नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

नदीच्या वरच्या बाजूला एक छोटीशी टेकडी होती. टेकडीवर एक आंबामातेचे मंदीर होते. मंदिराकडे जायला डांबरी रास्ता होता आणि नदीच्या कडेने वर जाण्यासाठी पायऱ्या पण बांधलेल्या होत्या. खालून टेकडीकडे पाहताना हिरव्यागार डोंगरातून दिसणारा वर पर्यंत जाणारा नागमोडी रस्ता आणि ठिकठिकाणी बांधलेल्या कमानीतून वर जाणाऱ्या पायऱ्या यांचे खूपच मनोहारी दृष्य दिसत होते. मग सगळ्यांनी गाडी पायथ्याशी लावून पायऱ्या चढूनच मंदिरात जायचे ठरवले. थोड्याच वेळात ते मंदिरात पोहोचले. मंदिराच्या गाभाऱ्यात सुबक अशी आंबामातेची मूर्ती होती. मंदिरातील वातावरण आणि देवीची मूर्ती पाहून त्यांचे मन प्रसन्न झाले.
September 27, 2019
आपल्या समाजव्यवस्थेत कुटुंब एक संस्था आहे. बहुतांश कुटुंबांचा प्रवास हा एकत्र कुटुंब पद्धतीपासून एकेरी कुटुंब पद्धतीकडे झालेला दिसून येतो. परंतु याचा अर्थ असा नाही कि वेगवेगळ्या नात्यांचे महत्व व त्यांचा आपल्या जीवनावरील प्रभाव नाहीसा झाला, नक्कीच त्यामध्ये कमी-अधिक बदल झाला असेल तरी त्याचे अस्तित्व अजूनही कायम आहे. आजच्या बदलत्या समाजव्यवस्थेत नात्यांच्या वेगवेगळ्या रंगांचा अनुभव घेयचाच असल्यास एखादा मोठा कौटुंबिक सोहळा किंवा कार्यक्रम सर्वात उत्तम जागा आहे. अश्या सोहळ्यांमध्ये आपण पूर्णपणे जागरूक अवस्थेत व विनोदबुद्धी दक्ष ठेवल्यास मानवी स्वभावाचे अनेक नाव-नवीन प्रकार अनुभवायास मिळतात.
"तत्वज्ञानी नातेवाईक " या प्रकारातील लोक नेहमीच दुसर्यांना स्वतःचा कधी न मागितलेला सल्ला देण्यास तत्पर असतात . कोणत्याही गोष्टीत व कामात बारीक-बारीक चुका दाखवून आपले उच्च विचार मांडण्यासाठी त्यांना प्रत्येक वेळ योग्यच वाटत असते, थोडक्यात सांगायचे म्हणजे या लोकांना वेळेचे भान नसते. यांची देहबोली देखील स्वभावाला पूरकच असते. विषय कोणताही असो राजकारण, अर्थकारण, देश, विदेश, विज्ञान इ.. प्रत्येक विषयात आपला सखोल अभ्यास असल्याचा गोड गैरसमज बाळगून आत्मविश्वास कोणत्याही परिस्थितीत उच्चतम शिखरावर ठेवणे हे यांचे वैशिष्ट्य, छंद म्हणाल तर युवकांना जबरदस्तीचे मार्गदर्शन करणे. अश्या लोकांना ऐकण्याची मज्जा वेगळीच असते परंतु एक ठराविक अंतर ठेवुनच.
"जावई " नावाचा प्राणी, हा प्राणी दोन पायांचाच असतो, अगदी सर्वसाधारण माणसासारखाच दिसतो परंतु तरीही हा प्राणी पृथ्वी या ग्रहावरचा नसून बाहेरून आला आहे असा भास झाल्यास आश्चर्य वाटण्याची गरज नाही. नातेवाईकांमध्ये हा प्रकार अतिशय मौल्यवान, नाजूक व जतन करून ठेवण्याचा असतो. कोणत्याही कौटुंबिक कार्यक्रमात या प्राण्याच्या आजूबाजूला नेहमीच दोन-चार डोकी निव्वळ मनोरंजनासाठी व तोंडातून पडलेला शब्द झेलण्यासाठीच तत्पर असतात. यांचे झेलण्याचे अप्रतिम कौश्यल्य अर्थातच घरातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळेच लाभते. जावयाच्या प्रत्येक गोष्टीत होकार पुरवणे, उगाचच चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवणे, सतत आग्रह करणे अशी यांची काही ठराविक वैशिष्ठे यांमध्ये अढळतात. या प्राण्यासाठी एवढे करूनही नाराजी व्यक्त करणारी प्रजाती यात सापडते याचा खेद वाटतो.
थोडंसं हटके बघितले तर पारिवारिक कार्यक्रमात आत अजून एक दुसरा कार्यक्रम शांतपणे सुरु असतो, तो म्हणजे "मुली-मुले दाखवण्याचा अघोषित कार्यक्रम" ज्या पालकांना आपल्या पाल्यांचा लवकरच बार उडवण्यानचा विचार असतो त्यांच्यासाठी तर हि सुवर्ण संधीच असते. यासाठी पद्धतशीरपणे पेहरावापासून ते चालण्या-बोलण्यापर्यंत नियोजन व रंगीत तालीम करून घेतली जाते, त्यासाठी पालकांकडून विशेष महत्वाच्या सूचना व मार्गदर्शन पुरवले जाते. बिचाऱ्या मुलं-मुलींची इच्छा नसली तरी जबरदस्तीने नटून-थटून, हसू येत नसेल तरी चेहऱ्यावर एक हलकासा हसरा भाव ठेवून बुजगावण्यासारखे मिरवावे लागते. काहींची तशी हौसदेखील असते, अशी मुले कार्यक्रमाचा आनंद लुटतात परंतु इच्छेविरुद्ध आलेल्यांची मनाची घुसमट समजण्याची पालकांनी तसदी घेणे थोडेसे मला तरी गरजेचे वाटते.
एक खास वर्ग आपल्याला कोपऱ्या-कोपऱ्याने मिरवतांना, कुठेतरी लोकांपासून लांब शांत बसलेला आणि कधी येथून पाय काढता येईल याची संधी शोधणारा पाहावयास मिळतो. हा असतो "स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा वर्ग" डोक्यात एका बाजूला अभ्यास व परीक्षेचा सतत घोळणारा विचार व दुसऱ्या बाजूला नातेवाईकांचे येणारे तीक्ष्ण बाणासारखे प्रश्न यामध्ये हा पिसलेला असतो. लोकांची नजर चुकवून त्यांच्यापासून लांब राहणे हा या मुलांचा स्वभाव नसतो तर मजबुरी असते कारण यश-अपयश हा जरी शेवटच्या दिवसाचा निर्णय असला तरी तितपर्यंतचा प्रवास मोठा आणि कठीण असतो, तरी याचा काहीही विचार न करता काही लोक कळत-नकळत मुलांचा आत्मविश्वास कमी होईल असे बोलून त्यांचा हा प्रवास अजून कठीण बनवतात.
आपण कधी-कधी सहजपणे म्हणतो कि काही लोक साखरेपेक्षाही गोड असतात, याचा संबंध त्यांच्या स्वभावाशी असतो. परंतु काही लोक फक्त तोंडावर बोलण्यापुरतेच गोड असतात ते नेहमीच तोंडात साखर ठेऊन बोलतात कि काय असे वाटते. असले नातेवाईक कार्यक्रमात फक्त स्वतःचे चाहते वाढवण्याच्या हेतूने मिरवत असतात. काहीही असो समोरून आपला गोडपण सोडायचा नाही असा पक्का निश्चय असतो. परंतु पाठीमागे दुसयांच्या नावाचे खडे फोडण्यात देखी यांचाच अव्वल क्रमांक असतो.
एकीकडे रुसलेले चेहरे तर दुसरीकडे प्रफुल्लित हास्य, कुणीकडे नव्या नात्यांची सुरवात तर कुणीकडे जुन्या नात्यांची सावरासावर, एकीकडे भावनाशून्य मन तर दुसरीकडे भावनिक झालेले मन, एकीकडे नवीन वादांची सुरवात तर दुसरीकडे जुन्या वादांवर पांघरून असा हा नात्यांचा गेट-टु -गेदर रंगीबेरंगी व्यक्तिरेखांनी रेखलेला व असंख्य भावनांनी बहरलेला.
-- विवेक विजय रणदिवे
September 1, 2019
बायका कुणाला, कधी, कुठे आणि काय विचारतील आणि कुठून कुठे पाठवतील याचा थांग ब्रम्हांड निर्मात्या ब्रम्हदेवालाही लागणार नाही, हे मात्र खरं. हे सर्व नाट्य दादर स्टेशनवरच्या प्लॅटफाॅर्म क्रमांक चारवर अवघ्या ४५ सेकंदात घडलं. ४५ सेकंद अवधी मुंबई बाहेरची जनता जमेसही धरत नसेल, मुंबईत मात्र या वेळेत चंद्र ते व्हाया पृथ्वी पुन्हा चंद्रावरचा आणखी एक खड्डा एवढा प्रवास सहजपणे होतो..
August 29, 2018
नांगल ते धौला कुआँ या ५ किमी रस्त्याच्या दोन्ही बाजूला कडू लिंबाची झाडे आहेत. अधिकांश झाडे फार जुनी अर्थात अंग्रेजांच्या काळातील असतील. काल रात्री वादळ आणि पाऊस आला होता. अश्या वादळी पाऊसात जुनी झाडे नेहमीच पडतात. संध्याकाळी कार्यालयातून परतताना, चार्टर बस क्रिबीपेलेसच्या लाल बत्ती वर थांबली. खिडकीतून बाहेर पाहिले रस्त्याच्या बाजूला एक वाळलेले, पोखरलेले झाडाचे खोड पडलेले होते. बहुतेक काल रात्रीच्या वादळात कोलमडून पडले असावे. गेल एकदाच हे ही झाड म्हणत मी हळहळलो. गेल्या ३० वर्षांपसून मी या रस्त्यावरून जात आहे, पूर्वी हे झाड हिरवेगार होते. संध्याकाळी कार्यालयातून परतताना, लाल बत्ती वर चार्टर बस थांबली कि कित्येक बाबू खिडकीतून हात लांब करून, झाडाच्या लहान-लहान फांद्या तोडण्याचा प्रयत्न करायचे. काही चक्क बस वर चढून, फांद्या तोडायला कमी करायचे नाही. अर्थातच, दातून साठी. बस थांबली असताना पक्ष्यांची किलबिल ही ऐकू यायची. पण वेळ सदा एक सारखा राहत नाही, काही वर्षांपूर्वी झाडाला वाळवी लागली. वाळवीने झाड पोखरून टाकले. एक-एक करून फांद्या गळून पडल्या. संसारापासून अलिप्त तपस्वी सारखे दिसायचे ते सुकलेले झाडाचे खोड. आज ते ही गेल. अचानक लक्ष्य त्याच जागेवर दीड-दोन फुट उंच एक कडू लिंबाच्या लहानश्या रोपट्याकडे गेले. अरेच्या हे कुठून आले, एका दिवसात रोपटे एवढे वाढत नाही. काही महिन्याचे हे निश्चित असेल. झाडाच्या सावलीत वाढणाऱ्या या रोपट्या कडे आपले लक्ष कसे गेले नाही. झाड गेल्याचे दुख कुठच्या कुठे पळाले. काही वर्षात ह्या रोपट्याचे ही मोठे झाड होईल. एक मोठ्या बहरलेल्या झाडाचे चित्र डोळ्यांसमोर तरळले. आनंदाने युरेका-युरेका म्हणत जोरात ओरडायचे वाटले. पण काय करणार, सभ्यतेच्या बुरख्यात राहणार्यांना, आनंद ही मोठ्याने ओरडून व्यक्त करता येत नाही.
जीवन पार्कच्या स्थानकावर बस थांबली, बस मधून उतरून घराकडे पायी चालत जाऊ लागलो. एका गल्लीत घराबाहेर खाटेवर एक म्हातारी झोपलेली दिसायची. आजकाल तिच्या सोबत दीड-दोन वर्षाची एक चुणचुणीत पिटुकली, बहुतेक तिची नात असावी सोबत खेळताना दिसायची. कालचीच गोष्ट, त्या गल्लीतून जाताना, ती पिटुकली आपल्या हातातले बिस्कीट म्हातारीला दाखवत म्हणत होती, दादी, आप भी लों ना चीजी (खाऊ). तिची दादी प्रेमाने तिच्या डोक्यावर फिरवीत म्हणाली, आपने खा लिया न, समझो मेरा पेट भर गया. अचानक पिटुकलीचे लक्ष्य माझ्या कडे गेले, हातानी बिस्कीट उंचावत आनंदाने ती म्हणाली, चीजी (खाऊ) आणि दुडदुड धावत धावत घरात गेली. मला हसूच आले, म्हातारीकडे पहिले. अस्ताचलच्या सूर्याचे सोनेरी किरणे तिच्या चेहऱ्यावर पसरली होती. तिचे डोळे बंद होते. तिचा चेहरा संतुष्ट, शांत आणि आनंदी दिसत होता. काही क्षण मी तिला पाहतच राहिलो. अचानक एका आवाजाने तंद्रा भंग झाली. अंकल क्या हुआ, एका दहा एक वर्षाच्या मुलाने विचारले. कुछ नहीं, म्हणत मी तिथून पाय काढला. आज त्या गल्लीतून जाताना सदानकदा घरा बाहेर असलेली खाट दिसत नव्हती. त्या जागी घरा बाहेर एका सतरंजीवर पांढऱ्या वस्त्रात आणि पडलेले चेहरे करून लोक बसलेले दिसले. काय झाले असावे मला याची कल्पना आली. पण घरात काय घडले याची कल्पना इवल्याश्या पिटुकलीला कशी असणार. ती नेहमीप्रमाणे हातात बिस्कीट घेऊन इकडे तिकडे दुडदुड धावत होती. तिचे लक्ष्य माझ्याकडे गेले, हातातले बिस्कीट दाखवत म्हणाली, अंकल, चीजी लोगे, मला राहवले नाही, तिच्या डोक्यावरून हात फिरवित म्हणालो, आप के लिये है चीजी, आप ही खाओ. तेवढ्यात तिची आई बाहेर आली, तिने तिला उचलले आणि घरात नेले. मी पुढे निघालो. न जाणे का, डोळे पाण्याने डबडबले. डोळ्यावरून चष्मा काढला आणि रुमालाने डोळे पुसले. सहज वर आकाशात बघितले, अस्ताचालच्या सूर्याचे सोनेरी किरणे सर्वत्र पसरली होती. मनात म्हंटले, उद्या उगविणाऱ्या सूर्याची किरणे ही सोनेरीच असणार. संहार आणि सृजनाची दोन्हीची साक्षी ही सोनेरी किरणे.
May 16, 2015
गुलजार यांचा हा लेख ललित-लेख आहे, असें जर जाहीर केलें गेलें असतें, तर मग त्यांच्या या कल्पनाविष्काराबद्दल कांहीं तक्रार असायचें कारणच नव्हतें. मात्र, तसें न केल्यानें, वास्तविक परिस्थिती काय होती अथवा काय होती-असेल , याचा ऊहापोह करणें क्रमप्राप्त झालें. या मंथनातून, गालिबबद्दल योग्य ती माहिती सर्वांपर्यंत पोचेल अशी आशा.
April 6, 2019
डॉक्टर जेनर जोसेफ हे प्रसिद्ध बालरोग तज्ञ व शास्त्रज्ञ होते. निसर्ग प्रेमी होते. त्यांनी आपले घर समुद्र किनाऱ्यावर बांधले होते. रोज सूर्यास्त समयी ग्यालरीत बसून समुद्राच्या पैलतीरी आकाशातून मावळनाऱ्या सूर्याला बघताना त्यांना खूप आनंद वाटत असे.
December 3, 2020
November 21, 2022
मी ठरवून टाकलं, आजचा दिवस आपण पूर्वी जसा साधासुधा होतो, तसाच सर्वसामान्य माणसासारखा घालवायचा..
October 27, 2021
निसर्गाची नवलाई अनेक अंगाने मनुष्याला खुणावत असते. भूकंप, ज्वालामुखी, आदी या नवलाईची काही रूपे रहस्यमयी, विस्मयकारी आहेत तर धबधबे, सरोवर, गरम पाण्याचे झरे ही रूपे मनोहारी, आल्हाददायी आहेत. अशा विविध 25 नवलाईंमागील रहस्य, विज्ञान, कारणमीमांसा यांचा उलगडा अत्यंत सोप्या ओघवत्या भाषेत प्रा. सुधीर सहस्त्रबुद्धे यांनी निसर्गाची नवलाई मध्ये केला आहे. कोणत्याही वयोगटाच्या वाचकांना हे लिखाण आवडावे व त्यांच्या ज्ञानात भर पडावी. लेखक : प्रा. सुधीर सहस्त्रबुद्धे डॉ. मधुकर आपटे ,नागपूर प्रकाशक : नचिकेत प्रकाशन, 24 योगक्षेम ले-आऊट, स्नेह नगर वर्धा रोड, नागपूर-15 पाने: ९२,किंमत : रू ९०/-
September 29, 2012
सूर्याने आपली केशरी सोनेरी आभा वाळूवर पसरली आणि वाळूचा रंगच बदलून गेला. जिथवर नजर जाईल तिथवर सोनेरी रंगाची उधळण झाली. सोन्याचा व केशराचा सडा मऊ मुलायम वाळूवर पसरला. मावळतीच्या सूर्याचा गोळा जणू अथांग वाळूवर वास्तव्याला आल्यासारखा अप्रतिम दिसत होता. आम्ही ते दृश्य डोळे भरून पहात होत तोच पुन: एक ५-७ घरांची वस्ती लागली. प्रवास सुरू केला तेंव्हा सकाळच्या कोवळ्या ऊन्हात फिकट निळसर दिसणारे आकाश, दुपारच्या टळटळीत ऊन्हात चांदीसारखे चमकणारे आकाश, मधेच मावळतीच्या सूर्याने केलेले सोनसळी केशरी आकाश आणि आता आमची बस थांबली तेव्हा सूर्याचा गोळा क्षितिजाकडे झेपावत असताना इंद्रधनुष्यातले जवळपास सगळे आकर्षक रंग ल्यालेले आकाश...आकाशाचे एवढे विविध रंग इतके दिवस सिमेंटच्या जंगलात राहिल्याने कधी दिसलेच नव्हते. ते अगदी तृप्त मनाने न्याहाळत होतो. अद्याप सूर्य क्षितिजावर रेंगाळत होता. त्याच्या प्रकाशात सगळे अगदी स्वच्छ दिसत होते. रंगीबेरंगी छोट्या चौकोनी गोल तंबूंची वस्ती खूपच उठून दिसत होती. बस त्या वस्तीजवळ थांबली तेव्हा ५-६ गोरीपान गोबरी मुले रंगीबेरंगी पोशाखात व स्कार्फ व टोपीचे गोंडे उडवत वस्तीचे कुंपण ओलांडून बसपाशी आली. आम्ही खाली उतरताच त्या वस्तीचा म्होरक्या आमच्या स्वागताला पुढे आला.
म्होरक्याने आम्ही तिथे उतरताच आम्हाला मोठ्या तंबूपाशी नेले. त्याच्या मागे एक विस्तीर्ण तलाव होता. हाच तो प्रसिद्ध 'चिंघाई 'तलाव. चीनमधील हे सर्वात मोठे अंदाजे४३००चौ.कि.मी.व २१ते२५मी. खोल) तळे खाऱ्या पाण्याचे आहे. आकार इतका मोठा की, एका तीरावर उभे राहून दुसरा तीर दिसतच नव्हता. हा तलाव म्हणजे चिंघाई प्रॉव्हिन्सची हद्द सुरू झाल्याची खूणच. १००००' उंचीवरचा हा तलाव अतिशय थंडगार, स्वच्छ, काळसर पाण्याचा आहे. त्यात विविध प्रकारचे भरपूर मासे आहेत. पूर्वी १०० पेक्षा जास्त नद्या या तळ्याला पाणी पुरवत असत. पण वाळूचे थर या नद्यांमध्ये वाढल्याने त्यातील सुमारे २५ नद्याच शिल्लक राहिल्या आहेत. तळ्याचा आकार कायम कमी जास्त होत असतो. ते लहान व्हायला लागले की, अनेक छोटी छोटी तळी या तळ्याजवळ तयार होतात. २००४ मध्ये असेच एक छोटे तळे तयार झालेले आम्ही पाहिले. या तळ्याच्या पश्चिमेला एक बेट आहे, त्यावर एक महादेवाचे मंदिर आहे. Ma Ha De Va असे त्याचे तिबेटी बौद्ध लोकांमध्ये त्याचे अभिधान आहे. तिबेटी लोकांचे ते तीर्थस्थान असल्याने कोणीही या तळ्यातून बोटीने प्रवास करून देव दर्शनाला जात नाही. वर्षातून तीन महिने ते संपूर्णपणे आटते. तेव्हाच बौद्ध धर्मगुरू चालत जाऊन देवाचे दर्शन घेऊ शकतात. इतर वेळी नाही. चिनी वर्षगणनेप्रमाणे फक्त 'घोड्याच्या' वर्षात या तळ्याला प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे. घोड्यावरून १८ दिवसात किंवा पायी२३ दिवसात ही प्रदक्षिणा यात्रेकरू पूर्ण करतात. तिबेटमध्ये जी ४ तळी पवित्र मानली जातात त्यापैकी हे एक. मानसरोवराशेजारी कैलास पर्वत आहे. त्यामुळे या चार तळ्यात त्याचा मान पहिला. चिंघाई तळे कोणत्याही पर्वत पायथ्याशी नाही, तर वाळवंटात आहे. या तलावाच्या दुसऱ्या टोकास एक (चिंघाईपेक्षा) लहान तळे आहे. वाळवंटात असूनही त्याचे पाणी गोड आहे हे आश्चर्य. अर्थात खरे काय ते गाईडच जाणे, कारण ते पाणी न पचणारे आहे असे त्याने आधीच जाहीर केले होते. स्थलांतरीत पक्ष्यांच्या विश्रांतीसाठी ते अतिशय उत्तम आहे. त्यामुळे पक्ष्यांच्या खूप जाती इथे पहायला मिळतात. तळ्याच्या काठी वाळूतून थोडे चालून तळ्याच्या पाण्यात पाय बुडवून आम्ही परत तंबूत आलो.
एव्हाना सूर्यदेव दिवसभराचा प्रवास संपवून थकून भागून विश्रांतीसाठी क्षितीजापलिकडे जायला निघाले. जाताजाता त्यांनी आपले केशरी, भरजरी पांघरूण तळ्यावर पसरून तळ्याच्या पाण्याचा रंग बदलण्याची किमया आम्हाला दाखवली. तळे अंधारात अदृश्य होऊ लागताच आम्ही तंबूत परतलो. आता आमच्या स्वागतासाठी तंबूत ५-६ पुरुष व काही स्त्रिया जमल्या होत्या. त्यातील पुरुषांनी नर्तकांचा चकाकता वेष परिधान केला होता. आरसे, टिकल्या लावलेले घेरदार अंगरखे, खाली चुणीदार पायजमे, कमरेवर बांधलेले रंगीबेरंगी रूमाल, डोक्यावर गोल टोप्या असा त्यांचा वेष आकर्षक होता. नर्तिका तर खूपच सुंदर दिसत होत्या. त्यांनी डोक्यावर सोनेरी टिकल्या लावलेल्या जाळ्या बांधल्या होत्या. घट्ट दोन वेण्यांना रंगीबेरंगी गोंडे बांधले होते. बेताच्या उंचीच्या, रंगाने गोऱ्यापान, सुडौल बांधा, धरधरीत नाक (कदाचित मेकपची करामत असेल) असणाऱ्या, हातभर रंगीबेरंगी बांगड्या व पायात जाडजाड तोरड्या घालून छुमछुम करत त्या नर्तिका आम्ही बसलो होतो त्या तंबूत आल्या. तेवढ्यात तंबूचा मागचा पडदा अचानक जमिनीवर पडला व नाचाचीपोज घेऊन उभ्या नर्तिकांमागे आपोआप गडद निळ्या काळसर आकाशाचा पटल, त्यात चमकणाऱ्या चांदण्यांसह निर्माण झाला. आमची टेबले अर्धगोलाकारात मांडली होती. जेवणाची सुरुवात अर्थातच सूप-ब्रेडने झाली.
नंतर नेहेमीप्रमाणे २-३ कोर्स भाज्या व भाताच्या थाळ्या आल्या. इकडे जेवण सुरू होताच नर्तिकांनी आपली कला सादर करण्यास सुरुवात केली. तालात पदन्यास करत, एकापाठोपाठ गिरक्या घेत सगळ्याजणी व त्यांचे जोडीदार कधी गोलाकार करत, कधी एकामागोमाग जात तर कधी एकमेकांच्या मिठीत शिरत लीलया सगळीकडे भिरभिरत होते. साथ फक्त ढोलकी सारख्या दिसणाऱ्या वाद्याची व सनईसदृश सुरावटीची. नाचाच्या कोणत्याही खास शिक्षणा शिवाय त्यांनी जी 'नृत्यकला' सादर केली ती एकदमच लाजबाब! २ तास कसे संपले कळलेच नाही.
तेथून निघाल्यावर झिनिंगला पोहोचायला फार वेळ लागला नाही. आमचे हॉटेल मुख्य रस्त्यावर होते. त्यामुळे मुक्कामी पोहोचताच सगळे जण पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडले. चालणे फार झाले नसले तरी दिवसभराचा प्रवास अंगावर यायला लागला, तसे सारे परतले. सगळीकडे सामसूम झाली. आम्हीही गाढ झोपेत होतो. अचानक रात्री २-३ च्या सुमारास आमच्या खोलीची बेल वाजली. त्या अगोदर कुलुपात किल्ली फिरवण्याचा प्रयत्न झाल्याच्या चाहुलीने चाळवलेली झोप आता पूर्णपणे उघडली. पीपिंग होले मधून पहाण्याचा आम्ही प्रयत्न करीत होतो, पण अंधाऱ्या कॉरिडॉरमध्ये काहीच दिसेना. दार उघडावे का अशा संभ्रमात असतानाच बेल पुन: जोरजोरात वाजू लागली व दाराचे हँडल फिरवण्याचा आवाजही येऊ लागला. रिसेप्शनचा फोन उचलला जाईना. आता दारावर धक्के व बरळल्याचाही आवाज येऊ लागला. गाईड व सिक्युरिटीही झोपेत! त्यामुळे गप्प बसून बाहेरचा धिंगाणा थांबण्याची वाट पहाण्याची वाट पहाण्याखेरीज उपायच राहिला नाही. स्थानिक भाषा येत नाही, बाहेर किती जण आहेत याचा अंदाज नाही. त्यामुळे जीव मुठीत धरून बसण्याखेरीज इलाजच नव्हता. तास-दीड तासाने धिंगाणा हळूहळू कमी झाला. शेजारच्या खोल्यांपैकी कोणी बाहेर कसे आले नाही याचेही आश्चर्य वाटल्यावाचून राहिले नाही. सकाळी उलगडा झाला की हा प्रकार करणारा एक दारुडा पूर्वी त्या खोलीत रहात होता आणि अधून मधून तो या हॉटेल मधल्या त्याच्या पूर्वीच्या खोलीत शिरणे, प्रवेश न मिळाल्यास शिवीगाळ करणे, आरडाओरडा करणे, धिंगाणा घालणे वगैरे करतो. तिथल्या स्टाफला हे नवीन नसल्याने ते तिकडे दुर्लक्ष करतात! चीनच्या भूमीवर आलेल्या पहिल्याच सलामीने आम्हाला नवाच अनुभव मिळाला.
सकाळी आम्ही झिनिंगची सफर केली. चिनी औषधालय, त्याचा कारखाना इ. ठराविक ठिकाणांची पहाणी झाली. शहर जरा उंचावर असल्याने रस्ते खूपच चढ उताराचे आहेत. अगदी कोकणची आठवण करून देणारे. सभोवती गर्द झाडी. जेवणानंतर झिनिंगच्या स्थानिक 'तू' या आदिवासी जमातीच्या लोकांना भेट होती. गावातून निघून आमची बस गर्द झाडीत लपलेल्या वळणावळणांच्या व चढ उतारांच्या रस्त्याने जायला लागली. अतिशय सुंदर असा हा साधारण दीड तासाचा प्रवास करून आम्ही त्यांच्या वस्तीवर पोहोचलो. तेथे त्यांनी बनवलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी प्रत्येक झोपडीबाहेर हातगाड्यांवर दुकाने थाटली होती. उत्तम भरतकाम केलेले छोटेछोटे बटवे, स्कार्फ, उशांचे अभ्रे, हस्तकलेचे नमुने असणारे विविध प्रकारचे रुमाल, पिशव्या यांची विक्री या हातगाड्यांवर चालू होती. मध्यभागी चौक व बाजूने २-२ खोल्यांची घरे अशी ५-६ घरांचीच ती वस्ती. चौकात थोडासा उंचावर स्टेजसारखा चबुतरा आणि प्रत्येक घराच्या पडवीत प्रवाशांची बसण्याची सोय केली होती. आमची बस थांबताच २-३ पुरुष व २-३ स्त्रिया पुढे आल्या. हेच ते 'तू' जमातीचे लोक. आमच्या गळ्यात स्कार्फ घालून व अत्तरासारखा स्प्रे उडवून त्यांनी आमचे स्वागत केले व आत नेऊन पडवीत बसवले. सर्वजण स्थानापन्न झाल्यावर चायनीज टी व कुकीज देऊन आमचा पाहुणचार करून त्यांच्यातील मुखियाने कार्यक्रमाची सुरुवात करून दिली. चौकातील स्टेजवर पाहुण्यांच्या करमणुकीसाठी वेगवेगळे कार्यक्रम सुरू झाले. स्टेजच्या मधोमध खांब होता. त्याच्या वरच्या टोकाच्या गोल कड्यावर पक्क्या बसवलेल्या पण जमिनीपासून बऱ्याचवर तरंगतील अशा बांबूच्या काठ्या होत्या. या काठ्या व खांबही रंगीबेरंगी कागद, कापड यांनी सजवलेले होते. पडवीत, मोकळ्या जागेत, छपरांवर पताकांच्या माळा वाऱ्यावर डुलत होत्या. एका बाजूच्या खोलीत वादक बसले होते. आम्ही चायनीज चहा व उकडलेल्या शेंगांचा आस्वाद घेत असताना वाद्ये वाजू लागली व कार्यक्रमाला सुरुवात झाली. कमरेपर्यंत येणारी रंगीबेरंगी पोलकी, त्याखाली पायापर्यंत येणारे रंगीत घेरदार परकर, एक वेणी व तिला झुपकेदार गोंडा, डोईवर मोठ्या घेराची हॅट घातलेल्या काही मुली व रंगीत शर्ट-पायजमे घातलेली मुले हातात हात घालून पुढे आली, आम्हाला विश करून सर्कशीसारख्या कसरती करू लागली. मधल्या खांबाशी लागून असलेल्या कड्यांना लोंबकळून त्यांनी हवेत गोल फेर धरून कसरती सुरू केल्या. त्या पाहून अगदी थक्क व्हायला झाले. निवेदन चिनी भाषेतून होते, तरी देहबोली इतकी स्पष्ट व बोलकी होती, की भाषा समजत नसूनही सर्वकाही समजत होते. हा खेळ बराच वेळ चालला होता. त्यानंतर थोडी विश्रांती घेऊन त्यांचा महत्त्वाचा खेळ सुरू झाला.
यावेळी खेळ करणाऱ्यांनी आमच्या सहप्रवाशांपैकी मॅडेरिन भाषा येणाऱ्या एका चिनी माणसाची निवड केली. तोही खूप खूष झाला. त्याच्या बायकोने आपला कॅमेरा सरसावला. त्याला घेऊन ते आतल्या खोलीत गेले. थोडा वेळ गेला अन् अचानक आतल्या खोलीतून वाजंत्रीचा आवाज ऐकू येऊ लागला. आमचे लक्ष साहजिकच तिकडे गेले. वाजंत्रीवाले आपल्या वाद्यांसह दोन-दोनच्या ओळीत, तालात मागे पुढे पावले टाकत, मागे पुढे झुलत पुढे आले. त्यांच्या मागोमाग चमकदार रंगीबेरंगी कपडे व मुंडावळ्यांसारख्या माळा सोडलेली टोपी घातलेला, आमचा सहप्रवासी दोघांच्या हातात हात घालून नाचत नाचत आला. त्याच्या मागोमाग त्याचे (तात्पुरते) 'तू' आईवडील व भावंडे होती. त्यांचा एक फेरा पूर्ण झाल्यावर स्टेजवर अगोदरच दाखल झालेल्या 'तू' पुरोहितासमोर त्याला उभे केले. त्याच्या मागोमाग तशाच चमकत्या पोशाखात 'नवरी' ही आपल्या आईवडील व बहिणी-मैत्रिणींबरोबर नाचत येऊन पुरोहितासमोर उभी राहिली. पुरोहिताने त्यांच्या (मँडेरीन) भाषेत काहीतरी विचारले. दोघांनी माना डोलावल्या, दोघांच्या हातात रेशमी स्कार्फ व फुले दिली गेली. ते त्यांनी एकमेकांना द्यायचे होते. स्कार्फ घालताना वधूवरांना उचलणे, उंच करणे, दोघांची उंची सारखी होताच नवरीला खांद्यावर टाकून दुसऱ्याच माणसाने पळवणे, नवऱ्याने त्यांना गाठणे असे बरेच खेळ करून झाले. फुले देताना अचानकच नवरीऐवजी दुसरी जाडी म्हातारी बाई पुढे येणे, तिला नवरदेवाने फुले देणार नाही म्हणणे असे बरेच गमतीजमतीचे प्रकार चालू होते. सगळ्यांची हसून हसून पुरेवाट झाली. शेवटी एकमेकांच्या गळ्यात स्कार्फ घालण्यात यश आल्यावर प्रीस्टने त्यांचे लग्न झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर चिनी पद्धतीनुसार एकमेकांच्या आईवडिलांना गुडघ्यावर बसून चहा देणे, त्यांनी वधुवरांना 'आंगपाओ'ची (चिनी) लालपाकिटे भेट देणे वगैरे 'विधी' पार पडले. दोघांनीही पुरोहिताशी हस्तांदोलन करून विवाह संपन्न केल्याबद्दल आभार मानले. सर्व समारंभ अत्यंत गंमतीत व हास्यविनोदात पार पडला. त्या सहप्रवाशाची सिंगापुरी धर्मपत्नीही उत्साहाने सगळे शूटिंग करत होती, फोटो काढत होती. लग्न समारंभ संपल्याची घोषणा झाली व नवरी आपल्या सख्यांबरोबर आतल्या खोलीत गेली. तिचा 'नवरा' (आमचा सहप्रवासी) ही कपडे बदलून आमच्यात येऊन बसला.
-- अनामिका बोरकर
December 7, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti