(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • मानसिक तणाव -1

    प्रिय वाचक - - -मानसिक तणाव ही लेखमाला मी आपणासाठी क्रमशः आठ भागात देत आहे. कृपया आपला अभिप्राय द्यावा. धन्यवाद.

    मानसिक तणाव -1

    (हा लेख क्रमशः आहे )

    माणसाच मन अतिशय चंचल आणि प्रचंड वेगवान असते.

    अस्तित्वात असलेल्या ज्ञानानुसार त्याचा वेग, प्रकाश वेगापेक्षा कितीतरी जास्त असतो. त्याची मोजमाप कुणीही करु शकत नाही.

    शरिरातील सर्व अवयवांचा शोध लागला, परंतु मन हा अवयव म्हणून सापडले नाही. ते एक विचारवाहक म्हणून आहे ही संकल्पना. अदृष्य परंतु प्रचंड कार्य क्षमताप्राप्त असे असते.

    दोन गोष्टींचा शोध आजतागायत देखील लागलेला नाही. त्यांच्या बद्दल खूप माहीती, ज्ञान प्राप्त आहे. परंतु त्यांना कुणीही बघीतल नाही. ते म्हणजे एक परमेश्वर आणि दुसरे माणसाचे मन.

    मनाचे Physicial Existance अर्थांत शारीरिक अस्तित्व दिसत नसले, तरी त्याचा क्रियात्मक सहभाग Activity in form of Energy दिसून येतो.

    मानवाने प्रकाश शक्तीला, उष्णता शक्तीला, विजेच्या शक्तीला, वादळ-वाऱ्याच्या शक्तीला, जवळ जवळ सर्व प्रकारच्या शक्तीना अंकित करण्याची कला बऱ्याच अंशी साध्य केली. मनाच्या शक्तीची कल्पना ही मानवाला युगानुयुगे आलेली आहे, परंतु आजतागायत त्या मनःशक्तीला कुणीही अंकीत करु शकले नाही. अनेक ऋषी, संत महात्मे, विद्वान मंडळी, मोठ मोठे धर्मग्रंथ यांनी मनास शांत करण्याबद्दल अनेक मार्ग सुचविले आहेत. तरी देखील त्या मनावर कुणालाही ताबा मिळवता आलेला नाही. त्या आणि कोणत्याही सामान्य व्यक्तीला. विचारांनी प्रचंड बुद्धीमान, जागतीक मान्यतेची असलेले अनेक थोर महात्मे आपल्या चंचल मनासमोर हत्-बल झालेले आम्हाला माहीत आहेत. अध्यात्म शास्त्र, विज्ञान शास्त्र यांनी देखील मनासमोर हात टेकलेले आजतरी दिसते.

    चंचलता हा मनाचा गुणधर्म. मन केव्हांच शांत, स्थीर

    असणार नाही. ह्या चंचल मनाच्या हालचालीमुळे जेव्हां शरिरावर शरिरामधल्या अवयवावर परिणाम होतो, त्यालाच मानसिक तणाव असे सर्वसाधारण म्हणतात. शरिरामध्ये होणऱ्या व्याधीला जेव्हां मन ही संकल्पना जबाबदार असते वा ठरते, तेव्हां आपण हे सारे मानसिक तणावामुळे झाले असे संबोधतो. जर सुक्ष्म पद्धतीने विचार केला तर आजचे शरिर विज्ञान सांगते की जवळ जवळ सर्वच रोगांचे कारण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मनाच्या हलचालीमुळे मानसिक तणावामुळे निर्माण झालेले असते.

    याचा अर्थ सुदृढ शरिर केवळ सुदृढ मनामुळेच असू शकते. Healthy Mind in Healthy body म्हणतात. ते ह्यालाच.

    शरिरावर राज्य करते ते तुमचे मन. तुम्हाला सम्राट बनवते ते मन आणि भिकारी करुन टाकते तेही तुमचे मन. जगाच्या इतिहासांत आजपर्यंत अनेकजणानी जसे ऋषीमुनी, संत महात्मे, विचारवंत, विद्वान, निरनिराळे धर्म व त्यांचे गुरुजन यांनी मनावर ताबा मिळवण्याचे अनेक मार्ग सुचविले.

    पण खऱ्या अर्थाने कुणासही त्यात आजपर्यंत यश आलेले नाही. मनाच्या चंचल गुणधर्माचे आणि त्याच मनामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक तणावाचे महत्व येथेच दिसून येते.

    ज्या घटना जीवनामध्ये घडत असतात, त्याना तीन कारणे प्रामुख्याने असतात.

    १) वातावरण, जे निसर्ग निर्मीत असते.

    २) परिस्थिती, जी मानव निर्मीत असते, आणि

    ३) वैयक्तीक स्वभाव विशेष.

    ह्या जणू घटनेच्या त्रिकोणाच्या तिन बाजू ठरून घटना होत जाते. जीवनचक्रामध्ये घडणाऱ्या घटना ह्या निसर्ग निर्मीत वा ईश्वर निर्मीत केव्हांच नसतात. मात्र आपण त्या घटना निर्माण करण्यास कारणीभूत असतो. व्यक्ती तितके स्वभाव. स्वभाव तितक्या घटना. प्रत्येक घटना अनेक अनुभवाना जन्म देत असते. हेच भिन्न भिन्न स्वभाव पुन्हा विविध घटना घडण्यास कारणीभूत होत असतात. असेच जीवनाचे चक्र चालू राहते. घटनांच्या क्रियांचा आपल्या मनावरचा परिणाम म्हणजे सुखदुःखाच्या लाटांची निर्मीती.

    घटना व प्रसंग कसे घडतात हे प्रथम जाणले पाहीजे. त्या ईश्वराची वा निसर्गाची एक महान कलाकृती व योजना ही घटनांच्या माध्यमामधून दिसून येत असते. निसर्गाने त्याचे नियम केलेले आसतात.ते सतत, सारखे आणि निश्चीत पद्धतीने चालत असतात. ह्या मध्ये क्रिया वा प्रतिक्रीया घडत असतात. घटना ज्या घडत असतात, त्या फक्त निसर्गाच्या चाकोरीमधूनच. प्रत्येकजण हाच घटनांचा निर्माता असतो. ह्यामध्ये ईश्वराची भूमिका वा प्रत्यक्ष सहभाग केव्हांच नसतो. घटना धडण्याचे स्वातंत्र आणि परिणाम ह्याचा प्रत्यक्ष आपल्याशीच असतो.

    घटना ह्या आवडणाऱ्या, भावणाऱ्या असतात तशाच त्या न आवडणाऱ्या देखील असतात. घटना ह्या सुख दुःखाच्या लाटा निर्माण करीत असतात. त्या नेहमी प्रासंगीक असतात. परंतु कोणतीही सुख दुःखाची लाट ही "मानसिक तणाव निर्माण करते" ह्या सदरांत मोडत नसते. निसर्ग वा काळ अशा घटनाना शारिरीक हानी न पोहंचू देता, सर्व सुसाह्य करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु ह्याच घटनामधून जन्म होतो, निर्मीती होते ती तुमच्या स्वभाव रचनेची. हाच अत्यंत महत्वाचा धागा आहे, पायरी आहे, मानसिक तणावाची. तुमचा निर्माण झालेला स्वभाव, तुमच वागण, हे जेव्हां सभोवतालच्या परिस्थितीवर आघात करतो, त्याचवेळी जन्म होतो मानसिक तणावाचा.

    म्हणून अत्यंत महत्वाचे - अत्यंत महत्वाचे - म्हणजे प्रत्येकांचे स्वभाव हेच मानसिक तणाव याची चौकट निर्माण करीत असतात. कोणतीही आवती भोवतीची परिस्थिती नव्हे. हे निसर्गाचे वरदान समजा.

    क्रमशः पुढे २ वर चालू -

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • देव ही संकल्पना

    अनेक योनी ही निसर्गाची निर्मिती आहे. सजीव प्राण्यांमध्ये झाडे, वनस्पती, क्रिमी, किटक, पक्षी, जनावरे इत्यादी अनेक प्रकारचे सजीव आहेत. यांची चक्रमय योजना …..

  • मानसिक तणाव -२

    प्रिय वाचक - - -मानसिक तणाव ही लेखमाला मी आपणासाठी क्रमशः आठ भागात देत आहे. कृपया आपला अभिप्राय द्यावा. धन्यवाद.

    मानसिक तणाव -

    (हा लेख क्रमशः आहे )

    माणसाच मन अतिशय चंचल आणि प्रचंड वेगवान असते.

    अस्तित्वात असलेल्या ज्ञानानुसार त्याचा वेग, प्रकाश वेगापेक्षा कितीतरी जास्त असतो. त्याची मोजमाप कुणीही करु शकत नाही.

    शरिरातील सर्व अवयवांचा शोध लागला, परंतु मन हा अवयव म्हणून सापडले नाही. ते एक विचारवाहक म्हणून आहे ही संकल्पना. अदृष्य परंतु प्रचंड कार्य क्षमताप्राप्त असे असते.

    दोन गोष्टींचा शोध आजतागायत २खील लागलेला नाही. त्यांच्या बद्दल खूप माहीती, ज्ञान प्राप्त आहे. परंतु त्यांना कुणीही बघीतल नाही. ते म्हणजे एक परमेश्वर आणि दुसरे माणसाचे मन.

    मनाचे Physicial Existance अर्थांत शारीरिक अस्तित्व दिसत नसले, तरी त्याचा क्रियात्मक सहभाग Activity in form of Energy दिसून येतो.

    मानवाने प्रकाश शक्तीला, उष्णता शक्तीला, विजेच्या शक्तीला, वादळ-वाऱ्याच्या शक्तीला, जवळ जवळ सर्व प्रकारच्या शक्तीना अंकित करण्याची कला बऱ्याच अंशी साध्य केली. मनाच्या शक्तीची कल्पना ही मानवाला युगानुयुगे आलेली आहे, परंतु आजतागायत त्या मनःशक्तीला कुणीही अंकीत करु शकले नाही. अनेक ऋषी, संत महात्मे, विद्वान मंडळी, मोठ मोठे धर्मग्रंथ यांनी मनास शांत करण्याबद्दल अनेक मार्ग सुचविले आहेत. तरी देखील त्या मनावर कुणालाही ताबा मिळवता आलेला नाही. त्या आणि कोणत्याही सामान्य व्यक्तीला. विचारांनी प्रचंड बुद्धीमान, जागतीक मान्यतेची असलेले अनेक थोर महात्मे आपल्या चंचल मनासमोर हत्-बल झालेले आम्हाला माहीत आहेत. अध्यात्म शास्त्र, विज्ञान शास्त्र यांनी देखील मनासमोर हात टेकलेले आजतरी दिसते.

    चंचलता हा मनाचा गुणधर्म. मन केव्हांच शांत, स्थीर

    असणार नाही. ह्या चंचल मनाच्या हालचालीमुळे जेव्हां शरिरावर शरिरामधल्या अवयवावर परिणाम होतो, त्यालाच मानसिक तणाव असे सर्वसाधारण म्हणतात. शरिरामध्ये होणऱ्या व्याधीला जेव्हां मन ही संकल्पना जबाबदार असते वा ठरते, तेव्हां आपण हे सारे मानसिक तणावामुळे झाले असे संबोधतो. जर सुक्ष्म पद्धतीने विचार केला तर आजचे शरिर विज्ञान सांगते की जवळ जवळ सर्वच रोगांचे कारण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मनाच्या हलचालीमुळे मानसिक तणावामुळे निर्माण झालेले असते.

    याचा अर्थ सुदृढ शरिर केवळ सुदृढ मनामुळेच असू शकते. Healthy Mind in Healthy body म्हणतात. ते ह्यालाच.

    शरिरावर राज्य करते ते तुमचे मन. तुम्हाला सम्राट बनवते ते मन आणि भिकारी करुन टाकते तेही तुमचे मन. जगाच्या इतिहासांत आजपर्यंत अनेकजणानी जसे ऋषीमुनी, संत महात्मे, विचारवंत, विद्वान, निरनिराळे धर्म व त्यांचे गुरुजन यांनी मनावर ताबा मिळवण्याचे अनेक मार्ग सुचविले.

    पण खऱ्या अर्थाने कुणासही त्यात आजपर्यंत यश आलेले नाही. मनाच्या चंचल गुणधर्माचे आणि त्याच मनामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक तणावाचे महत्व येथेच दिसून येते.

    ज्या घटना जीवनामध्ये घडत असतात, त्याना तीन कारणे प्रामुख्याने असतात.

    १) वातावरण, जे निसर्ग निर्मीत असते.

    २) परिस्थिती, जी मानव निर्मीत असते, आणि

    ३) वैयक्तीक स्वभाव विशेष.

    ह्या जणू घटनेच्या त्रिकोणाच्या तिन बाजू ठरून घटना होत जाते. जीवनचक्रामध्ये घडणाऱ्या घटना ह्या निसर्ग निर्मीत वा ईश्वर निर्मीत केव्हांच नसतात. मात्र आपण त्या घटना निर्माण करण्यास कारणीभूत असतो. व्यक्ती तितके स्वभाव. स्वभाव तितक्या घटना. प्रत्येक घटना अनेक अनुभवाना जन्म देत असते. हेच भिन्न भिन्न स्वभाव पुन्हा विविध घटना घडण्यास कारणीभूत होत असतात. असेच जीवनाचे चक्र चालू राहते. घटनांच्या क्रियांचा आपल्या मनावरचा परिणाम म्हणजे सुखदुःखाच्या लाटांची निर्मीती.

    घटना व प्रसंग कसे घडतात हे प्रथम जाणले पाहीजे. त्या ईश्वराची वा निसर्गाची एक महान कलाकृती व योजना ही घटनांच्या माध्यमामधून दिसून येत असते. निसर्गाने त्याचे नियम केलेले आसतात.ते सतत, सारखे आणि निश्चीत पद्धतीने चालत असतात. ह्या मध्ये क्रिया वा प्रतिक्रीया घडत असतात. घटना ज्या घडत असतात, त्या फक्त निसर्गाच्या चाकोरीमधूनच. प्रत्येकजण हाच घटनांचा निर्माता असतो. ह्यामध्ये ईश्वराची भूमिका वा प्रत्यक्ष सहभाग केव्हांच नसतो. घटना धडण्याचे स्वातंत्र आणि परिणाम ह्याचा प्रत्यक्ष आपल्याशीच असतो.

    घटना ह्या आवडणाऱ्या, भावणाऱ्या असतात तशाच त्या न आवडणाऱ्या देखील असतात. घटना ह्या सुख दुःखाच्या लाटा निर्माण करीत असतात. त्या नेहमी प्रासंगीक असतात. परंतु कोणतीही सुख दुःखाची लाट ही "मानसिक तणाव निर्माण करते" ह्या सदरांत मोडत नसते. निसर्ग वा काळ अशा घटनाना शारिरीक हानी न पोहंचू देता, सर्व सुसाह्य करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु ह्याच घटनामधून जन्म होतो, निर्मीती होते ती तुमच्या स्वभाव रचनेची. हाच अत्यंत महत्वाचा धागा आहे, पायरी आहे, मानसिक तणावाची. तुमचा निर्माण झालेला स्वभाव, तुमच वागण, हे जेव्हां सभोवतालच्या परिस्थितीवर आघात करतो, त्याचवेळी जन्म होतो मानसिक तणावाचा.

    म्हणून अत्यंत महत्वाचे - अत्यंत महत्वाचे - म्हणजे प्रत्येकांचे स्वभाव हेच मानसिक तणाव याची चौकट निर्माण करीत असतात. कोणतीही आवती भोवतीची परिस्थिती नव्हे. हे निसर्गाचे वरदान समजा.

    क्रमशः पुढे २ वर चालू –

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • जेलची हवा

    आजकाल निरनिराळ्या गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे. सरकार, समाज आणि कुटुंब घटक हतबल झालेला दिसत आहे. ‘जिसकी लाठी उसकी भैस’ या उक्ती प्रमाणे किंवा बळी तो कान पिळी, या तत्त्वाने प्रत्येक जण वागत आहे. संस्कार, नितीमत्ता, चांगुलपणा असले गुणधर्म फक्त पुस्तकातच बंदीस्त झालेले आहेत. न ते कुणी वाचत, न ते ऐकू येतात न ते सांगितले जातात. लोकांनादेखील असल्या महान तत्त्वज्ञानाचा कंटाळा आलेला दिसतो. कारण एकच. असले तत्त्वज्ञान जीवनात आणले जाऊच शकत नाही, ही धारणा. जर ईश्वराच्या अस्तित्वाविषयीच प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. तर मग कसला मानसिक धाक उरत नाही. सरकार फक्त नावालाच असल्याचे जाणवते. खा, प्या, मजा करा, मी खूर्चीवर बसतो. मरु द्या इतरांना. ज्यांनी त्यांनी स्वत:ला सांभाळतच जगायच. हाच मंत्र दिला जातो. असल्या बेछुट, बेशरम तत्त्वज्ञानांनी प्रत्येक व्यक्तींनी आपली सत्ता काबीज केली आहे. जर निमीमत्ता, प्रतिष्ठा, सद्‍गुण लोपच पावले असतील तर निर्लजपणाच्या चक्रातच व्यक्ती वावरत असतो.

    ‘अटक’ अर्थात ‘Arrest’ हा हास्यापद शब्द होऊ पाहात आहे. काही होत नाही त्या संकल्पनेमुळे. ती व्यक्ती पोलीसांच्या संरक्षणात जास्त सुरक्षित राहते. त्यांच्या खाण्या, पिण्याची सर्व गरजांची, दुखल्या-खुपल्याची सोय पद्धतशीर होते. गाडीत फिरणे होते इत्यादी. शिक्षा झाली तर तो जेलमध्ये जातो. कशासाठी फक्त त्याला बंदीस्त करण्यासाठी इतरांपासून दूर करण्यासाठी. “काय तर म्हणे त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा येते.” अभ्यास केला तर वाटते किती हास्यापद हे सांगणे आहे.

    स्वातंत्र्य पूर्व काळ, ब्रिटीशांचा तो काळ होता. जेव्हा अटक, बंदीस्त व जेलची सजा या संकल्पना होत्या. त्यावेळी किती वेगळी परिस्थिती होती. खरी सजा ही त्यावेळी गुन्हेरागाला मिळे. त्याला छडीचे फटके मारले जात. हे दोन्ही हात पाय बांधून होत असे. एक छडीचा फटका बसला, तर कातडे फाटले जावे, ही जेलच्या शिपायांना समज होती. नसता त्यालाच शिक्षेला वा चौकशीला सामोरे जावे लागे. शिक्षा अत्यंत गंभीरतेने घेतली जात असे. गुन्हेगार हा गुन्हेगारच समजला जाई. त्याच्याकडून सतत कामे करुन घेतली जात. मग ती बाग कामे, शेती, सफाई, रंग-रंगोटी, विणकाम, फर्निचर, कपडे शिलाई, चटया विणणे, सतरंज्या इत्यादी अनेक अनेक हातमाग युक्त होत्या. प्रत्येक कैद्याला व त्यावर नियंत्रण करण्याऱ्याला एक Target दिले जाते व ते पूर्ण करण्याची त्याच्यावर जबाबदारी निश्चित केलेली असे. कैद्यांना कुणासही भेटू दिले जात नसे. फक्त ठराविक काळानंतर एखाद दुसरा भेट घेई. न पत्र न चिठ्ठी संपर्क. संपूर्ण कट केलेला असे.

    कैद्याचे तो एकदा ‘गुन्हेगार’ ठरला, की त्याचा शिक्षेचा काळ हा निश्चित होता व तो पूर्ण करीपर्यंत त्याच्या शारिरीक व मानसिक हालाला पर्याय नव्हता. जे मिळेल तेच खावयास मिळे. दुखऱ्या खुपऱ्याकडे ही फारसे लक्ष दिले जात नव्हते.

    का हे सारे होते? राक्षसी वाटते ना? भयंकर वाटते ना? माणुसकीला सोडून वाटते ना? अन्यायकारक वाटते ना? होय मान्य सारे काही रानटी वाटते. ज्याला सारासार विचार आहे, त्याला हे पटणार नाही. राग येईल.

    पण आपण सारेच व्यवहारहीन, भावनाहीन होत चाललो आहे. फुकटचे तत्त्वज्ञान व माणुसकी, प्रेम, दया या भावनांचे पुळके बाळगणारे झालो आहोत. चार माणुसकीचे तत्त्वज्ञानवाचले की आपली मती कुंठीत होते. माणसांनी जनावरांप्रमाणे वागू नये. त्यात माणुसकी, प्रेम, दया या भावना सतत जागृत असाव्या, अत्यंत चांगले व उच्च दर्जाचे हे तत्त्वज्ञान आहे. परंतू असल्या तत्त्वज्ञानाचा विचार करताना जग, व्यवहार आपापसातील संबंध हे सारे समजणे अत्यंत गरजेचे असते. चांगले वागण्यास कोणीही विरोध करणार नाही. परंतू जर ते चांगले वागणे या सदरात असेल तर. पण तेच जर रानटी, जंगली या सदरात जात असेल तर मात्र त्याच्याशी त्याच पद्धतीने वागणे, त्या वाईटाचा प्रतिकार करणे याला समज, शहाणपण म्हणतात. आईने वा वडील व्यक्तीने शिक्षा केली, थोबाडीत मारले तर त्याचा विचार निश्चित व्हावा. त्यावर विचारणा, सुधारणा व्हावी. परंतु जर कुणी अज्ञात व्यक्तीने तुमच्या थोबाडांत मारली तर त्याच्या बाबतीतही प्रेमाचे गोडवे, दया या आदर्श भावना व्यक्त करणे केवळ बुळेपणाचे लक्षण समजले जाईल. त्यालाच मूर्ख समजतील.

    ‘पाचामुखी परेश्वर’ हे महान तत्त्वज्ञान आहे. परंतु जर पाच जणाने कुणा अबलेवर अत्याचार केला, बलात्कार केला, तर त्याला तुम्ही काय म्हणता. जीवनात जशास तसे याच पद्धतीने जगण्याचा रिवाज आहे आणि तसेच जगले तरच तुम्ही जगू शकतात. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यानी देखील म्हटले आहे. " नाठाल्याचे माथी हानू काठी " . ईश्वरांनी देखील दुष्टांचा नाश करण्यासाठीच जन्म घेतलेला हे सत्य आहे. वाईट प्रवृत्ती सुधारण्याचा प्रयत्न व्हावा. परंतु जर सुधारणा होतच नसतील तर त्याचा संपूर्ण बिमोड करणे हे व्हावे.

    आज काल चांगुलपणा, संस्कार, आदर्शवाद याच्या भावना उदाहरणासाठी देखील मिळत नाहीत. यात देवालयाचा परिसर, धार्मिक स्थळे, मंदीर, मशीदे, गुरुद्वारे, शाळा, कॉलेज हे भाग पण अलिप्त राहीले नाहीत. अनेक वाईट गोष्टी अशा परिसरांत होत असल्याची अनेक उदाहरणे दिसून येतात.

    माझा आपला छोटासा अनुभव. परंतु खुपसे काही सांगणारा वाटतो. मी सेंट्रल जेलमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काही काळ व्यतीत केला. जे मी जाणले, दिसले, अनुभवले त्याचे चिंतन करण्याची गरज आहे. पूर्वीचा काळ एकदम बदलला आहे.

    अर्थात बदल ही काळाची गरज असते. याच्याशी सहमती आहे. परंतू बदल कुणासाठी व का व कोणता याचा देखील विचार होणे आवश्यक आहे.

    जेलमधली कागदावर यादी केलेली शिस्त ही फक्त त्या कागदावरच असल्याचे आढळते. मुख्य म्हणजे जेलमध्ये आलेले सारे कैदी हे देखील तुमच्या आमच्या प्रमाणेच माणसे आहेत. त्यांना माणुसकी, माणवतावादी दृष्टीकोण याचा संपूर्ण अधिकार आहे. ते जनावेर नाहीत व आपण इतर रानटी नाहीत ही धारणा अत्यंत दृढ व पक्की सर्वांच्या मनात भरलेली आहे. हे सारे त्यांची मानसिकता सुधारावी म्हणून. त्यांनी केलेली चूक ही कदाचित प्रासंगिक असेल त्यांना सुधारण्याचा फक्त प्रयत्न व्हावा. अत्यंत योग्य व मानवतावादी दृष्टीकोण आहे. यात दुमत नाही.

    परंतू हीच मंडळी ज्यांनी सर्व नियम, वागण्याच्या तऱ्हा, माणुसकी पायदळी तुडवलेली असते. इतर कुणाचे भयानक नुकसान केलेले असते. काहींनी हत्या, बलात्कार, चोरी, मारामारी या सर्व क्लेशदायक गोष्टी केल्या असतात. आपल्या भावना, लोभ, स्वार्थीपणा, इर्शा, राग इत्यांदीना खतपाणी देत समाजाची प्रकृती नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला असतो. म्हणून त्यांना बंदी केलेली असते. त्यांचे सर्व म्हणणे, त्यांचे सर्व विचार, भावना या समजावून घेतल्या असतात. त्यांना त्यांची बाजू व्यक्त करण्यास संपूर्ण मुभा दिलेली असते. सारे होऊनच काही काळासाठी त्यांना सजा व बंदी केलेले असते.

    एखाद्या सामान्य माणसापेक्षा या कैद्यांचे जीवन अत्यंत आनंदाचे, समाधानाचे व सुखसोईंनीयुक्त असे वाटते. फक्त चार भिंतीच्या आत राहणे येवढेच बंधन. परंतु जे बाहेर कुणाला सहज मिळत नाही ते त्यांना मिळते. नव्हे ते त्यांना मिळण्याचा जवळ जवळ अलिखीत अधिकार प्राप्त झालेला असतो. चांगले जेवण, चांगले पाणी, चहा, कॉफी व दूध देखील भरपूर प्रमाणात मिळते. जर खाण्यापिण्यात कर्माचाऱ्यांनी हलगर्जीपणा केला व चूक झाली तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होते. त्यांना जाब विचारला जातो. चांगली कारवाई होते. कॉलीटी योग्य, योग्य धान्य, फळे, भाजी हे पुरवले जाते. त्याची नियमित वैद्यकीय तपासणी होत असते. त्यात कोणतीच कमतरता पडू दिली जात नाही. जे सामान्यांना बाहेर श्रम करुन देखील संपूर्ण कुटुंबाला जे मिळत नसते ते या कैद्यांना मिळते. याच कारणाने अनेक कैदी सतत बाहेर कोणता तरी गुन्हा करुन तिथे येण्याचा प्रयत्न करतात हे अभ्यासले आहे. बाहेर न नोकरी न धंद्याच्या सोई, न तो करण्याची मोकळीक. पोटभर कमविण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतात. अनेक प्रशासकीय शिस्तीचा बडगा त्यांच्या भोवती असतो. गंमतीची गोष्ट म्हणजे तो फक्त ‘शिस्तीचा, नियमाचा बडगा’ एवढेच हत्यार असते. त्याचा केव्हाच खऱ्या मार्गाने उपयोग केला जात नाही. फक्त धाक आणि तो कशासाठी तर त्या धाकातून होणाऱ्या भ्रष्टाचारासाठी. सर्व केवळ लूटालूट असते.

    मग ‘हम सब चोर है’ या तत्त्वांनी ही माणसे बिनधास्त गुन्हे करतात व जेलमध्ये येतात. कशाला भ्यायचे, कुणाला भ्यायचे? हे मूळ प्रश्न त्यांच्याकडे नसतात व का असावे. कारण जर सर्वच चोर असतील म्हणजे काही शाहू, सभ्य तर काही शिरजोर गुंड. कोणतीच नितीमत्तेची रेखा कोठेच आढळत नाही. खानदानी, संस्कारीत, परंपराचे श्रेष्ठत्व हे सारे शब्द इतिहास जमा होवू लागले आहे. मग सारेच बदमाश हरामखोर या सदरांत येवून जातात. जो पकडला गेला तो चोर. जो पडला तोच मुर्ख ठरतो. इतर सारे मान सन्मान प्राप्त, हे बिरुद घेऊन आपल्या मनाला, आत्माला चक्क फसवित जगत असतात.

    ‘कैदी देखील मानव आहेत’ हे तत्त्वज्ञान A.C रुममध्ये सुरक्षित बसणारे महान व्यक्ती गुणगान करताना दिसतात. त्या दृष्टीने कैद्यांच्या मनाचा मागोवा घेत, जेलचे वातावरण फिरते. त्यांना चांगल्या खाण्या-पिण्या बरोबर परवानगीने त्यांच्या तल्लफींच्या सवयींची काळजी घेतली जाते. नाते संबंधी, मित्र मंडळी यांना नियमीत भेट दिली जाते. सहीली देखील काढल्या जातात. झोपण्यासाठी चांगले पांघरुण दिले जाते. स्नान, स्वच्छतासाठी भरपूर पाणी असते. सर्व प्रकारचे पेपर्स, लायब्ररी, खेळासाठी सर्व साहित्य, रेडीओ, टिव्ही इत्यादी व्यवस्थित असते. कोणत्याही मध्यम वर्गामधल्या व्यक्तीला आपल्या जीवनचक्रात जे मिळते, प्राप्त होते ते सारे सारे त्याला त्यांच्या गरजांना पूर्ण केले जाते. डॉक्टर आहेत, औषध आहे, काय नाही सर्व काही मोफत असते. शिवाय कोणतीच शिक्षा नाही. अंगाला स्पर्शही केला जात नाही. नियमीत सांस्कृतिक कार्यक्रम, गाणे, नाटक, भाषणे, करमणूक व ज्ञान प्रदान गोष्टी होतात. थोडासा विचार करा जे त्यांना बाहेर कष्ट करुन. मर मर मरुन मिळत नाही ते सर्व फुकट त्यांना मिळते. मग जेल कशासाठी – फक्त चार भिंतीच्या आत ठेवण्यासाठी. बस शब्दांचाच हा खेळ आहे. अटक, बंदीस्त, जेलची हवा इत्यादी, ज्यांना थोडीशी शरम असेल, इज्जत असेल तीच माणसे या शब्दांना घाबरतात. त्यांना महत्त्व देतात. परंतु आजपर्यंत तरी कुणी महाभाग दिसला नाही. जो या बंदीस्तपणाच्या संकल्पनेला दचकून आहे. अनेक पुढारी, नेते, तथाकथीत संतमंडळी, महाराज इत्यांदीनी पण जेलची हवा चाखली व ते तेथेही अत्यंत समाधानी असल्याचे चित्र अनेकांनी बघीतले आहे.

    सामान्य नागरीकांच्या पैशावर पोसत असलेली ही बांडगुळे आहेत. जेल म्हणजे काय या संकल्पनेचा विचार करण्याची खरी गरज आहे. गुन्हा, गुन्हेगार व शिक्षा या बंदिस्त त्रिकोणाचा समाजाच्या आरोग्यासंबंधी गंभीरतेने विचार व्हावा. मानव, मानसिकता, दया, प्रेम या भावनिक शब्दांचा खेळ, तीच माणसे करतात. ज्यांना या असल्या गुन्हेगारांचा दुरान्वये संबंध येत नाही. ज्यांचे जळते त्यांनाच कळते म्हणतात.

    कोणत्याही शिक्षेत रानटीपणा भयानकता, तिरस्कार वाटेल तशी योजना नसावी. परंतू शिक्षा ही एक धाक, जरब, भीती या भावना स्थापन करणाऱ्या मिश्रीत असाव्यात.

    बलात्कार करणाऱ्यालासुद्धा भावना असतात. तो देखील माणूस आहे. चुका करु शकतो. त्यांना पण दया दाखवा. असे बेछूट तत्त्वज्ञान सांगणारे आता बदलत आहे. बलात्कार पीडीत व्यक्तीला न्याय मिळावा असे त्यांना पण वाटू लागलेले आहे. शिक्षा व गरज पडल्यास फाशीची शिक्षा द्या असे लोक म्हणू लागले या कारणाने.

    शिक्षा, अटक, जेल याचा खऱ्या अर्थाने पुर्नविचार व्हावा. ती एक गरज आहे. समाजाच्या चांगल्या आरोग्यासाठी.

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • मानसिक तणाव- (क्रमशः पुढे २ वर चालू- – -)

    मानसिक तणाव- (क्रमशः पुढे २ वर चालू- - -)

    दैनंदिनीच्या जीवनामध्ये एक प्रकार दिसून येतो. जेथे Repetition of action होत असते. तेथे काहीतरी खूणा पडतात. गावात बघितले असेल की विहिरीवरील दगडावर घर्षण होऊन दगड झिजून जातो. दगडावर फक्त ज्या ठिकाणी दोर घासली जाते त्याच ठिकाणी खूणा पडतात. मजूर वा शेतकरी कामे करत असताना, हातापायांच्या ठराविक भागी जेथे सततचे घर्षण होत राहते. भाग कठीण होतो. जाडसा होतो अथवा त्याचे पापूद्रे निघून - Pilling Off होत जाते. ह्याचा एकच अर्थ, जेव्हा त्या भागावर सतत त्याच प्रकारचा आघात होत राहतो, परिणाम दिसून येतो.

    मेंदूचे कार्य अर्थात विचार करण्याचे. आणि हे कार्य सतत होत असते. विचारांची उत्पती हे जिवंतपणाचे लक्षण असून, त्यामुळे मेंदूला सतत चेतना मिळत राहते. मेंदूचे हे एक प्रकारे खाद्यच आहे. असे म्हटले तर वावगे ठरु नये. विचारांचे मार्ग एका दिशेने जाणे चागंले. त्याला लय असते. विचार भरकटत राहणे चांगले नव्हे. मनन, चिंतन, ध्यान creative विचार शोधबुद्धीचे विचार आध्यात्मिक विचार हे मेंदूला एकप्रकारे शांतता देते. त्याला कारण विचारांना एक दिशा, लय असते. विचार जेव्हा विखूरलेले असतात धावपळ करतात असंबध असता आणि सर्वांत निर्माण होणे हे धोक्याचे ठरते. अशी वैचारिक ठेवण शरिराला म्हणजे इतर अवयवांना धोका वा आघात निर्माण करु शकतात. ह्यालाच आपण तणाव म्हणतो. विचार करणे हेच तर मेंदूचे कार्य परंतू जेव्हा तोच तोच विचार सतत घोळत राहतो तणाव निर्माण करतो.

    माणसाला विवेक शक्ती दिलेली आहे. घटनांचे विश्लेषण करणे, त्यामधली सत्यता, नैसर्गिक परिणाम, जीवन चाकोरीवरील त्याचा आघात हे सारे आपण विवेकी विचारांनी ठरवू शकतो.

    होणाऱ्या घटनेत तुमच्या विचार करण्याने काही बदल होऊ शकतो. आणि जेव्हा हे आपल्या मनाला चांगले मान्य होते, तेव्हा तो विचार बाद करणे काढून टाकणे,त्याला प्रयत्नपूर्वक मनात येवू न देणे चांगले. जर तुमची विवेकबुद्धी, समजदारी सुस्थिर असेल तर तुमचे गैरविचार उत्पन्न होण्याच्या प्रक्रियेला तुम्ही रोखू शकता. अशा विचारांना चालना न देणे, त्याच्या लयीमध्ये न जाणे हे तुमच्या हाती असू शकते. तुमच्या स्वभावाची ठेवण ह्यास कारणीभूत असते. जो स्वभाव तुम्ही तुमच्या वागण्याच्या पद्धतीने निर्माण केलेला असतो. कित्येकजण प्रत्येक घटनाच्या प्रसंगाच्या मागे जावून त्यांत गुंतून राहण्यात समाधानी होतात. मग त्याचा संबंध नजदीकचा असो वा नसो. त्याच वृत्तीमधून त्या त्या घटनेबद्दल सतत विचार करण्याची सवय जडते. हेच विचारांचे चर्वण शरिराला धोकादायक ठरु शकते. ह्याचा परिणाम म्हणजेच मानसिक तणाव .

    २. एक उदाहरण देतो. कुणाचे १०० रुपये हरवतात तर कुणाचे १००० रुपये हरवतात. हे दोन्ही निश्चित की दोन्ही घटनांनी दुख होईल आणि विचारांच्या लगभगीमुळे तुमचे मन विचलीत होईल. कदाचित, ह्यालाच क्षणिक मानसिक तणाव संबोधता येईल. अशा मानसिक तणावांचा शरीरावर परिणाम होण्यासाठी असा तणाव सतत उत्पन्न झालेला असावा केवळ निर्माण झालेला विचार घातक नसतो तर तोच तोच विचार घोळत राहणे हे त्रासदायक असू शकते. येथे तुमचा स्वभाव विशेष असे होण्यास भाग पाडतात, पैसे हरवले ह्या बद्दल थोडीशी खंत करुन आपल्या विश्लेषणात्मक विचारांनी स्वत:ची समज घालतात आणि तो विचार मनांतून काढून टाकतात. ह्या उलट काही पैसे कसे हरवले ह्या बद्दल सतत सर्वांना वाच्यता करुन तोच तोच विषय घोळत राहतात. तणाव म्हणतात तो हाच. पैसे किती हरवले, नुकसान किती झाले ह्यावर मानसिक तणाव अवलंबून नसतो.

    निसर्गाने त्याच्या चक्रात अनेक लहान मोठे आणि काही तर भयावह प्रसंग निर्माण केलेले असतात. परंतू त्याचवेळी स्व सान्तवन, समजदारी प्रसंगामधून पुन्हा उभारी येण्याची कला माणसाला दिली आहे. अशी कला ही उन्नत करावी लागते. त्याचवेळी कोणत्याही दुर्धर प्रसंगाची धार बोथट होऊ शकते. सुसह्य होवू शकते. अशाच वृत्तीची माणसे मानसिक तणावापासून आपला बचाव करु शकतात.

    १०० रु याच्यापेक्षा १००० रु हरवणे म्हणजे जास्त मानसिक तणाव हे वैद्यकिय शास्त्रामध्ये साधे अंकगणित नव्हे. किती रुपयाच्या हानीचा विचार कितीवेळा हेच गणिताचे उत्तर ठरवितो.

    थोडेसे वैद्यकिय विश्लेषनाकडे जावू या. मेंदूमध्ये विचार करण्याचे एक अवयव असते. ते सतत चेतना मिळून कार्यरत असते. म्हणून विचार धारा सतत वाहत असते. जसे ह्रदयाचे ठोके, श्वासोच्छवास, तसेच मेंदूचे विचार कार्य सतत Non-Stop चालू असते. अगदी झोपेमध्ये -विचार उत्पन्न होतो, पसरतो आणि नाहीसा होतो. ही समजण्यास सोपी चक्र- रचना. विचारांची साठवण होत जाते. काळाप्रमाणे व प्रसंगाच्या तिव्रतेनुसार आठवणी लोप पाऊ लागतात.

    जर विचार मंथनाचा आलेख काढला, तर हे एक सत्य आहे की विचार उत्पन्न होताच, तो पूर्णतेने आघात करतो. मग त्याला उत्पन्न करणारी चेतना कितीही छोटी असो. ग्राफ काढला तर काटा प्रत्येक विचार चेतनेला प्रथम सर्वोच्य जागी नेतो. व नंतर पायापाशी येत असतो. लहान चेतनेचा विचार आलेख चटकन पायाजवळ जाईल व जर चेतना फार प्रभावी असेल तर तीला पायाजवळ येण्यास वेळ लागेल. अर्थ असा की १०० रु. हरवले हे दोन दिवसांत विसरले जातील. वा १००० रु हरवलो हे चार दिवसात (समजण्यासाठी)

    ३. मात्र दोन्ही चेतना उत्पन्न होताना, विचारातील सर्वोच्य जागी गेल्याचे दर्शविले. जेव्हा विचार उत्पन्न होतो, तेव्हा तो प्रथम सर्वोच्य बिंदू गाठतो. असेच विचार सतत उत्पन्न होत राहतील तर प्रत्येक वेळी ते सर्वोच्य बिंदू गाठत राहतील. येथे मानसिक तणावाचा संबंध येतो. सतत तोच तोच विचार करण्यामुळे, विचार चेतना सतत जागृत राहते. हेच धोक्याचे ठरु शकते. त्यालाच मानसिक तणाव निर्मिती म्हणतात. तुमची वैचारिक ठेवण कशी असते, तुमच्या स्वभावाची ठेवण कशी तयार झालेली असते हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. वैचारिक घटनांची सतत उजळणी करण्याचे त्या घटनांचे विश्लेषण करीत राहण्याचे काहींचे स्वभाव बनलेले असतात. अशी माणसे विचारांच्या विश्लेशनात्मक बाबींना फारसे महत्त्व देत नसतात. ते भावनिक बाबींना सतत समोर आणून भावनिक विश्लेषण करीत राहतात. त्यामुळे अशी माणसे तो विशिष्ट विचार मनातून दूर शकत नाहीत. स्वत:ला असमर्थ ठरवितात. विचार केला तर अशा भावनिक बाबींवर विचारला व्यवहारिक दबावाने, सत्य परिस्थितीचे अवलोकन करुन छेद देणे अशक्य नसते. ते अशी माणसे करीत नाहीत. अशानाच मानसिक तणावाला सामोरे जावे लागते.

    मी माझे एक मित्र बघितले मी. वैद्य ते आणि मी गेली पाच वर्षे सततच्या सहवासात आहोत. दररोज संध्याकाळी भेटतो. बागेत फिरण्यास जातो. गप्पा-टप्पा होतात. सामाजिक विषय, राजकारण, देवधर्म बदलत जाणारा समाज, भूतकाळातील नोकरी व्यवसाय ह्यामधल्या रोमांचित प्रसंग इत्यादी विषयावर सततच्या गप्पा गोष्टी होत असतात. कुटूंब वा वैयक्तीक जीवनावर केव्हाच भाष्य होत नाही. संध्याकाळची निरामय वेळ कशी घालवावी व आनंद घ्यावा ही सर्वसाधारण धारणा.

    एका प्रसंगामध्ये मी सहज विचारणा केली, वैद्य साहेब आपण कुठे राहता? त्यांनी सोसायटीचे नाव सांगितले. घरी कोण कोण असते? आम्ही दोघेच. मी व माझी पत्नी. तुम्हाला काही मुले? मी चौकशी केली. वैद्य एकदम गप्प झाले. “नशीब आमचे, २७ वर्षांचा मुलगा होता. तरूण मुलगा, चांगल्या कंपनीमध्ये नोकरीला.

    आमच्याकडे राहयचा. दुर्दैवाने अपघात झाला व त्यातच तो खलास झाला.” वैद्यांचे डोळे पाणावले होते. आज त्याला जाऊन तीन वर्षे झाली. ते खिन्न मनाने सांगत होते.

    स्वत:चा एकूलता एक मुलगा, तरूण जीवनाच्या चक्राला हातभार लावणार आणि काळाच्या आघातामध्ये एकदम पडद्याआड होणे ही किती भयावह व दुख:द घटना आहे. मला नाही वाटत ह्या घटनेपेक्षा कोणत्याही घटनेची तिव्रता जास्त भयावह व परिणामर करणारी असू शकेल. परंतू एक गोष्ट मला जाणवली की माझा व वैद्यांचा सहवास पाच वर्षांपासून सततचा होता. परंतू तरीही मला ह्या घटनेची केव्हाच चाहूल लागली नाही. त्यांनी कधीच वाच्यता केली नाही. न कोणता प्रसंग निर्माण झाला की ह्यांनी ती मला इतरांना सांगावी.

    ४. ह्यालाच स्वभाव विशेष म्हणतात. घटना घडली, तुफान निर्माण झाले, ते वादळच होते. थोड्याशा वेळेनंतर स्थिरस्थावर झाले. वैद्य रडले असतील, ओरडले असतील, त्यांची झोप, भुक काही दिवस त्यांना साथ सोडून गेली असेल. दुख:च्या त्या कोसळलेल्या डोंगरानी कोपाता आघात केला नसेल. परंतू ते दुखः ही पचविले होते. काळ प्रत्येक गोष्ट, प्रत्येक आठवणी विसरण्यास सतत मदत करीत असतो. निसर्गाचे हे चक्र आहे. ही इश्वरी इच्छा म्हणून त्याला आपण मान्यता द्यावी ही समजदारी. जी माणसे त्याला वैचारीक विश्लेशन करुन विसरत नाहीत, प्रसंगाना बाजूस सारत नाहीत, भावनीक चक्रातच अडकून राहतात,त्यानाच मानसिक तणावाला सामोरे जावे लागते.

    एखादी भयानक, दुर्भाग्यपूर्ण, सहनशक्तीचा अंत बघणारी घटना घडते - जसे सख्यातल्याचा अनैसर्गिक मृत्यू, जन्मभर साठवलेली पूंजी नष्ट होणे, इत्यादी - एकदम प्रचंड आघात होतो, दुःखाचा डोंगर कोसळतो, हे नैसर्गिक आहे. परंतु ह्यातून स्वतःला सावरणे है काहीजण करतात. जीवनाच्या सुख दुःखाच्या चक्राचा विचार करतात. दुनियामे आये है तो जीनाही पडेगा । जीवन हे जहर तो पिनाही पडेगा । हे तत्वज्ञान ही मानसे बाळगतात. अशीच माणसे तणावमुक्त जीवन जगू शकतात.

    क्रमशः पुढे ३ वर चालू –

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • कैलास मानसरोवर यात्रा

    देवाधिदेव महादेव श्री शिवशंभू आणि जगनमाता पार्वतीदेवी यांचे परमपवित्र निवास स्थान म्हणजेच कैलास पर्वत. जगामध्ये अस्तित्वात असलेल्या निरनिराळ्या धार्मिक पवित्र स्थळांमध्ये कैलास पर्वत आणि त्याच्या नजिकच पसरलेले मानसरोवर ही दोन तीर्थक्षेत्रे सर्वाधिक महत्त्वाची, मोठी आणि प्रथम क्रमांकाची मानली गेली आहेत. शिवपुराणामध्ये असा उल्लेख आहे की कैलास दर्शन आणि मानसरोवर स्नान ज्याला नशिबाने प्राप्त झाले त्या व्यक्तीच्या सात पिढ्यांचा उद्धार होऊन जातो. अर्थात हा श्रद्धा व भावनेचा भाग आहे. परंतु, एक मात्र सत्य आहे की कैलास दर्शन हा जीवनामधला अत्यंत रोमांचकारी, दुर्मिळ आणि कृतकृत्य वाटणारा अनुभवी प्रसंग आहे. सारे जीवन यथार्थ झाल्याचे मानसिक समाधान मिळते. नास्तिक देखील त्या सत्य शिव आणि सुंदर यांचे प्रतिक दिसणाऱ्या कैलास पर्वताच्या दर्शनाने नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक भाविक तर कैलास दर्शन घेताना आनंदाच्या अश्रुंनीच त्या शिव परमात्याला अभिषेक करताना दिसतात. त्यांचे ह्रदय भक्तिभावाने उंचबळून येते. कुलस्वामिनी अथवा कुलदेवता यांची कृपादृष्टी आणि वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद यांच्यामुळे कैलास-मान सरोवर ही यात्रा निर्विघ्न पार पडते. सनातन धर्मी, बौद्ध धर्मी, निरनिराळ्या धर्माचे अनुयायी ही यात्रा करताना स्वत:ला धन्य समजतात. जगामधील सर्व तीर्थयात्रांमध्ये सर्वाधिक दुर्गम, अत्यंत कठीण आणि म्हणून साहसी अशी ही यात्रा आहे. परंतु त्याचबरोबर सर्वाधिक पवित्र व मंगलमय आनंदी असल्यामुळे, भाविक सारे कष्ट सहन करुन तो परमानंद मिळवतात.

    कोणत्याही तिर्थयात्रेचे स्थान म्हणताच डोळ्यापुढे उभे राहतात ते मंदीर आणि त्यामधील निरनिराळ्या देवतांच्या मूर्ती, मंदीराचे उंच कळस, डोंगरावर उभी असलेली भव्य कलाकृती, पूजा अर्चा, पुजाऱ्यांची धावपळ, आरत्या, शंख-घंटेचा निनाद, फुले, पूजा साहित्ये यांची दुकाने आणि भाविकांची वर्दळ. कैलास तीर्थ यात्रेचे चित्र एकदम वेगळेच आहे. वरिल कोणत्याच गोष्टी त्या तीर्थ क्षेत्रात दिसून येत नाही. नाही तेथे मूर्ती, ना मंदीर, ना पूजा- अर्चा, ना भाविकांची वर्दळ. एक अतिउंच, गोलाकार बर्फाच्छादित असा पर्वताचा एक भाग आहे. हिमालयाच्या पर्वताचाच एक भाग कैलास पर्वत आहे. दुरवरुन बघताना एक अवाढव्य अशी शिवलिंगाकार आकृती भासते. भस्माचे पट्टे आणि ध्यानमूर्ती शिवप्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. शिवपार्वतीचे असे हे पवित्र निवासस्थान आणि त्या कैलास पर्वातानजिकच पसरलेले एक प्रचंड सरोवर - मान सरोवर म्हणून प्रसिद्ध आहे. कैलास पर्वत शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १९ हजार फूट असून, मान सरोवरचा परिघ ९० किलो मीटर इतका लांब आहे. तिबेटच्या हद्दीत असलेल्या त्या कैलास पर्वतावर आजतरी राजकीय हक्क चीन या देशाचा आहे. मान सरोवराच्या उत्तरेस कैलास पर्वत आहे.

    २ हा सदैव बर्फाच्छादीत असतो. इतर सर्व परिसरावर लहान मोठे दगड, माती रेती असून तिथे एक देखील मोठे झाड कुठेच दिसून येत नाही. सारे काही बोडखे वाटते. गवत आणि लहान लहान झुडपी मात्र सर्वत्र दिसून येते. अतिशय थंडी, वारा, पाऊस, हिम बर्फाचा वर्षाव, बर्फावरुन परावर्तित झालेली सूर्याची प्रकाश किरणे डोळ्यास झगझगाट निर्माण करतात. सर्व वातावरण सदैव बदलत राहणारे असते. हे सारे असून देखील प्रत्येक रात्री भक्तीभावाने त्या शिव परमात्म्याच्या अत्यंत पवित्र अशा निवासस्थानाचे दर्शन घेण्यास अती उस्तुक असलेला जाणवतो.

    जीवनातील सर्वोत्तम पवित्र तीर्थक्षेत्र कैलास-मान सरोवर आपण देखील जावून बघावे, दर्शन घ्यावे, त्याची परिक्रमा करावी आणि मानसिक शांती समाधानाचा परमोच्च अनुभव घ्यावा ही सुइच्छा प्रत्येक भाविक नागरिकाच्या मनामध्ये येणे साहजिकच आहे. त्यादृष्टीने कैलास-मानसरोवरच्या तीर्थयात्रेसंबंधी ज्या सर्वसामान्य शंका असतात, त्या येथे सांगण्याचा प्रयत्न करतो. भाविकास ती यात्रा करुन धन्यता मिळवता येईल. ॐ शिवपार्वतीच्या कृपेने कैलास मानसरोवर यात्रा १९९७ च्या पहिल्याच गटामध्ये आम्हा दोघा पती-पत्नाला प्रवेश मिळून, ती कठीण परंतु अत्यानंद देणारी यात्रा, आम्ही जून १९९७ मध्येच सुखरुपपणे करुन आलो. त्यामुळे स्वानुभवानेच त्या यात्रेची माहिती इतरांसाठीही देत आहोत.

    कोणतीही यात्रा म्हटली ते ठिकाण, तिथे जाण्याचे मार्ग, राहण्या-उतरण्याची व्यवस्था, यात्रेसाठी येणारा सर्वसाधारण खर्च, प्रवासात लागणाऱ्या गरजेच्या वस्तू, वाहनाची सोय आणि त्या विशीष्ट प्रवासात लागणाऱ्या बाकींची पूर्तता या सर्वांच्या मार्गदर्शनासाठी यात्री उत्सुक असतो.

    कैलास मानसरोवर यात्रेची पूर्वतयारी

    • पहिली गोष्ट म्हणजे त्या कठीण आणि दुर्गम यात्रेस जाण्याच्या विचाराप्रमाणे च पक्का दृढनिश्चय आणि उत्स्फूर्त मानसिक इच्छा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
    • उंच पहाडी भागातील चढण-उतरण सारखी करावी लागते. प्रवास साधारण दहा किलोमीटर दररोज पायीच करावयाचा असतो. त्यामुळे जाण्यापूर्वीच दोन महीनेतरी दररोज दूरवर पायी फिरण्याचा व्यायाम वा सवय निर्माण करावी म्हणजे यात्रा सुकर होण्यास मदत मिळेल.
    • १९००० फूट उंचीवर (हाय आल्टीट्यूड) हवामान विरळ असून प्राणवायूचे प्रमाण कमी असते. श्वासोच्छवास करताना कठीण जाते व छाती भरुन आल्याप्रमाणे

    ३ जाणवते. तेव्हा श्वासाचे व्यायाम, दीर्घ श्वास ठेवून सोडणे, प्राणायाम इत्यादीची सवय केल्यास ऑक्सीजन टेन्शनचा परिणाम कमी जाणवतो.

    शारिरीक प्रकृती नियमित व्यायाम आणि आहार यांच्या साह्यायाने सुदृढ व निरोगी ठेवण्याचा सतत प्रयत्न करावयास हवा.

    लागणारी प्रमाणपत्रे (ही दिल्लीच्या परराष्ट्र व्यवहार खात्यास लागतात.) पासपोर्ट, वैद्यकीय प्रमाणपत्र हे एखाद्या रजिस्टर मेडीकल प्रॅक्टीशनरकडून मिळवणे. सोबत काही वैद्यकीय चाचण्याचे रिपोर्टस हवेत. हिमोग्लोबीन, इएस आर, टि.एल. सी. डि.एल.सी, लघवी, संजास, रक्तामध्ये बल्ड शुगर, युरिया, क्रियेटीनीन, बीलीरुबीन, ब्लड ग्रुप महत्त्वाचे. छातीचा क्ष किरण आणि स्ट्रेस इसीजी (टि.एम.टी)

    • जर तुमच्याकडे कॅमेरा किंवा व्हीडीओ कॅमेरा असेल तर त्याचा मेक, सिरीअल नंबर कागदावर लिहून खाली मालकाचे व, गाव, पत्ता लिहून ठेवावा काळजीसाठी.

    प्रवासामध्ये लागणारे कपडे आणि इतर वस्तू

    सर्व कपडे साधारण वजनाने हलके, गरम, वारा व पाणी ह्यापासून बचाव करणारे असावेत. विन्ड फ्रुप जाकेट, स्वेटर्स, (२ नग लांब बाह्याचे व १ नग हाफ बाह्याचे, माकड टोपी, व वुलनच हात मोजे (२ नग), वुलनचे लाँग पायमोजे (२ नग), कॉटन पायमोजे (४ नग), जीन्स किंवा पँट (३ नग) शॉर्टस (२ नग), शर्टस किंवा टी-शर्ट (४ नग), सन ग्लासेस, हंटर किंवा मार्चिंग किंवा ट्रेकिंग बुट (२ नग), क्रिकेटमध्ये घालतात तशी टोपी वेताची फेल्ट हॅट (सूर्य प्रकाशाच्या बर्फावरुन परावर्तीत झालेल्या कीरणांपासून संरक्षण करता यावे म्हणून) पाण्याची बाटली, विजेरी (दोन जादा सेल्स व एक बल्ब जादा घेणे), रेन कोट (लांब आकाराचा, शक्य असल्यास शर्ट पँट असे वेगळे असल्यास चांगला) बेल्ट पाऊच ज्यात कॅमेरा, पैसे, पासपोर्ट व गरजेची थोडी औषधी घेता येईल, प्लास्टीकचे मोठे शिट सामानावर गुंडाळता येऊन पाण्यापासून रक्षण होऊ शकेल, चालण्याची एक काठी, प्लेट-मग-चमचा-वाटी, टॉयलेट पेपर वा टिश्यू पेपर (२ रोल) सूर्य प्रकाशापासून रक्षण करणारे तोंडास लावणारे लोशन (हाय आल्टीट्यूड अर्थात उंचावर सूर्य प्रकाशामधील अल्ट्रा व्हायलेट किरणांमुळे उघड्या भागातील चमडी काळी पडते, जळून जाते व चेहरा काळा होतो म्हणून) मेणबत्ती, काड्याची पेटी किंवा लायटर, लहान चोकू, रबर स्लिपर, वाजवण्याची शिट्टी, वही, पेन

    प्रवासाची व्यवस्था

    वर्षभरात फक्त जून ते सप्टेंबर ह्या चार महिन्याच्याच कालावधीमध्ये कैलास- मानसरोवर यात्रेचे आजोजन केले जाते. त्याच काळामध्ये चीनचे सरकार यात्रेकरुस त्या भागामध्ये जाण्याची परवानगी देते आणि तेही फक्त पाचशे यात्रेकरुनांच. तेव्हा भारत सरकारतर्फे अंदाजे ३५ यात्रेकरुचा एक गट याप्रमाणे विभआगून १५ गट थोडे दिवसाच्या अंतराने दिल्लीहून पाठविले जातात. उत्तर प्रदेशातील शासनांर्गत कुमाऊ मंडळ विकास निगम संस्था आहे. या संस्थेतर्फेच सर्व यात्रेचे आयोजन केले जाते. ही संस्था भारतीय परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून चीनच्या हद्दीत जाण्यासाठी लागणारा व्हीसा आणि इतर सोपस्कार पूर्ण करते. यात्रा दिल्लीपासून सुरु होत असल्यामुळे यात्रींची दिल्लीतच राहण्याच्या व्यवस्थेपासून यात्रेमधील पुढील सर्व टप्याटप्याची राहण्याची, जेवणाची आणि प्रवास वाहनांची सोय कुमाऊ मंडळातर्फेच केली जाते.

    साधारणपणे मार्च महिन्यापासून संपूर्ण भारतामधून भारतीय परराष्ट्र खात्याच्या ईस्ट एशीया डिव्हीजनतर्फे कैलास मान सरोवरच्या तीर्थयात्रेस जाण्यास उत्सुक असलेल्या व्यक्तींकडून अर्ज मागविले जातात. त्याची छाननी होऊन निवडलेल्या व्यक्तींना निरनिराळ्या गटांत विभागले जाते. क्रमाक्रमाने त्या व्यक्तीस त्याच्या निवडीबद्दल अवगत केले जावून पुढील कार्यक्रमाचे मार्गदर्शन केले जाते.

    प्रवासामध्ये घोडा भाड्याने उपलब्ध असतो. किंवा आपल्या हातातील सामान घेवून जाण्यासाठी त्याचप्रमाणे प्रसंगी अवघड चढणावर आपले धरुन मदतीसाठी मदतनीस अथवा पोर्टर पण मिळतात. त्यांना रोजदारी घ्यावा लागते. घोडा किंवा पोर्टर हे सुरवातीपासून आपल्या सेवेत घ्यावे लागतात. प्रवासाच्या अधेमध्ये ते मिळत नाहीत. वयस्कर अथवा अशक्त यात्रेकरुंनी त्यांची सोय निश्चित करणे अत्यंत जरुरीचे असते. अर्थात हा येणारा खर्च प्रत्येकास स्वतंत्रपणे करावा लागतो. सर्व दर जाणून घ्यावे, ते बदलत असतात.

    चीनच्या हद्दीमध्येसुद्धा घोडा / पोर्टर / याक प्राणी प्रवासामध्ये मिळतात. त्यांचादेखील खर्च यात्रीस करावा लागतो. कुमाऊ मंडळाचे कर्मचारी यात्रीस याबद्दल मदत करतात.

    राहणे व खाणे यांची सोय

    कुमाऊ मंडळ या बाबींची सोय करते. ठराविक अंतरावर मुक्कामाची व्यवस्था केली गेली आहे. या ठिकाणी मोठे बॅऱ्याक्स बांधलेले असून झोपण्यास अंथरुण, गरम पांघरुण दिले जातात. स्वतंत्र पलंगही काही ठिकाणी उपलब्ध असतात. पाणी, संडास, बाथरुम यांची उत्तम सोय असते. वीज नसल्यामुळे काही ठिकाणी जनरेटरच्या साह्यायाने वीज पुरवठा

    ५ करुन देण्याची सोय केली जाते. यात्रींसाठी देन वेळा गरम जेवण, सकाळचा नाष्टा, दोन्ही वेळा चहा, गरम सूप दिले जाते. जेवण हे संपूर्ण शाकाहारी असून भात, भाजी, चपाती, पापड, लोणचे, उसळी, सॅलड आणि एखादा गोड पदार्थ देखील दिला जातो. प्रवासी थकवा आणि हाय आल्टीट्यूडचा परिणाम होऊन सर्वांचीच भूक मात्र बरीच मंदावते असे दिसून येते.

    चीनच्या हद्दीमध्ये मात्र खाण्याची बरीच गैरसोय झाल्याचे जाणवते. फक्त सुरवातीच्या मुक्कामात तकलाकोट येथे चीनी पद्धतीचे जेवण मिळते. सर्व उकडलेले नुडल्स, भात, ब्रेड इत्यादी. शाकाहारी असते. नंतरच्या प्रवासात मात्र जेवणाची गैरसोय झाल्याचे जाणवते. आमच्यावेळी आम्ही शिधा बरोबर नेला होता. त्यांनी भांडी व इतर साहित्य दिले. सर्व यात्रींच्या एकोप्याने आम्ही जेवणाची सोय करुन वेळ निभावून नेली.

    या प्रवासात विशेषकरुन चीनच्या भागात खाण्याचे हाल होऊ नये म्हणजे सर्वांनीच ड्राय फूड्स जेस काजू, बदाम, मनुका, चिकी, बिस्कीटटे, खाऱ्या डाळी, चिवडा, गोळ्या, फरसाण, खाकरे, लाडू, खारीक, पेंडखजूर इत्यादी खाद्य साहित्य घेवून आपली भूक थोडीशी हलकी केली. त्याचप्रमाणे यात्रेकरुने १०-१२ दिवसाच्या काळासाठी पूरेल असा. सुका मेवा बरोबर न्यावा.

    चीनच्या संपूर्ण प्रवासात कुठेही चहा किंवा काही खाण्याची हॉटेल्स, धाबे व टपऱ्या दिसून येत नाही. भारतीय हद्दीत काही ठिकाणी चहा, बिस्किटे वा भाजीपूरी देणाऱ्या टपऱ्या दिसल्या.

    औषधी

    भारतीय हद्दीमध्ये मंडळातर्फे एक वैद्यकीय अधिकारी बोरबर असतो. त्याचप्रमाणे सर्व गटामध्ये यात्रेकरुमची निवड करताना एक दोन तरी वैद्यकीय ज्ञान असलेले यात्रेकरु प्रत्येक गटात सामील केले जातात की ज्याचा इतरांना आपातकाली उपयोग व्हावा. दिल्लीलाच प्रत्येक यात्रेकरुला एक फर्स्ट एड किट दिले जाते. तरी देखील प्रत्येक यात्रेस आपणांस लागणारी नेहमीची औषधी त्यावर ते कशासाठी हे लिहून व्यवस्थीत घ्यावात. त्याचप्रमाणे व्हॅसलीन पेट्रोलियम जेली थंडीत अंगास लावण्यासाठी घ्यावी.

    सामान

    प्रत्येक यात्रेकरुनी कोण-कोणत्या वस्तू न्यावयाच्या ते वरील यादीवरुन लक्षात ओलेच असेल. सर्वसाधारण प्रत्येक कपड्याचे चार चार जोड ठेवावे लागतात. कारण पाऊस पाण्याने खराब झाल्यास सुकवण्यास वेळ नसतो व योग्य जागा मिळत नाही. अंथरुण पांघरुण घेण्याची गरज नसते. ती दिली जातात. सामान अतिशय कलात्मक तऱ्हेने बांधावे लागते.

    ६ बॅग, पेटी वा सूटकेस घेण्यास परवानगी नसते. सामान खेचरावर लादावे लागते. कॅनव्हास बॅगच्या थैल्यामध्ये सामान घेवून वर पोत्याने बांधावे लागते. त्यावर प्लास्टीकच्या कव्हराने गुंडाळून, पुन्हा पॉलीथेन बॅगमध्ये बांधून घ्यावे लागते. त्यावर आपले नाव व खूण असावी. खेचरावर लादताना व काढताना सामानाची खूप फेकाफेक होते त्यामुळे ते निसटणार नाही. अशीच पक्की पॅकिंग करावी लागते आणि पावसापासून रक्षण करावे लागते. प्रत्येक व्यक्तीस २५ किलो पर्यंतच सामान घेण्याची परवानगी आहे. एका मुक्कामापासून दुसऱ्या मुक्कामापर्यंत कुमाऊ मंडळ सामान ताब्यात घेवून त्याची वाहतूक करण्याचे काम करते. प्रवास दिवसभराचा असल्यामुळे अत्यंत गरजेच्या गोष्टीच फक्त स्वत:जवळ बाळगाव्यात बाकी सर्व मुख्य सामान प्रवाहात द्याव्यात.

    यात्रेचा प्रवास

    दिल्ली पासून कैलास मानसरोवर जवळ जवळ ८६५ किमी दूर अंतरावर आहे. दिल्ली ते धारचुला हे ६४० मैलाचे अंतर रेल्वे आणि बसने पूर्ण करावयाचे असते. नंतर मात्र धारचुला जवळ तवाघाट पासून यात्रा पायी किंवा घोड्यावरुन करावी लागते. ही पायी यात्रा एकूण २२५ किमी इतकी आहे.

    दिल्लीस दिलेल्या तारखेस उतरताच कुमाऊ मंडळाने देवू केलेल्या सोईस प्रारंभ होतो. प्रथम अशोक यात्री निवास येथे उतरण्याची व्यवस्था केली जाते. दुसऱ्या दिवशी इंडो-तिबेटीयन बॉर्डस पोलिस हॉस्पीटलमध्ये जावून तुमचे सर्व वैद्यकीय प्रमाण पत्रे व प्रयोगशाळा रिपोर्टस तपासून पुन्हा व्यवस्थीत आरोग्य तपासणी होते. आरोग्याच्या दृष्टीने जे यात्री अती उंच व कठीण दुर्गम यात्रा करण्यास जे अपात्र ठरतील त्यांना यात्रेमधून वगळले जाते. अशाच प्रकारे प्रवासामधील भारत चीनच्या हद्दीजवळ गुंजी नावाचे पोलीस मुख्यालय आहे. ते जवळ जवळ समुद्र सपाटीपासून ११८८० फूट उंचावर आहे. तिथे पुन्हा दुसरी वैद्यकीय शारिरीक तपासणी होते. पहिल्या तपासणीत योग्य वाटलेल्या यात्रेकरुपैंकी काही अपात्र ठरण्याची शक्यता असते. त्यांना तिथून परत पाठविले जाते. या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची सूचना करावीशी वाटते की शारिरीक आरोग्य आणि सुदृढपणा याबद्दल अतिशय काटेकोरपणे बघीतले जाते. त्यामध्ये थोडीदेखील ढिलाई होत नाही.

    भारतीय हद्दीमधला प्रवास दिल्ली ते लिपूलेखपासपर्यंत असतो. तेथून पुढे चीनची हद्द सुरु होते. हा प्रवास ११ दिवसाचा असतो. अंतर व सोयीनुसार रात्रीचा मुक्काम जेथे होतो ती ठिकाणे म्हणजे दिल्ली नंतर अलमोडा (३७० किमी), धारचुला (२७० किमी), थोड्याच अंतरावर तवाघाट. येथून प्रवास डोंगराळ असून पायी प्रवास सुरु होतो. कोणतेही वाहन पुढे जात नाही. नंतर पांगू (२६ किमी), सिर्खा (१० किमी), गाला (१० किमी),

    ७ मालपा (११ किमी), बुधी (९ किमी), गुंजी (१५ किमी), काला पाणी (१० किमी), नवी डांग (८ किमी), लिपू लेख पास (७ किमी)

    लिपूलेख पास हा भाग समुद्र सपाटीपासून १६७३० फूट उंचावर आहे व येवून तिबेट अर्थात चीनचे राज्य सुरु होते.

    “ॐ नम: शिवाय” च्या मधूर आणि भक्तीपूर्ण भावनेने प्रत्येक यात्री नामस्मरण करत चालत राहतो. रस्त्यात जो कुणी वाटसरु भेटेल त्याला पण राम राम म्हणतो, त्याप्रमाणे “ॐ नम: शिवाय” म्हणताना व आपला आदर भाव व्यक्त करताना दिसतो. यात्रा ग्रुप सकाळी ५.३० ते ६ च्या सुमारास एका मुक्कामाहून कूच करते. सकाळी चहा व फराळ दिले जाते. हलके हलके. यात्री दुसऱ्या स्थानापर्यंत १ ते २ पर्यंत पोहोचतात. या ठिकाणी गरम गरम जेवण तयार ठेवलेले असते व यात्रेकरुंना येताच जेवण मिळते. दुपार व रात्र दुसऱ्या मुक्कामी थांबते व पुन्हा दुसऱ्या दिवशी सुरु होते.

    लिपूलेखपास नंतर सुरु होणारा प्रवासातील पहीला मुक्काम तकलाकोट येथे असतो. मोठे शहर असून सर्व तिबेटी वस्ती व चीनी भआषा प्रमूख असते. दुभाषीचा उपयोग करुन घ्यावा लागतो. चीनतर्फे दोन मार्गदर्शक दुभाषी मिळतात. सर्व सामानाची त्यांच्या कस्टमतर्फे तपासणी केली जाते. यात्रेबरोबर असलेल्या अधिकारी यात्रींची दोन ग्रुपमध्ये विभागणी करतो. एक ग्रुप (अ) कैलास पर्वताची परिक्रमा करण्यास जातो व दुसरा ग्रुप (ब) मान सरोवराची परिक्रमा करण्यासाठी जातो. प्रत्येक परिक्रमा करण्यासाठी चार-चार दिवस लागतात. कैलास परिक्रमेमध्ये तारचेन, दिरेबू, झॉग झेरबू ह्या ठिकाणी मुक्काम केला जातो. मान सरोवर परिक्रमेमध्ये होरे, चिगू, जैदी या ठिकाणी मुक्काम होतो. दोन्ही ग्रुप परिक्रमा करुन एका मुक्कामात एकत्र येवून पुन्हा परत तकलाकोटला परत येतात व परतीचा प्रवास सुरु होतो. कैलास पर्वत परिक्रमा खऱ्या अर्थाने अत्यंत कठीण असून पर्वत शिखर चढण्यासाठी ‘याक’ या तिबेटीयन केसाळ प्राण्याचा उपयोग केला जातो. बैलाप्रमाणेच हा प्राणी असतो. परंतु घोडा जेथे चढून जावू शकत नाही तिथे या प्राण्याचा वाहन म्हणून उपयोग केला जातो. अत्यंत शक्तीवान परंतु गरीब प्राणी म्हणून हा उपयोगात आणला जातो. रस्त्यात उंचावरचे ‘डोलमा पास’ अर्थात दयेची देवी ही भव्य शिळारुपी असून सर्वजण तिली श्री. पार्वती देवीचे महत्त्व देवून पूजा करतात. तसेच तिथे गौरीकुंड असून ते रस्त्यात लागते. रस्त्यामधील दिरेबू . मुक्कामाहून कैलास पर्वताचे अप्रतिम असे स्वरुप अत्यंत जवळून दिसते. तिथेच सर्व यात्री मिळून शिवपार्वतीला यज्ञ / हवनाद्वारे पूजा आरती करुन समाधान व आनंद मिळवितात.

    मानसरोवराची परिक्रमा त्या अथांग जलाशयाच्या काठाकाठाने करीत जैदी मुक्कामी तीर्थस्थान, पूजा पुन्हा हवन इत्यादी स्वइच्छेनुसार केले जातात व मानसिक समाधान

    ८ मिळवले जाते. तिथूनच कैलास मानसरोवराचे पवित्र जलतीर्थ यात्री आपल्या बरोबर घेवून जातात.

    परतीच्या प्रवास तकलाकोट नंतर पुन्हा त्याच मार्गाने धारचुलापर्यंत व तेथून बसने काठगोदामपर्यंत करुन पुढे रेल्वेने दिल्लीला येवून सर्व यात्रेचा समारोप होतो.

    आमची बॅच पहीलीच होती त्यामुळे जाताना भारतीय जनता पक्षातर्फे आम्हांस निरोप देवून रवाना केले गेले. आम्ही भाग्यवान समजतो की पूर्व पंतप्रधान मा. अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या हस्ते आमचे स्वागत होवून प्रवासाचा हिरवा कंदील दाखविला गेला. सर्व प्रवास अत्यंत समाधानाचा व आनंदाचा झाला.

    विनंती- वरील प्रवास वृतांत १९९७ सालवरील आधारीत आहे. त्यावेळी प्रवास फक्त शासकिय मदतीने होता. आज काल बऱ्याच खाजगी यात्रा कंपनी सहभागी झालेल्या आहेत. त्याचा अभ्यास व्हावा.

    जय हिंद जय महाराष्ट्र

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • कारखाना

    पांडबाच्या छपराच्या भोवताली धूर घोटळत होता.निळ्या रंगात वस्ती गुडूप झाल्ती.वस्तीवर सगळ्या घराच्या चुली पेटल्या होत्या.मसाला भाजल्याचा वास येत होता.काहीतरी गोडधोड ,मसालेदार खाण्याचा बेत सार्‍या वस्तीचा असावा असे वाटत होते. वस्ती धुंदाळल्यासारखी भासत होती. काळ्या कॅरीबॅगा वार्‍यानी उडून जात तराडाच्या झाडाला गुतल्या होत्या.येणारा जाणाराच्या नजरा रोखत होत्या.पळापळ वाढली होती.पोर्‍ही-सोरी लगबगीन इकडं-तिकडं पळत होत्या.गोठयातली जनावरं कावरी-बावरी झाली होती.

    रस्ता मात्र झोपलेल्या अजगरासारखा गच्च होता. येणारा-जाणाराची वर्दळ कमीच होती.गावाकडून बगीररोडानं येणारी मोटरसायकल दिसत होती.धुरळा उधळीत येत होती.पँटशर्टातली एकच व्यक्ती गाडीवर होती.मसुबाला वळण घेत ती गाडी नजरेच्या आवाक्यात येत होती.रस्त्यावरच्या बुचाडाजवळ ती थांबली.गाडी स्टँडवर लावून ती व्यक्ती हातात काहीतरी घेऊन येताना वस्तीवरच्या लोकांनी पाहयलं.

    "आमचे सर आल्येत..आमचे सर आल्येत" - सदाची पोर्गी वरडत गेली तव्हा कळल.
    वस्तीवरची लोक जमा व्हायला लागली.गावाचे मास्तर आल्येत म्हटल्यावर वस्ती जागी झाली.
    "या गुरूजी या ." धोतराचा पदर सावरीतच पांडबा पुढं झाला.दोनचार पडल्याले चिपाड उचलून बाजूला करत होता.

    ''ये पोरी सतरंजी आण. तिकडं लपती कशाला.आज शाळात गेली न्हाय म्हणून आलं दिसतय गुरूजी. त्यान्लाबी लई दट्टया असत्यूय वरून.' पांडबा अंदाज बांधत होता.भीताडाला उभी केलेली बाज आडवी केली.गुरूजी जवळ येत होते.तसे पांडबाची गरबड वाढली होती.तोपर्यंत पोरीन सतरंजी आणून दिली.पांडबान झटकली.बाजावर आणून टाकली.गुरूजीकडे इशारा "बसा गुरूजी बसा.'लई दिसा येण केल वस्तीला.ये पोरी बघतीस काय.पाणी आण की तांब्याभरून.आन्‌ ऐक , तुझ्या मायीला म्हणाव.च्या टाक कप-दोन कप ''- पांडबा समजावत होता.गुरूजीनी कागद काढले .पेन घेतला अन लिहू लागले पांढर्‍याफट्ट कागदावर सूर्यप्रकाश पडत होता.पांडबाचे डोळे दिपत होते.मिचमिच्या डोळयाने पांडबा गुरूजीकडं पाहू लागला.तसे गुरूजी त्याला म्हणाले.

    'तुमचं पुर्ण नाव''
    ''पांडू नारायण जाधव''
    ''वय''
    ''चाळीस-पंचेचाळीस करा''
    गुरूजींनी जात न विचारताच तशीच लिहली
    ''का हो गुरूजी कशाला पाहिजी हे सारं?''
    ''ते सर्वेंक्षण असतय शासनाच.आपलं लिहून न्याव लागतय.आम्हाला.''
    'व्हय का ? असुद्या , असुद्या.'
    ' किती माण्सयत घरात सगळी. लहान मोठी ?'
    'लहानी चार आन्‌ मोठी तीन.'आम्ही दोघं नवरा-बायको आन म्हातारी एक.सात करा.'
    'जमीन कितीय ?'
    'आता कशाचीय जमीन ?' -पांडबा हतबल झाल्यासारखा झाला होता.
    'म्हणजे ?'
    ' ती पलीकडं तरटीच्या डव्हाकडं सतरा गुंठे होती ती आन्‌ ही तेवीस गुंठे ..'पांडबाने वाक्य मधीच तोडलं.
    ''एक एक्कर म्हणा की''
    ''आता कशाची एक एक्कर
    मग ?''

    ''काल दिले ना कागद करून.'
    'म्हणजे ! ' गुरूजी कुतूहलाने विचारत होते.
    ' सगळया वस्तीचा ठराव झाला.त्या सनगराला कारखाना काढायचाय.'
    'कसला ?'

    'साखर कारखाना काढायचाय म्हणतूय.सहकारी. आम्हाला पाच हजार रूपये एकरानी पैसे दिले. परत खुटागणिक एकजण नवकरीला घितूय म्हणाला.त्याच्या लईमोठया शाळायेत. दूधाच्या डेर्‍यायत.पेट्रोलचे पंप का फंप काय म्हणतेत त्येय.एकेक पोर्ग चिटाकल तरी बास झालं ना.काय ह्या शेतात ? त्येबी बरडाच . कुसाळबी नीट यायनात. बाजरी कमी आन्‌ कुर्डू वाढलाय नामी अशी गत.ठेवूनतरी काय व्हायचयं. आमच्या त्‌ पाचवीलाच उसतोड आलीय पोरांचतरी कल्याण व्हईल.''

    ''मंग आता मजूरी करू का ?'- गुरूजी स्वत:च्या गालाला हात लावत बोलेले.

    'आम्ही येव मजूर आन त्येव मजूर.पोरांना आरक्षण नाही.शिक्षण नाही.नोकर्‍या नाहीत.जे पुढं गेले त्ये मागच्याला विचारीत न्हायीत.मरणादारी का तोरणादारी अशी आमची अवस्था.म्हणून सगळयानी चकाट सगळया रजिस्टर्‍या दिल्या काल.मोकळे खट्ट झाले.''

    'न्हाय म्हणजे मला काय यातल करायचय पण सहज विचारतो.कारखान्याच्या नावावर दिल्या का वैयक्तीक मालकाच्या?

    "वैयक्तीक दिल्या काही.काही त्याच्या बायकांपोरांच्या नावावर आन काही जणांच्या कारखान्याच्या नावावर...''

    'तुमची ?'
    ''आमची काय , आमची दिली त्याच्या बायकोच्या नावावर''
    ''व्हय का "

    "का काही धोका व्हयील का काय? दोन तीनशे एकर जमीन दिलीय लोकांनी एवढे लोक हैत ना. परत मोठमोठे नेते-पुढारी येणारेत उद्घाटनाला.ती काय कालच बोर्ड लागलाय.तिथं पलीकडं त्ये रचलय ना तिथं. मंत्र्याच्या हातानी भूमीपुजन व्हणारेय."

    "बss रं ! म्हण्जी आता ऊसतोडीला जाण्यापेक्षा कारखान्याचा मालकच झालात म्हणायच तुम्ही.काय नाव म्हणालात कारखान्याचं?"
    "काहीतरी कर्परा का काय दिलय जणू ."
    "इथ नदीच्या नावावर ठेवलयं म्हण.आपून कहयाला हया भानगडीत पडायच.आमचा त्यो भावकीतला पोर्‍या.पमा. जरा शिकला सवरल्याला.हिंडतू फिरतू इकड तिकडं त्योच पुढं व्हवून करतोय सम्दं."
    " पाच हजार एकरानी म्हंजी जरा कमीच भाव झाला न्हाय काय ?"

    "हाय कमीच जरा.पण पोर्ग नवकरीला लागलं.त्यालाबी भरावा लागले आस्ते त्ये वाचले ना."
    "पुढचंबी पाव्हा लागल ना काहीतरी.म्हातारपणाला व्हणारेय का हयो कुटाळ धंदा.तुम्ही कसं पोर्‍ह शिकविता रोजाचा पैका घट्ट . परत आठवडयाला सुट्टी. दिवाळीत सुट्टी.उन्हाळयात सुट्टी."

    गुरूजींनी रंग ओळखला अन्‌ चर्चा आटोपती घेण्याचा प्रयत्न केला.पांडबा फूल मोसममधी होता. काल खरेदीच्या टायमाला च्याऊ-म्याऊ झाल होत. पुरता भारीला होता.त्यामुळं त्याच्या डोक्यातली हवा काही केल्या उतरत नव्हती. वेळ वाढतोय हे पाहून पांडबान तशी हाक दिली.

    " आरं ऊक्काळलाका न्हायी चहा. लवकर आटपा की !" "गुरूजी आता जेवूनच जावा." - बाजावर टेकत गुरूजीला बोलला

    "न्हायी अजुन बर्‍याच घरांना भेटी द्यायच्यात.सर्व्हे लवकर सादर करायचाय.सुमन आली नाही तुमची शाळेत दोन तीन दिवसापासून शाळेत." थोडा वेळ थांबून गुरूजीनी विषय काढलाच.

    'हयोच राडा होता ना दोन तीन दिवस.कुणी आता येईल उद्यापासून.'

    कधी नव्हे एवढया पांढर्‍याफट्ट रंगाच्या गाडया वस्तीला धुळ उधळीत येवून गेल्या होत्या.पांढर्‍या फट्ट कपडयाची पांढरी माणसं कावळ्यासारखे इकडून तिकडं वस्त्यांवर हिंडताना दिसली होती.वातावरण तसं बनवल होतं.गावातले गावपुढारी हाताखाली धरले होते.त्यांना झेड्.पी.,पंचायत समिती,बाजार समित्या,नाहीतर सरपंच सोसायटयाचं गाजर दाखविलं होते.त्ये खूष होते.रात्री -अपरात्री बोलून घेतले होते.काही विरोध करणारे मॅनेज केले होते.रोटी , बोटी अन्‌ नोटाच्या बळावर हे घडत होतं.साखर कारखान्याच काम उद्याच सुरू होतय अस प्रत्येकालाच वाटलं. स्वप्नही पडत होते.वाहनांची वर्दळ वाढणार होती.छोटे-मोठे उद्योग वाढणार होते.सगळे लोक खुशीत दिसत होते.टीका करणारावर गुरकून माघारी बोलत होते. बाया-बापडया , पोर्‍ह - सोर्‍ह सगळयांचा एकच विषय होता. कर्परा सहकारी साखर कारखान्याचा .गुरूजींनी चहा घेतला. पांडबानंबी चहाचे घोट घेतले.नरडयाखाली उतरवले.गुरूजींना म्हणयाचं होत मनात क्षणभर विचारही आले.जर साखर कारखाना नाही झाला तर तुमच्या जमीनी परत मिळतील काय ? ही तुमच्या बापजादयाची इस्टेट . तुमची ओळख कुणी हिरावून तर घेणार नाही ना.याचा तुम्हाला काही मेळ आहे का ? तुमचे माणसं हाताशी धरून तुम्हाला दगा-फटका होऊ शकतो.तुम्ही तसा लेखी करार केलाय का पण गुरूजींनी तोंड आवरलं. काही न बोलताच ते निघू लागले. पांडबामात्र गुरूजींच्या धुसर होणार्‍या पाठमोर्‍या आकृतीकडे टक लावून पाहत राहीला.मागे वळून गुरूजींनी पुन्हा आठवण करून दिली. "तेवढं मुलीला पाठवा उद्यापासून नियमित शाळेत ."

    पांदीच्या बाजून वळणा-वळणाची वाट जाते.केकताडाचे अड्डेच जणू ते.बाजूला त्यांचे अणकुचिदार काटे टोचण्यासाठी टोकत होते .बेशमीचे झाड तर एवढे होते की वाट काढायलासुध्दा जागा नव्हती. अधुनमधून गाजरगवतातून जागा करून जाव लागायच.सगळी रान तणकाटान जुळली होती.मशागती कमी पडायला लागल्या होत्या की काय कोण जाणे ! गुरूजी चालत होते. गाडीजवळ जात होते.चावी चाचपत होते . गाडीवर टांग मारून नाहीसे झाले.समाजाला शिक्षण देणार्‍या शाळेत.

    आज त्या गोष्टीला सात-आठ वर्ष झाले असतील.पांडबा शिर्राच्या बाजारला निघाला होता.मागून पांढरीफट्ट कार हॉर्न वाजवीत येत होती.पांडबा पाठीमाग वळून पाहू लागला. गाडीच्या काचा बंद होत्या.आतला माणूस काही दिसत नव्हता.पण जरा हळूच गाडी आलीय म्हणाल्यावर आपल्या ओळखीचीच कुणाचीतरी गाडी असेल असे त्याला न जाणे वाटलेच.इथून शिर्रापर्यंत लिप्ट मिळाली तर बर होईल असं मनात वाटलं देखील .

    आशाळभूतपणे तो गाडीकडे पाहू लागला.
    "काय पांडबा कुणीकडं ?"- गाडीची काच खाली घेत आतली व्यक्ती बोलली.

    पांडबाला नवल वाटल.गाडीतली माणसं मोठी.श्रीमंत.आपल्या गरीबाला कशाला हाक मारतील.असं मनाशीच पुटपुटला.गाडी अधिकच जवळ आल्यान आतली व्यक्ती टपकळपणे दिसली.

    " ओळखल का नाय ? "ती व्यक्ती पांडबाला जवळची वाटत होती.पण विस्मृती झाली की काय म्हणून डोक खाजवलं

    "बस बस.बाजाराला जायच वाटतं"

    ' हूँ ss निघालोय .म्हण्ल होउन जाईन कामात काम.'-पांडबा सांगायला लागला.

    "म्हण्जी ?.''

    " आज तहेशीलीवर मोर्चा हायी.पण म्या नाय ओळखिल तुम्हाला."
    " मी तुमच्या गावात नवकरी केली.बरेच दिवस.प्राथमिक शाळेला नव्हतो का ? सर्वे करायला यायचो.तुमची मुलगी शिकली राव माझ्या हाताखाली."

    "व्हय,व्हय आता आलं ध्यानात.हल्ली मला असंच होतय बघा.ध्यानात त्‌ असतय पण ध्यानातबी येत न्हाय. बरं कसे कायेत तुमचे पोर्‍ह बाळं?'

    'बरेयत सगळे.आता बीडलाच गेलोत र्‍हायाला.पोरांची बी सोय लागती.नोकरीला जायला काय आता गाडी घेतलीय.चार-दोन आमचे जोडीदार सीटावारी आणायचे.डिझेलच भागतय.'

    'शाळासाठी गेलात व्हय.'
    ' हूँ..काय म्हणत होता कसला मोर्चाय. ?'
    'काय धोका झाला बघा.'
    ' म्हण्जी ?'
    'साखर कारखान्याच्या मालकांन दिला ना धोका.'
    ' व्हय का ? मंग..'
    'लुबाडली सारी जमीन.नवकर्‍या गेल्या मातीत.अन्‌ शेर्स गेले मातीत.दिवसा लुटलंय आम्हाला."
    "मधी तर उद्घाटन झाल्त त्याचं."

    "मस्स झाल्त उद्घाटन.मंत्री-संत्री झाडून सारे पुढारी आल्ते.नरडं ताणूस्तर भाषणं दिल्ती.आठ दिसात काम सुरू करतोत म्हणत सगळ्यांनी मिळून जत्रा केली आमच्या रानांवर अन्‌ दुसरं काय ? उघड्यावर आलोत आम्ही."

    "मंग आता काय म्हणतोय तो.कारखाना झाला नाही त्‌ शेतकर्‍याची जमीन परत द्यावा असा कायदाय."
    "स्वत:च्या , बायकापोरांच्या नावावर करून घेतली जमीन त्यानं. नाकब्लीला आलाय आता.द्यायची नाही म्हणतोय.दिवाळं निघालं म्हणतोय.काय करता येतय आता.लुटलं म्हणायचं दिवसा."

    "म्हणून मोर्चा काढलाय का काय ?"
    "सगळे जमून देणारेयत निवेदन.म्हण्लं आपलं सगळ्याबरोबर र्‍हावा हजर."
    "मधी काहीतरी चाललं व्हतं ना माघारी द्यायचय.माघारी द्यायचय म्हणून."

    "आमचा म्होरक्या. चोरांवर मोर झाला. मोर्चा काढायला लावायला त्योच.पैसे खाउन म्यानेज व्हणारा त्योच.आमच्या भांडवलावर त्याची झाली मांडी ओली. लाख -दोन लाख घेतले त्याच्याकडून झाला मिंधा.दिलं सोडून वार्‍यावर.सगळा खेळच बिघडलाय.."

    "व्हय.."

    "नितीमत्ताच र्‍हायली नाही. मधी आमच्या भावकीतल पोर्ग जमिनीसाठी भांडत होत.त्या पोराला त्यांनीच पुढं केल.कोण्त्यातरी समितीवर घेतल.त्येबी येड झालं खुश .जमिनी र्‍हायल्या की तशाच.कोणत्या धुंदीत वागत्येत लोकं कुणास ठाऊक. धा-पाच प्यायाला दिले की भाळले त्याच्यावर.आजचा मोर्चा तसाच प्रकार व्हायचा."

    गुरूजी आता शहरात जावून सर झाले होते.सर गाडी चालवीत होते.मागे कान देउन ऐकत होते.माझ्या समोर हा प्रकार घडला. या गरीब लोकांचे संसार बघता बघता उघड्यावर आले याची त्यांना चुरचूर लागली होती.मनात अनेक विचार येत होते.पण आपण सरकारी नोकर आपल्याला काय करता येतय ? याच्यात नाही तर लढा, उभारला असता.उपोषण केले असते.शेतकर्‍यांची भाकरी त्यांना मिळवून दिली असती.सारं जीवन कसं साचेबंद झालय याचा विचार केला अन गुरूजी मनातल्या मनात शांत झाले.अस्वस्थता पुन्हा वाढत होती. बाजारकर्‍यांची वर्दळ वाढली होती.जनावराचे टेंम्पो भरून बाजाराला येत होते.थोडे अंतर कापून गेले की तहसिल येणार होती. स्टेंरीगवर हात फिरवत गुरूजी बोलते झाले.

    "पांडबा, तुम्ही लढा तुमची जमीन तुम्हाला परत मिळेल'.सगळे एक्या जागंवर या. कुणी फूटू नका.मोहाला बळी पडू नका.कोर्ट प्रकरण करा.नियमान तरी जमीन परत मिळायलाच पाहिजे."
    हे शब्द सरांचे एकले की पांडबाला हायसे वाटले.गुरूंजीवरच्या विश्वासापोटी शब्दावर विश्वास बसला. आपली जमीन नक्की परत मिळेल आपला संघर्ष संपेल.अंधुकशी किनार आशादायी वाटली.पोरांबाळांचा घास तरी त्यांना मिळेल.असं उगीचच वाटून गेल.गाडी पुढे पुढे जात होती.तशी पांडबाला उतरण्याची घाई झाली होती.पण तरी गुरूजीबद्दल काहीतरी बोलाव म्हणून बोलला.

    " गुर्जी ,या एकदा गावाकड.पुढच्या महिण्यात हरिनाम सप्ताह गावात.मोठमोठे महाराज येणारेत किर्तनाला.नावाजलेले गायक-वादक सम्दे येणारेत.वर्गणी-फिर्गणी सम्द झालय."

    "हो , येईन की मला बर्‍याच दिवसापासून यावा वाटतय.पण काही निमीत्त नव्हत येईल सप्त्याला.किती किती दिली वर्गणी."

    "माणसी हजार दिल्येत."
    " व्हय का !"
    "परत लाल्याचे पैसे आले होते सरकारचे बँकीत.त्ये सम्द्यांनी सहया-आंगठे करून दिले सप्त्यावाल्याला."
    "बरं, मंग तर बरेच जमले असतील."

    "हूँ सगळा लाखातच खर्च म्हणायचा"
    "परत त्ये कुपनावरचा गहू - तांदूळ कुणीच उचलला नाही.तो तसाच तिकडं वळती केलाय.मोठा सप्ता होणारेय.या बरका तुम्ही, तेवढयाच गाठी-भेटी व्हत्यात."
    "बरंय, येईन बरं.किर्तन ऐकेल मंग तर झालं."

    पांडबा चर्चा करत होता.तहसिल जवळ येतय का ते पाहत होता.न झालेल्या कारखान्याची जमिनी आता परत मिळती का काय अस झाले होत.स्वप्न डोळ्यासमोर दिसत होते.
    " पोर्‍ह काय करत्येत आता."-गुरूजींनी विषय काढला.
    "मोठ जातय बांधकामावर"

    "म्हंजी,शिकले न्हायीत का काय पुढं."
    " शिकले पण नोकरी काय लागली नाही जातेत आता थापी घेउन .कधी बिगारकाम करत्येत.कधी दुकानावर कामावर जातेत.पोट भरायचे म्हणल्यावर कराव लागतय काहीबी."
    "बरं बरं तहसिलजवळ उतरायच ना आता."

    "हूँ.बघतो ना कुणी मोर्चेकरी आल्येत का त्ये.आला असला तर तिथच त्यांच्यात थांबतो.ह्यो तिढा काय लवकर सुटन अस वाटत नाही."

    तहसिल जवळ आल होतं.गाडी थोडी उताराला लागली.रस्त्यावरच्या खड्डयात आदळली.पण गाडीचे सीट मजबूत होते.मउशार सीटावर माणूस आदळत नव्हत.परत आलेला घाम पार कमी झाल्ता.गा र वाटत होत.एसी चालू केल्यामुळ काचा बंद झाल्या होत्या.काचातून बाहेरच दिसत होतपण आतलं दिसत नव्हतं.न झालेल्या कारखान्याचा बोर्ड मात्र स्वप्नात आल्यासारखा भासत होता.गाडीचं ब्रेक कचकन दाबल गेल.एक दचका घेउन गाडी थांबली.दार उघडल गेलं.पांडबा गाडीतून उतरला.हात जोडून उपकार झाल्यासारखे वाकून निरोप घेतला.गुरूजीची गाडी भुर्रकन निघून गेली.नोकरदार गाडीत अन्‌ शेतीचा मालक उघडयावर अशीच गत झाल्ती.पण त्यांनी तरी आपल्याला लिप्ट दिली.आपली चौकशी केली म्हणून काहीसे दु:ख कमी झाले नसता बाकीचे साले तसेच कट मारून पुढे जातात अनेक प्रश्न मनात उपस्थित होत होते.

    हळुहळू माणसं गोळा होत होती.एकमेकांशी चर्चा करत होती पांडबा त्या गर्दीत सामील झाला होता.घोषणा काय द्यायच्या याचा सराव होत होता.उन्मळून पडण्यापेक्षा इथ ताठपणे उभं राहणच बर असं वाटून गेलं.एक दोन नेहमीचेच कार्यकर्ते झगे घालून तयार होते.घोषणांचे फलक आणले गेले.कर्मचारी जिल्हयावरून पांढत्याफट्ट गाडयात येत होते. उतरत होते.आफिसात जात होते.पांडबाला मनात वाटल आपलं काट्ट शिकल असतं तर असच गेल असत हाफीसात.

    मोर्चा निघाला.'आमच्या जमिनी आम्हाला परत द्या. देणार कशा नाहीत? घेतल्याशिवाय राहणार नाहीत.एक , दोन,तीन,चार...'....परिसर दणाणून गेला होता. निवेदन दिल गेल.तुमच्या भावना मी वरीष्ठांपर्यंत पोहोचवतो.एवढे आश्वासन मिळाले.मागं पोलीस .पुढं पोलीस करत मोर्चा संपन्न झाला.

    मोर्चा, निवेदन यातच दिवस गेला. बाजार संपला.पालं उठली. भाजीपाल्यावाले परत गेले.पांडबा भानावर आला. बाजार करायचा तसाच र्‍हायला. सूर्य डोंगरावर टेकला आता कसला मिळतोय बाजार ? या विचारांन डोक्यात प्रकाश पडला.गुलाल खांदयावर टाकलेले बैल परत जात होते.काही बैलाचे मालक बदलले होते.काहींचे ते तसेच होते काही बैल टेंपोत भरून चालले होते.तर काहींच्या नशीबी पायी चालणे आले होते.वाहनं माघारी घराच्या वडीनं निघाली होती. ही वाहनं निघून गेली की आपल्याला घरी जायला सुध्दा काही मिळणार नाही.पांडबाच्या मनात आले आता घर गाठलेलेच बरे. म्हणून तो रस्त्यावर आला. वाहनाला हात करत होता.पण गच्च भरलेल्या वाहनात पांडबाला कुणीच जागा देईना.

    झाकड पडली होती. वाहनांचा उजेड भक्कदिशी पांडबाच्या अंगावर पडायचा.डोळे दिपायचे.भूंगे किलकिले डोळे करून आशाळभूतपणे वाहनांकडे पाहत होता.पण एकही वाहन उभे राहीले नाही.एकतर पांडबाच सीट त्यांना परवडणार नव्हतं.दुसरं म्हणजे त्यांच्याकड जागाच शिल्लक नव्हती.काय कराव ? काय कराव या विचारात पांडबा तसाच तडा-तडा पायी निघाला.घामाघूम होत चालतच होता. घराच्या वडीनं,पोर्‍ह अन्‌ लेकराबाळांत जाण्यासाठी...

    विठ्ठल जाधव
    शिरूरकासार,जि.बीड-4132449
    मो.9421442995
    vitthalj5@gmail.com

  • गर्भातून ज्ञान विकास

    मानसीने नुकतेच दोन वर्ष पूर्ण केले होते. तिच्या सर्व हालचाली मनास खूप प्रसन्नता देत होत्या. तिचे दुडु दुडु पळणे, पडणे, रडणे, हट्ट करणे, कोणत्याही वस्तूला बघणे, हाताळणे, तोडफोड करणे सारे काही तिच्या वाढीचा वेग दर्शवीत होते. मला मात्र एका गोष्टीचे सतत आश्चर्य वाटत होते. हे तिच्या बोबडे बोलण्याचे. ती पूर्ण वाक्ये उच्चारीत होती व भावना तोडक्या मोडक्या शब्दांत व्यक्त करीत होती. बरेच ज्ञान, माहितीही तिने सभोवतालचा परिसर, ह्याच्या संपर्कामधून ग्रहण केली होती. जे ती बघे, ऐके तेच ती पुनुरुच्चारीत असे. हे सारे सामान्य होत. मात्र एक गोष्ट तिव्रतेने जाणवली. ती म्हणजे तिचे टेबल टेनीस खेळावरील प्रेम, ज्ञान व आवड. ते ती सतत व्यक्त करीत असे. समजण्याच्याच काळात तिने त्या खेळाबद्दल बरीच माहिती संकलीत केल्याचे आढळून आले. तसा तीचा दर दिवशी टे.टे. चा संपर्क नव्हता तरी देखील. मात्र एक सत्य होते की तीची आई टे.टे. ची खेळाडू champion होती. तिने जिल्हा, प्रांत यातसुद्धा यश मिळवून देशस्थरावर गेली होती. टे.टे. हा विषय तिच्या रक्तात, मेंदूत पक्यापद्धतीने स्थित व स्थीर झालेला होता. मात्र आजकाल इतर कार्यबाहुल्यांमुळे तिचे टे.टे.कडे फारसे लक्ष नव्हते. तसा तो विषय बाजूस पडला होता. तरी त्याविषय बद्दल मानसीमध्ये निर्माण होणारी आवड attachment मन वेधून घेत होती.

    आज अचानक एका शास्त्रिय मासिकांत वाचण्यात आले. नुकत्याच डेन्मार्क येथील वैद्यकीय शास्त्रज्ञाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यांनी सहा हजारपेक्षा जास्त गर्भवती स्त्रिया व नवजात बालके यांचा सखोल अभ्यास व सर्वेक्षण केले होते. बालकामध्ये गर्भात असताना, होणाऱ्या वाढीच्या वेळीच त्याच्या मेंदूची वाढ होत असते. मेंदूचे कार्य हे गर्भात असतानाच सुरु होते. आईकडून येणाऱ्या प्रत्येक चेतना, या त्या नव बालकाच्या मेंदूत देखील साठवणूक होत जातात. आईला बाह्यांगातून अर्थात सभोवताल परिसर येथून ज्या चेतना प्राप्त होतात, त्या जसे आई आपल्या मेंदूत साठविते, त्याचप्रमाणे त्याचवेळी आईच्या मेंदूतून परावर्तीत होत त्या चेतना नव बालकांच्या मेंदूतही साठवणूक करतात. कंप्यूटरच्या भाषेत बोलावयाचे, तर आईच्या कंप्यूटर मेंदूत डाऊनलोड झालेले सर्व विचार अर्थात चेतना बालकाच्याही मेंदूत transfer होऊन तेथेही डाऊनलोड होतात, फिक्स होतात. हे कायम स्वरुपी असतात. मुलाच्या जन्मानंतर त्याच्यात वाढत जाणाऱ्या समजानंतर, भाषेनंतर त्याला पुन्हा display करता येतात. व हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे.

    अनेक अनेक वर्षापूर्वी महाभारत काळातील अभिमन्यूची कथा जीला पुराण कथा म्हणून संबोधीले गेले होते. अभिमन्यू गर्भात असताना श्री कृष्णाकडून सुभेद्रेने ऐकलेले चक्रव्यूह भेदण्याचे ज्ञान, हे त्यालाही प्राप्त झाले होते. त्याच्या त्या ज्ञानाचा उपयोग त्याने युद्धासमयी केला. अर्थात ते ज्ञान त्याला पूर्णत: न प्राप्त झाल्याने, त्याचा अंत झाला. कितीतरी कथा ज्या भारतीय संस्कृतीत महाभारत, रामायण इत्यादी ग्रंथात नमुद केलेल्या आहेत व ज्यांना भाकड कथा म्हणून उपहासले गेले. त्याच कथांचे सूत्र, संकल्पना आज विज्ञान सत्त्यतेच्या इमारतीमध्ये प्रदर्शित करत आहे. त्याचा सन्मान, Credit घेत आहेत. पूर्वजांनी आपल्या ज्ञानाने मिळालेल्या अनेक गोष्टी, जसे अस्त्र, शस्त्र, विमान (पुष्पक) आकाशातील भ्रमण, दिव्यदृष्टी, दिव्य श्रवण दृष्टी, अदृश्य होण्याची संकल्पना इत्यादी या एकापाठोपाठ विज्ञान शास्त्राच्या परिभाषेत सत्याकडे झुकत आहेत. आपण आपणास विसरतो व परकिय आपणास सदा श्रेष्ठ वाटत गेले. हे सारे निराशामय वाटते. साठवणूक, विकास व उपयोगींना, असे त्रिकोणातील ही तीन अंगे आहेत. चेतना जर मिळाली तरच साठवणूकीला प्रारंभ होईल. त्यामुळे चेतना ही महत्त्वाची वाटते. वैद्यकीय शास्त्र त्याचमुळे चेतनेची महती गाते. त्याचवेळा शिक्षण क्षेत्रातील मानसशास्त्र त्या चेतनेचे तत्त्वज्ञान मान्य करीत, योग्य व अयोग्य चेतनेचा उहापोह करते. बालकाचा विकास हा नेहमी योग्य अशाच चेतनेमुळे झाला पाहिजे. ज्याला सुसंस्कार म्हणता येईल. चेतनेमुळे मानसिक तणाव ग्रस्तता त्याचवेळी निर्माण होईल, जेव्हा त्या चेतना अहितकारक, असंस्कारीकता किंवा विकसीत होणाऱ्या मेंदूला तो विचार ग्रहण शक्तीच्या मर्यादेबाहेरचा असेल. समजण्याच्या युक्तीच्या बाहेरचा असेल. बालक तो विचार साठवताना एक प्रकारे तणावग्रस्त होईल. त्याला समज येईपर्यंत त्याचे ग्रहण होणार नाही. याच कारणाने हे सर्व शिक्षण क्षेत्र सूचविते की मेंदूची काही अंगे विकसीत होईपर्यंत शिक्षण ही संकल्पना नको. साधारणपणे पाच वर्षे, मुलाना शालेय शिक्षण न देता, त्याच्या आपल्या बुद्धीला परिस्थिती व वातावरणात विकसीत होवू देते. केवळ बाह्य चेतनामय संस्कार त्याच्या पंचेद्रीयावर प्रक्रीया करीत राहतात. साठवणूक होते. हेच तर ज्ञानप्राप्तीचे प्राथमिक द्वार असते. त्याचा प्रथम मुळ असतो निसर्ग. तो मातृत्वाच्या माध्यमातून हे साध्य करतो. विकसीत करतो. बालकाला अवलंबीत्वाच्या धारणेपासून स्वतंत्र जीवन जगण्यासाठी, कला शिकवत असतो. जी पुढे उत्पतीपासून स्थितीकडे व शेवटी लय या संकल्पनेत अंत पावते. मानसीची प्रथम ज्ञान प्राप्ती जरी गर्भातून सुरु झालेली दिसली, तरी तिला तो मार्ग बदलावाच लागतो व ज्ञान वृद्धी तिची तिलाच करावी लागते. तेच तिचे भावी व्यक्तीमत्व ठरेल.

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • शाळा, शिक्षक, मुलं आणि सकाळ…

    पहाट होते.जाग येते.सूर्य उगवतो . तसा वेध लागतो.उरक वाढतो. आंघोळ होते . सकाळचा चहा होतो. आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम सुरू असतात. नियमितपणे. बातम्या , भक्तीसंगीत, आरोग्याचे कार्यक्रम वगैरे. जेवणाचा डबा तयार होतो. तोपर्यंत असते दारात हजर वर्तमानपत्र . ठळक बातम्या आणि संपादकीय पानावर लेख वाचण्याची मजा काही औरच. पक्षांचा किलबिलाट.. मंदिरातील घंटा घण्- घण वाजते. सूर्य किरणं हळूच पसरतात जमिनीवर . नकळत बागेतली , दारातली , कुंडीतील फुलं बघतात डोकावून.आज तोडण्यासाठी कुणाचा नंबर आहे ते ?

    दिवस सरकत जातो.रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढते.. लालपरी मुक्कामाच्या गावावरून निघते. प्रवाशांची धांदल उडते.भाजीवाले,दुधवाले , खारी, पाववाले ओरडून विकतात.आपला माल... शिक्षक करतात प्रवास गाडीने . जेवणाचे डब्बे असतात सोबतीला.मुलंही पळतात शाळेच्या ओढीने . दप्तरात आपले भविष्य घेऊन . वडाच्या, पिंपळाच्या झाडावर भरते पाखरांची शाळा. गाव, नदी, डोंगर, रस्ता , चौक होतात जागे सेवेसाठी. मुलं शाळेत गोळा झाली की गजबज होतो सुरू. परिपाठाने घुमतो परिसर. सडा रांगोळीने सजते घर. शेतातील कामाची असते लगबग. खुरपणी , कोळपणी, नांगरणी, पाळी, पेरणी, राखणी, गुरांची सोडबांध , वेचणी , तोडणी यांचा असतो समावेश . शाळेत पहिला तास सुरू होतो. प्रसन्न मुद्रेने असतात सर्वचजण. हजेरी होते. वेळापत्रक असते.तासिकेनुसार शिक्षक बदलतात. भाषा, गणित, विज्ञान, कला, इतिहास , भूगोल हे असतात विषय . जे शिकवतात. जे घडवतात उद्याचा भारत. प्राथमिक शाळेतच घडत असते भविष्य .. शाळेत नसतो निर्जिव दगडांच्या सांगाडा .भींत बोलत असते मुलांशी . संवाद होतात फळ्यावरच्या अक्षरांशी. संवाद होतात रंगवलेल्या भिंतीशी.निसर्गातील प्रत्येक घटकांशी.. सकाळ सरून जाते पटकन.दुपारची चाहूल लागते. अंगाला ऊन स्पर्श करून जाते.जाणिव करून देते.पोटात ओरडतात कावळे. न्याहारीचा वखत टळून गेलेला. मुलं बघतात . किचनशेडकडे . भात , वरण , खिचडी की अजुन काही. हात धुवून तयार असतात.गाडीला अडकवलेला डबा पटकन येतो हातात. मनसोक्त होते पंगत . रानात सुटतात मजूर . दुपारच्या भाकरीसाठी. लसणाची चटणी आणि पाट्यावर रगडलेला ठेचा असतो . तोंडी लावण्यापुरता. कामाचा पडतो विसर . कारण कोणते तरी एक गाणं असत सोबतीला.असेच दिवस पडतात मागे एकेक ....प्रत्येक दिवसाची सकाळ असते नविन काही देणारी .. शिकवणारी ...

    विठ्ठल जाधव
    शिरूरकासार (बीड)
    मो.9421442995
    vitthalj5@gmail.com

  • बालकांची दोन पत्रे.

    बालकांची दोन पत्रे.

    १) बालक पुतण्याचे पत्र-

    ( आठ दिवसाच्या पुतण्याने (भारतातल्या) काकूस (अमेरिकेतील) लिहीलेले पत्र )

    प्रिय काकू,

    Hi, आणि सा. नमस्कार. तुला वाटत असेल हा कोण? मला अद्याप नाव नसलं तरी रक्ताच, घराण्याच अस नातं मात्र निश्चितच निर्माण झालेलं आहे. त्यामुळे त्या नात्याचाच आधार घेवून मी तुला काकू म्हणालो. खर म्हणजे मला प्रथम पत्र लिहावयाच होत ते माझ्या आईला. परंतु मी या जगात आल्यापासून, नव्हे त्याच्या पूर्वीही जेव्हा मी तिच्या पोटांत होतो ना, ती क्षणभर देखील मजपासून दूर झालेली नाही. मी सतत तिच्याच सहवासामध्ये आहे. त्यामुळे तिला जे माहित आहे ते सर्व मला देखील ठाऊक आहे . व मला जे ज्ञात आहे ते तिला देखील समजल आहे. तेव्हा मजकूर काय? विचार काय? आमची देवाण-घेवाण होवूच शकत नाही. मग मीच विचार केला की तू येथून खूप खूप दूर आहेस ना ? मग तुलाच पत्र लिहून आपलं मनोगत सांगाव. म्हणजे तुला माझा Bio-data, नव्हे जन्म कुंडली, नव्हे जन्म प्रवास समजेल. खरं सांगू काकू मी जसा आलो तसेच तुझेही बाळ माझ्याप्रमाणे येण्याच्या मार्गावर आहेच. म्हटले माझा प्रवासी अनूभव जर तुझ्या कानावर घातला, तर माझ्या लहान भावडांचा या जगांत येण्याचा मार्ग थोडातरी सुकर, सुखकर आणि सुयोग्य होईल. कोणतीही घटना घटताना जेव्हा संपूर्ण नावीन्यपूर्ण असते ना, त्यावेळी मन नेहमी साशंक असून एका अज्ञानाच्या मार्गामुळे खूपच काळजी वाटत असते. पण मी जेव्हां त्या प्रवास मार्गाबद्दलचा तपशील तुला सांगेल ना तेव्हा तू योग्य त्या तयारींची काळजी घेशील. व मग कोणतीही प्रसंग अघटीत होणार नाही.

    काकू तुला आश्चर्य वाटेल पण मला तर तुझे आणि काकांचे नाव तर खूप पूर्वीच समजले होते. मी जेव्हां आईच्या पोटांत होतो ना, जगांत येण्याच्या आधीच तेव्हाच कळले. आई-बाबा, आजोबा-आजी जेव्हां गप्पा मारायचे, तेव्हां तुमचा विषय निघायचा. त्याचवेळी मी पण ऐकत होतो. अग, तुला माहितच असेल ना की अभिमन्यू जेव्हां त्याच्या आईच्या पोटांत होता, तेव्हांच तो जगातल्या खूप गोष्टी ऐकून शिकला होता ना. मला बोलता आले असते ना तर मी सर्व काही व्यवस्थीत सांगू शकलो असतो. माझी सर्व इंद्रिये अतिशय चांगल्या प्रकारे कार्यारत होते. मला सभोवतालच्या सर्व जगाची पूर्ण जाणीव होत होती. सर्व व्यक्तींच्या हालचाली, त्यांचे बोलणे, अस्तित्व, मला सार काही कळत होते. तुला गंमत सांगू मला नुसते बाहेरचे जग, बाहेरील व्यवहार कळत होते असे नाही, तर माझ्या आईच्या अंतर मनाची, अंतर जगाची देखील पूर्णपणे जाणीव होत होती. माझ्या आई – बाबांनी माझ्या बद्दल केलेली व्यक्तव्ये, अंदाज, स्वप्ने इत्यादी. त्याचप्रमाणे माझ्या प्रकृतीसाठी, माझ्या उदयास येणाऱ्या मनाच्या स्वास्थ्यासाठी, ते चांगले विचार, संस्कार करीत होते.

    ज्या उच्य प्रतीच्या आध्यात्मीक प्रेरणांच्या लहरी मला देत होत्या ना, त्या सर्व शक्तींची मला तीव्रतेने जाणीव होती. सारी शक्ती मजमध्ये संकलीत होत होती. ज्या गोष्टी त्यानांही समजत नव्हत्या, नव्हे माझ्या बाबांच्या बाबांना अर्थात आजोबांना देखील समजत नव्हत्या, अशा सर्व सूक्ष्म बाबींचे संकलन मी माझ्या मनांत (वा बुद्धीला) करुन ठेवीत होतो. माझं फक्त आताच्या घडीला एकच Bad Luck आणि ते म्हणजे मला बोलताच येत नाही. नाहीतर थेट तीन-चार महीन्यापूर्वीचा सारा वृतांत मी धडा-धडा बोलून दाखविला असता. आणि केवळ मला बोलता येत नाहीना, तर हे सारे आजूबाजूचे लोक मला ‘नासमज’, अज्ञानी याला काय कळतं, इत्यादी उपाधी देवून माझ्याकडे अतिशय दुर्लक्षून बघत असतात. व आजही तसेच समजतात. पण मी सर्वांना सांगू इच्छीचो की थोडे थांबा, मला बोलण्याची कला येऊ देत, भले ते बोबडे बोल का असेना, मग सारे काही बोलेन, तेव्हा सर्वजण तोंडात बोटे घालून म्हणतील, “आरे कुठे शिकला हे सारे. याला सारे समजते. आपणच त्याला नासमज म्हणून म्हणत होतो.....” इत्यादी. अग बाहेरच्या गप्पा ऐकताना मला पण जेव्हां आवडलं ना तेव्हा मी पण टाळी वाजवायचा, नाचाया देखील. परंतु हे कुणालाच कळत नव्हते. आई म्हणायची “बाळ काय सारख फिरतय” कमाल आहे नाही. त्यांच मला कळायच पण माझ मात्र त्यांना काही कळायचं नाही.

    मला या जगात येवून केवळ चारच दिवस होत आहेत. बराच काळ मला आईच्या पोटांतच राहून बाहेर येण्याची वाट बघावी लागली. माझी शेवटी शेवटी सर्व तयारी झाली होती. पण कुणीच लक्ष देत नव्हते. माझ्या जन्माच्या आदल्याच दिवशी, आईने स्व:ता पावभाजी, आईस्क्रीमीची ट्रीट दिली होती. ती जे जे करीत होती व जे जे बोलत होती, ऐकत होती त्याचा मी स्वत: साक्षीदार आहे. पण माझ्याकडे लक्ष देण्यास कुणासच फूरसत नव्हती. त्यांना काय माहीत की या सर्व Activities वर माझीपण नजर खिळून होती. रात्रीतर मध्यरात्र उलटेपर्यंत सारे काही आनंदमय वातावरण होते. मग मीच का म्हणून मागे राहू. मलाही खूप खूप आनंद झाला होता आणि त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी मी पण नाचू लागलो, टाळ्या वाजवू लागलो. पण गंमत सांगू काकू तुला, सर्वांनी आनंद साजरा केला. परंतु माझ्या आनंदाला वेगळेच रुप देवून, मला चक्क आईसह हॉस्पीटलमध्ये सकाळी नेऊन सोडले. अर्थात मी माझा उत्साह आवरता घेतला व शांत झालो. मी माझ्या आईस बघण्यासाठी फार उत्सुक होतो. येताच मी आनंदाने किंचाळलो. नंतर माझा जीव शांत झाला. मला मोठी गमंत आणि आश्चर्य वाटले ती डॉक्टर काकूंचे. ती माझ्याशी, माझ्या आगमनाच्या दिवशी अतिशय रफ (वाईट) वागली.

    थोडा देखील हळूवारपणा दाखविला नाही. किती नाजूक होतो मी, अगदी कळीचे फुलात रुपांतर होताना कसे मोहक व आल्हादकारक वाटते ना तसा. पण तीने मला पूरता उलटा सुलटा केला, प्रत्येक अवयव वाकडे तिकडे करुन बघीतले. तीला माझ्यांत कोणते

    व्यंग आहे का हे बघण्याचीच उत्सुकता होती. म्हणाले कुठेही व्यंग नाही. No Congenital Anomaly, सर्व अवयव ठीक ठाक आहेत. माझ्या पायावर त्यांनी एकदम चापटी मारली. मी एकदम तळतळून रडलो तर म्हणतात कसे “रडतो चांगला बरे” कमालच आहे की नाही. रडण हे देखील चांगल असत हे मला माझ्या जीवनाच्या पहील्याच दिवशी कळलं. तीच वागणं मला फार विचित्र वाटलं. डॉक्टर काकूंचा शोध माझ्यांत काही व्यंग आहे का, वाईट आहे का त्यांच्यासाठी होत असल्याची मला जाणीव झाली. आणि ती माझी आजी, ती देखील तशीच. आज आल्या आल्या तीच लक्ष मी 'सू' केली का ?, 'शी' केली का ?, 'उलटी' झाली का ?, अधून मधून 'रडतो' का ?, बस अशीच चौकशी. कुणी म्हणाले मी बाबाप्रमाणे दिसतो. म्हणजे माझे नाक व चेहरापट्टी त्यांच्या सारखी आहे. कुणी म्हणाले चेहरा गोल असून रंग गोरा आहे. आईप्रमाणे आहे. माझ्या प्रत्येक अवयवांच पृथकरण होऊन कोणता भाग कुणासारखा आहे त्याची यादीच मोठी होत होती. प्रत्येकजण आपला त्यात सहभाग व्यक्त करीत होता. डॉक्टर आजीची तर एकदम कमाल. तिला तस काहीच सापडलं नाही, तरी तिचा प्रयत्न आपला नंबर वर ठेवण्याचा होता म्हणाली. बाळाचा Blood group A +ve आहे. मला हे सार ऐकून खूप मौज वाटत होती. आणि माझे ते भाव माझ्या चेहऱ्यावर दिसत होते. माझ्या मनांतून उत्सुर्त आलेलं हास्य, प्रथम टिपले ते आत्याबाईंनी. माझ्या चेहऱ्यावर निर्माण झालेल्या प्रत्येक हालचालींची त्यांनी योग्य ती कदर केली. त्याच योग्य विश्लेषण केले. मी पण त्याच्यांवर फार खूश झालो. काहीतरी Gift घ्यावी वाटले. काकू तुला सांगू, माझ्याकडे तर त्यावेळी काहीच नव्हतं. मी चक्क तिच्या अंगावर पहीली ‘सू’ केली व Congratulation च्या स्वरात किंचाळलो.

    काकू खर सांगू, हे सर्व माझ्या या जगांत येण्याच प्रवास वर्णन वाचून तुला खूप बर वाटल असंल. गमंत वाटली असेल व आनंदपण झाला आसेल. तुला अजून न बघता देखील मी तूझा प्रफूल्लीत झालेला चेहरा कसा असेल, याचे चित्र माझ्या चिमकुल्या डोळ्यापुढे आणू शकतो. पण तुला माहीत असेलच कि जेव्हां आपण सर्कस बघतोना त्या कलाकाराच्या उलट्या सूलट्या उड्या बघून खूप करमणूक होते. आनंद वाटतो. पण कुणीच विचार करीत नाही की त्यांच्या उड्या, करामत इतकी साधी गोष्ट नाही. त्याच्यामागे श्रम, तपश्चर्या आणि साहस यांचा मधूर मिलाप दडलेला असतो. दिसणारे चित्र आणि असणारे चित्र यांत खूप तफावत असते. तू म्हणशील काकू की मी कोणते तत्वज्ञान सांगू इच्छीतो. मी पडलो अज्ञानी मी काय ह्या जगांत नवीन सांगणार. पण मी आहे एक ‘साक्षी’, एक साक्षीदार जो आईच्या पोटांत राहून अंतर जगातील व बाह्य जगातील सर्व घटणांचा अनूभवी.

    त्यामुळे मी जे सांगतो ना ते एक दीर्घ काळापर्यंत अनूभवलेले आणि परिणामी अत्यंत आनंद देणारे एक सत्य आहे.

    डॉक्टर Anti अर्थात Gynecologist यांच्याकडे माझ्या आईला बाबा किंवा आजीला घेवून जात असे. जशी मला समज येवू लागली. मी त्यांनी दिलेला उपदेश माझ्या बुद्धीत साठवून ठेवला. माझ्या आईने तिच्या बुद्धीत तो साठविला. त्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी.

    १) सदैव प्रफूल्लीत व आनंदात रहा. त्याने आईची व बाळाची प्रकृती पण चांगली राहते.

    २) सदैव चांगल्या गोष्टींचा विचार करावा, चांगले वाचावे, चांगले लिहावे. (जमल्यास) अध्यात्म्याची नितीज्ञानाची, संस्कार रुजविण्याची पुस्तके, देवादीकांच्या कथा, स्तोत्रे वाचवित. चांगले चारित्र्यवान गोष्टी एक प्रकारच्या लहरी निर्माण करतात व त्याचा बाळाच्या मानसिक विकासासाठी अप्रत्यक्ष खूप उपयोग होतो. जे तुम्ही ९ वर्षात बाहेर मिळवू शकणार नाहीत, ते केवळ ९ महीन्याच्या काळांत मिळविता येतो. हे पौराणिक विचार नव्हेत तर प्रयोगांनी सिद्ध झालेले एक शास्त्रीय सत्य आहे.

    ३) रोजच्या आहारात भाज्या, फळे, दुध, ताक, डाळीचे पदार्थ आणि पिष्टमय पदार्थ योग्य त्याप्रमाणात असावे. आहार सकस व प्रमाणशीर असावा, नियमीत असावा. आपल्या जेवणांत जवळ जवळ सर्व गोष्टी असतात. परंतु जेवणाच्या बाबतीत दुर्लक्ष करु नये. तुला भूक नाही म्हणून न जेवणे वा कमी जेवणे हे मुळीच चालणार नाही. कारण तुझे जेवण फक्त तुझेच असते असे नाही, ते दुसऱ्याचे जेवण पण असते. त्याच्या शारिरीक वाढीसाठी लागणारे घटक पदार्थ केवळ तुझ्यामार्फत त्याला मिळत असतात. याचा विचार मनाच्या कोपऱ्यामध्ये पक्का कोरुन ठेवणे. तुझी कोणतीही दुर्लक्षीत केलेली कृती ही खूप खूप त्रासदायक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    माझी आई खाण्याच्या बाबतीत फारच निवडक होती. तिला भूकपण लागत नव्हती. परंतु तिला सर्वांनी व्यवस्थीत समज दिली. आणि तिने पण स्वत:चा हट्ट, सोडून केवळ माझ्यासाठी आहारांत योग्य बदल व योग्य सेवन सुरु केले. ए तू आईला सांगू नकोस, पण ती ५५ किलो वजनापासून मी जगात येण्याच्या दिवशी ७६ किलो वजनाची झाली होती. आता तिचे वजन ६९ किलो आहे.

    ४) अत्यंत कंटाळवाणी गोष्ट, परंतु अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘व्यायाम’ याच्याचसाठी मी सुरवातीला सर्कशीचे उदाहरण दिले होते. बाकी सर्व गोष्टी करणे शक्य होते. पण व्यायाम करणे म्हणजे एक दिव्यच. त्यातही डॉक्टरांनी अतिशय मध्यम मार्ग काढला होता. घरामधील प्रत्येक गोष्ट स्वत: करण्याचे बंधनच आईवर टाकले होते. ती माझी आई कामाच्या बाबतीत फार उत्साही. तो उत्साह Casual नसावा म्हणून त्याला Medical Advice ची

    झालार लावली, म्हणजे मुळीसुद्धा कंटाळा करता कामा नये. घरातले झाडणे, स्वयंपाक, साफसफाई, कपडे धुणे इत्यादी कामे दिसायला लहान असतात.

    तरी सतत व्यस्त ठेवून शरिराच्या प्रत्येक अवयवाला व्यायाम देतात. Movements देतात. पोटांत वाढणाऱ्या बाळाला आईच्या सततच्या योग्य त्या हालचालींमुळे स्वत:ची बैठक पण व्यवस्थीत set करता येते. तिचा हालचालीच्या वेळीच, तो आपला मार्ग अतिशय सुकर करतो. जेणेकरुन वेळ येताच बाळ चटकन व चांगल्याप्रकारे बाहेर येवू शकते. बाळाच्या या अतिशय मुख्य प्रवासासाठी, आईची योग्य साथ मिळणे हे फार जरुरी आहे. माझ्या आईने खरेच यासाठी थोड्याशा काळासाठी का होईना खूप श्रम घेतले. कष्ट सोसले. तिची पाठ दुखत असे. ती विव्हळायची, रात्री झोप लागण्यास त्रास व्हावयचा. पण तिने माझे व पर्यायाने तिचेदेखील भावी सूखकर आगमन डोळ्यासमोर ठेवले. व त्यामुळेच माझ्या प्रवासाचा शेवट अतिशय समाधानकारक व चांगला झाला.

    तसे म्हटले तर घरांत नोकर, आजी बाबा होते पण तरीही केवळ शारिरीक हालचालींना प्राधान्य देण्यासाठी, ती कुणालाच काम करु देत नव्हती. स्वत:च घरातील सर्व कामे करावयाची. अग काकू मला पण तिची किव येत असे पण काय करणार

    व्यायामामधला सर्वात चांगला प्रकार म्हणजे ‘फिरणे’ रोज एक तास आई केव्हा बाबा बरोबर तर केव्हा आजी बरोबर बाहेर फिरण्यास जात होती. कुणीच मिळाली नाही तर घरातल्या घरातच, या खोलीतून त्या खोलीतून चकरा घालायची पण व्यायाम पूर्ण करावयाची. कुणावर अवलंबून नाही. काकू तू पण व्यायामाबाबतीत हालचालीबाबतीत मत्र निश्चिचपणे आईप्रमाणेच Follow up कर. म्हणजे माझ लहान भावंड व्यवस्थीत येवून सर्वांना आनंदीत करेल.

    तू ज्यांच्या supervision खाली तिथे Medical सल्ला घेतेस ना, त्यांच्याच सल्ल्याप्रमाणे वाग. मात्र त्यात कोणतीही हयगय नको. आजचे श्रम, कष्ट, उद्याचे आनंदी वातावरण निर्मितीचे असणार.

    काकू तुला सांगू, माझी वाढ व प्रकृती (Growth Development and Health) केवळ नॉर्मलच नाही तर मी केवळ चार दिवसामध्ये बरीच प्रगती केल्याचे Remarks डॉक्टराकडून ऐकू येतात. याला कारण मी अनूभवलेल्या डॉक्टरांच्या सूचनांचे आईने केलेले तंतोतंत पालन.

    बाबा आईच्या थकव्याकडे, पाठ दुखण्याकडे व प्रकृतीकडे जास्त लक्ष देवू लागले. त्यांची इच्छा असो वा नसो ते रोज आईला एक तास बाहेर फिरवून आणू लागले. आईचा थकवा कदाचित वाढत होता. परंतु त्याच प्रमाणात तजेलेपणा देखील वाढत जात असल्याचे स्पष्ट दिसत होते. मी पण खुशीने नाचत असे आणि माझ्या या नाचण्यानेच माझी प्रकृती देखील चांगल्याप्रकारे आकार घेत आहे याची सर्वांना जाणीव होत होती.

    मला उत्सुकता आहे ती मला लहान भावडांशी खेळण्याची. माझी इच्छा आणि अपेक्षा तुमच्या दोघांच्या लक्षात आलीच असेल. ते भावंड कुणीही असो परंतु ते निश्चित सुदृढ असले पाहिजे. म्हणजे मग खेळण्यात खूप मज्जा येईल. आणि त्याचसाठी तू खूप काळजी घेत जा. जसे मी वर वर्णन करुन सांगीतले त्याप्रमाणे.

    मला आई बाबा, आजी आजोबा ‘शांत’ आहे, रडत नाही आणि अशाचप्रकारे खूप मोठेपणाची विशेषणे माझ्या माथी मारतात. त्याचा अर्थ तू असे मुळीच समजू नकोस की मी एखादा आदर्शाचा पुतळा होणार आहे. नव्हे मी एकदम आपल्या सर्व वडीलधाऱ्याप्रमाणे त्यांच्या बालपणाच्या काळाप्रमाणे असेल. अरे श्रीकृष्ण पण मोठा झाल्यावरच मोठा झालाना. त्यापूर्वी त्यांनी त्यांच्या लहान वयांत केलेले सर्व कारनामे, प्रताप मी पण करणार आहे. सर्वांना त्रस्त करणार, रडकुंडीला आणणार, तोडमोड करणार, नुकसान करणार, मारामारी करणार, खेळणार, हसवणार देखील. माझ्या बुद्धीने सुचविले त्याप्रमाणे परिस्थितीचा विचार करुन सर्वांना खूप खूप आनंद देणार. माझ्यात हे सर्व गुण असतील. ज्याला जसे भावेल त्याप्रमाणे त्यांनी ते मान्य करावे. मग माझ कौतुक करा, नाहीतर मला धम्मक लाडू द्या. साऱ्या साठी मी तयार असेन.

    असो आता येथेच थांबतो. नवजीवनाचा एक साथीदार म्हणून व्यक्त केलेले माझे मनोगत तुम्हाला पटते. तर त्याकडे एक सत्य अनुभव म्हणून बघा. योग्यवेळी योग्य गोष्टींचा विचार , म्हणजेच Stitch is time saves nine ह्या संकल्पने प्रमाणे.

    पुन्हा काका, काकू यांना माझे सविनय प्रेमळ नमस्कार. तुमच्या भेटींसाठी खूप खूप उत्सुक आहे. तुमच्या नवीन येवू घातलेल्या बाळासाठी आणि माझ्या लहान भावंडासाठी माझ्या सदिच्छा. अद्यापतरी माझे नामकरण झालेले नाही , होईल तेव्हा नाव व इतर उपाध्यायासहीत कळवीन. तुमचा प्रेमळ पुतण्या. – अनामिक

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com