(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भारतीय बनावटीचे एकमेव ऑर्गन उत्पादक उमाशंकर दाते

    उमाशंकर उर्फ बाळा सुरेश दाते यांचे शिक्षण १२ वी आर्टस पर्यंत. त्यांचा जन्म १४ जून १९७६ रोजी कोकणातील आडिवरे येथे झाला. बाळा दाते यांचा वयाच्या १८ व्या वर्षांपर्यंत संगीताशी तसा संबंध नव्हता. पण १९९४ साली उदय गोखले यांचे श्री. महाकाली मंदीरात भजन होते ते गाणं ऐकताना या सुरांशी आपले काहीतरी अनामिक नाते आहे याची त्यांना पहिली जाणीव झाली या नात्याच्या ओढीतून शोध सुरु झाला आणि शोधातून अस्वस्थता. अर्थात केवळ संगीताचा ध्यास घेऊन चालणारे नव्हते. कौटुंबिक जबाबबदा-यांचा ससेमिरा त्यांच्या मागे सुध्दा होता, त्याच दरम्यान व्यवसाय म्हणून त्यांनी खाजगी प्रवासी वाहतूक हा व्यवसाय चालू केला.

    दळणवळणाची साधने आणि संपर्क याची सोय नसल्यामुळे कोणत्याही गुरुकडे जाऊन संगीत शिक्षण घेणे त्यांना शक्य नव्हते. म्हणून संगीत मार्गदर्शक पुस्तके आणि कॅसेट्स यांनाच गुरु मानून त्यांनी एकलव्य साधना सुरु केली. त्यांच्या संगीत वेडाच्या साधनेत पहिली अधिकृत मोहर आकाशवाणीच्या ऑडिशनच्या माध्यमातून १९९९ साली उमटली. या छोट्या यशाने त्यांना पुढील प्रवासाला प्रेरणा मिळाली. त्या१च दरम्यान आकाशवाणीचे संगीतकार अवधूत बाम आणि चिपळूणातील राजाभाऊ शेंबेकर (पं. रामभाऊ मराठे व पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य) यांचा परिचय होऊन उमाशंकर दाते यांना मार्गदर्शन मिळू लागले. सांगितिक क्षेत्रातील दर्दीशी परिचय, चर्चा होऊ लागली पण व्यवसायाची कसरत जमेनाशी झाली. अर्थात संगीत सोडणं शक्य नव्हतं.

    उमाशंकर दाते यांनी व्यवसाय म्हणून केबल टिव्ही नेटवर्क आणि डी.टी.एच.सर्व्हीसची एजन्सी हा व्यवसाय २००१ साली सुरु केला. त्याच दरम्यान त्यांचा एक संगीत नाटक बघण्याचा योग आला. ऑर्गन हे वाद्य महाराष्ट्रात जास्त लोकप्रिय झालं ते या संगीत नाटकांमुळेच. उमाशंकर दाते यांच्या जीवनाला भविष्यात कलाटणी देणारी घटना घडली. जेव्हा त्यांनी आयुष्यात सर्वप्रथम ऑर्गन पहिला. ते ऑर्गन च्या प्रेमात पडले ते सुर सारखे कानात वाजू लागले. उमाशंकर दाते यांनी त्या आधी आणि Leg Harmonium हि वाद्ये होती. इथून ऑर्गन मिळवण्यासाठी धडपड चालू झाली. त्याच वेळी त्याची दुर्मिळता लक्षात आली कारण सामान्यत: अमेरिका आणि युरोप या देशातच ऑर्गन बनवले जात होते. पण १९५० च्या दशकानंतर ही चळवळ मंदावली. त्यानंतर Electronics च्या युगाचा प्रारंभ झाला. भारतात तर फक्त Harmonium बनविणा-या कंपन्या होत्या ऑर्गन बनवणारी एकही कंपनी नव्हती किंबहूना ऑर्गन चे अधिकृत ज्ञानही कोणाला माहित नव्हते. त्यामुळे जुना ऑर्गन मिळवण्याखेरीज दुसरा कोणताच पर्याय त्यांच्या कडे नव्हता. खरतर परदेशात जाऊन तेथील उत्तमोत्तम ऑर्गन चा अभ्यास करावा, ते तंत्र आत्मसात करावं असं त्यांना अनेकदा वाटल पण आर्थिक समस्या आणि मार्गदर्शनाचा अभाव यामूळे हे केवळ अशक्यच होते. मात्र ऑर्गन ची शोधाशोध सुरु होतीच. पण पुन्हा एकदा व्यवसायानं दगा दिला आणि चालू असलेला व्यवसाय बंद झाला. त्या तच वडिलांचे छत्र हरपले. आणि कुटुंबाची व त्यांच्या व्यवसायाची जबाबदारी खांदयावर आली.

    वडिलांचा Electrical maintenance व किराणामाल दुकान हा व्यवसाय ते करु लागले. पण ऑर्गन चे वेड त्यांच्या डोक्यातून जाई ना. तोपर्यंत या सर्व काळात त्यांची सांगितीक प्रगती चांगली झाली होती. संगीत क्षेत्रातील चांगल्या व्यक्तींशी माझा संबंध वाढला होता Harmonium साथीदार म्हणून ते ब-याच ठिकाणी जात होते. त्यावेळी मुंबईस्तिथ मुकुंद आठवले यांच्या ओळखीतून एक जुन्या ऑर्गन चा Sound Box मिळाला.त्यापासून ऑर्गन बनविण्याचा प्रयत्न सुरु झाला. जवळच श्री. वामन मेस्त्री (Harmonium Maker) यांच्या सहकार्याने ऑर्गन उत्तमबनला माझ्या कडील ऑर्गन फार चांगला असल्यामुळे संगीत क्षेत्रातील बरीच मंडळी तो ऑर्गन बघण्यास येऊ लागली आणि बऱ्याच मित्रांनी आम्हालापण असा ऑर्गन मिळवून दे अशी त्यांना विनंती केली. ब-याच Harmonium makers बरोबर ऑर्गन या विषयावर चर्चा केल्यावर ते करणे अशक्य आहे असे सांगितले पण हे बाळा दाते यांच्या बुदधीला पटत नव्हते. कारण जी गोष्ट १५० वर्षापूर्वी होऊ शकते ती गोष्ट आताच्या आधुनिक युगात अधिकच उत्तम व्हायला पाहिजे असा त्यांचा विश्वास होता. त्यांची तंत्रज्ञानाची आवड, जिज्ञासू वृत्ति आणि डोक्यात सतत वाजणारे ऑर्गन चे सूर यांनी भारतीय बनावटीच्या पहिल्या ऑर्गन चा त्यांनी संकल्प केला आणि हे आव्हान त्यांनी स्वीकारायचे ठरविले.

    बाळा दाते यांना Automobile, Mechanical & Electrical Engineering या बद्दल प्रचंड आवड व थोडे फार ज्ञान होते. त्याचा उपयोग ऑर्गन manufacturing या Challenge मध्ये होईल असा त्यांना विश्वास होता. १५ डिसेंबर २०१० साली एकाच दिवशी दोन आवडीच्या क्षेत्रात नोकरी करण्याचे प्रस्ताव बाळा दाते यांच्या समोर आले. एक संगीत कलेच्या क्षेत्रामध्ये होती. अनेकांशी चर्चा करुन त्यांनी राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाकडून सन्मानपूर्वक संगीत शिक्षकाच्या पदाच्या दिलेल्या जबाबदारीचा स्वीकार केला. या नोकरीतून त्यांना आर्थिक स्थैर्य आणि संगीत उपासनेला बळ मिळाले. त्याच वेळी ते राहत असलेल्या आडिवरे गावात इंटरनेट ची सुविधा सुरु झाली आणि त्यांचा घरच्या घरीच ऑर्गन विषयाचा अभ्यास सुरु झाला. अमेरिकेतील एका मित्राकडून सुमारे 50 ऑर्गन चे Reeds जमविल्यानंतर त्यांनी ऑर्गन बनवण्यासाठी करण्यासाठी प्रयन्त सुरु केले. त्यासाठी एका जुन्या ऑर्गन चा Reed board मिळवून Measuring करुन Reference शोधून काढले.

    त्याचबरोबर ऑर्गन वरील अनेक पुस्तके मागवून अभ्यास सुरु केला. हे करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. त्यामध्ये आर्थिक अडचण ही होतीच, परंतू त्याच दरम्यान त्यांना बेंगलोर येथे Imperial organ and piano co. LTD. London या make चा एक double keybard चा अप्रतिम ऑर्गन मिळला. या ऑर्गन मुळे अभ्यास करणे अजून सोयीचे झाले.

    ऑर्गन चा मुख्य part Read Holder आणि Sound Pan हे आहेत. हे बनविण्यासाठी त्यांनी स्वत: एक लाकडी Milling Machine तयार केले. त्यावर 23000 RPM चा Spindal बसवला कारण Milling Machine घेणे हे आर्थिक दृष्टया शक्य नव्हतं त्यांनी बनवलेल्या Milling Machine वर पहिले 5 ऑर्गन बनवले. प्रयोग आणि प्रयत्न 100% यशस्वी झाले. आता यामध्ये काम अजून prisies होण्यासाठी योग्य प्रकारची machinery घेण्याचे ठरविले. त्याप्रमाणे 2014 मध्ये Bridgeport या कंपनीचे M1TR Milling Mchine घेतले. त्याचप्रमाणे Milling Cutters Design करुन बनवून घेतले.त्यामुळे कामाची Accuracy 0.10 Micron एवढी मिळायला लागली. यासाठी उत्तम प्रतीचे लाकूड मिळवले sound box साठी Pine wood, German sprus, Keyboard साठी aster, body साठी beech wood, teak wood यासारख्या लाकडांचा वापर करावा लागला. Sound Box बनवताना जास्तीत जास्त Machine चा उपयोग कसा करता येईल याचा विचार करुन Pallet च्या Guide pins चे hole one time करायला लागलो. सर्व Guiude pins सुद्धा stainless steel च्या वापरु लागलो. जास्तीत जास्त precision काम कस होईल याकडे जास्त लक्ष दिले. Key board चे Guide pins slots सुध्दा Milling Machine वर करु लागले.

    Wood stump ऐवजी ते Alluminium चे Rod वापरायला लागलो. त्यामुळे वातावरणातील बदलाने key board अडकण्याची शक्यता 0% झाली ऑर्गन वापरायला सोपा होण्यासाठी Transporting key board हि सोय केली ( 1 Note + / 1 Note -) वापरण्यात येणारे Reeds Ultrasonic cleaning machine मध्ये clean करु लागलो easy maintainance साठी sound box आणि bellow frame एकमेकावर Hingesच्या सहाय्याने fitting करण्याची पदधतही सुरु केली त्यामुळे maintenance करतांना स्क्रू काढायचा वेळ आणि त्रास कमी झाला आणि काम करणे सोपे झाले main bellow साठी high quality recxine आणि sub bellow साठी कार्ड बोर्डचा वापर करु लागले bellow spring सुध्दा स्पेशल ऑर्डर देऊन बनवून घ्याव्या लागल्या अशा प्रकारे high quality ऑर्गन बनवू लागलो. Tuning च्या वेळी manometer वापरु लागलो आतापर्यंत 44 ऑर्गन तयार झाले त्यामध्ये 5 octave, 4 octave, 3.5 octave असे ऑर्गन बनवले गेले. सामान्य पणे ऑर्गन चे वजन 35 ते 50 किलो च्या आसपास असते प्रवासातून नेण्या आणण्यासाठी गैर सोयीचे होते म्हणून 18 ते 22 किलो इतक्या कमी वजनाचे ऑर्गन बनवायला लागले. या सर्व कामाची दखल आदित्य ओक यांनी घेऊन ABP माझा या न्यूज चॅनेल वर interview चा स्पेशल कार्यक्रम केला. या कार्यामूळे लोकमान्य सेवा संघ मुंबई या संस्थेकडून पंडीत रामदास कामत या श्रेष्ठ कलाकाराकडून सत्कार झाला. आदित्य ओक यांच्या जादूची पेटी या कार्यक्रमात ते बाळा दाते यांच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढतात. दिनांक २५ जुलै २०१६ रोजी दुनियादारी फाऊंडेशन यांच्याकडून स्वराधिश सुधीर फडके (विशेष) पुरस्कारने त्यांना सन्मानित करण्यात आले तसेच चित्पावन उद्योजक मंच मुंबई यांच्याकडून उद्योगश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

    Mtv मध्ये ग्रेट संगीतकार आणि फिल्म निर्माते विशालजी भारद्वाज, तसेच शंकर महादेवन यांनी कट्यार चित्रपटात याचा वापर केला, राज्याचे सास्कृतिक मंत्री विनोद जी तावडे यांनी त्यांच्या आडिवरे येथील कारखान्यास भेट देऊन संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आणि त्या प्रमाणे कार्यवाही सुरू केली. पंडीत तुलसीदास बोरकर, पं. विश्वनाथ कान्हेरे, डॉ. विद्याधर ओक ( 22 - Shruti Harmonium scientist) या सर्व लोकांनी त्यांच्या या सर्व कामाचे कौतूक केले. त्यांचा ऑर्गन ‘एमटीव्ही अनप्लग्ड’ मध्ये वापरला गेला व एमटीव्ही अनप्लग्ड याची नोंद घेणे म्हणूनच महत्त्वाचे आणि आश्वासक आहे. तसेच सर्व मराठी वृत्तपत्र आणि DNA English-Web या सर्वांनी याची दखल घेतली त्यामुळे संपूर्ण जगाला त्यांच्या कामा विषयी माहिती झाली या मध्ये फेसबुक चा फार उपयोग झाला. यातूनच David Este या अमेरिकन माणसाची ओळख झाली या संगीत प्रेमी आणि धडपडीला प्रोत्साहन देणा-या माणसामुळे बाळा दाते यांच्या Reeds manufacturing संशोधना मध्ये मोलाची मदत मिळत आहे. David मूळेच NED PHOENIX या अमेरिकन शास्त्रज्ञाची ओळख झाली. त्यांनी Reed manufacturing बददलची अत्यंत महत्वाची माहिती त्यांना Handover केली. त्या प्रमाणे reeds manufacturing project चालू आहे.

    अजून एक नवीन special purpose Machine बनवण्यावर Research चालू आहे. Milling Machine मध्ये alteration करुन त्याला learner Guideways, 20000 RPM spindle आणि digital Readout system या गोष्टींचा समावेश्‍ असेल. यामुळे कामाची accuracy 0.005 micron एवढी मिळेल. या सर्व प्रवासात त्यांना हेमंत लिंगायत, संजय तारळकर, सुहास पांचाळ, किरण नांदगावकर आणि संदेश पांचाळ या त्यांच्या सहकारी कारागरांची फार मोलाची मदत झाली.
    २००२ साली पहिला ऑर्गन त्यांनी पाहिला तर २००५ साली ऑर्गन चा sound box हाती आला आणि २०१३ साली पहिला भारतीय बनावटीचा ऑर्गन ते बनवू शकले. आत्तापर्यंत ८० हून अधिक ऑर्गन त्यांनी तयार केले आहेत. त्यांच्याकडे ६५ हजार रुपयांपासून १ लाख २० हजार रुपयांर्पयच्या किमतीचे ऑर्गन बनवून दिले जातात. आता त्यांना ध्यास आहे पेटंट मिळविण्याचा. अनेक नामांकित कंपन्यांनी ऑर्गन बनवणे वेगळी गोष्ट आहे आणि खेडयातील एका सामान्य तरुणाने एकाकी प्रयत्नातून ऑर्गन बनवणे केवळ दैवी लिलाच असू शकते.

    त्यांनी आपल्या अभ्यासपूर्वक आणि कौशल्यपूर्ण कामाने वाद्यनिर्मितीला नवसंजीवनी दिली आणि कोकणवासीयांना नवीन उद्योगधंद्याची संधी निर्माण करून दिली. १९५० नंतर अमेरिका आणि युरोपमध्ये ऑर्गनची निर्मिती जवळजवळ थांबल्यातच जमा आहे. ही बाळा दातेंसाठी जमेचीच बाजू म्हणायला हवी. लवकरच ऑर्गन निर्मितीमध्ये बाळा दाते यांची मक्तेदारी झालेली बघायला मिळाली तर नवल वाटायला नको!

    संपर्क. ‘बाळा ऑर्गन ॲ‍ॅण्ड म्युझिकल’
    उमाशंकर उर्फ बाळा दाते भ्रमणध्वनी. ९४०५९५५६११
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट / बाळा दाते

    श्री. दाते यांच्या ऑर्गन नवनिर्मितीच्या ध्येयाने अमेरिकास्थित ७५ वर्षीय शास्त्रज्ञ नेड फोनिक्स हे कमालीचे प्रभावीत झाले. त्यांनी त्यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार
    I checked out the guy in India who makes auction organs. Pretty amazing. He is a mad scientist who makes it all by hand with an old English milling machine and his friends CAD router. So were all the original inventors and developers of reed organs. Good for him! Good for you!I suppose I am also a mad inventor: Several times I reinvented the 2MP RO concept, and 30 years ago arrived at what I think is the design that is for sound the most efficient and most musical (of course, this is Not the simplest to build :-)He is even looking into making his own reeds next and I think he can do it. He currently buys old sets on eBay. He has sent samples to the top labs in India to get the metal make up of the brass. Please forward all this information to this maker. Because of his good work, he deserves to know these important things so he can improve his reed organs for the best playability and longevity.I hope all this helps you make your decisions.I would be happy to receive an email from David, and also from the reed organ maker in India if he would like to write.Best wishes,
    – Ned PhoenixPhoenix Reed Organ Resurrection593 Phoenix Way, Townshend, VT 05353

  • ज्येष्ठ संगीततज्ज्ञ आणि संगीतकार डॉ. अशोक रानडे

    ज्येष्ठ संगीततज्ज्ञ आणि संगीतकार डॉ. अशोक रानडे यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९३७ रोजी झाला. मुंबईतील विल्सन महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. डॉ. रानडे यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण पं. गजाननराव जोशी, पं. लक्ष्मणराव बोडस आणि प्रा. बी. आर. देवधर यांच्याकडून घेतले.

    संगीतशास्त्राचे गाढे विद्वान, अशी ख्याती असलेल्या डॉ. रानडे यांनी भारतीय लोकसंगीत आणि पाश्चिीमात्य शास्त्रीय संगीताचा सखोल अभ्यास केला होता. मुंबई विद्यापीठाच्या संगीत केंद्राचे पहिले संचालक असलेल्या डॉ. रानडे यांनी अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज आणि नॅशनल कौन्सिल फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌ या संस्थांमध्ये महत्त्वपूर्ण पदे भूषविली होती. डॉ. रानडे यांनी तब्बल १६ वर्षे या पदाची धुरा वाहिली. त्यांना फुलंब्रीकर पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

    बडोदा येथील महाराज सयाजीराव विद्यापीठातील टागोर अध्यासनावर त्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांना १९९० मध्ये व्यावसायिक रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. डॉ. रानडे यांनी अनेक विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीत आणि "व्हॉईस कल्चर'चे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले होते. संगीताचे सौंदर्यशास्त्र, लोकसंगीत शास्त्र, ऑन म्युझिक अँड म्युझिशियन्स, स्टेज म्युझिक इन महाराष्ट्र, महाराष्ट्र आर्ट म्युझिक यासारख्या संगीताचं महत्त्व सांगणारी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली.

    संगीत क्षेत्रातील विविध प्रवाहांबाबत डॉ. रानडे यांनी सदोदित स्वागतशील भूमिका घेतली होती. त्यांना याच वर्षी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. डॉ. अशोक रानडे यांचे ३० जुलै २०११ रोजी निधन झाले. डॉ. अशोक रानडे यांनी तब्बल चार दशकांच्या संशोधन-व्यासंगातून ‘पाश्चात्त्य संगीतसंज्ञा कोश’ या कोशाचे काम जवळजवळ पूर्णत्वास नेले होते. मात्र, तो प्रसिद्ध होण्याआधीच त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर त्यांचे शिष्य संगीतज्ञ चैतन्य कुंटे यांनी या कोशाचे संपादन पूर्ण केले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान’च्या अध्यक्षा आणि उद्योजिका मीनल मोहाडीकर

    आजपर्यंतच्या इतिहासात महाराष्ट्र चेम्बर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चरची पहिली महिला अध्यक्ष जर कुणी असेल तर मीनलताईंचे नाव सन्मानपुर्वक घेतले जाते. ‘मराठी माणसाने आपली नोकरी करावी’ या पराभूत मानसिकतेमधून जगणाऱ्या समाजात कोणत्याही पाठबळाशिवाय उभ्या राहिलेल्या मीनल यांनी २०१३ साली शारजात केवळ उदघाटन करून कुठलेही प्रदर्शन न भरवलेल्या इंडियन एग्झिबीशन सेंटर शारजा येथे प्रदर्शन केंद्रात, २०१४ मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर दुबई येथे यशस्वी उद्योजकांची बाजारपेठ प्रदर्शनाद्वारे नुसतीच आयोजित करुन दाखवली नाहीतर यशस्वी करून दाखवली. ज्या अरब देशात तेथील महिलांना देखील सार्वजनिक जीवनात असे कार्य करण्याची मुभा नाही तेथे जाऊन एका मराठी महिलेने हा नेत्रदीपक उद्यम यशस्वी केला.

  • ज्येष्ठ पत्रकार समीरण वाळवेकर

    समीरण वाळवेकर यांनी ‘आजच्या ठळक बातम्या’ (टेलिव्हिजन पत्रकारितेवरील अभ्यासपूर्ण ग्रंथ), चॅनल ४ लाईव्ह’ (मराठी लोकप्रिय काल्पनिक कादंबरी), चरित्रात्मक ग्रंथ : ‘फिनोलेक्स पर्व’ (प्रल्हाद पी छाब्रिया यांच्या वरील) ही तीन पुस्तके लिहिली आहेत.

  • नटवर्य गोपाळ गोविंद ऊर्फ नानासाहेब फाटक

    राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकातील वीरश्रीयुक्त विक्रांतची भूमिका, ‘संन्याशाचा संसार’मधील शंकराचार्यांची भूमिका, ‘सत्तेचे गुलाम’मधील केरोपंत वकिलाची भूमिका, ‘शहाशिवाजी’ नाटकात शहाजी, ‘कृष्णार्जुन युद्धात’ चित्ररथ गंधर्व, ‘हाच मुलाचा बाप’मध्ये वसंत, ‘श्री’ या नाटकातील कुसुमाकर, ‘सोन्याचा कळस’ नाटकातील कामगार बाबा शिगवण इ. भूमिका तर खूपच गाजल्या, पण ‘पुण्यप्रभाव’मधील वृंदावन, ‘एकच प्याला’मधील सुधाकर, ‘झुंजारराव’ नाटकातील झुंजारराव आणि ‘हॅम्लेट’ या भूमिका त्यांच्या सर्वोच्च भूमिका होत.

  • आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पंच डिकी बर्ड

    आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पंच डिकी बर्ड

    डिकी बर्ड उजव्या हाताने गोलंदाजी करत असत. ते राईट आर्म ऑफ ब्रेक गोलंदाज होते. १९५६-५९ यॉर्कशायर कडून ते पहिला प्रथम श्रेणीचा सामना खेळले. १२ ऑगस्ट १९६४ रोजी अखेरचा प्रथम श्रेणी सामना खेळले. १९७० मध्ये अंपायर म्हणून त्यांनी आपले करिअर सुरु केले. डिकी बर्ड हे क्रिकेटचा एवढ्या वर्षांचा काळ बघितलेला एकमेव जिवंत माणूस असावेत.

  • अभिनेत्री वैजयंती माला

    वैजयंतीमाला यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरवात तामिळ भाषेतील ” वड़कई ” या चित्रपटापासून केली.

  • शापित योगी

    संगीतकार दत्ता डावजेकर यांच्या कन्या डॉ. अपर्णा मयेकर .पूर्वाश्रमीच्या रेखा डावजेकर यांनी जागवलेल्या आठवणी..

    १५ नोव्हेंबर १९१७ ला पुण्याजवळ कोंडुर येथे दत्तात्रेय शंकर डावजेकर ऊर्फ डी. डी. यांचा जन्म झाला. तो दिवस होता दिवाळीतला पाडवा. अतिशय शुभ दिवस. डी. डीं.चे वडील शंकर डावजेकर हे उर्दू, मराठी नाटके व कीर्तनात तबला वाजवीत असत. त्यामुळे डी. डीं.ना लहानपणापासूनच संगीताचे बाळकडू मिळाले. दुर्दैवाने डी. डी. चार वर्षांचे असतानाच त्यांची आई बाळंतपणात दगावली. डी. डी. पुण्याच्या नूतन मराठी हायस्कूलमध्ये शिकले. बुद्धीने अतिशय तल्लख. वर्गात पहिला नंबर कधी सोडला नाही. इंजिनीअर व्हावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती, पण गरिबीमुळे ते जमणे नव्हते. इयत्ता पाचवीत असताना साबणाच्या डबीत त्यांनी रेडिओ बांधला होता. ते सातवीत असताना लंडनला मेकॅनोची स्पर्धा होती. तेथे डी. डीं.च्या सर्किटला पहिले बक्षीस मिळाले. नूतन मराठीमध्ये असताना डी. डीं.च्या वर्गात दादा खरे म्हणून होते. त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स या विषयातील मॅगझिन्स येत असत. ती वाचून डी. डी. नवनवीन काही बनवण्याचा प्रयत्न करीत असत. तबलाही डी. डी. दादांकडूनच शिकले.

    त्यावेळी स्वातंत्र्यलढय़ात प्रभातफेऱ्या निघत. या प्रभात फेऱ्यांतल्या गाण्यांना चाली लावून डी. डी. गात असत व इतरांनाही शिकवत असत. यादरम्यान नभोवाणीवरही ते गाण्यांना संगीत देऊ लागले. जलतरंग, दिलरुबा, हार्मोनियम व तबला ही वाद्ये ते लीलया वाजवीत. पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये डी. डीं.चे अॅोपेंडिक्सचे ऑपरेशन झाले तेव्हा ते तिथे रोज दिलरुबा वाजवीत. डॉक्टर मंडळी ते ऐकायला येत असत.

    वाल्हे येथील इंदुमती बनसोड यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यावेळेस डी. डी. कोल्हापुरात राहत होते. राजारामपुरीत मालती बंगला येथे ते वास्तव्यास होते. अभिनेत्री बेबी नंदा यांचे पिताश्री मा. विनायक यांच्या प्रफुल्ल पिक्चर्समध्ये ते संगीतकार म्हणून नोकरीस होते. एकदा विनायक त्यांना म्हणाले, ‘अरे दत्ता, आज एक मुलगी गाण्याची ऑडिशन द्यायला येईल.’ नंतर एक सडपातळ, खूप लांब केसवाली आणि दोन वेण्या घातलेली एक मुलगी ऑडिशनला आली. साधारण १३-१४ वर्षांची असावी. डी. डीं.ना वाटले, की एवढी लहान मुलगी काय गाणार? पण जसे तिने गाणे सुरू केले, डी. डी. आश्चर्यातच पडले. अतिशय गोड आवाज, उत्कृष्ट हरकती, तालाची उत्तम समज! तिला कुठे ठेवू अन् कुठे नको असे डी. डीं.ना होऊन गेले. ‘अजून एक गाणं म्हण.. एक चॉकलेट देतो,’ असे करत करत डी. डीं.नी तिच्याकडून सात-आठ गाणी गाऊन घेतली. धावतच ते मा. विनायकांकडे गेले व म्हणाले, ‘ती मागेल तो पगार द्या; पण तिला नोकरीत ठेवून घ्या. फार गुणी मुलगी आहे.’ यावर मा. विनायक हसून म्हणाले, ‘अरे दत्ता, ही लता. माझी पुतणी! दीनानाथ मंगेशकरांची मुलगी!!’ अशा तऱ्हेने स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांची ऑडिशन घेण्याचा मान डी. डीं.ना मिळाला. ‘माझं बाळ’ या चित्रपटात पाचही मंगेशकर भावंडांना प्रथम पाश्र्वगायनाची संधी देण्याचा मानही डी. डीं.नाच मिळाला. तद्वत लतादीदींचे पहिले हिंदी चित्रपटगीत ‘पा लागू करजोरी’ (चित्रपट : ‘आपकी सेवा में’) हेपण डी. डीं.नीच कम्पोज केले होते. अशा तऱ्हेने या स्वरसम्राज्ञीचे पदार्पणाचे मराठी व हिंदी चित्रपटगीत देण्याचा मान डी. डीं.ना मिळाला. वसंतराव देशपांडेंसारख्या दिग्गज गायकाला ‘पेडगावचे शहाणे’मध्ये डी. डीं.नी प्रथम गाणे दिले. पंडित जितेंद्र अभिषेकींनीही पहिले पाश्र्वगायन डी. डीं.कडेच केले होते. ते म्हणजे.. ‘गोमू माहेरला जाते हो नाखवा’!

    त्यांनी सुधा मल्होत्राला ‘गोवलकोंडा का कैदी’ या चित्रपटात पहिल्यांदा ब्रेक दिला. त्यांनी अभिनेता प्रेमनाथलाही या चित्रपटात गायला लावले. माणिक दादरकर (माणिक वर्मा) यांची पहिली एच. एम. व्ही. रेकॉर्ड डी. डीं.नीच काढली. पं. हरिप्रसाद चौरासिया व अनिल मोहिले यांनाही पहिला ब्रेक त्यांनीच दिला. कोल्हापुरात असताना डी. डी. आणि लताबाई एकत्र खेळतही असत. लताबाई व आशाबाई यांच्याकडून डी. डीं.ना बरेच काही शिकावयास मिळाले. आणि त्यांनीही डी. डीं.वर मोठय़ा भावाप्रमाणे माया केली. लताबाईंनी ‘आनंदघन’ नावाने संगीत दिले. त्या चित्रपटाचे संगीत संयोजन व पाश्र्वसंगीत डी. डीं.नी केले आहे. मुंबईत आल्यानंतर डी. डी. काही काळ एच. एम. व्ही.मध्ये नोकरीला होते. तेथे जी. एन. जोशी आणि गजानन वाटवेंशी त्यांची ओळख झाली. वाटवेंचे काही कार्यक्रमही डी. डीं.नी वाजवले. ‘थांबते मी रोज येथे’, ‘कुणी बाई गुणगुणले’ ही आशाबाईंची एच. एम. व्ही. रेकॉर्ड, त्याचप्रमाणे ‘गेला कुठे बाई कान्हा’, ‘तुज स्वप्नी पाहिले रे गोपाला’ ही लतादीदींची एच. एम. व्ही. रेकॉर्डही तेव्हाच प्रसिद्ध झाली. ही सर्व गाणी डी. डीं.नीच लिहिली व त्यांना चालीही दिल्या. नंतर सी. रामचंद्रन यांच्याकडे डी. डीं.नी साहाय्यक म्हणून काम केले. रोशनजी व चित्रगुप्त (आजचे संगीतकार आनंद-मिलिंद यांचे वडील) यांच्याकडेही त्यांनी काम केले. त्याबरोबरच स्वतंत्रपणे संगीत दिग्दर्शन देणेही सुरूच होते. पण डी. डीं.ना खरा ब्रेक मिळाला तो ‘रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटापासून! त्याला महाराष्ट्र सरकारचे पारितोषिक मिळाले. हा चित्रपट तवायफच्या जीवनावर होता. गाण्यात तो बाज असावा म्हणून डी. डी. व दिग्दर्शक राजा ठाकूर हे काही दिवस रेडलाइट एरियात जाऊन गाणी ऐकायचे. नंतर ‘तेरे वादे भी सपने दिखाते रहे’ हे गाणे आशाताईंच्या आवाजात रेकॉर्ड झाले व त्यांनासुद्धा उत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार मिळाला.

    मग मात्र डी. डीं.कडे चित्रपटांची रीघ लागली. डी. डीं.चा पाश्र्वसंगीत देण्यात हातखंडा होता. त्यामुळे राजा परांजपेंनी त्यांना ‘पाठलाग’ हा भयपट दिला. फक्त पाच वादकांमध्ये केलेले ‘या डोळ्यांची दोन पाखरे’ हे गाणे प्रचंड गाजले. ‘नको मारूस हाक’ हे गाणेही लोकप्रिय झाले. डी. डीं.ना व आशाताईंना पुरस्कार मिळाले. पुन्हा ‘पडछाया’मध्ये ‘बाई माझी करंगळी मोडली’, ‘उठ शंकरा, सोड समाधी’ ही गाणी गाजली. गजानन जागीरदार, धर्माधिकारी, राजा ठाकूर, यशवंत पेटकर, भालजी पेंढारकर यांच्यासारख्या मातब्बर लोकांबरोबर डी. डीं.नी काम केले. वसंतराव जोगळेकर, राजदत्त यांच्यासमवेतही त्यांनी काम केले. डी. डीं.ना नवनवीन प्रयोग करायला आवडत. ‘काका, मला वाचवा’ या चित्रपटात ‘सा सागर उसळे कैसा’ हे सप्तसुरांचे गाणे डी. डीं.नी ग. दि. माडगूळकरांकडून लिहून घेतले. ‘साऊंड अॅाण्ड म्युझिक’ या चित्रपटातील गाण्यावरून ती कल्पना घेतली होती. ‘आसावल्या मनाला’ या गाण्यात डी. डीं.नी तोडी रागात शुद्ध धैवत लावला होता. ‘रंगल्या रात्री अशा’, ‘पाठलाग’, ‘पडछाया’, ‘पाहू रे किती वाट’, ‘संथ वाहते कृष्णामाई’, ‘धरतीची लेकरे’ यासारखे अनेक चित्रपट डी. डीं.नी केले.

    याशिवाय रेडिओच्या अनेक संगीतिका, बालचित्रवाणीचे चित्रपट, अनेक माहितीपटही त्यांनी केले. १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त आमचे नेहमी कार्यक्रम होत. एका हुतात्मादिनी ऑगस्ट क्रांती मैदानात मला इंदिरा गांधींच्या शेजारी बसून गाण्याची संधी मिळाली. डी. डी. हे बहुगुणी व्यक्तिमत्त्व होते. ते संगीतकार होते, तसेच कवी आणि लेखकही होते. त्यांनी लिहिलेली ‘सांतानेरीचा अपघात’ ही भयकथा वाचली की अंगावर काटा येतो. ‘विज्ञानयुग’ या मासिकात इलेक्ट्रॉनिक्स या विषयावर त्यांची लेखमाला येत असे. माझा मोठा भाऊ विजय हा इलेक्ट्रॉनिक इंजिनीअर आहे. त्याच्या मदतीने त्यांनी अनेक म्युझिकल इन्स्ट्रमेंट्स बनवली. इलेक्ट्रॉनिक तानपुरा, स्वरमंजुषा, सूरपेटी, लेहेरासाथी. त्यात वेगवेगळे ६०० ताल होते. सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे भारतातील पहिला सिंथेसायझर डी. डीं.नी बनवला. त्याला तेव्हा क्लेव्हायोलिन म्हणत. पूर्वी परदेशी सिंथेसायझर अवाढव्य असत. डी. डीं.नी हा सिंथेसायझर सुटसुटीत बनवला. कौतुकाची गोष्ट म्हणजे आर. डी. बर्मनच्या साहाय्यकांनी तो आर. डीं.च्या जवळजवळ ३०० रेकॉर्डिग्जमध्ये वाजवला. डी. डी. उत्कृष्ट टॅप डान्सर होते. त्यावेळची प्रसिद्ध अभिनेत्री बेबी आचरेकर हिच्याबरोबर डी. डीं.नी चित्रपटात टॅप डान्स केला होता. तसेच केवळ तीस सेकंदांत समोरच्या व्यक्तीचे रेखाचित्र डी. डी. काढत असत. आमच्या भीमराववाडीच्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावरील चित्र नेहमी डी. डी.च काढत. एकदा एका काळ्या कागदावर तेली खडूंनी केशरी रंगात ‘मंगळावरचा माणूस’ हे चित्र त्यांनी काढले होते. ते ग. दि. माडगूळकरांना एवढे आवडले, की त्यांच्या ‘पंचवटी’ बंगल्यात ते त्यांनी हॉलमध्ये लावले होते. ग. दि. मा. एकदा म्हणाले होते, की- ‘मी लिहिलेल्या काव्यात जर कधी बदल करावयाचा असेल तर तो अधिकार मी फक्त डी. डीं.ना देईन. कारण त्यांना काव्याची जाण आहे.’

    डी. डीं.ना परिस्थितीमुळे स्वत:ला फार शिकता आले नाही. त्यामुळे आम्ही भावंडांनी खूप शिकावे असा त्यांचा व आईचा आग्रह असे. त्याप्रमाणे विजय इलेक्ट्रॉनिक इंजिनीअर, विनय ऊर्फ पप्या सिव्हिल इंजिनीअर आणि मी डॉक्टर झाले. धाकटी बहीण ललिता (डॉली) हिचे ड्रॉइंग अतिशय सुंदर असल्याने तिने जे. जे. स्कूलमध्ये कलाशिक्षण घेतले. डी. डीं.कडे एवढे कलागुण असूनही त्यांचे म्हणावे तसे चीज झाले नाही. त्यामुळे मी त्यांना ‘शापित योगी’ म्हणते. योगी- कारण ते स्थितप्रज्ञ होते. कौतुक झाले, नाव मिळाले म्हणून गर्व नाही. आणि वाईट परिस्थिती आली म्हणून विषादही नाही. जेव्हापासून मला कळायला लागले- माझे वडील डी. डी. म्हणजे खूप ‘मोठा माणूस’ आहे- मला खूप आश्चर्य वाटायचे. माझ्या मैत्रिणींना खूप उत्सुकता असायची. ‘ए रेखा, एकदा आम्हाला डी. डीं.ना बघायचंय,’ असे त्या म्हणत. मग मी त्यांना घरी घेऊन आले की त्यांचा भ्रमनिरास व्हायचा. वडील नेहमी पांढरा सदरा, पायजमा किंवा पांढरी चड्डी अशा वेशात असायचे. एकदम साधे. डामडौल नाही. भपका नाही. लोकांच्या अपेक्षेत डी. डी. म्हणजे ‘स्टाईलबाज’ माणूस असावा. पण मग सहवासात आल्यावर त्यांचा साधेपणा, ज्ञान, मिश्कील स्वभाव याने ते समोरच्याला जिंकायचे. मला नेहमी म्हणायचे, ‘शेवटच्या क्षणापर्यंत माणसाने काहीतरी शिकत राहावे. काहीतरी नवीन करावे, म्हणजे मेंदू तल्लख राहतो.’ एक गोष्ट आठवते. वयाच्या २४ व्या वर्षी मी रेखा डावजेकरची ‘सौ. अपर्णा मयेकर’ झाले. पण इतक्या वर्षांत मी त्यांना कधीही रागावलेले बघितले नाही.

    वसंतराव जोगळेकरांचा ‘शेवटचा मालुसरा’ हा चित्रपट डी. डीं.नी केला. ‘तुझे रूप राणी’ या गाण्यासाठी महेंद्र कपूरना अॅशवार्ड मिळाले. पुढचा ‘हा खेळ सावल्यांचा’ हा चित्रपट डी. डीं.नी साइन केला. त्यासाठी रवींद्र साठेंना घेऊन गाणेही बसवले. आणि अचानक वसंतराव जोगळेकरांकडून फोन आला- ‘डावजेकर, हा चित्रपट मी हृदयनाथला (बाळ) देत आहे.’ आम्ही सगळे नव्‍‌र्हस झालो. पण डी. डी. म्हणाले, ‘अरे वा! बाळ गुणी संगीतकार आहे. छान संगीत देईल. माझ्या त्याला शुभेच्छा!’ किती मोठे मन! चित्रपट हातातून गेला याचे दु:ख तर नाहीच; उलट बाळला मनापासून त्यांनी शुभेच्छा दिल्या. म्हणूनच मी डी. डीं.ना योगी म्हणते. अजातशत्रू असणे म्हणजे काय, हे त्यांना पाहून कळावे. आयुष्यात त्यांना बरेच पुरस्कार मिळाले. महाराष्ट्र शासनाचे, सूरसिंगार, लता मंगेशकर पुरस्कार, झी जीवनगौरव पुरस्कार, ग. दि. मा. पुरस्कार, वगैरे वगैरे. पण डी. डी. नेहमी जमिनीवरच!

    साधे घसरून पडण्याने माकडहाड दुखावले गेले आणि एका आठवडय़ातच माझ्या वाढदिवसाच्या दिवशी ते अनंतात विलीन झाले. कॉलनीतली माणसे म्हणाली, ‘अजून डी. डी. आम्हाला ‘वॉक’ करताना दिसतात.’ डी. डी. नेहमी म्हणायचे, ‘मला पुनर्जन्म नाही.’ कदाचित परमेश्वराला पण त्यांचे सुंदर संगीत कायम ऐकावेसे वाटले असेल.

    डॉ. अपर्णा मयेकर
    संकलन.संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • खासदार छत्रपती  उदयनराजे भोसले

    उदयनराजे भोसले यांचे शिक्षण पाचगणी येथे झाले. त्यांनी प्रॉडक्शन मेकॅनिकल इंजिनियरिंग पदवी घेतली आहे. १९९० पासून राजकारणात सक्रीय असलेल्या उदयनराजे यांनी सर्वप्रथम १९९१ मध्ये उगवता सूर्य या चिन्हावर रयत पॅनेलवर सातारा नपा निवडणूक लढवली होती. तत्कालिन १४ क्रमांकाच्या प्रभातून ते विजयी झाले. १९९६-९७ मध्ये विधानसभेची जागा त्यांनी भाजपच्या चिन्हावर लढवली.

  • ‘जनकवी’ पी. सावळाराम

    कल्पवृक्ष कन्येसाठी, गंगा यमुना डोळ्यात उभ्या कां?, लिंबलोण उतरता, जिथे सागरा धरणी मिळते, सप्तपदी ही रोज चालते, रिमझिम पाउस पडे सारखा, घट डोईवर, अशा एकसे एक सुंदर गाण्यांचे जनक म्हणजे नामवंत गीतकार म्हणजे कवी पी. सावळाराम. त्यांचा जन्म ४ जुलै १९१४ रोजी झाला.

    पी.सावळाराम यांचे खरे नाव निवृत्ती रावजी पाटील. पी.सावळाराम यांना शालेय वयापासूनच काव्याची गोडी लागली होती. पुढे ते शिक्षणासाठी सांगलीला महाविद्यालयात दाखल झाले, तेथे त्यांना तिथे शिक्षक लाभले, ते थोर कवी माधव ज्युलियन म्हणजेच प्रोफेसर माधवराव पटवर्धन तेथेच ह्या सर्जनशील मनाच्या पी.सावळाराम यांची काव्यकळा फुलू लागली. त्यांच्या संपर्कात ते आले, तेव्हा त्यांनी ‘सौंदर्य नसते रंगात। सौंदर्य असते अंतरंगात। उघडुनि पाही।’ या ओळी असलेली ‘काळा गुलाब’ शीर्षकाची कविता लिहिली. ही कविता तेव्हा कॉलेजमधल्या वर्णाने काळी, परंतु दिसायला सुंदर असलेल्या एका मुलीवर लिहिली होती. मा.पी.सावळारामांपाशी विलक्षण प्रतिभा होती. पंढरपूरला बडव्यांचे असलेले वर्चस्व पाहिल्यावर ‘पंढरीनाथा झडकरी आता। पंढरी सोडुनि चला। विनविते रखुमाई विठ्ठला’ हे गीत त्यांनी लिहिले. महाविद्यालयीन शिक्षण झालेले निवृत्ती पाटील, ठाणे येथे रेशनिंग ऑफिसमध्ये नोकरीसाठी रुजू झाले. काव्याची उर्मी त्यांना गप्प बसू देत नव्हती.

    एच. एम.व्ही. कंपनीच्या वसंत कामेरकरांनी पाटलांना संधी दिली आणि ह्या पी.सावळाराम यांची गट्टी जमली ती संगीतकार वसंत प्रभू ह्यांच्याशी. त्यांची पहिली दोन गाणी प्रसिद्ध झाली, निवृत्ती पाटील ह्या नावाने, पण त्याचवेळी नागपूर आकाशवाणी केंद्रावर निवृत्ती पाटील नावाचेच बासरीवादक कलाकार होते, ह्या नामसाधर्म्यातुन त्यांना बाहेर यायचे होते, त्यावेळी पी. सावळाराम ह्यांचे एक मित्र उपयोगाला आले. ते मित्र होते, विधानसभेचे माजी अध्यक्ष वि. स. पागे होय. तर ह्या पागे यांना, ह. ना. आपटे ह्यांच्या त्यावेळी गाजत असलेल्या, "उषःकाल" ह्या कादंबरीमधील "सावळ्या" ह्या व्यक्तिरेखेने भारावून टाकले होते. पागे ह्यांना, आपला मित्र निवृत्ती पाटील ह्याच्या व्यक्तिरेखेत ह्या "सावळ्या"चे साधर्म्य जाणवायचे. ते निवृत्ती पाटील ह्यांना "सावळ्या" नावाने हाकारायचे. झाले. अशा रीतीने निवृत्ती पाटील ह्यांनी आपले "पी.सावळाराम" हे नाव धारण केले.

    पंढरपूरला बडव्यांचे असलेले वर्चस्व पाहिल्यावर ‘पंढरीनाथा झडकरी आता। पंढरी सोडुनि चला। विनविते रखुमाई विठ्ठला’ हे गीत त्यांनी लिहिले. १९४९ साली ‘राघु बोले मैनेच्या कानात ग’ हे पहिले गीत त्यांनी लिहिले. वसंत प्रभू, माधव शिंदे व दिनकर पाटील हे त्यांचे स्नेही होते. मराठी चित्रपटांचा तो ऐन बहराचा काळ होता. जिथे चित्रपटगृहे होती, तिथे प्रदर्शित होणाऱ्या बऱ्याच चित्रपटांतून पी. सावळारामांची गाणी असायची. सर्वसामान्य लोकांपर्यंत ती अशी थेटपणे पोहोचली होती. परंतु पी. सावळाराम यांच्या गीतांचा संग्रह फार उशिरा म्हणजे १९९१ साली कुसुमाग्रजांच्या प्रस्तावनेसह प्रसिद्ध झाला. पण त्याआधी कित्येक वर्षे तुकारामांच्या अभंगांप्रमाणे सावळारामांची गीते लोकांच्या मनात आणि कंठात कायमची बसली होती. त्यांना सामाजिक कार्याची ओढ होती. १९६४-६५ साली ते ठाण्याचे नगराध्यक्ष झाले. येऊर पाणी योजना आणि ड्रेनेज सिस्टमसंबंधी त्यांनी विशेषत्वाने लक्ष घालून त्या पूर्णत्वास नेल्या. शिक्षकांच्या पगारात त्यांच्याच काळात वाढ झाली. ६३-६४ साली ते शिक्षण समितीचे सभासदही राहिले. ठाण्याच्या ज्ञानसाधना कॉलेजच्या स्थापनेत इतरांबरोबर त्यांचाही सहभाग होता. त्यांच्याप्रतीच्या कृतज्ञतेने या कॉलेजने ‘पी. सावळाराम गौरवग्रंथ’ प्रकाशित केला.
    पी. सावळाराम यांची गीते अशी लोकमानसात त्यांचा ठेवा म्हणून स्थिरावली आहेत. संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम यांच्या अभंग व ओव्यांना हे भाग्य लाभले होते. अलीकडल्या काळात ग. दि. माडगूळकर यांच्या बरोबरीने कवी पी. सावळाराम यांना ते लाभले. या अर्थाने ते ‘जनकवी’ आहेत.

    ‘गंगा यमुना डोळ्यांत उभ्या का?’ या गीतातील भावना लग्न होऊन सासरी जाणाऱ्या कुणाही मुलीच्या आईच्या आहेत. आपल्याला दुरावणार म्हटल्यावर होणारे दु:ख अतिशय अल्पाक्षरी, पण अर्थपूर्ण शब्दांत त्यांनी साक्षात् उभे केले आहे. म्हणूनच त्यातली भावना कुणा एका ‘क्ष’ आईची न उरता कुणाही आईची असू शकते. त्यांच्या गीताच्या या सामर्थ्यांमुळेच ते महाराष्ट्रात अजरामर झाले आहेत.
    ‘ज्ञानदेव बाळ माझा’, ‘विठ्ठल तो आला आला’ व ‘सखू आली पंढरपुरा’ ही गीते. ती लोकभाषेला सहजपणे जवळ जाणारी आणि तिच्यातील नादमाधुर्य टिपणारी आहे. पण त्याचबरोबर एखादी लावणी लिहिताना ते लावणीचा म्हणून जो ठसका असतो, तिथे नायिकेची प्रेमासंबंधातली जी धिटाई असते ती ते नेमक्या शब्दांमध्ये टिपतात. उदाहरणार्थ, ‘काल रातीला सपान पडलं’ किंवा ‘तुला बघून पदर माझा पडला’ या त्यांच्या लावण्या पाहाव्यात.

    सावळारामांनी जवळजवळ सातशे-आठशे गीते लिहिली. त्यांपैकी पाचशे-सहाशे रेकॉर्डवर आली. मा.पी. सावळाराम यांना ‘जनकवी’ ही उपाधी देताना कुसुमाग्रजांना नेमके काय अभिप्रेत होते, हे त्यांनी पुढील शब्दांमध्ये व्यक्त केले आहे..‘ पी. सावळाराम त्यांच्या रसपूर्ण आणि भावगर्भ गीतांच्या द्वारा महाराष्ट्रातील असंख्य घरांपर्यंत- नव्हे, घरातल्या स्वयंपाकघरांपर्यंतही पोहोचले आहेत. खानदानी दिवाणखान्यापासून गोरगरीबांच्या ओटी-ओसरीपर्यंत सर्वत्र या नावाचा संचार झाला आहे. नागरवस्तीच्या वेशीवरच ते थांबले नाहीत. ग्रामीण भागातील झोपडय़ांत आणि चावडी-चव्हाटय़ावरही त्यांचे स्वागत झाले आहे. सावळारामांनी गद्यलेखनही केले. आकाशवाणीच्या ‘कामगार सभे’साठी ‘सहज सुचलं म्हणून’ कार्यक्रमात त्यांनी संहितालेखन केले. ‘माणसाला पंख असतात’ या चित्रपटाचे लेखन, ‘माणसा आधी हो माणूस’ व ‘मंगल कलश’ हे लघुपट व एस. टी.वर ‘सारे प्रवासी घडीचे’ हे वार्तापत्र त्यांनी लिहिले. याशिवाय त्यांनी ‘पुत्र व्हावा ऐसा’, ‘नांदायला जाते’, ‘कन्यादान’, ‘सलामी’ आणि ‘बेरडाची अवलाद’ या चित्रपटांच्या कथाही लिहिल्या. १९८२ सालच्या ‘गदिमा’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. मा.पी. सावळाराम यांचे २१ डिसेंबर १९९७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट