(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • १० मे – कवी ग्रेस यांची जयंती

    कवी ग्रेस हे मराठी कवितेच्या प्रांतावर मौलिक ठसा उमटवून गेलेले कवी...'ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता' या काव्याने घरोघरी पोहचलेले माणिक गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस. त्यांचा जन्म १० मे १९३७ रोजी झाला.

    माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस यांची मर्ढेकरोत्तर नव कवींच्या दुसऱ्या पिढीतील प्रमुख कवींमध्ये गणना होते. ग्रेस मूळचे नागपूरचे. त्यांचे वडील सैन्यात होते. नागपुरातील कर्नल बाग परिसरात त्यांचं बालपण हलाखीच्या परिस्थितीत गेलं. आईच्या अकाली निधनामुळे नोकरी व शिक्षण यांच्यात मेळ साधत त्यांना आपली प्रतिभा जपावी लागली. १९६६ मध्ये ते नागपूर विद्यापीठातून मराठीमध्ये एम.ए. झाले. त्यानंतर दोन वर्षं त्यांनी धनवटे नॅशनल कॉलेजमधे अधिव्याख्याता म्हणून नोकरी केली. १९६८ पासून १९९७ साली निवृत्त होईपर्यंत ते नागपूरमधील वसंतराव नाईक समाजविज्ञान संस्थेत (मॉरिस कॉलेज) मराठीचे प्राध्यापक होते. निवृत्तीनंतर काही काळ ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या मराठी विभागात सौंदर्यशास्त्र या विषयाचं अध्यापनही करत होते. ग्रेस यांच्या लिखाणाला सुरुवात झाली १९५५ सालापासून. 'छंद', 'सत्यकथा' या नियतकालिकांमधून त्यांच्या कविता सुरुवातीला प्रसिद्ध झाल्या. १९६७ साली त्यांचा पहिला काव्यसंग्रह 'संध्याकाळच्या कविता' प्रसिद्ध झाला. त्यांचं समकालीन कवितेत असलेलं वेगळेपण या कविता संग्रहामुळे अधोरेखित झालं. मुक्तछंदाचा प्रभाव असणाऱ्या या काळात ग्रेस यांनी निष्ठेने वृत्तबद्ध आणि नादानुसारी लयविभोर काव्यरचना केली.त्यामुळे त्यांची कविता सौंदर्यवादी असूनही तिला अभिजाततेची वैशिष्ट्यं प्राप्त झाली. यानंतर प्रसिद्ध झालेल्या राजपुत्र आणि डार्लिंग (१९७४), चंद्रमाधवीचे प्रदेश (१९७७), सांध्यपर्वातील वैष्णवी (१९९५), सांजभयाच्या साजणी (२००६) आदी संग्रहांमधून त्यांची कविता अधिक गूढ आणि व्यामिश्र होत गेलेली जाणवते. मा.ग्रेस हे विलक्षण आत्ममग्न कवी होते. ग्रेस एक बेट आहे आणि या बेटाला समजून घेण्यासाठी त्या बेटावरच यावे लागते असे मा.ग्रेस वारंवार म्हणायचे. मा.ग्रेस यांचे मराठीसोबत इंग्रजी व उर्दू भाषांवर प्रभुत्व होतं. त्यांच्या कवितांमधून याचा प्रत्यय येतोच, पण त्यांच्या व्याख्यानांमधे व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत त्यांनी केलेल्या कार्यक्रमांमधूनही त्यांच्या प्रखर वाणीचा अनुभव रसिकांना येत असे. मा.ग्रेस यांच्या काव्याइतकीच मोहिनी त्यांच्या ललित लेखनानेही वाचकांच्या मनावर घातली आहे. 'चर्चबेल' हा त्यांचा पहिला ललित लेख संग्रह १९७४ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर 'मितवा', 'संध्यामग्न पुरुषाची लक्षणे', 'मृगजळाचे बांधकाम', 'वाऱ्याने हलते रान', 'ओल्या वेळूची बासरी' हे त्यांचे ललित लेख संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. " मा.माणिक गोडघाटे यांनी कवी म्हणून 'ग्रेस' हे नाव धारण करण्यामागे कारण ठरली ती लोकप्रिय पाश्चात्त्य अभिनेत्री इन्ग्रीड बर्गमन. 'द इन ऑफ द सिक्स्थ हॅपिनेस' या चित्रपटात इन्ग्रीडसंबंधी 'शी इज इन ग्रेस' असं वाक्य उच्चारलं जातं. हे वाक्य ऐकल्यानंतर आपल्या आत्म्यावरची धूळ उडाली आणि आपल्याला प्रतिभेचा पहिला साक्षात्कार झाला, असं ग्रेस यांनी म्हटलं आहे. इन्ग्रीडचे ऋण आठवणीत राहावं यासाठी त्यांनी कायमस्वरूपी 'ग्रेस' हेच नाव लावलं. स्वतःला त्यांनी दुःखाच्या स्वाधीन केले होते. त्याबाबतीत त्यांनी म्हटलेले आहे, "मी महाकवी दुःखाचा म्हणत, दुःखाचा धागा विणताना, दगडाचे माझ्या हाती, वेगाने फूल होते'. मा.ग्रेस यांच्या ‘ती आई होती म्हणुनि...’ या गीताबद्दल, मा.ग्रेस यांच्या आईचे जेव्हा निधन झाले, त्यांना ही कविता सुचली. त्यांच्या विषण्ण मनाने ही कविता लिहिली. ग्रेस यांच्या कवितेतल्या शब्दांना हृदयनाथ मंगेशकरांच्या सुरांनी साद घातली आणि एक अजरामर गीत जन्माला आलं...

    ती गेली तेव्हा रिमझिम
    पाऊस निनादत होता
    मेघात अडकली किरणे
    हा सूर्य सोडवीत होता...

    पावसाचा रिमझिम निनाद दु:खाचा सांगावा घेऊन येणारा...आई गेल्यानंतरचं पोरकेपण सांगणारा...जाणारी ती आई होती म्हणून घनव्याकूळ करणारा... हृदयनाथ मंगेशकरांच्या स्वरांमधून ग्रेस यांची ही कविता ऐकताना आपल्या मनाची अवस्था कशी होते हे सांगण्यासाठी शब्द बापुडे होतात. पावसाच्या प्रत्येक थेंबात दु:ख ठिबकत राहावं ना, अगदी तसच वाटत राहतं. त्यांच्या इतर ''भय इथले संपत नाही'',घर थकलेले संन्यासी '',पाऊस कधीच पडतो''अशा या सुंदर कवितांना ही हृदयनाथ यांनी आपल्या सुरेल स्वरांच्या कोंदणात बसवून अजरामर केले आहे. ग्रेस यांच्या ''संध्याकाळच्या कविता''या संग्रहाला १९६८ मध्ये महाराष्ट्र सरकारचे ''कवी केशवसुत''पारितोषिक मिळाले .त्यांच्या ''वाऱ्याने हलते रान'' या ललितबंध संग्रहाला २०१२ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.२०१२ साली ''युनिक फीचर्स ''ने आयोजित केलेल्या ''दुसऱ्या मराठी ई साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद त्यांनी भूषविले होते. हिंदी चित्रपटसृष्टीतील अतिशय गुणी व प्रतिभाशाली संगीतकार रोशन हे ग्रेस यांचे आवडते संगीतकार. 'चर्चबेल' या ललित गद्याच्या पुस्तकात ग्रेस यांचा 'रोशनची गाणी' या शीर्षकाचा अतिशय सुंदर लेख आहे. त्यात सुरवातीलाच ग्रेस म्हणतात, 'मी रोशनचे छायाचित्र पाहिले आहे, पण त्याला भेटू शकलो नाही. भेटायची खूप इच्छा होती. अशा ब-याच गोष्टी राहून गेल्या आहेत; राहून जातात. मृत्यू असं काही करुन जातो.' ग्रेसनी, रोशन यांनी संगीतबद्ध केलेल्या 'बहुबेगम' चित्रपटातील कव्वालीतील वाकिफ़ हूं खूब इश्क की तर्जे-बयां से मैं, ऐसे में तुझको ढूंढके लाऊं कहां से मैं! या ओळी उद़्धृत करुन, रोशनना आदरांजली वाहिली होती. ग्रेस यांचे २६ मार्च २०१२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    ग्रेस यांचे कवितासंग्रह
    संध्याकाळच्या कविता (१९६७)
    राजपुत्र आणि डार्लिंग (१९७४)
    चंद्रमाधवीचे प्रदेश (१९७७)
    सांध्यपर्वातील वैष्णवी (१९९५)
    सांजभयाच्या साजणी (२००६)
    बाई! जोगिया पुरुष (२०१२)

    ललितबंध संग्रह
    चर्चबेल (१९७४)
    मितवा (१९८७)
    संध्यामग्न पुरुषाची लक्षणे (२०००)
    मृगजळाचे बांधकाम (२००३)
    वाऱ्याने हलते रान (२००८)
    कावळे उडाले स्वामी (२०१०)
    ओल्या वेळूची बासरी (२०१२)

    ती गेली तेंव्हा रिमझिम पाऊस होता
    https://youtu.be/pM3eOOP786w
    भय इथले संपत नाही.
    https://youtu.be/x88r7JI4ljU
    तुला पाहिलें मी नदीच्या किनारीं
    https://youtu.be/e_-9GiAMInY

  • हॉटमेल’चे सबीर भाटिया

    पहिल्याच वर्षी हॉटमेलने सगळ्यात प्रसिद्ध असलेल्या अमेरिकन ऑनलाईन (AOL) या ई-मेल कंपनीलाही मागं टाकलं. अमेरिका ऑनलाइनला सहा वर्षांत जेवढे ग्राहक मिळाले त्यापेक्षाही जास्त ग्राहक हॉटमेलला दोन वर्षांत मिळाले!

  • कोबोल या भाषेची निर्माती ग्रेस हॉपर

    कंप्यूटरच्या भाषांपैकी एक "कोबोल" या भाषेची निर्माती ग्रेस हॉपर यांचा जन्म ९ डिसेंबर १९०६ रोजी न्यूयॉर्क येथे झाला. सुमारे ८० वर्षांपूर्वी "इंटरनेट'चे अस्तित्व कुणाला माहिती नव्हते. संगणकविज्ञान ही शाखा अगदी नवी होती. संशोधनाची साधने नव्हती. अशा परिस्थितीत संगणकविज्ञान आत्मसात करून "प्रोग्रॅमिंग'मध्ये अजरामर योगदान देणाऱ्या ग्रेस मरे हॉपर या पहिल्या महिला शास्त्रज्ञ! आपल्या असामान्य बुद्धीवैभवाने त्या अमेरिकन नौदलातल्या पहिल्या "नेव्हल ऑफिसर' ठरल्या.

    संगणकशास्त्र आणि नौदलातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी नावाजलेली ज्येष्ठ महिला शास्त्रज्ञ म्हणजे रिअर ऍडमिरल ग्रेस मरे हॉपर. संगणक प्रोग्रॅमिंगच्या भाषेची पहिली संकलक अशी ग्रेसची ओळख आहे. बहुआयामी व्यक्तिमत्त्व आणि अमेरिकन नौदलातील असामान्य कामगिरीमुळे त्यांचा उल्लेख "अमेझिंग ग्रेस' असाही केला जातो. इतकेच नव्हे तर यू. एस. नेव्ही डिस्ट्रॉयरला "यू. एस.एस. हॉपर" हे नाव त्यांच्याच नावावरून दिले गेले आहे, हा केवढा मोठा गौरव आहे.

    ग्रेस मरे हॉपर यांचे शालेय शिक्षणही न्यूयॉर्क येथे झाले. त्यांनी गणित आणि भौतिकशास्त्रातील पहिली पदवीही तेथेच मिळवली. १९४१ मध्ये जेव्हा जपानने पर्ल हार्बरवर अचानक हल्ला केला, तेव्हा ग्रेसला नाविक दलात प्रवेश हवा होता. तो तिला मिळाला नाही. तिचे चौतीस हे वय त्यांना जास्त वाटले होते. शिवाय तिच्या पाच फूट सहा इंच उंचीच्या मानाने तिचे वजन नौदलाच्या प्रमाणाप्रमाणे सोळा पौंड कमी भरले. शासनाने तिचे गणितातील पदव्युत्तर शिक्षण पाहून गणितात अध्यापन करण्याचा निर्णय घेतलं आणि तिला सैनिकाऐवजी नागरिक राहण्याचा आदेश दिला. तरीही निराश न होता, तिने खटपट करून अमेरिकन नौदलाच्या राखीव सेनेत नेमणूक मिळवली. लेफ्टनंट हा हुद्दा तिला देण्यात आला आणि दुस-या युद्धाच्या धामधुमीत नौदलाच्या "Ordnance Computation Project" या विशेष प्रकल्पावर तिला धाडण्यात आले. वयाच्या साठाव्या वर्षी ती नौदलातून निवृत्त झाली. पण एका वर्षातच तिला पुनः बोलावण्यात आले. नौदलाच्या सर्व संगणकीय कामाचे प्रमाणीकरण करण्याच्या कामात समन्वय आणण्यासाठी तिची नेमणूक झाली. यापूर्वी तिला आदेशा बरहुकूम काम करण्याचा अनुभव होता. आता सबंध नौदलातील नोकरशाहीशी तिचा सामना होता आणि तो तिने यशस्वीपणे हाताळला.

    युद्धकालीन कामगिरीवर असतांना तिला मार्क-१ हा जगातील पहिला डीजीटल संगणकीय सोफ्टवेअर प्रोग्राम शिकायला मिळाला.या मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन या हुशार बाईनं एका आयुष्यात काय काय करावं? डब्यात जाणारा ‘मार्क-१’ संगणक तिनं तिच्या हुशारीनं वाचवला. तसंच ‘कंपायलर’ नावाच्या संकल्पनेला तिनं जन्म दिला. जसा एखादा दुभाष्या एका भाषेतलं बोलणं समजून घेऊन दुसऱ्या भाषेत त्याचा अर्थ लावून सांगतो, तसं ‘कंपायलर’ नावाचा एक प्रोग्रॅम आपण संगणकाला चालवायला सांगू शकतो. हा ‘कंपायलर’ प्रोग्रॅम मग आपल्याला सोप्या वाटतील अशा संगणकाच्या भाषेत (उदाहरणार्थ सी, जावा, कोबॉल) लिहिलेले प्रोग्रॅम्स संगणकाला समजतील अशा ०-१ च्या भाषेत (मशीन लँग्वेज) आपल्याला बदलून देतो. आणि हा ० आणि १ च्या भाषेतला ‘मशीन लँग्वेज’ मधला प्रोग्रॅमच संगणकाला कळू शकतो. त्यामुळे मग आपल्याला संगणकाची ०-१ ची क्लिष्ट भाषा शिकत बसावी लागत नाही. तसंच एकदा ग्रेस हॉपर तिचा एक प्रोग्रॅम चालवून बघत असताना अचानक ‘मार्क २’ संगणक नीट कामच करेना! त्या इमारतीत वातानुकूल यंत्रणा नव्हती. त्यामुळे सगळ्या खिडक्या वारं येण्यासाठी उघडलेल्या होत्या.

    काय झालं म्हणून तिनं एका सहकाऱ्याच्या मदतीनं जरा खुडबूड करुन बघितली तेव्हा तिच्या लक्षात आलं की संगणकाचा कुठला तरी भाग उघडा राहिला होता, आणि त्यात एक किडा (बग) जाऊन बसला होता! त्याला बाहेर काढून तिनं तिचा प्रोग्रॅम परत चालवून बघितला तर तो व्यवस्थित चालला की! आजही त्या ऐतिहासिक किडय़ाचा अवशेष अमेरिकेत जपून ठेवलेला बघायला मिळतो! तेव्हापासून कोणताही प्रोग्रॅम नीट चालत नसेल तर त्या प्रोग्रॅममध्ये ‘बग’ आहे असं सॉफ्टवेअरमधली मंडळी आजही म्हणतात आणि ती ‘बग’ शोधून प्रोग्रॅम दुरुस्त करायला ‘डिबगिंग’ असं म्हणतात! असो. १९५३-५४ च्या काळातला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे प्रोग्रॅमर मंडळींना इंग्रजीसारख्या भाषेत संगणकाकडून काम करुन घेण्यासाठी सूचना लिहायची सोय करणं. प्रोग्रॅमिंगचं काम शक्य तितकं सोपं व्हावं यासाठी ग्रेस हॉपर प्रयत्नशील असे. त्यातूनच जेव्हा इंग्रजीशी बऱ्यापैकी साधर्म्य असणारी ‘कोबॉल’ नावाची भाषा तयार झाली तेव्हा त्या प्रयत्नात तिचा वाटा मोठा होता. यासाठी १९५९ साली हॉपरसकट ६ माणसांनी एका परिषदेत यासंबंधी चर्चा करुन या भाषेचा तपशील ठरवला.

    अनेक दशकं ‘कोबॉल’ ही भाषा संगणकाचे प्रोग्रॅम्स लिहिण्यासाठी वापरात असलेली सगळ्यात लोकप्रिय भाषा होती. १९६६ साली तिचं वय खूप जास्त असल्याच्या सबबीवर तिला नौदलानं सक्तीनं निवृत्ती घ्यायला लावली. तिच्या आयुष्यातला हा सर्वात वाईट दिवस होता. पण १९६७ साली नौदलात काम करणाऱ्यांची पगारपत्रकं बनवायच्या कामात असंख्य चुका होत असल्यानं त्या दुरुस्त करण्यासाठी प्रोग्रॅम्स लिहिण्यासाठी तिला ‘थोडय़ा काळासाठी’ परत कामावर रुजू व्हायची विनंती केली गेली. हा ‘थोडा काळ’ चार वर्षांचा असणार होता! १९७१ साली ती परत एकदा निवृत्त झाली. पण तिला कोणी निवृत्त थोडीच होऊ देणार होतं! १९७२ साली तिला पुन्हा एकदा कामावर येण्याची विनंती केली गेली. १९७३ साली तिला ‘कॅप्टन’ म्हणून पदोन्नती मिळाली. शेवटी १९८६ साली वयाच्या ८०व्या वर्षीही ही बाई नाखुशीनं तिच्या इच्छेविरुद्धच निवृत्त झाली. ही तिची शेवटची (!) निवृत्ती होती! संगणकक्षेत्रातली बहुतेक झाडून सारे पुरस्कार तिला मिळाले होते. तिची संगणक आणि नौदल यांच्याविषयीची भाषणं अतिशय लोकप्रिय असायची.

    "मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन'मध्ये काम करणाऱ्या महिलांनी "हॉपर्स' नावाचे मंडळच स्थापन केले आहे आणि त्यांच्या नावाने शिष्यवृत्त्याही दिल्या जातात. सप्टेंबर १९९१ मध्ये तिला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या तंत्रज्ञानाचे राष्ट्रीय पदक मिळाले. तिने केलेल्या संगणकाच्या विकास कार्याची देशाने घेतलेली ती दखल होती. यापेक्षा आणखी एक सर्वोच्च पातळीवरील सन्मान तिला लाभला. तो म्हणजे अमेरिकन नौदलातील एका विनाशिकेला तिचे नाव देण्यात आले. यु.एस.एस. हॉपर या ४६६ फूट लांब व ८३०० टन वजनाच्या विनाशिकेवर अत्याधुनिक संगणकीय यंत्रणा बसवलेली आहे. नौदलाच्या परंपरेनुसार या विनाशिकेवरील मानचिन्हातही शब्द आहेत, ते माजी रिअर अॅयडमिरल हॉपर मार्गदर्शन करताना नेहमी वापरत असे – DARE & DO

    अशा या हरहुन्नरी बाईची काही विधानंही अजरामर आहेत:
    ‘कुठलीही गोष्ट करायची परवानगी मागण्यापेक्षा ती सरळ करुन मोकळं होणं जास्त बरं असतं.’ किंवा
    ‘बंदरात असलेलं जहाज हे समुद्रातल्या जहाजापेक्षा जास्त सुरक्षित असतं. पण बंदरात ठेवण्यासाठी जहाज तयार केलेलं नसतं.’ ग्रेस हॉपर यांचे १ जानेवारी १९९२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट/ विनोद गोरे

  • नाटय़समीक्षक डॉ.वि.भा. देशपांडे

    नाट्यसमीक्षक विश्वनाथ भालचंद्र देशपांडे उर्फ डॉ.वि.भा. देशपांडे हे पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे पदाधिकारी होते.

  • तबलावादक पद्मश्री पंडित विजय घाटे

    विजय घाटे यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षी तबला शिकण्यास सुरवात केली. त्यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६४ रोजी मध्यप्रदेशातील जबलपूर येथे झाला. १२ व्या वर्षी त्यांनी तबलामधील विशारद पदवी मिळविली होती. वयाच्या १६ व्या वर्षी ते मुंबईत आले आणि बारा वर्षांहून अधिक काळ तालयोगी पंडित सुरेश तळवळकर यांच्या कडे गुरुकुल पध्दतीत शिक्षण घेतले. वयाच्या १६ व्या वर्षीही ते आपल्या चमकदार एकल म्हणजेच सोलो तबला वादनाने प्रसिद्ध झाले. विजय घाटे हे काही कलाकांरपैकी एक आहे जे गायन, वाद्य आणि नृत्य या तीनमध्ये निपुण आहेत.

    विजय घाटे यांनी उस्ताद बिस्मिल्लाह खान, उस्ताद विलायत खान, पंडित हरिप्रसाद चौरासिया, उस्ताद अमजद अली खान, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित बिरजू महाराज, पंडित जसराज, उस्ताद शाहिद परवेझ आणि अनेक मान्यवर कलाकारांच्या सोबत साथ केली आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय कलाकार प्रसिद्ध संगीत जेथ्रॉटेल सारख्या प्रसिद्ध संगीतकारांसोबत आणि जॉर्ज ड्यूकेस, अल्जेर्यु, रवी कॉलतारिन यांच्या सारख्यांना साथ दिली आहे. तसेच विजय घाटे यांनी गिसॉन्टी, लॅरी कॉरीयेल, जॉर्ज ब्रुक्स इ. त्यांनी लुई बॅंक, शंकर महादेवन, हरिहरन, शिवमणी या सुप्रसिद्ध भारतीय संगीतकारांसोबत काम केले आहे. विजय घाटे यांनी कर्नाटकी फ्युजन मध्ये डॉ. सुब्रायमॅनियम, विद्याभवन विनायकम, एम.एस गोपालकृष्णन व यू. श्रीनिवास यांच्या बरोबरही काम केले आहे. विजय घाटे नेदेरलंड मधील रॉटरडॅम मधील आर्ट कॉट्स युनीव्हसीटीत व्हिजीटींग फॅकल्टी म्हणून काम करतात.

    विजय घाटे यांनी पॅरिस येथे १९८४ साली भारत-फ्रांस फेस्टिव्हल, १९८५ साली भारत फेस्टिव्हल रशिया येथे, राष्ट्रपती भवन येथे आणि भारत भवन येथे भारतीय महोत्सव येथे आपल्या तबला वादनाची प्रतीभा दाखवली होती. ते सवाई गंधर्व संगीत महोत्सव, हरवलाभा संगीत महोत्सव, तानसेन समारोह, गुनीदास संमेलन, उस्ताद अखिलिया खान संगीत समारोह, कालिदास महोत्सव, खजुराहो महोत्सव, विष्णु दिगंबर संगीत उत्सव महोत्सवामध्ये आपले उत्कृष्ट तबला वादन प्रदर्शित करत असतात. विजय घाटे यांनी तालचक्र नावाचा एक ट्रस्ट स्थापन केला असून तो तरुण आणि नवीन कलाकारांसाठी व्यासपीठ पुरवते आणि आर्थिक दुर्बल घटकांमध्ये संगीतकारांना मदत करते. या ट्रस्टने अनुभवी संगीतकारांकडून संगीत कार्यशाळा आयोजित करण्याची आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वातावरणात असलेल्या संगीतकार व संगीत शिक्षकांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याची योजना आखली आहे. तालाचक ट्रस्ट शास्त्रीय संगीत आणि नृत्य यांना प्रोत्साहित करतो.

    विजय घाटे यांनी 'विजय' नावाचा आपला अल्बम प्रसिद्ध केला आहे. विजय घाटे यांना पं. जसराज पुरस्कार, सरस्वती बाई राणे पुरस्कार, डॉ. वसंतराव देशपांडे पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. भारत सरकारने त्यांचा २०१४ मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • जेष्ठ कलाकार दादामुनी उर्फ अशोक कुमार

    १९३६ मध्ये बॉंम्बे टॉकीज प्रॉडक्शनच्या जीवन नैय्या, या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा काम केले. त्यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९११ रोजी झाला. बॉलिवूडमधल्या दर्जेदार अभिनेत्यांपैकी ते एक होते. १९३६ सालच्या जीवन नैया या पहिल्याच चित्रपटाने नायक म्हणून लोकप्रिय केल्यानंतर त्याने तब्बल अर्धा डझन सिनेमात देविका राणीचा नायक म्हणून काम केलं. या व्यतिरिक्त ते इतर अभिनेत्रींसमोरही अनेक सिनेमांत हीरो म्हणून चमकले. वय झाल्यावर मोठमोठ्या हीरोंना निष्टूरपणे बाजूला सारणार्याम या चित्रपटसृष्टीत आपल्याला अभिनेता म्हणून टिकून रहायचं आहे, हीरोगिरी नाही करता आली तरी चालेल हे अशोक कुमार यांनी वेळीच ठरवलं होतं. त्यामुळे राज कपूर - देव आनंद - दिलीप कुमार या तीन दिग्गजांसमोर पन्नासच्या दशकात टिच्चून उभं राहिल्यानंतर नायक म्हणून असलेल्या आपल्या मर्यादांची संपूर्णपणे जाणीव असलेल्या अशोक कुमार यांनी अगदी सहज हातातले पिस्तुल आणि सिगारेट टाकून काठी आणि पाईप कधी घेतले ते समजलंच नाही.

    दादामुनींच्या बाबतीत दूरदर्शनवर केलेल्या कामगिरीचा उल्लेख केलाच पाहिजे. 'हम लोग' मालिकेच्या प्रत्येक भागाची प्रेक्षक जितक्या उत्कंठेने वाट बघत असत, तेवढीच उत्सुकता त्या भागाच्या शेवटी दादामुनींच्या त्या भागावर केलेल्या छोट्याशा भाष्याची आणि त्यांच्या त्या विशिष्ट प्रकारच्या हातवारे करत वेगवेगळ्या भाषेत 'हम लोग' म्हणण्याचीही असे. शम्मी कपूरबरोबर लग्नाच्या वरातीच्या पार्श्वभूमीवर केलेली पान परागची जाहिरातही प्रचंड लोकप्रिय झाली होती. सुमारे सहा दशकं त्यांनी बॉलिवूडवर आपल्या अभिनयाने भुरळ पाडली. या काळात त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले. भारतीय चित्रपटांमधील त्यांच्या कामासाठी भारत सरकारने १९८८ मध्ये अशोक कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने व १९९८ मध्ये पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केले. अछुत कन्या, किस्मत, परिणीता, चलती का नाम गाडी, आशीर्वाद, छोटी सी बात, मिली, खुबसुरत, खट्टा मीठा, मि. इंडिया हे मा.अशोक कुमार यांचे गाजलेले चित्रपट.

    रेल गाडी रेल गाडी हे बॉलिवूडमधील पहिले रॅप गाणे त्यांनीच गायले आहे. अशोक कुमार यांचे १० डिसेंबर २००१ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • जेष्ठ बासरीवादक पंडित केशव गिंडे

    पंडित केशव गिंडे मूळचे अभियंते, मुलानेही कोणती तरी कला शिकावी, असे पंडित केशव गिंडे यांच्या आईला वाटत होते. त्यातून त्यांनी सुरवातीला उभी बासरी आणून दिली. वयाच्या आठव्या वर्षी शाळेत बासरीवर पंडित केशव गिंडे यांनी “राष्ट्रगीत’ वाजविले. १९७० साली ते पुण्यात आले.

  • अभिनेते शरद पोंक्षे

    गांधी हत्या या अत्यंत संवेदनशील विषयामुळे ‘मी नथूराम गोडसे बोलतोय’ हे नाटक विवादाच्या भोवऱ्यात सापडूनही रसिकांनी या नाटकास उचलून धरल ते शरद पोंक्षे यांच्या अभिनयामुळे नथूराम गोडसे या व्यक्तीबद्दल प्रचलित असलेले सर्व गैरसमज काही अंशी कमी करण्यात आणि खऱ्या अर्थानी गोडसे यांची भूमिका स्पष्ट करणारे हे नाटक समीक्षकांच्या पसंतीस ही उतरले.

  • मराठी अभिनेत्री लीला चिटणीस

    लीला नगरकर हे त्यांचे माहेरचे नाव. त्यांचा जन्म ९ सप्टेंबर १९०९ रोजी धारवाड येथे झाला. लीला चिटणीस यांचे वडील हे पुरोगामी विचारांचे, उच्चशिक्षित, प्रार्थना समाजाचे पुरस्कर्ते होते. लीला चिटणीस यांचे वडील त्याकाळी गाजलेल्या नाट्यमन्वतर या मराठी नाट्यसंस्थे मध्ये होते. मा.लीला चिटणीस लीला यांनी हास्यप्रधान चित्रपट, ' उसना नवरा ' यात काम केले. नंतर काही काळ स्टंट अभिनेत्रीच्या रूपात व एक्स्ट्रॉ म्हणूनही कामे केली. लवकरच मास्टर विनायक यांच्याबरोबर, ' छाया- साल, १९३६ ' व प्रभात चे केशव नारायण काळे यांच्याबरोबर, ' वहाँ -१९३७ ' आणि सोहराब मोदी यांच्याबरोबर, ' जेलर -१९३८ ' या त्यावेळी टॉप वर असलेल्या कलाकारांबरोबर संधी मिळाली. १९३९ साली मा.लीला चिटणीस यांना अमाप प्रसिद्धी मिळाली ती विष्णूपंत पागनीस यांच्या जोडीने पागनीसांची बायको म्हणून ' संत तुलसीदास' यातील कामामुळे. पुढे अशोक कुमारबरोबर त्यांची जोडी अतिशय गाजली. लागोपाठ आलेल्या, ' कंगन, बंधन व झुला ' या तीन सिनेमांनी हॅटट्रिक करून त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले. मा.लीला चिटणीस यांनी जवळपास शंभर एक चित्रपट केले. त्यांचा प्रेम विवाह डॉ. चिटणीस ह्यांच्यांशी १९२८ साली झाला होता. पण त्यांचं वैवाहिक आयुष्य अल्पजीवी ठरलं. अवघं सहा वर्षांचं! या काळात तीन मुलांचं मातृत्व पदरी आलं. मुलांसाठी, त्यांना चरितार्थासाठी उभं राहणं भाग होतं. स्त्रियांनी चित्रपटात काम करणे हीन समजल्या जाणाऱ्या १९३०-१९४० च्या दशकांत उच्च विद्याविभूषित असलेल्या लीला चिटणीसांनी समाजाचा रोष पत्करून अभिनयाचा मार्ग निवडला होता. मा.लीला चिटणीस यांची रुपेरी पडद्यावरची कारकीर्द जशी प्रदीर्घ, तशीच ती धाडसी होती. नाटकांत किंवा चित्रपटांत कामे करणे म्हणजे अतिशय लाजिरवाणे व निषिद्ध मानले जायचे, त्या काळात लीला चिटणीस यांनी रोमॅन्टिक भूमिका केल्या. काहीशा बुजऱ्या व बावळट अशोककुमारचा आत्मविश्वास वाढविण्यात लीला चिटणीस यांचा फार मोठा हातभार आहे. आपण नायिकेच्या भूमिकेत यशस्वी होत असतानाच त्यांनी 'शहीद' मध्ये दिलीपकुमारच्या आईची भूमिका स्वीकारत आपल्या धाडसी वृत्तीची झलक दाखविली. दिलीप-राज-देव आनंद या रुपेरी पडद्यावर सर्वात यशस्वी त्रिकुटाची मा.लीला चिटणीस पडद्यावरची यशस्वी आई ठरली. त्यांच्या डोळ्यांतील कारुण्य, चेहऱ्यावरील भावुकता, कृश शरीरयष्टीतील सहज दिसणारी लवचीकता व संवादफेकीतील स्पष्टता यामुळे लीला चिटणीस कोणत्याही शॉटमध्ये भाव खाऊन जात. त्या कधीच सुलोचना, कामिनी कौशल किंवा अचला सचदेवप्रमाणे रडक्या आई झाल्या नाहीत, किंवा ललिता पवारसारख्या खाष्ट आईही झाल्या नाहीत. वात्सल्य सिंधू आईचे एक उदात्त, पण प्रसन्न व्यक्तिमत्त्व म्हणून मा.लीला चिटणीस या रुपेरी पडद्यावरील एक अजरामर कलाकार म्हणून कायमच स्मरणात राहतील. मा.लीला चिटणीस या १९७० ला न्यूयॉर्क मध्ये स्थायिक झाल्या होत्या. त्यांच्या चाहत्यांना, क्वचित अमेरिकेत येणाऱ्या सहकलाकारांना भेटत होत्या. मा.लीला चिटणीस यांनी ’चंदेरी दुनियेत’ हे जीवनचरित्र लिहिले आहे. मा.लीला चिटणीस यांचे १४ जुलै २००३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • कादंबरीकार, समीक्षक, वृत्तसंपादक गजानन त्र्यंबक माडखोलकर

    कादंबरीकार, समीक्षक, वृत्तसंपादक गजानन त्र्यंबक माडखोलकर यांचा जन्म २८ डिसेंबर १८९९ रोजी झाला. माडखोलकर यांचे वडील त्र्यंबकराव मुंबईत भिक्षुकी करीत. त्यांच्या आई पार्वतीबाई या त्याकाळी शिक्षित असलेल्या स्त्रियांपैकी एक होत्या. आईने केलेल्या संस्कारामुळे लहानपणीच माडखोलकरांनी मराठी आणि संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले होते. मुंबईच्या आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत त्यांचे सर्व शिक्षण झाले होते.

    राष्ट्रसभेच्या अधिवेशना- पासून स्फूर्ती घेऊन त्यांनी जागृती नावाचे हस्तलिखित सुरू केले. त्याचे संपादन माडखोलकर करीत असत. नवयुग, विविध ज्ञान विस्तार इ. मासिकातून त्यांच्या काव्यलेखनाला सुरुवात झाली. केशवसुतांचा संप्रदाय या नवयुगमध्ये लिहिलेल्या टीकालेखामुळे माडखोलकर एकदम प्रसिद्धीस आले. त्यानंतर केसरीत त्यांचे लेख छापून आले. त्यावेळी रविकिरण मंडळाशी त्यांचा संबंध आला. तेथे अनेक साहित्यिकांशी त्यांचा स्नेह जडला.

    १९२२ साली माडखोलकर पुण्याला आले. त्यावेळेस रेव्हरंड टिळक, केशवसुत, विनायक, गोविंदाग्रज आणि बालकवी यांच्या काव्याची मीमांसा करणारे आधुनिक कवी पंचक हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केले. १९३३ नंतर नागपूरला आल्यावर त्यांच्या कादंबरी लेखनाला सुरुवात झाली. मुक्तात्मा, भंगलेले देऊळ, शाप, कांता, दुहेरी जीवन, मुखवटे, नवे संसार या त्यांच्या गाजलेल्या कादंब-या. शुक्राचे चांदणे, रातराणीची फुले हे कथासंग्रह तर वाङ्मयविलास, स्वैरविचार, परामर्श हे समीक्षात्मक लेखनही त्यांनी केले. १९४४ पासून माडखोलकर तरुण भारत चे संपादक म्हणून काम पाहू लागले. १९४६ साली महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष झाले.

    बेळगाव येथे झालेल्या संमेलनाच्या अध्यक्ष पदावर संयुक्त महाराष्ट्राचा ठराव सर्व प्रथम माडखोलकरांनी मांडला. याशिवाय पुढील काळात काही नाटकं आणखी काही कादंब-या, साहित्य समस्यांवरील लेख व्यक्ति तितक्या प्रकृती, मी आणि माझे वाचक इ. विविधपूर्ण लेखन माडखोलकरांनी केले. त्यातून वृत्तपत्रीय लेखनाप्रमाणे त्यांचे विविधांगी लेखन प्रतिबिंबित झाले आहे. मा.गजानन त्र्यंबक माडखोलकर यांचे २७ नोव्हेंबर १९७६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट