(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री क्रिस्टल डिसूझा

    क्रिस्टल डिसूझा ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्याच्या वडिलांचे नाव मर्विन डिसूझा आणि आईचे नाव स्लीविया डिसूझा आहे. तिने आपले सुरुवातीचे शिक्षण ऑक्झिलियम कॉन्व्हेंट हायस्कूलमधून पूर्ण केले आणि त्यानंतर तिने मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

  • ज्येष्ठ संवादिनी वादक पंडित पुरुषोत्तम वालावलकर

    मोठमोठ्या गवयांकडून रियाज घेतल्यामुळे पं. वालावलकर हार्मोनियम वादनात एवढे पारंगत झाले की श्रोत्यांना त्यांच्या हार्मोनियम वादनाची भुरळ पडायची. बेळगावच्या एका कार्यक्रमात त्यांनी कुमार गंधर्वांना ऐनवेळी साथ केली होती. तो कार्यक्रम एवढा रंगला की कार्यक्रम संपल्यावर खुद्द कुमारजींनी पं. वालावलकरांना ‘असे षड्ज-पंचम मला कुणी दिले नाहीत’ अशी पावती दिली होती.

  • पॉप्युलर प्रकाशनचे संस्थापक रामदास भटकळ

    संगीतकार यशवंत देव यांच्याकडे ते भावगीत शिकले होते, पण पुढे प्रकाशन व्यवसायाचा व्याप वाढल्यामुळे रामदास भटकळांना गाण्याकडे फारसे लक्ष देता आले नाही.

  • नलिनी जयवंत

    नलिनी जयवंत यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९२६ रोजी झाला. नलिनी जयवंत यांचे शिक्षण प्रार्थना समाजाच्या राममोहन शाळेत झाले. लहान पणी नलिनी जयवंत यांचा डान्स हे राममोहन शाळेच्या वार्षकि स्नेहसंमेलनाचे सर्वात मोठे आकर्षण असे. नामांकित लोक तो पाहायला येत. तिच्या या डान्सला भाळूनच मा.वीरेन्द्र देसाईंनी केवळ चौदा वर्षांच्या नलिनीला सिनेमात काम करण्याची ऑफर दिली. नलिनी आणि विजया जयवंत (मेहता) विद्यार्थी भवनमध्ये राहात होत्या. "राधिका' या १९४१ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटापासून आपल्या कारकीर्दिला सुरुवात करणाऱ्या नलिनी यांनी त्यांच्या अप्रतिम अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत काही वर्षांतच स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. कसदार अभिनयामुळे त्यांना अशोक कुमार, देवानंद आणि दिलीपकुमारसारख्या त्या काळातील आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम करता आले. दिलीपकुमार, नर्गीस यांच्यासोबत "अनोखा प्यार'मध्ये त्यांनी केलेल्या अभिनयाने चित्रपट रसिकांची वाहवा मिळविली होती. नलिनी यांनी निर्देशक वीरेन्द्र देसाई यांच्या बरोबर १९४० मध्ये विवाह केला.

    हिंदी चित्रपटसृष्टीत मोजक्याच पण विविधांगी भूमिकांनी आपल्या लोभस व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविलेल्या नलिनी जयवंत यांनी १९४१ साली चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलेल्या नंतर नलिनी जयवंत यांच्या कारकिर्दीला ‘अनोखा प्यार’ (१९४८) चित्रपटापासून वेग आला. १९६५ सालचा ‘बॉम्बे रेस’ हा प्रमुख भूमिका असलेला त्यांचा अखेरचा चित्रपट. मा.अशोककुमार यांच्या सोबत केलेले "समाधी', "सरगम", "मिस्टर एक्सु', "काफिला', "मुकद्दर' हे त्यांचे चित्रपट चांगलेच गाजले. देवानंदसोबत केलेल्या "कालापानी' या चित्रपटाने त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. बहन ,जलपरी, शिकस्त, जादू, महबूबा, राजकन्या, रेल्वे प्लॅटफॉर्म, सलोनी, बॉम्बे रेसकोर्स या चित्रपटांत त्यांनी केलेल्या भूमिकांमुळे त्यावेळच्या हिंदी चित्रसृष्टीतील आघाडीच्या नायिकामध्ये त्यांची गणना होत होती. फिल्मफेअरनेच १९५० मध्ये घेतलेल्या एका सर्वेक्षणात त्याकाळात हिंदी सिनेसृष्टीत असलेल्या सर्वात सुंदर नायिकेचा मान दिला होता. १९८३ मध्ये ‘नास्तिक’ चित्रपटात अमिताभ बच्चनच्या आईच्या भूमिकेत त्यांचे रूपेरी पडद्यावर अखेरचे दर्शन झाले. मा.नलिनी जयवंत यांचे निधन २० डिसेंबर २०१० रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध तबला वादक पद्मविभूषण किशन महाराज

    किशन महाराज बनारस घराण्याच्या कंठे महाराजांचे शिष्य होते. त्यांचा जन्म ३ सप्टेंबर १९२३ रोजी झाला. त्यांच्या योगदाना बद्दल भारत सरकारने त्यांना १९७३ साली पद्मश्री आणि त्यानंतर २००२ साली त्यांना पद्मविभूषण देऊन गौरविण्यात आले होते. त्यांना काशी विद्यापीठ आणि रवींद्र विद्यापीठातर्फे डॉक्टरेट ही उपाधीही देण्यात आली होती.

    किशन महाराज यांचे ४ मे २००८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगली वेंकय्या

    पिंगाली वेंकय्या.. हे नाव फारसे कुणाला माहीत नाही. भारताच्या राष्ट्रध्वजाची कल्पना मांडली ती याच पिंगाली वेंकय्या यांनी. त्यांचा जन्म २ ऑगस्ट १८७६ रोजी झाला. ध्वज कोणत्या रंगाचा असावा, त्यात किती आणि कोणते रंग असावेत, त्याचा आकार कसा असावा याचा सखोल अभ्यास करून त्यांनी तिरंगा साकारला. ते केवळ तिरंग्याचे निर्माते नव्हते तर जपानी भाषेचे शिक्षक, सिद्धहस्त लेखक आणि जिओफिजिसिस्टही होते. मछलीपट्टनममध्ये माध्यमिक शिक्षण पुर्ण करुन पिंगली वेंकय्या पुढील शिक्षणासाठी कोलंबोला गेले. भारतात परत आल्यावर प्रथम त्यांनी एका रेल्वे गार्डची नौकरी व नंतर बेल्लोरीमधे सरकारी नौकरी केली. तदनंतर त्यांनी एंग्लो वैदिकीय महाविद्यालयात उर्दु आणि जापानी भाषेच्या अभ्यासाकिरता लाहोर गाठले.

    वेंकय्या यांना ब-याच विषयांची ज्ञानप्राप्ती केलेली. त्यापैकी भुविज्ञान आणि कृषीक्षेत्राशी जास्त लगाव होता. तसेच ते हि-यांच्या खदानीत विशेषज्ञ देखील होते. वेंकय्या यांनी ब्रिटीश भारतीय सेनेमध्ये पण नोकरी केली होती आणि एंग्लो-बोअर युद्धामध्ये पण ते सहभागी झाले होते. त्याच काळात ते गांधीजींच्या संपर्कात आले आणि त्यांच्या विचारांनी प्रभावित झाले.

    १९०६ ते १९११ पर्यंत वेंकय्या कापसाच्या वेगवेगळ्या प्रकारंच्या अभ्यासात मग्न झाले. आणि त्यांनी बॉम्वोलार्ट कंबाडीया प्रकारच्या कापसावर एक अध्ययन देखील प्रकाशीत केलं. आणि त्यावरुन वेंकय्या हे कपास वेंकय्या म्हणुन प्रसिद्ध झाले. काकीनाडा मध्ये आयोजीत केलेल्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस आयोजीत अधिवेशना दरम्यान भारताचा स्वतःचा राष्ट्रध्वजाची आवश्यकता यावर भर दिला आणि त्यांचे हे विचार गांधीजीना पटला. मग गांधीजीनींच त्या राष्ट्रध्वजाची रचना करण्यास सुचवले. त्यांनंतर १९१६ ते १९२१ पर्यंत वेंकय्या यांनी तब्बल पाच वर्षे विविध ३० देशांच्या राष्ट्रध्वजाचा अभ्यास केला आणि नंतर तिरंग्याचा विचार केला.

    १९२१ साली विजवाडा येथे आयोजीत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस च्या अधिवेशनात महात्मा गांधीना त्यानी बनवलेल्या हिरव्या आणि लाल रंगाचा ध्वज दाखवला व त्यापुढे प्रत्येक अधिवेशनात हा द्विरंगाचा ध्वज वापरला जात होता. पण त्यावेळी अधिकारीकरित्या कॉंग्रेसकडुन या झेंड्याला मान्यता मिळाली नाही.

    यादरम्यान जालंधरच्या हंसराज यांनी झेंड्यामध्ये चक्रीय चिन्हाचा समावेश करण्याचा सुझाव दिला. या चक्राला सामान्य माणुस व प्रगतीच्या रुपात पाहिलं जात होतं.

    नंतर गांधीजीच्या सुचवलेल्या विचारानुसार शांतीचे प्रतिक मानलं जाणा-या पांढ-या रंगाचा समावेश देखील त्यामध्ये करण्यात आला. पुढे १९३१ मध्ये केशरी, हिरवा आणि पांढ-या रंगाच्या तिरंगा ध्वजास कॉंग्रेसने कराचीमध्ये आयोजीत अखिल भारतीय सम्मेलनामध्ये सर्वसम्मतीने स्विकारीत केल. नंतर ध्वजामध्ये असलेल्या चरख्याची जागा अशोकचक्रानी घेतली.

    पिंगाली वेंकय्या यांचे ४ जुलै १९६३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट/ संजय पेठे

  • आक्रमक फलंदाज फारुख इंजिनिअर

    मद्रासमधल्या त्या कसोटीत पहिल्या दिवशीच्या उपाहारापर्यंतच्या खेळातच टिकाकारांची तोंडे गप्प झाली होती. दिलिप सरदेसाईसोबत फारुख इंजिनिअर सलामीला आला होता आणी सलामीच्या पहिल्याच डावात त्याने वेस्ली हॉल, चार्ली ग्रिफिथ, दस्तुरखुद्द सोबर्स आणी लान्स गिब्ज ह्यांचे डोळे पांढरे केले होते. उपाहारावेळी तो ९४ धावांवर नाबाद होता आणी संघाच्या धावा होत्या बिनबाद १२५.

  • ज्येष्ठ शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर

    सॉलिड प्रॉपेलंट स्पेस बूस्टर प्लान्ट हे जगातले सर्वात मोठे युनिट त्यांनी स्थापन केले. त्यांनी बनवलेले एचटीपीबी हे घन इंधन विकसित करून आता ३० वर्षे झाली तरी आजही ते जगातले अद्ययावत असे इंधन आहे.

  • दिग्दर्शक गजानन सरपोतदार

    चित्रपट निर्माते नानासाहेब सरपोतदार हे गजाननरावांचे वडील आणि आदित्य सरपोतदार हे नातू होत. गजाजन सरपोतदारांनी फिरते उपाहारगृह ही संकल्पना पुण्यामध्ये पहिल्यांदाच राबवली. गजानन सरपोतदार हे राजकारणीही होते. गं.नी. जोगळेकर यांच्याविरुद्ध ते निवडणुकीला उभे होते, पण थोड्या मतांनी हरले.

    गजानन सरपोतदार यांनी तुझ्यावाचुन करमेना, दुनिया करी सलाम, सासू वरचढ जावई, अशा चित्रपटांची निर्मिती केली. गजानन सरपोतदार यांच्या नावाने एक स्मृती पुरस्कार दिला जातो. गजानन सरपोतदार यांचे ८ ऑगस्ट १९९९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • लेखक मुल्कराज आनंद

    त्यांची सुप्रसिद्ध ‘ अनटचेबल ‘ ही कांदबरी १९३५ साली निर्माण झाली.. एका दलित तरुणावर ही कांदबरी आधारलेली आहे. शौचालय साफ करणाऱ्या एका तरुणाची ही गोष्ट आहे. दलितच दलितांच्या व्यथा मांडू शकतात असे तोपर्यंत मानत कारण कोणत्याही उच्च जातीच्या लेखकाने इतकी जळजळीत कांदबरी लिहिली नव्हती. ही कांदबरी भारतात आणि भारताबाहेर इतकी गाजली की मुल्क राज आनंद यांना भारताचा ‘ चार्ल्स डिकन्स ‘ म्हणून म्हणू लागले. विशेष म्हणजे ह्या पुस्तकाची प्रस्तावना त्यांचे मित्र , जगप्रसिद्ध लेखक ई . एम . फ्रॉस्टर यांनी लिहिली होती. त्यावेळी मुल्क राज आनंद यांची ओळख फ्रॉस्टर यांच्याशी टी . एस. ईलियट यांच्या पत्रिकेत ‘ क्रायटेरियोन ‘ येथे काम करताना झाली.