त्यांच्या पुस्तकांमध्ये कोकणातील निसर्ग केंद्रस्थानी होता. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३५ रोजी गुहागरमध्ये झाला. पुण्यातील एसएनडीटी महाविद्यालयातून मराठीच्या प्राध्यापिका म्हणून त्यांनी काम केले होते. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या त्या माजी अध्यक्षा आणि गेली सुमारे वीस वर्षे विश्वस्त म्हणून काम पाहात होत्या. डॉ. दीक्षित यांनी ‘प्राचीन मराठी वाङ्मयातून दिसणारे स्त्री दर्शन’ या विषयावर पीएचडी प्राप्त केली होती. त्यांना चार राज्य पुरस्कार, भा. रा. तांबे पारितोषिक, ना. धों. ताम्हनकर पारितोषिक, वा. ल. कुळकर्णी पारितोषिक, दि. के. बेडेकर पारितोषिक आणि मसाप पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं आहे. बालसाहित्याशिवाय त्यांनी विविध विषयांवर संशोधनपर लेखन केले. ‘प्राचीन मराठी साहित्यातील स्त्रीचे दर्शन’ या त्यांच्या पुस्तकाला राज्य सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा पुरस्कार मिळाला होता. परभणीला २००५ साली झालेल्या अखिल भारतीय बालसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
डॉ. दीक्षित यांची विविध विषयांवरील सुमारे ५० पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यामध्ये ‘अंतरीचे धावे’, ‘बहाद्दर बल्लू’, ‘मुके मित्र’, ‘मैत्री मोलाची’ ‘आजोबांचं घर’, ‘आनंदयोगिनी’, ‘कोकण - विविध दिशा आणि दर्शन’, ‘गंमत गाव’, ‘गाणारं झाड’, ‘घर आमचं कोकणातलं’, ‘चंदनवेल’, ‘नाच रे मोरया’ ‘पंख नवे’, ‘पोपटाचं झाड’ आदी पुस्तके आहेत. ‘फुलांना मिळाले रंग’ हे बालनाट्य त्यांनी लिहिले. ‘स्वामी अपरान्ताचा’ ही कादंबरी त्यांनी लिहिली. डॉ. लीला गणेश दीक्षित यांचे १३ ऑक्टोबर २०१७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
योगेश्वर अभ्यंकर हे महान गीतकार होते. सर्जनशील कवी व लेखक म्हणून त्यांची ओळख होती.
त्यांचा जन्म ५ नोव्हेंबर १९२९ रोजी झाला.
'अक्रुरा नेऊ नको माधवा, अजिंक्य भारत अजिंक्य, अभिमानाने मीरा वदते, अमृताची गोडी तुझ्या, आज मी नाथा घरी आले' यासारखी एकाहून सरस गाणी त्यांनी लिहिली व त्याकाळच्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये ती गाजली.
योगेश्वर अभ्यंकर यांचे १४ नोव्हेंबर २००० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
योगेश्वर अभ्यंकर यांनी लिहीलेली काही गाणी
अक्रुरा नेऊ नको माधवा,
अजिंक्य भारत अजिंक्य,
अभिमानाने मीरा वदते,
अमृताची गोडी तुझ्या,
आठवणी दाटतात.
आज दिग्गज दिग्दर्शक व निर्माते यश चोप्रा यांची पुण्यतिथी
जन्म:-२७ सप्टेंबर १९३२
यशजींनी अभियंता बनावे अशी त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा होती, लंडनला जाण्यासाठी त्यांचा पासपोर्टही बनला होता. मात्र नियतीला काही औरच मंजूर होते आणि ते चित्रपटसृष्टीत आले.
यश चोप्रा यांच्या चित्रपटाचे वैशिष्टय म्हणजे गीत आणि संगीत. यश चोप्रा हे कवी असल्याने त्यांनी स्वत: कधीही उथळ दर्जाची गीते निवडली नाहीत. त्यामुळे सगळी इंडस्ट्री आनंद बक्षीची धूळ झाडत असतानाही चोप्रा यांनी साहिर लुधियानवीची साथसंगत कधी सोडली नाही.
बी. आर. चोप्रा आणि यश चोप्रा हे सख्खे भाऊ. सहायक दिग्दर्शक म्हणून यश चोप्रा यांनी आपल्या करिअरला सुरवात केली. १९५९ मध्ये "धूल का फूल‘ या चित्रपटाद्वारे त्यांनी स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. राजेंद्र कुमार व माला सिन्हा या कलाकारांना घेऊन त्यांनी हा चित्रपट बनविला. त्यानंतर "आदमी और इन्सान‘, "धरतीपुत्र‘, "वक्त‘ असे काही चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. १९६५ मध्ये त्यांचा 'वक्त' चित्रपट आला. बॉलीवूडमधील हा पहिला मल्टी स्टार चित्रपट होय. राजेश खन्ना व शर्मिला टागोर यांना घेऊन बनविलेल्या "दाग‘ या चित्रपटाद्वारे त्यांनी निर्मितीत पाऊल टाकले. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. १९७३ मध्ये त्यांनी यशराज चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना केली. "काला पत्थर‘, "चांदनी‘, "लम्हे‘, "दिल तो पागल है‘, "वीर झारा‘, "सिलसिला‘, "डर‘, "रब ने बना दी जोडी‘ अशा अनेक चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली. तसेच "दीवार‘, "त्रिशूल‘ अशा काही अन्य निर्मात्यांच्या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. त्यांच्याबरोबर अनेक कलाकारांनी काम केले असले अमिताभ बच्चन हे त्यांचे आवडते कलाकार होते. "सिलसिला‘साठी त्यांनी अमिताभ बच्चन, जया भादुरी व रेखा यांना एकत्र आणले. त्या वेळी हिंदी चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली होती. विविध आणि आकर्षक लोकेशन्स व सुमधुर गाणी ही त्यांच्या चित्रपटांची खासियत होती. दादासाहेब फाळके पुरस्कारासह पद्मभूषण, तसेच अन्य काही पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. यशजींनी पाच दशक चित्रपटसृष्टीवर राज्य केले. यादम्यान त्यांना ६ राष्ट्रीय व ११ फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. चित्रपटसृष्टीतील अतुल्य योगदानासाठी त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
मा.यश चोप्रा यांचे २१ ऑक्टोबर २०१२ रोजी निधन झाले. यश चोप्रा यांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.विकी पिडीया
सात सक्कं त्रेचाळीस’, ‘रावण अँड एडी’, ‘ककल्ड’, ‘द एक्स्ट्राज’ आदी क्लासिक कादंबऱ्यांनी साहित्यप्रेमींच्या मनावर अधिराज्य निर्माण करणारे प्रसिद्ध साहित्यिक, कादंबरीकार, पटकथा लेखक, नाटककार किरण नगरकर यांचे संपूर्ण शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून झाले.
दो बिगा जमीन, देवदास, मधुमती, सुजाता आणि बंदिनी आदी चित्रपटांतून रसिकांच्या मनावर मोहिनी घालणारे हिंदी चित्रपट दिग्दर्शक म्हणजे बिमल रॉय. त्यांचा जन्म १२ जुलै १९०९ रोजी झाला. हिंदी चित्रपटसृष्टीत त्या काळात कधी शेतकऱयांची व्यथा, रहस्यमय, विरह, समाजव्यवस्था आदी विषय त्यांनी आपल्या चित्रपटातून हाताळले आणि आपली वेगळी छाप त्यांनी निर्माण केली. ते खास करून चित्रपटामध्ये सौदर्याचा वापर करून घेणार दिग्दर्शक म्हणून ओळखले जात. त्यांच्या चित्रपटातील प्रत्येक फ्रेम ही कलात्मक असायची. मा.बिमल रॉय यांच्या चित्रपटात संवेदनशील नातेसंबंध आणि समाजातील उपेक्षित वर्गांचे चित्रण असायचे. मा.बिमल रॉय यांनी एक तरुण फिल्ममेकर म्हणून त्याकाळी अनेकांना प्रेरणा दिली. गुलजार यांना मा.बिमल रॉय यांनी त्यांच्या "बंदिनी' या चित्रपटासाठी त्यांना संधी दिली आणि त्यांनी लिहिलेले "मोरा गोरा अंग लै ले..' हे नूतन यांच्यावर चित्रित झालेले गाणे सुपरहिट ठरले. बिमल रॉय स्वत:च एक चित्रपटाची शाळा होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.बलराज सहानी यांची दो बिघा जमींन बद्दल एक आठवण सांगितली जाते.
बलराज सहानी हे त्या काळातले एक उच्चविद्याभूषित होते. कलकत्त्यात ते तेव्हा प्राध्यापकी करत. इंग्लंडवरून शिकून आल्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व हे साहेबी होतं. बिमल रॉय हे चित्रपट बनवत असल्याचं त्यांना कळल्यानंतर ते त्यांना भेटायला गेले व आपल्याला या चित्रपटात भूमिका करायची आहे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. बिमल रॉय यांचं पात्र हे एका गरीब शेतक-याचं, एका रिक्षावाल्याचं होतं. बलराज सहानी यांना सुटाबुटात पाहून बिमल रॉय यांनी त्यांना ही भूमिका देण्याचं नाकारलं. बलराज सहानी यांनाही आपली चूक कळून आली. त्यानंतर या भूमिकेसाठीच्या पोषाखात त्यांनी वावरून त्या भूमिकेचा अभ्यास केला. इतकंच नव्हे तर आपल्या बायका-मुलांना घेऊन त्यांनी कलकत्त्यात काही काळ रिक्षा ओढण्याचाही सराव केला. या सा-या गोष्टीचा अभ्यास करून मग ते पुन्हा बिमल रॉय यांना भेटायला गेले. त्यांना त्या लुकमध्ये पाहिल्यावर मग बिमल रॉय यांनी त्यांना ही भूमिका देऊ केली. कलाकाराच्या प्रभावापुढे न झुकणारे असे ते दिग्दर्शक व आपल्या दिग्दर्शकाच्या समाधानासाठी प्रचंड कष्ट घेणारे ते कलाकार आता सापडणं मुश्कीलच.
बिमल रॉय हे त्या काळातले एकमेव असे दिग्दर्शक होते ज्यांच्या घरी दिलीप कुमार स्वत: कथा ऐकायला येत असे. एरवी सर्वच दिग्दर्शकांना दिलीप कुमार आपल्या घरी बोलावत अस्त. बिमल रॉय यांनी मात्र कधीही फोन केला तर ते लागलीच त्यांच्या घरी येत असत. दिलीप कुमार यांच्या अभिनय कारकिर्दीतली सर्वात प्रभावी व्यक्तिरेखा म्हणजे देवदास हा चित्रपट होय असे दिलीप कुमार स्वत:च म्हणत आहे. भारतीय चित्रपट इतिहासात जे देदीप्यमान तारे चमकून गेले त्यामध्ये निर्माते-दिग्दर्शक बिमल रॉय यांचे स्थान अढळ आहे. रॉय यांच्या चित्रपटांना आजमितीस अनेक वर्षे लोटली तरी त्यातील आशय, कलात्मकता आणि सर्जनशीलता सामान्य रसिकांच्या हृदयाचा ठाव अजूनही घेत असतात. १९११ ते १९६६ या काळातील ‘उदयरे पथे’, ‘दो बीघा जमीन’, ‘परिणीता’, ‘बिराज बहू’, ‘देवदास’, ‘मधुमती’, ‘सुजाता’, ‘बंदिनी’, ‘परख’ आणि ‘बापबेटी’ अशी अनेक चित्ररत्ने रॉय यांच्या श्रेष्ठत्वाची जाणीव करून देतात. बिमल रॉय यांचे ८ जानेवारी १९६६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
बिमल रॉय यांच्या काही कलाकृतीची माहिती :
दो बिघा जमींन
साल:- १९५३ या चित्रपटाची प्रेरणा त्यांना बायसिकल थिव्ह्स या चित्रपटावरून आली होती. एक अल्पभूधारक असा शेतकरी, त्याच्याकडे केवळ दोन बिघा जमीन असते. या गावात त्याला अनेक संकटांचा सामन करावा लागतो. याच गावातला एक सावकार एका मिल मालकाबरोबर मिळून या गावात एक मिल बनवण्यासाठी जमीन मिळवून देण्याचं कारस्थान करतो. त्याचाही त्रास या शेतक-याला होतो. या शेतक-याला आपल्या उदरनिर्वाहासाठी शहरात यावं लागतं.
त्यानंतर त्याच्या आयुष्यात काय होतं. त्याच्या जमिनीचं काय होतं? याची कथा या चित्रपटातून पाहायला मिळते. बलराज सहानी व निरुपा रॉय यांच्या अभिनयासाठीही हा चित्रपट आठवणीत आहे. अगदी साधेपणाने कथा सांगण्याचं बिमलदांचं कौशल्यही या चित्रपटातून पाहायला मिळतं. त्या काळात या चित्रपटाने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले होते.
देवदास
साल:-१९५५
शरदचंद्र चटोपाध्याय यांच्या देवदास या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची निर्मिती बिमल रॉय यांनी केली. आपल्या लहानपणीच्या प्रेमासाठी नंतर दारूच्या आहारी गेलेल्या व स्वत:च्या जीवनाचा नाश केलेला नायक या चित्रपटातून दाखवण्यात आला आहे.
दिलीप कुमार, वैजंयती माला व सुचित्रा सेन यांच्या विलक्षण अभिनयासाठीही हा चित्रपट ओळखला जातो. एक ठाकूर आपल्या जीवनाचं कशा प्रकारे पतन करून घेतो हे या चित्रपटातून दाखवण्यात आलं असलं तरी समाज व व्यक्तिस्वातंत्र्य या महत्त्वाच्या गोष्टीकडेही हा चित्रपट लक्ष वेधतो. आपल्या विलक्षण शैलीच्या जोरावर बिलदांच्या या चित्रपटालाही अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. याच चित्रपटाचा रिमेक नंतर शाहरुख खान याला घेऊन संजय लीला भन्साली यांनी केला होता.
मधुमती
साल:-१९५८
या चित्रपटात एका पुनर्जन्मावरच्या प्रेमावरची कथा सांगण्यात आली होती. एका निर्जन जागी गेलेल्या एका इंजिनीअरला आपल्या पुनर्जन्माच्या प्रेमाची कथा आठवते व त्यानंतर त्यांच्या जीवनात काय काय उलथापालथी होतात हे या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे.
फ्लॅशबॅक व वर्तमानाचा सुरेख वापर करून मांडण्यात आलेली ही कथा लोकांना चांगलीच भावली होती. या चित्रपटाबरोबरच या चित्रपटातली गाणीही गाजली. तब्बल बारा गाण्यांचा या चित्रपटात समावेश होता. ही गाणी आजही तितकीच अवीट गोडीची आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांनी, समीक्षकांनी व पुरस्कारांनीही गौरवण्यात आले होते. शाहरुख खानने नंतर याच चित्रपटावर आधारित ओम शांती ओम या चित्रपटाची निर्मिती केली होती. तोही प्रचंड यशस्वी ठरला होता.
सुजाता
साल:-१९५९
जातीप्रथेच्या संदर्भात अनेक माध्यमातून चर्चा होत असते. असे असले तरी भारतात ती एक मोठी समस्या आहे. याच विषयावर आधारित चित्रपटाची निर्मिती बिमलदांनी केली होती. एका ब्राह्मण मुलाचे दुस-या जातीतल्या मुलीशी प्रेम होते. त्यानंतर समाज त्यांच्या या प्रेमाकडे कसा पाहतो. त्यांच्यापुढे कोण कोणती आव्हानं येतात हे या चित्रपटातून दाखवण्यात आले होते. या चित्रपटातल्या नूतन यांच्या जबरदस्त अशा अभिनयामुळेही हा चित्रपट गाजला होता.
बंदिनी
सर्वसामान्य भारतीय स्त्रीच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात दिल्या गेलेल्या योगदानाची कथा या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून नूतन यांचा दमदार अभिनय लोकांपुढे आला. अशोक कुमार व त्या वेळी नवोदित असलेल्या धर्मेद्र यानेही यात चांगली भूमिका केली होती. संपूर्णपणे स्त्रीप्रधान असलेला हा चित्रपट त्या काळातला एक क्रांतिकारी चित्रपट म्हणून गणला गेला. या चित्रपटानेही प्रचंड यश मिळवले. बिमलदा यांचे चित्रपट पाहून त्याकाळी भारतीय चित्रपटांची उंची किती होती हे दाखवणारे आहेत. आज जागतिक सिनेमाचं कौतुक करणाऱ्यांनाही हे चित्रपट आपलेसे वाटतील यात शंका नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
पॉल न्यूमन यांना कलर ऑफ मनी या चित्रपटातील भूमिकेसाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. याशिवाय एमी पुरस्कार, स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कार व इतर अनेक पुरस्कार त्यांना मिळाले.
शिवाजी मंदिरच्या सांस्कृतिक कार्य परंपरेत त्यांचे मोलाचं योगदान होते. नाटक, मालिका, चित्रपट, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचा मोठा मित्र परिवार होता.श्री शिवाजी मंदिरचे अध्यक्ष आणि कलर वाहिनीवरील कॉमेडी एक्स्प्रेस चे निर्माते, दिग्दर्शक ज्ञानेश भालेकर आणि गीतसुगंध या संगीताच्या कार्यक्रमाची सर्वेसर्वा अक्षदा विचारे यांचे ते वडिल होत.
लोकमान्य टिळक म्हणायचे, पंचांग हे आकाशाचा आरसा असला पाहिजे, लोकमान्यांचं हे विधान नानाशास्त्रींना प्रेरणा देऊन गेले. नानाशास्त्री यांनी १९१६-१७ या वर्षासाठीचं पंचांग काढलं, ते कोल्हापुरातल्या आर्यभूषण प्रेसमधून छापून घेतलं.
त्यांनी अभिनयासोबत काही चित्रपटांचे दिग्दर्शक व निर्माती पण केली होती. त्यांचा जन्म ३ सप्टेंबर १९२६ रोजी झाला. त्यांनी बंगाली भाषेमधील चित्रपटांशिवाय काही हिंदी चित्रपटांमधूनही त्याने अभिनय केला. १९५३-१९७५ या काळात बंगाली चित्रपटांत उत्तम कुमार यांची सुचित्रा सेन यांच्यासोबत त्यांची जोडी चांगली जमली होती आणि या जोडीचे अनेक चित्रपट गाजले. अभिनेते उत्तमकुमार यांच्यासमवेत सुचित्रा सेन यांनी ३० चित्रपट केले होते.
उत्तम कुमार यांनी २५० हून अधिक चित्रपटांत अभिनय केला. अमानुष, छोटीसीमुलाकात,आनंद आश्रम हे त्यांचे हिंदी चित्रपट खूप गाजले.चित्रपटातील योगदानासाठी भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला. उत्तमकुमार यांचे २४ जुलै १९८० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
भालजी पेंढारकर यांच्या आकाशगंगा या चित्रपटातील छोट्या सीतेच्या भूमिकेपासून त्यांच्या चित्रपट कारकीर्दीची सुरुवात झाली. थोरातांची कमळा या चित्रपटात त्यांनी प्रथमच नायिकेची भूमिका केली. त्यानंतर नायिका म्हणून त्यांनी सुमारे १५ वर्षे काम केले. मधुचंद्र, आम्ही जातो आमुच्या गावा, अंगाई, काका मला वाचवा, शेवटचा मालुसरा, मल्हारी मार्तंड, स्वयंवर झाले सीतेचे, भालू असे ८० हून अधिक चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. अभिनेते-दिग्दर्शक प्रकाश भेंडे हे त्यांचे पती. लग्नानंतर प्रकाश भेंडे यांनी सुरू केलेल्या श्री प्रसाद चित्र या संस्थेच्या माध्यमातून भालू, चटक चांदणी, आपण यांना पाहिलंत का, प्रेमासाठी वाट्टेल ते, आई थोर तुझे उपकार या चित्रपटांची त्यांनी निर्मिती व चित्रपटांमधून त्यांनी काम केले.
Copyright © 2025 | Marathisrushti