या विभागात आपल्याला वेगवेगळ्या विषयांवरील पॉडकास्ट बघायला मिळतील.
श्री स्वामी समर्थांचं चित्र पाहिलं की चित्रकार म्हणून डोळ्यासमोर येतात सुप्रसिद्ध चित्रकार श्री शेखर साने. विविध भावमुद्रांमध्ये स्वामी समर्थांची सुंदर पेंटिंग त्यानी चितारली आहेत. शंभर-दोनशे नाही.. तर तब्बल ४५०० पेक्षा जास्त !
भारतातील रेल्वेविषयक उत्पादने करणाऱ्या आणि सेवा देणाऱ्या कंपन्यांची माहिती देणारे पॉडकास्ट. चंद्रशेखर टिळक यांच्या बाजारगप्पांमधून…
आयुर्वेद. शतकानुशतकांपासून वापरली जाणारी भारतीय उपचार पद्धती. आयुर्वेदाबद्दल अनेक गैरसमजुती समाजात पसरलेल्या आहेत. पाश्चिमात्य उपचार विरुद्ध आयुर्वेद असा वाद तर अनेकदा बघायला मिळतो.
सह्याद्रीच्या कड्यांवर उभे असलेले किल्ले म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास, पराक्रम आणि अभिमान.
त्याची गोष्टच्या आजच्या भागात भेटूया अभिनेते जयवंत वाडकर यांना. आधी बँकेत नोकरीला असणाऱ्या जयवंत वाडकर यांनी वयाच्या पस्तीशीत रिटायरमेंट घेतली. मराठी आणि हिंदी सिनेविश्वातील त्यांचा प्रवास, प्रमुख भूमिकेसाठी नसलेला अट्टहास अशा बऱ्यात मुद्द्यांवर त्यांनी गप्पा मारल्या. पहा त्याची गोष्टचा नवा एपिसोड.
आळंदी , हे इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले एक प्राचीन शहर आहे जिथे माऊली संत ज्ञानेश्वर ह्यांची समाधी आहे. ह्या शहरात पर्यटक आणि साधकांनी का यावे, इथली कुठली मंदिरे आणि स्थळे सगळ्यांनी बघावी आणि सर्वात महत्वाचे कुठल्या क्रमाने बघावी, ही सगळे माहिती ऐका ह. भ. प. यशवंत महाराज फाले ह्यांच्या ओघवत्या वाणीतून.
हुशारीला योग्य दिशा मिळाली तर ते ज्ञान होतं आणि असं ज्ञान समाजोपयोगी असतं. मात्र प्रचंड बुद्धिमत्ता असताना केवळ पैशाच्या अभावी माणूस भरकटतो आणि एका वेगळ्या दिशेने प्रवास करायला लागतो. ही कथा आहे एका अशा तरुणाची ज्यांच्या आयुष्यात दोन वेळा असे टर्निंग पॉइंट आले.
हिरवागार निसर्ग, देखणा समुद्रकिनारा, समृद्ध सांस्कृतिक वारसा, बहुविध वन्यजीव आणि पक्षी, साहसी पर्यटन – हे सगळे जर एका शॉर्ट ट्रिप मध्ये करायचे असेल तर तुम्ही नक्कीच जायला पाहिजे श्रीलंकेला!! अधिक माहिती आजच्या पॉडकास्ट मध्ये.
भारतीय पत्रकाराच्या चष्म्यातून पाकिस्तानचा प्रवास हा आजच्या भागाचा विषय. हे पत्रकार कोण ? तर टिळकांच्या केसरी वर्तमानपत्राचे माजी संपादक , लोकमत या वृत्तपत्राचे माजी संपादक आणि लोकसत्ताचे माजी सहाय्यक संपादक अरविंद गोखले. सुरुवातीला क्रिकेट मॅचच्या निमित्ताने होणाऱ्या पाकिस्तान भ्रमंतीचं अनुभवकथन त्यांनी केलं आहे त्यांच्या ‘पाकिस्ताननामा’ या पुस्तकात. बेनझीर भुट्टो यांची प्रत्यक्ष मुलाखत घेणारे पहिले मराठी पत्रकार म्हणजे अरविंद गोखले.
कैलास मानसरोवर यात्रा ही जगातील सर्वात पवित्र यात्रांपैकी एक असली तरी ती शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत कठीण आहे. या पॉडकास्टमध्ये नेपाळचे श्री विकास कांडेल कैलास मानसरोवर यात्रेदरम्यान येणाऱ्या प्रत्यक्ष अडचणींवर सखोल माहिती देत आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti