नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
जन्मताच स्त्रीची सर्वांगीण ताकत जास्त असते. जीवनाच्या प्रत्येक पाऊलावर हे सिद्ध झालेले आहे की तिच्यात प्रचंड क्षमता व उरक शक्ती असते. बौद्धीक, शारीरिक, मानसिक शक्तीमध्ये तिचा वरचढपणा स्पष्ट झालेला आहे.ज्या वेळी संधी मिळाली, तिने आपली योग्यता सिद्ध केली आहे.
नुकताच दक्षिण आफ्रिकेला जाण्याचा योग आला होता. निसर्गाच वरदान लाभलेली भूमी असे वर्णन तीच करता येईल. उत्तम हवा, भरपूर पाणी, नद्या नाले तलाव आणि नेत्रदिपक धबधबे दिसत होते. त्याच प्रमाणे प्रचंड झाडे, वेली, क्षितीजापर्यंत पसरलेली जंगले. त्या जंगलामध्ये साम्राज्य गाजविणारी श्वापदे. बळी तो कान पिळी. ह्या तत्वाने जीवन जगणारे पशू कळपा कळपानी स्वातंत्रपूर्ण जगण्याचा आनंद घेताना दिसत होती. सार बघतांना ह्रदय भरुन येत होत.
जोहानेसबर्ग ही दक्षिण आफ्रिकेची राजधानी. सारा परिसर सुवर्णमिश्रित दगडांच्या खाणीनी भरलेला. जगातील सर्वांत जास्त खनिज सोन्याचे उत्पादन देणारा हा प्रांत समजला जातो. अतिशय कलात्मक आणि नाविण्यपुर्णतेने वसलेले हे शहर आहे. केवळ शे - दोनशे वर्षाचा इतिहास त्यांच्या वसाहतीचा आहे. थोर जागतिक किर्तीचे नेते नेल्सन मंडेला यांचे वास्तव्य असलेले शहर. त्यानीच द. आफ्रिकेचे प्रथम अध्यक्षपद भूषविलेले होते. जोहानेसबर्ग येथेच भारताचे महान नेते महात्मा गांधीजी यांचे वास्तव्य २१ वर्षे होते. त्यानी गरीब, वर्णभेदामुळे अत्याचार होत असलेल्या जनतेला जाणले. एक लढा दिला. त्यांत ते अशस्वी झाले. पुढे भारतामधील कार्य तर त्याना जागतीक स्थरावर घेऊन गेले. जोहान्सबर्गने गांधीजींची य़ोग्यता, थोरवी जाणली. त्याना अजरामर अशी श्रधांजली अर्पिली.
प्रसंगः- एक प्रसंग घडला. दक्षिण आफ्रिकेत त्यावेळी वर्णभेद, उचनीचता अतिशय प्रखरतेने मानली जात असे. एकदा ते रेल्वेने प्रवास करीत होते. गांधीजी प्रथम वर्गाच्या बोगीमध्ये रीतसर तिकीट काढून बसले होते. गाडीचा तिकीट तपासनीस तेथे आला. त्याने गांधीजीना त्या डब्यामध्ये बसण्यास हरकत घेतली. गांधीजीनी आपल्या जवळचे नियमाप्रमाणे घेतलेले प्रथम वर्गाचे तिकीट दाखविले. तरी त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. तो वर्णद्वेष्टा इंग्रज होता. तो तरुण गांधीजीवर खेकसला.
. " Black passengers are not allowed to sit in this compartment with white persons ''
असे गांधीजीना ब्ल्याक म्हणत, इंडीयन म्हणत, फॉरीनर्स म्हणत आरोप केले. गांधीजी गोऱ्या लोकांच्या सहवासाठी अयोग्य असल्याचे व्यक्त केले. गांधीजीना हे अत्यंत अपमानकारक वाटले. त्यानी त्याचा स्पष्ट शब्दांत निषेध केला. ही वर्ण भेदाची बाब उच्यायुक्ताकडे व त्यावेळच्या सकरारी दरबारांत निदर्शनास आणून देण्याचे सुचविले. त्या उर्मट उद्धट आणि मग्रुर अशा इंग्रज अधिकाऱ्याना जनाची वा मनाची लाज राखली नाही. त्याने गांधीजीना चक्क हात धरुन प्रथम वर्गाच्या डब्यातून खाली उतरुन दिले.
गाधीजीनी Bar-At Law ची पदवी घेतलेली होती. ते साऊथ आफ्रिकेमध्ये २१ वर्षे राहीले. प्रखर देशाभिमान आणि कायद्याचे ज्ञान ह्यामुळे एक वेगळेच व्यक्तीमत्व त्याना प्राप्त झाले होते.
कालाय तस्मै नमः काळाचा महीमा अगाध असतो. ते सत्य आहे. भारतातील अन्याय, वर्णभेद, उच्य-निचता, असत्य, हिंसक वृती, यांच्या विरोधांत गांधीजीनी प्रचंड झगडा दिला. जगभर शक्तीच्या जोरावर राज्य करणाऱ्या इंग्रजाना अहिंसा व सत्य ह्याच्या महामंत्राने भस्मसांत केले. इंग्रजांची जागतिक स्थरावर माघार होत गेली. हाती कोणतेही शस्त्र न घेतांच त्यांनी इंग्रजांचा पराभव केला. गांधीजी महान बनले. त्यांची योग्यता दक्षिण आफ्रिकेतील जनतेने, सरकारने तिव्रतेने जाणली. महात्माजींचा एके काळी त्यांच्याच भूमिवर करण्यांत आलेल्या अपमानाची पश्चातापपूर्ण भरपाई करण्यांत आली. ज्या वयांत गांधीजीनी दक्षिण आफ्रिकेंत वर्णभेद व उच्यनीचतेला आवाहन दिले, त्याच वयातील ( तिशीतील ) त्यांचा पुतळा जोहान्सबर्ग आणि दरबन ह्या दोन प्रमुख शहरांत उभारला जाऊन त्या चौकांना गांधी चौक (Gandhi Square.) हे नामकरण करुन सन्मानित केले.
त्यांचा तारुण्यातील , तिशीच्या जवळपासचा पुतळा, तेजःपुंज चेहरा, उंचपुरा मात्र सडसडीत बांधेसुद अंगकाठी व्यक्त होत होता. वकीली पेहेराव घातलेला, दिसत होता. काळा मोठा कोट परिधान केलेला होता. अंगात सुटबुट टाय शर्ट चमकत होते.
आम्ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा तारुण्यातील भव्य ब्रांझचा पुतळा बघून भाराऊन गेलो. आमचे डोळे आनंदाने, प्रेमाने, अभिमानाने, आणि आदराने भरुन आले. अश्रु स्वयंस्फूर्तीनेच आपली वाट काढीत होते. मन गहीवरुन आले होते.
आम्ही भारतामध्यें महात्मा गांधीजींचे अनेक ठिकाणी, अनेक जागी भव्य दिव्य असे पुतळे बघीतले आहेत. त्यांच्या महान कर्तृत्वाचा, सत्य आणि अहिंसा यांचा मंत्र देत हे सारे पुतळे अजरामर झाल्याचा भास होत असतो. ज्येष्ठत्व-श्रेष्ठत्व यांचे भव्य दर्शन देत, वाकून गेलेले शरीर, हाती काठी, चष्मा, तुरळक केस आणि केवळ पंचा व धोतर हा पेहेराव, मनांत इतका बसला आहे की त्यांची महान भव्यता आणि वेगळेपणा केवळ भारतीयांनांच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये मा्यता पावलेले ते एक महान मानव समजले जातात.
जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका येथील शासनाने गांधीजींचा भव्य ब्रॉन्झचा पुतळा शहराच्या मध्यवर्ती भागांत स्थापन केला.
चौकाला गांधी चौक (Gandhi Square.) हे नामकरण करुण करुन पुतळ्या खालती एक स्तंभ ( शिलालेख ) कोरला होता. तो असा.
|
M. K. Gandhi Attorney at law Mohandas K. Gandhi was a famous figure at Johannesburg’s first law courts located on Government Square, now renamed Gandhi Square. He kept offices near the law courts from 1903 to 1910, at the corner of Rissik and Anderson Streets, and challenged racially discriminatory enactments, both inside and outside of the courts. Gandhi’s legal work soon merged with his Satyagraha ( ‘Soul Force ‘ ) movement of passive resistance, putting his legal career behind him. Gandhi dedicated himself to a lifetime of public service. Gandhi returned to India in 1914 after 21 full and fruitful years in South Africa. Continuing the search for truth which he had begun in South Africa, he plunged in to India’s struggle for freedom and came to be hailed by his people as Mahatma, ‘ Great Soul ‘
Sculptor : Tinka Christopher
Unveiled by His Worship the Executive Mayor Councillor Amos Masondo, 2 October 2003 |
त्याच पुतळ्याच्या दुसऱ्या बाजूला स्थंभ ( शिलालेख ) कोरलेला असून त्यावरती त्यावेळचे गांधीजींचे विचार व्यक्त केलेले आहेत.
| I learn during all those years to love Johannesburg even though ir was a mining camp. It was in Johannesburg that I found my most precious friends. It was in Johannesburg that the foundation for the great struggle of Passive Resistance was
Laid in the September of 1906… Johannesburg, therefore, had the holiest of all the holy associations that Mrs. Gandhi and I will carry back to India. M. K. Gandhi, 1914
|
जगातींल सर्वांत श्रीमंत व बलशाली असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष श्री बराक ओबामा हे महात्मा गांधीजीना खूप आदरणीय स्थानावर मानतात. त्यांचे तैलचित्र हे आजही त्यांच्या भव्य कार्यालयांत दिमाखाने जगासमोर आहे.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
मला एक भावनिक वैचारीक सवय होती. रोज सकाळी अंगणांत वाटीभर धान्य प्लास्टीकच्या चटईवर टाकींत असे. जमा होणाऱ्या पक्षांची ते टीपताना गम्मत बघणे व आनंद घेणे हा हेतू. कबुतर, चिमण्या तेथे नियमीत येत असत. धान्य त्या चटईवर पडतांच, क्षणाचा विलंब न करता ते येत असे. मात्र त्यांच्या येण्याचा व दाणे टीपण्याच्या सवईमध्ये एक नैसर्गिक पद्धत निश्चीतपणे दिसून येई. पक्षी प्रथम झाडावर, पत्र्यावर, खांबावर, दोरीवर इत्यादी ठिकाणी बसत. सर्व दिशेने चौफेर द्रष्टीने बघत. सभोवतालच्या परिस्थीतीचा मागोवा घेत असत. कोठे आपला शत्रु अर्थात, मांजर, कुत्रा वा कुणा नाहीत ना ? याची चाहूल घेत असत. संपुर्ण खात्री वाटल्यावरच चटईवर येऊन सतर्कतेचे भान ठेवीत दाने टिपीत. जगण्यातील पावलोपवलीचे धोके जाणत कसे सतर्कतेने जगावे हा नैसर्गिक संदेश ते देत होते. शिवाय एक दोन दाणे टिपले की परत सुरक्षीत जागी जाऊन बसणे, पुन्हा अवलोकन करणे, व परत दाणे टिपण्यासाठीच प्रयत्न. हे चक्र असे. त्यांच्या हलचाली खुप शिस्तभद्ध व मनाला मोहून टाकणाऱ्या वाटे. भूतदयेचा ओलावा त्यांत समाधान देई.
मी एका मोठ्या पत्र्याच्या डब्यांत पक्षासाठीचे धान्य जमा ठेवित असे. व दररोज एक वाटीभरुन टाकी. कांही कारणास्तव मी दोन आठवडे बाहेर गांवी गेलो होतो. पक्षांना धान्य टाकणे ह्यांत खंड पडला. गावाहून आलो. सकाळी डब्बा उघडला तर दिसले की त्यांत खूप किडे, आळ्या, जळमटे झालेली आहेत. मी बेचैन झालो. लगेच सुप आणले व अंगणातच बसुन सर्व धान्य साफ केले. सर्व किडे आळ्या झटकून कचरा कोपऱ्यांत फेकून दिला. धान्य स्वच्छ केले. व नेहमी प्रमाणे एक वाटी भरुन ते चटईवर पसरुन टाकले. खुर्चीवर बसुन पक्षांची वाट बघत बसलो. थोड्याच वेळांत कांही चिमण्या तेथे आल्या. मात्र मला एकदम आश्चर्य वाटले. त्या चिमण्या तेथील धान्य टिपण्यापूर्वी, मी शेजीरीच फेकून दिलेल्या कचऱ्याकडे झेपावल्या. त्यातील किडे आळ्या याना वेचित त्याना खाण्याचा अस्वाद घेऊ लागल्या. मी त्या द्रष्यानी खुप प्रभावित झालो. त्या रोजच्या सवईप्रमाणेच खाण्याचा अर्थात टिपण्याचा आनंद घेत होत्या. मात्र ज्या प्रमाणे आपणास जेवणांत एखादा आवडीचा पदार्थ मिळाला तर त्यावर कसे तुटून पडतो, त्याप्रमाणे त्यानाही त्यांच्या आवडीनुसार व प्रकृती, निसर्गानुसार आवडते खाद्य प्राप्त झाले होते. निसर्गाची किमया आणि माझा दैनंदीन हिशोब ह्यातील तफावत माझ्या लक्षांत आली. अर्थात जे मला सहज व शक्य असेल तेच मी पक्षांना देणार. इतर त्यांच्या अवडीचे खाद्य, "वेगळा आहार एक ट्रीट" त्यानाच शोधू देत. हा देखील एक निसर्ग म्हणून मी त्याच्याकडे बघीतले.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
एक दिवस मी एका लहान मुलाला तपासत होतो. त्याला चांगलाच ताप भरला होता. खोकलत होता. बेचैन होता. तगमग करीत होता. त्याला हा त्रास तीन दिवसापासून होता. त्याच्या वडीलानी त्या मुलाचे रक्तही तपासून व क्ष किरण फोटो काढून आणले होते. सर्व रिपोर्ट्स मी व्यवस्थीत बघीतले. माझ्या वैद्यकीय तपासणी व रिपोर्ट्स वरुन मी ह्या मतास आलो की त्या मुलास निमोनीया ( Pneumonia ) झालेला असावा. तसे मी त्या मुलाच्या वडीलांना सांगीतले.
आज काल पालक फार चोखंदळ व चिकीत्सक झालेले जाणवते. हे चांगले लक्षण आहे. फक्त डॉक्टर सांगतात म्हणून सर्व मान्य करावे हे त्यांच्या पचनी पडत नाही. मुलाच्या वडीलांनी चौकस बुद्धीने मला प्रश्न केला. " डॉक्टर तुम्ही रक्ताचा रिपोर्ट बघून कसा तर्क बांधू शकता? रक्ताचा रिपोर्ट हा निदान करण्यासाठी कशी मदत करतो. " त्यांचा प्रश्न हा साधा, योग्य व सर्वसाधारण व्यक्तीच्या मनांत येणाऱ्या शंकाच बोलून दाखवणारा होता. अर्थांत वैद्यकीय शास्त्र प्रचंड आहे. ज्या ज्या शक्यतेचे बारकावे आम्ही शिक्षण घेताना शिकलो ते सर्वच त्याना सांगणे शक्य नव्हते. व अयोग्यही होते. त्याना फक्त त्यांचा छोटासा तर्क –" रक्ताचा रिपोर्ट व निदान ह्याचा कसा संबंध ? " आणि ते मला त्याना त्यांच्या भाषेत समजेल ते सांगणे हीच मजसाठी परिक्षा होती.
मी खिडकीवाटे बाहेर बघू लागलो. विचार करीत होतो. अचानक माझे लक्ष्य वेधले गेले ते एका पोलिस गाडी मुळे. एक पोलिस Vane व्हॉन व कांही पोलीस त्याच्या भोवती उभे होते. त्यांची आपसांत चर्चा चाललेली दिसत होती. अशी पोलिस गाडी पोलिसांसह त्या जागी मी पूर्वी बघीतली नव्हती. आज अचानक ते सारे बघीतले. मी किंचीत हासत त्या मुलाच्या वडीलांना प्रश्न केला. " बघीतल ती पोलिसांची गाडी व कांही पोलिस. ते आज अनपेक्षीत असे येथे दिसतात. काय तुमचा तर्क असावा ? "
ते निरखून बघू लागले. " मला वाटते जवळपास कांहीतरी घटना घडली असावी. कदाचित् चोरी, मारामारी, आत्महत्या, खून, वा असलेच कांही असावे. "
" बरोबर आहे तुमचा तर्क. असेच असते बघा दैनंदिन जीवनाच्या प्रसंगाचे. फायर ब्रिगेडची गाडी जर आली असेल तर तर्क करता येतो की कुठे आग लागली असावी. ऍम्बुलन्स (Ambulance) जर दिसली तर कोणीतरी रुग्ण मदतीच्या आपेक्षेत आहे असे वाटते. शववाहिका ( HEARSE ) त्याच वेळी दिसेल, जेंव्हा कुणातरी मृत व्यक्तीसाठी आलेली असेल. क्वचित प्रसंगी जर मिलीटरी वाहन वा सैनिक दिसले तर जवळपास आतंकवादी अथवा शत्रु गटातील कुणीतरी त्या भागांत असावा हा तर्क माणसे काढतात. ह्याचा अर्थ निर्माण झालेली परिस्थितीचे अवलोकन, तर्क, कल्पना ह्याचा अंदाज त्या त्या परिस्थितीला काबूत आणणारी यंत्रणा बघून करता येतो. हा जरी तर्क असला तरी तो त्या कारणाच्या खूपच जवळ नेण्यास मदत करतो.
शरीराच्या आतील कार्यशाळे बद्दल असेच कांहीसे असते. रक्त शरीराचा अत्यंत महत्वाचा प्राथमिक भाग असतो. शक्ती, उर्जा, अन्न, रक्षण, सारे सारे रक्ताच्या मार्फतच होते. अनेक घटक पदार्थ असलेल्या रक्तामध्ये पांढऱ्या पेशी हा एक घटक पदार्थ. रक्षणाची प्राथमिक जबाबदारी सांभाळण्याची त्यांची क्षमता असते. ज्या पद्धतीचा रोग प्रादुर्भाव ( जंतू मार्फत ) शरीरावर होतो, त्याला ताब्यात आणण्यासाठी, त्या रोगाचा प्रतीकार करण्यासाठी रक्तामध्ये त्वरीत बदल होतो. शरीरांत असलेला Reserve Blood stock जो कांही अवयवांत असेल तो रक्त वाहीन्यामध्ये उतरतो. पांढऱ्या रक्तपेशीमध्ये त्या त्या रोगाला अनुसरुन त्वरीत वाढ होते. बस त्या ठराविक वाढलेल्या पेशी वा रक्त बदल हा कोणत्या रोगामुळे ते शक्य झाले असावे असा तर्क काढण्यास मदत करतो.
चोरी, खून, मारामारी, इत्यादी तुम्ही प्रत्यक्ष न बघताच केवळ पोलीसांची गाडी व पोलीस याना बघून जसे अनुमान काढू शकतात, त्याच प्रमाणे रक्त लघवी इत्यादींचे रिपोर्ट आम्हास त्या रोगाचे अप्रत्यक्ष निदान करण्यास मदत करतात.
मुलाच्या वडीलांनी हासत माझ्या तर्काला व निदानाला साथ दिली. मी त्याना लिहून दिलेले Prescription घेऊन ते औषधी आणण्यासाठी गेले.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
गेल्या काही महिन्या पासून आमच्या गावाचं नाव या पेपरात झळकतंय ! चार मुडदे पडलेत ! हो या रेल्वेस्टेशनच्या परिसरात ! कोणी तरी एकट्या दुकट्याला गाठून डोक्यात दगड घालून खून करतोय ! का ? माहित नाही. पोलीस पण चक्रावलेत .
मी काहीतरी मिळावं म्हणून गातो . ते काहीतरी मिळालंय , ते वाटून टाकल्याशिवाय राहवत नाही , म्हणून गातात .
जीवनांच्या चक्रांत, आयुष्याच्या मार्गांत कोणतीही एखादी गोष्ट, संकल्पना परिपूर्ण असूच शकत नाही. कोणतीही घटना घडते त्याला तीन गोष्टी कारणीभूत असतात. एक वातावरण जे निसर्ग निर्मीत असते. दुसरे परिस्थिती जी मानवनिर्मीत असते. आणि तीसरे कारण मानवी वैयक्तीक स्वभाव. याचाच परिपाक म्हणजे घटनांची निर्मिती. त्यामुळे त्यांत भिन्नता आणि मर्यादा असेलच. भले ते केवढे महान व जीवनाला यशस्वी करणारे असो. त्यांत मानवी मर्यादा येतीलच. फक्त ईश्वरी तत्त्वच परिपूर्ण असते. असे म्हणतात की प्रत्येक व्यक्ती ही एक वैशिष्ठपूर्ण ईश्वरी निर्मिती असते. कोणतेही कार्य मग ते केवढेही महान असो. जर मानवी मर्यादांच्या क्षमतेमधील असेल तर ते कुणीही करु शकतो. ही नैसर्गिक देणगी आहे. फक्त दुर्भाग्याने हे तत्वज्ञान व्यक्ती समजत नाही. अंगीकारत नाही. तसा त्याचा प्रयत्न होत नसतो.
इतरांचे विचार, इतरांची समज ही तुमच्यासाठी फक्त ' मार्गदर्शक ' ह्या संकल्पनेंत असावी. एखाद्याचे त्या प्रांतातले यश देखील एक उदाहरण म्हणून असावे. मात्र हाच केवळ एकमेव सत्याचा मार्ग सर्वासाठी असू शकत नाही. जर प्रत्येकजण आपल्यापरी वैशिष्ठपुर्ण आहे, तर व्यक्तीने आपला मार्ग, ध्येय हे स्वतःच्या आत्म्याला साक्षी ठेवितच चेतवावे. कारण ते आन्तरीक सत्य, हेच फक्त त्याच्यासाठी एकमेव सत्य असेल. इतरांसाठी मार्ग दर्शनपर. कदाचित तो मार्ग आगदी त्याच पद्धतीने हाताळता येणे शक्यच नसते. त्यांत कोठेतरी कांहीतरी भिन्नता येणारच.
'सदैव ईश्वरी नामस्मरण करावे' हा संदेश माझ्या बुद्धीने, विचारांनी त्याला मान्यता दिली. कां कुणास ठाऊक माझा आत्मा मात्र शासंक होता. कुणाचे नामस्मरण ? कुणी त्याना बघीतले ? कुणी हे सत्य अनुभवले ? व जर हा अनुभव असेल तर हे फक्त त्याचे त्याच्यासाठीचे सत्य असेल. हे नैसर्गिक सत्य कसे असेल. हा एक मार्ग ठरु शकेल. पण पुन्हा तोच मार्ग चालणे केवळ अशक्य. उत्पन्न होणारे अनुभव देखील भिन्न असतील ना ?. जरी ध्येय ( Aim ) हे एकच असले तरी.
पुन्हा प्रश्न उत्पन्न होतो की कोणते ध्येय ? ईश्वर दर्शनाचे, अनुभवाचे, सान्तवनाचे, ईश्वरांत एकरुप होण्यांचे. खुप द्विधा मनस्थीती झाली. ईश्वराने, निसर्गाने मला त्याच्यापासून वेगळे काढले ते कशासाठी ? पुन्हा त्याच्यांतच मिसळण्यासाठी. एकरुपता तर होतीच की. मग भिन्नता कशासाठी निर्माण केली गेली. निसर्गाचे त्या जीवाचे चक्र पुर्ण करण्यासाठी. हेच ते प्रयोजन. मुल. ते आईच्या सान्नीध्यांत फार अल्प काळासाठी असते. पोटचा तो गोळा. आईचे एक अंग. तीच्याशी एक रुप झालेला. वाढत वाढत मातेच्या शरीरामधून वेगळे अस्तित्व निर्माण केले गेलेला. काळाच्या चक्रांत संपुर्ण वेगळा केलेले. आता तर त्याचे सर्व व्यवहार, दैनंदिन अस्तित्व भिन्न होऊन जाते. आपले जीवन स्वतंत्र व आपल्याच पद्धतीने ते जगते. सर्व जीवनाचा खेळ खेळून व्यक्ती बनुन शेवटी विश्रांतीसाठी त्याच ईश्वरी तत्वात विलीन होऊ इच्छीते. हेच त्याचे ध्येय असते. विश्रांति, पुन्हा खेळणे, अर्थांत आता खेळ वेगळा, वातावरण भिन्न. सारेच निराळे.
नामस्मरणाचा उद्देश कोणता ? लयबद्धता (वा मग्नता) आणि आठवण. त्या ईश्वराची आठवण काढीत एका लयबद्धतेमध्ये विलीन होणे. इष्ठ देवतेच्या सतत आठवणीत राहणे. परंतु खोलवर विचार केला तर हे दोन्ही साधणे आवघड नव्हे , अशक्य वाटते.
लयबद्धतेच्या प्रक्रियेंत सर्व सभोवताल, परिस्थिती, स्वतःचे देखील अस्तित्व हे संपूर्ण विसरुन जाण्याचा प्रयत्न असतो. नामस्मरण करीत करीत अशा स्थितीमध्ये जाणे जरुरी असते, जेंव्हा हेच नामस्मरण विसरुन जावे लागते. शब्द जावून विचार, भावना, यांची एक तंद्री लागावी लागते. पुढे तेही विसरुन जावे लागते. सारे कांही जेंव्हा गळून पडते, त्याच वेळी ईश्वरी तत्वांत, अनुभवांत, नितांत आनंदात व्यक्ती पदार्पण करते. मग त्याला सारे विसरावे लागते. सर्वस्व विसरणे हा क्षण सर्व कांही मिळवणे ह्यासाठी ठरतो.
मी शांत बसलो होतो. नामस्मरणाचा प्रयोग चालला होता. एकाग्र होऊन इष्ठ देवतेचे चिंतन करीत होते. नामस्मरण चालू होते. अचानक ते एका मग्नतेत सुटले. तसा मला कविता करण्याचा छंद आहे. कवितेचे शब्द उत्पन्न होण्यासाठी भावनेचा कढ भरुन यावा लागतो. त्याच भवना मग शब्दरुप धारण करतात. कवितेचा जन्म होतो. मी माझ्याच विचारांत बराच वेळ गुरफटून गेलो होतो. भावना, विचार, आणि शब्द यांच्या द्वंद्वांत मग्न झालो होतो. एक काव्य बाहेर पडले. जे मला अत्यानंद देत होते. समाधान देत होते. मनाची शांती खऱ्या अर्थाने लाभली होती. हेच तर मला ईश्वरी दर्शन वाटले. कारण जर ईश्वर कसा व कशांत आहे हे निश्चीत नसेल, तर मग तो मला माझ्याच आन्तरीक विचारांत, भावनेंत, शब्दांत मिळाला असे मी समजतो. ते मिळण्याचा प्रांत कोणताही असेल. पण जर शेवट अत्यानंदांत, समाधानांत, असेल तर ह्यालाच ईश्वरी अनुभवाचे दर्शन समजतो.
नामस्मरण अतिशय चांगले व योग्य. महान व्यक्तीनी सांगितलेला मार्ग. एकदम पटणारा. परंतु अनुभव असा की ती ध्येयाकडे, पुढे घेऊन जाणारी एक पायरी असते. दुर्दैवाने असेही दिसते की व्यक्ती त्याच पायरीवर सतत घुटमळतच राहतो. एखादा घान्याच्या बैलाप्रमाणे. फक्त चकरा मारणारा. कोणताही दुरचा प्रवास न करणारा. जसे पुजाकर्म, आन्हीके इत्यादी. असतात. जे प्रथम पायरी प्रमाणे असतात. त्यांचाच आधार घेऊन पुढे लांब छलांग मारावी लागते. ईश्वरी तत्वांचा शोध घ्यावा लागतो. परंतु हे सहसा होत नाही. व्यक्ती त्याच पायरीवर, त्याच वातावरणात घुटमळत राहतो. अचानक कांही चमत्कार घडेल, वेगळाच मार्ग मिळेल, ईश्वरी अनुभव येईल, ह्या रम्य विचारांत रममान होतो.
अशाने हाती कांहीच लागत नाही. तो मात्र कर्मकांडी, व फक्त नामस्मरण घेणारा असाच राहतो. एकदम अपूर्ण. फक्त अंधश्रद्धावान. जर मार्ग दाखविला गेला तर चालताना मात्र स्वतःत्या आत्म्याला जागृत करण्याचा प्रयत्न व्हावा. नामस्मरण योग्य परंतु लयबद्धतेमधूनच ते विसरावे लागते. अर्थात हे विसरणे दुसऱ्या महान तत्वासाठी. हे विसरणे जाणून, समजून,नसावे. सहज असावे. चिंतनांत, घ्यानधारणेत, समाधी अवस्थेत जाण्यासाठी असावे. एका दालनात शिरलो. तेंव्हा पहीले दालन अपोआप सुटून गेले. त्याची आता त्या क्षणाला आठवण देखील नसावी. न नाम, न नामस्मरण, ना कोणती आठवण, ना कोणता विचार. नामस्मरणाला पर्याय असावा लय, एकाग्रता. आणि ती देखील विसरावयास हवी. आपोआप, सहजपणे. कशासाठी – तर त्याचे उत्तर नाही. तेथे असेल फक्त नितांत आनंद ( Ecstasy Of Joy ), समाधान, शांतता - - -
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
एकनाथ माझा मित्र. त्याच्या घरी एकदा कोणत्या तरी पुजाविधीसाठी प्रसादाला गेलो होतो. घरातील देवघरात कोणत्यातरी महाराजाची मोठी तसवीर लावलेली होती. हार, फुले, उदबत्ती, निरंजनचा दिवा तेवत ठेवलेला होता. त्या महाराजाविषयी चौकशी करता ते शेजारच्याच गावचे एक ग्रहस्थ असल्याचे कळले. सामान्य जनाप्रमाणे त्यांचे व्यवहार चालू असतात. एका बँकेमध्ये नोकरी करुन उदार्निवाह चालवितात हे कळले. परंतु अध्यात्मिक प्रांतात, ईश्वरी ज्ञानाबद्दल जाणकार होते. वाचन, अभ्यास, व अनुभव ह्यातून त्यानी ज्ञानसंपदा केलेली होती. ईश्वरी श्रद्धा, संकल्पना, ज्ञान आणि वाणी कौश्यल्य ह्याचा अप्रतीम संगम प्राप्त ती व्यक्ती होती. निसर्गतः ह्या व्यक्तीचा समोरच्या ऐकणाऱ्या श्रोत्यांवर एकदम परिणाम होणारच. व्यक्तीचे ज्ञानच फक्त प्रभावित करणारे असते. त्या ज्ञानी व्यक्ती बद्दल आदर वाटू लागतो. त्याचे प्रत्येक शब्द आपणास पटू लागतात. प्रत्येकजण अशा व्यक्तीचे मोजमाप आपल्या स्वतःच्या ज्ञान साधनेतून करतो. त्याला संपर्कात ठेवतो. आदर्श मानतो. मोजमापाचे कोणतेही परिमाण नसते. फक्त वाटले, पटले, भावले, ह्या शब्दानी त्यावर मुलायमा लावला जातो. त्याचे तुम्ही वर्णन करु बघता. त्याला चांगल्या, उत्कृष्ट स्थानी मानता. देवत्वाची कल्पना ही अशाच चक्रातून सुरु होते. दुसरा ऐकून तोही प्रभावित होतो. सर्वांत महत्वाचे म्हणजे त्या तथाकथीत थोर व्यक्तीला कृपावंत, दयावंत, सुखदाता, दुःख हर्ता इत्यादी विषेशने लाऊन, त्याच्या बद्दल वाटणारे प्रेम आदर्श व्यक्त करताना आपलाही अहं जागृत केला जातो. मला कोणीतरी देवतुल्य व्यक्ती सापडला, हा भाव निर्माण केला जातो. तसे जीवन हे सुख दुःख यांच्या परिणामांचेच चक्र असते. मात्र व्यक्ती नेमके सुखदायी घटना टिपून त्या देवत्व दिलेल्या व्यक्तीवर लादतात. त्यांच्यामुळे हे सारे मिळाले, प्राप्त होऊ शकले ही अशांची समज. बस ह्याच आहिक मिळकतीची यादी सतत सर्वासमोर ठेऊन, वाचून त्या व्यक्तीला दिले गेलेले देवत्व द्दढ करण्याचा प्रयत्न होतो. एकापासून दुसरा, नंतर तिसरा, मग चौथा --- सर्व त्या मार्गानी धावण्याचा प्रयत्न करतात. येथे प्रमुख ध्येय बनते ते सुख मिळवणे वा दुःख कमी करणे. आदर भावना, प्रेम, हे तर देवत्वासाठीचे रंग आहेत. सारा व्यवहार हा फक्त अशाच मुखवट्याने झाकलेला असतो.
प्रत्येक सजीवाला भावना दिलेल्या आहेत. हा एक सिद्धांत आहे. तो त्याचा जीवन जगण्याचा व आशेचा एक मार्ग असतो. भावनाप्रधानता हा नैसर्गिक गुणधर्म असतो. मानवाला मात्र 'विचार- विवेक ' ह्या संकल्पनेचे विशेष वरदान मिळाले आहे. त्याच्याच जोरावर जीवनांत तो प्रगती करतो, जीवनाच्या गरजांचा मागोवा घेत ते सुसाह्य करतो. मात्र अनेक प्रसंगी भावना ह्या विचारावर मात करतात. त्या प्रमाणे तो वागण्याची दिशा अखतो. विचारच सांगतात की परिस्थिती काय आहे. वातावरण कोणते आहे. जगण्याचे सारासार मार्ग कोणते. पायंडा कोणता. इत्यादी. खरे जगणे व सुसाह्य जगणे, सत्याचा मागोवा तर्क बुद्धीने घेणे, याचे मार्ग दर्शन फक्त सुविचारच करु शकतात. व्यक्तीचे मुळ गुणधर्म असतात स्वार्थ, अहंकार, वर्चस्व, राग, लोभ, मोह. आणि ह्याच्या गुंत्यातच राहण्यांत ती समाधान मानते.
निसर्ग महान असतो. जीवनासाठी उर्जा देणारा असतो. गरजांची पूर्तता करणारा असतो. खरे म्हणजे त्यालाच देवत्व ही संकल्पना लादलेली असते. प्रकाश, अग्नी, हवा, पाणी, प्रथ्वी इत्यादी मध्येच ईश्वराच स्वरुप असते. प्रथमदर्शनी अभ्यासकांनी विद्वानानी, ऋषी मुनीनी हे मान्य केले. निर्गुण निराकार सर्व व्यापी अणूरेणूस्थित इत्यादी. माणूस एक बुद्धीवान प्राणी. त्याच्या भावना उसळू लागल्या. मन सैरावैरा धाऊ लागले. ईश्वराला जाणण्यात भावनानी अनेक अडचणी निर्माण करण्यास सुरवात केली. ईश्वराच्या संकल्पनेला सगुण रुप दिले गेले. 'विविधता ' हा मानवी स्वभाव गुणधर्म आहे. तो वरदान तसाच शाप देखील ठरत आहे. एकसंघपणा, एकवाच्यता ह्यामुळे संपूर्ण नष्ट झाली. ज्याला जसा विचार सुचला, जशी भावना आली, त्याप्रमाणे तो त्याने व्यक्त केला. इथेच न थांबता, आपलेच विचार कसे योग्य व परिणामकारक आहेत, ह्यावर भाष्य सुरु झाले. जो जेवढा प्रभावी, पटवून देणारा , अभ्यासक, वाक् चतूर होता, इतरांच्या गळी उतरविण्यास सक्षम ठरला. झाले निरनीराळे संघ, समाज, कुटूंबे त्याच्या विचारावर मोहून गेली. अनेक मार्ग, विचारसरणी, प्रथा, बनू लागल्या. प्रमुख विचार धारा एकच होती. मात्र वेगवेगळ्या दिशा, मार्ग विचारसरणी ह्यानी अनेक तुकडे तुकडे बनत गेले. फारच थोड्याना हे कळले. परंतु अनेकजण फक्त नक्कल करण्यांत समाधानी होऊ लागले. एक इसापनिती मधली गोष्ट आठवली. झाडाचे पान पडले. ससा भितराच तो. घाबरला. त्याला वाटले आकाश कोसळत आहे. तो धावत सुटला. ओरडत सुटला--- ''पळा पळा आकाश कोसळत आहे."---- त्याचे ओरडत धावणे बघून, रस्त्यामधील भेटणारे इतर प्राणी ही त्याच्या बरोबर धूम ठोकून पळू लागले.---- कसलीही खातरजमा न करता. फक्त जे दिसते ते सत्य समजून.
मानवी जीवनातही असेच चित्र दिसून येते. बुद्धीमत्तेचे वरदान असून देखील. कुणीही सारासार विचार, विवेकाला चालना देताना दिसत नाही. फक्त जे दिसते, एकू येते, कुणीतरी सांगते, कांही तरी वाचले जाते, बस माणसे ह्यातच वाहुन जातात. जीवन प्रवाहांत प्रवाह नेईल तस वाहून जायच नसत. पोहून मार्ग आक्रमण करावयाचा असतो. इतरांचे अनुभव मार्ग दर्शनासाठी ठीक. परंतु त्यातील सत्यता व तारतम्य ह्यावर चिंतन असावे. स्व अनुभव व सदसदविवेबुद्धी ह्यावर जीवन प्रवाह करायचा असतो. आज काल कोणत्याही संकल्पनेचे त्वरीत व अनेक शिष्यगण तयार होतात. कुणीही सखोल अभ्यास, ज्ञान, माहीती याचा विचार करीत नसतो. फक्त तो करतो. मला पटले. आम्ही असे वर्षानुवर्षे करीत आलो आहे. पुर्वजानी केले. आता मी करीत आहे. कुणीही रचमात्मक अभ्यास करीत नाही. त्याला आवाहन देऊन त्याची सत्यता पडताळून बघत नाही. मागुन आले. पुढे चालू. शेवटी शेवटी तर संपूर्ण सत्य, तत्वज्ञान, बदलून जाते. व राहतात त्या रुढी, फक्त गैरसमज, अज्ञानाच्या भिंतीच्या चौकटीमध्ये बंदीस्त. मुळ गाभ्याकडे कुणीच लक्ष देत नाही.
भावना आली, पटले, व अनुकरण केले. एकनाथरावानी ज्या व्यक्तीचा फोटो घरांत लाऊन त्याला सर्व भावनिक देवत्वाचे गुणधर्म अर्पण केले. देव संकल्पनेपेक्षाही जास्त प्राधान्य दिले तो अशातलाच भानिक श्रद्धेचा प्रकार झाला होता. ती व्यक्ती कदाचित् थोर असेलही. त्याला विरोध नाही. मात्र एकनाथरावांच्या वैचारीक ठेवणाची खंत वाटते. आगदी सहजपणे त्यानी त्यांचे पारंपारीक व घराण्याचे रुढी संस्कारीत देव संकल्पना मोडीत काढल्या. आपल्या उत्पन्न झालेल्या भावनाना प्राधान्य देत एक वेगळेच ईश्वरत्व निर्माण केले. अर्थात मान्य आहे तत्वज्ञान "जसा भाव तेथे व तसा देव" परंतु असे प्रकार फक्त भावना व ईश्वर भक्ती ह्याच्यातच रहात नाही. तर त्याला व्यवहारीक, मानसिक रंग चढतो. त्याना काय भावते, आवडते, हे मानवी विचार तुमच्या ईश्वरी भावने भोवती चक्रा मारु लागतात. व आपण त्याने प्रभावित होतो. व तसाच मार्ग निवडतो. व आपले स्वताःचे अध्यात्म निर्माण ३ करतो. ह्यात फक्त उद्देश, ध्येय नसते. असतो, मला, माझा, माझ्यासाठी,अर्थात अहंला शांत करणे. खऱ्या देवत्वाच्या कल्पनेपासून खूप दूर. मानवी अहंकारी स्वार्थी जगांत.
एकनाथरावांच्या कल्पना रम्यतेत होता, फक्त जीवन व्यवहार. जीवनाच्या सुख दुखाःचे धागे, झगडा, यश अपयशाच आलेख. आणि हे सारे घडत असते कुणाच्या तरी इच्छेनुसार, शक्तीनुसार, योजने नुसार. त्यांच्या लेखी मानवी प्रयत्नाना खुपच कमी मर्यादा असतात. सारे होत असते ते फक्त ईश्वरी इच्छेनुसार. त्यांचे ते आदरणीय महाराज हेच ईश्वराचे प्रतिक आहेत. त्यांच्याच दयेवर सारे व्यवहार, दैनंदीनी चाततात. महाराजाना समर्पण भाव, व प्रेम, सतत वाहणे, व्यक्त करणे हेच ते आपल्या जीवनाचे ध्येय समजतात. एकनाथराव आपल्या वैचारीक व भावनिक गुंत्यात सतत राहू इच्छीत होते. हीच त्यांची श्रद्धा व ते द्रष्य स्वरुपांत देऊ करण्याचे आश्वासन देणारे त्यांचे देव अर्थात महाराज.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
प्रिय वाचक - - -मानसिक तणाव ही लेखमाला मी आपणासाठी क्रमशः आठ भागात देत आहे. कृपया आपला अभिप्राय द्यावा. धन्यवाद.
मानसिक तणाव -1
(हा लेख क्रमशः आहे )
माणसाच मन अतिशय चंचल आणि प्रचंड वेगवान असते.
अस्तित्वात असलेल्या ज्ञानानुसार त्याचा वेग, प्रकाश वेगापेक्षा कितीतरी जास्त असतो. त्याची मोजमाप कुणीही करु शकत नाही.
शरिरातील सर्व अवयवांचा शोध लागला, परंतु मन हा अवयव म्हणून सापडले नाही. ते एक विचारवाहक म्हणून आहे ही संकल्पना. अदृष्य परंतु प्रचंड कार्य क्षमताप्राप्त असे असते.
दोन गोष्टींचा शोध आजतागायत देखील लागलेला नाही. त्यांच्या बद्दल खूप माहीती, ज्ञान प्राप्त आहे. परंतु त्यांना कुणीही बघीतल नाही. ते म्हणजे एक परमेश्वर आणि दुसरे माणसाचे मन.
मनाचे Physicial Existance अर्थांत शारीरिक अस्तित्व दिसत नसले, तरी त्याचा क्रियात्मक सहभाग Activity in form of Energy दिसून येतो.
मानवाने प्रकाश शक्तीला, उष्णता शक्तीला, विजेच्या शक्तीला, वादळ-वाऱ्याच्या शक्तीला, जवळ जवळ सर्व प्रकारच्या शक्तीना अंकित करण्याची कला बऱ्याच अंशी साध्य केली. मनाच्या शक्तीची कल्पना ही मानवाला युगानुयुगे आलेली आहे, परंतु आजतागायत त्या मनःशक्तीला कुणीही अंकीत करु शकले नाही. अनेक ऋषी, संत महात्मे, विद्वान मंडळी, मोठ मोठे धर्मग्रंथ यांनी मनास शांत करण्याबद्दल अनेक मार्ग सुचविले आहेत. तरी देखील त्या मनावर कुणालाही ताबा मिळवता आलेला नाही. त्या आणि कोणत्याही सामान्य व्यक्तीला. विचारांनी प्रचंड बुद्धीमान, जागतीक मान्यतेची असलेले अनेक थोर महात्मे आपल्या चंचल मनासमोर हत्-बल झालेले आम्हाला माहीत आहेत. अध्यात्म शास्त्र, विज्ञान शास्त्र यांनी देखील मनासमोर हात टेकलेले आजतरी दिसते.
चंचलता हा मनाचा गुणधर्म. मन केव्हांच शांत, स्थीर
असणार नाही. ह्या चंचल मनाच्या हालचालीमुळे जेव्हां शरिरावर शरिरामधल्या अवयवावर परिणाम होतो, त्यालाच मानसिक तणाव असे सर्वसाधारण म्हणतात. शरिरामध्ये होणऱ्या व्याधीला जेव्हां मन ही संकल्पना जबाबदार असते वा ठरते, तेव्हां आपण हे सारे मानसिक तणावामुळे झाले असे संबोधतो. जर सुक्ष्म पद्धतीने विचार केला तर आजचे शरिर विज्ञान सांगते की जवळ जवळ सर्वच रोगांचे कारण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मनाच्या हलचालीमुळे मानसिक तणावामुळे निर्माण झालेले असते.
याचा अर्थ सुदृढ शरिर केवळ सुदृढ मनामुळेच असू शकते. Healthy Mind in Healthy body म्हणतात. ते ह्यालाच.
शरिरावर राज्य करते ते तुमचे मन. तुम्हाला सम्राट बनवते ते मन आणि भिकारी करुन टाकते तेही तुमचे मन. जगाच्या इतिहासांत आजपर्यंत अनेकजणानी जसे ऋषीमुनी, संत महात्मे, विचारवंत, विद्वान, निरनिराळे धर्म व त्यांचे गुरुजन यांनी मनावर ताबा मिळवण्याचे अनेक मार्ग सुचविले.
पण खऱ्या अर्थाने कुणासही त्यात आजपर्यंत यश आलेले नाही. मनाच्या चंचल गुणधर्माचे आणि त्याच मनामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक तणावाचे महत्व येथेच दिसून येते.
ज्या घटना जीवनामध्ये घडत असतात, त्याना तीन कारणे प्रामुख्याने असतात.
१) वातावरण, जे निसर्ग निर्मीत असते.
२) परिस्थिती, जी मानव निर्मीत असते, आणि
३) वैयक्तीक स्वभाव विशेष.
ह्या जणू घटनेच्या त्रिकोणाच्या तिन बाजू ठरून घटना होत जाते. जीवनचक्रामध्ये घडणाऱ्या घटना ह्या निसर्ग निर्मीत वा ईश्वर निर्मीत केव्हांच नसतात. मात्र आपण त्या घटना निर्माण करण्यास कारणीभूत असतो. व्यक्ती तितके स्वभाव. स्वभाव तितक्या घटना. प्रत्येक घटना अनेक अनुभवाना जन्म देत असते. हेच भिन्न भिन्न स्वभाव पुन्हा विविध घटना घडण्यास कारणीभूत होत असतात. असेच जीवनाचे चक्र चालू राहते. घटनांच्या क्रियांचा आपल्या मनावरचा परिणाम म्हणजे सुखदुःखाच्या लाटांची निर्मीती.
घटना व प्रसंग कसे घडतात हे प्रथम जाणले पाहीजे. त्या ईश्वराची वा निसर्गाची एक महान कलाकृती व योजना ही घटनांच्या माध्यमामधून दिसून येत असते. निसर्गाने त्याचे नियम केलेले आसतात.ते सतत, सारखे आणि निश्चीत पद्धतीने चालत असतात. ह्या मध्ये क्रिया वा प्रतिक्रीया घडत असतात. घटना ज्या घडत असतात, त्या फक्त निसर्गाच्या चाकोरीमधूनच. प्रत्येकजण हाच घटनांचा निर्माता असतो. ह्यामध्ये ईश्वराची भूमिका वा प्रत्यक्ष सहभाग केव्हांच नसतो. घटना धडण्याचे स्वातंत्र आणि परिणाम ह्याचा प्रत्यक्ष आपल्याशीच असतो.
घटना ह्या आवडणाऱ्या, भावणाऱ्या असतात तशाच त्या न आवडणाऱ्या देखील असतात. घटना ह्या सुख दुःखाच्या लाटा निर्माण करीत असतात. त्या नेहमी प्रासंगीक असतात. परंतु कोणतीही सुख दुःखाची लाट ही "मानसिक तणाव निर्माण करते" ह्या सदरांत मोडत नसते. निसर्ग वा काळ अशा घटनाना शारिरीक हानी न पोहंचू देता, सर्व सुसाह्य करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु ह्याच घटनामधून जन्म होतो, निर्मीती होते ती तुमच्या स्वभाव रचनेची. हाच अत्यंत महत्वाचा धागा आहे, पायरी आहे, मानसिक तणावाची. तुमचा निर्माण झालेला स्वभाव, तुमच वागण, हे जेव्हां सभोवतालच्या परिस्थितीवर आघात करतो, त्याचवेळी जन्म होतो मानसिक तणावाचा.
म्हणून अत्यंत महत्वाचे - अत्यंत महत्वाचे - म्हणजे प्रत्येकांचे स्वभाव हेच मानसिक तणाव याची चौकट निर्माण करीत असतात. कोणतीही आवती भोवतीची परिस्थिती नव्हे. हे निसर्गाचे वरदान समजा.
क्रमशः पुढे २ वर चालू -
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
अनेक योनी ही निसर्गाची निर्मिती आहे. सजीव प्राण्यांमध्ये झाडे, वनस्पती, क्रिमी, किटक, पक्षी, जनावरे इत्यादी अनेक प्रकारचे सजीव आहेत. यांची चक्रमय योजना …..
Copyright © 2025 | Marathisrushti