हॉकी फेडरेशन आर्थिक संकटांना सामोरे जात असतानाही कोणताही दबाव निर्माण न होऊ देता ध्यानचंद यांनी भारतीय संघाचे नेतृत्त्व करून देशाला पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून दिले होते. त्यानंतर सलग दोन ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचा दबदबा कायम होता.
इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा प्रथम वापर त्यांनी जादूमध्ये आणला. ते त्या काळी एलईडी दिव्यांचा कोट वापरीत. भूत व ड्रॅगन यांची फाईट हा त्यांच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे. ‘डोळे बांधून मोटारसायकल चालविणे’ हा गाजलेला प्रयोग, ही त्यांची खासीयत होती.
अंगद म्हसकर… एक गुणी आणि वास्तववादी कलावंत… रंगमंचावरून प्रवेश करून त्याने स्वत:चा पाया किती पक्का आहे हे कधीच दाखवून दिलंय….
साधारणपणे पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. दिग्दर्शक विजू मानेचा मला फोन आला. मराठी इंडस्ट्रीत येऊ पाहत असलेल्या एका फिमेल मॉडेलचं फोटोशूट करण्यासाठीचा तो फोन होता. ठरल्याप्रमाणे आम्ही स्टुडिओत भेटलो आणि शूटला सुरुवातही केली. त्या मॉडेलचं शूट संपल्यावर विजूसोबत एक सडपातळ बांध्याचा, निळ्या-घाऱया डोळ्यांचा, हसऱया चेहऱयाचा आणि चेहऱयावर विलक्षण तेज असलेला मुलगा होता. विजूने ओळख करून दिली. फोटोशूट संपल्यावर विजूचे आणि या नुकत्याच भेटलेल्या मुलाचे काही फोटो मी स्टुडिओत टिपले. ही मैत्री इथेच संपली नाही. पुढे नियमित भेटीगाठी झाल्या. या नव्या मुलाचा आणि इंडस्ट्रीत काही करू पाहत असलेल्या कलाकाराचा प्रवास पुढे रंगमंच ते छोटा पडदा आणि नंतर थेट रुपेरी पडदा असा वेगाने होताना मला पाहायला मिळाला. अंगद म्हसकर या तरुणानं अल्पावधीतच आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं. मोजक्या पण अर्थपूर्ण भूमिका चोख निभावणारा कलाकार म्हणून त्याने आपली ख्यातीच निर्माण केली.
अभिनयाचा श्रीगणेशा करण्याआधी अंगदने स्वतःवर विशेष मेहनत घेतली होती. नियमित व्यायामाच्या सरावाने त्याने चांगली शरीरयष्टी कमावली. अभिनयाचे वेगळे धडे गिरवले. या सिनेसृष्टीतल्या प्रवासात अंगदला अनेक गुरू भेटले. अनिवाश नारकर यांना अंगद अगदी जवळचा मित्र मानतो. तर कै. मोहन वाघ यांना तो आपले व्यावसायिक गुरू मानतो. तर त्याचे दुसरे व्यावसायिक गुरू म्हणजे दिग्दर्शक वामन केंद्रे. गॉडफादर नितीन सरदेसाई यांच्यामुळे त्याला अभिनयाची वेगळी शिस्तच लागल्याचं तो मानतो. ‘गारंबीचा बापू’ हे अंगदचं गाजलेलं नाटक. याखेरीज ‘ती फुलराणी’, ‘रणांगण’, ‘ऑल द बेस्ट’, ‘बुड्ढा होगा तेरा बाप’, ‘गिधाडे’, ‘तिन्ही सांज’ या नाटकांतून अंगदने रसिकमन जिंकलं. ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’, ‘मड्डम सासू दड्डम सून’, ‘गुंतता हृदय हे’, ‘तू तिथे मी’, ‘हृदयी प्रीत जागते’, या महाराष्ट्रभर गाजलेल्या मालिकांत अंगदची महत्त्वाची भूमिका होती. ‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य एक युगपुरुष’, ‘मुंबई पुणे मुंबई-2’ या चित्रपटांत अंगदने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. ‘बायोस्कोप’ या सिनेमातील ‘एक होता काऊ’ या लघुपटात स्पृहा जोशीसोबतची अंगदची भूमिका विशेष गाजली.
अंगदचं फोटोशूट करण्यासाठी त्याकाळी गाजलेल्या एका मालिकेत त्याची असलेली कॉर्पोरेट प्रतिमा आम्ही लक्षात घेतली आणि याच प्रतिमेला धरून काहीतरी वेगळ शूट करायचं असं आमचं ठरलं. कॉर्पोरेट प्रतिमेला धरून अंगदचा पेहराव ठरवण्यात आला. ब्लेझर लूकमध्ये अंगद फारच सुंदर दिसत होता. स्टुडिओत त्याचं या लूकमधलं एक फोटोशूट केलं. यानंतर या शूटला विरोधाभास वाटेल असं एक शूट करायचं आमचं ठरलं. या शूटसाठी आम्ही थेट एका गॅरेजमध्ये गेलो.
माझा मित्र दिगंबर यादव याचं अवाढव्य मोठं गॅरेज या शूटसाठी आम्हाला उपलब्ध झालं. इथे मला हवं असलेलं सारं काही होतं. जुन्या मोटारी, त्यांचे पार्टस् तसंच त्याची अवजारं हे सारं काही होतं. सुरुवातीला ब्लेझर घातलेल्या अंगदचे इथल्या जुन्या मोटारींच्या बॅकग्राऊंडला काही फोटो मी टिपले तर यानंतर एक जुनी सायकल आमच्या नजरेस पडली. ही सायकल हातात घेऊन जात असलेल्या अंगदचे काही फोटो टिपले. अंगदचा ब्लेझरमधल्या पेहरावामुळे हवा असलेला विरोधाभास निर्माण करता आला तसंच त्याच्या हातात एक हेल्मेट देऊन आम्ही त्यात आणखी मजा आणण्याचा प्रयत्न केला.
साधारणपणे पाच ते सहा तास अंगदचं शूट सुरू होतं. या शूटवर अंगद म्हणाला, ‘यातलं लायटिंग आणि ओव्हरऑल एक्स्प्रेशन फारच सुंदर आहेत. माझ्या आयुष्यातलं हे फारच लक्षात राहणारं शूट तर आहेच; परंतु ही कल्पना मुळातच फार सुरेख आहे आणि हे शूट झाल्यानंतर मला असं जाणवलं की हे समाज प्रबोधनासाठीही अत्यंत उपयोगी पडेल. यासाठी की, सध्याच्या प्रदूषणावर मात करण्यासाठी सायकल हे अत्यंत उत्तम साधन आहे. वाहने चालवताना सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे. मग ते कोणतेही वाहन असो आणि माझ्या हातात असलेलं हे हेल्मेट त्यांचं प्रातिनिधित्व करत आहे.’ त्याच्या या विधानाने मी भारावूनच गेलो. अंगद जे करतो त्या प्रत्येक कृतीमागे त्याचा असा एक स्वतंत्र विचार असतो. तो विचार त्याला पटला तर आणि तरच तो पुढचं पाऊल उचलतो. हाच गुण कदाचित त्याचा कलाकृती निवडण्यामागेही असावा आणि म्हणूनच मोजक्या परंतु चोख भूमिका निभावण्यात अंगदचा नेहमीच हातखंडा राहिला आहे.
धनेश पाटील
dhanauimages@gmail.com
नृत्यासाठी त्यांच्या आई-वडिलांचे उत्तेजन मिळाले, मेडिकलच्या अभ्यासक्रमास जाता येईल इतके मार्क पडूनही केवळ नृत्यातच करिअर करायचे, या दृढनिश्चेयाने त्या या क्षेत्राकडे वळल्या. त्यांचा जन्म ६ डिसेंबर १९४८ रोजी मुंबई येथे झाला.
सुचेता भिडे यांचे शिक्षण मुंबईतील बालमोहन विद्यामंदिरात झाले. आचार्य पार्वतीकुमार आणि तंजावरचे गुरू के. पी. किटप्पा यांच्याकडे त्यांनी नृत्याचे शिक्षण घेतले. कला अधिक चांगली शिकता यावी म्हणून त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमध्ये प्रवेश घेतला. त्या वेळी चित्रकलेच्या परीक्षा दिल्याशिवाय इकडे प्रवेश मिळत नसे. मग काय, एक वर्षाचा गॅप घेणे आले. तो त्यांनी घेतला आणि रीतसर चित्रकलेच्या परीक्षा दिल्या. त्या वर्षाच्या काळात त्यांनी पार्वतीकुमार यांच्याकडे नृत्याचेच केवळ धडे गिरवले.
संपूर्ण वर्ष केवळ नृत्याचाच विचार, ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब होती. आज कधीही त्या वर्षाची आठवण आली, की पुन्हा लहान व्हावे आणि ते वर्ष जगावे, असे सुचेता भिडे सहजतेने लिहून जातात. सकाळी सात ते सायंकाळी सात, त्या नृत्याच्याच विश्वाीत असत. सुचेता भिडे चापेकर यांनी भारतात व भारताच्या बाहेर अनेक नृत्याचे कार्यक्रम केले आहेत, त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे. पुणे महापालिकेने रोहिणी भाटे यांच्या नावाने दिला गेलेला २०१५ सालचा ’स्वर्गीय गुरू पंडिता रोहिणी भाटे पुरस्कारही मिळाला आहे. सुचेता भिडे-चापेकर यांनी केलेली नृत्यगंगा ही नृत्य शैली ही कला क्षेत्राला दिलेली मोठी देणगी आहे.
सुचेता भिडे-चापेकर यांची कलावर्धिनी ही संस्था आहे. ‘कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट’ ही भरतनाट्यम् या विषयासाठी वाहून घेतलेली संस्था आहे. नृत्यात्मिका हे त्यांचे आत्मचरित्र वाचण्यासारखे आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
शंकर काशिनाथ गर्गे हे ‘नाट्यछटाकार दिवाकर’ म्हणून अवघ्या मराठी जनमानसांत लोकप्रिय असणारे लेखक होते. त्यांचा जन्म १८ जानेवारी १८८९ रोजी पुणे येथे झाला. वर्डस्वर्थ, ब्राउनिंग, शेक्सपीअर हे त्यांचे आवडते साहित्यिक होते. लॉर्ड टेनिसन यांनी १८४२ मध्ये पहिला ड्रामॅटिक मोनोलॉग लिहिला होता, जो पुढे मॅथ्यू अरनॉल्डने आणि रॉबर्ट ब्राउनिंगने लोकप्रिय केला. त्यापासून स्फूर्ती घेऊन शंकर गर्गे यांनी दिवाकर टोपण नाव घेऊन हा नाट्यप्रकार लिहून मराठीत रूळवला आणि तो ‘दिवाकरांच्या नाट्यछटा’ या नावानेच ओळखला गेला. नाट्यछटा म्हणजे एक छोटेखानी, एकपात्री स्वगतासारखा प्रकार.
आपल्या शेजारी एक किंवा काही पात्रे आहे अशी कल्पना करून नाट्यछटा सादर करणारा त्यांच्याशी संवाद साधत असतो, त्याचे संवाद तो मोठ्याने म्हणत असतो, त्यावर शेजारच्याची प्रतिक्रिया “काय म्हणालात ..”अशी सुरुवात करून स्वतःच म्हणत असतो. त्यामुळे वरपांगी हे स्वगत वाटत असले तरी सुप्त स्वरुपातले संवाद असल्यामुळे नाट्यछटा हा प्रकार अत्यंत नाट्यपूर्ण असतो. नाट्यछटा हा अगदी छोटेखानी नाट्यप्रकार, त्याचा विस्तार आणि त्याचा कालावधी हा मर्यादित स्वरुपाचा असतो, फारफारतर पन्नास-पंचावन्न ओळींचा, पण ह्या मर्यादित अवकाशातही अतिशय वेधक पद्धतीने प्रसंगाचे वर्णन केलेले असते.
दिवाकरांच्या नाट्यछटा ही मराठी साहित्याला मोठी देणगी आहे. अरेरे! ओझ्याखाली बैल मेला!, अशा शुभदिनी रडून कसें चालेल?, अहो, आज गिऱ्हाइकच आलें नाही, एका नटाची आत्महत्या, काय! पेपर्स चोरीस गेले?, कार्ट्या! अजून कसें तुला जगातलें ज्ञान नाही?, कोकिलाबाई गोडबोले, चिंगी महिन्याची झाली नाहीं तोच, पंत मेले - राव चढले, बाळ! या नारळाला धक्का लावूं नकोस बरें!, माझी डायरेक्ट मेथड ही!, मुंबईत मजा गमतीची।, म्हातारा इतुका न | अवघें पाऊणशे वयमान, स्वर्गांतील आत्मे!, हें काय उगीचच?, हें काय सांगायला हवें! – अशा त्यांच्या एकूण ५१ नाट्यछटा लोकप्रिय आहेत. शंकर काशिनाथ गर्गे यांचे १ ऑक्टोबर १९३१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
जब जब फुल खिले’ या चित्रपटापासून त्यांची गीतकार म्हणून खरी कारकीर्द सुरु झाली. त्यातील एक गाणे ‘एक था गुल एक थी बुलबुल.’ हे गाणे खूप लोकप्रिय झाले .
लीला नगरकर हे त्यांचे माहेरचे नाव. त्यांचा जन्म ९ सप्टेंबर १९०९ रोजी धारवाड येथे झाला. लीला चिटणीस यांचे वडील हे पुरोगामी विचारांचे, उच्चशिक्षित, प्रार्थना समाजाचे पुरस्कर्ते होते. लीला चिटणीस यांचे वडील त्याकाळी गाजलेल्या नाट्यमन्वतर या मराठी नाट्यसंस्थे मध्ये होते. मा.लीला चिटणीस लीला यांनी हास्यप्रधान चित्रपट, ' उसना नवरा ' यात काम केले. नंतर काही काळ स्टंट अभिनेत्रीच्या रूपात व एक्स्ट्रॉ म्हणूनही कामे केली. लवकरच मास्टर विनायक यांच्याबरोबर, ' छाया- साल, १९३६ ' व प्रभात चे केशव नारायण काळे यांच्याबरोबर, ' वहाँ -१९३७ ' आणि सोहराब मोदी यांच्याबरोबर, ' जेलर -१९३८ ' या त्यावेळी टॉप वर असलेल्या कलाकारांबरोबर संधी मिळाली. १९३९ साली मा.लीला चिटणीस यांना अमाप प्रसिद्धी मिळाली ती विष्णूपंत पागनीस यांच्या जोडीने पागनीसांची बायको म्हणून ' संत तुलसीदास' यातील कामामुळे. पुढे अशोक कुमारबरोबर त्यांची जोडी अतिशय गाजली. लागोपाठ आलेल्या, ' कंगन, बंधन व झुला ' या तीन सिनेमांनी हॅटट्रिक करून त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले. मा.लीला चिटणीस यांनी जवळपास शंभर एक चित्रपट केले. त्यांचा प्रेम विवाह डॉ. चिटणीस ह्यांच्यांशी १९२८ साली झाला होता. पण त्यांचं वैवाहिक आयुष्य अल्पजीवी ठरलं. अवघं सहा वर्षांचं! या काळात तीन मुलांचं मातृत्व पदरी आलं. मुलांसाठी, त्यांना चरितार्थासाठी उभं राहणं भाग होतं. स्त्रियांनी चित्रपटात काम करणे हीन समजल्या जाणाऱ्या १९३०-१९४० च्या दशकांत उच्च विद्याविभूषित असलेल्या लीला चिटणीसांनी समाजाचा रोष पत्करून अभिनयाचा मार्ग निवडला होता. मा.लीला चिटणीस यांची रुपेरी पडद्यावरची कारकीर्द जशी प्रदीर्घ, तशीच ती धाडसी होती. नाटकांत किंवा चित्रपटांत कामे करणे म्हणजे अतिशय लाजिरवाणे व निषिद्ध मानले जायचे, त्या काळात लीला चिटणीस यांनी रोमॅन्टिक भूमिका केल्या. काहीशा बुजऱ्या व बावळट अशोककुमारचा आत्मविश्वास वाढविण्यात लीला चिटणीस यांचा फार मोठा हातभार आहे. आपण नायिकेच्या भूमिकेत यशस्वी होत असतानाच त्यांनी 'शहीद' मध्ये दिलीपकुमारच्या आईची भूमिका स्वीकारत आपल्या धाडसी वृत्तीची झलक दाखविली. दिलीप-राज-देव आनंद या रुपेरी पडद्यावर सर्वात यशस्वी त्रिकुटाची मा.लीला चिटणीस पडद्यावरची यशस्वी आई ठरली. त्यांच्या डोळ्यांतील कारुण्य, चेहऱ्यावरील भावुकता, कृश शरीरयष्टीतील सहज दिसणारी लवचीकता व संवादफेकीतील स्पष्टता यामुळे लीला चिटणीस कोणत्याही शॉटमध्ये भाव खाऊन जात. त्या कधीच सुलोचना, कामिनी कौशल किंवा अचला सचदेवप्रमाणे रडक्या आई झाल्या नाहीत, किंवा ललिता पवारसारख्या खाष्ट आईही झाल्या नाहीत. वात्सल्य सिंधू आईचे एक उदात्त, पण प्रसन्न व्यक्तिमत्त्व म्हणून मा.लीला चिटणीस या रुपेरी पडद्यावरील एक अजरामर कलाकार म्हणून कायमच स्मरणात राहतील. मा.लीला चिटणीस या १९७० ला न्यूयॉर्क मध्ये स्थायिक झाल्या होत्या. त्यांच्या चाहत्यांना, क्वचित अमेरिकेत येणाऱ्या सहकलाकारांना भेटत होत्या. मा.लीला चिटणीस यांनी ’चंदेरी दुनियेत’ हे जीवनचरित्र लिहिले आहे. मा.लीला चिटणीस यांचे १४ जुलै २००३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
कंगना राणावतचे वडील अमरदीप राणावत एक व्यापारी व आई आशा राणावत एका शाळेवर शिक्षिका होत्या. तिचा जन्म २३ मार्च १९८६ रोजी हिमाचल प्रदेश येथील मंदी जिल्ह्यातील भाम्बला येथे झाला.तिने चंदिगढ येथील DAV स्कूल मधून आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षण त्यांनी तेथेच विज्ञानात केले. आई वडिलांची अशी इच्छा होती कि कंगनाने डॉक्टर बनावे. परंतु १२ वीत केमिस्ट्रीच्या युनिट टेस्ट मध्ये फेल झाल्यावर तिने ऑल इंडिया प्री मेडीकल टेस्ट देण्याचे मनातून काढून टाकले. आणि आपल्या भवितव्याला योग्यरीत्या निर्धारित करण्याचे ठरविले. पुढील शिक्षणासाठी कंगना दिल्लीला वयाच्या १८ व्या वर्षी राहायला आली. तिला मेडिकल क्षेत्रात जायचे नव्हते. कोणते क्षेत्र करियर म्हणून निवडायचे अशा विचारात असतानाच अचानक एका मोडेलिंग एजन्सीला तिचे लुक्स आणि अंदाजांना प्रभावित होऊन काही मौडेलिंग असाइनमेन्टसाठी बद्ध केले.या क्षेत्राबद्दल तिला जास्त रुची नव्हती. कारण तिला वाटायचे कि या खेत्रामध्ये क्रिएटीवीटीसाठी कोणतीच जागा नाही. म्हणून तिने अभिनयाकडे आपले लक्ष केंद्रित केले. त्यासाठी तिने अस्मिता थियेटर ग्रुप मध्ये सदस्य म्हणून कार्यरत झाली. येथे डिरेक्टर अरविंद गौर यांनी तिला अभिनयाचे गुण शिकविले. त्यांच्या थिएटर ग्रुप मध्ये राहून नाट्यामध्ये प्रभावशाली अभिनय केला. एका प्रयोगात सोबतच्या पुरुष अभिनेत्याचा रोल स्वतःच्या रोल सोबत करून तिने सगळ्यांचे लक्ष आकर्षित केले. त्यानंतर कंगना मुंबईला आली अभिनयात आपले करियर व्हावे यासाठी ख्यातनाम आशा चंद्रा यांच्या ड्रामा स्कूल मध्ये चार महिन्यांचा कोर्स साठी दाखला घेतला. कंगना राणावत यांनी २००६ मध्ये आलेल्या थ्रिलर फिल्म “गैंगस्टर” नी चित्रपटात प्रवेश केला. यासाठी त्यांना बेस्ट फीमेल डेब्यू फिल्मफेअर अवार्ड सुद्धा मिळाला. यानंतर २००६ च्या शेवटी आलेली फिल्म “वो लम्हे” मध्ये तिने एक भावूक भूमिका असलेले पात्र अभीनित केले. पुढे (२००७) लाइफ इन_ _ मेट्रो आणि (२००८) फैशन सारखे सुपरहिट चित्रपट केले. यासाठी त्यांना उत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री म्हणून राष्ट्रीय फिल्मफेअर अवार्ड आणि याच श्रेणीत एक फिल्मफेअर अवार्ड सुद्धा मिळाले आहे. कंगनाने यानंतर व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपट “राज : द मिस्ट्री कंटिन्यूज” (२००९) आणि “वन्स अपोन ए टाइम इन मुंबई” (२०१०) केले. त्यानंतर त्यांनी (२०११) मध्ये बॉक्स ऑफिसवर हिट झालेली फिल्म “तनु वेड्स मनु” मध्ये अभिनेता आर.माधवन यांच्यासोबत विनोदी भूमिका केली. यानंतर त्यांनी सुपरस्टार ह्रितिक रोशन यांच्या सायन्स फिक्शन फिल्म “क्रिश 3” (२०१३) मध्ये एक उत्परीवर्ती जंतूची भूमिका केली. हि फिल्म बॉलीवूडच्या सर्वात यशस्वी चित्रपटामधील एक मानली जाते. २०१४ मध्ये चित्रपट “क्वीन” मधील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून फिल्मफेअर आणि राष्ट्रीय फिल्म अवार्ड सुद्धा मिळाला. २०१५ मध्ये कंगनाची आणखी सर्वोत्तम फिल्म “तनु वेड्स मनु रिटर्न्स” मधील दुहेरी भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर क्रिटीक्स अवार्ड आणि दुसरयांदा उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून लगातार दुसरा फिल्मफेअर आणि राष्ट्रीय फिल्म अवार्ड मिळाला हि उपलब्धी कोणत्याही महिला कलाकाराने मिळविलेली पहिली मानली जाते. त्या भारतातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्र्यामधून एक आहे. कंगना भारतीय मेडीया मध्ये इमानदारी आणि खऱ्या मनाने सामान्यासमोर आपले विचार प्रकट करण्यासाठी ओळखली जाते. भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध कलावंतांमध्ये गणल्या जाणारी कंगना तीन राष्ट्रीय फिल्म अवार्ड आणि चार विविध श्रेणीमध्ये फिल्मफेयर अवार्ड जिंकणारी अभिनेत्री आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
बॉलिवूडचे पहिले सुपर स्टार राजेश खन्ना यांचा जन्म २९ डिसेंबर १९४२ रोजी झाला. ‘...बाबू मोशाय! जिंदगी और मौत उपरवाले के हाथ में हैं। जहाँपनाह, इसे ना तो आप बदल सकते हैं, ना मैं... हम सब रंगमंच के कठपुतलियोंमें बंधी हैं, कौन कब कैसे उठेगा यह कोई नहीं जानता... हाऽऽ हाऽऽ हाऽऽ’ राजेश खन्ना यांनी ‘आनंद’चा दर्द अत्यंत प्रभावीपणे या संवादातून साकारला. या चित्रपटात छोट्या-छोट्या संवादातून ‘आनंद’ आयुष्याचा काय भरंवसा, म्हणून प्रत्येक क्षणाचा भरभरून आनंद घ्या. हे छोट्या-छोट्या संवादातून सांगत असतो.
‘जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं.’ हा संवादही असाच बोलका, तर ‘आनंद मरते नहीं, अमर होते है ।’ हा चित्रपटाचा शेवट होतानाचा संवाद या कथेचे खूपच मोठे सार आहे. आनंद चित्रपटातील हे संवाद मा. राजेश खन्ना यांनी इतके प्रभावी पणे म्हणलेत की हा संवाद आज ही अंगावर काटा आणतो.
बॉलीवूडचा ‘सुपरस्टार’ अशी ओळख असलेला राजेश खन्ना यांनी चित्रपटात येताना आपले खरे नाव बदलले. त्यांचे मूळचे नाव जतीन खन्ना. गिरगावातच राहणारे अभिनेते रवी कपूर अर्थात जीतेंद्र यांच्यासोबत मा.राजेश खन्ना यांनी केसी कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतले. महाविद्यालयात असताना ‘जतीन’ खन्ना हे वेगवेगळ्या नाटय़स्पर्धामध्ये भाग घेत असे. प्रत्येक स्पर्धेत बक्षीस जतीन घेऊनच जाणार हे ठरलेले असायचे. एकदा युनायटेड प्रोडय़ुसर्स आणि एका चित्रपटविषयक मासिकाने ‘टॅलेंट हंट’ स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतही मा. जतीन खन्ना यांनी चांगली कामगिरी केली. त्याच वेळी काही निर्मात्यांनी जतीन खन्ना याला आपल्या चित्रपटासाठी साइन केले होते. त्यावेळी बक्षीस म्हणून चेतन आनंद दिग्दर्शित आखरी खत आणि रवींद्र दवे दिग्दर्शित राज या दोन चित्रपटांमध्ये त्यांना हिरो म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
राजेश खन्ना यांनी १९६६ मध्ये ‘आखरी खत’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल ठेवले. १९६७ साली भारतातून आखरी खत या सिनेमाची ‘बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म’ श्रेणीत ऑस्करसाठी पहिल्यांदाच शिफारस करण्यात आली होती. त्यांची अदाकारी पाहून जी. पी. सिप्पी आणि नासीर हुसैन यांनी त्यांना आपल्या चित्रपटांमध्ये ब्रेक दिला. त्या वेळी एका प्रसिद्ध न्युमरॉलॉजिस्टने जतीन खन्ना यांना नाव बदलण्याचा सल्ला दिला. तू तुझे नाव बदललेस तर बॉलीवूड तुझ्यासाठी लाल गालिचा अंथरेल, तू प्रसिद्ध होशील, असा सल्ला दिला तो जतीन यांनी मानला आणि जतीनचा ‘राजेश खन्ना’ झाले. १९६९ साली प्रदर्शित झालेल्या आराधना या चित्रपटाने राजेश खन्ना यांचे आयुष्यच बदलून टाकले.
शर्मिला टागोर आणि फरीदा जलाल या अभिनेत्रींसोबत आराधनामधील राजेश खन्नांचा डबल रोल प्रेक्षकांना एवढा आवडला की, ते रातोरात सुपरस्टार बनले. दो रास्ते, हाथी मेरे साथी, सफर, आनंद, अमर प्रेम या सिनेमांनी त्यांच्या सुपरस्टारपदावर शिक्कामोर्तब केले. १९६९ ते १९७२ या काळात त्यांनी लागोपाठ १५ सुपरहिट सिनेमे दिले. त्यांचा हा विक्रम बॉलिवूडमध्ये अद्याप कुणीही मोडू शकलेले नाही. त्यानंतर राजेश खन्ना सुपरस्टारपदावर अक्षरशः आरूढ झाले. असे होत असे की राजेश खन्ना यांची एक झलक पाहण्यासाठी तरूणी रस्त्यावर गर्दी करायच्या. राजेश खन्ना यांच्या स्वागतासाठी त्याकाळी तरूण मुली वेड्यासारख्या वागत असत. राजेश खन्नाच्या गाडीवर लिपस्टिकचा सडा पडत असे. रक्ताने राजेश खन्नाला लव्ह लेटर लिहिणार्याक फॅन्सची संख्याही मोठी असायची.
भारतात एखाद्या सिनेस्टारच्या वाट्याला प्रेक्षकांचे एवढे प्रेम पहिल्यांदाच पाहायला मिळाले. चालण्याबोलण्याची विशिष्ट ढब, मानेला खास झटका देत, हातवारे करत नाचण्याची विशिष्ट शैली, जबरदस्त संवादफेक आणि ओठांवर कायम रूंजी घालतील अशी गाणी यामुळे राजेश खन्ना हे अफलातून रसायन बनून गेले. राजेश खन्नांचा अभिनय, किशोर कुमार यांचे त्यांच्यासाठी पार्श्वैगायन आणि आर. डी. बर्मन अर्थात पंचमदांचे संगीत असा त्रिवेणी संगम जुळून आल्यानंतर ८० च्या दशकापर्यंत राजेश खन्ना बॉलिवूडचे अनभिषिक्त सम्राट बनले. सर्वाधिक मानधन घेण्याचा सिलसिला त्यांनीच सुरू केला. आपल्या चाहत्यांमध्ये 'काका' नावाने प्रसिद्ध असलेल्या राजेश खन्ना यांचे १९७० च्या दशकात 'आराधना' आणि 'अमर प्रेम' याबरोबरच अनेक चित्रपटांनी रौप्य आणि सुवर्णमहोत्सव साजरे केले होते.
रोमँटिक हिरो म्हणून नावारूपाला आलेले राजेश खन्ना यांचे आधी तत्कालिन फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री अंजू महेंद्रू यांच्यासोबत सूत जुळले. परंतु त्यांचा ब्रेकअप झाल्यानंतर, मार्च १९७३ मध्ये राजेश खन्ना यांनी आपल्यापेक्षा वयाने कितीतरी लहान असलेल्या डिंपल कपाडिया यांच्याशी विवाह केला. त्यावेळी डिंपलचा बॉबी हा सिनेमा रिलीज देखील झाला नव्हता. डिंपलपासून त्यांना ट्विंकल आणि रिंकी खन्ना या दोन मुली झाल्या. १९८४ मध्ये डिंपल आणि राजेश खन्ना विभक्त झाले. परंतु त्यांनी घटस्फोट घेतला नाही. १९९२ साली कॉंग्रेसच्या वतीने त्यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवली आणि ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले. राजेश खन्ना यांचे निधन १८ जुलै २०१२ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
राजेश खन्ना यांची गाणी.
https://www.youtube.com/watch?v=UEI_1SLR4mY
https://www.youtube.com/watch?v=EkuVh_tmb0g
Copyright © 2025 | Marathisrushti