“केसरी’ गणेशोत्सवातील दहा दिवसांचे सांस्कृतिक कार्यक्रम लोकप्रिय करण्यात खेर यांचा मोठा वाटा असे. जयंतराव टिळक, वि. स. माडीवाले, हरिभाऊ कुलकर्णी, रामभाऊ जोशी आदींच्या “केसरी’च्या आवारात जमणाऱ्या मैफिलीतील गप्पा, हास्यविनोद आणि एकमेकांची थट्टा हा एक अविस्मरणीय अनुभव होता. स. गर्गे यांनी संपादित केलेल्या “यशवंतराव चव्हाण आणि पत्रकार’ या पत्रसंवाद ग्रंथांतील भा. द. खेर आणि यशवंतराव चव्हाण यांच्यातील पत्रव्यवहार वाचल्यानंतर खेरांच्या ’लेखनध्यास’ किती होता हे ध्यानात येते.
१९६४ मध्ये ह्याच पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. १९६७-६८ मध्ये ते पुणे महापालिकेचे महापौर होते. १९७० पासून ते राज्यसभेचे सदस्य आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय भाग घेऊन नानासाहेबांनी अनेकवार तुरुंगवास भोगला.
करसन घावरी हे फास्ट बॉलर असून ते लेफ्ट आर्म स्पिन बॉलिंग ही करत असत. करसन घावरी आपल्या करीयर मध्ये ३९ कसोटी व १९ वनडे खेळले. १९७४ ते १९८१ पर्यत आपल्या क्रिकेट करियर मध्ये दोन वेळा १९७५ व १९७९ वर्ल्ड कप पण खेळले.
शिक्षण जेमतेमच होते. झोपण्यासाठी छत नव्हते का पोटाला अन्न नव्हते . तरीपण त्यांनी प्रथम स्वतःलाच शिकवले, वाचायला-लिहावयाला शिकले.
इंग्लिश अभिनेता तसेच दिग्दर्शक व संगितकार मा.चार्ली चॅप्लिन यांचा जन्म १६ एप्रिल १८८९ लंडन येथे झाला.
पहील्या महायुद्धाच्या अगोदरच्या काळात जगभरातल्या सर्वात प्रसिद्ध सिनेतारकांपैकी एक आणि मुकपटांमध्ये विनोदी अभिनय करणारा कलाकार म्हणजे चार्ली चॅप्लिन. अभिनयासोबतच मुकपटांचे लेखन ही त्याची विशेष ख्याती होती. तो मुकपट करणारा अतिशय प्रख्यात तसेच रचनात्मक अभिनेता होता. चार्ली चॅप्लिन यांनी आपल्या करियरची सुरुवात वयाच्या ९ व्या वर्षी केली. शाळेत शिकता शिकता वडिलांच्या ओळखीनं चार्ली एका नृत्यपथकात दाखल झाला. या पथकातून फिरता फिरता, त्याचं शाळेकडे दुर्लक्ष होऊ नये याकडे त्याच्या आईचं लक्ष असायचं. पण आईच्या मानसिक आजारामुळे आणि एकूण परिस्थितीमुळे त्यानं १३ व्या वर्षीच शाळा सोडली. पोट भरण्यासाठी अनेक छोटी मोठी कामं केली, पण ही कामं करत असताना त्यानं आत्मविश्वास जराही ढळू दिला नव्हता, जो त्याच्या आईनं सतत त्याच्या मनावर बिबंवला. त्याच्यातला कलाकार तिनं जोपासला. त्या वेळच्या परिस्थितीबद्दल चार्ली यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटलंय, ‘‘मला त्या परिस्थितीचे चटके फार कमी वेळा जाणवले, कारण आम्ही त्या परिस्थितीतून सतत वाटचाल करत होतो आणि लहान असल्यामुळे हा त्रास मी सहजच विसरून जायचो.’’ छोटी-मोठी कामं करतानासुद्धा तो कधीही आपल्या ध्येयापासून ढळला नाही. अभिनेता होण्याचं ध्येय कायम त्यानं आपल्या उराशी बाळगलं. त्यासाठी तो स्वत:चे बूट पॉलिश करायचा, कपडे साफ ठेवायचा, नाटक कंपन्यांना नित्य नेमाने संपर्क करत राहायचा.
जेव्हा जेव्हा चार्लीच्या आईचं सादरीकरण असायचं, त्या रात्री त्याला भाडय़ाच्या घरात ठेवण्यापेक्षा ती त्याला स्वत:बरोबर नाटय़गृहात आणायची. स्वत: उपाशी राहून या मुलांना खायला द्यायची. त्याचा परिणाम तिच्या प्रकृतीवर व्हायला लागला होता. चार्लीनं यशस्वी अभिनेता व्हावं ही तिची तीव्र इच्छा होती. या इच्छेपुढे त्यानं स्वत:समोर पर्यायही ठेवला नव्हता.
स्वत:तल्या आत्मविश्वासामुळे अनेक वैशिष्टय़पूर्ण युक्त्या तो पडद्यावर साकारू शकला. पडद्यावरच्या मस्तमौला चार्लीचं आगळंवेगळं रूप होतं, ‘एक टाइट कोट, बॅगी पॅन्ट, छोटी हॅट आणि मोठे शूज, आणि हो, चेहऱ्यावरची त्याची ती छोटीशी मिशी.’ त्याने त्याचं हे रूप समजून उमजूनच ठरवलं होतं. त्याला त्याचं बाह्य़रूप संपूर्णपणे विरोधाभासी हवं होतं. ती छोटीशी मिशी त्याच्या व्यक्तिमत्त्वाला, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव न लपवता वयातला मोठेपणा, परिपक्वता देऊ शकेल हा त्याचा अंदाज होता आणि त्याचं हे बाह्य़रूप त्याची ओळखच ठरलं. या व्यक्तिरेखेबद्दल त्याचं म्हणणं होतं, ‘‘ज्या क्षणी मी तो पोशाख केला, मेकअप केला, त्या क्षणी मी ते व्यक्तिमत्त्व अनुभवू लागायचो. मी त्याला ओळखायचो आणि रंगमंचावर असेपर्यंत तो माझ्यात भिनलेला असायचा.’’
आयुष्याचं सार त्यानं पडद्यावर अनेक तऱ्हेनं जगापुढे मांडलं. खिल्ली उडवण्यासाठी दु:ख हे कारण असतं. खिल्ली उडवणे म्हणजे प्रतिकार करणे. निसर्गाच्या शक्तीपुढे स्वत:च्या हतबलतेतही आपण हसत राहिलं पाहिजे. प्रतिकूलतेचा हसत हसत सामना केला पाहिजे, नाही तर मानसिकरीत्या खचून जाल. म्हणूनच त्याच्या आयुष्याच्या जवळचा चित्रपट ‘द किड्’ याचं ओपिनग टायटल होतं, ‘‘अ पिक्चर विथ अ स्माइल अँड परहॅप्स अ टिअर.’’
आईचं स्वप्न हेच आयुष्याचं अंतिम ध्येय मानत अंगच्या निर्वविाद कलागुणांनी जगभरच्या प्रेक्षकांवर राज्य केलं. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या माणसावर तो गारुड करू शकला. भाषेच्या बंधनाविना पडद्यावरून तो कुठल्याही प्रेक्षकाशी संवाद साधू शकला. त्यासाठी त्यानं वापरलेली साधनं होती, भरपूर हासू आणि थोडेसे आसू! मा.चार्ली चॅप्लिनने त्याच्या चित्रपटांमधून आपल्याला गडाबडा लोळायला लावून हसवलं, पण त्याचबरोबर त्यानं डोळ्यात टचकन् पाणी आणून रडवलंही. विचार करायला लावलं. जागतिक पटलावर एक महानायक म्हणून वावरला! स्वत:तल्या आत्मविश्वासामुळे अनेक वैशिष्टय़पूर्ण युक्त्या तो पडद्यावर साकारू शकला. १९१५ मध्ये विश्व युद्धाच्या काळात कठीण परीस्थितीतही त्याने लोकांना हसवण्याचे मौल्यवान कार्य केले. २५ वर्षानंतर महामंदी आणि हिटलरच्या काळात देखिल त्याने लोकांना हसवण्याचे आपले कार्य थांबवले नाही. तो निरंतर लोकांना हसवत राहिला. लोकांना ज्याकाळात मनोरंजनाची आणि हास्याची अधिक गरज होती. त्याकाळात चार्ली चॅप्लिनने लोकांसाठीची उत्तम भुमिका बजावली. ह़ॉलिवुड मध्ये चार्ली चॅप्लिन यांचे बोलते चित्रपट द ग्रेट डिक्टेटर (१९४०),लाइमलाइट आणि मोसिओर वरडॉक्स हे चित्रपट आले होते. चार्ली चॅप्लिन यांचा “दिस इज माई सॉग” हा चित्रपट वेगवेगळ्या भाषेत प्रदर्शित करण्यात आला. त्यात ‘अ काऊंटेस फ्रम हांगकांग’ हा प्रथम श्रेणीतला होता. हा शेवटचा चित्रपट. १९७२ मध्ये अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. १९६४ मध्ये चार्ली चॅप्लिन यांनी त्यांचे आत्मचरीत्र प्रदर्शित केले. मार्टिन सिएफफ यांनी २००८ मध्ये “चॅप्लिन अ लाइफ” हे पुस्तक लिहिले. मा.चार्ली चॅप्लिन यांचे २५ डिसेंबर १९७७ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
चार्ली चॅप्लिन चित्रपट
https://www.youtube.com/watch?v=1ZW820852ws
https://youtu.be/ZNyttSbCUCU
https://youtu.be/WZVp5v-cNak
https://youtu.be/OUh7UTUZIXc
https://youtu.be/-GYhvdRNKzg
तलत या नावातच एक तलम, तरल, रेशमी अनुभव मिळतो. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९२४ रोजी झाला.तलत यांचा दु:खाचा आवाज होता. त्याही पेक्षा आपल्या मनातल्या प्रत्येकच नाजूक, तरल भावनेचा तो आवाज होता. तलत यांच्या आवाजाला मर्यादा होत्या. तरी देखील जगभरातल्या चाहत्यांचा विचार केला तर या सर्व गायकांपेक्षा तलतच्या चाहत्यांची संख्या काकणभर जास्तच भरेल. कारण बाकी सर्व आवाज हे गायकांचे होते पण तलत यांचा आवाज हा सर्वसामान्य माणसाचा होता. त्यामुळे सानुनासीक, किंचीत कापरा आवाज ही त्याची मर्यादा न ठरता तोच त्यांचा सर्वोत्तम गुण ठरला. त्याच्या आवाजाचा टोन हा सर्व गाण्यांसाठी सारखाच राहीला. सुरुवातीच्या काळात तलत महमूद पार्श्वगायक म्हणून नव्हे तर गायक म्हणून प्रसिद्धीच्या झोतात होते. त्यांना त्या काळी प्रतिसैगल म्हणूनच ओळखत होते. तलत अगदी लहानपणापासूनच सैगलचा वेडा होते. लखनौतील सनातनी वृत्तीच्या त्यांच्या वडिलांना हे गाण्याचे वेड बिलकुल पसंत नव्हते. तलत मात्र सैगलची गाणी, गझला पाठ करायचा व हुबेहूब सैगलप्रमाणे गायचे. मुकेश, रफीच्या सुरुवातीच्या जमान्यातील हे तलत स्वत:च्या चाहत्यांचा एक वर्ग निर्माण करू शकले. मुळात तलत हे एक गझलगायक होते. गझल व गीत ही दोन्ही भावगीतेच व तलत हा भावपूर्ण आवाजात गाणारा गायक. गझल गाताना कवीच्या मूळ शब्दांची संगत तो कधीच सोडत नसे. तेथे तडजोड नव्हती. आपल्या येथील जगजितसिंग, राजेंद्र मेहता ह्या गझल गायकांनी पाकिस्तानी गझलगायक मेहदी हसनची शैली उचलली आहे. याच मेहदी हसनला ‘पाकिस्तानचा तलत महमूद’ म्हणून ओळखायचे. तलतचा आवाज हा मुळातच निर्मळ प्रीतीचा आवाज होता. वासनेचा लवलेशही त्यात दिसत नसे. अभिनेता म्हणूनही त्यांनी एकुण १३ चित्रपटात काम केलं. त्यापैकी नऊ चित्रपटात त्यांनी नायकाची भुमिका केली. "दिल-ए-नादान", " एक गांव की कहानी", "लालारुख" आणि "सोने की चिडीया" ही त्यातली काही नावे. दोन मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली. त्यापैकी "पुत्र व्हावा ऐसा" या चित्रपटातले "यश हे अमृत झाले" हे गाणे लोकप्रिय ठरले. तलत यांच्या गाण्यामध्ये मधुरतेबरोबरच शोकात्मतेचाही सूर होता. तलत यांनी ईंडस्ट्रीतल्या जवळपास सर्वच संगीतकारांकडे सारखेच काम केले. त्यांचे उर्दु उच्चार हे इतर कुठल्याही गायकापेक्षा जास्त स्वच्छ होते. मजरुह सुलतानपूरी, साहीर यांचे सुरवातीच्या काळातले खास उर्दू काव्य, त्याला खरा न्याय तलतनेच दिला. "शाम-ए-गम़ की कसम" हे त्याचेच एक उदाहरण आहे. तलत महमूद यांनी एकूण ७४७ गाणी गायली ज्यात ४८१ फिल्मी आणि तब्बल २६६ गैरफिल्मी गीतांचा समावेश आहे. एकूण २९३ चित्रपटांसाठी पार्श्वगायन त्यांनी केले. तरीही एकाही चित्रपटासाठी त्याला पार्श्वगायनाचा फिल्मफेअर पुरस्कार काही मिळाला नाही. काही संगीतकारांनी त्याच्यातील मधुरतेला झुकते माप दिले, तर काहींनी शोकात्मतेला. शंकर-जयकिशन, सचिन देव बर्मन, अनिल बिश्वास, या संगीतकारांनी तलतला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन बसविले व सामान्य लोकांना त्याची गाणी गुणगुणायला लावली. भारत सरकारने त्यांना पद्मभुषण सन्मानाने गौरवले होते. मा.तलत महमूद यांचे ९ मे १९९८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
तलत महमूद यांची काही गाणी.
शाम-ए-गम़ की कसम
ये हवां ये रात यें चांदनी
मैं दिल हुं ईक अरमान भरा
रिमझीम के ये प्यारे प्यारे गीत लिए
हमसे आया न गया
सिनें में सुलगते है अरमान
ऐ मेरे दिल कहीं और चल
तस्विर बनाता हुं
जलतें है जिसके लिए
रात ने क्या क्या ख्वाब दिखायें
अणुचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्रच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक. डॉ. भाभा यांनी पाया रचला म्हणूनच भारताने अनेक ठिकाणी अणु भट्या सुरू करून त्यांचा विज निर्मितीसाठी उपयोग केला तसेच १८ मे १९७४ रोजी भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला.
सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक व्यवसायाने खरे डॉक्टर आहेत. अथक परिश्रम घेऊन उत्कृष्ट नाट्य व चित्रपट अभिनेते म्हणून लौकिक प्राप्त केला.
पी.एल. संतोषी फक्त गीतकार नव्हते तर ते दिग्दर्शकही होते. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १९१६ रोजी झाला. उत्कृष्ट लेखकही होते. म्युझिकल कॉमेडी हा प्रकार त्यांनी लोकप्रिय केला केला. तसेच 'अनोखे बोल' हा गीतप्रकार 'टिका लई कली दई' (चित्रपट - शिनशिनाके बुबला बु) यासारख्या गाण्यातून रूढ केला. 'कोई किसीका दिवाना ना बने' (सरगम), 'महफिल में जल उठी शमा' (निराला), 'तुम क्या जानो तुम्हारी याद में' (शिनशिनाके बुबला बु) यांसारखी तरल भावकाव्यं त्यांच्या लेखणीतून झरली होती.
पी.एल.संतोषी हे एक अफलातून व्यक्तिमत्त्व होते. ते उत्तम गीतकार होते. मग ते पटकथाकार बनले. मग दिग्दर्शक. यानंतर त्यांना चित्रपट निर्माता होण्याची दुर्बुद्धी झाली आणि त्यापायी ते कफल्लक बनले. या माणसाने दोन्ही हातांनी पैसा कमावला व दहा हातांनी तो उधळला. नटीच्या प्रेमात पडले व तिच्यावर सारी संपत्ती ओवाळून टाकली. जवळ मोटारीन्चा ताफा असलेला माणूस बसच्या रांगेत उभा राहिलेला जगाने पाहिला. हिंदी सिनेमाचे जग कसे मोहमयी असते याचे जबरदस्त उदाहरण म्हणजे संतोषी यांचे आयुष्य.
संतोषी यांनी १९५२ मध्ये 'शिनशिनाकी बबला बु' या नावाचा चित्रपट निर्माण केला. त्याचे लेखक, दिग्दर्शक, निर्माते व गीतकार तेच होते. संगीतकार होते त्यांचे खास मित्र-सी. रामचंद्र. हा चित्रपट म्हणजे त्यांच्या काव्यप्रतिभेचा एक उत्तम नमुना होता. या सिनेमात एकीकडे त्यांनी 'अरे बाबा, ये हसी बाबा, ये खुशी बाबा, खा बाबा, पी बाबा, ' अशी निरर्थक गाणी लिहिली आणि दुसरीकडे मनाची व्याकुळता अतिशय आर्तपणे व्यक्त करणारे उत्कट गीतही लिहिली.
रेहाना नावाची नटी, संगीतकार, सी.रामचंद्र आणि पी. एल. संतोषी या त्रिकुटाने चित्रपटसृष्टीत एकेकाळी धमाल उडवून दिली होती. 'शहनाई', 'खिडकी', सरगम' हे या त्रिकुटाचे चित्रपट हाऊसफुल्लचा ठरले होते. पी. एल. संतोषीच्या 'हम पंछी एक डालके' या चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले होते. पी.एल.संतोषींबरोबर सी. रामचंद्र यांचे टयुनिंग बराच काळ जमले होते. अनेक वेळा त्यांच्या संगीतातील बरीच गाणी पी.एल.संतोषी आणि राजेंद्र कृष्ण या दोनच गीतकारापैकी एकाची तरी आढळतात.
पी.एल.संतोषी यांचे निधन ७ सप्टेंबर १९७८ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. श्री.पद्माकर पाठक
राणी मुखर्जीने करिअरची सुरुवात 'बियेर फूल' या बंगाली चित्रपटातून केली. यात तिने सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे१९९७ साली आलेल्या राजा की आयेगी बरात ह्या चित्रपटामधून राणीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिचा जन्म २१ मार्च १९७८ रोजी झाला.१९९८ साली आलेला आमिर खानसोबतचा गुलाम हा तिचा दुसरा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. त्याच वर्षी करण जोहरने आपल्या कुछ कुछ होता है ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खान व काजोलसोबत राणीला आघाडीची भूमिका दिली. ह्या चित्रपटाच्या यशामुळे राणी सुपरस्टार बनली. . यानंतर तिने 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम', 'मुझसे दोस्ती करोगे', 'साथिया' यासारख्या हिट चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. राणीने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्या व तिला आजवर ७ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. 'नो वन किल जेसिका' या चित्रपटात तिने कणखर पत्रकाराची भूमिका साकारली.सावारिया' या चित्रपटात राणीने ग्लॅमरस भूमिका साकारली. कभी अलविदा ना कहना या चित्रपटात राणीने खूपच वेगळी भूमिका साकार केली. 'पहेली' या चित्रपटात राणी मुखर्जीने पारंपारिक मारवाडी महिलेची भूमिका सादर केली.'बंटी आणि बबली' या चित्रपटात 'ब्लॅक' या चित्रपटात राणीने अंध आणि मुक्या मुलीची भूमिका केली होती. 'वीर झारा' हा तिच्या करियर मधील उत्तम चित्रपट होता. राणी मुखर्जीने प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक आदित्य चोप्रासोबत २०१४ मध्ये विवाह केला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
राणी मुखर्जीची गाणी
https://www.youtube.com/watch?v=_CGOTyBWlbw
Copyright © 2025 | Marathisrushti