(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • सरखेल कान्होजी आंग्रे स्मृतिदिन

    मराठ्यांचा इतिहास घडविणाऱ्या प्रसिद्ध घराण्यांपैकी आंग्रे घराणे हे एक. पुणे जिल्ह्यातील काळोसे हे आंग्रे घराण्याचे मूळ गाव व शखपाळ-शंकपाळ-संकपाळ हे त्यांचे मूळ आडनाव; परंतु आंगरवाडी ह्या काळोसेतील एका छोट्या भागावरून त्यांस पुढे आंग्रे हे उपनाव प्राप्त झाले. सेखोजी हे या घराण्यातील पहिले ज्ञात पुरुष. त्यांचे चिरंजीव तुकोजी हे उत्तर कोकण काबीज करीत असता शहाजी महाराजांनी चौलजवळ १६४० मध्ये जी दर्यावरील लढाई केली, त्यात प्रथम प्रसिद्धीस आले. १६५९ मध्ये ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी गेले. त्यांना मराठी आरमारातील २५ असामींची मुखत्यारी होती. पुढे ते आपल्या कर्तबगारीने सरनौबतीच्या हुद्द्यापर्यंत चढले. इ.स. १६८० तुकोजीं आंग्रेंचे निधन झाल्यावर त्यांचा मुलगा कान्होजी आंग्रे ह्यांनी त्यांचे कार्य पुढे चालू ठेवले.

  • क्रिकेटपटू जॉन विस्डेन

    विस्डेन हा इंग्लंडच्या दक्षिणेकडच्या ब्रायटन नावाच्या समुद्रकिनाऱ्यानजीकच्या सुंदर भागात राहायचा. विस्डेनची फलंदाजी बऱ्यापैकी चांगली असली तरी तो प्रामुख्यानं गोलंदाज म्हणूनच गाजला. पण दुर्दैवानं विस्डेनच्या कामगिरीचे अनेक तपशील नष्ट झाले असल्यामुळे त्याविषयी फारसं माहीत नाही. त्यातून वाचलेल्या माहितीनुसार लॉड्सवर दोन वेगवेगळ्या सामन्यांच्या दोन्ही डावांमध्ये विस्डेननं सुरुवातीपासून शेवटपर्यंत न थकता गोलंदाजी टाकली होती. तसंच अमेरिकेमध्ये एकदा त्यानं ६ चेंडूंमध्ये ६ बळी घेतले होते.

  • गायिका सुमन कल्याणपूर

    सुमन कल्याणपुर नुसते नाव जरी उच्चारले तरी निर्मळ शांत, सोज्वळ, सात्विक चेहरा आणि तेवढाच मधुर आवाज आठवतो. त्यांचा २८ जानेवारी १९३८ रोजी झाला. त्यांची गाणी जितकी प्रसिद्ध झाली तितक्याच त्या प्रसिद्धिपासुन अलिप्त राहिल्या. सुमन हेमाडी हे नाव लग्नाआधीचे. रामानंद कल्याणपुर यांच्याशी लग्न होऊन त्या सुमन कल्याणपुर या नावाने सर्व परिचित झाल्या. मराठी भाव तसेच सिनेसंगीतात सुमन कल्याणपूर या गायिकेचे योगदान फार मोठे आहे. एका गाण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी तलत महमूद हे सुमनताईंच्या आवाजाने प्रभावित होऊन त्यांनी HMV म्युझिक कंपनीकडे त्यांच्या नावाची शिफारस केली. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी मो.शफी यांनी संगीत दिलेल्या "मंगु" या चित्रपटासाठी प्रथम पार्श्वगायन केले. गाण्याचे बोल होते "कोई पुकारे धीरे से तुझे". त्यानंतर त्यांच्या गाण्याची घोडदौड चालुच राहिली आणि लता मंगेशकर, शमशाद बेगम आणि आशा भोसले यांच्या गाण्याचा तारकामंडळात त्यांनी मानाचे स्थान मिळवले. सुमन कल्याणपुर यांच्या आवाजाने एका पिढीला अक्षरशः वेड लावले होते. "जिथे सागरा धरणी मिळते" असे म्हणत प्रियकराची वाट बघणारी प्रेयसी, "घाल घाल पिंगा वार्यार माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात" असे म्हणणारी सासुरवाशीण, "निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाहि" हि अंगाई, "कशी गवळण राधा बावरली" हि गवळण, "सांज आली दुरातुनी, क्षितीजाच्या गंधातुनी" हे विरहगीत, "नाविका रे वारा वाहे रे, डौलाने हाक जरा आज नाव रे", "केतकीच्या बनी तेथे नाचला ग मोर" हे भावगीत, "केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा", "जगी ज्यास कोणी नाहि त्यास देव आहे", "देव माझा विठु सावळा, माळ त्याची माझिया गळा" सारखी भक्तीगीते, "उठा उठा चिऊताई", "या लाडक्या मुलांनो या" सारखी बालगीत अशा विविध मराठी गाण्यांनी एक काळ गाजवला होता. किंबहुना आजही तितकीच गोड वाटतात. पण दुर्दैव असे की सुमनताईंनी गायलेली बहुतेक गाणी हि लता मंगेशकर यांनी गायली आहे असा अनेकांचा समज असतो. सुमनताईंनी मराठी भावगीतांपैकी सर्वात जास्त गाणी श्री दशरथ पुजारी यांच्याकडे गायली. किंबहुना दशरथ पुजारी यांच्या गाण्यांमुळेच आज मराठी भावगीतांमध्ये सुमनताईंची गाणी मैलाचा दगड ठरली आहेत. मा.यशवंत देव त्यांच्या शिष्यवर्गातील एक नामवंत नाव म्हणजे मा. सुमन कल्याणपूर. त्यांची देवांच्या संगीत दिग्दर्शनाखालील ‘मधुवंतीच्या सुरासुरातून’, ‘श्रीरामाचे चरण धरावे’, ‘पक्षिणी प्रभाती चारियासी जाये’ ही गाजलेली गाणी त्यांनी गायली. मा.सुमन कल्याणपुर यांनी मराठी व हिंदी व्यतिरीक्त पंजाबी, गुजराती, बंगाली, असामी, कन्नड, भोजपुरी ओरीया भाषेत सुद्धा गाणी गायली आहे. "न तुम हमे जानो न हम तुम्हे जाने मगर लगता है कुछ ऐसा मेरा हमदम मिल गया", "ठहरीए होश मै आ लू, तो चले जाईएगा", "तुमसे ओ हसीन कभी मोहब्बत न मैने करनी थी", "परबतो के पेडो पर शाम का बसेरा है", "अज हु ना आये बालमा", "तुमने पुकारा और हम चले आये" "मेरे मेहबुब न जा", "नाना करते प्यार तुम्हीसे कर बैठे", "आपसे हमको बिछडे हुए", "चले जा चले जा....जहां प्यार मिले", "मन गाए वो तराना", "दिल ने फिर याद किया" या आणि अशा असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीहि गाजवली होती. आणि लोकप्रियतेच्या या शिखरावरच असताना त्यांनी एकदम गाणे गायचे सोडुन दिले. काही अंतर्गत वादामुळे रफी यांनी लतादिदि बरोबर गाण्याचे सोडुन दिल्याने लतादिदिंची काही गाणी सुमनताईंच्या वाटेला आली आणि त्यांनी त्या गाण्याचे अक्षरशः सोने केले. लता मंगेशकर आणि सुमन कल्याणपुर या हेमंत कुमार यांनी संगीत दिलेल्या "चांद" ह्या हिंदी चित्रपटाकरीता एकत्र गायल्या होत्या.मा.सुमन कल्याणपूर यांनी तब्बल ७४० चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

    सुमनताईंनी गायलेली काहि मराठी गाणी.
    आई सारखे दैवत सार्या जगतात नाहि
    अक्रुरा नेऊ नको माधवा
    आकाश पांघरून जग शांत झोपलेले
    आली बघ गाई गाई
    केतकीच्या बनी तेथे नाचला ग मोर
    वाट इथे स्वप्नातील संपली जणु
    अरे संसार संसार
    असावे घर ते आपुले छान
    चल उठ रे मुकुंदा
    देवा दया तुझी
    दिपक मांडले
    एक तारे सुर जाणे
    एकदाच यावे सखया
    गेला सोडुनी मजसी कान्हा
    घाल घाल पिंगा वार्या्

  • इतिहास संशोधक डॉ.पांडुरंग पिसुर्लेकर

    पिसुर्लेकरांनी या अभिलेखागाराखालील दप्तरखाना सुधारला; त्यातील कागदपत्रे खंडवार लावली आणि त्यासंबंधी सूची व दोन मार्गदर्शिका प्रसिध्द केल्या. गोवा स्वतंत्र झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने पणजी येथे इतिहास संशोधनकेंद्र स्थापन केले. त्याचे संचालकपद पिसुर्लेकरांकडे होते. गोमांतकातील पहिले हिंदू इतिहास संशोधक असणारे डॉ. पिसुर्लेकर पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेली सर्व ऐतिहासिक कागदपत्रे भारतीय पुराभिलेखागारात आणण्यासाठी आयुष्यभर झटले. पोर्तुगीज दफ्तरातील साडेचारशे वर्षातील सर्व कागदपत्रे अभ्यासून त्यांनी ‘पोर्तुगीज मराठे संबंध’ हा अप्रतिम साधनग्रंथ लिहिला.

  • शिवचरित्राचे अभ्यासक निनाद बेडेकर

    शिवरायांचा राज्यकारभार आणि मराठेशाही संदर्भात त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून लेखन केले. शिवाजीमहाराजांचे युद्धकौशल्य, नेतृत्वगुण, दुर्गबांधणी, आरमार उभारणी या पैलूंचा स्वतंत्रपणे अभ्यास करून त्यांनी लेखन केले होते.

  • इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष सुहार्तो

    १९६५ ते ६८ या काळात कम्युनिस्टांचे सरकार सुहार्तोंनी लष्कराच्या बळावर उलथवले, तेव्हा तब्बल आठ लाख कम्युनिस्ट कार्यकर्ते वा समर्थकांना त्यांनी ठार मारले. त्यानंतरही पूर्व तिमूर, पापुआ व असेह भाग आपल्याच टाचेखाली ठेवण्यासाठी सुहार्तो यांनी लष्कराकरवी किमान तीन लाख जणांचे शिरकाण केले.

  • ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक बी. आर. इशारा

    हिंदी चित्रपटात काम करण्यासाठी बी. आर.इशारा १९६० च्या दशकात मुंबईत आले. त्यांचा जन्म ७ सप्टेंबर १९३४ रोजी झाला. हिंदी चित्रपटांत नवीन ज्वलंत विषयांची लाट आणण्याचे काम बी. आर. इशारा यांनी १९७० च्या दशकात केले. इन्साफ का मंदिर चित्रपटातून लेखक म्हणून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ३४ चित्रपटांपैकी बहुतेकांचे लेखन त्यांनीच केले होते. त्यांनी १९६९ ते १९९६ या काळात ३४ चित्रपट बनवले. इशारा यांनी चित्रपटसृष्टीत "बोल्ड‘ विषय आणले. कोणीही हाताळले नाहीत, अशा विषयांवर त्यांनी चित्रपट तयार केले.

    "चेतना‘मध्ये त्यांनी वेश्यां्च्या पुनर्वसनासारखा विषय घेतला. हा चित्रपट २५ दिवसांत पूर्ण झाला होता. बंगल्यात चित्रीकरण करण्याचा पायंडा त्यांनी पाडला. त्यांनी "प्रेम शस्त्र‘, "औरत और इंतकाम‘, "वो फिर आयेगी‘, "हम दो हमारे दो‘, "जरूरत‘, "मिलाप‘ आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. चेतना, हम दो हमारे दो, एक नजर, मिलाप, लोग क्या कहेंगे, सौतेला पती, औरत का इन्तेकाम, घर की लाज असे विविध वादग्रस्त विषयांवरील सिनेमे त्यांनी केले. अभिनेत्री परवीन बॉबीला रूपेरी पडद्यावर झळकवण्याचे श्रेय इशारा यांनाच जाते.

    त्याशिवाय रेहाना सुल्तान, राकेश पांडे, विजय अरोरा या कलावंतांनाही त्यांनीच पहिला ब्रेक दिला.चित्रपटांचे लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन अशा तिन्ही जबाबदाऱ्या त्यांनी कौशल्याने पार पाडल्या. ज्येष्ठ कलाकार रेहाना सुलतान ह्या बी. आर. इशारा यांच्या पत्नी होत.मा.बी.आर.इशारा यांचे २५ जुलै २०१२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • अभिनेत्री मुग्धा चिटणीस

    मुग्धा या केवळ अभिनेत्री नव्हत्या तर त्या उत्कृष्ट कथा-कथनकारही होत्या. भारत आणि अमेरिकेत त्यांनी कथाकथन शैलीत ५०० कार्यक्रम सादर केले होते. मुंबईतील ‘ऑल इंडिया रेडिओ’मध्ये पुष्कळ कार्यक्रम सादर केले.

  • मराठीतले लोकप्रिय बालकथाकार राजीव तांबे

    राजीव तांबे गेली अनेक वर्षे मुलांसाठी काम करत आहेत. मराठीतले लोकप्रिय बालकथाकार राजीव तांबे यांचा जन्म ४ ऑगस्ट रोजी झाला. त्यांच्यासाठी विविध पुस्तके, हसत-खेळत शिक्षणाच्या पद्धतींचा विकास केला आहे.

    युनिसेफ आणि इतर काही सामाजिक संस्थांसोबत काम करताना त्यांनी राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील अनेक शाळांना भेट दिली आहे. त्या माध्यमातून विविध स्तरातील विद्यार्थ्यांच्या गरजा समजून घेत त्यांनी शिकवण्याची पद्धत विकसित केली आहे. यामध्ये कविता, कथा, एकपात्री प्रयोग, नाटक, विज्ञानकथा अशा विविध वाङ्मय प्रकारांची निर्मिती केली आहे. त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तीनही भाषांमध्ये लेखन केले आहे. गुजराती आणि कानडीमध्ये त्यांनी लिहिलेली पुस्तके भाषांतरीत झाली आहेत. बालरंगभूमीसाठी त्यांनी लिहिलेल्या अनेक एकांकिकांना बक्षिसं मिळाली आहेत. त्यांच्या लेखनाला आजपर्यंत सुमारे १७ विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.

    अक्कम बक्कम, छत्रीची जादू आणि इतर कथा, दांडोबा राक्षस आणि गुळगुळीत मावशी, अजब कथा, अशोक आणि अमीन, आई आणि बाळ, आमची शाळा, मगरू आणि इतर कथा, गंमत गँग, गंमत जंमत, गंमतशाळा भाग १, २, गुळाची ढेप आणि सरबत, चटकन पटकन वाचन लेखन, झॅकपॅक शोध आणि इतर कथा, बंटू बसला ढगात आणि इतर कथा, ससुल्या आणि इतर कथा, विज्ञान गमती-सहज सोपे प्रयोग, माझे मराठी निबंध, भाग १,२, सु सुटका आणि रंगीत डोंगर, प्रेमळ भूत संच अशी त्यांची ५० हून जास्त पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • दूरदर्शन’ या पहिल्या दूरचित्रवाणी वाहिनीचा वाढदिवस

    आज १५ सप्टेंबर..आज 'दूरदर्शन' या केंद्र सरकारने सुरू केलेल्या देशातील पहिल्या दूरचित्रवाणी वाहिनीचा वाढदिवस

    १५ सप्टेंबर, १९५९ रोजी एक छोटासा ट्रान्समीटर व स्टुडिओ यांच्या साह्याने दूरदर्शनचे काम चालू झाले. राजधानीत दूरदर्शनची ही मुहूर्तमेढ रोवली जाताना ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचा त्यात मोलाचा वाटा होता. दुरदर्शनचे पहिले संचालक होते प्रत्येक मराठी माणसाचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे!!! पु.लं. नीच "दुरदर्शन" हे नाव सुचवले.

    दूरदर्शनवरुन बातमीपत्राची नियमित सेवा १९६५ पासून सुरु झाली. १९७२ मध्ये दूरदर्शन सेवा मुंबईत आली. १९७५ मध्ये चेन्नई, श्रीनगर, अमृतसर व लखनौ या शहरांमध्ये दूरदर्शनचे प्रसारण सुरु झाले. उपग्रहाद्वारे सामाजिक शिक्षण अथवा अत्याधुनिक तंत्रज्ञानातून सामाजिक शिक्षण देण्याचा पहिला प्रयोग भारतात केला. सॅटेलाईट इंस्ट्रक्शनल टेलेव्हिजन एक्सपरीमेंट ची चाचणी १९७५-७६ या वर्षी घेण्यात आली. याद्वारेच जगात प्रथमच सामाजिक शिक्षणाचा प्रचार घरोघरी करण्यात आला. १९८२ मध्ये दिल्ली आणि अन्य ट्रान्समिटर्स दरम्यान उपग्रहांमार्फ़त प्रसारण सुरु करण्यात आले.

    १९८२ मध्ये टीव्ही रंगीत झाला. पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावरचे भाषण देश पाहू लागला आणि 'नॅशनल ब्रॉडकास्टर' ही दूरदर्शनची ओळख रुजली. 'ऑल इंडिया रेडिओ'च्या सावलीतून दूरदर्शन बाहेर आले.१९८५ नंतर घरोघरी दूरचित्रवाणी संच दिसू लागले. आणि मालिकांविषयीच्या चर्चा रंगू लागल्या. चिमणराव आणि गुंड्याभाऊ, चाळ नावाची वाचाळ वस्ती, गोट्या, बंदिनी, एक शुन्य शुन्य, सर्जा राजा, प्रतिभा आणि प्रतिमा, ज्ञानदीप, आमची माती आमची माणसं या मालिका ज्ञान, माहिती आणि निखळ मनोरंजन देण्याचं काम करीत होत्या. व्यत्यय नावाची पाटीही चांगलाच भाव खावून जायची. हिंदीतल्या बुनियाद, हमलोग, ये जो है जिंदगी, रजनी, तमस, रामायण, महाभारत, द वर्ल्ड धिस वीक, दर्पण या मालिकांनी तर मनोरंजनाच्या विश्वात अफाट प्रेक्षक वर्ग मिळवला. अनंत भावे, प्रदीप भिडे, शम्मी नारंग, अविनाश कौर सरीन यांचे आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेले वृत्तनिवेदन दर्शकांना भारावणारे असेच होते. गेल्या दोन दशकांत झालेल्या संज्ञापन क्रांतीमुळे दूरदर्शनचा भारतातला एकाधिकार संपत गेला. नंतर सगळ्या राष्ट्रीय चर्चांमध्ये दूरदर्शनचे स्थान नगण्य होत गेले. सरकारने दूरदर्शनमध्ये चैतन्य यावे, यासाठी 'प्रसार भारती'ची स्थापना केली. देशात ९० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येपर्यंत कोणतेही खासगी चॅनल जात नाही. दूरदर्शन मात्र जाते. याशिवाय, दूरदर्शनकडे देशभरात ४६ स्टुडिओंचे जाळे आहे. इतके विशाल जाळे कोणत्याही खासगी वाहिनीकडे नाही. असे असूनही दूरदर्शनचा समाजमनावर फारसा प्रभाव आज नाही. असे का, याचे आत्मपरीक्षण करायला हवे. सरकारच्या विरोधात फारशा न जाणाऱ्या पण वस्तुनिष्ठ बातम्या हे दूरदर्शनचे खरे शक्तिस्थान होते. गेल्या दशकभरात दूरचित्रवाणी हा मीडियाचा सर्वाधिक जाहिराती व त्यामुळे उत्पन्न मिळणारा अवतार झाला आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.म.टा./इंटरनेट