इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
महात्मा गांधीजीच्या चलेजाव चळवळी नंतरच्या काळात ब्रिटीश सरकारला समांतर अशी यंत्रणा महाराष्ट्राच्या काही भागात उभी करताना क्रांतीसिंह नाना पाटील यांनी स्वयंपूर्ण कारभाराचं सूत्र पुढे आणलं. त्यासाठी ग्रामीण भागातल्या बहुजन समाजात स्वाभिमान जागृतीचं काम त्यांनी निष्ठेनं आणि अथकपणे केलं. ‘स्वातंत्र्यचळवळीत सर्वसामान्यांचं योगदान’ हीच त्यांची भूमिका होती. परिणामी ‘प्रतिसरकार’ ही संकल्पना अस्तित्वात आली.
During the 1971 war, the Marathas saw action on both fronts. In the Western theatre, eight regular battalions and three Territorial Army battalions of the Maratha Light Infantry were involved. Six regular battalions of the Regiment took part in the Eastern theatre for the liberation of Bangladesh. Some were employed in the battle areas without actual combat; others were engaged in fierce fighting, inflicting and suffering heavy casualties.
रसिकहो तुम्ही कधी अक्षरश: प्रेमात पडला आहात का? अक्षरश: हा शब्द कंसात बर का. सदर असेल तर गदिमांच्या या गीतात तुम्हाला ते प्रेमाचे क्षण पुन्हा एकदा वेचता येतील, अनुभवता येतील. ज्या चित्रपटात गदिमांनी स्वतः नायकाची भूमिका केली होती, त्या सौभाग्य चित्रपटातलं हे गीत. गदिमांच्या नायिका होत्या बेबी शकुंतला आणि सुलोचना. आणि संगीत अर्थातच सुधीर फडके यांचं.
यावेळी आमचे ‘तात्या’ तथा व्यंकटेश माडगूळकरांचा एक मस्त् बलदंड किस्सा !
पंडित वसंतराव देशपांडे यांच्य आवाजातील `कट्यार काळजात घुसली’ या नाटकातील हे अजरामर पद.
महाराष्ट्रातील भजनसम्राट पं.बाळासाहेब वाईकर, संगीत अलंकार श्री लक्ष्मण चव्हाण, गायनाचार्य श्री किरण भोसले यांचा व्हिडीओ.
सहावी सातवीच्या वर्गात असताना वर्गात हा विलक्षण् प्रसंग घडला आणि गदिमांकडून पहिली कविता लिहिली गेली. पण ती कविता सुद्धा त्यांची सामाजिक जाणीव दाखवणारी होती.
बायको दुसऱ्याची – मराठी कॉमेडी नाटक
लेखक आणि दिग्दर्शक: अशोक पाटोळे.निर्माते: रुपेश पाटोळे
कलाकार : संजय मोने, शुभांगी गोखले, अतुल परचुरे, नीलम शिर्के, आशिष गाडे
Running Time 1:36:11
क्रांतिवीरांच्या कर्तृत्वाला शाप होता फितूरीचा. या देशात जसे प्राणाची आहुती देणारे राष्ट्रभक्त वीर जन्माला आले तसेच त्यांच्या विरुद्ध फितूर होणारे राष्ट्रद्रोही नतद्रष्टही इथे होतेच. या फितूरांना ठेचणाऱ्या सत्येन बोस, कन्हाई दत्त, चारुचंद्र बसू यांच्या क्रांतीवीरांची अमृतगाथा ऐकुया या भागात.
https://www.youtube.com/watch?v=nRr7B_Ms-lA
श्री दत्तस्थान महात्म्य दर्शन ( पिठापूर ) | Shree datta sthan mahatmya darshan ( PITHAPUR )
पिठापुरम हे भारतातील आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात स्थित दत्त क्षेत्र आहे. पीठापुरमला दक्षिणा कासी (किंवा दक्षिण काशी) म्हणूनही ओळखले जाते. पिठापुरम पूर्वी पेठापुरम किंवा पेथीकपुरम म्हणून ओळखलं जात असे. या जागेला १८ शक्तीपीठांपैकी १० वे शक्तीपीठ मानलं जातं. सतीदेवीच्या प्रेताचे काही भाग पडण्याविषयी पौराणिक कथांमध्ये म्हटले आहे की, जेव्हा भगवान शिवने सतीचे शव घेतले आणि भटकले त्यावेळी सतीच्या शवाचे श्रीहरिंनी सुदर्शन चक्राने विभाजन केल्यावर पाठीचा एक भाग पिठापुरला पडल्यामुळे त्या ठिकाणास 'फुर हुत्तिका शक्ती पीठ' उत्पन्न झाले. भगवान दत्तात्रेय येथे स्वयंभू होते. याचा अर्थ असा की मंदिरात उपस्थित असलेल्या मूर्ती कोणाच कोरलेल्या नाहीत. त्याऐवजी ते स्वत:हून प्रकट झाले आहेत. इतर दत्त क्षेत्रांप्रमाणे मूर्तीची पूजा येथे केली जाते. श्रीपाद वल्लभ चरिताने हे सिद्ध केले आहे की इ.स. १३५० पासून अप्पाला राजा शर्मा (श्रीपादांचे वडील) यांनी दत्ताची पूजा केली होती.पुढे दत्त महाराजांचे मंदिर उभारले गेले आणि खाली एक औदुंबर वृक्ष लावला गेला ज्याच्या खाली आपण परमेश्वराच्या पायाचे ठसे म्हणजेच पादुका पाहू शकतो. येथे श्रीपादांची मूर्तीही ठेवली आहे.
स्थानिकांचा असा विश्वास आहे की जर कोणी या दत्त मंदिरात गेले आणि त्यांनी आपली इच्छा पूर्ण होण्याची आकांक्षा बाळगली तर त्यांची नक्कीच इच्छापूर्ती होते. इच्छापूर्तीसाठी त्यांनी नारळ बाळगला पाहिजे आणि पूजा केल्यावर नारळ परमेश्वराच्या मूर्तीच्या मागे ठेवल्यावर ३ महिन्यांतच इच्छा पूर्ण होतात असा तेथील सगळ्यांचा विश्वास आहे.
निर्मिती : वासुदेव शाश्वत अभियान, वसई
संकल्पना : सद्गुरू चरणरज पाध्ये काका
Copyright © 2025 | Marathisrushti