गोविंद वासुदेव कानिटकर हे कवी आणि भाषांतरकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना चित्रकला आणि संगीतातही गती होती.
त्यांनी काही दीर्घकाव्यं लिहिली होती. त्यांचा जन्म ९ जानेवारी १८५४ पुणे रोजी झाला. कानिटकरांचे सुरुवातीचे शिक्षण पुण्यात आणि उच्च शिक्षण मुंबईच्या विल्सन कॉलेजात झाले. १८७६ मध्ये ते बी.ए. झाले.
एल्एल.बी झाल्यावर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात तीन वर्षे वकिली केली. नंतर ते सरकारी न्यायालयात मुन्सफ झाले. त्यांच्या पत्नीचे नाव काशीताई कानिटकर. या लेखिका होत्या. प्रसिद्ध नाटकककार नारायण बापूजी कानिटकर हेही त्यांच्या कुटुंबीयांपैकी एक होते. इचलकरंजीचे संस्थानिक बाबासाहेब घोरपडे ह्यांच्या स्नुषा अनुताई घोरपडे ह्या कानिटकरांच्या कन्या होत्या. स्वतः गोविंद वासुदेव कानिटकर हे चित्रकला आणि संगीत या कलांचे ज्ञाते होते. त्यांचा व हरी नारायण आपटे यांचा स्नेह होता.
अकबर बादशाह, श्रीमंत नारायणराव पेशवे यांचा वध, संमोहलहरी अशी दीर्घकाव्यं आणि कविकूजन हा त्यांच्या कवितांचा संग्रह, तसंच ‘भट्ट मोक्षमुल्लर कृत धर्मविषयक व्याख्याने’ हे व्याख्यानांचं भाषांतर प्रसिद्ध आहे. मॅक्समुल्लरच्या व्याख्यानांचं भाषांतर करताना त्याच्या नावाचे ‘मोक्षमुल्लर’ असं मराठीकरण त्यांनी केले होते.
शेक्सपियरच्या ‘हॅम्लेट’, ‘कोरिओलेनस’ आणि ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’ या नाटकांचे, तसंच जॉन स्ट्युअर्ट मिलच्या ‘सब्जेक्शन ऑफ वूमन’चे त्यांनी केलेले अनुवाद गाजले होते. १९०६ साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. गोविंद वासुदेव कानिटकर यांचे ४ जून १९१८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मुकेश अंबानी हे गेल्या नऊ वर्षांपासून भारतातील नंबर वनचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये दिवसेंदिवस वाढच होत असून सध्या त्यांची एकूण संपत्ती २२.७ अब्ज डॉलर इतकी झालेली आहे. मुकेश अंबानींचे वडील धीरूभाई अंबानी यांनी भुलेश्वर चाळमधील छोट्याशा खोलीत आपला बिझनेस सुरु केला होता. मुकेश व अनिल यांचे बालपण देखील याच खोलीत गेले. आज मुकेश अंबानी ‘एंटीलिया’मध्ये राहात असले तरी त्यांना भुलेश्वर चाळीतील घराचा विसर पडलेला नाही. एका इंटरव्ह्यूमध्ये मुकेश अंबानी यांनी भुलेश्वर चाळ व कुलाब्यातील फ्लॅटचा खास उल्लेखही केला होता.मुकेश अंबानींकडे तीन खासगी विमाने आहेत. त्यात ३३० कोटींचे एअरबस ३१९ कॉपरेरेट जेट, ४०१ कोटी रुपयांचे बोइंग बिजनेस जेट-२ आणि ९९ कोटी रुपयांचे मिनी जेट फॉल्कन ९०० ईएक्सचा समावेश आहे.
चित्रगुप्त यांनी एकूण ८२८ गाणी केली. चित्रगुप्त यांनी प्रेमधवन, मजरुह सुलतानपुरी, साहिर, राजेंद्र कृष्ण व आनंद बक्षी इ. गीतकारांकडून गाणी लिहून घेतली. महमंद रफी व लता मंगेशकर यांच्या आवाजाचा टोन चित्रगुप्तांनी बरोबर वापरला व या कलाकारांची गाणी त्यामुळे अतिशय सुरेल वाटली.
उदय टिकेकर यांनी ‘शमिताभ’, ‘बर्फी’, ‘रईस’, ‘लाल सलाम’ या हिंदी चित्रपटांमधूनही त्यांनी काम केलं आहे. ‘तुझा माझा ब्रेक अप’, ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘कोई अपना सा’, ‘कसौटी जिंदगी की’ या मराठी-हिंदी मालिकेत उदय टिकेकर यांनी काम केले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे संपूर्ण कुटुंब स्वातंत्र्याच्या होमकुंडात होरपळून निघाले होते. नातेवाईक, सगेसोयरे, अगदी जवळच्या लोकांनी सुद्धा त्यांना दूर लोटले होते. सरकारी ससेमिरा मागे लागल्यावर तर लोकांनी त्याच्याकडे जाणेयेणे, बोलणे टाळले होते. क्रांतीवीर गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर हे स्वा. विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू.
गेल्या अनेक वर्षांपासून ईबोला आफ्रिकन देशांना त्रास देतोय. कोरोनाप्रमाणेच ताप, सर्दी, खोकला, फुफ्फुसांना सूज अशी लक्षणं या ईबोलामधे दिसतात. मात्र, कोरोनापेक्षा हा विषाणू कित्तीतरी घातक असल्याचं तज्ञांचं मत आहे. ईबोलाच्या पहिल्या पेशंटला हॉस्पिटलमधे रोखून हा भयानक साथरोग नायजेरिया देशात पसरण्यापासून वाचवणाऱ्या नायजेरियन डॉक्टर अमेयो स्टेला अडाडेवोह यांचा जन्म २७ ऑक्टोबर १९५६ रोजी झाला.
सिंहासन या चित्रपटामध्ये अनेक दर्जेदार अभिनेत्यांच्या मांदियाळीत आपल्या कुटुंबावर प्रेम असलेला, त्यांच्या सुखासाठी धोक्याची नोकरी पत्करणारा आणि शेवटी राजकारणाच्या पटावर बळी जाणारा त्यांचा ‘पानिटकर’ लक्षात राहतो.
स्वामी विवेकानंद आणि संत परंपरेतून पुढे आलेले विचार विद्यार्थ्यांमध्ये पोहोचविण्यासाठी त्यांनी एमआयटी ही संस्था सुरू केली. ही त्यांची संस्था पुण्यात खासगी शिक्षण उपलब्ध करुन देत असून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे काम त्यांनी केले आहे.
उज्वल निकम यांच्या कडे भारतातील हाय प्रोफाईल केसेस असतात. त्यामुळे त्यांना झेड सुरक्षा देण्यात आली आहे. झेड सुरक्षा असलेले उज्वल निकम हे भारतातील एकमेव वकील आहेत. उज्वल निकम यांच्या सभोवताल ४७ शस्त्रधारी कमांडो नेहमी असतात.
डॉ.काशीनाथ घाणेकर व्यवसायाने दंत शल्यचिकित्सक होते. पण त्यांनी मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीला डॉ.काशिनाथ घाणेकर यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. संभाजीराजांचा विषय निघाला किवा भालजींचे जुने चित्रपट कुठे सुरु असले कि “डॉ.काशिनाथ घाणेकर”…यांचा विषय निघणार नाही असे होणार नाही…
Copyright © 2025 | Marathisrushti