(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • ज्येष्ठ तत्वज्ञ जे कृष्णमूर्ती

    कृष्णमूर्तींच्या मतानुसार दारिद्र्य, युद्धे, आण्विक संकट आणि इतर दुर्दैवी गोष्टींचे मूळ आपल्या विचारांमध्ये आहे. आपल्या विचारांप्रमाणे आपण जगतो आणि वागतो त्या प्रमाणेच युद्धे आणि सरकारे त्याच विचारांचा परिपाक आहेत.

  • वॉल्टर एलिआस डिस्नी

    अमेरिकन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक, अभिनेता, रेखाचित्रकार आणि उद्योजक वॉल्टर एलिआस डिस्नी यांचा जन्म ५ डिसेंबर १९०१ रोजी झाला.

    वॉल्टर उर्फ वॉल्ट डिस्ने यांचा जन्म शेतकऱ्याच्या कुटुंबातला, अनेक भावंडातला वॉल्टर लहानपणापासूनच कलाकार होता. वयाच्या सातव्या वर्षीच चित्रे काढून शेजाऱ्याना विकून तो काही पैसेही तेव्हापासून मिळवत असे. एका ट्रेनच्या प्रवासात त्याला 'मिकी माऊस' गवसला असे म्हणतात. पुढे वयाच्या सोळाव्या वर्षीच सैन्यात भरती होण्यास तो गेला पण त्याला प्रवेश नाकारला गेला. मग त्याने रेडक्रॉसमध्ये काम सुरु केले. म्हणजे निसर्गदत्त कलाकार व त्यातही व्यंगचित्र काढण्याची त्याची हातोटी असूनही सुरुवातीला त्याने अगदी विपरीत जीवनकार्य निवडण्याचा प्रयत्न केला. हे असे अनेकांच्या बाबतीत होते. ‘मी कोण’ आहे ‘कोऽहम’ हा तसा सनातन, चिरंतन प्रश्न.

    ‘मी ब्रह्म आहे’ असे त्याचे अंतिम व आदिम उत्तर. पण त्यामध्ये मी सध्या कोण आहे? या जन्मात माझ्या आत अशा काय क्षमता आहेत की ज्या फक्त व फक्त माझ्यातच आहेत हा शोध महत्त्वाचा आहे. आपला ‘स्व’ कळणे- ‘स्वभाव’ कळणे हे अपरिहार्य आहे. अन्यथा अर्धे आयुष्य किंवा कधीकधी पूर्ण आयुष्यही न आवडणार्या , न कळणार्याय कामात अडकून पडते. वॉल्टर रेडक्रॉसच्या कामासाठी फ्रान्सला गेला, तिथे त्याला अॅम्ब्युलन्स चालवण्याचे काम होते. पण त्याच्या आतला कलाकार गप्प बसेना. असे म्हणतात त्याची अॅम्ब्युलन्स नेहमी गच्च भरलेली असे. पण वैद्यकीय गोष्टींनी नाही तर त्याने काढलेल्या असंख्य कार्टून्सनी! वर्षभरातच वॉल्टर परत आला. त्याने कमर्शियल आर्टमध्येच करिअर करायचे ठरवले. कान्सासमधे स्थानिक व्यवसायांसाठी त्याने अॅनिमेटेड फिल्म्स बनवण्यास सुरुवात केली.

    ‘The Alice Comedies’ ही फिल्म त्याने बनवली. तो कफल्लक झाला. त्याची कंपनी कर्जबाजारी झाली. पण त्याने निराश न होता सुटकेस भरली. अॅलिसची अपूर्ण फिल्म घेऊन त्याने तडक हॉलिवूड गाठले. वॉल्टर त्यावेळेस जेमतेम २२ वर्षाचा होता. भावाचे अडीचशे डॉलर, अधिक काही ५००-६०० डॉलर्सचे कर्ज यातून एका गॅरेजमधे काम सुरू झाले. १९२५ साली वॉल्ट डिस्नी यांचा विवाह व्यंगचित्रकार लिलियन बाऊण्ड्स यांच्याशी झाला. डिस्नी दांपत्य आणि आयवर्क्स यांनी नव्या जोमाने आपल्या स्टुडिओत पुन्हा कामाला सुरूवात केली. वॉल्ट यांनी कॅन्सास स्टुडिओत सहज म्हणून काढलेले उंदराचे चित्र घेऊन त्यावर आयवर्क्सने नवे साज चढविले. या चित्राला आढी मॉर्टिमर असे नाव देण्यात आले. पण लिलियनला ते नाव आवडले नाही. म्हणून मग तिनेच सुचविलेले मिकी माउस हे नाव त्या चित्राला देण्यात आले. मॉर्टीमर नाव पुढे एका खलनायकाच्या चित्रासाठी दिले.

    मिकीचा आवाज स्वतः वॉल्ट डिस्नी यांचाच आवाज होता. मिकीचा पहिला मूक चित्रपट Plane Crazy तयार झाला. (१९२८). या काळापर्यंत मूकपटांची मागणी कमी होत गेली होती, प्लेन क्रेझी सपशेल आपटला. १९३७ सालची Snow white & the Seven Dwarfs ही पूर्ण लांबीची, प्रचंड खर्चाची पण सदाबहार अॅनिमेटेड फिल्म त्याने केली. मग डिस्ने स्टुडीओने अनेकानेक क्लासिक्सची निर्मिती केली. विनोदनिर्मितीतून करमणूक करतानाही निरागसता जपणारा चार्ली चॅपलीन हा लहानपणापासून त्याचा आदर्श होता. Pinocchio, Fantasa, Dumbo, Bambi ते Junglebook ह्या सगळ्या फिल्म्स त्याची साक्ष देतात. टेक्नीकलरचे पेटंट त्याने घेतल्याने काही वर्षं कलर फिल्म बनवण्याचा हक्क फक्त त्यांनाच मिळाला. १९३२ च्या फ्लॉवर्स अॅण्ड ट्रीजने त्याला पहिला अॅकेडमी अॅवार्ड मिळवून दिला.

    वॉल्ट डिस्नेज फिल्मोग्राफी या शीर्षकाखाली निर्माता म्हणून जवळजवळ ५७६, दिग्दर्शक म्हणून जवळजवळ ११२ व अभिनेता म्हणूनही १०-१२ फिल्म्सची नावे दिसतात. ही प्रचंड क्रिएटिव्हिटी, Animation या माध्यमातही सतत केलेली नवनिर्मिती ही थक्क करणारी आहे. असंख्य मुलांचे बालपण खुलवणारा, मोठ्यांनाही छोटं करणारा, भाषा, प्रांत, संस्कृती, इतिहास या साऱ्या सीमारेषा पुसून आनंदाचे अपराजित साम्राज्य उभे करणार्याठ वॉल्ट डिस्नेच्या अफाट सृजनशीलतेला व नवनिर्मितीच्या क्षमतेला सांष्टांग दंडवत घालावा असे वाटते.

    मिकी, मिनी, डोनाल्ड, मोगली, गुफी, टॉम अॅण्ड जेरी, लायन किंग ही पात्रे आपल्या सर्वांच्या भावविश्वात कायमचे घर करून आहेत. जंगल बुक १९६७ साली सुपरहिट होता, २०१६ सालीही सुपरहिटच आहे. त्या कथेवर TV सिरिअल्सचे असंख्य भाग पाहूनही पुन्हा थिएटरकडे गर्दी होते. तीच गोष्ट टारझन, सिंड्रेला, रॉबिनहूड, अॅलिस यांची. यामागे आनंद वाटण्याची अमर्याद ओढ, तंत्रज्ञानावरची हुकुमत व नवनवीन तंत्रेही सर्वात आधी आत्मसात करण्याची तत्परता या सर्व गोष्टी आहेत. १९९० साली डिस्नेचा २९ वा पूर्ण लांबीचा चित्रपट The Little Mermaid आला.

    वॉल्ट डिस्ने यांची कार्टून फिल्म सलग २० वर्षे एबीसी अॅ ण्ड एबीसीसारख्या मोठ्या चॅनलवर प्रसारित होत होती. वॉल्ट डिस्नेने जे पैसे कमावले तेच त्यांनी आपल्या ड्रीम प्रोजेक्ट डिस्नेलँडमध्ये गुंतवले. 1१७ जुलै १९५५ रोजी कॅलिफोर्नियामध्ये शेकडो एकर जमिनीवर डिस्नेलँड तयार करताना वॉल्ट डिस्नेने सांगितले होते की, मनोरंजन आणि कुतूहल असलेल्या या जागेला तोपर्यंत पूर्णत्व येणार नाही जोपर्यंत लोकांमध्ये कल्पनाशक्ती आहे. कॅलिफोर्निया, आरलँडो, पॅरिस, टोकियो आदी ठिकाणी तयार करण्यात आलेले डिस्नेलँड खरोखर परीकथेतील कल्पनेप्रमाणे आहे. त्यांनी जन्माला घातलेले कार्टून, डिस्नेलँड आणि अॅटम्युझमेंट पार्क आजही मनोरंजन जगात सर्वोच्च पदावर विराजमान झालेले आहेत. त्यानंतर त्यांनी हाताने चित्र काढणे व रंगवणे ह्या अत्यंत कष्टप्राय तंत्रातून संगणकीय चित्रांच्या नव्या तंत्राकडे झेप घेतली ती आजतागायत उंच उंच जातच आहे.

    लहानपणी वॉल्टला प्राणी, पक्षी, निसर्गाचे खूप कुतूहल होते. त्यांचे चेहरे, लकबी, रंग यांना तो कागदावर आणी पण आपल्या खास शैलीत. त्या कुतूहलातून एक प्रतिसृष्टी निर्माण झाली आणि अजूनही होतच आहे.
    वॉल्ट डिस्ने यांचे निधन १५ डिसेंबर १९६६ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर

    भालचंद्र पेंढारकरांनी अनेक नाटकांना संगीत दिले आहे त्यांची नावे आकाशगंगा , आकाश पेलताना , दुरितांचे तिमिर जावो , पंडितराज जगन्नाथ बहुरूपी हा खेळ असा , रक्त नको मज प्रेम हवे , सत्तेचे गुलाम आणि स्वामिनी अशी आहेत.

  • ज्येष्ठ आणि श्रेष्ठ तालवादक लॉर्ड कॉवस

    लॉर्ड कावस हे भारतीय चित्रपटसृष्टीच्या पाऊणशे वर्षांच्या इतिहासाचे ते साक्षीदार होते. त्यांचा जन्म १९११ रोजी पुणे येथे झाला. लॉर्ड कावस यांचा पुण्याच्या सधन पारशी कुटुंबात लॉर्ड कॉवस यांचा जन्म झाला. घरची आíथक परिस्थिती उत्तम. छोटय़ा कॉवसचे सांगीतिक मन तिथे रमत नव्हते. डोळय़ांत स्वप्न आणि डोक्यात फक्त एक विचार, मला सांगीतिक विश्वात करिअर करायचे आहे. आपला छंद जोपासण्यासाठी वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी आई बरोबर मुंबईत मामाच्या घरी स्थायिक होण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला.

    मुंबईत जिथून जसे संगीत शिकता येईल ते शिकण्यास त्यांनी सुरुवात केली. मेजर गुंडलखान या पठाण मिलिटरी अधिकाऱ्याकडून बॅग पाइप वाजविण्यास शिकले. दिवसातून दहा दहा तास ड्रम वाजविण्याचा सराव केला. पारंपरिक भारतीय तालवाद्यांची माहिती असावी म्हणून संगीतकार गुलाम मोहोम्मदकडे तबलाही शिकले. मि. वालिसकडून ट्रम्पेट आणि मि. लुईस मोरेनो या स्पॅनिश कलाकाराकडून कास्टनेट (हे छोटेसे वाद्य स्पॅनिश नर्तक दोन्ही हातांच्या मुठीत धरून वाजवत असत.) वाजविण्यास शिकले. ड्रम्सवर मात्र स्वत: अभ्यास करून प्रावीण्य मिळविले. ‘आलम आरा’ या पहिल्या हिंदी बोलपटाचे संगीतकार होते फिरोजशहा मित्री व बहराम इराणी.

    बहराम हे लॉर्ड कॉवसचे चुलतमामा. त्यांच्याबरोबर कॉवसनी ‘आलम आरा’च्या पाश्र्वसंगीतात ट्रम्पेट वाजवून फिल्मी संगीतात प्रवेश केला. पुढे दोन-तीन वर्षे ब्रिटिश आर्मीमध्ये त्यांच्या बँडपथकात नोकरी केली व कॅप्टनपदापर्यंत पोहोचले. त्यामुळे माìचग ड्रम वाजविण्यात त्यांचा हातखंडा होता. सुनील दत्तच्या ‘उसने कहा था’ फिल्ममधील ‘जानेवाली सिपाही से पुछो’ गाणे आठवते? त्यातील माìचग ड्रम लॉर्ड कॉवस यांनी वाजविला आहे. दुसरे महायुद्ध संपले आणि त्यांची आर्मीमधील नोकरी संपुष्टात आली. त्यांना ब्रिटिश नागरिकत्व मिळाले होते, परंतु त्यांनी ते नाकारून मुंबईत राहणे पसंत केले.

    ४० व्या दशकात काही काळ ताज हॉटेलमध्ये बारमनची नोकरी करत असताना तिथे अनेक विदेशी बॅण्ड पाहायला व ऐकायला मिळाले. त्या वादकांशी दोस्ती करून तीन वर्षांत सर्व प्रकारची लॅटिन अमेरिकन वाद्य्ो ते वाजविण्यास शिकले. इतकेच नव्हे तर त्यांनी मिळेल त्या किमतीत ती वाद्य्ो विकत घेतली. स्वातंत्र्यपूर्व काळात ऑस्टोरिया, व्होल्गा, रिटज, व्हेनिस आदी ठिकाणी बॉलरूम डान्स चालत असे अनेक नाइट क्लब सुरू होते, तिथे पाश्चात्त्य नृत्य चालत असे. नौशादचा ‘जादू’ चित्रपट पाहिला असेल तर त्याची कल्पना येईल! ताजच्या बाजूला त्या काळच्या जाझ संगीतप्रेमींचे अत्यंत आवडते ग्रीन्स हॉटेल होते. इथे मोठमोठय़ाने ड्रम वाजविण्यास मुभा होती. पहाटेपर्यंत चालत असे, लॉर्ड कावस यांनी या हॉटेल्सच्या बॅण्डमध्ये वाजविण्यास सुरुवात केली.

    १९४५ च्या सुमारास गोव्याहून प्रसिद्ध जाझ ट्रम्पेट वादक चिकचॉकलेट (चिको बाज) मुंबईला आले, त्यांनी आपला बॅण्ड चालू केला, लॉर्ड कावस आता त्यांच्या बॅण्डमध्ये वाजवू लागले. अॅककॉíडयनवादक गुडी सिरवाईना कावसनी आपल्या बॅण्डमध्ये बोलावून घेतले. सुट्टीमध्ये ते सर्व मसुरीच्या क्लबमध्ये बॅण्डवादन करत असत. त्यादरम्यान लाहोरहून कुक्कू डान्सर मुंबईत आली. आपल्या नृत्यसंगीताच्या कार्यक्रमांसाठी तीही एका चांगल्या बॅण्डच्या शोधात होती.

    लॉर्ड कावस, जेरी फर्नाडिस व चिको वाजनी ‘जिरोम एॅण्ड हिज जाईव्ह क्लब बॉईज’ हा बॅण्ड तयार केला होता. कुक्कू त्यामध्ये सामील झाली. तिच्या पहिल्या फिल्मी नृत्याचे ध्वनिमुद्रण याच बॅण्डने केले. सी. रामचंद्र म्हणजे कल्पक व तल्लख बुद्धीचे संगीतकार. सतत काही तरी नवे आणि वेगळे संगीत देण्याच्या प्रयत्नात ते असत. जाझ संगीतावर त्यांचे विशेष प्रेम होते. दिवसभर गाण्यांचे ध्वनिमुद्रण करून मध्यरात्री ते बॅण्ड ऐकायला ग्रीन्स हॉटेलमध्ये चिक चॉकलेटकडे येत असत. त्यांना लॉर्ड कॉवस यांचे विविध पाश्चिमात्य तालवाद्यांवर असलेले प्रभुत्व भावले. त्या बॅण्डमधील सर्व कलाकारांना घेऊन पाश्चिमात्य शैलीचे संगीत देण्याचे त्यांनी ठरविले.

    नेमकी त्याच काळात मुंबई इलाख्यात दारूबंदी जाहीर केली गेली. नाइट क्लब बंद झाले. उदरनिर्वाहासाठी काहीतरी करणे आवश्यक होते. लॉर्ड कावस, त्यांचा मोठा मुलगा केरसी, गुडी, जेरी सारे सी. रामचंद्रांच्या वाद्यवृंदात सामील झाले. कावसनी आपल्याबरोबर विविध प्रकारचे जाझ, ड्रम्स, बोंगो, कोंगो, कबास, रेसो, एॅकॉíडयन, कॅस्टनेट, ट्रांगल, खंजिरी, चायनीज ब्लॉक, वूडब्लॉक, व्हायब्रोफोन आदी लॅटिन अमेरिकन वाद्य्ो सोबत आणली आणि या सर्वानी एक नवीन प्रकारचे फिल्मी संगीत तयार केले. आमा ‘आना मेरी जान संडे के संडे,’ ‘जवानी की रेल चली जाएगी’ (शहनाई), ‘गोरे गोरे ओ बांके छोरे’ (समाधी), ‘मोम्बासा मोम्बासा’ (सरगम), ‘मेरे पिया गए रंगून’ (पतंगा) या गाण्यांनी सर्वत्र धमाल उडवून दिली. संगीतकार सी. रामचंद्र प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले. संगीताची ही नवीन शैली यशस्वी होताच सर्व संगीतकार लॉर्ड कावस यांच्या मागे लागले. लॉर्ड कावस यांनी पारंपरिक िहदी फिल्मी संगीताला आपल्या असामान्य वादन शैलीने, कल्पकतेने आधुनिक वळण दिले.

    हॉलीवूडच्या ‘लव्ह ऑफ कारमेन’ चित्रपटावरून कारदारनी ‘जादू’ या वेषभूषाप्रधान चित्रपटाची निर्मिती केली. त्यातील गाण्यांसाठी लॉर्ड कावसनी प्रथमच कॅस्टनेट यामूळ स्पॅनिश वाद्याचा उपयोग केला, गाणे होते ‘जब नन मिले ननों से, लारा लूं, लारा लूं’ आजही फिल्मी संगीतात सिंगल कॅस्टनेट वाजविणारे होमी मुल्लर, वकील बाबा, दीपक बोरकरसारखे काही कलाकार आहेत. परंतु डबल कॅस्टनेट वाजविणारे कलाकार फक्त दोन होते. लॉर्ड कावस आणि त्यांचा धाकटा मुलगा बजी. महमूदच्या ‘शबनम’ फिल्ममध्ये डबल कॅस्टनेट आहे, ‘हर नजर में सौ अफसाने.’ खंजिरीचा उपयोग यापूर्वीही भारतीय संगीतातून केला जात होता. वादक तालासाठी धातूच्या चकत्यांचा वापर करीत. लॉर्ड कावस यांनी खंजिरी वादनात अमेरिकन शैली आणून ते पूर्ण वाद्य वाजविण्यास सुरुवात केली.

    अनेक लोरींमध्ये (अंगाई गीतात) हळुवार घंटानाद ऐकू येतो. फिल्मी संगीतात हा नवीन प्रकार लॉर्ड कावस यांनी आणला. घोडय़ांच्या टापांचा आवाज निर्माण करण्याचे प्रथम श्रेय आर. सी. बोराल व पंकज मलिकला जाते. (चले पवन की चाल) परंतु घोडय़ांच्या टापांचा अस्सल ध्वनी निर्माण करण्याची किमया लॉर्ड कावस यांचीच! दोन रिकाम्या करवंटय़ा फरशीवर वाजवून त्यांनी तो आभास निर्माण केला होता. ‘अनमोल घडी’, ‘उडन खटोला’, ‘नया दौर’, ‘तुमसा नहीं देखा’ आदी चित्रपटांतून त्यांनी वादन केले आहे. केवळ घोडय़ांच्या टापांचाच नाही तर बुटाच्या टापांचा (फूट स्टेपचा) अफलातून ध्वनीही त्यांनी आपल्या कल्पक बुद्धीने निर्माण केला आहे.

    सी. रामचंद्रच्या ‘इना मिना डीका’ (आशा) गाण्यावरील वैजयंतीमालाच्या नृत्यात त्यांनी फूटटॅप डान्ससाठी, तिच्या पायातील बुटांच्या टापांचाही ध्वनी निर्माण केला आहे. काचेवर दोन नाण्यांनी वादन केले. मिष्किलपणा त्यांच्या रक्तातच होता. रेकॉìडगमध्ये ते खूप गमतीजमती करीत असत. ‘दिल का हाल सुने दिलवाला’ (श्री ४२०) मधील ‘चुकचूक’ आवाज ही त्यांचीच कल्पना होती. अलबेलामधील ‘ओ बेटा जी’ गाण्यात त्यांनी किचनमधील भांडी वाजवली तर नोकरीमधील किशोरच्या ‘अर्जी हमारी’ गाण्यात चक्क टाइपरायटर वाजवला आहे. गाईडमधील ‘पिया तोसे नना’मधील घुंघरांची साथही त्यांची होती.

    भगवानचा ‘अलबेला’ त्यातील संगीतामुळे तुफान लोकप्रिय झाला. त्याचे बरेचसे श्रेय लॉर्ड कावस यांना द्यावे लागेल! ‘शोला जो भडके’मधील सुरुवातीचे बेंगो पीस व ‘दिवाना परवाना’मधील पाश्चिमात्य ऱ्हिदम काकांनी दिला. ‘दिवाना परवाना’च्या चित्रीकरणप्रसंगी भगवानदादांनी ते गाणे वाजविणाऱ्या प्रमुख कलाकारांनाही (चिक चॉकलेट, फ्रान्सिस, जेरी फर्नाडिस, सहृद कार) आपल्या समवेत नाचायला लावले आहे. बोंगो, कोंगो, चायनीज ब्लॉक, वूडब्लॉक, ड्रम, व्हायोब्रोफोन वादनात तर त्यांचा हात धरणारा कुणीही कलाकार फिल्मी संगीतात नव्हता. पुढील गाणीच त्याची साक्ष देतील!

    ‘जाने क्या तूने कहीं’ - प्यासा (चायनीज ब्लॉक), ‘आई ए मेहरबां’ - हावडा ब्रिज (बोंगो व वूडब्लॉक), ‘हूं अभी मं जवां ऐ दिल’ - भाई भाई (बोंगो), ‘लो प्यार की हो गई जीत’ - जादू (बोंगो), ‘अंधे जहाँ के अंधे रास्ते’ - पतिता (बोंगो), ’जाता कहा हैं दीवाने‘ - सीआयडी (बोंगो), ‘ये रात ये चांदनी’ - जाल (बोंगो).

    आर.डी.बर्मन यांच्या संगीतामध्ये लॉर्ड फॅमिलीचे प्रचंड योगदान आहे. ‘आराधना’ या चित्रपटातील ‘रूप तेरा मस्ताना’ या गाण्यात बोंगो - कावस लॉर्ड, एकॉíडयन - केरसी लॉर्ड, व्हायब्रोफोन - बजी लॉर्ड यांनी वाजविला आहे.

    १९४० ते १९९० या कालखंडात असा एकही संगीतकार नव्हता की ज्याचे गाणे लॉर्ड कावस यांनी वाजविले नाही. पाश्चात्त्य आणि भारतीय वाद्यांवर त्यांची कमालीची पकड होती. नारळाच्या करवंटय़ा, टाईपरायटर, बुटांच्या टापांच्या आवाजाचा वापर करून त्यांनी सदाबहार गाण्यांना जन्म दिला. कावस म्हणजे हिंदी फिल्मी संगीताचा चालताबोलता इतिहास होता. लॉर्ड कावस यांचे २४ डिसेंबर २००६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट/ अरुण पुराणिक

  • डॉ.नरेंद्र दाभोळकर

    आज १ नोव्हेंबर.. आज मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते डॉ.नरेंद्र दाभोळकर यांची जयंती.
    डॉ.नरेंद्र दाभोळकर यांचा जन्म १ नोव्हेंबर १९४५ जन्म सातारा जिल्ह्यातील माहुली येथे झाला.
    एखाद्या व्यक्तीचं आयुष्य हाच एखाद्या चळवळीचा, संस्थेचा इतिहास बनण्याची परंपरा महाराष्ट्राला नवीन नाही. मा.डॉ.नरेंद्र दाभोळकर हे असेच एक नाव. अंधश्रध्दा निर्मूलन आणि दाभोळकर हे एकमेकांचे समानर्थी शब्द बनून गेलेले होते. मा.डॉ.नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी १९८९ साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना स्थापली. नरेंद्र दाभोलकरांचे माध्यमिक शिक्षण साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत झाले. त्यांनी सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उत्तम कबड्डीपटू म्हणून क्रीडाजगतात प्रसिद्ध होते. कबड्डीवर उपलब्ध असलेले एकमेव शास्त्रशुद्ध पुस्तकही त्यांनी लिहिले. कबड्डीतील योगदानासाठी त्यांना मानाचा शिवछत्रपती पुरस्कारही मिळाला. १९७० साली मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शाखेचे शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर त्यांनी सातारा यथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. बाबा आढाव यांच्या एक गाव - एक पाणवठा या चळवळीत दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्या १९८३ साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती मध्ये कार्य सुरू केले. पण नंतर १९८९ मध्ये त्यापासून वेगळे होऊन त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साधना या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते डिसेंबर २००६पासून मृत्यूपर्यंत संपादक होते.

    महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, परंपरा मोडीत काढण्यासाठी लोकप्रबोधन करण्यात येते. महाराष्ट्र जादूटोणाविरोधी विधेयक विधीमंडळात मंजूर व्हावे, यासाठी दाभोलकर गेल्या काही वर्षांपासून कार्यरत होते. यासंदर्भात सातत्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन विधेयकाच्या बाजून सर्वपक्षीय मत बनवण्याचे काम ते करीत होते. समाजातील अनेक भोंदू बाबांचे पितळ दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सप्रयोग उघडे केले होते. विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी’ हे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे पुस्तक. महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची पार्श्वभूमी या पुस्तकातील सर्व लेखांना आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनचा विचार, प्रसार, अंगीकार करण्याचे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे सूत्र या पुस्तकातील सर्व लेखांच्या मुळाशी आहे. या पुस्तकात धर्माची कृतिशील आणि विधायक चिकित्सा केलेली आहे. पुस्तकात छत्तीस लेख आहेत. अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनने त्यांच्यातर्फेचा पहिला समाजगौरव पुरस्कार ’अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ला दिला होता. भारत सरकारने दाभोळकर यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार दिला. अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या महाराष्ट्र फाउंडेशनने २०१३ सालापासून समाजहितार्थ एखाद्या कार्यात वाहून घेणाऱ्या व्यक्तीला डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार सुरू केला आहे. सुप्रसिद्ध तत्त्वचिंतक कै. डॉ. देवदत्त दाभोळकर हे त्यांचे सर्वात थोरले बंधू होते. मा.डॉ.नरेंद्र दाभोळकर यांचे निधन २० ऑगस्ट २०१३ रोजी झाले. आपल्या समूहातर्फे मा.डॉ.नरेंद्र दाभोळकर यांना आदरांजली.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • बॉलीवूड अभिनेत्री बिंदू

    बॉलीवूड अभिनेत्री बिंदू यांचा जन्म १७ एप्रिल १९५१ रोजी झाला. बिंदू यांचे वडील नानूभाई देसाई हे चित्रपट निर्माता होते.

    बिंदू या चारहून अधिक दशके बॉलीवूड मध्ये काम करत आहेत. बिंदू यांनी आपली करीयरची सुरवात १९६९ मध्ये आलेल्या इत्तेफाक व दो रास्ते या चित्रपटापासून केली. आपल्या कारकिर्दीत त्यांनी १६० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. कटीपतंग मधील शबनमच्या अभिनयासाठी व मेरा नाम शबनम या गाण्यासाठी अजूनही लोक बिंदू यांची आठवण काढतात.

    बिंदू यांनी आपल्या इम्हतीहान व हावस या चित्रपटातील कामाने हिंदी चित्रपट उद्योगात वेगळे नाव कमवले. त्यानी व्हॅम्प रोल करण्यास सुरवात केली. या सोबतच त्यांनी अभिमान, अर्जुन पंडित या चित्रपटातील केलेले अभिनय गाजले. जंजीर मधील त्याच्यावरील मोना डार्लिंग डायलॉग प्रसिद्ध झाला.

    बिंदू यांनी आपले बालपणीचे मित्र चंपकलाल झवेरी यांच्याशी लग्न केले.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • शिवचरित्राचे सव्यसाची अभ्यासक निनाद बेडेकर

    छत्रपती शिवाजीमहाराज आणि मराठेशाहीच्या इतिहासावर अधिकारवाणीने बोलू शकणारे निनाद बेडेकर यांची शिवचरित्राचे अभ्यासक अशी ख्याती होती. त्यांचा जन्म १७ ऑगस्ट १९४९ रोजी पुणे येथे झाला. निनाद बेडेकर यांनी मॉडर्न शाळेतील शिक्षणानंतर शासकीय तंत्रनिकेतन येथून अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांच्या मातोश्री या सरदार रास्ते घराण्यातील होत्या. स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी महिलांचे संघटन केले होते. हाच वारसा निनाद बेडेकर यांच्याकडे आला. शिवचरित्राची गोडी लागल्याने बेडेकर इतिहास संशोधनाकडे वळाले.

    इतिहासाच्या अभ्यासासाठी त्यांनी मोडी, फार्सी, उर्दू या लिपींवर प्रभुत्व मिळविले. या लिपीमध्ये असलेल्या हस्तलिखिते आणि कागदपत्रांचे वाचन करून त्यांनी साहित्यनिर्मिती केली. त्याचबरोबरीने बेडेकर यांनी पर्शियन, पोर्तुगीज, फ्रेंच आणि इंग्रजी या परकीय भाषा आत्मसात केल्या. शिवचरित्र आणि १८ व्या शतकात देशभर विस्तारलेले मराठी साम्राज्य या विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. राज्यातील आणि देशातील किल्ल्यांवर भ्रमंती करून शिवकालीन इतिहासामध्ये ते रममाण झाले होते.

    शिवरायांचा राज्यकारभार आणि मराठेशाही संदर्भात त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून लेखन केले. शिवाजीमहाराजांचे युद्धकौशल्य, नेतृत्वगुण, दुर्गबांधणी, आरमार उभारणी या पैलूंचा स्वतंत्रपणे अभ्यास करून त्यांनी लेखन केले होते. शिवरायांची व्यवस्थापकीय कौशल्ये हा विषय ते एमबीएच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये समजावून सांगत असत. लालित्यपूर्ण शैलीमध्ये ऐतिहासिक लेखन करणाऱ्या बेडेकर यांची ‘शिवभूषण’, ‘थोरलं राजं सांगून गेलं’, ‘गजकथा’, ‘हसरा इतिहास’, ‘दुर्गकथा’, ‘विजयदुर्गचे रहस्य’, ‘समरांगण’ आणि ‘झंझावात’ ही निनाद बेडेकर यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी ३५ पुस्तकांसह शेकडो लेख आणि शोधनिबंध लिहिले. गेल्याच महिन्यात त्यांचे ‘अजरामर उद्गार’ हे अखेरचे पुस्तक प्रकाशित झाले होते. इतिहास संशोधनाच्या कार्यामध्ये रममाण होण्यासाठी त्यांनी किर्लोस्कर कमिन्समधील नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. भारत इतिहास संशोधक मंडळ, श्री रायगड स्मारक मंडळ, श्री राजगड स्मारक मंडळ, गोनीदा दुर्गप्रेमी मंडळ या संस्थांशी संबंधित असलेले बेडेकर हे पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धाचे आयोजन करणाऱ्या ‘महाराष्ट्रीय कलोपासक’ संस्थेचे अध्यक्ष होते. निनाद बेडेकर यांना शिवभूषण, दुर्ग साहित्य पुरस्कार, जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार, पुराण पुरुष पुरस्कार, शिवपुण्यतिथी रायगड पुरस्कार या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.

    शनिवारवाडा येथील ध्वनिप्रकाश योजनेमध्ये दाखविल्या जाणाऱ्या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी बेडेकर यांनी संहितालेखन केले होते. गड-किल्ल्यांच्या जतन-संवर्धनासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून निनाद बेडेकर यांची नियुक्ती झाली होती. छत्रपती शिवाजीमहाराज आणि मराठेशाहीच्या इतिहासावर अधिकारवाणीने बोलणाऱ्या अभ्यासकांच्या प्रभावळीमध्ये निनाद बेडेकर यांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. वयाची साठी पूर्ण झाल्यावर २००९ मध्ये बेडेकर यांनी युवक आणि गडप्रेमींना घेऊन ६१ किल्ल्यांवर भ्रमंती करण्याचा संकल्प केला होता. मात्र, त्या वर्षभरात त्यांनी १०१ किल्ल्यांना भेटी दिल्या. निनाद बेडेकर यांचे १० मे २०१५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • कीर्तनकार चारुदत्त आफळे

    कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचा जन्म ३ जून १९६७ रोजी झाला.

    चारुदत्त आफळे उर्फ बुवा शालेय वयापासून आजवर गेली ४० हून अधिक वर्षे चारुदत्त आफळे संगीत रंगभूमीवर कार्यरत आहेत. आफळे घराणे क्षेत्र माहुलीचे सज्जनगडाच्या पायथ्याचे. समर्थ रामदासस्वामींच्या समाधीमंदिराकडून आफळे कुटुंबाला कीर्तनसेवेचे व्रत मिळाले. हे व्रत चारुदत्त आफळे निष्ठेने चालवीत आहेत. वडील गोविंदस्वामी आफळे आणि आई सौ. सुधाताई गोविंद आफळे. गोविंदस्वामी आफळे हे तरुण - बाल - वृद्धांची अलोट गर्दी खेचणारे असे त्यांच्या काळातले ते एकमेव कीर्तनकार होते. तसेच सुधाताईही उत्तम कीर्तन प्रवचन करीत असत. त्या होमिओपॅथीक डॉक्टर ही होत्या. आणि हिंदुमहासभेच्या कट्टर कार्यकर्त्या होत्या. चारुदत्त आफळे यांनी मराठी विषय घेऊन B.A. पदवी प्राप्त केली व संगीत विषय घेऊन M.A. पदवी प्राप्त केली. आणि भक्तीसंगीत व नाट्यसंगीत यावर ते Ph.D. केली आहेत. आई वडिलांकडून मिळालेली समृद्ध कीर्तन विद्या जोपासत असताना – श्री. दत्तदासबुवा घाग, श्री. श्रीपादबुवा ढोले, श्री. सुंदरबुवा मराठे अशा नामवंत कीर्तनकारांचे मार्गदर्शन बुवांना लाभले. बुवांनी त्यांच्या आयुष्यातले पहिले कीर्तन वयाच्या पाचव्या वर्षी केले. शाळा महाविद्यालयात असताना देखील काही कीर्तने केली. पण पूर्णतः कीर्तन सेवा १९८८ पासून सुरु झाली. संगीत शिक्षणासाठी त्यांनी मुकुंदबुवा गोखले, पित्रे बुवा, पं.आगाशे बुवा, पं.शरद गोखले, मधुकर खाडिलकर, पं. विजय बक्षी, ऋषिकेश बडवे अश्या अनेकांचे मार्गदर्शन लाभले. शिलेदार यांच्या मराठी रंगभूमीच्या अनेक संगीत नाटकांना चारुदत्त आफळे यांनी ऑर्गन साथ केली आहे.

    १९८८ ते २०१८ या तीस वर्षांत देश विदेशातून ५००० चे वर कीर्तने त्यांनी केली आहेत. नाट्यप्रयोग, नाट्यगीते कार्यक्रम यांची संख्या वेगळी आहेच. महाराष्ट्रासह इंदोर, उज्जैन (मध्यप्रदेश), बडोदा (गुजरात), ग्वाल्हेर, लखनौ (उत्तरप्रदेश), दिल्ली, कोलकाता (बंगाल), हैद्राबाद (आंध्र), बेळगाव, बेंगलोर (कर्नाटक) इ. प्रांतातून कीर्तन, प्रवचने झाली. श्रीलंका, कुवेत, दुबई, मस्कत, दोहा, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया अशा परदेशातही कीर्तनाचा गजर पोहोचविला.

    कीर्तन करण्याबरोबर अनेक मुलामुलींना ते कीर्तनाचे प्रशिक्षण देतात. राजर्षी शाहू महाराजांवरील शाहू या मालिकेत बालगंधर्वांचे काम करण्याचेही त्यांना भाग्य मिळाले.हेमंती बॅनर्जी कृत बालगंधर्व वरील माहितीपटात बुवांनी बालगंधर्वांची भूमिका केली. ज्या माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.

    नाट्यसेवेसाठी त्यांना पुणे मराठी ग्रंथालयाकडून पाटणकर पुरस्कार मराठी नाट्य परिषदेकडून – पं. पलुस्कर पुरस्कार, बालगंधर्व रसिक मंडळाकडून – बालगंधर्व पुरस्कार, मंगेशकर प्रतिष्ठानाकडून – मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, व या वर्षी पुणे महानगर पालिकेकडून "बालगंधर्व पुरस्कार" असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • साधना शिवदासानी

    वैशिष्ट्यपूर्ण केशरचनेमुळे एकेकाळी "फॅशन आयकॉन‘ म्हणून ओळखल्या जाणारी गुणी अभिनेत्री साधना शिवदासानी नय्यर तथा साधना यांचा जन्म २ सप्टेंबर १९४१ रोजी झाला. प्रसिद्ध नृत्यांगना साधना बोस यांच्या नावावरून साधना यांच्या वडिलांनी त्यांचे नाव साधना असे ठेवले होते.

    साधना शिवदासानी यांचे पुढील शिक्षण मुंबईतच झाले. चर्चगेट येथील जय हिंद महाविद्यालयात त्या शिकल्या. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. यशस्वी अभिनेत्री बनण्याचे त्यांचे स्वप्न होते. कुटुंबाचा त्यांना पूर्ण पाठिंबा होता. वडिलांनी त्यांचे हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी मेहनत घेतली. १५ वर्षांच्या साधनाला महाविद्यालयातील एका नाटकात भूमिका करताना काही निर्मात्यांनी पाहिले आणि चित्रपटांत काम करण्याची संधी दिली. १९५८ मध्ये "अबाना‘ या भारतातील पहिल्या सिंधी चित्रपटाद्वारे त्यांनी अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटाचे मानधन म्हणून त्यांना एक रुपया मिळाला होता.

    प्रसिद्ध निर्माते शशिधर मुखर्जींनी साधना यांचा 'स्क्रीन' मॅगझिनमधील फोटो पाहून त्यांना आपल्या अभिनय प्रशिक्षण शाळेत प्रवेश दिला, आणि 'लव्ह इन सिमला' या चित्रपटात प्रमुख भूमिका दिली. अभिनेता जॉय मुखर्जी यांच्यासोबतचा हा चित्रपट खूप गाजला आणि साधना यांची यशस्वी कारकीर्द सुरू झाली. त्या चित्रपटातील त्यांची हेअरस्टाईल पुढे 'साधना कट' या नावाने खूप प्रसिद्ध झाली. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान साधना आणि आर.के. नय्यर यांचे प्रेम जमले. पुढे त्यांनी विवाह केला. त्यांनी ‘गीता मेरा नाम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. अनीता, मेरा साया आणि वो कौन थी या चित्रपटांमुळे त्यांना इंडस्ट्रीमध्ये ‘मिस्ट्री गर्ल’ म्हणूनच ओळखले जायचे.

    मनोज कुमारसोबत त्यांनी केलेल्या "वो कौन थी‘ चित्रपटातील त्यांचा डबल रोल खूप गाजला. या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर नामांकनही मिळाले. मा.साधना यांचे २५ डिसेंबर २०१५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • हिंदी चित्रपट अभिनेते आशुतोष राणा

    १९९४ मध्ये महेश भट्ट यांच्या ‘स्वाभिमान’ मालिकेतील ‘त्यागी’ या पहिल्याच भूमिकेतून सर्वांचे लक्ष वेधणारा अभिनेता आशुतोष राणा पुढे ‘दुश्मन’ आणि ‘संघर्ष’सारख्या चित्रपटांतून दज्रेदार आणि प्रभावी खलनायकाच्या भूमिकेत दमदारपणे उभा राहिला. दुश्मन सिनेमातील दमदार अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.