(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • गद्रे मरीनचे उद्योगपती दीपक गद्रे

    त्यांनी बनवलेल्या माशांच्या विविध खाद्यपदार्यांच्या निर्यातीचा आकडा २५ हजार टनापर्यंत पोहचला आहे. त्यांची वार्षिक उलाढाल आहे ४२५ कोटी. गद्रे ब्रॅडने आता देशभर मेट्रोसिटीमध्ये ‘रेडी टू कूक अ‍ॅण्ड रेडी टू इट’ खाद्यपदार्थ दाखल केले आहेत. इतकेच नव्हे तर त्यांच्या कारखान्यात माशांवर प्रक्रिया करण्यासाठी वापरलेल्या पाण्यापासून इंधनही बनवले जाते. त्यातून निघालेल्या मिथेन वायूचा उपयोग बॉयलरमध्ये इंधन म्हणून केला जातो.

  • माजी केंद्रीय आरोग्य मंत्री राजनारायण

    आणीबाणीनंतर १९७७ साली झालेल्या निवडणुकीत राजनारायण यांनी इंदिरा गांधींचा त्यांचा बालेकिल्ला असलेल्या “रायबरेली” मतदारसंघात मोठा पराभव केला. जनता पक्षाकडून निवडणुक लढवणाऱ्या राजनारायण यांनी इंदिरा गांधींचा रुपात भारतातील सर्वात शक्तिशाली महिलेचा पराभव केला होता.

  • टॉम अॅण्ड जेरीचे दिग्दर्शक जीन डेच

    ऑस्कर पुरस्कार विजेते चित्रकार आणि टॉम अॅण्ड जेरीचे दिग्दर्शक जीन डेच यांचा जन्म ८ ऑगस्ट १९२४ रोजी झाला.

    जीन डेच यांचे संपूर्ण नाव युजीन मेरील डेच असं होतं. त्यांनी सुरुवातीला त्यांनी नॉर्थ अमेरिकन एव्हीएशन कंपनीमध्ये ड्राफ्टमन म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी त्यांनी लष्करासाठी काम केलं आणि नंतर त्यांनी वैमानिक होण्याचे प्रशिक्षण घेतलं. १९४४ साली आरोग्याशी संबंधित अडचणींमुळे त्यांनी हे क्षेत्र सोडलं आणि ते पुन्हा कमर्शियल आर्टकडे वळले. तिथून त्यांच्या अॅचनिमेशन क्षेत्रातील प्रवासाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

    १९५८ साली जीन डेच यांना त्यांच्या सिडनीज फॅमेली ट्री या चित्रपटासाठी अकॅडमी पुरस्कारांचे (ऑस्कर्स) नामांकन मिळालं. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच १९६० साली त्यांना मुनरो या त्यांच्या अॅ निमेशन चित्रपटासाठी सर्वोत्तम अॅननिमेशनपट म्हणून नामांकन मिळालं. त्यानंतर १९६४ साली हियर्स नूडनीक आणि हाऊ टू अवॉइड फ्रेण्डशीप या दोन चित्रपटांसाठी जीन यांना सर्वोत्तम अॅयनिमेशनपट कॅटेगरीमध्ये नामांकन मिळालं होतं. जीन डेच यांनी ट्विटीयथ सेंच्यूरी फॉक्स या कंपनीसाठी टेरीटून्सचे दिग्दर्शक म्हणून काम केलं. त्यांनी तेथे सिडनी द एलिफंट, गॅस्टॉन ली क्रेऑन, क्लिट कॉब्लर आणि टेरीबल थॉम्पसन सारखी कार्टून कॅरेक्टर स्वत: निर्माण केली.

    १९६० च्या दशकात जीन यांनी रेम्ब्रँट फिल्म्सबरोबर काम करताना पोपॉय कॉर्टून सिरीजची निर्मिती केली. त्यानंतर त्यांनी मेट्रो-गोल्डवॅन-मायरसोबत काम करताना टॉम अॅकण्ड जेरीचे अनेक लहान लहान कार्यक्रमांची निर्मिती केली होती. जीन डेच हे किग्स फिचर्सच्या ‘क्रेझी कॅट’ या टीव्हीवरील कार्यक्रमाचे सहनिर्माते होते. तर त्यांनी लहान मुलांसाठी ‘द ब्लफर्स’ या अगदी नव्या सिरीजची निर्मिती केली होती. जीन डेच यांचे निधन १६ एप्रिल २०२० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

  • हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गायक मन्ना डे

    प्रबोधचंद्र डे असे मूळ नाव असलेल्या मन्ना डे यांचे काका के.सी.डे हे संगीतातील तज्ञ. त्यांचा जन्म १ मे १९१९ रोजी झाला. त्यांनी एस.डी. बर्मन यांना संगीताचे धडे दिले होते व अनेक हिंदी व बंगाली चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले होते. मन्ना डे यांनी त्यांच्याकडून संगीताचे धडे ही त्यांना मिळाले.त्यामुळे लहानपणीही त्यांनी बालकलाकार म्हणून लौकीक प्राप्त केला होता. शास्त्रीय संगीताचे शिक्षण उस्ताद अमान अली खान व उस्ताद अबदुल रहमान खान यांच्याकडून त्यांनी घेतले.

    पार्श्वगायनाची सुरवात त्यानी १९४२ मधील ’तमन्ना’या चित्रपटापासून केला.’तमन्ना’चे संगीत दिग्दर्शक के.सी.डे हेच होते मन्ना डे यांनी सुरैय्याबरोबर "जागो आयी उषा "हे युगलगीत गायिले होते. मन्ना डे ची खरी ओळख त्यांच्या "बसंत बहार " मधील "सुर ना सजे" मुळे तसेच "श्री चारसौबीस"मधील "प्यार हुआ "सीमा मधील"तू प्यारका सागर है""दो आंखे बारह हाथ"मधील "ऐ मालिक तेरे बंदे हम" किंवा "लागा चुनरीमे दाग" अश्या निवडक गीतातूनच झाली.राजकपूरसाठी त्यांचा आवाज काही चित्रपटातून वापरला गेला व तो योग्यही वाटला.

    शास्त्रीय संगीतावर आधारित गीते म्हणण्याविषयी कुशल अशी प्रसिद्धी असूनही मन्ना डे यांची अवखळ गीतेही तितकीच प्रसिद्ध झाली.विशेषत: रफी यांच्याबरोबर गायलेले परवरिश चित्रपटातील "मामा ओ मामा"किंवा चलतीका नाम गाडी"मधील "बाबू समझो इशारे" किंवा "पडोसन" मधील किशोरकुमारबरोबर गायलेले "एक चतुर नार" ही गीते त्याची साक्ष देतात. मन्ना डे यांनी हिंदी व्यतिरिक्त बंगाली भाषेत गाणी गायली आहेत.

    मराठी भाषेत गायलेल्या त्यांच्य गीतांची संख्या इतर कोणाही मराठी गायकाच्या (एक बाबूजी सोडले तर) तोडीस तोड आहे. त्यांनी ५५ मराठी गाणी गायली आहेत " अ आ आई म म मका, धुंद आज डोळे". त्याचबरोबर "घन घन माला नभी " ही त्यांची गाजलेली चित्रपटगीते."घरकुल" चित्रपटातील "हाउस ऑफ बांबू"हे वेगळ्या शैलीचे गीतही लोकांनी खूपच डोक्यावर घेतले होते. सर्व संगीत दिग्दर्शकांबरोबर गीते गायलेल्या मन्ना डे यांनी नौशाद यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली मात्र गायलेले दिसत नाही कदाचित मोहंमद रफी हे नौशाद यांचे आवडते गायक असण्याचा परिणाम असावा व त्यांच्यानंतर महेंद्र कपूर यांच्यावर नौशाद यांची भिस्त होती असे दिसते.

    मन्ना डे यांच्या गायनाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा शास्त्रीय पाया. शास्त्रीय ढंगाची गाणी ते अशी काही खुलवत की काही विचारू नका. याबाबतीत ते एकमेवाद्वितीयच म्हणावे लागतील. लोकसंगीताचा बाज असणारी गाणीही ते तितक्याेच सहजतेनं, लीलया गात असत. फुलवत असत. मन्ना डे यांच्या आपल्या "ट्रेडमार्क‘ टोपी बद्दल मन्ना डे नी लिहिले आहे. एकदा ऐन डिसेंबर महिन्यात गाण्यांच्या कार्यक्रमासाठी काश्मीहरला गेलो होते. त्या वेळी केवळ थंडीच नव्हती, तर बर्फ देखील पडत होता.

    व्यासपीठावर आल्यानंतर कडाक्या च्या थंडीत गाणी म्हणायची कशी, असा प्रश्नल माझ्यापुढे उपस्थित राहिला. माझ्या चेहऱ्यावरची अस्वस्थता पाहून चाहत्याने तत्काळ व्यासपीठावर येत त्याने मला आपली टोपी भेट दिली. चाहत्याच्या प्रेमाने मी भारावून गेलो. थंडी पळून गेली आणि कार्यक्रम सुरळीत पार पडला. मा.मन्ना डे यांचे २४ ऑक्टोबर २०१३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    मन्ना डे यांची गाजलेली काही गाणी
    प्यार हुआ..., दिल का हाल सुने... (श्री ४२०)
    तू प्यार का सागर है (सीमा)
    ना तो कारवॉं की तलाश है (बरसात की रात)
    लागा चुनरी में दाग (दिल ही तो है)
    ऐ मेरे प्यारे वतन (काबुलीवाला)
    जिंदगी कैसी है पहेली (आनंद)
    घन घन माला नभी दाटल्या (वरदक्षिणा, मराठी)
    अ आ आई (एक धागा सुखाचा, मराठी)
    यारी है ईमान मेरा (जंजीर)
    ए मेरी जोहराजबी (वक्त)
    यशोमती मैया से (सत्यम शिवम्‌ सुंदरम्‌)
    पुछो ना कैसे मैंने रैन बिताई (मेरी सूरत तेरी आँखे)
    ए भाय जरा देख के चलो (मेरा नाम जोकर)
    कसमे वादें प्यार वफा सब (उपकार)
    ये दोस्ती (शोले)
    चलत मुसाफिर मोह लियो रे (तिसरी कसम)
    चुनरी संभाल गोरी (बहारों के सपने)

  • आग्रा घराण्याचे गायक पं.दिनकर कैकिणी

    वयाच्या सातव्या वर्षी दिनकर कैकिणी यांनी एका संगीत सोहळ्यात उस्ताद अल्लादिया खान, उस्ताद फैय्याज खान व उस्ताद अब्दुल करीम खाँ या तीन संगीत दिग्गजांचे गाणे ऐकले. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९२७ रोजी झाला. उस्ताद फैय्याज खानांचे गाणे ऐकल्यावर ते इतके प्रभावित झाले की त्यांनी तिथेच संगीत कलेची साधना करण्याचा व फैय्याज खानांच्या गायनशैलीला आत्मसात करण्याचा निश्चय केला.

    त्यांचे प्रथम संगीत गुरू पतियाळा घराण्याचे पं. के. नागेश राव हे होते. त्यानंतर त्यांनी दोन वर्षे ग्वाल्हेर घराण्याच्या पं. ओंकारनाथ ठाकूर यांच्याकडे संगीत शिक्षण घेतले. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी लखनौच्या मॉरिस कॉलेजात (भातखंडे संगीत संस्थान विश्व विद्यालयात) प्रवेश घेतला. तिथे त्यांना पं. विष्णू नारायण भातखंडे व उस्ताद फैय्याज खान यांचे शिष्य पं. श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांच्याकडून संगीताची तालीम मिळाली. ह्या अतिशय कठीण प्रशिक्षणात एस. सी. आर. भट्ट, चिदानंद नगरकर, के. जी. गिंडे यांसारख्या आपल्या अन्य सहाध्यायांबरोबर कैकिणींनी संगीताचा कसून अभ्यास केला. त्याचा परिणाम म्हणूनच की काय, इ.स. १९४३ मध्ये त्यांना संगीतातील पदवीसोबत ख्याल गायनासाठी मानाचे समजले जाणारे भातखंडे सुवर्णपदक प्राप्त झाले.

    त्यांनी १९४६ साली आपले संगीत कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. एक गायक व संगीत प्रशिक्षक म्हणून त्यांनी देशोदेशींचे दौरे केले. संगीत क्षेत्रात त्यांनी अनेक मानाची पदे भूषविली. इ.स. १९५४ सालापासून त्यांनी आकाशवाणीवर सुरुवातीस रचनाकार व नंतर निर्माता म्हणून काम पाहिले. ते भारताच्या सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या प्रबंध विभागाचे सहायक संचालक होते. त्यानंतर ते दीर्घ काळासाठी मुंबई येथील भारतीय विद्या भवन च्या संगीत व नृत्य शिक्षापीठाचे प्राचार्य पदी नियुक्त होते. अनेक वेगवेगळ्या समित्यांमध्ये त्यांचा समावेश होता, तसेच विविध परीक्षा मंडळांतही त्यांचा सहभाग होता. १९७४ साली भारत सरकारतर्फे त्यांना युगोस्लाव्हिया आणि पूर्व जर्मनी येथे पारंपरिक भारतीय संगीत या विषयाचे अभ्यासक म्हणून पाठवण्यात आले होते. तेथील विद्यापीठांमध्ये तसेच सांस्कृतिक केंद्रांमध्ये त्यांनी आपली कला सादर करण्याबरोबरच व्याख्यानेही दिली होती.

    कैकिणींनी ख्याल, ध्रुपद, धमार, ठुमरी व भजन शैलींत शेकडो नवीन रचना केल्या व अनेक नवे राग बांधले. त्यांनी समूह गायनासाठीही विविध रचना बांधल्या, 'मीरा' (१९७९) या चित्रपटात पार्श्वगायन केले, तसेच पंडित रविशंकर यांच्या सहयोगाने 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' ह्या बॅले नृत्यनाटिकेला संगीत दिले.

    त्यांनी बंदिशींवर 'रागरंग' नावाचे पुस्तकही लिहिले आहे. स्वरचित राग आणि बंदिशींवरील त्यांच्या ध्वनिमुदिकाही प्रकाशित झाल्या आहेत. संजीवनी भेलांडे, आरती अंकलीकर-टिकेकर, उदित नारायण, निषाद बाक्रे, सुधींद भौमिक यांसारखे शिष्य त्यांनी घडवले आहेत. गायक, संगीतकार आणि गुरू अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी पार पाडल्या. मा.कैकिणींचे सर्व कुटुंब संगीत साधनेत आहे. त्यांच्या पत्नी शशिकला ह्या नभोवाणी गायिका होत्या व भवन्स संगीत व नृत्य महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका पदावरून निवृत्त झाल्या. त्यांचे धाकटे पुत्र योगेश साम्सी हे नामवंत तबला वादक असून त्यांच्या कन्या आदिती कैकिणी उपाध्या या शास्त्रीय संगीत गायिका आहेत. सुप्रसिध्द गायक पं. दिनकर कैकिणी यांचे सुपुत्र असलेले योगेश सम्सी यांनी उस्ताद अल्लारखॉं यांचेकडे २३ वर्षे तबल्याची तालीम घेतली आहे. आजवर अनेक ज्येष्ठ गायकांना यशस्वी साथ संगत केली आहे. तसेच अनेकवेळा स्वतंत्र तबदा वादनाचे कार्यक्रमही केले आहेत.पं.दिनकर कैकिणी यांचे २३ जानेवारी २०१० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • संगीतकार रवि शंकर शर्मा

    हेमंतकुमार यांनी रवि यांना त्यांचे असिस्टंट बनवले. त्यांच्याबरोबर शर्त , सम्राट, जागृती , नागीण अशा अनेक चित्रपटांमध्ये ते त्यांचे असिस्टन्ट म्हणून होते. नागिन या चित्रपटामधील बीनची धून त्यांनी बनवली. ते गाणे होते , ” मन डोले . मेरा तन डोले, मेरे दिल का गया करार “

  • शरद तळवलकर

    शालेय जीवनात म्हणजे पुण्याच्या भावे स्कूलमध्ये ऐनवेळेस रणदुंदुंभी नाटकातील शिशुपाल आणि साष्टांग नमस्कार या नाटकातील भद्रायु भाटकर ही पात्र त्यांनी अतिशय सुंदर रीतीने रंगविली होती. त्यांचा जन्म १ नोव्हेंबर १९१९ रोजी झाला. इथूनच त्यांच्या रंगभूमीच्या प्रवासाला सुरुवात झाली. छापील संसार नावाच्या पहिल्या व्यावसायिक नाटकात त्यांनी काम केले. हा अभिनयाचा छंद जोपासत असतांना त्यांनी मिलीटरी अकौंटस् मध्ये नोकरी केली. त्यावेळेस त्यांचे शिक्षणही सुरू होते. विनोदी अभिनेता म्हणून त्यांनी केलेला पहिला चित्रपट होता माझा मुलगा. तिथून सुरू झालेला विनोदी अभिनेत्याचा प्रवास शेवटपर्यंत सुरूच होता. नाट्य आणि चित्रपट दोन्ही क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयाचा प्रभाव पाडला होता.

    बालगंधर्वांसारख्या नटश्रेष्ठाबरोबर एकच प्यालातील रंगवलेली तळीरामाची भूमिका बालगंधर्वांच्या शाबासकीला पात्र ठरली. लग्नाची बेडी या नाटकातला गोकर्ण शरद तळवलकरांनी आपल्या ठसकेबाज शैलीत रंगवून अविस्मरणीय केला. पुणे आकाशवाणी केंद्रावर नाट्यनिर्माते म्हणून केलेले त्यांचे कार्य मोलाचे होते. त्यांच्या काळातील नभोनाट्ये हा श्रोत्यांच्या आवडीचा विषय होता. कलाकार ही नाट्यसंस्था त्यांनी उभारली. भावबंधन मधील कामण्णा, अपराध मीच केला मधील गुप्तेकाका, दिवा जळू दे मधील गोळे मास्तर अशा अनेक नाटकांमधील अनेक भूमिका संस्मरणीय ठरल्या. अप्पाजींची सेक्रेटरी आणि सखी शेजारीण या नाटकांतील त्यांच्या भूमिका हलक्या फुलक्या पण सबंध नाटक पेलून धरणार्या दमदार अशाच होत्या.

    अतिशय बोलक्या चेहऱ्याचा हा विनोदी कलावंत ज्याला नाट्यसृष्टीत मानाचा समजला जाणारा विष्णुदास भावे पुरस्काराने गौरविले गेले. मा.शरद तळवलकर हे नाव मराठी चित्रपटसृष्टीशी निगडित असले तरी त्यांचे स्वतःचे नाट्यवेड हे प्रख्यात होते. नाटकाप्रमाणे चित्रपटातदेखील शरद तळवलकरांनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, तुळस तुझ्या अंगणी, रंगल्या रात्री अशा अखेर जमलं, वाट चुकलेले नवरे, बायको माहेरी जाते, मुंबईचा जावई आणि एकटी अशा कितीतरी गाजलेल्या चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या. जावई विकत घेणे मधील म्हातार्याच्या भूमिकेचे आणि एकटीतील भूमिकेबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाले होते. शरद तळवलकर हे १९९२ मध्ये वाशी येथे भरलेल्या ७२ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते. शरद तळवलकर यांचे निधन २१ ऑगस्ट २००१ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • बुलो चंदीराम रामचंदानी ऊर्फ बुलो सी.रानी

    बुलो सी रानी यांचे पूर्ण नाव बुलो चंदीराम रामचंदानी. बुलो. सी. रानी यांच्या नावाची हकीगतही रंजक आहे. त्यांचा जन्म ६ मे १९२० रोजी हैद्राबाद पाकिस्तान येथे झाला.सिंधी समाजात जन्माला आलेल्या बुलो चंदी रमानी यांनी आडनावाचं इंग्रजी आद्याक्षर ‘सी’ वेगळं काढलं व ‘रमानी’चं ‘रानी’ करून टाकलं. त्यामुळं अनेकांना हा पुरुष संगीतकार की स्त्री संगीतकार असा प्रश्न पडे. मा.बुलो सी रानी यांचे वडीलही संगीतकार होते. ४० ते ६० च्या दशकात त्यांनी संगीत दिले. बुलो सी रानी यांनी १९३९ रणजीत मोविटोन पासून आपली सुरवात केली. खेमचंद प्रकाश यांना असीस्टट म्हणून मदत करायला सुरवात केली. खेमचंद प्रकाश यांच्या तानसेन, चांदनी, सुखदुख या चित्रपटाना असीस्टट म्हणून काम केले. त्या काळी बुलो. सी. रानी अमीरबाई कर्नाटकी यांच्या आवाजाने इतके प्रभावित होते की आपल्या पुढील चित्रपटांसाठी इतर कोठल्या गायिकेचा विचार करण्यासाठी तयार नव्हते. त्यांच्या १९४४ साली आलेल्या ‘कारवाँ’ चित्रपटातील धिम्या लयीतील ‘सूनी पडी है प्यार की दुनिया तेरे बगैर जली हुई है दिल में तमन्ना, तेरे बगैर’ या गाण्यातील अमीरबाईचा एकेक स्वर मनात साठवून ठेवण्यासारखा आहे. तसेच १९४५ सालच्या ‘चांद चकोरी’ मध्ये तर त्यांनी सर्वच्या सर्व गाणी अमीरबाईच्या आवाजात स्वरबद्ध केली होती. बुलो सी रानी यांचे २४ मे १९९३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • दिग्गज दिग्दर्शक व निर्माते यश चोप्रा

    आज दिग्गज दिग्दर्शक व निर्माते यश चोप्रा यांची पुण्यतिथी
    जन्म:-२७ सप्टेंबर १९३२
    यशजींनी अभियंता बनावे अशी त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा होती, लंडनला जाण्यासाठी त्यांचा पासपोर्टही बनला होता. मात्र नियतीला काही औरच मंजूर होते आणि ते चित्रपटसृष्टीत आले.

    यश चोप्रा यांच्या चित्रपटाचे वैशिष्टय म्हणजे गीत आणि संगीत. यश चोप्रा हे कवी असल्याने त्यांनी स्वत: कधीही उथळ दर्जाची गीते निवडली नाहीत. त्यामुळे सगळी इंडस्ट्री आनंद बक्षीची धूळ झाडत असतानाही चोप्रा यांनी साहिर लुधियानवीची साथसंगत कधी सोडली नाही.
    बी. आर. चोप्रा आणि यश चोप्रा हे सख्खे भाऊ. सहायक दिग्दर्शक म्हणून यश चोप्रा यांनी आपल्या करिअरला सुरवात केली. १९५९ मध्ये "धूल का फूल‘ या चित्रपटाद्वारे त्यांनी स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. राजेंद्र कुमार व माला सिन्हा या कलाकारांना घेऊन त्यांनी हा चित्रपट बनविला. त्यानंतर "आदमी और इन्सान‘, "धरतीपुत्र‘, "वक्त‘ असे काही चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. १९६५ मध्ये त्यांचा 'वक्त' चित्रपट आला. बॉलीवूडमधील हा पहिला मल्टी स्टार चित्रपट होय. राजेश खन्ना व शर्मिला टागोर यांना घेऊन बनविलेल्या "दाग‘ या चित्रपटाद्वारे त्यांनी निर्मितीत पाऊल टाकले. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. १९७३ मध्ये त्यांनी यशराज चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना केली. "काला पत्थर‘, "चांदनी‘, "लम्हे‘, "दिल तो पागल है‘, "वीर झारा‘, "सिलसिला‘, "डर‘, "रब ने बना दी जोडी‘ अशा अनेक चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली. तसेच "दीवार‘, "त्रिशूल‘ अशा काही अन्य निर्मात्यांच्या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. त्यांच्याबरोबर अनेक कलाकारांनी काम केले असले अमिताभ बच्चन हे त्यांचे आवडते कलाकार होते. "सिलसिला‘साठी त्यांनी अमिताभ बच्चन, जया भादुरी व रेखा यांना एकत्र आणले. त्या वेळी हिंदी चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली होती. विविध आणि आकर्षक लोकेशन्स व सुमधुर गाणी ही त्यांच्या चित्रपटांची खासियत होती. दादासाहेब फाळके पुरस्कारासह पद्मभूषण, तसेच अन्य काही पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. यशजींनी पाच दशक चित्रपटसृष्टीवर राज्य केले. यादम्यान त्यांना ६ राष्ट्रीय व ११ फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. चित्रपटसृष्टीतील अतुल्य योगदानासाठी त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
    मा.यश चोप्रा यांचे २१ ऑक्टोबर २०१२ रोजी निधन झाले. यश चोप्रा यांना आदरांजली.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.विकी पिडीया

  • ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे

    १९५५ मध्ये समाजवादी पक्षाने पुकारलेल्या गोवा मुक्तीसंग्रामात दिनू रणदिवे सक्रिय होते. तसंच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सहभाग होता. या लढ्यात त्यांनी आचार्य अत्रे यांच्यासोबत तुरुंगवासही भोगला. संयुक्त महाराष्ट्र समितीने १९५६ मध्ये संयुक्त महाराष्ट्र पत्रिका या नावाचे अनियतकालिक सुरु केले.