(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • बासरीवादक पन्नालाल घोष

    प्रतिभावान बासरीवादक पन्नालाल घोष ऊर्फ अमोल ज्योती घोष यांना बासरींच शिक्षण देण्यासाठी वयाच्या ३६ व्या वर्षांपर्यंत कोणी गुरुच नव्हता.

  • ज्येष्ठ संगीतकार व व्हायोलिन वादक नंदू होनप

    शिर्डी माझे पंढरपूर, नमन श्री एकदंता, शांताई मंगेशी, गजानन शेगावी आले, स्वामी समर्थ कथामृत्त असे अनेक भक्तिमय अल्बम त्यांनी केले. भक्तिगीते आणि भावगीते असा प्रवास करीत असतानाच त्यांनी जवळपास ९४ हून अधिक चित्रपटांना संगीत दिले.

  • ज्येष्ठ आणि श्रेष्ठ तालवादक लॉर्ड कॉवस

    लॉर्ड कावस हे भारतीय चित्रपटसृष्टीच्या पाऊणशे वर्षांच्या इतिहासाचे ते साक्षीदार होते. त्यांचा जन्म १९११ रोजी पुणे येथे झाला. लॉर्ड कावस यांचा पुण्याच्या सधन पारशी कुटुंबात लॉर्ड कॉवस यांचा जन्म झाला. घरची आíथक परिस्थिती उत्तम. छोटय़ा कॉवसचे सांगीतिक मन तिथे रमत नव्हते. डोळय़ांत स्वप्न आणि डोक्यात फक्त एक विचार, मला सांगीतिक विश्वात करिअर करायचे आहे. आपला छंद जोपासण्यासाठी वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी आई बरोबर मुंबईत मामाच्या घरी स्थायिक होण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला.

    मुंबईत जिथून जसे संगीत शिकता येईल ते शिकण्यास त्यांनी सुरुवात केली. मेजर गुंडलखान या पठाण मिलिटरी अधिकाऱ्याकडून बॅग पाइप वाजविण्यास शिकले. दिवसातून दहा दहा तास ड्रम वाजविण्याचा सराव केला. पारंपरिक भारतीय तालवाद्यांची माहिती असावी म्हणून संगीतकार गुलाम मोहोम्मदकडे तबलाही शिकले. मि. वालिसकडून ट्रम्पेट आणि मि. लुईस मोरेनो या स्पॅनिश कलाकाराकडून कास्टनेट (हे छोटेसे वाद्य स्पॅनिश नर्तक दोन्ही हातांच्या मुठीत धरून वाजवत असत.) वाजविण्यास शिकले. ड्रम्सवर मात्र स्वत: अभ्यास करून प्रावीण्य मिळविले. ‘आलम आरा’ या पहिल्या हिंदी बोलपटाचे संगीतकार होते फिरोजशहा मित्री व बहराम इराणी.

    बहराम हे लॉर्ड कॉवसचे चुलतमामा. त्यांच्याबरोबर कॉवसनी ‘आलम आरा’च्या पाश्र्वसंगीतात ट्रम्पेट वाजवून फिल्मी संगीतात प्रवेश केला. पुढे दोन-तीन वर्षे ब्रिटिश आर्मीमध्ये त्यांच्या बँडपथकात नोकरी केली व कॅप्टनपदापर्यंत पोहोचले. त्यामुळे माìचग ड्रम वाजविण्यात त्यांचा हातखंडा होता. सुनील दत्तच्या ‘उसने कहा था’ फिल्ममधील ‘जानेवाली सिपाही से पुछो’ गाणे आठवते? त्यातील माìचग ड्रम लॉर्ड कॉवस यांनी वाजविला आहे. दुसरे महायुद्ध संपले आणि त्यांची आर्मीमधील नोकरी संपुष्टात आली. त्यांना ब्रिटिश नागरिकत्व मिळाले होते, परंतु त्यांनी ते नाकारून मुंबईत राहणे पसंत केले.

    ४० व्या दशकात काही काळ ताज हॉटेलमध्ये बारमनची नोकरी करत असताना तिथे अनेक विदेशी बॅण्ड पाहायला व ऐकायला मिळाले. त्या वादकांशी दोस्ती करून तीन वर्षांत सर्व प्रकारची लॅटिन अमेरिकन वाद्य्ो ते वाजविण्यास शिकले. इतकेच नव्हे तर त्यांनी मिळेल त्या किमतीत ती वाद्य्ो विकत घेतली. स्वातंत्र्यपूर्व काळात ऑस्टोरिया, व्होल्गा, रिटज, व्हेनिस आदी ठिकाणी बॉलरूम डान्स चालत असे अनेक नाइट क्लब सुरू होते, तिथे पाश्चात्त्य नृत्य चालत असे. नौशादचा ‘जादू’ चित्रपट पाहिला असेल तर त्याची कल्पना येईल! ताजच्या बाजूला त्या काळच्या जाझ संगीतप्रेमींचे अत्यंत आवडते ग्रीन्स हॉटेल होते. इथे मोठमोठय़ाने ड्रम वाजविण्यास मुभा होती. पहाटेपर्यंत चालत असे, लॉर्ड कावस यांनी या हॉटेल्सच्या बॅण्डमध्ये वाजविण्यास सुरुवात केली.

    १९४५ च्या सुमारास गोव्याहून प्रसिद्ध जाझ ट्रम्पेट वादक चिकचॉकलेट (चिको बाज) मुंबईला आले, त्यांनी आपला बॅण्ड चालू केला, लॉर्ड कावस आता त्यांच्या बॅण्डमध्ये वाजवू लागले. अॅककॉíडयनवादक गुडी सिरवाईना कावसनी आपल्या बॅण्डमध्ये बोलावून घेतले. सुट्टीमध्ये ते सर्व मसुरीच्या क्लबमध्ये बॅण्डवादन करत असत. त्यादरम्यान लाहोरहून कुक्कू डान्सर मुंबईत आली. आपल्या नृत्यसंगीताच्या कार्यक्रमांसाठी तीही एका चांगल्या बॅण्डच्या शोधात होती.

    लॉर्ड कावस, जेरी फर्नाडिस व चिको वाजनी ‘जिरोम एॅण्ड हिज जाईव्ह क्लब बॉईज’ हा बॅण्ड तयार केला होता. कुक्कू त्यामध्ये सामील झाली. तिच्या पहिल्या फिल्मी नृत्याचे ध्वनिमुद्रण याच बॅण्डने केले. सी. रामचंद्र म्हणजे कल्पक व तल्लख बुद्धीचे संगीतकार. सतत काही तरी नवे आणि वेगळे संगीत देण्याच्या प्रयत्नात ते असत. जाझ संगीतावर त्यांचे विशेष प्रेम होते. दिवसभर गाण्यांचे ध्वनिमुद्रण करून मध्यरात्री ते बॅण्ड ऐकायला ग्रीन्स हॉटेलमध्ये चिक चॉकलेटकडे येत असत. त्यांना लॉर्ड कॉवस यांचे विविध पाश्चिमात्य तालवाद्यांवर असलेले प्रभुत्व भावले. त्या बॅण्डमधील सर्व कलाकारांना घेऊन पाश्चिमात्य शैलीचे संगीत देण्याचे त्यांनी ठरविले.

    नेमकी त्याच काळात मुंबई इलाख्यात दारूबंदी जाहीर केली गेली. नाइट क्लब बंद झाले. उदरनिर्वाहासाठी काहीतरी करणे आवश्यक होते. लॉर्ड कावस, त्यांचा मोठा मुलगा केरसी, गुडी, जेरी सारे सी. रामचंद्रांच्या वाद्यवृंदात सामील झाले. कावसनी आपल्याबरोबर विविध प्रकारचे जाझ, ड्रम्स, बोंगो, कोंगो, कबास, रेसो, एॅकॉíडयन, कॅस्टनेट, ट्रांगल, खंजिरी, चायनीज ब्लॉक, वूडब्लॉक, व्हायब्रोफोन आदी लॅटिन अमेरिकन वाद्य्ो सोबत आणली आणि या सर्वानी एक नवीन प्रकारचे फिल्मी संगीत तयार केले. आमा ‘आना मेरी जान संडे के संडे,’ ‘जवानी की रेल चली जाएगी’ (शहनाई), ‘गोरे गोरे ओ बांके छोरे’ (समाधी), ‘मोम्बासा मोम्बासा’ (सरगम), ‘मेरे पिया गए रंगून’ (पतंगा) या गाण्यांनी सर्वत्र धमाल उडवून दिली. संगीतकार सी. रामचंद्र प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले. संगीताची ही नवीन शैली यशस्वी होताच सर्व संगीतकार लॉर्ड कावस यांच्या मागे लागले. लॉर्ड कावस यांनी पारंपरिक िहदी फिल्मी संगीताला आपल्या असामान्य वादन शैलीने, कल्पकतेने आधुनिक वळण दिले.

    हॉलीवूडच्या ‘लव्ह ऑफ कारमेन’ चित्रपटावरून कारदारनी ‘जादू’ या वेषभूषाप्रधान चित्रपटाची निर्मिती केली. त्यातील गाण्यांसाठी लॉर्ड कावसनी प्रथमच कॅस्टनेट यामूळ स्पॅनिश वाद्याचा उपयोग केला, गाणे होते ‘जब नन मिले ननों से, लारा लूं, लारा लूं’ आजही फिल्मी संगीतात सिंगल कॅस्टनेट वाजविणारे होमी मुल्लर, वकील बाबा, दीपक बोरकरसारखे काही कलाकार आहेत. परंतु डबल कॅस्टनेट वाजविणारे कलाकार फक्त दोन होते. लॉर्ड कावस आणि त्यांचा धाकटा मुलगा बजी. महमूदच्या ‘शबनम’ फिल्ममध्ये डबल कॅस्टनेट आहे, ‘हर नजर में सौ अफसाने.’ खंजिरीचा उपयोग यापूर्वीही भारतीय संगीतातून केला जात होता. वादक तालासाठी धातूच्या चकत्यांचा वापर करीत. लॉर्ड कावस यांनी खंजिरी वादनात अमेरिकन शैली आणून ते पूर्ण वाद्य वाजविण्यास सुरुवात केली.

    अनेक लोरींमध्ये (अंगाई गीतात) हळुवार घंटानाद ऐकू येतो. फिल्मी संगीतात हा नवीन प्रकार लॉर्ड कावस यांनी आणला. घोडय़ांच्या टापांचा आवाज निर्माण करण्याचे प्रथम श्रेय आर. सी. बोराल व पंकज मलिकला जाते. (चले पवन की चाल) परंतु घोडय़ांच्या टापांचा अस्सल ध्वनी निर्माण करण्याची किमया लॉर्ड कावस यांचीच! दोन रिकाम्या करवंटय़ा फरशीवर वाजवून त्यांनी तो आभास निर्माण केला होता. ‘अनमोल घडी’, ‘उडन खटोला’, ‘नया दौर’, ‘तुमसा नहीं देखा’ आदी चित्रपटांतून त्यांनी वादन केले आहे. केवळ घोडय़ांच्या टापांचाच नाही तर बुटाच्या टापांचा (फूट स्टेपचा) अफलातून ध्वनीही त्यांनी आपल्या कल्पक बुद्धीने निर्माण केला आहे.

    सी. रामचंद्रच्या ‘इना मिना डीका’ (आशा) गाण्यावरील वैजयंतीमालाच्या नृत्यात त्यांनी फूटटॅप डान्ससाठी, तिच्या पायातील बुटांच्या टापांचाही ध्वनी निर्माण केला आहे. काचेवर दोन नाण्यांनी वादन केले. मिष्किलपणा त्यांच्या रक्तातच होता. रेकॉìडगमध्ये ते खूप गमतीजमती करीत असत. ‘दिल का हाल सुने दिलवाला’ (श्री ४२०) मधील ‘चुकचूक’ आवाज ही त्यांचीच कल्पना होती. अलबेलामधील ‘ओ बेटा जी’ गाण्यात त्यांनी किचनमधील भांडी वाजवली तर नोकरीमधील किशोरच्या ‘अर्जी हमारी’ गाण्यात चक्क टाइपरायटर वाजवला आहे. गाईडमधील ‘पिया तोसे नना’मधील घुंघरांची साथही त्यांची होती.

    भगवानचा ‘अलबेला’ त्यातील संगीतामुळे तुफान लोकप्रिय झाला. त्याचे बरेचसे श्रेय लॉर्ड कावस यांना द्यावे लागेल! ‘शोला जो भडके’मधील सुरुवातीचे बेंगो पीस व ‘दिवाना परवाना’मधील पाश्चिमात्य ऱ्हिदम काकांनी दिला. ‘दिवाना परवाना’च्या चित्रीकरणप्रसंगी भगवानदादांनी ते गाणे वाजविणाऱ्या प्रमुख कलाकारांनाही (चिक चॉकलेट, फ्रान्सिस, जेरी फर्नाडिस, सहृद कार) आपल्या समवेत नाचायला लावले आहे. बोंगो, कोंगो, चायनीज ब्लॉक, वूडब्लॉक, ड्रम, व्हायोब्रोफोन वादनात तर त्यांचा हात धरणारा कुणीही कलाकार फिल्मी संगीतात नव्हता. पुढील गाणीच त्याची साक्ष देतील!

    ‘जाने क्या तूने कहीं’ - प्यासा (चायनीज ब्लॉक), ‘आई ए मेहरबां’ - हावडा ब्रिज (बोंगो व वूडब्लॉक), ‘हूं अभी मं जवां ऐ दिल’ - भाई भाई (बोंगो), ‘लो प्यार की हो गई जीत’ - जादू (बोंगो), ‘अंधे जहाँ के अंधे रास्ते’ - पतिता (बोंगो), ’जाता कहा हैं दीवाने‘ - सीआयडी (बोंगो), ‘ये रात ये चांदनी’ - जाल (बोंगो).

    आर.डी.बर्मन यांच्या संगीतामध्ये लॉर्ड फॅमिलीचे प्रचंड योगदान आहे. ‘आराधना’ या चित्रपटातील ‘रूप तेरा मस्ताना’ या गाण्यात बोंगो - कावस लॉर्ड, एकॉíडयन - केरसी लॉर्ड, व्हायब्रोफोन - बजी लॉर्ड यांनी वाजविला आहे.

    १९४० ते १९९० या कालखंडात असा एकही संगीतकार नव्हता की ज्याचे गाणे लॉर्ड कावस यांनी वाजविले नाही. पाश्चात्त्य आणि भारतीय वाद्यांवर त्यांची कमालीची पकड होती. नारळाच्या करवंटय़ा, टाईपरायटर, बुटांच्या टापांच्या आवाजाचा वापर करून त्यांनी सदाबहार गाण्यांना जन्म दिला. कावस म्हणजे हिंदी फिल्मी संगीताचा चालताबोलता इतिहास होता. लॉर्ड कावस यांचे २४ डिसेंबर २००६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट/ अरुण पुराणिक

  • रणधीर कपूर

    रणधीर कपूर यांची एक हिंदी चित्रपट प्रसिद्ध अभिनेता व करीश्मा व करीना कपूर यांचे वडील व राजकपुर यांचा मुलगा अशी ओळख आहे. त्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४७ रोजी झाला. रणधीर कपूर यांना चित्रपट क्षेत्र हे वारसाने मिळाले आहे. त्यांचे वडील राज कपूर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार होते. तर रणधीर कपूर यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात ‘श्री ४२०’ चित्रपटात बालकलाकार म्हणून केली होती. ‘दो उस्ताद’ चित्रपटात काम केलेल्या रणधीर कपूर यांनी १९६८ सालच्या ‘झुक गया आसमान’ चित्रपटा दरम्यान सहायक दिग्दर्शक म्हणूनही काम पाहिले होते. १९७१ च्या ‘कल आज और कल’ चित्रपटात अभिनय केलेल्या रणधीर कपूर यांनी या चित्रपटाद्वारे चित्रपट दिग्दर्शनाच्या क्षेत्रात देखील पाऊल ठेवले. चित्रपटात कपूर कुटुंबातील पृथ्वीराज कपूर, राज कपूर आणि रणधीर कपूर या तीन पिढ्यांनी अभिनय केला होता. याशिवाय बबीताने देखील महत्वाची भूमिका साकारली होती. सत्तर ऐंशीच्या दशकात त्यानी हिंदी चित्रपट जवानी दिवानी, हाथ कि सफाई, रामपूर का लक्ष्मण, ढोंगी, खलिफा, कच्चा चोर, कल आज और कल, पोंगा पंडित, कस्मे वादे, बिवी ओ बिवी, भंवर, हरजाई, हमराही, चाचा भातीजा,राम भरोसे,आज का महात्मा, लफंगे, खलिफा आखरी डाकू, पुकार असे चांगले व उत्तम चित्रपट दिले. किशोरकुमार व त्याचे चांगले जमत असे. किशोरकुमार यांनी गायलेली गुम है किसीके प्यारमे दिल सुबह शाम', 'जा ने जा धुंडता फिर रहा' व 'भवरे की गुंजन ए मेरा दिल' ही गाणी अजून लोकांच्या तोंडावर आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • ‘जनकवी’ पी. सावळाराम

    पी. सावळाराम यांचा जन्म ४ जुलै १९१४ रोजी झाला.पी.सावळाराम यांचे खरे नाव- निवृत्ती रावजी पाटील. वि. स. पागे यांनी ह. ना. आपटे यांच्या ‘उष:काल’ या कादंबरीतील सावळ्या तांडेल या पात्रावरून त्यांना प्रेमाने दिलेले ते नाव! सावळारामांनी ते आयुष्यभर स्वीकारले. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. तेव्हा त्या कॉलेजात माधव ज्यूलिअन शिकवत असत. त्यांच्या संपर्कात ते आले, तेव्हा त्यांनी
    ‘सौंदर्य नसते रंगात।
    सौंदर्य असते अंतरंगात।
    उघडुनि पाही।’
    या ओळी असलेली ‘काळा गुलाब’ शीर्षकाची कविता लिहिली.

    ही कविता तेव्हा कॉलेजमधल्या वर्णाने काळी, परंतु दिसायला सुंदर असलेल्या एका मुलीवर लिहिली होती. १९४९ साली ‘राघु बोले मैनेच्या कानात ग’ हे पहिले गीत त्यांनी लिहिले. वसंत प्रभू, माधव शिंदे व दिनकर पाटील हे त्यांचे स्नेही होते. मराठी चित्रपटांचा तो ऐन बहराचा काळ होता. जिथे चित्रपटगृहे होती, तिथे प्रदर्शित होणाऱ्या बऱ्याच चित्रपटांतून पी. सावळारामांची गाणी असायची. सर्वसामान्य लोकांपर्यंत ती अशी थेटपणे पोहोचली होती. परंतु पी. सावळाराम यांच्या गीतांचा संग्रह फार उशिरा- म्हणजे १९९१ साली कुसुमाग्रजांच्या प्रस्तावनेसह प्रसिद्ध झाला. पण त्याआधी कित्येक वर्षे तुकारामांच्या अभंगांप्रमाणे सावळारामांची गीते लोकांच्या मनात आणि कंठात कायमची बसली होती.

    त्यांना सामाजिक कार्याची ओढ होती. पी. सावळाराम यांची गीते अशी लोकमानसात त्यांचा ठेवा म्हणून स्थिरावली आहेत. संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम यांच्या अभंग व ओव्यांना हे भाग्य लाभले होते. अलीकडल्या काळात ग. दि. माडगूळकर यांच्या बरोबरीने कवी पी. सावळाराम यांना ते लाभले. या अर्थाने ते ‘जनकवी’ आहेत. ‘गंगा यमुना डोळ्यांत उभ्या का?’ या गीतातील भावना लग्न होऊन सासरी जाणाऱ्या कुणाही मुलीच्या आईच्या आहेत. आपल्याला दुरावणार म्हटल्यावर होणारे दु:ख अतिशय अल्पाक्षरी, पण अर्थपूर्ण शब्दांत त्यांनी साक्षात् उभे केले आहे. म्हणूनच त्यातली भावना कुणा एका ‘क्ष’ आईची न उरता कुणाही आईची असू शकते. त्यांच्या गीताच्या या सामर्थ्यांमुळेच ते बृहन्महाराष्ट्रात अजरामर झाले आहेत. ‘ज्ञानदेव बाळ माझा’, ‘विठ्ठल तो आला आला’ व ‘सखू आली पंढरपुरा’ ही गीते. ती लोकभाषेला सहजपणे जवळ जाणारी आणि तिच्यातील नादमाधुर्य टिपणारी आहे. पण त्याचबरोबर एखादी लावणी लिहिताना ते लावणीचा म्हणून जो ठसका असतो, तिथे नायिकेची प्रेमासंबंधातली जी धिटाई असते ती ते नेमक्या शब्दांमध्ये टिपतात. उदाहरणार्थ, ‘काल रातीला सपान पडलं’ किंवा ‘तुला बघून पदर माझा पडला’ या त्यांच्या लावण्या पाहाव्यात. सावळारामांनी जवळजवळ सातशे ते आठशे गाणी लिहिली. मा.पी. सावळाराम यांना ‘जनकवी’ ही उपाधी देताना कुसुमाग्रजांना नेमके काय अभिप्रेत होते, हे त्यांनी पुढील शब्दांमध्ये व्यक्त केले आहे.. ‘ पी. सावळाराम त्यांच्या रसपूर्ण आणि भावगर्भ गीतांच्या द्वारा महाराष्ट्रातील असंख्य घरांपर्यंत- नव्हे, घरातल्या स्वयंपाकघरांपर्यंतही पोहोचले आहेत. खानदानी दिवाणखान्यापासून गोरगरीबांच्या ओटी-ओसरीपर्यंत सर्वत्र या नावाचा संचार झाला आहे. नागरवस्तीच्या वेशीवरच ते थांबले नाहीत. ग्रामीण भागातील झोपडय़ांत आणि चावडी-चव्हाटय़ावरही त्यांचे स्वागत झाले आहे. सावळारामांनी गद्यलेखनही केले. आकाशवाणीच्या ‘कामगार सभे’साठी ‘सहज सुचलं म्हणून’ कार्यक्रमात त्यांनी संहितालेखन केले. ‘माणसाला पंख असतात’ या चित्रपटाचे लेखन, ‘माणसा आधी हो माणूस’ व ‘मंगल कलश’ हे लघुपट व एस. टी.वर ‘सारे प्रवासी घडीचे’ हे वार्तापत्र त्यांनी लिहिले. याशिवाय त्यांनी ‘पुत्र व्हावा ऐसा’, ‘नांदायला जाते’, ‘कन्यादान’, ‘सलामी’ आणि ‘बेरडाची अवलाद’ या चित्रपटांच्या कथाही लिहिल्या. १९८२ सालच्या ‘गदिमा’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. १९६४ साली ते ठाण्याचे नगराध्यक्ष झाले. येऊर पाणी योजना आणि ड्रेनेज सिस्टमसंबंधी त्यांनी विशेषत्वाने लक्ष घालून त्या पूर्णत्वास नेल्या. ठाण्याच्या ज्ञानसाधना कॉलेजच्या स्थापनेत इतरांबरोबर त्यांचाही सहभाग होता. मा.पी. सावळाराम यांचे २१ डिसेंबर १९९७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • अक्षरकार’ कमल शेडगे

    कमल शेडगे हे धुरंधर, ज्येष्ठ कलाकार. अक्षरांची कलात्मक मांडणी करून शेडगे शीर्षकाला असं काही रुपडं बहाल करत असत की ते शीर्षक हीच कलाकृतीची ओळख बनत असे. कमल शेडगे यांनी मुद्रित माध्यमात विपुल काम केले असले तरी त्यांची खरी ओळख होती ती टाईम्स समूहातील प्रकाशनांसाठी तसेच नाटक, सिनेमाच्या जाहिरातींसाठी त्यांनी केलेल्या कला दिग्दर्शन व सुलेखनामुळे!

  • राज कपूर निर्मित — दिग्दर्शित “संगम” चित्रपट प्रदर्शनाला ५४ वर्षे झाली

    प्रदर्शित तारीख १८ जून १९६४
    राज कपूर ह्यांनी दिग्दर्शन व निर्मिती केलेल्या ह्या चित्रपटामध्ये स्वत: राज कपूर, वैजयंतीमाला व राजेंद्र कुमार ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. संगमचे कथानक प्रेम त्रिकोणावर आधारित असून हा चित्रपट तब्बल ४ तासांचा आहे. संगम राज कपूर यांनी निर्मिती केलेला पहिलाच रंगीत चित्रपट होता. साने गुरुजींच्या ‘तीन मुले’ या कथेची साधारण कल्पना घेऊन के. अब्बास यांनी ‘संगम’ची कथा लिहिली. ही कथा प्रभावीपणे गुंफताना राज कपूर यांनी जी कल्पकता दाखवली, जे परिश्रम घेतले, त्याला तोड नाही.

    कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय, संकलन, कलादिग्दर्शन, छायाचित्रण, संगीत, पाश्र्वसंगीत या सर्वच आघाडय़ांवर हा चित्रपट लक्षणीय ठरला. संगममधील सर्व गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. ‘मेरे मन की गंगा’ या गाण्याचा किस्सा तेव्हा खूप गाजला होता. नायिकेच्या भूमिकेसाठी वैजयंतीमालाचा बरेच दिवस होकार येत नसल्याने आरकेने म्हणे तिला तार करून प्रश्न विचारला होता, ‘बोल राधा बोल संगम होगा के नही..’ आणि तिनेही ठसक्यात उत्तर दिलं होतं, ‘होगा, होगा, होगा!’ पुढे महान गीतकार शैलेंद्रने हे गाणं पूर्ण केलं आणि एसजेंनी त्याला सहज-सोप्या चालीत गुंफलं. गाण्यात नायिकेचा आवाज वापरण्याची कन्सेप्ट तेव्हा नवीनच होती. त्यानंतर अनेक नायिकांनी याचं अनुकरण केलं.

    रफी यांनी गायलेल्या ‘ये मेरा प्रेमपत्र पढकर’ने लाखो कानसेनांवर मोहिनी घातली होती. इफ्तेकार, राजेंद्र कुमार, राज मेहरा, नाना पळशीकर, ललिता पवार, अचला सचदेव आणि हरी शिवदासानी हे सहयोगी कलाकार म्हणून कामे केली आहेत. हा चित्रपट दासरी नारायण राव यांनी तेलुगू आणि कन्नड भाषांत ‘स्वप्न‘ नावाने निर्माण केला॰ हिबरू भाषेतही हा चित्रपट ‘ Desperado Square ‘ या नावाने निर्माण झाला होता. या चित्रपटाला लागणारा वेळ २३८ मिनिटे (४ तास) होता॰ याला दोन मध्यंतरे होती; आणि Interval ऐवजी First Intermission / Second Intermission असे शब्द वापरले होते. त्यामुळे एका दिवसात ४ ‘खेळ‘ दाखवणार्‍या चित्रपटगृहांना पहिला ‘खेळ‘ सकाळी ७ वाजता सुरू करावा लागत असे. हा ‘आरके फिल्म्स‘चा पहिला रंगीत चित्रपट॰ म्हणून त्याची जाहिरात सिलोन रेडियोवर ‘आग‘ से लेकर ‘जिस देशमे‘ तक मनोरंजन के नऊ युग थे |

    अब ‘संगम‘से दसवा रंगीन युग शुरू होता है I ‘, अशी अमीन सायानीच्या आवाजात होत असे. संगमसाठी राज कपूर यांना फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार तर वैजयंतीमाला यांना फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाले.
    या चित्रपटाची कथा अशी होती॰ एका गावात सुंदर, राधा आणि गोपाळ ही तीन मुले लहानपणापासूनच सवंगडी म्हणून एकत्र वाढत असतात॰ सुंदरचे राधावर प्रेम असते आणि त्याने तिच्याशीच लग्न करण्याचे पक्के केले असते॰ सुंदरने वेळोवेळी आपले राधावरचे प्रेम व्यक्त केलेले असते॰ मात्र, राधा मनोमन गोपाळवर प्रेम करत असते॰ अंत:र्मुख असणारा गोपाळ आपले तिच्यावरचे प्रेम कधीच बोलून दाखवत नाही॰ सुंदरची हवाई दलात निवड होते॰ तो कश्मीरात लढाईवर जातो॰ जाताना तो गोपाळकडून राधावर लक्ष ठेवण्याचे वचन घेतो॰ युद्धात सुंदरच्या विमानाला अपघात झाल्याची आणि सुंदर मृत झाल्याची बातमी येते॰ काही दिवसांनी राधा आणि गोपाळ एकमेकांवर प्रेम करू लागतात॰

    अचानक सुंदर सुखरूप परत येतो॰ गोपाळ आपल्या प्रेमाचा त्याग करतो आणि राधा–सुंदरचे लग्न होते॰ सुंदरच्या गैरहजेरीत गोपाळ राधाला सही न केलेले प्रेमपत्र लिहितो॰ राधा ते आपल्या प्रेमाची निशाणी म्हणून जपून ठेवते॰ राधा-सुंदर मधुचंद्रासाठी युरोपमधील काही देशांत फिरून येतात॰ नंतर राधा गोपाळला त्यांच्या आयुष्यातून दूर जाण्यास सुचवते॰ एक दिवस सुंदरला ते सही न केलेले प्रेमपत्र सापडते॰ मग चिरपरिचित फिल्मी नाट्य॰ सुंदर पिस्तूल घेऊन येतो, मधल्या काळात न्यायाधीश झालेला गोपाळ त्याच पिस्तुलाने स्वत:वर गोळी झाडून घेतो॰

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट / प्रकाश चांदे
    "
    संगम" चित्रपट
    https://www.youtube.com/watch?v=8wSC6ti_ly4
    "संगम" चित्रपटातील गाणी.
    https://www.youtube.com/watch?v=MISzXVVVFUo

  • दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टी

    बाहुबली चित्रपटात देवसेनाची भूमिका करणारी अनुष्का ही रियल लाइफमध्ये मात्र खूपच ग्लॅमरस आहे. अनुष्का शेट्टी हे साऊथ सिने इंडस्ट्रीतील एक मोठं नाव असून तिकडे ती टॉपची हिरोईन आहे. इतकेच नाहीतर सिनेमासाठी पैसे घेण्याबाबतीतही ती साऊथमधील सर्व अभिनेत्रांच्या कितीतरी पुढे आहे.

  • महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री रावसाहेब रामराव पाटील ऊर्फ आर आर पाटील

    आबा सत्तेची एक एक पायरी चढत गेले पण कुटुंबानं आबांप्रमाणेच आपला साधेपणा टिकवून ठेवला. पत्नी सुमन, मुलगा रोहित आणि मुलगी स्मिता, आई भागिरथी यांनी वागण्या बोलण्यात सत्तेचा दर्प येऊ दिला नाही. आबांचे एक भाऊ सुरेश हे गावाकडे शेती बघतात. तर दुसरे भाऊ राजाराम पोलीस दलात आहेत. आबा गृहमंत्री असतांना आबांचे भाऊ राजाराम पाटील पोलीस दलात कुठलाही बडेजाव न करता सेवा बजावत होते.

  • ललित लेखक मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष

    डॉ. मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष हे ज्येष्ठ समीक्षक आणि ललित लेखक म्हणून ओळखले जात असत. ‘पुरुषराज अळुरपांडे’ असं काहीसं विक्षिप्त नाव घेऊन काही लेख बडोद्याच्या अभिरुची मासिकांत येत असत. गंमत म्हणजे ते नाव घेऊन लिहिणारी एक व्यक्ती नसून तीन जण होते. ते म्हणजे – पु. ल. देशपांडे, रा.वा.अलूरकर आणि मं. वि. राजाध्यक्ष!