पोरांना मे महिन्याची उन्हाळी सुट्टी पडली की घरातल्या बायकांना जरा निवांतपणा मिळतो मग याच उन्हाळी सुट्ट्यांचा सदुपयोग या बायका इतर वार्षिक घरगुती पदार्थाच्या साठवणीने करतात. जसं कि, चिनीमातीच्या बरण्यांमध्ये लोणचं बनवून वर्षभरासाठी मुरवत ठेवणे, लाल मिरची, शंकासुरी मिरचीचे लाल मसाले (कांडायला) दळायला देणे, नानकटाया बनवून बेकरीत भाजायला देणे, आमपोळ्या, फणसपोळ्या, मुरांबा बनवणे, फणसाचे काप तळणे वगैरे.
May 14, 2019
आज कधीतरी प्रदर्शनातून हिंडताना किंवा एखाद्या संग्रहालयाला भेट देतो त्यावेळी तांबा, पितळ व जर्मनच्या वस्तु विक्रीसाठी तर कुठे फक्त माहिती कळावी म्हणून ठेवलेल्या असतात. थोडसं हसू ही येतं, कारण काल परवा पर्यंत वापरातल्या गोष्टींना आता अॅन्टीकचा दर्जा प्राप्त झालेला आहे..
June 29, 2013
एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जगात मोठी क्रांती घडत होती ज्याच्या आगमनानं येणारी सर्व शतकं, अनेक पिढ्या “टेक्नो सॅव्ही” होणार होत्या, क्लास ए, बी, च्या प्रतिष्ठेला मानाचा तुरा प्राप्त झाला, “टाईप रायटर” च्या रुपानं कार्यालयीन कामकाजात लिखापढी वाढल्यानंतर मनुष्यबळाची मर्यादा लक्षात येऊ लागल्या व लेखन यंत्राची गरज ही भासू लागली.
September 4, 2013
एकूणात गांव किंवा तिर्थयात्रा या पलिकडे त्या काळात देशाटन नव्हतं..परदेश तर खुप दुरची गोष्ट होती, आपला प्रान्त, आपला देश बघावा असंही काही फार जणांना वाटत नव्हतं. मुळात त्यावेळच्या बहुतेकांचं जग सिमित होतं. उत्पन्न मर्यादीत. एक जण कमावणार आणि दहा जण खाणार. महत्वाकांक्षाही सिमित, म्हणजे देन वेळचं जेवण, सणासुदीला एखादं लुगडं-कापड आणि मुलांची व गांवावरुन शिकण्यासाठी आलेल्यांचं शिक्षण, एवढीच.
July 18, 2018
जगात बर्याच घटना घडतात. परंतु स्थानिक घटना, चांगल्या किंवा वाईट, या दूरवर होणार्या घटनांपेक्षा आपल्यावर अधिक परिणाम करतात. बर्याच घटना अगदी कमी कालावधीसाठी आपल्या मनात राहतात, काही थोडा जास्त काळ. केवळ काही गोष्टी चिरस्मरणात राहतात.
August 12, 2025
या वर्षी १२ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’द्वारा वानखेडे स्टेडियमचा सुवर्ण महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला. त्यानिमित्ताने, ‘सीसीआय’ आणि ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’ यांच्या वादातून आणि विजय मर्चंट यांनी बॅ. शेषराव वानखेडे यांना डिवचल्यामुळे वानखेडे स्टेडियमची स्थापना कशी युद्धपातळीवर झाली याची रंजक कहाणी एव्हाना क्रिकेटरसिकांना मुखोद्गत होत आहे.
March 4, 2025
आर. के. नारायण यांनी मालगुडी या काल्पनिक गावाच्या पार्श्र्वभूमीवर अनेक कथा लिहिल्या. त्यामध्ये गावातील सर्वसामान्य अशा अनेक व्यक्तीरेखा घेऊन त्यांच्या जीवनातील चढ-उतार, आशा-निराशा, आनंद-दुःख, राग-लोभ अप्रतिमरित्या रेखाटले.
October 21, 2021
“कोशिश” हा हिंदी नव्हें तर भारतीय चित्रसृष्टीतील मैलाचा दगड आहे. हा एकच चित्रपट करून गुलजार ,संजीवकुमार ,जया भादुरी आणि असरानी थांबले असते तरी चिरकाल आपल्या स्मरणात राहिले असते .नाही म्हणायला आपले प्रेक्षक म्हणून अपरिमित नुकसान झाले असते हा भाग अलाहिदा . कारण कोशिश नंतरही त्यांनी आपल्याला एकाहून एक नजराणे बहाल करून श्रीमंत करून टाकलेले आहे.
November 12, 2021
आमच्या आगरी भाषेत चिंचेला चिच बोलतात. ड ऐवजी र आणि ळ ऐवजी ल तसेच चिंच ऐवजी चिच. चिंचेच्या झाडावर चढला असे कोणाला सांगायचे असेल तर ” तो बघ चिचेच्या झाराव चरला ” असे बोलले जाते.
June 9, 2021
भीती नावाच्या प्रकाराची मनुष्याला अगदी लहान वयातच ओळख होत असते." झोप लवकर, बागुलबुवा येईल बघ. "इथपासून सुरू झालेला आपल्यातील भितीचा प्रवास अगदी शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजेच मृत्यूशय्येवर पडल्यावर होणाऱ्या विलक्षण थररकापापर्यंत सुरूच असतो. भितीची कारणं वेगवेगळी असतील... प्रतिक्रिया सुद्धा वेगवेगळ्या असतील परंतु कोणतीही व्यक्ती घ्या कशाची ना कशाची भिती तिला सदैव सतावत असतेच.. लहानपणी मला अशीच बुरुजावरच्या घुबडाची फार भीती वाटायची... आमचं घर म्हणजे फार मोठा बुरुजाचा वाडा होता.. त्याच्या प्रत्येक बुरुजावर घुबडाचे कायम वास्तव्य असायचे. संध्याकाळ झाली की सारे पक्षी आपापल्या घरट्याकडे परतायचे...आमची सुद्धा खेळून खेळून घरी परतायची वेळ तीच असायची. मी पळत पळत घराकडे निघतांना बुरुजाकडे जायच्या पायऱ्या म्हणजे आम्ही त्याला 'चोप' म्हणायचो.अर्थात उतरत्या दगडी पाय-याचा रस्ता, या चोपंवर पाऊल ठेवलं की एकदम डोळ्यासमोर एक घुबड बसलेले दिसायचे मग पुढे जायची हिंमत व्हायची नाही. वाट बघायची कोणी मोठा माणूस वाड्यात जाणारा येईल का ? म्हणजे त्यांच्या सोबत जाता येईल. खरं तर एक लहानसा खडा फेकून हाणला तरी ते घुबड उडून जाईल पण तसे करणे शक्य नव्हते कारण त्या बाबतीत अशी एक दंतकथा होती की या घुबडांना जर का खडा मारला तर ते घुबड अलगद खडा झेलते अन् समुद्रात नेऊन टाकते मग जसा जसा खडा विरघळत जाईल.. तसे तसे आपण सुद्धा विरघळून जातो... या कथेचा एवढा प्रभाव होता की कधीच आम्ही घुबडाला खडा फेकून मारू शकलो नाही..
जागच्या जागेवर गरकन फिरणारे... लुकलुकणारे त्याचे भेसूर डोळे, टवकारलेले कान,पंखांची केलेली फडफड काही केल्या माझ्या डोळ्यासमोरून जायची नाही. मध्यरात्री केव्हातरी घुssघुss असा घुबडाचा आवाज ऐकू यायचा.. मग तर अधिकच भिती वाटायची. तोंडावर पांघरून घेतलं तरी घुबड सारखं दिसत राहायचं. खरंतर नंतर मोठे झाल्यावर कळलं की घुबड काही देशात शुभशकून मानले जाते..घुबड हे तर ज्ञानाचे प्रतिक आहे. परंतु आपल्याकडे मात्र घुबडाला अशुभ मानतात.घुबड म्हणजे कुरुप आणि अजागळ पक्षी .. आमच्या लहानपणी आमच्या मित्रांचा सगळा वाचिक व्यवहार घुबड हा शब्द घेऊनच चालायचा. 'घुबडा सारखं काय टकमक बघतोस ?' ..'घुबडासारखं तोंड करायला काय झालं..?' 'घुबड्या तोंडाच्या...?' अन् मुलगी किंवा भांडकुदळ बाई असेल तर 'ती घुबडी..' असे घुबडा बद्दलचे वाक्य उच्चारतांना त्या घुबडाची भिती तेवढी कायम होती. खेळता-खेळता आम्ही घुबडाचं एक गाणं म्हणत असू .. घुबड घुमतं, पैसा मागतं पैसा कशाला?...असं ते बरंच लांबलचक गाणं होतं.
काही लोक सांगायचे की आपली अंडी उबवण्यासाठी घुबड सातासमुद्रा पलीकडून परीस आणतात. हा परिस लोखंडाला लावला तर त्याचं सोनं होतं. आमच्या वाड्यात बसल्यानंतर चर्चा निघायच्या आमचे एक चुलत आजोबा नेहमी तवा किंवा लोखंडी वस्तू घुबड बसायचं तिथं नेऊन ठेवायचे. परिस आणला तर तो लोखंडी वस्तूला लागेल व ती सोन्याची होईल. या आशेवर वाट बघायचे.. .. परंतु कधीच त्यांच्या लोखंडाला परीस लागला नाही. यावरून असा निष्कर्ष ते काढत असायचे की घुबड आपल्या परिसाला खूप जपते, चुकूनही लोखंडाच्या जवळ अंडी ठेवत नाही. अशा चर्चा आमच्या कानावर पडायच्या अन मनात यायचे चुकून कधीतरी आपल्याला हा परिस सापडेल काय..? मग आपण साऱ्याच लोखंडी वस्तू सोन्याच्या करून टाकू बालबुद्धीला वाटत असणारे हे विचार हळूहळू वास्तवाचा शोध घेत गेले..अन् कळून चुकलं की 'परीस' नावाची अशी कोणतीच वस्तू जगात नसते... पण एक मात्र खरं की सतत चांगलं काम, प्रेमाने बोलणं,सत्य वागणं,अभ्यास, वाचन,चिंतन,गुरुचा सहवास,ज्ञानकणाची जिज्ञासा..यासारखे किती तरी परीसच होते जे पुढील आयुष्यात भेटत गेले ..कसे स्पर्शत गेले नकळत कळलं सुद्धा नाही..?स्वतःच्याच आयुष्याचं सोनं कसं होत गेलं तेही समजलं नाही ? घुबडाबाबतचे ते विचार आजही आठवतात...पण प्रत्यक्षात आज घुबडंच दिसत नाहीत..अन् भिती तर केंव्हाच पळून गेली आहे..दूर. बुरुजाचा वाडा ही तसा शाबूत राहिला नाही...फक्त मनावर काही परीस राहून गेले.तेच परीस मी जपत राहतो...जीवापाड.अजून ही असेच नवनवीन परीस भेटत राहतात... नकळतपणे. तेव्हा आयुष्याच सोनं होऊन जातं...
-- संतोष सेलूकर.
परभणी
७७०९५१५११०.
May 23, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti