(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • बॉलीवुड कलाकार गोवींदा

    गोविंदा यांचे खरे नाव गोविंदा अरुण आहूजा आहे. बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये त्यांना गोविंदा या नावाने लोकप्रियता मिळाली. त्यांचा जन्म २१ डिसेंबर १९६३ रोजी झाला. गोविंदाने अनेक चित्रपटांमध्ये विविध पात्रे केली असून त्यापैकी त्यांचे विनोदी भूमिका असलेले चित्रपट विशेष गाजले. नव्वद च्या दशकात गोविंदा जितका त्याच्या चित्रपटांसाठी ओळखला जात होता तितकाच तो त्याच्या डान्ससाठी प्रसिद्ध होता. गोविंदाच्या डान्सचे आजही अनेक चाहते आहेत.

    गोविंदाने जवळजवळ सर्वच अभिनेत्रींसोबत काम केले. मात्र गोविंदाला नीलमसोबत काम करायला अधिक आवडायचे. गोविंदाला तिच्याशी लग्नही करायचे होते. मात्र त्यांची ही जोडी केवळ रील लाईफपुरतीच मर्यादित राहिली. गोविंदाने १९८६मध्ये आपल्या करियरची सुरुवात केली. इल्जाम हा त्याने केलेला पहिला चित्रपट. हा चित्रपट त्या वर्षातील पाचवा सुपरहिट सिनेमा होता. या चित्रपटाच गोविंदाची हिरोईन म्हणून नीलमने काम केले होते. दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आणि पाहता पाहता ही जोडी हिट झाली. लोकांनी या जोडीला डोक्यावर घेतल्यानंतर अनेक चित्रपटाच्या ऑफर्स यांना आल्या.

    विनोदी संवाद फेकीच्या उत्कृष्ट शैलीमुळे त्यांचे विनोदी चित्रपट हिट ठरले. गोविंदा यांचा देशात खूप मोठा चाहता वर्ग आहे. गोविंदाचा अभिनय, विनोदाचे टायमिंग, संवादफेक एवढेच नाही तर खास गोविंदा स्टाईल नृत्य आजही अफलातून आहे. मा.गोविंदा हे माजी खासदार आहेत. ते उत्तर मुंबई मतदार संघामधून लोकसभा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढविली होती. अभिनेता गोविंदा यांना दोन मुले आहेत. मोठ्या मुलीचे नाव नर्मदा आहे. तिने किशोर नमित कपूर इन्स्टिट्यूटमधून अभिनय क्षेत्राचा कोर्स केला आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक मधुकर दत्तात्रेय देवरस ऊर्फ बाळासाहेब देवरस

    गोळवलकर गुरुजींच्या निधनानंतर १९७३ साली त्यांनी संघाचे नेतृत्व स्वीकारले. त्यांच्या सरसंघचालक पदाच्या कारकिर्दीत संघाला एक नवी दिशा मिळाली आणि संघाने पूर्वांचल राज्यातून वनवासी क्षेत्रांतून सेवाकार्याला सुरुवात केली. त्यांनी २१ वर्ष सरसंघचालकपद भूषविले.

  • त्रावणकोरच्या राजघराण्यातील एक चित्रकार राजा रवि वर्मा

    राजा रवि वर्मा यांनी भारतीय साहित्य आणि संस्कृतीतील पात्रांची रंगीत चित्रे काढली. त्यांचा जन्म २९ एप्रिल १८४८ रोजी झाला. राज रविवर्म्याने काढलेल्या चित्रांनंतरच हिंदूंना आपले देव कसे दिसत असावेत, ते समजले. भारतातील परंपरागत हिंदू महाकाव्ये आणि पुराणांतील कथा यांवर रविवर्म्यानॆ काढलेली चित्रे आजही प्रमाण मानली जातात. रविवर्म्याचा जन्म केरळमधील कोईल तंपुरन येतील किलिमनूर राजवाड्यात झाला. त्याचे वडील मोठे विद्वान व आई ही कवयित्री होती. त्याच्या आईने लिहिलेले काव्य, 'पार्वती स्वयंवर' हे रविवर्म्याने तिच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध केले. राजा रवि वर्माला सी.गोडा वर्मा नावाचा भाऊ व मंगला नावाची बहीण होती.त्याच्या बालपणीच त्याला महाराज अलियम् तिरुनल या त्याच्या नातलग राजाचा आश्रय मिळाला.

    राजा रविवर्मा यांचे काका उत्तम चित्रकार होते. तो वारसा पुतण्यात उतरला. याशिवाय त्रिवेंद्रमच्या राजदरबारी असणारे इंग्रज चित्रकार थी ओडेर जेन्सन, रामस्वामी नायडू यांच्या चित्रकारितेचा प्रभाव त्यांच्यावर पडला. त्रावणकोर महाराजांच्य प्रोत्साहनामुळे त्यांना अधिकच प्रेरणा मिळाली. १८७३ मध्ये मद्रास येथील चित्रकलेच्या स्पर्धेत रविवर्म्याने सुवर्णपदक मिळवले. महाराजांच्या दरबारात असणाऱ्या इटालियन तैलचित्रांकडे पाहून त्याने तैलचित्रे काढण्याचे ठरवले.

    राजा रविवर्म्याच्या चित्रांत एक सुंदर, प्रमाणबद्ध व सौंदर्यवती साडी नेसलेली स्त्री असते. त्याचा स्टुडिओ महाराष्ट्रात लोणावळ्याला होता. तेव्हा दिसलेल्या मराठी स्त्रियांकडे पाहून त्याने तशाच स्त्रिया चित्रांत रंगवल्या. १८७३ मध्ये, व्हिएन्ना येथे झलेल्या कला प्रदर्शनात त्याला मिळालेल्या प्रथम पारितोषिकामुळे तो जागतिक क्षेत्रावर प्रकाशझोतात आला. राजा रविवर्म्याने चित्रांतील विविध विषयासाठी भारतभर प्रवास केला. त्याचे 'दुष्यंत व शकुन्तला','नल व दमयंती, या विषयावरील चित्रे प्रसिद्ध आहेत. त्याच्या चित्रांनी भारतीयांस त्यांच्या धर्मग्रंथांतील द्दष्ये डोळ्यासमोर साकार झाली. ही त्याची चित्रे सर्व भारतभर प्रसिद्ध झाली. आधुनिक भारतीय वास्तववादी चित्रकलेचा जनक म्हणून राजा रविवर्मा यांचे नाव घेतले जाते. युरोपियन चित्रकारांप्रमाणे ‘कमिशन पोट्र्रेट’ काढणारे ते पहिले भारतीय चित्रकार. त्यांच्या चित्रकलेवर पाश्चात्त्यांचा पगडा असला तरी त्यांची चित्रे मात्र अस्सल भारतीय होती. रामायण-महाभारतातील प्रसंग, विश्वामित्र-मेनका, दुष्यंत-शकुंतला, उर्वशी-पुरुरवा अशी एकापेक्षा एक सरस चित्रे आपल्या वास्तववादी शैलीच्या कलाकृतीतून चितारली आहेत. आपली चित्रे छापण्यासाठी त्यांनी लोणावळ्याजवळील मळवली येथे छापखाना उभारला.

    या छापखान्यातून हजारो देवदेवतांची चित्रं साऱ्या भारतभर पूजली जाऊ लागली. देवतांना मानवी चेहरे देण्याचे काम रविवर्मा यांनी केले. आपल्या चित्रांतून भारतीय संस्कृतीचा ठसा जगात पोहचविणाऱ्या रविवर्माना अनेक मानसन्मान मिळाले. शिकागोच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात स्थान मिळणारे ते एकमेव. सातव्या एडवर्डने कैसर-ए-हिंद’ हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविले होते. त्या काळात देशविदेशातील राजांचे राजवाडे राजा रविवर्माच्या चित्रांच्या दालनांनी सजले होते. त्यांच्या चित्रातून मानवी स्वभावाच्या भावना, छटा सहजसुंदरतेने दर्शविल्या. भारतीय कलेच्या इतिहासात तो उत्कृष्ट चित्रकारांपैकी एक समजला जातो.

    १९०४ मध्ये, भारताचे व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी केसर-इ-हिंद या सुवर्णपदकाने सन्मानित केले. त्यावेळेस त्याचे नांव 'राजा रवि वर्मा' असे नोंदविलॆ गेले. मावेलिकरा, केरळ येथे त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ फाइन आर्टचे एक महाविद्यालय उघडण्यात आले आहे. पुण्यातही नवोदित चित्र-कलावंतांना व्यासपीठ मिळवून देणारे राजा रविवर्मा कलापीठ आहे. राजा रविवर्मा यांचे २ ऑक्टोबर १९०६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • नाटककार के. नारायण काळे

    व्ही. शांताराम यांनी काळे याना ‘ वहॉ ‘ या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संधी दिली. त्यामध्ये आर्य आणि अनार्य यांच्यामधील संघर्ष दाखवला होता.

  • लेखक प्रभाकर आत्माराम पाध्ये

    मो.ग. रांगणेकरांच्या ‘चित्रा’ साप्ताहिकात पाध्ये रुजू झाले. या साप्ताहिकातून पाध्यांनी राजकीय विषयांवर व्यासंगपूर्ण लिखाणास आरंभ केला. याशिवाय हरिभाऊ मोटे यांच्या ‘प्रतिभा’ साप्ताहिकात पाध्ये साहित्यिक घडामोडींवर लिहीत असत.

  • ज्येष्ठ गायक मन्ना डे

    मराठी भाषेत गायलेल्या त्यांच्या गीतांची संख्या इतर कोणाही अमराठी गायकाच्या तोडीस तोड आहे. त्यांनी ५५ मराठी गाणी गायली आहेत ” अ आ आई म म मका, धुंद आज डोळे”. त्याचबरोबर “घन घन माला नभी ” ही त्यांची गाजलेली चित्रपटगीते.”घरकुल” चित्रपटातील “हाउस ऑफ बांबू”हे वेगळ्या शैलीचे गीतही लोकांनी खूपच डोक्यावर घेतले होते.

  • संतकवि कृष्णदयार्णव

    हा संतकवि सातारा जिल्ह्यांतील कर्हाहड जवळील कोपरडें येथील रहाणारा. माध्यंदिनशाखी देशस्थ ब्राह्मण होय. याचें खरें नांव नरहरि असून बापाचें नांव नारायण व आईचें बहिणा होते. याचा जन्म सन १६७४ च्या अक्षय्य तृतीयेस झाला. याचें लग्न लवकर झालें होतें. या वेळीं महाराष्ट्रांत औरंगझेबाच्या स्वारीमुळें सर्वत्र धुमाकूळ माजला होता. त्यामुळें नरहरीला गांव सोडावा लागला. तो जोगाईच्या आंब्यास राहिला असतां तेथें आनंदसंप्रदायीं गोविंदाने त्याला शके १६१८ गोकुळ अष्टमीस उपदेश दिला.

    मधुकरी मागत असतां “कृष्णदयार्णव” असें नरहरि सतत म्हणे. त्यावरून तेंच त्यांचें टोपण नांव रूढ झालें. तीर्थयात्रा करून आल्यावर व प्रथम कुटुंब वारल्यावर अग्निहोत्र घेतल्यामुळें यांनीं द्वितीय संबंध केला. परंतु तितक्यांत त्यांना महारोग झाला. त्यावर उपाय म्हणून भागवताच्या दशमस्कंधावर त्यांनीं प्राकृत टीका लिहिली. यावेळीं यांचें वय ५४ होतें. या ग्रंथास आधार श्रीधरी टीकेचा आहे. पूर्वार्धाचे ४९ अध्याय संपले व रोग नाहींसा झाला. उत्तरार्धाचे ३७ अध्याय संपविले व ३८ व्या अध्यायाचे २३ श्लोक झाले आणि स्वामी पैठण येथें समाधिस्त झाले (शके १६६२ मार्गशीर्ष). पुढील साडेतीन अध्याय यांचा शिष्य उत्तमश्लोक यानें लिहिले आहेत. एकंदर ग्रंथास १६ वर्षे लागलीं. हा ग्रंथ चांगला आहे. ओवी एकनाथाप्रमाणें आहे.

    ज्ञानेश्वरीचीहि छाया ग्रंथावर पडलेली आहे. विद्वान लोक या “हरिवरदा” ग्रंथास फार मान देतात. यावरून कर्त्याची विद्वत्ता व बहुश्रुतपणा दिसून येतो. काव्याच्या दृष्टीनेंहि ग्रंथ चांगला वठला आहे. विस्ताराच्या मानानें हा ग्रंथ प्रचंड आहे. याची एकंदर ओवीसंख्या ४२ हजार आहे. स्वामींचा “तन्मयानंद” नांवाचा आणखी एक ग्रंथ व बरेचसे अभंग आणि पदें इतकी कृति सध्यां उपलब्ध आहे. संतकवि कृष्णदयार्णव यांचे १३ नोव्हेंबर १७४० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • श्रीपाद रेडीओचे मालक व रेडीओचे संग्राहक श्रीपाद कुलकर्णी

    श्रीपाद कुलकर्णी १९७८ साला पासून रेडिओचे संग्रह करत आहेत. श्रीपाद कुलकर्णी यांनी १९७८ साली चिपळूण येथे नोकरीला असताना एका स्थानिक स्टोअरमधून विकत घेतलेला फिलिप्स रेडिओ सेट हा त्यांचा पहिला सेट. श्रीपाद कुलकर्णी यांच्या कडे ४० हून अधिक vintage रेडिओ सेट्स आहेत.

  • मराठी गायिका व अभिनेत्री आर्या आंबेकर

    आर्या आंबेकरची आजीसुद्धा एक शास्त्रीय गायिका आहेत. तिचा जन्म १६ जून १९९४ रोजी झाला. त्यांनी आर्या जेमतेम २ वर्षाची असतानाच तिचे गायनातले कौशल्य ओळखले. आर्या साडेपाच वर्षाची असताना तिने आपल्या आईकडे शास्त्रीय गायनाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. वयाच्या सहाव्या वर्षी तिने संगीताची पहिली परीक्षा दिली.

    तिसरीत असताना आर्याने आंतरशालेय गायनाच्या स्पर्धेत भाग घेतला आणि आपल्या शाळेला पहिले पारितोषिक मिळवून दिले. आर्याने आतापर्यंत अनेक मराठी / हिंदी अल्बम्स मध्ये तसेच काही मराठी चित्रपटांसाठी व नाटकांसाठी गाणी गायली आहेत. सा रे ग म प लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमात आर्या सर्वोत्कृष्ट ५० स्पर्धकांमध्ये निवडली गेली, आणि सा रे ग म प लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमाची एक स्पर्धक झाली. आर्याने आपल्या सुमधुर आवाज आणि सांगीतिक कौशल्याच्या जोरावर अंतिम फेरीत व नंतर महाअंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत १२ स्पर्धकांची निवड झाली तर महाअंतिम फेरीत ५ स्पर्धकांची निवड केली होती. आर्याने या कार्यक्रमांमध्ये अनेक उत्तमोत्तम गाणी सादर केली.

    ‘पंचरत्न’, ‘गर्जती सह्याद्रीचे कडे’, ‘जय हरी विठ्ठल’, ‘मराठी अभिमानगीत’, ‘आठवा स्वर’, ‘मला म्हनत्यात आर्या आंबेकर’, ‘गीत तुझे गाता गाता’, ‘खाऊचा गाव’, ‘माझ्या मातीचे गायन’, ‘दिवा लागू दे रे देवा’ हे आर्याच्या आवाजातील अल्बम संगीतप्रेमींच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी झाले आहेत. ‘आनंदवन आले घरी’ हा थोर समाजसेवक बाबा आमटेंचं कार्य वर्णन करणारा अल्बमही खूप चर्चेत राहिला.‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेचं शीर्षक गीतही आर्यानेच गायलं आहे. आर्याला आवाजाची दैवी देणगी लाभली आहे. त्याला आपल्या रियाजाची जोड देत आर्याने संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकारांनी आर्याच्या आवाजाची व तिच्या गान कौशल्याची भरभरून प्रशंसा केली आहे. शास्त्रीय संगीत असो वा नाट्यगीते, भावगीते असो वा भक्तिगीते, मराठी चित्रपट संगीत असो वा हिंदी गाणी, इतकेच नव्हे तर, लावणी, लोक-गीते या सर्व शैलीतील गाणी आर्या तितक्याच ताकदीने गाते. आर्याला माणिक वर्मा शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. नुकतीच आर्या आंबेकर अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. ती सध्या काय करते या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीचा रोल तिने केला आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

  • ज्येष्ठ चित्रपट आणि नाट्य अभिनेते विजय कदम

    विजय कदम यांचे ‘अपराध कुणाचा’ हे पहिलं व्यावसायिक कुमार नाटक होते.पुढे ‘स्वप्न गाणे संपले’ या नाटकात सतीश दुभाषी, जयराम हर्डीकर, शिवाजी साटम अशा प्रतिथयश कलावंतांसोबत काम करावयास मिळालं. ‘खंडोबाचं लगीन’ या जागरण विधी नाटकाने विजय कदम यांना नाट्य दर्पणचा ‘सर्वोत्कृष्ट लोकनाटय अभिनेता’ हा पुरस्कार मिळवून दिला. रथचक्र, घरटे आमुचे छान, वासुदेव सांगती, अशी व्यावसायिक नाटके करता करता टूरटूर या नाटकाने मात्र जबरदस्त लोकमान्यता मिळाली. तर विच्छा माझी पुरी करा या लोकनाटयाने राजमान्यता दिली.