मुख्यमंत्री झाल्यानंतर अंतुले यांची कारकीर्द अवघ्या १८ महिन्यांची असली तरी, त्यांनी दूरदृष्टीचे अनेक निर्णय घेतले आणि ते घेतानासुद्धा गरीब माणसाला समोर ठेवले.
सागर सादर करत असलेले ‘चला हवा येऊ द्या’ मधील पोस्टमन काका हे प्रेक्षकांच्या मनातील हळवा कोपरा आहेत. हे पोस्टमन काका प्रेक्षकांच्या अश्रूंना वाट मोकळी करून देतात. हीच खऱ्या अर्थानं सागरमधील अभिनेत्याला मिळालेली दाद आहे…
निखिल बॅनर्जी यांचे वडील जितेंद्र नाथ बॅनर्जी हे सुद्धा सतारवादक होते. मैहर घराण्याचे सतारवादक निखिल बॅनर्जी जन्म १४ ऑक्टोबर १९३४ रोजी झाला. वडिलांकडून प्रेरणा घेउन निखील बॅनर्जी यांनी लहानपणीच आपला संगीत प्रवास सुरु केलं. वयाच्या ९ व्या वर्षीच त्यांनी आकाशवाणीवरील अखिल भारतीय सतारवादन स्पर्धा जिंकली. अशा प्रकारे ते आकाशवाणीवर नेमणूक होणारे सर्वात लहान वयाचे संगीत कलाकार ठरले. त्यांची आवड पाहून वडिलांनी त्यांना मुश्ताक अली खान ह्यांच्याकडे पाठवले. परंतु त्यांच्याकडे निखिलजी काही आठवडेच शिकले. त्यांचे प्रमुख गुरु म्हणजे मैहर चे अलाउद्दीन खान.
अल्ला उद्दीन खान साहेबांनी निखील बॅनर्जी यांची गुणवत्ता पाहून अतिशय कठीण अशा प्रकारे त्यांच्याकडून रियाज करून घेतला. फक्त हाताची तयारी व तांत्रिक क्षमताच नव्हे तर त्याहून पलीकडील सांगीतिक ज्ञान निखील बॅनर्जी यांना त्यांच्याकडून मिळाले. यामुळे निखीलजींनी आपली वैशिष्ट्यपूर्ण अशी स्वतंत्र वादनशैली निर्माण केली. अल्लौद्दिन खान यांच्यानंतर निखील बॅनर्जी यांनी व सरोदवादक उस्ताद अली अकबर खान तसेच त्यांच्या कन्या अन्नपूर्णा देवी यांच्याकडूनही संगीताचे धडे घेतले.
मैहर घराण्यातून शिक्षण घेतल्यानंतर निखिलजींनी उस्ताद अली अकबर खान ह्यांच्याबरोबर जुगलबंदी चे कार्यक्रम केले. तसेच आकाशवाणी वर सुध्धा ते नियमित वादन करत असत. त्यांचे भारतभर कार्यक्रम होऊ लागले. त्यांनी अनेक पहिला परदेश दौरे केले. ध्वनिमुद्रनापेक्षा प्रत्यक्ष कार्यक्रमांवर त्यांचा भर असायचा. निखिलजींनी आपली स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण अशी वादन शैली निर्माण केली. त्यांच्या शैलीत गाण्यातील गेयता आणि सतार वादनातील तंतकारी अंग ह्याचा मिलाफ दिसतो. स्वर आणि ताल ह्या दोन्ही अंगांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांची तयारी जबरदस्त होती. परंतु त्यांनी त्यांच्या वादनात नेहमीच सौंदर्य आणि भावपूर्णतेला महत्त्व दिलेले आढळते.
सुरेख संयमी आलाप, भावपूर्ण राग विस्तार, सुरेख तिहाया, स्पष्ट-वेगवान ताना, छूट तानांवरील प्रभुत्व, लयकारी ह्यामुळे त्यांच्या शैलीत संपूर्णत्व होते. त्यांचा भर पारंपारिक राग व मैहर घराण्याचे खास राग इत्यादींवर असायचा. तसेच ते अहिरी, कौशिकी, श्याम केदार इ. अनेक अपारंपरिक रागही वाजवत असत. मनोमंजरी, हेम-ललत इ. राग त्यांनी तयार केल्याचे मानले जाते. भारत सरकाने निखिल बॅनर्जी यांना १९६८ साली पद्मश्री पुरस्कार व १९८६ साली पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले होते. १९७४ साली निखिल बॅनर्जी यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला होता. निखिल बॅनर्जी हे सर्वकालीन सर्वोत्तम सतार वादकांमधील एक म्हणून गणले जातात. मा.निखिल बॅनर्जी यांचे २७ जानेवारी १९८६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. मराठी विकिपीडिया
”भारतीय सिनेमांमध्ये सामाजिक, स्त्रीप्रधान असे चित्रपट जेव्हा बनू लागले त्यावेळी अनेक गुणी कलाकार या इंडस्ट्रीला लाभले. त्या काळच्या कलाकारांमध्ये असलेल्या असाधारण प्रतिभेमुळे यशाचं शिखर अगदी सहज सर करता आलं आणि त्यांचं नाव चित्रपटाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले; त्यापैकीच एक नाव होते शांता आपटे. त्यांचा जन्म १९ मार्च १९२३ रोजी झाला. शांता आपटे यांचे वडिल रामचंद्र आपटे रेल्वेत नोकरीला होते; शांता आपटें यांचे शालेय शिक्षण ४ थी पर्यंतचं, त्यानंतर घरीच शिकवण्यासाठी शिक्षक येत, अभ्यासाव्यतिरिक्त वयाच्या ५ व्या वर्षापासून गायनाचे धडे सुध्दा शांता आपटेंना दिले गेले; पुण्यात असताना बापूराव केतकर यांच्याकडे संगीताचं पहिलं प्रशिक्षण घेतलं; कालांतर त्यांच्या वडिलांची बदली पंढरपूरला झाली त्यामुळे तिथे गायन आणि संगीताचं प्रशिक्षण नारायण बिवा थिटे व मास्टर कृष्णाराव यांच्याकडून घेतले. लहान वयातच शांता आपटेंनी गायनाचे छोटे-मोठे जलसेही करु लागल्या; अश्या या गोड गळ्याच्या गायिकेला रुपेरी पडद्यावर अभिनय करण्याची संधी मिळाली. कला तसंच अभिनय क्षेत्रात कारकीर्द घडवायची असेल तर सर्वच गोष्टी अवगत असणं गरजेच्या आहेत; हे माहित असल्यामुळे शांता आपटेंनी ड्रायव्हींग, स्वीमिंग यासारखे प्रकार शिकून घेतले. नृत्यात तर त्या निपुणच होत्या! भालजी पेंढारकरांच्या ‘श्यामसुंदर’ या चित्रपटातून या सिनेमात शांता आपटेंनी ‘राधा’ ची भूमिका साकारली; त्यानंतरच्या २-३ वर्षात शांताजींनी शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण घेतलं व कालांतराने ‘प्रभात’च्या ‘अमृत-मंथन’ , ‘वहॉं’ , ‘राजपुतरमणी’ सारख्या हिंदी चित्रपटातून भूमिका करुन आपल्यातील वैविध्यपूर्ण कलेची चुणूक दाखवून दिली; तसंच ”गोपालाकृष्ण” , ”अमरज्योती” या चित्रपटातील भूमिका सुध्दा प्रचंड गाजल्या; ”कुंकू” चित्रपटानी त्यांच्या अभिनयावर आंतरराष्ट्रीय मोहोर उमटवली. कारण त्याकाळात बर्लिन फेस्टीव्हल मध्ये शांता आपटेंच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं होतं, आणि कुंकू त्यांच्या कारकीर्दीचा ”माइलस्टोन” ठरला. शांता आपटेंची ओळख बनला; कारण त्यांची कुंकूतील भूमिका त्या काळातल्या एका अतृप्त मनाचा ठाव घेणारी होती जी शांता आपटेंनी हिबेहूब रंगवली. ”कुंकू” आणि ”स्वयंसिध्दा” या चित्रपटात अन्यायाविरोधात पेटून उठनाऱ्याच स्त्रीचं दर्शन शांता आपटेंनी घडवून दिलं. शांता आपटेंचा खाजगी जीवनात वावरसुध्दा अन्याय सहन करायचा नाही आणि वेळ प्रसंगी त्यांनी ते दाखवून देखील दिले. एकदा एका पत्रकाराने शांता आपटें यांच्या विषयी काहीतरी खोटी खरपूस बातमी बनवली, ती बातमी वाचल्यावर त्या खूपच हैराण झाल्या ! आपण ही गोष्ट बोललोच नव्हतो तर त्या पत्रकाराने छापलीच कोणत्या आधारावर? त्याक्षणी अगदी बेधडकपणे शांता आपटे त्या वृत्तपत्राच्या कार्यालयात गेल्या व ही बातमी छापणाऱ्या व पत्रकाराला आपल्या फटक्यांचा प्रसाद द्यायला देखील मागे-पुढे पाहिले नाही. हा प्रसंग म्हणजे एक अपवाद असला तरी खोटेपणाच्या विरोधात केलेला हा मुकाबलाच होता; मिलेट्री माईंडेड असल्याने वेळेचे भान, हजरजबाबीपणा, शिस्तबध्दता, आणि हाती घेतलेलं कार्य वेळच्यावेळी पूर्ण करणे हे गुण अगदी नमुद करण्यासारखेच होते. तसंच एक आई म्हणून शांता आपटे स्वत: आपल्या मुलीवर बारीक लक्ष ठेवून होत्या. नाटक आणि शुटिंग्समधून वेळ मिळेल तेव्हा जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबियासोबत व्यतीत करण्याचा प्रयत्न करत; इंग्रजी भाषेचं वाढतं महत्व ओळखून शांता आपटेंनी आपल्या दोन्ही मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल केले, पण घरात असताना अगदी सक्तीने मराठीतच बोलायचे यावर त्या ठाम असायच्या. शांता आपटेंना हिंदी, मराठी, इंग्रजी सोबतच अनेक भाषा अवगत होत्या; त्यामुळे अनेक प्रादेशिक चित्रपटामध्ये त्यांना भूमिका करता आल्या ज्यामध्ये गुजराती, बंगाली, तमिळ, तेलुगू या भाषांचा समावेश आहे. त्याकाळी महिलांचा रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावरील वावर कमी होता,पण या क्षेत्रात महिलांनी दैदिप्यमान कामगिरी करावी असं त्यांना मनोमन वाटे, आणि म्हणून ऑफस्क्रीन आणि बॅकस्टेज आर्टिस्ट ना शांता आपटेंकडून सतत प्रोत्साहून मिळत असे.
”शांता आपटे” यांचे, ”कुंकू” मधील निरा या त्यांच्या भूमिकेमुळे जाचक परंपरेला विरोध करणारी स्त्री आणि अन्यायाविरुध्द बंड पुकारुन समाजाला सत्मार्गाकडे नेणार्याल स्त्रीची प्रतिमा निर्माण झाली; त्याकाळी अश्या भूमिका साकारुन अजरामर करणं हे मोठं धारिष्ठ्यच होतं आणि मा.शांता आपटेंनी हे लिलया पेललं; १९३१ ते १९५३ या काळात मा.शांता आपटे यांनी रुपेरी पडद्यावर आणि मराठी संगीतरंगभूमीवर साकारलेल्या भूमिका कायम स्मरणात राहिल्या. भारतीय चित्रपटामधील झंझावती अभिनेत्री म्हणून ज्यांचं नाव अग्रक्रमाने घेतले जाते अश्या काही मोजक्या स्त्रीकलाकारांमधील ‘शांता आपटे’ हे नाव वर्तमानकाळातील कलाकारांना प्रेरणा देत राहिले आहेत. त्याकाळात पार्श्वगायनाची संकल्पना रुजली नसल्याने बहुदा गायक-गायिका या रुपेरी पडद्यावर भूमिका करत; पण मा.शांता आपटे म्हणजे गायन आणि चतुस्थ अभिनयाचा आविष्कार होता. १९५३ नंतर मा.शांता आपटें यांनी मराठी संगीत रंगभूमीवर ”सौभद्र” , ”मानापमान” , ”लग्नाची बेडी” , ”एकच प्याला” सारख्या नाटकांमधून दर्जेदार भूमिका केल्या, अनेकअंकी असलेल्या या नाटकांसमोर प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे मोठे आवाहन असे; म्हणून प्रयोगात सतत नाविन्यपूर्ण भूमिका सादर करण्याची जबाबदारी कलाकारांवर असायची, याच भान शांता आपटेंना असल्याने नेहमीच आपल्या अभिनयाचे वैविध्यमय आविष्कार सादर केले तसंच अनेक जुन्या ‘संगीत’ नाटकांना, पुनर्जीवीत केले, ते म्हणजे त्याकाळातील नामवंत कलाकारांना सोबत घेऊन अर्थात या नाटकांचा पारंपारिक बाज आणि मुळ गाभा मात्र तसाच ठेवला गेला.
एका प्रसंगाचा किस्सा नयना आपटे सांगतात की मुंबईतल्या गोरेगाव परिसरात मोतीलाल नगर या रस्त्याचे उद्घाटन पंडित नेहरुंच्या हस्ते करायचे होते. अभिनेत्री शांता आपटेसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यावेळी पंडित नेहरूंनी शांता आपटेंना वंदेमातरम गाण्याची विनंती केली. आणि त्यांच्या सुरमधूर स्वरांनी कार्यक्रमाला चार चांद लागले. मा.शांता आपटे यांचे २४ फेब्रुवारी १९६४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
कोलकात्यामध्ये जन्मलेल्या अलका याज्ञिक यांनी वयाच्या ६व्या वर्षापासून शास्त्रीय गायनाचे धडे घ्यायला सुरूवात केली. १९७२ पासून अलका याज्ञिक आकाशवाणीच्या कोलकाता केंद्रासाठी भजने म्हणत असत. त्यांचा जन्म २० मार्च १९६६ रोजी झाला. वयाच्या दहाव्या वर्षी अलका याज्ञिक यांनी १९८० साली आलेल्या लावारिस ह्या हिंदी चित्रपटामधील तिने म्हटलेले गाणे गाजले होते. परंतु तिला १९८८ सालच्या तेजाब चित्रपटामधील माधुरी दीक्षितवर चित्रित झालेल्या एक दो तीन ह्या गाण्यामुळे खरी प्रसिद्धी मिळाली. ह्या गाण्यासाठी तिला पहिला फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला. त्यानंतर तिने १९९० व २००० च्या दशकांमध्ये अनेक गाणी गायली जी लोकप्रिय झाली. अलका यज्ञिकने एकूण १,११४ हिंदी चित्रपटांमध्ये २,४८२ गाणी गायली आहेत. सर्वाधिक गाणी म्हटणाऱ्या बॉलिवूड गायकांमध्ये आशा भोसले, लता मंगेशकर, महम्मद रफी व किशोर कुमार खालोखाल तिचा त्यांचा पाचवा क्रमांक लागतो. अलका याज्ञिक यांनी हिंदी व्यतिरिक्त गुजराती, अवधी, उडिया, आसामी, मणिपुरी, नेपाळी, राजस्थानी, बंगाली, भोजपुरी, पंजाबी, मराठी, तेलुगू, तमिळ, मल्याळी व इंग्लिश ह्या भाषांमध्ये गाणी गायली आहेत. अलका याज्ञिक यांनी कल्याणजी-आनंदजी, आर.डी. बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, राजेश रोशन, नदीम-श्रवण, जतिन-ललित, अनू मलिक, ए.आर. रहमान, आनंद-मिलिंद, हिमेश रेशमिया, शंकर-एहसान-लॉय, इस्माईल दरबार इत्यादी सर्व आघाडीच्या संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. तिची बव्हंशी युगुलगीते कुमार सानू, उदित नारायण व सोनू निगम ह्य सहपार्श्वगायकांसोबत आहे. सुमारे ३ दशके हिंदी सिनेमामध्ये कार्यरत राहिलेली अलका याज्ञिक या भारतामधील सर्वात यशस्वी पार्श्वगायिकांपैकी एक आहे. त्यांना आजवर फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कारासाठी विक्रमी ३५ नामांकने व एकूण ७ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. तसेच दोनवेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार बहाल करण्यात आले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
अलका याज्ञिक यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=hzTz7wUzm8E
https://www.youtube.com/watch?v=f1FqIdVRtWU
ज्येष्ठ समाजसेवक किसन बाबूराव हजारे उर्फ अण्णा हजारे यांचा जन्म १५ जून १९३७ भिंगार, अहमदनगर जिल्हा येथे झाला. अण्णा हजारे यांचे वडील बाबूराव हजारे तेथील आयुर्वेद आश्रम औषधशाळेत मजूर होते. बाबूरावांचे वडील ब्रिटिश फौजेत सैनिक होते. किसन यांना सहा लहान भावंडे होती व कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होती. त्याच्या आत्याने किसनची देखभाल करण्याचे ठरवले व शिक्षणासाठी त्या त्याला मुंबईला घेऊन गेल्या. सातवीपर्यंत शिकल्यावर घरात मदत व्हावी म्हणून किसनने शिक्षण सोडून नोकरी शोधण्यास सुरुवात केली.
२००५ मध्ये १० बुद्धिमान महिला खेळाडूंविरुद्धच्या नॉर्थ उरलस कप स्पर्धेतही तिने बाजी मारली. २००६ मध्ये दोहा येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने सुवर्णपदक तर जिंकलेच, शिवाय आणखी एक सुवर्णपदक तिने मिश्र सांघिक गटातही जिंकले. त्यानंतर २०१५ ला चीनमधली चेंगडू इथे भरलेल्या महिला सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत तिने कांस्य पदक मिळवले. २०१९ मध्ये ती जागतिक रॅपिड चॅम्पियन ठरली.
कवी मायदेव म्हटले की, कवितांची आवड असणाऱ्या जु्न्या पिढीतील वाचकांना हटकून आठवणार ती त्यांची 'गाइ घरा आल्या' ही सुंदर कविता. त्यांचा जन्म २६ जुलै १८९४ रोजी झाला. सकाळी चरायला गेलेल्या गाई संध्याकाळी घरी आल्या तरी गाई राखायला गेलेला 'वनमाळी' मात्र काही घरी आलेला नसतो.
कातरवेळ उलटते, रात्रही होते, तरी वनमाळी न आल्यामुळे आईच्या जिवाची जी उलघाल होते, तिचे वर्णन मायदेव यांनी या कवितेत अतिशय साध्या-सोप्या शब्दांत केले आहे. ही कविता हीच मायदेव यांची ओळख होती. १९२९ साली त्यांनी ती लिहिली.
१९१५ ते १९२९ या कालखंडात त्यांच्या हातून ज्या कविता लिहून झाल्या, त्या सर्व कविता 'भावतरंग' या संग्रहात वाचायला मिळतात. 'गाइ घरा आल्या' ही कविता याच संग्रहात आहे.
कवी मायदेव रविकिरण मंडळातील कवींचे म्हणजे, माधवराव पटवर्धन ऊर्फ माधव ज्यूलियन, यशवंत, गिरीश, श्री. बा. रानडे आदींचे समकालीन कवी. गंभीर विचारवृत्तीच्या; तसेच बालांसाठीच्या विपुल कविता मायदेव यांनी लिहिल्या. त्या काळी लहान मुलांमध्ये मायदेव यांच्या बालकविता विशेष आवडीच्या असत. कवी वनमाळी या टोपणनावानेही ते साहित्यक्षेत्रात परिचित होते.
'काव्यमकरंद', 'भावतरंग', 'भावनिर्झर', 'सुधा', 'भावविहार' हे त्यांचे काव्यसंग्रह; तर 'बालविहार', 'किलबिल', 'शिशुगीत', 'क्रीडागीत' हे बालगीत संग्रह प्रसिद्ध आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भा. रा. तांबे यांच्या कवितांचेही संपादन मा.मायदेव यांनी केले होते. मा.मायदेव यांचे ३० मार्च १९६९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मायदेव यांची गाइ घरा आल्या कविता
.............................
गाइ घरा आल्या
.............................
गाइ घरा आल्या । घणघण घंटानाद
कुणीकडे घालू साद । गोविंदा रे? ।। १ ।।
गाइ घरा आल्या । धूळ झाली चहूंकडे
घनश्याम कोणीकडे । माझा गेला? ।। २।।
गाइ घरा आल्या । वासरे हंबरती ।।
कुणीकडे बालमूर्ती । कृष्ण माझा? ।।३।।
गाइ घरा आल्या । ब्रह्मानंद वासरांना
काय करू माझा कान्हा । चुकला का? ।।४।।
गाइ घरा आल्या । घोटाळती पाडसांशी
हाय! नाही हृषीकेशी । माझ्यापाशी ।।५।।
गाइ घरा आल्या । पाडसास हुंगीतात
माझा मात्र यदुनाथ । दुरावला! ।।६।।
गाइ घरा आल्या । आंवरेना मुळी पान्हा
राहणार भुका तान्हा । वासुदेव ।।७।।
गाइ घरा आल्या । दूध वाहे झुरूझुरू
माझ्या जीवा हुरूहूरू । मुकुंदाची ।।८।।
गाइ घरा आल्या । दूधवाट राहियेली
कुणी माझा वनमाळी । गुंतवीला ।।९।।
गाइ घरा आल्या । झाली बाई कातरवेळ
आजुनी का घननीळ । ये ना घरा? ।।१०।।
गाइ घरा आल्या । लावियेली सांजवात
बाळा दामोदरा रात । झाली न का? ।।११।।
गाइ घरा आल्या । पाल चूकचूक करी ।
राख अंबे माझा हरी । असे तेथे ।।१२।।
अमेरिकेत बोलपटांची निर्मिती सुरू होऊन तीन-चार वर्षे नाही झाली तोच भारतात पहिला बोलपट निर्माण केला गेला. आलम आरा या पहिला भारतीय बोलपटाने १९३१ च्या मार्चमध्ये करण्याचा मान मिळवला. १४ मार्च १९३१ रोजी 'आलम आरा' मुंबईच्या 'मॅजेस्टिक' सिनेमात लागला होता. पहिल्या दिवशी, पहिल्या शोच्या तिकीटासाठी सिनेमा हॉल बाहेर मोठी गर्दी जमली होती. या प्रकरणाला सांभाळण्यासाठी पोलिसांनासुध्दा बोलवावे लागले होते. जे तिकीट चार आण्यात मिळत होते, त्याला लोकांनी ब्लॅकमध्ये पाच रुपयांत खरेदी केले.
सांगितले जाते, ब्लॅक मार्केटिंग भारतीय सिनेमाच्या पहिल्या बोलपटापासून सुरु झाली. या चित्रपटाचे निर्माते अर्देशीर एम् इराणी हे होते. त्यात झुबेदा व मास्टर विठ्ठल यांच्या भूमिका बरोबर, जिल्लो, सुशीला आणि पृथ्वीराज कपूर यांनी भूमिका साकारल्या होत्या. सिनेमाची कहाणी जोसेफ डेव्हिड यांनी लिहिली होती, तसेच याचे दिग्दर्शन अर्देशिर ईराणीने लिहिली होती. १२४ मिनीटांचा हा सिनेमाला इम्पीरिअल मूव्हीटोन नावाची प्रॉडक्शन कंपनीने निर्मित केला होता.
या पहिल्या बोलपट सिनेमातून संगीताला उत्तम स्थान मिळाले. 'आलम आरा'मध्ये सात गाणी होती आणि याच सिनेमाचे 'दे दे खुदा के नाम पे' भारतीय सिनेमाचे पहिले गाणे मानले जाते. हे गाणे वजीर मोहम्मद खानने गायले होते. 'बदला दिलवाएगा या रब..., 'रूठा है आसमान...', 'तेरी कातिल निगाहों ने मारा...', 'दे दिल को आराम...', 'भर भर के जाम पिला जा...', और 'दरस बिना मारे है...' सिनेमाची ही इतर गाणी होती.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
राजस्थान भाजपमध्ये एक नाव असं आहे, ज्याचा निर्णय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनाही मानावाच लागतो. हे नाव आहे महाराणी वसुंधरा राजे. मराठ्यांच्या ग्वालियर घराण्याची कन्या असलेल्या वसुंधरा यांचा विवाह राजस्थानमधील ढोलपूरचे महाराजा राणा हेमंत सिंग यांच्यासोबत झाला. पण लग्नानंतर काही दिवसातच ते वेगळे राहू लागले. वसुंधरा राजेंचा मुलगा दुष्यत सिंग खासदार आहे. तर त्यांची बहिण यशोमती राजे शिंदे मध्य प्रदेशमध्ये मंत्री होत्या. काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या त्या आत्या आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti