मराठी सिनेमांच्या संगीतासाठी सध्या आघाडीच्या नावांमध्ये घेतलं जाणार एक नाव म्हणजे चिनार-महेश. चिनार खारकर आणि महेश ओगले या जोडगोळीने संगीतकार म्हणून मराठीतल्या अनेक सिनेमांच्या गाण्यांना संगीत दिलं. या दोघांनी एकत्रच मराठी सिनेइंडस्ट्रीत संगीतकार म्हणून श्रीगणेशा केला तो २००४ साली.
अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांचं साहित्य अनुवादित झालं आहे. त्यांना लेखनाबद्दल साहित्य अकादमीची फेलोशिप मिळाली होती. तसंच भारत सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
६ नाटके, २ प्रवासवर्णन, २ व्यक्तिचित्रे, २८ कथासंग्रह, १८ लेखसंग्रह, निवडक कथा संग्रहाचे दोन भाग इतके त्यांचे साहित्य प्रसिद्ध झाले.
इंडस्ट्रीमध्ये अभिनय, डायलॉग आणि सतरंगी डान्सने ओळख निर्माण करणारा अभिनेता अनिल कपूर यांचा जन्म २४ डिसेंबर १९५९ रोजी मुंबई येथे झाला.
अनिल कपूर प्रसिद्ध फिल्म निर्माता सुरेन्द्र कपूर यांचे सुपुत्र. अनिल कपूरचं नाव घेतलं की अजूनही खळखळत्या उत्साहाने भरलेला आणि तरुणांनाही लाजवेल असा त्यांचा फिटनेस याचं गणित अचूक जमलेला ‘टपोरी’ चेहरा डोळ्यासमोर येतो. त्यांच्या वागण्या-बोलण्यात अजूनही मुंबईतल्या गल्लीबोळात लहानाचा मोठा झालेल्या तरुणांचा टपोरीपणा अजूनही कायम आहे. ‘वेलकम बॅक’सारख्या चित्रपटात नानाबरोबर पुन्हा एकदा जमवलेली अभिनयाची भट्टी असेल नाहीतर त्यांच्या ‘२४’ या बहुचर्चित शोच्या दुसऱ्या पर्वात त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट ही ‘जबरदस्त’ असते. १९७९ मध्ये 'हमारे तुम्हारे' सिनेमातून पदार्पण करणारे अनिल कपूर यांचा प्रवास आज सुध्दा त्याच गतीने पुढे गेलाय आजसुध्दा रुपेरी पडद्यावर आपल्या फिटनेस आणि स्मार्टनेस अनेक नायकांना त्यांनी मागे टाकले.
८० च्या दशकात अनिल यांनी अनेक सिनेमांच 'झकास' डायलॉग म्हटला आहे, जो त्यांची ओळख झाली होती. ते आजच्या अभिनेत्रींच्या अपोझिटसुध्दा परफेक्ट दिसतात. बॉलिवूडमध्ये अभिनयासोबतच त्यांची दुसरी ओळख निर्माता आहे. अनिल यांचा 'मशाल', 'तेजाब', 'बेटा', 'वो सात दिन', 'लम्हे', 'मेरी जंग', 'जांबाज', 'कर्मा', 'मिस्टर इंडिया', 'विरासत'सह अनेक सिनेमे असे आहेत ज्यांची आजही प्रशंसा होते. ‘कांटे नही कटती ये दिन ये रात’ हे ‘मिस्टर इंडिया’या सिनेमातील अनिल कपूर आणि श्रीदेवीवर चित्रीत केलेलं गाणं आजही हॉट गाण्यांच्या यादीत लिहिलं जातं. या गाण्यात अनिल कपूर आणि श्रीदेवी यांची जबरदस्त हॉट केमिस्ट्री बघायला मिळाली.
अनिल कपूर यांनी नंतर टॉलीवुड मध्ये अभिनय करण्याचा प्रयत्न केला. तेलुगू फिल्म 'वम्सावृक्षं' व मणिरत्नम यांची पहिली कन्नड़ फिल्म 'पल्लवी अनुपल्लवी' मध्ये काम केले. यश चोपड़ा यांच्या 'मशाल' या चित्रपटात उत्तम अभिनय केला. 'मेरी जंग' या सारख्या फिल्म मध्ये न्याया साठी लढणाऱ्या एक नाराज तरुण वकीलाची ची भूमिका करून एक परिपक्व अभिनेता म्हणून आपल्याला सिध्द केले. मा.अनिल कपूर यांनी रुपेरी पडद्यासह छोट्या पडद्यावरसुध्दा शानदार अभिनय केला आहे. पहिल्यांदा त्यांनी २०१० मध्ये '२४' (अमेरिकन) टेलिव्हिजन सिरिजमध्ये काम केले होते. त्यानंतर २०१३ मध्ये त्यांनी '२४' (इंडियन) सिरिज बनवली. या मालिकेत त्यांनी जय सिंह राठोडची भूमिका साकारली होती.
‘२४’ सिरिजच्या मूळ शो बरोबरच ‘फॅमिली गाय’ आणि ‘प्रिझन ब्रेक’ अशा दोन अमेरिकन शोचेही हक्क त्यांनी विकत घेतले असून येत्या काळात ते टेलिव्हिजन येतील. अनिल कपूर यांचे वडील सुरेंद्र कपूर बॉलिवूडचे यशस्वी निर्मात्यांपैकी एक होते. त्यांनी 'पुकार', 'नो एंट्री', 'जुदाई', 'हम पांच', 'वो सात दिन'सारखे सिनेमे निर्मित केले होते. १९८४ मध्ये त्यांनी सुनीता कपूर यांच्या बरोबर लग्न केले. अनिल कपूर यांचा थोरला भाऊ बोनी कपूरसध्दा यशस्वी निर्माता आहे. दुसरीकडे, बोनी यांची पत्नी बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री श्रीदेवी आहे. अनिल कूपूर यांना तीन मुले. त्यांमध्ये दोन मुली सोनम आणि रिया, मुलगा हर्षवर्धन आहे. सोनम बॉलिवूडची यशस्वी अभिनेत्री आणि रिया निर्माती आहे. तसेच मुलगा बॉलिवूडमध्ये पदापर्ण केले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
एप्रिल २०१८ मध्ये माधव भांडारी यांनी भारतीय जनता पक्षाने मानाचे स्थान दिले असून, मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
एकविसाव्या शतकात मराठी कविपरंपरेत अग्रक्रमाने उल्लेख करावा असे कवी म्हणजे देवगड येथील कविराज प्रमोद जोशी. संघर्षमय परिस्थितीतही कवितेवरील अढळ निष्ठा प्रमोद जोशी सरांनी ढळू दिली नाही.
‘लगे रहो मुन्नाभाई’ मधील ‘खटय़ाळ म्हातारा’ प्रधानांनी रंगविला. भूमिका छोटीशीच असली तरी ते आपली छाप पाडून गेले. ‘जब वुई मेट’मधील त्यांच्या ‘स्टेशन मास्तर’ही प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. पण हिंदी चित्रपट आणि तेथील वातावरणात ते फारसे रमले नाहीत.
सुरेश वाडकर यांना लहानपणापासूनच त्यांना गाण्याची आवड होती. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १९५५ रोजी झाला. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षापासून त्याने जियालाल वसंत यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली, तसेच ‘पतियाळा’ घराण्याची तालीम घेतली. त्यांनी पार्श्वनाथ डिग्रजकर यांच्याकडून ही प्राथमिक गायनाचे शिक्षण व सदाशिव पवार यांच्याकडून तबल्याचे प्राथमिक शिक्षण घेतले.
१९७६ साली सूर-सिंगार नावाच्या संगीत स्पर्धेत सुरेश वाडकरांनी भाग घेतला. त्या मधील स्पर्धकांची कामगिरी पारखायला हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार जयदेव इत्यादी नामवंत परीक्षक होते. सुरेश वाडकर या स्पर्धेत विजेते ठरले. १९७६ नंतर सुरेश वाडकर यांनी चित्रपटांमध्ये गायला सुरुवात केली होती. त्यानंतर जयदेवांनी चाली बांधलेल्या गमन या हिंदी चित्रपटातील सीनेमें जलन हे गाणे वाडकर यांना गायला मिळाले.
‘मेघा रे मेघा रे’, ‘चप्पा चप्पा चरखा चले’, ‘ए जिंदगी’ यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांमुळे सुरेश वाडकरांनी चाहत्यांच्या मनावर त्यांच्या आवाजाची छाप सोडली आहे. प्रेमरोग, सदमा या चित्रपटातील त्यांची गाणी खूपच गाजली. सुरेश वाडकर यांनी प्रामुख्याने मराठी व अनेक हिंदी चित्रपटांमधून पार्श्वगायन केले आहे. याखेरीज त्यांनी काही भोजपुरी, कोकणी, मल्याळी, गुजराती, बंगाली, सिंधी चित्रपटांतूनही आणि उर्दू भाषेतूनही गाणी गायली आहेत.
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची परंपरा टिकावी यासाठी सुरेश वाडकर यांनी आजीवासन गुरुकुलम नावाची संस्था सुरू केली. सुरेश वाडकर यांची पत्नी पद्मा वाडकर याही गायिका आहेत. या दोघांनीही गायकीच्या जगात स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केले आहे. संगीत स्पर्धांमध्ये सुरेश वाडकर अनेकदा परीक्षक असतात. सुरेश वाडकर यांना त्यांच्या संगीतसेवेसाठी सुमारे ११ पुरस्कार किळाले आहेत.
कला क्षेत्रात सर्वोच्च समजल्या जाणा-या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही सुरेश वाडकर यांना मिळाला आहे. तसेच २०१९ मध्ये सुरेश वाडकर यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
सुरेश वाडकर यांनी गायलेली काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=-KTx-FJE3Y0
https://www.youtube.com/watch?v=2JXDLvxIF0Q
https://www.youtube.com/watch?v=2JXDLvxIF0Q
https://www.youtube.com/watch?v=_hfck-AakUg
सुरेश वाडकर यांनी गायलेली काही मराठी गाणी
https://www.youtube.com/watch?v=7H4CU8vHuys
https://www.youtube.com/watch?v=1V2pB9KCidE
रुसी फ्रेमरोज सुर्ती हे भारताकडून क्रिकेट खेळलेच त्याचप्रमाणे गुजराथ, राजस्थान आणि क्वीन्सलँडकडूनही क्रिकेट खेळले. ते ऑल-राउंडर होते. रुसी सुर्ती गोलंदाजी करताना चेंडू डाव्या हाताने सिम आणि स्विंग करत असत तर प्रसंगी स्पिन देखील करत असत. ते उत्तम क्षेत्ररक्षकही होते , एकनाथ सोलकरप्रमाणे. ते स्वतः सर गॅरी सोबर्स ला आदर्श मानत असत. त्यांचा खेळ पाहून त्यांना ‘ गरिबांचा गॅरी सोबर्स ‘ देखील म्हणत.
१४ जानेवारी १८९६ रोजी महाड जवळच्या नाते या गावी ते जन्मले . अतिशय कुशाग्र बुद्धीच्या या महाराष्ट्र-पुत्राने १९१२ साली तत्कालीन Matriculation Examination मध्ये प्रथम येण्याचा विक्रम केला तेव्हा राम गणेश गडकरी यांनी त्यांचे कौतुक काव्य रचून केले होते . इंग्लंडला जाऊन त्यांनी आय .सी. एस . परीक्षा दिली आणि त्या परीक्षेतही ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले तेव्हा त्यांचे अभिनंदन करताना स्वतः लोकमान्य टिळकांनीच त्याना सरकारी सेवेत राहून देशाची सेवा करण्याचा सल्ला दिला होता . सी .डी. देशमुख यांना त्यांच्या उत्तम प्रशासकीय सेवेसासाठी इंग्लंडच्या राजाने " सर " हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला . रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर म्हणून त्यांची नियुक्ती झाली तो दिवस होता , ११ ऑगस्ट १९४३ . असा सन्मान मिळालेले ते पहिले भारतीय . सुमारे सात वर्षानंतर पंडित नेहरूंच्या आग्रहास्तव ते लोकसभेची पहिली निवडणूक लढले , जिंकले आणि त्यांनी केंद्र-शासनात अर्थ-खात्याचा भार स्वीकारला . संसदेत या देशाचे पहिले अंदाजपत्रक सादर करून त्यावर अतिशय अभ्यासपूर्ण भाषण करणारे ते पहिले अर्थमंत्री ठरले . भारतीय नियोजन मंडळाचे ते उपाध्यक्ष होते . जीवन-विमा कंपन्यांचे त्यांनीच राष्ट्रीकरण केले आणि त्यामुळेच एल.आय .सी .स्थापित झाली . १९५६ साली भाषावार प्रांतरचना होत असताना केवळ मुबई राज्याच्या बाबतीत केंद्र-सरकारने अपवाद करून , गुजरात आणि महाराष्ट्र अशी दोन स्वतंत्र राज्ये अस्तिवात न आणता , एकाच मुंबई -राज्याला "द्वि - भाषिक (Bi-lingual State ) " केलेले त्यांच्या तर्कसंगत आणि मराठी-अभिमानी वृतीला पटले नाही आणि त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा पंडित नेहरूंना देऊन टाकला . नंतरच्या काळात ते UGC---University Grant Commission चे अध्यक्ष झाले. दिल्ली विद्यापीठाचे उपकुलगुरू झाले. कलकत्त्यामधल्या , Indian Statistical Institute चे ते अध्यक्ष झाले . हैदराबाद येथील , Indian Institute of Public Adminisration चे प्रमुख-पद त्यांनी सांभाळले . National Book Trust चे सन्माननीय चेअरमन होते....त्यांची प्रथम पत्नी , रोझिना नावाची एक ब्रिटीश महिला होती .त्या दोघांना एक मुलगी झाली होती परंतु भारत स्वतंत्र झाल्यावर , अन्य ब्रिटीश लोकांप्रमाणे रोझिना मुलीला घेऊन इंग्लंडला कायमची निघून गेली . कालांतराने , नियोजन -मंडळावर पहिल्या महिला -सभासद म्हणून नियुक्त झालेल्या विदुषी आणि सामाजिक कार्यकर्त्या , आंध्र-प्रदेशातील काकीनाडा येथे जन्मलेल्या , तेलुगु -भाषक रेवती राव , यांच्याशी ते विवाहबद्ध झाले . त्याच दुर्गाबाई देशमुख झाल्या आणि पुढे ते दोघे हैदराबाद येथेच राहू लागले . १९७५ साली सी. डी. देशमुख आणि दुर्गाबाई देशमुख या दोघा पती-पत्नींना एकाच वेळी , " पद्म-विभूषण " किताब देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला . Orient Longmann सारख्या विख्यात प्रकाशकांनी त्यांचे आत्मचरित्र " The Course of My Life " १९७४ साली प्रसिद्ध केले . ................अशा या असामान्य कर्तृत्वाच्या व्यक्तीला राष्ट्रपती-पद प्राप्त झाले असते तर तो त्यांच्या यशोमय जीवनाचा परमोच्च बिंदू ठरला असता ! १९६९ साली राष्ट्रपती-पदासाठी झालेल्या निवडणुकीत अपयश आल्यानंतर हैदराबाद येथे आपले उर्वरित आयुष्य एकांतात व्यतीत करत असताना २ ऑक्टोबर १९८२ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले . त्यांच्या अंत्यविधीसमयी कुणीही महत्वाची --अतिमहत्वाची व्यक्ती उपस्थित नव्हती . असे असले तरी जन -हृदयात त्यांचे स्थान , एक आदर्श पुरुष म्हणून कायमचे राहणार आहे !
- समीर गुप्ते
Copyright © 2025 | Marathisrushti