(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • गणितज्ञ गुरू लाभलेला इंजिनिअर कलाकार – चिन्मय कोल्हटकर

    चिन्मय कोल्हटकर हे भारतीय शास्त्रीय संगीताच्या जगातील एक प्रसिद्ध हार्मोनियम वादक आणि संगीतकार. पंडित बिरजू महाराज, उस्ताद झाकीर हुसेन, गानसरस्वती किशोरी आमोणकर या सारख्या दिग्गजांना हार्मोनियम वर साथ दिलेल्या व इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर असलेल्या चिन्मयने मी घेतलेल्या आपल्या मुलाखती मध्ये एक कलाकार त्याच्या इंजिनिअरिंग मधील कौशल्यांचा वापर करून आपल्या साधनेच्या जोरावर शास्त्रीय संगीतासारख्या क्षेत्रामध्ये आपले नाव कसे कमवू शकतो हे दाखवून दिले आहे.

  • संजय खान

    संजय खान यांचा जन्म ३ जानेवारी १९४१ रोजी झाला. संजय खान हे फिरोज खान आणि अकबर खान यांचे बंधू. संजय खान यांनी साठ च्या दशकात अभिनयाला सुरुवात केली.१९६४ साली दोस्ती या सिनेमाद्वारे त्यांनी बॉलीवुडच्या दुनियेत पाऊल ठेवले. साठ व सत्तर च्या दशकात त्यांनी अनेक हिट सिनेमे दिले.'दस लाख','एक फूल दो माली','इंतकाम','उपासना','मेला','नागिन'' सोना चांदी','काला धंधा गोरे लोग'हे त्यांचे निवडक गाजलेले सिनेमे. अभिनयाबरोबरच संजय खान यांनी दिग्दर्शक,निर्माती आणि पटकथा लेखकाच्या रुपातही आपली ओळख निर्माण केली.'महा काव्य महाभारत 1','जय हनुमान','द सॉर्ड ऑफ टीपू सुलतान' या मालिकांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे.
    द सॉर्ड ऑफ टीपू सुलतान'ही मालिका त्यांच्या करिअरमध्ये मैलाचा दगड ठरली.

    संजय खान यांचे लग्न जरीन खान यांच्यासोबत झाले. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • कवी, शाहीर, गीतकार राम उगावकर

    कवी, शाहीर, गीतकार राम उगावकर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील उगाव या गावी झाला.

    नाशिक जिल्ह्यातील येवला येथील जनता विद्यालयात उगावकर यांनी काही वर्षे शिक्षक म्हणून नोकरी केली. पुढे बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळेतही त्यांनी शिक्षक म्हणून काम केले.

    राम उगावकर हे आदर्श शिक्षक, कवी, शाहीर, गीतकार होते. ते सेवादलातही काम करत असत. वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज हे उगावकर यांना गुरुस्थानी होते. राम उगावकर यांना भाऊसाहेब रानडे, एस. एम. जोशी, भाई वैद्य, ग. प्र. प्रधान, कवी कुसुमाग्रज यांचे संस्कार आणि मार्गदर्शन मिळाले. शाहिरीपासून त्यांनी आपल्या कला जीवनाची सुरुवात केली. लोकनाट्य, नाटक, चित्रपट कथा, चित्रपट गीते, पोवाडे, वैचारिक लेख आदी विविध प्रकारचे लेखन त्यांनी केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेनेही त्यांना पुरस्कार देऊन गौरविले होते.

    ‘जिद्द’, ‘पायगुण’, ‘नवरा माझा ब्रह्मचारी’, ‘मोसंबी-नारंगी’, ‘भीमगर्जना’, ‘घरंदाज’ आदी चित्रपटांसाठी तसेच ‘संत गाडगे बाबा’ या मालिकेसाठीही त्यांनी गीत लेखन केले होते. उगावकर यांनी ‘नारदमुनी मुंबईत’, ‘एक मास्तर चंदेरी दुनियेत’ हे एकपात्री कार्यक्रमही सादर केले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, प्रतीकार, संत गाडगे महाराज, हॅलो इन्स्पेक्टर, पुरुष पात्र नसलेले आज येणार पाहुणे, मुलांचा हरिजन दिन अशी त्यांची बारा नाटके रंगभूमीवर आली. तर गीतागीत सुगंध (काव्य), अंतराळ स्नेह (काव्य), मस्करी (विनोदी कविता संग्रह), शिवबाची शौर्यगाथा (पोवाडा), भारतीय स्वातंत्र्याचा पोवाडा, लोकमान्य (नाटक) जादूचा मणी, टिल्लू ही बालनाट्ये, परिताईचा मंगू असे काव्य, नाट्य व बालसाहित्य प्रकाशित आहे.

    त्यांनी काव्यमय असे एका सच्चा शिक्षकाचे मनोगत, एक मास्तर चंदेरी दुनियेत या पुस्तकाद्वारे तर दाखवलेच पण त्यावर उत्कृष्ट कविता लिहून त्यांनी स्वत:चेच चरित्र काव्यातून सादर केले.

    उगावकर यांनी लिहिलेली २० नाटके रंगभूमीवर सादर झाली होती. त्यांची तीन हिंदी तर सुमारे ४० मराठी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. काही चित्रपटातूनही त्यांनी भूमिका केल्या होत्या.

    राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या ‘दलित मित्र’ या पुरस्कारानेही उगावकर यांना सन्मानित करण्यात आले होते.

    संत गाडगे महाराज यांचे ते उपासक होते. त्यामुळे भगवे कपडे न घालणारे साधू म्हणूनही उगवकारांचा परिचय करून दिला जातो. परम शांतीधाम वृद्धाश्रमाचे ते विश्वस्तही होते.

    राम उगावकर यांचे ५ एप्रिल २०१३ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • मराठी लेखक, कथाकार गुरुनाथ आबाजी कुलकर्णी ऊर्फ जी. ए.

    जी. ए. नी धारवाडच्या जे. एस. एस. महाविद्यालयामध्ये इंग्लिश भाषाचे अध्यापन केले. त्यांचा जन्म १० जुलै १९२३ रोजी झाला. ते वैयक्तिक आयुष्यात अबोल व प्रसिद्धिविन्मुख मानले जात. जी. ए. कुलकर्णींच्या काही कथा सुरुवातीस सत्यकथा नियतकालिकात प्रसिद्ध झाल्या. मराठीतील एक आघाडीचे नवकथालेखक म्हणून जी.ए. ओळखले जातात.

    निरनिराळ्या प्रतीकांचा वापर करून आपल्या कथेची मांडणी करण्याचा प्रयत्न करत. त्याचप्रमाणे मानवाला अगतिक व नगण्य बनविणार्यार नियतीला आणि तिच्या असीम शक्तीला जी.एं.नी आपल्या कथामधून बरेच प्राधान्य दिले असल्याचे आपणास पाहावयास मिळते. जी.ए. कुलकर्णी यांच्या निळासावळा व रक्तचंदन या कथासंग्रहाना महाराष्ट्र शासनाचे साहित्यविषयक पुरस्कार मिळले होते.

    जी.ए. कुलकर्णी यांना ’काजळमाया’ या कादंबरीसाठी मिळालेला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा पुरस्कार, पुढे टीका झाल्यामुळे जी.एं.नी प्रवासखर्चासकट परत केला.

    त्यांची ग्रंथसपदा: निळासावळा, पारवा, हिरवे रावे, काजळमाया, रक्तचंदन इत्यादी कथासंग्रह.

    जी. ए. कुलकर्णी यांचे ११ डिसेंबर १९८७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • महान गायक महेंद्र कपूर

    मनोज कुमार यांच्या "उपकार‘ चित्रपटातलं आजही दर स्वातंत्रदिनी अन्‌ प्रजासत्ताकदिनी आवर्जून कानांवर पडणारं गाणं "मेरे देश की धरती‘... हे गाणं कल्याणजी-आनंदजी या जोडगोळीच्या संगीताने जेवढं लोकप्रिय केलं, त्याहीपेक्षा ते देशभर नेलं ते महेंद्र कपूर यांच्या आवाजाने. त्यांचा जन्म ९ जानेवारी १९३४ रोजी झाला. महेंद्र कपूर यांचा जन्म व्यापारी घरात झाला. पण, त्यांना या व्यवसायात रुची नव्हती तर गीत-संगीताकडे त्यांचा वाढता कल होता. त्यांचे कुटुंब मुंबईत आले तेव्हा महेंद्र कपूर यांना एक दिशा मिळाली. या मार्गावर खूप संघर्ष करावा लागणार शालेय स्तरावरच त्यांचा गोड आवाज सर्वांचे लक्ष वेधून घेऊ लागला.

    प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांच्याकडून त्यांना मार्गदर्शन घेतले. सेंट जेवियर्स कॉलेजमधून त्यांनी शिक्षण घेतले. संगीत की शिक्षा उन्होंने पं. तुलसीराम शर्मा, उस्ताद नियाज अहमद, मनोहर पोतदार, फैयाज अहमद तसेच पंडित हुस्नलाल यांच्याकडून त्यांना संगीताचे धडे गिरवले. महाविद्यालयीन जीवनात त्यांच्या आवाजाची चर्चा सुरू झाली आणि शिक्षण घेतानाच त्यांना चित्रपटासाठी गाण्याची संधी मिळाली. 'मदमस्त' या चित्रपटासाठी त्यांनी सर्वप्रथम पार्श्वगायन केले.

    गीत, गझल, भजन, कव्वाली सारखे सर्व प्रकार ते सहजरीत्या गात असत. त्यांच्या काळातील नौशाद, सी. रामचंद्र, शंकर-जयकिशन, रवी, कल्याणजी-आनंदजी, खय्याम अशा जवळजवळ सर्व संगीतकारांसाठी ते गायले आणि अभिनेत्यांना आवाज दिला. रफी, किशोर, मुकेश, हेमंत कुमार यांच्यासारख्या गायकांमुळे त्यांना कमी संधी मिळाली. तरीदेखील एवढ्या स्पर्धेतही त्यांनी आपल्या आवाजाची जादू कायम राखली. बी. आर. चोपड़ा आणि मनोज कुमार यांच्यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. बी. आर. चोप्रा, संगीतकार रवी आणि महेंद्र कपूर या त्रिवेणीने अनेक यादगार गीते गायली. चोप्रा यांची 'धूल का फूल', 'वक्त', 'हमराज', 'धुँध' यांच्या अनेक चित्रपटांमध्ये महेंद्र कपूर यांनी गायन केले.

    मनोज कुमार यांच्या 'उपकार', 'पूरब और पश्चिम', 'क्रांती' यांसारखे अनेक चित्रपट यशस्वी होण्यामध्ये महेंद्र कपूर यांचेही योगदान आहे. या चित्रपटांमध्ये त्यांनी गायलेली देशभक्तीपरगीते हिट झाली. 'मेरे देश की धरती' या गीताची लोकप्रियता अजूनही कायम आहे. हिंदीबरोबरच त्यांनी इतर भाषांमध्येही गीते गायली. मराठी चित्रपटामध्ये दादा कोंडके यांच्याबरोबर त्यांचे खूप जमले. महेंद्र कपूर यांना आपल्या कारकीर्दीत अनेक पुरस्कार मिळाले. राष्ट्रीय पुरस्कार, तीनवेळा फिल्म फेयर पुरस्कार, सारखे अनेक पुरस्कार मिळाले. महेंद्र कपूर यांचे निधन २७ सप्टेंबर २००८ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • मराठी कलावंत वसंत पवार

    आज वसंत पवार हे नाव घेतलं की मराठी चित्रपट रसिकाच्या ओठावर नाव येतं ते 'सांगत्ये ऐका!' हेच, या चित्रपटातील वसंत पवार यांची सगळीच्या सगळी गाणी गाजली. चित्रपटही तुफान चालला आणि मराठी सिनेमाच्या इतिहासात अनेक नवे विक्रमही प्रस्थापित झाले. 'बुगडी माझी सांडली ग..' हे गीत तर आशा भोसले यांच्या संगीत प्रवासातील एक मैलाचा दगड बनून गेलं आहे. खरेतर वसंत पवार यांनी असंख्य आठवणीतली गाणी आपल्याला दिली आणि आपलं भावविश्व समृद्ध करून सोडलं.

    वसंतरावांनी अंगाईगीतांपासून अभंगांपर्यंत आणि पोवाड्यांपासून लावण्यांपर्यंत विविध प्रकारच्या गीतरचना केल्या आणि गाण्याचा प्रकार कोणताही असो, वसंतरावांच्या चालीत काही ना काही नावीन्य हे असायचंच. मा.वसंत पवार उत्कृष्ट सतार वादन करीत असत. ते स्वत: पार्श्र्वगायन करीत असत.

    मराठी संगीताच्या इतिहासात 'वसंत' या नावाला काही आगळंवेगळं महत्त्व असावं, अन्यथा या एकाच नावाच्या तीन संगीतकारांनी इतकं सुरेल संगीत कसं काय दिलं असतं? वसंत देसाई, वसंत प्रभू आणि वसंत पवार हे तीन संगीतकार. या तिघांनी दिलेल्या संगीतावर मराठी गीत रसिकांच्या चार पिढ्या आजवर तृप्त झाल्या आहेत. अडतीस वर्षांच्या काळात पवारांनी संगीताचा अक्षरश: खजिना आपल्याला दिला. पवार हे ख्रिश्चन होते, हे कोणालाचा ठाऊक नव्हते.

    अडतीस वर्षांचे अल्पायुष्य लाभलेल्या वसंत पवार नामक अवलिया संगीतकाराने महाराष्ट्राला द्यावे तरी काय काय? राम कदमांसारखा खंदा संगीतकार, सुमन कल्याणपूर यांच्यासारखी श्रेष्ठ गायिका, सुलोचना चव्हाण यांच्यासारखी लावणीसम्राज्ञी, जगदीश खेबुडकरांसारखा मोठ्या श्वासाचा गीतकार. एका प्रकारे गुणी माणसे जन्माला घालणारा हा रसिकराज लावण्या, अभंग, भावगीते, युगलगीते, सवाल-जवाब, झगडे, पोवाडे, फटके किती प्रकार? ‘मल्हारीमार्तंड’ या चित्रपटातील सुलोचना चव्हाणांच्या आवाजातील फड सांभाळ तुर्या ला ग आला, तुझ्या उसाला लागल कोल्हा’, ‘पदरावरती जरतारीचा मोरनाचरा हवा’ ह्या दोन लावण्या म्हणजे वसंत पवार यांच्या संगीत कारकीर्दीचा कळसच होय. अशा या संगीतकाराचे चरित्र "वसंतलावण्य' या नावाने श्री.मधू पोतदार यांनी लिहिले आहे. हे पुस्तक ‘कॉन्टिनेन्टल प्रकाशना'ने प्रसिध्द केले आहे.

    वसंत पवार यांचे ६ ऑगस्ट १९६५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट / प्रकाश अकोलकर

  • गीतरामायणकार, महाकवी ग. दि. माडगूळकर

    मराठी रसिकांनी माडगूळकरांच्या काव्यरचनेला मनःपूर्वक प्रतिसाद दिला आणि त्यांच्या गीत रामायणाने तर कीर्तीचा कळस गाठला; त्यांना ‘महाराष्ट्र वाल्मीकी’ ही सन्माननीय पदवी लोकांनी स्वयंस्फूर्तीने दिली. गीतरामायणाच्या गायनाचे शेकडो कार्यक्रम झाले व अजूनही होत आहेत. अन्य भारतीय भाषांत त्याचे अनुवादही झाले.

  • बालसाहित्यकार आणि चरित्रकार राजा मंगळवेढेकर

    राजा मंगळवेढेकर ऊर्फ वसंत नारायण मंगळवेढेकर यांना स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभाग घेत असताना त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. यातूनच त्यांना मुलांसाठी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. त्यांचा जन्म ११ डिसेंबर १९२५ रोजी झाला. आजवर मंगळवेढेकरांनी विपुल साहित्यनिर्मिती केली आहे.

    यामध्ये २०० पेक्षा जास्त गोष्टी, कथा, कविता, चरित्रे, पत्रे आणि विज्ञान व पर्यावरण याविषयीची पुस्तके आहेत. आपला भारत, शोध भारताचा या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकमालिका असून त्यांनी लिहिलेले साने गुरुजींचे चरित्रदेखील प्रसिद्ध आहे. जवाहरलाल नेहरू समिती पुरस्कार, गदिमा पुरस्कार, बालसेवा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.

    राजा मंगळवेढेकर यांचे १ एप्रिल २००६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    गीतकार म्हणून राजा मंगळवेढेकर यांनी लिहिलेली गाणी
    असावा सुंदर चॉकलेटचा
    उर्मिले त्रिवार वंदन तुला
    कोणास ठाऊक कसा
    सती तू दिव्यरूप मैथिली

  • बॉलीवूड मधील ट्रेजेडी किंग मुहम्मद युसुफ खान उर्फ दिलीप कुमार

    हिंदी चित्रपटांमध्ये अभिनयाची तहज़ीब आणि तरक्की असलेले अभिनेते म्हणजे दिलीपकुमार. त्यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ रोजी मध्ये पेशावर येथे झाला. पेशावरमधील किस्सा खवानी बाजारात एका फळविक्रेत्या पठाण कुटुंबात जन्माला आलेल्या युसूफ खान यांनी कधीही हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनय करण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. वडिलांनी व्यवसायाचे बस्तान बसविल्यानंतर इतर कुटुंबीयांसोबत मुंबईला आल्यावरही किशोरवयीन युसूफच्या तसे मनातही कधी आले नव्हते.

    उलट लवकरात लवकर स्वत:च्या पायावर उभे राहून बारा मुले, इतर नातेवाईक आणि पै-पाहुण्यांचे करता करता थकून गेलेल्या अम्मीचे कष्ट काही प्रमाणात कमी करता यावेत यासाठी लवकरात लवकर कमावता होणे याच एका उद्देशाने झपाटलेल्या युसूफने एकदा वडिलांशी उडालेला खटका मनाला लावून घेत तिरमिरीत घर सोडून थेट पुणे गाठले. तिथे लष्करी कॅन्टीनमध्ये मॅनेजरचा साहाय्यक म्हणून केलेल्या नोकरीने त्यांना आपणही पैसे कमवू शकतो, हा आत्मविश्वास मिळवून दिला.

    दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लष्करी कॅन्टीनचे व्यवस्थापन बदलले आणि युसूफ खान जमा केलेले पाच हजार रुपये घेऊन घरी परतले. नोकरी करावी की परंपरागत व्यवसाय, या द्विधा मन:स्थितीत दादर येथे एका परिचिताकडे निघालेल्या युसूफ खान यांना चर्चगेट स्थानकात डॉ. मसानी हे स्नेही भेटले. ख्यालीखुशालीच्या चौकशीत युसूफ नोकरीच्या शोधात असल्याचे समजल्यावर डॉ. मसानी यांनी त्यांना माहीम येथे सोबत येण्याची गळ घातली. युसूफही त्यांच्या आग्रहाखातर माहीम येथील बॉम्बे टॉकीज स्टुडिओत दाखल होऊन देविकाराणीसमोर उभे राहिले. देविकाराणीने राजबिंडे व्यक्तिमत्त्व आणि उर्दूवरील प्रभुत्व या भांडवलावर युसूफ खान यांना महिना बाराशे रुपये पगारावर बॉम्बे टॉकीजच्या चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची ऑफर दिली.

    युसूफ आणि डॉ. मसानी या दोघांनाही हे अनपेक्षित होते. देविकाराणींच्या सूचनेवरूनच दिलीपकुमार या टोपण नावाने ‘ज्वार भाटा’ या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर त्यांचे १९४४ मध्ये पदार्पण झाले. १९४४ साली आलेल्या ‘ज्वार भाटा’ चित्रपटापासून दिलीप कुमार यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली होती. मा.दिलीप कुमार यांनी त्यांच्या सहा दशकाच्या अभिनय कारकिर्दीत अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या. त्यातील ‘अंदाज’, आन, ‘देवदास’, ‘आजाद’, ‘मुगल-ए-आजम’ और सामाजिक विषयावर आधारित चित्रपट ‘गंगा जमुना’ यांसारख्या चित्रपटात अभिनय केला. १९५७ मध्ये दिलीप कुमार व वैजयंती माला यांच्यावर चित्रित झालेल्या 'माँग के साथ तुम्हारा मैने माँग लिया संसार...' या गीतातील शब्दांनी तरुणाईला भारून टाकले होते.

    १९७६ मधील तिहेरी भूमिका असलेला ‘बैराग’ हा नायक म्हणून दिलीपकुमार यांचा अखेरचा चित्रपट. त्यानंतर पाच वर्षे चित्रपटसृष्टीपासून दूर राहिलेल्या दिलीपकुमार यांनी मनोज कुमार यांच्या ‘क्रांति’ पासून चरित्र अभिनेता म्हणून काम करण्यास सुरुवात केली. ‘शक्ति’, ‘विधाता’, ‘मजदूर’, ‘दुनिया’, ‘मशाल’, ‘कर्मा’, ‘सौदागर’ अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या उत्तुंग अभिनयाचे दर्शन घडवले. दिलीप कुमार यांनी १९९८ साली किला या चित्रपटात शेवटची भूमिका साकारली.

    भारत सरकारने त्यांना पद्मभुषण, दादासाहेब फाळके, पद्मविभूषण पुरस्काराने गौरविले. पाकिस्तान सरकारनेही त्यांना १९९७ साली सर्वोच्च नागरिक पुरस्कार निशान-ए-इम्तियाजनेही सन्मानित केले गेले. ‘मुघल-ए-आझम’चे चित्रीकरण चालू असताना दिलीपकुमार आणि मधुबाला एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते, सायरा बानूशी झालेला विवाह हे विधिलिखित होते. हे वैवाहिक जीवन प्रदीर्घ काळ टिकले, असा दिलीपकुमार यांचा विश्वास होता.

    दिलीपकुमार आणि अभिनेत्री सायरा बानू यांचेही लग्न त्या काळी गाजले. कारण लग्नाच्या वेळी दिलीपकुमार पेक्षा सायरा बानूचे वय खूपच कमी होते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • चित्रपट ‘साहित्यिक दिग्दर्शक’ दिनकर द. पाटील

    जवळपास पन्नास चित्रपटांचे दिग्दर्शन व शंभराहून अधिक चित्रपटांचे लेखन इतके प्रचंड काम करणारे मा.दिनकर पाटील हे मराठीतील एकमेव ‘साहित्यिक दिग्दर्शक’ असावेत. त्यांना ग. दि. माडगूळकर पुरस्कार, जनकवी पी. सावळाराम पुरस्कार आणि व्ही. शांताराम पुरस्कार असे मानाचे पुरस्कार लाभले. चित्रपट महामंडळाच्या ‘चित्रभूषण पुरस्कारा’चेही ते मानकरी होते.