(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • सॅक्सोफोनचे जादूगार मनोहारी सिंग

    मनोहारी सिंग यांचे घराणे वादकांचेच असल्यामुळे बालपणापासून त्यांच्यावर संगीताचे संस्कार झाले. त्यांची वाद्यवादनाची सुरुवात पाश्चात्त्य बासरी (क्लॅरोनेट) आणि मेंडोलीन या वाद्यांपासून झाली. अखेर सॅक्सोफोन या वाद्याला त्यांनी आपलेसे केले व त्यावर हुकूमत मिळविली.

  • व्हिताज बलसारा उर्फ व्ही.बलसारा

    संगीतावर हुकूमत गाजविणारा कुशल कलाकार, प्रतिभासंपन्न संगीतकार व जागतिक कीर्तीचे पियानोवादक व्हिताज बलसारा यांचा जन्म २२ जुन १९२२ रोजी झाला.

    व्हिताज अर्देशर बलसारा उर्फ व्ही. बलसारा हे पारशी असून सुद्धा व्ही.बलसारा यांनी एकेकाळी आपला हार्मोनियम, ऑर्गन व पियानोच्या अप्रतिम साथीने अवघ्या हिंदी फिल्मी संगीतावर हुकूमत गाजवली.

    व्ही. बलसारा यांना हिंदी चित्रपटसृष्टीत जंटलमन म्युझीशयन म्हणत असत.
    ‘त्यांना संगीताचं बाळकडू आईकडून मिळालं. तीच पहिली गुरू. संगीताची गोडी त्यांना बालपणापासूनच होती. घरी पियानो नव्हता. गोव्याच्या शिक्षकांनी त्यांना पियानो व व्हायोलिनचं शास्त्रशुद्ध शिक्षण दिलं. गायनाचे प्राथमिक धडे त्यांनी फ्रामरोज श्रॉफ व पुढे बडोदा संस्थानचे उस्ताद बच्चूमियाँ यांच्याकडे गिरवले. १९३८ साल होतं. जुहूर राजा यांच्या ‘बादल’ चित्रपटासाठी बरेलीचे खानसाहेब मुश्ताक हुसैन संगीत दिग्दर्शक होते. ध्वनिमुद्रणाच्या वेळी त्यांचा नेहमीचा साजिंदा आला नाही, तेव्हा आयत्या वेळी व्ही. बलसारा पियानो वाजवण्यास बोलवले. तेव्हा वय होतं फक्त १६ वर्ष. व्ही. बलसारा यांच्या वादनशैलीवर खुश होऊन खानसाहेबांनी तिथल्या तिथे माझी दुय्यम सहायक म्हणून नेमणूक केली.’’ मा.व्ही.बलसारा यांनी ‘जिना सिखो’मध्ये पं. हनुमान प्रसादबरोबर, जुहूर राजासाठी ‘मझाक’मध्ये, ‘दोस्त’मध्ये सज्जाद हुसैनबरोबर, ‘रंगमहल’मध्ये मा.दत्ता कोरगावकर यांचा सहायक म्हणून काम केलं. त्यावेळी अॅ रेंजरचं नाव चित्रपटाच्या श्रेयनामावलीत येत नसे. मास्टर गुलाम यांनी मा.व्ही. बलसारा यांना स्वत:च्या मुलाप्रमाणे सांभाळलं. दत्ता कोरगावकर व मदन मोहननी सख्ख्या भावाचं प्रेम दिलं. शंकर-जयकिशननी तर अगदी ‘बरसात’पासून ते मुंबई सोडेपर्यंत एकही गाणं त्यांचे ऑर्गन अथवा हार्मोनियमवर असल्याशिवाय ध्वनिमुद्रित केलं नाही. मा.व्ही. बलसारा यांनी ‘‘‘आऽ इन्तजार हैं तेरा’ (बडी माँ), ‘चकोरी का चंदा से प्यार’ (दामन), ‘कोई प्रेम का दे के संदेसा’ (दोस्त), ‘कैसे कोई जिए’ (बादबान), ‘तारा री यारा री’ (दास्तान), ‘लो प्यार की हो गई जीत’ (जादू), याशिवाय शंकर-जयकिशन यांची ‘आवारा’, ‘बरसात’, ‘बादल’, ‘दाग’, ‘आंस’, ‘आह’, ‘पतिता’, ‘बादशहा’, ‘श्री ४२०’, ‘काली घटा’, ‘चोरी चोरी’ अशा अनेक चित्रपटांतील वाजवलेली गाणी अजून लोकांच्या लक्षात आहेत.’’ मा.व्ही.बलसारा हे पियानो, हार्मोनियमशिवाय व्हायोलिन, मेंडोलिनही वाजवत असत. त्या वादनामध्ये सतत ते निरनिगळे प्रयोग करीत असत. ते हार्मोनियमवर पाश्चिमात्य संगीत वाजव असत, त्यावेळी हार्मोनियमचा सूर अॅीकॉर्डियनसारखा येत असे. उदा. ‘ऐ मेरे दिल कही’ (दाग), ‘याद किया दिलने’ (पतिता) हे गाणं, पियानोवर जेव्हा ते वाजवत असत त्याला भारतीय संगीताची जोड देऊन तेव्हा पियानोवर सरोद, जलतरंग अथवा संतूरसारखा आवाज आणत असत. त्यांनी काउंटर मेलडी वाजवण्याची एक वेगळी शैली निर्माण केली ती सिनेशौकिनांना आवडली.’ १९४३ साली सर्कस गर्ल या चित्रपटाला संगीत देऊन मा.व्ही.बलसारा यांनी आपली संगीतकाराची कारकीर्द सुरुवात केली.ओ पंछी, रंगमहाल, मदमस्त, तलाश,चार दोस्त, विद्यापती और प्यार, अशा अनेक चित्रपटाना संगीत दिले. त्यांनी अनेक बंगाली चित्रपटाना सुद्धा संगीत दिले. मा.व्ही.बलसारा यांना ‘‘आयझ्ॉक डेव्हिड (स्पॅनिश मेंडोलिन), रामसिंग (सॅक्सोफोन), रामनारायण (सारंगी), अब्दुल करीम लाला (ढोलक व ढोलकी), कर्नाड, नार्वेकर (व्हायोलिन) यांसारखे अनेक कलाकारांनी साथ दिली. मा.व्ही.बलसारा यांचे निधन २४ मार्च २००५ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट / मा.अरुण पुराणिक

    व्ही.बलसारा
    https://www.youtube.com/watch?v=sBnWhzMYXJY

    https://www.youtube.com/watch?v=thXUWWYPsMo

  • हॉलीवूड अभिनेता ग्रेगरी पेक

    ग्रेगरी पेक हे हॉलिवुडमधला स्टाइल आयकॉन होते. त्यांचा जन्म ५ एप्रिल १९१६ रोजी झाला. १९४० ते १९६० पर्यतचं दशक ग्रेगरी पेक यांनी गाजवला. ‘मॅकेनाज् गोल्ड’च्या मुळे युवा पिढीमध्ये ते लोकप्रिय झाले. १९५३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘रोमन हॉलिडे’, १९६१ मध्ये आलेला ‘गन्स ऑफ नेव्हरॉन’, ‘केप फियर’, ‘मॅकआर्थर’, ‘ओमेन-१’, ‘केप फियर’चा रिमेक यांनी बॉक्स ऑफिस गाजवलं. ग्रेगरी पेक यांना पाच सिनेमांमधील भूमिकांसाठी ऑस्कर नामांकन मिळाले होतं. ‘द कीज् ऑफ द किंग्डम’, ‘द यर्लिग’, ‘जंटलमन्स अॅमग्रीमेंट’, ‘ट्वेल्व ओक्लॉक हाय’ या चित्रपटाना ऑस्कर जिंकता आले नाही. पण ‘टू किल अ मॉकिंग बर्ड’साठी ग्रेगरी पेक यांनी त्यांच्या आयुष्यातील एकमेव ऑस्कर जिंकले. ग्रेगरी पेक यांना अमेरिकन सिनेमाचा आदर्श मानलं गेले, कारण त्यानी केलेली बरीचशी पात्रं आदर्शवादी, तत्त्ववादी असत. भारतात मा.देवआनंद यांनी त्यांची छबी उचलली आणि लोकप्रिय केली. देव आनंद हिंदी चित्रपटसृष्टीतला ग्रेगरी पेक होता.

    ग्रेगरी पेक यांचे १२ जून २००३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

  • मराठीतील प्रसिद्ध नाट्यअभिनेते डॉ. दाजी भाटवडेकर

    केशवचंद्र मोरेश्वर भाटवडेकर ऊर्फ दाजी भाटवडेकर मूळचे मुंबईचे. त्यांचा जन्म १५ सप्टेंबर १९२१ रोजी झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात दाजींचे आजोबा मुंबईतील एक प्रख्यात डॉक्टर होते. त्याकाळी त्यांना मुंबईचे महापौरपदही मिळाले होते. त्यांचे घराणे संपन्नत असले तरी घरांत धार्मिक आणि संस्कृती जपणारे वातावरण होते.दर एकादशीला घरात कीर्तन आणि भजनाचा कार्यक्रम होत असे. दर पंधरवड्याला होणाऱ्या असल्या कार्यक्रमातील नाट्याचा आणि कथानकांचा दाजींच्या मनावर खोल परिणाम झाला. ते कीर्तनकार बुबांच्या आवाजाची आणि बोलण्याच्या ढंगाची हुबेहूब नक्कल करीत असत.

    भरदार आवाजाची देणगी मिळालेल्या दाजींनी संगीत नाटकांत भूमिका करायला सुरुवात केली. दाजींच्या दुर्दैवाने पुढे मराठी संगीत रंगभूमीला उतरती कळा लागली. संभाषणात नाटकी अभिनिवेशाने बोलण्याच्या जागी वास्तव शैलीने बोलायची पद्धत पडू लागली. मग दाजींनी आपला मोहरा संगीत रंगभूमीकडे वळवला. दाजी स्वतः उच्चशिक्षित आणि संस्कृ त नाटकांचे गाढे अभ्यासक असल्याने त्यांना संस्कृत रंगभूमीची चळवळ सुरू करायला फारशी अडचण पडली नाही.. मुंबईच्या ब्राह्मण सभेत त्यांनी १९५० ते १९८० या काळात दर वर्षाला एक नवे संस्कृत नाटक रंगभूमीवर आणले.

    कालिदास महोत्सवाच्या काळात दाजींनी ’अभिज्ञान शाकुंतल’ या संस्कृत नाटकाचा प्रयोग भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि अन्य सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीत सादर करून वाहवा मिळवली. संस्कृत नाटकांनाही पुढे प्रेक्षक मिळेनासे झाले. मात्र, ही नाटके सादर करताना काय काय अनुभव आणि अडचणी आल्या यावर दाजींनी लिहिलेला प्रबंध मुंबई विद्यापीठाने स्वीकारून त्यांनी डॉक्टरेट दिली. दाजींच्या संस्कृत रंगभूमीवरील योगदानाबद्दल भारतरत्न महामहोपाध्याय डॉ. पां. वा. काणे यांनी त्यांच्या एका ग्रंथातील परिशिष्टात खास उल्लेख केला आहे. मराठी रंगभूमीबरोबरच इंग्रजी, संस्कृत आणि हिंदी रंगभूमीवरही त्यांनी काम केले. दाजी भाटवडेकर यांचे २६ डिसेंबर २००६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    दाजी भाटवडेकर यांचा अभिनय असलेली नाटके आणि त्यातील त्यांची भूमिका
    एकच प्याला (सुधाकर), कृष्ण द्वीप (हिंदी), दुर्गा (जिवाजीराव), मानापमान (लक्ष्मीधर, विलासधर), मृच्छकटिक (शकार), बॉर्न येस्टरडे (इंग्रजी, दिग्दर्शक - हर्बर्ट मार्शल), भाऊबंदकी (तुळोजी, राघोबा, सखाराम बापू), भावबंधन (घनश्याम, धनेश्वर, मोरू), म्युनिसिपालिटी (पांडोबा), लग्नाची बेडी ( कांचन, गोकर्ण, तिमिर), शारदा ( कांचनशेट, भद्रेश्वर), संशयकल्लोळ (फाल्गुनराव, वैशाखशेठ), सौभद्र (बलराम)
    स्वयंवर (रुक्मी).

  • विधायक चळवळीचे जनक लेफ्टनन्ट जनरल  लॉर्ड बेडन पावेल

    २२ फेब्रुवारी स्काउट व गाईड्स या अवघ्या जगाला व्यापून टाकणाऱ्या विधायक चळवळीचे जनक लेफ्टनन्ट जनरल लॉर्ड बेडन पावेल यांचा स्मृतीदिन. यांचा जन्म दि. २२ फेब्रुवारी १८५७ रोजी लंडन येथे झाला.

    लॉर्ड बेडन पावेल यांचे पूर्ण नाव रॉबर्ट स्टीफन्स स्मिथ बेडन पॉवेल. लंडन मधील चार्टर औस ह्या शाळेत शिष्यवृती मिळवून त्यांनी शिक्षण केले. १८७६ साली लष्करात त्यांना कमिशन मिळाले. त्यानंतर त्यांनी दक्षिण अफ्रीका, अफगाणिस्थान, भारत अशा विविध ठिकाणी कामगिरी बजावली. आपल्या कर्तुत्वावर ते लेफ्टनंट जनरल या पदापर्यंत पोचले. १९०७ साली त्यांनी; बालवीर’ चळवळ सुरु केली.थोड्याच दिवसात हि चळवळ अनेक देशात पसरली. १९१० साली आपली बहिण ओंग्रेस हिच्या मदतीने त्यांनी मुलींसाठी ‘वीरबाला’ हि संघटना स्थापन केली.विवाहा नंतर ह्या संघटनेची जबाबदारी त्यांच्या पत्नीने लेडी-बोडन- पॉवेल यांनी सांभाळली संघटनेच्या स्थापने पासून ६-७ वर्षातच या संघटनेची पथके बेल्जियम, हॉलंड, अमेरिका, भारत, चीन, रशिया राष्ट्राने मध्ये सुरु झाली. संघटनेची पाहणी करण्या करीता. या पती-पत्नी ने सर्व देशाना भेटी दिल्या. त्यात भारतालाहि त्यांनी १९२१व १९३७ साली भेट दिली होती.

    भारतात १९१७ साली पं. मदनमोहन मालवीय यांनी बॉइज स्काउट चळवळ सुरु केली. १९२१ साली लॉर्ड बेडन पॉवेल यांनी सर्व संस्था एकत्र केल्या व त्याचे नाव बाय स्काउट ठेवले.१९३८ हिंदुस्थानात स्काउट असोसीएेयन ची स्थापना केली. त्यात हिंदुस्थान स्काउट. बायस्काउट ,गर्ल गाईड हे भाग होते. ७ नोहेंबर १९५० मध्ये एकत्रित होऊन ‘भारत स्काउट & गाईड ‘ असोशियन हे नाव दिले.

    भारतीय मुलांना मातृभूमीचे उत्तम नागरिक बनविण्यात सहकार्य करणे हा उद्द्येश होय. ईश्वरा विषयी पूज्य भावना, स्वहितापेक्षा देशहित मोठे, शेजारी व इतराच्या विषयी सेवाभावाचे बीज रुजावे हा उद्देश होय. सर्वजगात बंधुभाव, ऐक्य , व शांतता नांदावी, समान ध्येयाच्या संस्थांशी मित्रत्व राहील हे धोरण स्काउट चे आहे. लॉर्ड बेडन पॉवेल यांचे ८ जानेवारी १९४१ रोजी निधन झाले.

    -संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • विख्यात समालोचक विल्यम मॉरिस तथा बिल लॉरी

    बिल लॉरी हे भक्कम आणि अतिशय चिवट फलंदाज होते. रॉबर्ट ‘बॉबी’ सिम्पसन आणि बिल लॉरी या सलामीच्या जोडीने एक काळ गाजवला. लॉरी नंतर कर्णधार झाले.

  • आपल्या सौंदर्य,अभिनय,नृत्य या गुणांमुळे ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री गडकर

    कर्नाटकातील कारवार जिल्ह्यात जन्मलेल्या जयश्री गडकर यांनी बालकलाकार म्हणून अभिनयाची कारकिर्द सुरू केली. त्यांचा जन्म २१ फेब्रुवारी १९४२ रोजी कणसगिरी, कारवार जिल्ह्यात झाला.व्ही. शांताराम यांच्या ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटात एका गाण्यात संध्या यांच्यामागे समूहात नृत्य करणारी एक युवती असा मा.जयश्रीजींचा प्रवास सुरू झाला व पुढे जाऊन जयश्री गडकर नावाचा एक अलौकिक इतिहास आकाराला आला. ‘आलिया भोगासी’ या चित्रपटापासून त्यांची नायिका म्हणून कारकीर्द सुरू झाली. त्यांच्या महत्त्वाच्या चित्रपटांच्या नावांत ‘सांगत्ये ऐका’, ‘अवघाची संसार’, ‘मानिनी’, ‘रंगपंचमी’, ‘शाहीर परशुराम’, ‘बाप माझा ब्रह्मचारी’, ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘सवाल माझा ऐका’, ‘वैशाख वणवा’, ‘साधी माणसं’, ‘पाटलाची सून’, ‘एक गाव बारा भानगडी’, ‘जिव्हाळा’, ‘घरकुल’, ‘सुगंधी कट्टा’ यांचा समावेश होतो, पण अशा केवळ चित्रपटांच्या नावानेच त्यांचे मोठेपण मोजणे त्यांच्यावर अन्यायकारक ठरेल. तमाशाप्रधान ग्रामीण चित्रपटाची नायिका अशी त्यांची ‘ओळख’ घट्ट झाली असता त्या शहरी भूमिकेला न्याय देऊ शकणार नाहीत, अशा होणाऱ्या चर्चेला त्यांनी ‘मानिनी’ चित्रपटातूनच चोख उत्तर दिले. दिग्दर्शक अनंत माने यांच्या १९ चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या व त्यांना त्या आपल्या गुरू मानत. त्यांना त्या अण्णा म्हणत. हंसा वाडकर यांच्यानंतर तमाशा - लावणीपटात त्यांची जागा कोण भरून काढेल आणि सोज्वळ, सात्विक भूमिका करणा-या सुलोचनाबाईंच्या जागी कोणाला घ्यावं, या प्रश् ‍ नांना जयश्री गडकर यांनी आपल्या चतुरस्त्र आणि कसदार अभिनयाने उत्तर दिलं. अष्टपैलू अभिनेत्री असाच यांचा वावर मराठी चित्रपटसृष्टीत राहिला. ‘सांगत्ये ऐका’, ‘ सवाल माझा ऐका’, ‘ एक गाव बारा भानगडी ’ यांसारखे तमाशापट, ‘ मानिनी’ , वैशाख-वणवा ’ सारखे सोज्वळ चित्रपट तर ‘ मोहित्यांची मंजुळा’ सारखे ऐतिहासिक चित्रपटात त्यांनी विविधांगी भूमिका केल्या होत्या. अभिनय क्षेत्रातल्या त्यांच्या कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा २००३ सालचा व्ही. शांताराम पुरस्कार, विविध चित्रपटांसाठी राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले होते. मराठी चित्रपट महामंडळातर्फेही त्यांना चित्रभूषण ' जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. अभिनेते बाळ धुरी यांची ती पत्नी होती. मा.जयश्री गडकर यांचे २९ ऑगस्ट २००८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    जयश्री गडकर यांची गाणी.
    ‘बुगडी माझी सांडली गं जाता साताऱ्याला’
    ‘गेला हटकून बाई भरल्या बाजारात’
    ‘बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला’
    ‘तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण नाक्याचं’
    ‘फड सांभाळ तुऱ्याला ग आला’
    ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’
    ‘माळ्याच्या मळ्यामदि पाटाचं पानी जातं’
    ऐरनीच्या देवा तुला ठिनगी ठिनगी न्हाऊ दे’
    ‘कशी गौळण राधा बावरली’
    ‘चढाओढीनं चढवीत होते’
    ‘नाचू किती लाजू किती कंबर लचकली’

  • अभिनेते , चित्रकार श्री. चंद्रकांत मांढरे

    चंद्रकांत यांनी ‘ ज्वाला ‘ या चित्रपटात अभिनेते चंद्रमोहन यांच्याबरोबर १९३८ मध्ये अभिनय केला. त्याच वर्षी भालजी पेंढारकर यांच्या ‘ राजा गोपीचंद ‘ या चित्रपटासाठी साठी त्यांनी चंद्रकांत यांना बोलवले आणि त्यांचे सिनेसृष्टीसाठी पहिल्यांदा ‘ चंद्रकांत ‘ हे नाव ठेवले.

  • कोथरुडचे शिल्पकार मा. शशिकांत सुतार

    भाऊ अशी ओळख असलेले मा.शशिकांत सुतार हे त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे शिवसेनेचे उपनेते म्हणून कायम चर्चेत राहिले आहेत. साधेपणा हे तर भाऊंचे आभूषण, पांढऱ्या पायजमा कुर्त्यात वावरणाऱ्या भाऊ हे आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जुने सहकारी होत.

  • दिग्दर्शक शक्ती सामंता

    शक्ती सामंता यांच्या आराधना , अमानुष , अनुराग या चित्रपटांना फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळाले. इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशनचे ते पाच वर्षे अध्यक्ष होते. त्यांनी अनेक मोठी हुद्द्यांची पदे भूषवली.