असंख्य गाण्यांना आपल्या सृजनशीलतेनं प्रकाशमान करणारा हा संगीतकार म्हणजे ओंकार प्रसाद तथा ओ पी नय्यर !
गहन विषयांच्या व्यासंगात गढलेल्या केरुनानांना शास्त्रीय संगीत, संगीत नाटके व स्वत: पियानो वाजवण्याची आवड होती. शिवाय किर्लोस्कर नाटक मंडळीत त्यांचा राबता होता. फार काय नाटकांच्या तालमींना हजर राहून ते मोरोबा वाघोलीकर आणि बाळकोबा नाटेकर या गायक नटांना गाण्याच्या अतिरेकानं नाटकाचा रसभंग होतो, असा सल्ला देत असत. त्यांच्या या गुणांवर लुब्ध होऊन अण्णासाहेब किर्लोस्करांनी आपले ‘सौभद्र’ हे नाटक त्यांना अर्पण केलेलं आहे.
पेशवे उद्यानातल्या फुलराणीचे उद्घाटन ८ एप्रिल १९५६ ला पुण्यातील पूर्व प्राथमिक शाळेतील तेव्हाची विद्यार्थिनी वसुंधरा डांगे हिच्या हस्ते झाले. (पुढे त्या वाचकप्रिय लेखक सुहास शिरवळकर यांच्या पत्नी झाल्या.) इंजिन आणि दोन डबे अशी ‘फुलराणी’ची रचना होती. या रेल्वेसाठी दोन फलाट, तिकीट विक्रीची खिडकी, तिकीट तपासनीस, सिग्नल अशी सारी व्यवस्था उभारण्यात आली होती. लहानग्यांच्या करमणुकीसाठी उद्यानात चालविल्या जाणाऱ्या गाड्यांमध्ये पुण्यातली ‘फुलराणी’ देशातली सर्वात जुनी रेल्वे आहे, हे विशेष.
सोनाली बेंद्रेचा जन्म १ जानेवारी १९७५ रोजी झाला. सोनालीने करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. सोनालीने अभिनेत्री म्हणून १९९४ मध्ये आलेल्या झालेल्या 'आग' सिनेमातून पदार्पण केले होते. सोनालीला उत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. मात्र, सोनालीचे फिल्मी करिअर काही खास राहिले नाही. तिने अनेक मेगाबजेट आणि मल्टीस्टार सिनेमांत काम केले. सोनाली सिनेमांत हवे तसे यश मिळवू शकली नाही तरी तिने जवळपास प्रत्येक मोठ्या स्टारसोबत काम केले आहे. त्यामध्ये शाहरुख खान (इंग्लिश बाबू देशी मेम), सलमान खान (हम साथ साथ है) आमिर खान (सरफरोश), अमिताभ बच्चन (मेजर साहब), अजय देवगण (दिलजले, जख्म) आणि अक्षय कुमार (तराजू) यांची नावे सामील आहेत. सोनालीने आपल्या ११ वर्षांच्या करिअरमध्ये जवळपास ३० सिनेमे केले. शिवाय तिने, तामिळ, तेलगू, कन्नड आणि मराठी सिनेमांतसुध्दा काम केले आहे. २००३ मध्ये रिलीज झालेल्या 'कल हो ना हो' सिनेमानंतर तिने बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. दहा वर्षानंतर २०१३ मध्ये रिलीज झालेल्या 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा' सिनेमातून सोनालीने कमबॅक केले. सोनाली बराच काळ चित्रपटांपासून दूर होती. कमबॅक करत तिनं एक-दोन चित्रपट केलेही, पण नंतर तिनं टीव्हीकडे मोर्चा वळवला. 'क्या मस्ती क्या धूम', 'इंडियन आयडॉल', 'इंडियास गॉट टॅलेंट', 'सिनेस्टार की खोज' असे एकामागोमाग एक रिअॅलिटी शोज तिला मिळत गेले. सोनालीने मराठी चित्रपटसृष्टीत काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘अनाहत’ या मराठी चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. अगं बाई अरेच्चा या चित्रपटातील ‘छम छम करता है ये नशिला बदन’ या गाण्याच्या तालावर आपल्या सर्वांना थिरकायला लावून सोनाली ने एक धक्का दिला होता. सोनाली ने ‘पालकत्व’ या विषयावर एका उत्तम, दर्जेदार पुस्तकाचे लिखाण केले आहे. हे पुस्तक कथेच्या स्वरुपात आणि तिच्या स्वतःच्या अनुभवांवर आधारित आहे. पालकत्वाची जबाबदारी सांभाळताना येणारे सुखद अनुभव याबरोबरच आयुष्यातील चढ-उतार त्यांनी नीटनेटकेपणे मांडले आहेत. या पुस्तकात सोनाली बेंद्रे ने आपल्या मुलासोबतचे वेगवेगळे अनुभव मांडले असून चांगले पालक होण्यासाठी नेमके काय करायला हवे हे समजते. सोनालीने निर्माता गोल्डी बहलसोबत लग्न केले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
सुलभा देशपांडे या माहेरच्या सुलभा कामेरकर. मुंबईतच लहानाच्या मोठय़ा झालेल्या सुलभा देशपांडे यांनी सिद्धार्थ महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शिक्षिका म्हणून छबिलदास हायस्कूलमध्ये कारकीर्दीची सरुवात करणाऱ्या सुलभाताईंचे रंगभूमीशी इतक्या सहजतने धागे जुळले की पुढे याच छबिलदास हायस्कूलमध्ये ‘अविष्कार’च्या रुपाने त्यांनी नाटय़चळवळीचे कार्य उभारले.
आज १८ ऑक्टोबर
आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता स्वप्नील जोशीचा वाढदिवस.
जन्म:- १८ ऑक्टोबर १९७७
त्यांनी आपले शिक्षण जीजीभोय या पारशी मनुष्य सेवाभावी संस्था मधून केले.आणि नंतर चे पूर्ण शिक्षण सिडनाहम कॉलेज, चर्चगेट वाणिज्य या विषयातून पूर्ण केले. वयाच्या नव्या वर्षी, स्वप्नील जोशी यांनी रामानंद सागर यांच्या काल्पनिक कार्यक्रम उत्तर रामायण यात तरुण कुश भूमिका साकारली तिथून त्यांनी त्यांची अभिनय कारकीर्द सुरू केली. २००८ सालातील मराठी चित्रपटाद्वारे त्याने चित्रपटमाध्यमात पहिल्यांदा प्रमुख भूमिका बजावली. 'टार्गेट' नावाच्या सिनेमातही त्याने काम केले आहे. 'मुंबई-पुणे-मुंबई' नंतर मुक्ता बर्वे बरोबर एका लग्नाची दुसरी गोष्टनावाच्या अत्यंत लोकप्रिय मालिकेत त्याने 'घन:श्याम' उर्फ 'घना'ची भूमिका बजावली. दरम्यान 'मुक्ता बर्वे' बरोबर त्याची जोडी सर्वच प्रेक्षकांना आवडली. 'दुनियादारी' चित्रपटात त्याने सुंदर भूमिका केलेली आहे व 'जिंदगी, जिंदगी' नावाचे गीत देखील गायले आहे. ‘कॉमेडी सर्कस’मधून त्याने सगळ्यांना हसवले. मात्र कधी अभिनय, कधी निवेदन; तर कधी परीक्षक या सगळ्या रूपात कायम राहिली ती त्याची “चॉकलेट बॉय’ची प्रतिमा. अनेक हिंदी – मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमधून त्याने अभिनय केला आहे. विनोदी अभिनेता आणि स्टँडअप कॉमेडियन म्हणून त्याची ओळख आहे. हारे काच की चुडियाँ, कॉमेडी सर्कस – १ आणि २ यासारख्या हिंदी मालिकांमधूनही तो प्रेक्षकांच्या भेटीला आला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
शिवाजी महाराजांचे लढावू आयुष्य, सुरुवातीचा लढा, पहिली स्वारी आणि तोरणागडावरील विजय, शहाजीराजांना अटक, जावळी प्रकरण, आदिलशहाशी संघर्ष, अफझलखानाचा वध, प्रतापगडावरची लढाई, कोल्हापूरची लढाई, सिद्धी जोहरचे आक्रमण, पावनखिंडीतील लढाई, पुरंदराचा तह, मोगल साम्राज्याशी संघर्ष, शाहिस्तेखान प्रकरण, सुरतेची पहिली लूट, मिर्झाराजे जयसिंग प्रकरणे, आग्य्राहून सुटका, सवर्त्र विजयी घोडदौड, राज्याभिषेक, दक्षिणेतील दिग्विजय असा शिवाजीराजांचा एकंदर इतिहास मन भारावून टाकणारा आहे.
ब्रिटिशांच्या जुलमातून भारत मुक्त व्हावा यासाठी तुरुंगवास सोसलेल्या वराड (ता. मालवण) येथील वराडकर कुटुंबाचा वंश असलेले लिओ वराडकर हे आज ब्रिटनचा भाग असलेल्या आयर्लंडच्या पंतप्रधान बनले आहेत. एन्डा केनी यांनी पंतप्रधानपद सोडल्यानंतर लागलेल्या निवडणुकीत लिओ यांचा मुख्य मुकाबला सीमोन कोवनी यांच्याशी झाला.
३८ वर्षीय लिओ यांचा राजकारणातील प्रवास खूप वेगवान आहे. ते पेशाने डॉक्टर आहेत. डबलीग हे त्यांच्या कर्तृत्वाचे मुख्य ठिकाण. सुरवातीला उपमहापौर, त्यानंतर आयर्लंडच्या मंत्रीमंडळात स्थान मिळवत तेथे वाहतूक, पर्यटन आणि क्रिडा हे मंत्रीपद तसेच आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा मंत्रीपदावर त्यांनी प्रभावी काम केले. यामुळेच थेट पंतप्रधान पदाचे मुख्य दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. लिओ यांचे मुळ घर मालवण तालुक्यातील वराड हे होय.
वराडकर कुटुंब हे या गावातील प्रतिष्ठीत मानले जाते. लिओ यांचे वडील अशोक यांचे प्राथमिक शिक्षण वराडलाच झाले. अत्यंत हुशार असलेल्या अशोक यांना त्यांच्या वडिलांनी शिक्षणासाठी मुंबईत नेले पुढे हे कुटुंब मुंबईतच स्थायिक झाले. अशोक यांनी शिष्यवृत्ती मिळवून वैद्यकीय शिक्षणासाठी १९६० मध्ये इंग्लड गाठले. तेथे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी वैद्यकीय सेवा सुरू केली. यातच त्यांची ओळख नर्स असलेल्या आयरिश वंशाच्या मिरीअम यांच्याशी झाली. त्या दोघांचा प्रेमविवाह झाला. त्यांना एकूण तीन मुले यातील सानिया आणि सोफिया या लिओ यांच्या मोठ्या बहिणी. ही तिन्ही भावंडे डॉक्टर आहेत. सानिया या तर आयर्लंडमधल्या सगळ्यात मोठ्या रुग्णालयात बालरोगतज्ञ म्हणून कार्यरत आहेत. लिओ यांना तसा फारसा राजकीय वारसा नाही. मात्र देशभक्तीचा खूप मोठा वारसा या कुटुंबाच्या मागे आहे. लिओ यांच्या वडिलांचे काका मधुकर वराडकर आणि मनोहर वराडकर हे स्वातंत्र्य संग्रामात अग्रेसर होते. त्यांनी ब्रिटीशांचे राज्य जावे म्हणून तुरुंगवासही भोगला. आयर्लंडमध्ये स्थायिक होवूनही वराडकर कुटुंबाने गावाशी असलेली नाळ तोडलेली नाही.
गावात त्यांचे वडीलोपार्जित घर, जमीन जुमला आहे. चारच वर्षापूर्वी त्यांनी नवे टुमदार घरही बांधले. हे दाम्पत्य दर दोन वर्षांनी धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने गावाकडे आवर्जुन येते. लिओ हे मात्र अद्याप वराडला आलेले नाहीत. २०११ मध्ये विश्व्चषक क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने तत्कालीन आयर्लंडचे क्रिडामंत्री या नात्याने लिओ हे भारतात आले होते. यावेळी त्यांनी मुंबईला भेट दिली होती.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
जितेंद्र अभिषेकींचे मूळ आडनाव नवाथे. पण मंगेशाला अभिषेक करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आला अन् ते अभिषेकी बनले.
गोवा-मुक्तीनंतर पोर्तुगलला भेट देणारे तसेच चीनला अधिकृत भेट देणारे वेंकटरामन हे पहिलेच भारतीय राष्ट्रपती । कामराज यांच्या रशिया भेटीवर आधारित प्रवासवर्णनासाठी त्यांना सोव्हिएट लँड-नेहरू पारितोषिक देण्यात आले.
Copyright © 2025 | Marathisrushti