट्राला परिचय. न. र. फाटकांचा कोकणातील कमोद या गावाचे फाटकांचे घराणे. तेथून त्यांचे पूर्वज पुणे जिल्ह्यातील भोर संस्थानातील जांभळी या गावी आले. भोर संस्थानात त्यांचे आजोबा कारभारी होते. तर सरकारी नोकरीमुळे वडिलांचे वास्तव्य उत्तर भारतात होते. त्यामुळे न. र. फाटकांचे शिक्षण उत्तर भारतात वेगवेगळ्या ठिकाणी झाले.

    १९१५ मध्ये ते बी. ए. झाले. त्यावेळेस त्यांनी चित्रकलेच्या परीक्षा दिल्या होत्या आणि पंडित विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले होते. त्यांची वाङ्मयीन कारकीर्द मुंबईच्या ‘इंदूप्रकाश या दैनिकात वृत्तपत्र संपादन करण्यापासून झाली. नंतर नवाकाळ मध्येही त्यांनी काम केले. महिला विद्यापीठात प्राध्यापक म्हणून अध्ययन केले आणि त्यानंतर रुईया महाविद्यालयात ते शिकवू लागले.

    प्रचलित विचार प्रवाहाविरूद्ध मत मांडून वाद निर्माण करणे हे त्यांच्या वृत्तपत्रीय लिखाणाचे वैशिष्ट्य ‘अंतर्भेदी’ या टोपणनावाने त्यांनी व्यक्तिचित्रे लिहिली. फाटकांनी चरित्रपर लेखनाला सुरुवात केली ती ‘न्यायमूर्ती महादेव गोविद रानडे’ या ग्रंथापासून. त्यानंतर ‘अर्वाचीन महाराष्ट्रातील सहा थोर पुरुष’, ‘ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी’, ‘श्री एकनाथ ः वाङ्मय आणि कार्य’ ही संतचरित्रे तर लोकमान्य, आदर्श भारत सेवक, नाट्याचार्य कृ. प्र. खाडिलकर यांची चरित्रे ही फाटकांनी लिहिली. त्यांचा पिड खरा तर इतिहासकाराचा. त्यांच्यासमोर गिबनचा आदर्श होता. त्यामुळे त्या व्यक्तीचे तिच्या काळाशी नाते असते ह्या जाणिवेने फाटकांनी ही चरित्रे लिहिली आहेत. न. र. फाटक हे जसे स्वतंत्र प्रज्ञेचे समीक्षक होते तसेच ते इतिहासाचे दृष्टी ठेवून इतिहासाचा आणि वर्तमानाचा वेध घेण रे विचारवंत, भाष्यकार होते. त्यावरून फाटकांच्या वैचारिक आणि बौद्धिक पातळीची जाणीव होते. न. र. फाटक यांचे २१ डिसेंबर १९७९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • तब्बू

    तब्बूचं पूर्ण नाव तब्बसुम फातिमा हाश्मी आहे, मात्र लोक तिला तब्बू म्हणून ओळखतात.तब्बूच्या आईवडिलांची फारकत झाली तेव्हा तब्बू खूप लहान होती, तब्बूने आपल्या वडिलांना पाहिलं नसल्याचंही सांगण्यात येतं. तब्बूने आपल्या बॉलीवूड करिअरमध्ये आपल्या लूक्स सोबत अनेक प्रयोग केले आहेत. मात्र तब्बूने आपली हेअर स्टाईल कधी बदलली नाही, तब्बू आपले काळेभोर लांब केस आपली संपत्ती मानते. रुक रुक, अरे बाबा रुक’ म्हणत ती या सिनेमासृष्टीत आली. आल्यापासून आपल्या एक एक चित्रपटामधून सुरू झालेली तिची ही यात्रा तिला शब्दश: विजयपथावर घेऊन गेली. एकाहून एक वेगवेगळय़ा प्रकारच्या भूमिका केलेल्या तब्बूने आपले स्वत:चे असे एक स्थान या चित्रपटसृष्टीत निर्माण केले आहे. ‘माचीस, ‘हुतुतू, ‘बॉर्डर, ‘चांदनी बार, ‘अस्तीत्व’ यासारख्या चित्रपटात सुंदर भूमिका केल्या आहेत. तब्बूला माचिस आणि चांदनी बारसाठी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत, तब्बूचं लग्न झालेलं नाही. तब्बू ला फोटोग्राफीची आवड आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • सिंहासनकार अरुण साधू

    एकाच वेळी मराठी आणि इंग्रजी भाषेत दर्जेदार लिखाण करणाऱ्या मोजक्या लोकांमध्ये अरुण साधू यांचे नाव घेतले जाते. त्यांचा जन्म १७ जुन १९४१ रोजी झाला. त्यांच्या ‘सिंहासन’ आणि ‘मुंबई दिनांक’ या दोन कादंबऱ्या मराठी साहित्यविश्वात प्रचंड लोकप्रिय ठरल्या. यावर आधारित ‘सिंहासन’ हा चित्रपटही अजराअमर ठरला. या सिनेमातील ‘दिगू टिपणीस’ हे अभिनेते निळू फुले यांनी साकारलेले पात्र अरूण साधू यांच्यावरच बेतलेले होते, अशीही चर्चा त्यावेळी झाली.

    ‘सिंहासन’ या सिनेमात अरूण सरनाईक, श्रीराम लागू, निळू फुले, मधुकर तोरडमल, मोहन आगाशे, दत्ता भट, सतीष दुभाषी, रिमा लागू, लालन सारंग, जयराम हर्डीकर, नाना पाटेकर या आणि अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या भूमिका होत्या. मराठी सिनेसृष्टीतला ‘मास्टरपीस’ म्हणून या सिनेमाकडे आजही पाहिले जाते. ३० वर्ष त्यांनी पत्रकारिता केली. टाईम्स ऑफ इंडीया, स्टेटसमन, फ्री प्रेस जर्नल,केसरी, माणूस, इंडीयन एक्सप्रेससाठी त्यांनी काम पाहीलं होतं.त्रिशंकू, बहिष्कृत, स्फोट या कादंबऱ्याही प्रचंड गाजल्या.यातील बहिष्कृत ही कादंबरी जवळपास ४ दिवसांत त्यांनी लिहून पूर्ण केली होती.६ वर्ष ते पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहीलं.

    २००० साली आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवरील आधारीत चित्रपटामध्येही साधू यांचे योगदान होते, या चित्रपटासाठी त्यांनी सहलेखक म्हणून भूमिका बजावली होती. काकासाहेब गाडगीळ हे पुस्तक त्यांनी इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये आणलं होतं ‘ मुंबई दिनांक’ ही कादंबरी हिंदीमध्ये ‘ बंबई दिनांक’ नावाने प्रसिद्ध करण्यात आली होती. सगळ्या पिढीचे लेखक म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली.अमेरिकेमध्ये महाराष्ट्र फाऊंडेशनच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ८० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. आणि ड्रॅगन जागा झाला, शापित, शुभमंगल, मुखवटा या कादंबऱ्यांचेही लेखन केले.

    झिपऱ्या, तडजोड, शोधयात्रा या ही कादंबऱ्यांचे लेखन केले आहे. बेचका,एक माणूस उडतो त्याची गोष्टी, बिनपावसाचा दिवस,मुक्ति, ग्लानिर्भवती भारत हे कथा संग्रह प्रसिद्ध झाले. अरुण साधू यांचे २५ सप्टेंबर २०१७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • हस्ताक्षर महर्षी लक्ष्मण नारायण ऊर्फ अप्पासाहेब गोवेकर

    जन्म. ३० मे १९१५ बांदे सावंतवाडी संस्थान येथे.

    अप्पा गोवेकर यांचे शिक्षण बांदा येथेच झाले. १९३० ते मिडल स्कूल, बांदा येथून प्राथमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले.
    १९२८ साली सावंतवाडी संस्थानच्या आंतरशालेय क्रीडास्पर्धेत १५ वर्षाखालील गटात पाच मैल धावस्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक त्यांनी पटकावले. १९३० साली या गटात सर्वोच्च बहुमान प्राप्त केला.

    त्यांचे वडील नारायणराव गोवेकर हे बांदा मिडल स्कूलचे मुख्याध्यापक होते.त्यांचे १नोव्हेबर १९२८ रोजी आकस्मिक निधन झाले आणि गोवेकर कुटुंबावर मोठे संकट कोसळले. पण मोठ्या जिद्दीने हे कुटुंब सावरले.
    १९३० ते १९३३ या काळात ओटवणे, सातोसे, होडावडे या ठिकाणच्या प्राथमिक शाळात रजेवरील शिक्षकांचे जागी अंश- कालिक' शिक्षक म्हणून अप्पा काम करू लागले.

    याच काळात पत्रादेवी येथील दारूदुकानांवरील यशस्वी आंदोलन, त्याचप्रमाणे प्रभातफेऱ्या, हरिजन शिक्षण यामध्ये प्रामुख्याने भाग ते घेऊ लागले. १९३४ मध्ये सावंतवाडी मोती तलावात झालेल्या पहिल्याच पोहोण्याच्या शर्यतीत पहिला नंबर मिळवून त्यांनी विक्रम केला. त्यापूर्वी १९३३ मध्ये शिक्षक म्हणून बांदा येथील मिडल स्कूलमध्ये नेमणूकही झाली होती. त्यानंतर १९३५ ते १९४३ या कालखंडात डेगवे, निगुडे, उगाडे, कोनाळ व आरोस या गांवी खात्यातर्फे बदल्या झाल्या, पण अप्पानी शिक्षक म्हणून आपली भूमिका उत्तम प्रकारे निभावली.

    १९४० साली एक पोस्टकार्डवर एका बाजूने ६००० शब्द लिहून केलेला सूक्ष्म हस्ताक्षराचा जागतिक विक्रम त्यांनी केला होता.' सुंदर हस्ताक्षर कसे बनवाल ?'

    यावर ते अधिक विचार करू लागले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करु लागले. एक माहिती पत्रक त्यांनी तयार केले होते आपले व्याख्यान संपले की ते विद्यार्थ्यांना वाटत असत.

    हस्ताक्षरमहर्षी अप्पानी पाठवलेली सुंदर सूक्ष्म हस्ताक्षरांतील सुमारे २० पोस्टकार्डे लळीत यांच्या कडे आहेत. विशेष म्हणजे त्यातील एक पोस्ट खात्याला 'चकवा' देऊन छापील समजून 'नाॕटपेड 'झाले. तेव्हा अप्पानी त्यांना सांगितले होते. 'अरे पत्र आले तर दंड भरून लगेचच घे.'

    १९४३ साली उजळ माथ्याने सामाजिक व राजकीय आंदोलनांत भाग घेता यावा हेतूने शिक्षण खात्यातील नोकरीचा राजीनामा देऊन सावंतवाडीला आले. काळात उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पोकळे-विडी कारखान्यात मुनीम म्हणून नोकरी ते करु लागले.१९४५ मध्ये सावंतवाडी शहरातील मलेरियाच्या उपसर्गाने सेवानिवृत्ती स्वीकारून स्वग्रामी बांदे येथे पुन्हा गेले. बांदा येथे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून १९४७ पर्यंत स्वार यांचेकडे मुनीम म्हणून नोकरी सुरू केली.

    १९४७ च्या ऑक्टोबरच्या सुमारास आबासाहेब वालावलकर यांच्या निमंत्रणावरून पुन्हा सावंतवाडी येथे ते आले व सावंतवाडी 'प्रजा परिषदे'चे चिटणीस म्हणून सुमारे ६ महिने सवेतन सेवा केली. फेब्रुवारी १९४८ सावंतवाडी संस्थान-विलीनीकरण आंदोलनात सहभागी झाले.

    अप्पानी एक निवडणूकही लढवली कारण ती बिनविरोध होणार होती. अर्थात ते निवडणूक हरले, पण त्यांनी सायकलवर फिरून प्रचार केला..'लोकशाही जीवंत ठेवली' म्हणून बॕ. नाथ पै म्हणाले,'पराभवाला प्रतिष्ठा मिळवून दिलीत अप्पा .!
    अप्पानी १९४८ ते १९५३ या काळात सुमारे सहा वर्षे साप्ताहिक वैनतेय' कचेरीत व्यवस्थापक म्हणून नोकरी स्वीकारली. या काळातच व पुढे १९७८ पर्यंत दै.लोकसत्ता, लोकमान्य, सकाळ अशा दैनिक वृत्तपत्रांसाठी वार्ताहर म्हणून काम करू लागले. मध्यंतरी सुमारे २॥ वर्षे सावंतवाडी येथील खादी भांडाराचे कार्यवाह म्हणून विनावेतन सेवा त्यांनी केली.
    सा. 'वैनतेय कचेरीतून सेवानिवृत्तीनंतर कुटुंब निर्वाहाचे दृष्टीने वार्ताहर, विविध प्रकारचे लिहिण्याचे काम, रबरीशिक्के, छपाईकामे यांची ते करु लागले.

    १९३५ ते १९५१ या काळातच दोन नाटके, १५-२० कथा. ५०-६० शिशुगीते यांची निर्मिती. हौशी कलावंतांच्या सहाय्याने बांदा व सावंतवाडी येथे नाट्यप्रयोगात २५-३० भूमिका व काही प्रयोगांचे दिग्दर्शन, 'मदिरा' या विमल घैसास लिखित नाटकाचे प्रयोग केले.'दारूबंदी प्रचारकार्य 'म्हणून दोडामार्ग ते कणकवलीपर्यंत अनेक प्रयोग त्यांनी सादर केले.
    १९७५ मध्ये दापोली कॉलेजचे प्राचार्य माननीय चिंतामणी सहस्त्रबुद्धे यांच्याकडून' हस्ताक्षर महर्षी' हा बहुमान त्यांना देण्यात आला. १९७२ मध्ये मुंबई येथे हस्ताक्षर सुधार मोहिमेचा शुभारंभ त्यांनी केला. जी आजही चालू आहे.
    १९९०-९१ पर्यत मुंबई, पुणे,कोल्हापूर, सांगली, बेळगांव या शहरांतून, त्याच प्रमाणे गोमंतक ते रत्नागिरीपर्यंत अनेक माध्यमिक विद्यालये व अध्यापक महाविद्यालये यामधून ७००च्या वर हस्ताक्षर सुधार मोहिमेची व्याख्याने त्यांनी दिली.
    १९७८ मध्ये सावंतवाडी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा सत्कार काही तात्त्विक कारणांमुळे स्वीकारला नाही.

    अप्पासाहेब गोवेकर यांनी लिहिलेल्या कथा.. कविता व अन्य लेखन यावर डाॕ. जी. ए. बुबा यांनी एक माहितीपूर्ण लेख लिहिला आहे. चिऊमाऊ, जादुची पेटी-रेडियो अशी गीते त्यांनी लिहिली. त्यांच्या अनेक गीतांचे संकलन झालेले नाही. बालसन्मित्र,आदर्श ,वैनतेय,किरात अशा अनेक साप्ताहिकांतून त्यांच्या पंधराच्या वर कथा प्रकाशित झाल्या आहेत. म्हटले तर सहज उपलब्ध होतील. त्यांचा कथासंग्रह प्रकाशित व्हायला हवा. 'बंड्याचे लग्न 'ही त्यांची कथा वाचली की आजही ताजेतवाने वाटते. 'आसुरी आकांक्षा ' या त्यांच्या नाटकाची संहिता प्रकाशित केली तर कोकणातील हौशी नाट्य मंडळे त्याचे आजही प्रयोग करतील. त्यांचे साहित्य संकलन होऊन प्रसिद्ध व्हायला हवे अशी इच्छा जी.ए. बुवा सरांसारखे साक्षेपी समीक्षक व्यक्त करतात; त्या अर्थी ते लेखन नक्कीच लक्षवेधी असणार यात मला तरी शंका वाटत नाही.
    ' मनस्वी' व अक्षरप्रपंच' ही पुस्तके विकास गोवेकर यांनी प्रकाशित केली.

    अप्पासाहेब गोवेकर यांचे २३ जानेवारी १९९२ रोजी निधन झाले. अप्पांनी सुरू केलेली 'हस्ताक्षर सुधार मोहिम' आजही सुरु आहे. त्यांचे चिरंजीव विकास गोवेकर ती चालवतात व दरवर्षी अप्पांच्या स्मृतीप्रित्यर्थ हस्ताक्षर स्पर्धा व अन्य उपक्रम करतात त्यात प्रकाश,उल्हास व अन्य नातेवाईक (बिले, भिसे ,टोपले,पावसकर इ.) सहभागी होतात.

    -- डॉ.बाळकृष्ण लळीत.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • डॉ.माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन

    डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन यांचा जन्म २१ जानेवारी १८९४ रोजी झाला. माधव जूलियन मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक सदस्य होते. मा.माधव जूलियन हे फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. इंग्लिश कवी शेले याने रचलेल्या ज्यूलियन आणि मडालो या कवितेवरून यांनी "जूलियन" असे टोपणनाव धारण केले. (माधव त्र्यंबक पटवर्धनांचे जूलियन नावाच्या मुलीवर प्रेम होते. तिच्याशी प्रेमभंग झाल्यानंतर तिची आठवण म्हणून त्यांनी माधव जूलियन हे टोपण नाव घेतले हीच माहिती लोकप्रसिद्ध आहे). याशिवाय ’गॉड्ज गुड मेन’ या कादंबरीतील नायिका ’ज्युलियन’ या व्यक्तिरेखेवरून माधवरावांनी ज्युलियन हे वाव उचलले असेही सांगितले जाते.

    गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधवराव पटवर्धनांना देण्यात येते. माधव ज्युलियनांनी दित्जू, मा.जू. आणि एम्‌. जूलियन या नावांनीही लिखाण केले आहे. त्यांनी कविवर्य भा.रा. तांबे यांच्या कवितांचे संकलन आणि संपादन केले आहे. पटवर्धनांनी कवितांशिवाय भाषाशास्त्रीय लेखनही केले.

    सोप्या व शुद्ध मराठी लेखनाचे पुरस्कारणाऱ्या पटवर्धनांनी भाषाशुद्धि-विवेक हा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथात कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची समाविष्ट आहे. माधव त्र्यंबक पटवर्धनांना त्यांच्या ’छंदोरचना’ या ग्रंथासाठी मुंबई विद्यापीठाने १ डिसेंबर १९३८ रोजी डी.लिट्. ही सन्माननीय पदवी दिली. मुंबई विद्यापीठाने मराठी साहित्यासाठी दिलेली ही पहिली डी.लिट. होती. २९ नोव्हेंबर १९३९ रोजी माधव ज्युलियन यांचे निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ विकिपीडीया

  • गायिका माणिक वर्मा

    माणिक वर्मा यांनी वयाच्या अकराव्या वर्षी म्हणजे १९३९ साली दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेली चार भावगीते गायली आणि दोन ध्वनिमुद्रिकामध्ये गाऊन ह्या क्षेत्रात त्या आल्या. अर्थात चित्रपटगीतांच्या बाबतीतही त्यांचे महत्वाचे स्थान आहे. प्रभात कंपनीच्या हिंदी ‘ गोकुल ‘ या चित्रपटात सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेले गीत त्यांनी प्रथम गायले. परंतु त्यांनी जास्त गाणी हिंदीपेक्षा मराठी चित्रपटांसाठी गायली. माणिक वर्मा यांनी असंख्य भावगीते , भक्तिगीते , चित्रगीते गायली आणि ती सर्व गाणी आजही आपल्या संस्कृतिक जीवनाचा भाग बनून राहिली आहेत.