(User Level: [swpm_show_member_info column="membership_level_name"])

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • खरा पराक्रम

    बाराव्या शतकात फ्रान्समध्ये फिलीप गस्ट नावाचा राजा होऊन गेला. तो स्वतः अत्यंत पराक्रमी होता मात्र इतर पराक्रमी सैनिकांना वा सरदारांनाही तो सतत प्रोत्साहन द्यायचा. मुख्य म्हणजे त्याला सत्तेची कसलीच हाव नव्हती. आपल्या पदावर आपल्यासारखाच पराक्रमी व धाडसी राजा - मग तो कोणीही का असेना - बसावा, हीच त्याची इच्छा होती. त्या काळी देशाचे साम्राज्य वाढविण्यासाठी बऱ्याच लढाया होत. अशाच एका शत्रूराष्ट्राने कान्सवर हक्क चढविला. शत्रू बलाढ्य होता. त्यामुळे लढाईला तोंड फुटण्यापूर्वी राजा फिलीपने आपला राजमुकुट व पवित्र सिंहासन एका मैदानात आणण्याची सैनिकांना आज्ञा केली. सिंहासनावर त्याने राजमुकुट ठेवला व त्याखाली 'सर्वोत्कृष्ट पराक्रम गाजविणाऱ्या वीर पुरुषास' असा मजकूर असलेला फलक लिहून ठेवला व तेथे जमलेल्या सरदार व सैनिकांसमोर भाषण करताना तो म्हणाला, '' या सिंहासनावरील माझा हक्क मी या क्षणी सोडला आहे. या युद्धातके खय पराध्य करून विजयश्री खेचून आणील त्यालाच हे सिंहासन मिळेलच कोच यापुढचा राजा असेल.'' त्याचे ते वीरश्रीयुक्त भाषण ऐकून सैनिकांना चेव चढला व अत्यंत शर्थीने ते लढले. अशा सैनिकांच्या सहकार्यानेच स्वत: राजा फिलीपनेही या युद्धात अतिशय मोठा पराक्रम केला व शत्रूराष्ट्रावर विजय मिळविला. सायंकाळी जेव्हा त्याच मैदानात सर्व एकत्र जमले, त्या वेळी सर्व सरदार व सैनिकांनी एकमुखाने त्याच्या पराक्रमाची प्रशंसा केली व राजा फिलीपचा जयजयकार करून त्यालाच ते सिंहासन पुन्हा बहाल केले.

  • वारसा सांभाळणारी लेखिका

    आई-वडील दोघेही प्रख्यात वैज्ञानिक होते. त्यामुळे संशोधनाचे बाळकडू जणू तिला लहानपणापासून मिळाले होते. आई-वडिलांचा तिला सार्थ अभिमान होता. कारण दोघांनाही भौतिकशास्त्रातील संशोधनाबद्दल नोबेल पुरस्कार मिळाला होता. तिच्या आईने तर दोनदा नोबेल पुरस्कार मिळवून साऱ्या जगाला आश्चर्यचकित केले होते. अशा या थोर संशोधक आई-वडिलांचे नाव होते मेरी क्युरी व पिअरे क्युरी आणि त्यांच्या पोटी जन्म घेऊन स्वतःही नोबेल मिळविणारी ती संशोधिका होती आयरीन ज्युलिएट क्युरी. १९३५ मध्ये रसायनशास्त्रातील मौलिक शोधाबद्दल आयरीनला तिचे पती फ्रेडरिक ज्युलिएट यांच्याबरोबर संयुक्तपणे नोबेल पुरस्कार मिळाला. आयरीन क्युरीचा जन्म १२ सप्टेंबर १८९७ मध्ये पॅरिस येथे झाला. रात्रंदिवस संशोधनामध्ये गढून गेलेल्या आई-वडीलांमुळे आयरीनला संशोधनाचा जणू वारसाच मिळाला होता. आयरीनने आपल्या प्राथमिक शिक्षणानंतर 'रेडिओग्राफर नर्स' म्हणून काम सुरू केले. अल्का किरणांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण संशोधन केल्याबद्दल तिला १९२५ मध्ये डॉक्टरेट मिळाली. रेडियम इंस्टिट्यूटमध्ये काम करीत असताना ती फ्रेडरिक ज्युलिएटच्या संपर्कात आली. दोघांची कार्यक्षेत्रातील आवडनिवड सारखीच होती. त्यामुळे दोघांनी १९२६ मध्ये विवाह केला व नंतर मेरी क्युरी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनकार्य सुरू केले. आयरीनने अल्का किरणांसंदर्भात आधीच संशोधन केले होते. त्यानंतर तिने रेडिओधर्मी मूलतत्त्वांची कृत्रिम निर्मिती असा शोध लावला. याच शोधाबद्दल तिला फ्रेडरिकबरोबर संयुक्तपणे नोबेल पुरस्कार मिळाला. नंतर तिने न्यूट्रॉनच्या संदर्भात महत्त्वपूर्ण संशोधन केले. काही काळ प्रोफेसर म्हणून काम केल्यानंतर १९४६ मध्ये ती आयरीन रेडियम इन्स्टिट्यूट या संस्थेची ती संचालिका झाली. वैज्ञानिक संशोधनाबरोबरच तिला सामाजिक कार्यातही रस होता. 'वर्ल्ड पीस कौन्सिल' या संस्थेची ती सदस्य होती. १९५६ मध्ये पॅरिसमध्ये तिचे निधन झाले. तिचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्याची जबाबदारी तिचे पती फ्रेडरिक ज्युलिएट याने नंतर पार पाडली.

  • मानसिक तणाव (भाग ६)

    आपण वैशिष्ट्यपूर्ण आहात. तुलना करुन चिंता नका

    आपण आपल्या जीवनाची तुलना दुसऱ्य़ाबरोबर करुन चिंतीत होऊ नका. कारण, या विश्वांत आपण एक वैशिष्ट्यपूर्ण आहात. या जगात आपल्या सारखा अन्य कोणी नाही.

    दुर्दैवाने आपण स्वतःला ओळखत नसतो. जगाला मात्र समजण्याचा प्रयत्न करतो. सतत तुलनात्मक विचार चालले असतात. त्याचमुळे निराशेच्या वातावरणांत राहतो. इतरांच्या तुलनेमुळे स्वतःमधले वेगळेपण विसरतो.

    नुकतीच क्रिकेटची वल्डकपची मँच बघितली. एक शॉटमध्ये सचिन तेंडूलकर व शाहरुख खान यांची थोडीशी चर्चा दाखवली गेली. सचिन म्हणतो की आपण एक चांगले अभिनेते असावयास हवे होते. तर शाहरुख खान याने आपण यशस्वी क्रिकेटीयर झालो असतो तर आनंद झाला असता ही इच्छा व्यक्त केलेली दिसली. हे सहज म्हटले असेल तर गम्मत म्हणून घेता येईल. परंतु अशी जर त्यांची सुप्त इच्छा असेल, तर ते मानसिक तणावाचे बळी ठरतील.

    एक लक्षात ठेवा की प्रत्येकजण हा सर्वगुण संपन्न असू शकत नाही. जे मिळाले, जे तुम्ही कमावले त्यांत समाधानी रहा. चांगल व वेगळ मिळवण्या प्रयत्न असू द्या. परंतु ठेवीले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ही वृत्तीच तुमचे मानसिक तणावापासून मुक्त ठेवेल.

    निंदकाचे घर असावे शेजारी.

    संत शिरोमनी श्री. तुकाराम महाराजानी म्हटले आहे. निंदकाचे घर असावे शेजारी. एक महान तत्वज्ञान त्यानी सांगितले आहे. तुम्हाला घडवण्यात, तुमची मानसिक जडन घडन चांगली करण्यात, ह्या तत्वाचा मोलाचा वाटा असतो. प्रत्येकजण चांगले वा वाईट गुणधर्म बाळगुण असतो. तुमचे मित्रमंडळ, नातेसंबंधी तुमच्या चांगल्या गुणांची नेहमी स्तुती करतात. हे चांगले आहे. परंतु तुमच्यामधील जे कांही दुर्गुण असतील, वागणूकीमधील अहंकारी, हट्टी स्वभाव ते फक्त तुमचे निंदकच चव्हाट्यावर आणतात. त्या निंदकाना आपलस करा, वा प्रेम करा हा संतथोर संदेश मी देवू इच्छीत नाही. परंतु निंदकाच्या सहवासापासून तुम्हास मिळणार, तुमच्या स्वभावातील दुर्गुणांची जाणीव करुन देणारा संदेश. त्यावर चिंतन करा. मनन करा. मात्र मुळीच कुणाबरोबर चर्चा करु नका. कोण सांगतो ह्यापेक्षा काय सांगतो, ह्यावर तुमचा वैचारीक भर असावा. चांगल्या मनाची ठेवण, चांगले चिंतन करु शकते. चांगला स्वभावच तुमचा मानसिक तणाव कमी करु शकतो.

    नेहमी लक्षात असू द्या की तुमची निंदा करणारा तुमचा खरा मित्र आहे. जो तुम्हाला विनामुल्य एका मनोचिकित्सकाप्रमाणे तुमच्या ढोबळ चुका व कमतरतांकडे तुमचे लक्ष वेधू इच्छितो.

    क्रमशः पुढे ७ वर चालू

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • ध्वनी’ – एक ईश्वरी उर्जा

    सुर्यास्ताची वेळ होती. समोरचे नैसर्गिक द्दष्य टिपत बाकावर नामस्मरण घेत बसलो होतो. हाती मन्यांची माळा होती. सैरावैरा धावणारे मन केंव्हा सुर्यास्ताकडे, वा माळेकडे वा सभोवतालच्या परिसराकडे जात होते. थोड्याश्या अंतरावर एक तरुण हाती गितार घेऊन एका जुण्या गाण्याची धुंद वाजवीत होता. आम्ही दोघे समान परीस्थितीचे सहप्रवासी होतो. माझे नामस्मरण व ईश्वरी आराधनेत लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न. त्याचा सुरतालांत गाणे बद्ध करण्याचा, संगीताच्या आनंदात रममान होण्याचा प्रयत्न. माझा प्रयत्न जाणिवेतून होता. त्याचा कदाचित् अजाणतेने. मार्ग मात्र जात होते ते त्या अनंतातील कोणत्यातरी दालनांत.

    "ध्वनी " एक ईश्वरी उर्जा ह्यामध्ये.

    नामस्मरणाची प्रक्रीय व उद्देश कोणता. परमेश्वर संकल्पनेशी एक रुप होणे. शब्दांत दडला आहे स्वरुप आणि ध्वनी. स्वरुप असेल विचारांचे - कल्पनांचे आकार. जे खोटा आभास निर्माण करतील. उलट ध्वनीत एकरुप होण्याचा अनुभव आनंद व ईश्वरी असेल.

    नामस्मरणाच महत्व चांगलच लक्षांत आले होते. प्रथम त्या परमेश्वरला जाणणे, त्याच्यामध्ये एकरुप होण्याचा प्रयत्न हेच जीवनाचे अंतीम ध्येय असावे हे समजलो. कारण तसे आपण सर्व शुन्यातून आलो व शून्यातच एकाग्र होणार. संसार, ग्रहस्थाश्रम इत्यादी सारे मार्ग फक्त देहाच्या वाढीसाठी व अंतीम ध्येयाकडे नेण्याकरीता.

    नामस्मरण कुणाचे. तो परमेश्वर तर सर्व व्यापी, सर्व श्रेष्ठ, निर्गुण निराकार. हे जगाने मान्य केले. त्याचे नामकरण हे केवळ मन केंद्रीत करण्यासाठी. मात्र तो एक मार्ग समजुन. ध्येय व साधना यांची स्पष्ट जाणीव सतत असावी. नसता साधनेलाच ध्येयाचे रुप समजून अनेक फक्त मार्गातच रेंगाळतात. इष्ठ देवतेचे नाम व तेही लयबद्धते मध्ये शांत मनाने घेत त्या परमेश्वराची आराधना समाधान देते. तरी खरी शांतता अद्यापी बरीच दूर राहते.

    कुठे व कसा आहे तो परमेश्वर. सत् चित् व आनंद किंवा सत्यम् शिवम् सुंदरम् ह्यातच त्या परमेश्वराचे योग्य व निश्चीत असे वर्णन ऋषीमुनीनी केलेले आहे. फक्त " आनंद " हाच ईश्वर असतो. मात्र त्यामध्ये विचार वा भावना ह्यांचा किंचीतसा देखील स्पर्ष नसावा. केवळ आनंद आनंद आणि आनंद. आनंद व्यक्त होत नसतो. व्यक्त आनंद खरा आनंद रहात नाही. समाधान व्यक्त होते. शांतताही व्यक्त वा शरीर मनावर प्रकट होते. जे जे व्यक्त केले जाते, कुठेतरी कृत्रिमता त्यावर अच्छादलेली असते. फक्त आनंद ह्रदयामधून शरीरभर पसरुन जातो. विचार शुन्य, भावना शुन्य तरीही एका वेगळ्याच अनुभवाची प्रचीती. क्षणिक तरीही अनंत काळ व्यतीत झाल्याप्रमाणे.

    मानव हा निसर्गातील एक घटक. मात्र त्यानेच स्वतः आपण सर्व श्रेष्ठ नैसर्गिक कलाकृती असल्याचे चित्र जगासमोर रंगविलेले आहे. त्याला प्राप्त बुद्धीच्या देणगीच्या जोरावर तो हे सारे रंगवितो. ईश्वराने त्याच्या अगणित साधन सामुग्रीमधून फक्त पांचच तत्वांची जाण त्याला दिलेली आहे. आणि ती तत्वे जाणण्यासाठी, समजण्यासाठी पांचेंद्रिये देऊ केली आहेत. फक्त पांच इंद्रीयांच्या साधनांचा हा खेळ. त्याचा आधार घेत मानव प्रगतीच्या अर्थात उत्कर्शाच्या वाटा शोधीत चालला आहे.

    २ एक समज मानवाला आलेली आहे. आणि ती म्हणजे ही जी पांच तत्वे त्याला प्राप्त झाली आहेत. त्याच्याच आधाराने त्याला हा निसर्ग वा ईश्वर याला जाणावयाचे आहे. साधन limited परंतु साध्य मात्र अनंत. म्हणूनच मानव सत्यापेक्षा कल्पना जगतात जास्त भराऱ्या घेतो. विशेषकरुन त्याच्या परमेश्वराबद्दलचे विचार.

    ध्वनी ही एक ईश्वर निर्मीत उर्जा –शक्तीचे रुप. ध्वनी हे ईश्वरी अस्तित्वाचे रुप. अक्षर, शब्द, ओम् कार ( ॐ ), लय, लहरी, नाद, इत्यादी, वर्णनामधून व्यक्त होतो, तो ध्वनी. ह्या ध्वनीला सर्व अंगानी जाणणे हेच त्या परमेश्वराला जाणण्याचे एक साधन. ध्वनीला निरनीराळ्या रुपांत प्रकट करण्याचा मानवाने प्रयत्न केला. ध्वनीशी एकरुप होत, आनंदात विलीन होणे, हेच तर ईश्वर सान्निध्य होय.

    नामस्मरण हा एक प्रकार. नामस्मरणांत आम्ही कोणत्यातरी दिव्य शक्तीची आठवण काढीत, त्याच चक्रांत फिरत राहतो. मुळ हेतू विसरतो. तो असतो त्या ध्वनीचा शोध. नामस्मरण करताना शुद्ध हरपली पाहीजे, स्वतःला विसरले पाहीजे. नामस्मरण गळून पडले पाहीजे. कोणत्यातरी अज्ञात तंद्रीत गेले पाहीजे. भान हरपले पाहीजे. ती स्थिती क्षणीकच असेल. परंतु त्या हरपलेल्या भानाचे वेळेत मोजमाप होऊ शकणार नाही. नामस्मरणाचा तो अत्युच्च क्षण असेल. " आनंद " ज्याच्या अवती भवती असेल शांतता.

    त्याच प्रमाणे ध्वनी लहरी, धुंदी आणणाऱ्या सभोवताल-जगाला विसरावयास लावणाऱ्या- दोघांचा अर्थ एकच नव्हे काय ? अस्तित्व विसरुन एकरुप होण्याचे साध्य.

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • मानसिक तणाव (क्रमशः ७ वर पुढे चालू )

    यातना देणारास क्षमादान द्या आणि त्यास विसरुन जा.

    जीवन व्यवहारांत अनेकांशी संपर्क येत असतो. काहींचा सहवास सुखकर असतो तर कांहीमुळे यातना होतात. तो तुमच्या आवडी निवडीवर, स्वभावावर ठेच पोहोंचवतो. कित्तेकदा तुम्हाला अपमानीत झाल्याचा अनुभव येतो. तुमचा अहंकार डिवचला जातो. येथेच तुमच्या शांत स्वभावाची परिक्षा होत असते. मला माहीत आहे की आपण कोणी संत महात्मे वा साधूपुरुष नव्हेत. परंतु तुम्ही जर समजदारीची भूमिका घेतली तर येवू घातलेल्या मानसिक तणावाच्या चक्रातून जाण्याचे टाळू शकतो. प्रत्येक प्रश्नाचे संघर्ष हे उत्तर नसत. कोणत्या घटनेला किती प्राधान्य द्यायच, त्यांत किती तिवृतेने स्वतःला गुंतवून ठेवायच ह्याचा तुम्ही शांततेने विचार करु शकतां. काहीं व्यक्तीतर वर्षानुवर्षे सुडाच्या वातावरणात, अहंकाराच्या चकरामध्ये आपले आयुष्य घालवितात. ही आमच्या घराण्याची दुष्मनी आहे, अशी दर्पोक्ती करण्यात त्याना धन्यता वाटते. आयुष्य कशासाठी व किती असते हाच मुळ प्रश्न ते जाणत नाही. व्यवहारिक दृष्टीने असल्या संघर्षामधून काहींही उत्पन्न होत नसते. फक्त Ego, मीपणा, अहंभाव, याना खतपाणी देण्यातच त्यांच जीवन खर्च होत. ही एक वृत्ती बनते. हा स्वभाव घातक तर ठरतोच पण मानसिक तणावाला कारणीभूत ठरतो. काय करावे ह्या यातना देणारय़ा संबंधी. चिंतन करा, विचार करा, कांही मार्ग सुचतो कां हे बघा. वेगळ्या वातावरणाची निर्मिती करा. क्षमा याचनेचा विचार करा आणि जर अत्यंत कठीण व अशक्य वाटत असेल तर अशांच्या सहवासातून स्वतःबाजूस व्हा. संपर्क टाळा. अशा व्यक्तीना विसरुन जाण्याचा प्रयत्न करा.

    हे मी फक्त ठोकताळे सांगतो. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घटना, आणि सहवासामधली जवळीक ही भिन्न असू शकते. परिस्थितीजन्य उपाय योजना ह्या तुम्हालाच घ्यावयाच्या असतात. जे कराल ते शांततेने व शांततेसाठीच असावे. मानसिक तणावाला प्राधान्य देत.

    सृष्टी एकविशाल नाटक एक रंगभूमी

    अस म्हणतात की हे जग, ही सृष्टी, एकविशाल नाटक आहे. एक रंगभूमी आहे.आणि आपण सर्वजण कलाकार आहोत.प्रत्येकाची भूमिका वेगळी व स्वतंत्र असते. कुणाचीही भूमिका एक सारखी नसते. भिन्नता आणि तरीही त्या त्या भूमिकेतील वैशिष्ठपूर्णता, हाच निसर्गाचा चमत्कार असतो.

    एखाद्या नाटकांत कुणी राजाची भूमिका करतो तर कुणी भिकारय़ाची.त्या भूमिका ते कशी वठवतात, ह्यावरच त्या कलाकाराचे यश असते. जीवनाच्या ह्या रंगभूमिवर देखील प्रत्येकाने ज्याच्या नशिबी जी भूमिका आलेली असेल ती तशीच हूबेहूब करणे, हे अपेक्षित असते.

    नाटकांत देखील भिकारी आपल्या कर्तृत्वाने, हिमतीने राजा बनू शकतो. तसाच राजा आपल्याच दुर्गुणाने, मुर्खपणाने राज्यपद गमावतो.

    भिकारी बनतो. हे सत्य आपण बघतो. जीवनाच्या लढ्यात, संघर्षात देखील क्षमता, योग्यता, कर्तृत्व, हिम्मत याना मोठे स्थान असते.

    मानसिक तणाव येतो कोठे ?

    ज्यावेळी अशी माणसे स्वतःमधील क्षमता, योग्यता विसरतात. कसलेही प्रयत्न करीत नसतात. केवळ इच्छेने, विचाराने इतरांच्या यशाबद्दल कल्पना करतात. मला हे ईश्वराने कां दिले नाही ? याची तक्रार करतात. परिस्थितीला, वातावरणाला बोल लावतात. अशांचे जसे स्वभाव गुणधर्म तयार होतात, त्याला मानसिक तणावामध्ये ढकलतात. दुसरय़ाचे शेत अशाना नेहमी हिरवेगार वाटत असते.आपल शेत देखील कसे हिरवेगार करता येइल, ह्याचा ते प्रयत्न ते करीत नसतात.

    अशांच्या स्वभावात निर्माण झालेली वैचारीक ठेवण, त्याना सतत विचारांमध्ये लोटते. तेच मानसिक तणावगृस्त होतात.

    जीवनाच्या ह्या रंगभूमिवर, इतर भूमिकांचा अवास्तव विचार न करता, जो आपली स्वतःची अपेक्षीत भूमिका चांगली वठवतो, तोच जीवनात यशस्वी होतो. हीच मानसे तणावरहीत जीवन जगू शकतात.

    एक मित्र आहे. त्याच दुकान आहे. खूप मेहनत करतो. व्यवसायांत चांगली कमाई करतो. परंतु जे त्याला मिळत, त्यात सदैव निराश असतो.

    तो बघ कंपनीत नोकर आहे, बस महीना संपला की हाती पगार.

    तो Contractor आहे. एखादे काम केले की भरपूर पैसे. माझ्या कामासारखी रोजची आणि सतत किच किच नाही. प्रत्येक अभिनेता आपला श्रेष्ठ अभिनय सादर करीत असतो. म्हणून कोणाच्याही अभिनयाला पाहून चिंतीत होऊ नका.

    क्रमशः पुढे ७ वर चालू

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • स्त्री ईश्वराची एक अप्रतिम कलाकृती

    जन्मताच स्त्रीची सर्वांगीण ताकत जास्त असते. जीवनाच्या प्रत्येक पाऊलावर हे सिद्ध झालेले आहे की तिच्यात प्रचंड क्षमता व उरक शक्ती असते. बौद्धीक, शारीरिक, मानसिक शक्तीमध्ये तिचा वरचढपणा स्पष्ट झालेला आहे.ज्या वेळी संधी मिळाली, तिने आपली योग्यता सिद्ध केली आहे.

  • तरुणवयातील म. गांधीजींचा पुतळा

    नुकताच दक्षिण आफ्रिकेला जाण्याचा योग आला होता. निसर्गाच वरदान लाभलेली भूमी असे वर्णन तीच करता येईल. उत्तम हवा, भरपूर पाणी, नद्या नाले तलाव आणि नेत्रदिपक धबधबे दिसत होते. त्याच प्रमाणे प्रचंड झाडे, वेली, क्षितीजापर्यंत पसरलेली जंगले. त्या जंगलामध्ये साम्राज्य गाजविणारी श्वापदे. बळी तो कान पिळी. ह्या तत्वाने जीवन जगणारे पशू कळपा कळपानी स्वातंत्रपूर्ण जगण्याचा आनंद घेताना दिसत होती. सार बघतांना ह्रदय भरुन येत होत.

    जोहानेसबर्ग ही दक्षिण आफ्रिकेची राजधानी. सारा परिसर सुवर्णमिश्रित दगडांच्या खाणीनी भरलेला. जगातील सर्वांत जास्त खनिज सोन्याचे उत्पादन देणारा हा प्रांत समजला जातो. अतिशय कलात्मक आणि नाविण्यपुर्णतेने वसलेले हे शहर आहे. केवळ शे - दोनशे वर्षाचा इतिहास त्यांच्या वसाहतीचा आहे. थोर जागतिक किर्तीचे नेते नेल्सन मंडेला यांचे वास्तव्य असलेले शहर. त्यानीच द. आफ्रिकेचे प्रथम अध्यक्षपद भूषविलेले होते. जोहानेसबर्ग येथेच भारताचे महान नेते महात्मा गांधीजी यांचे वास्तव्य २१ वर्षे होते. त्यानी गरीब, वर्णभेदामुळे अत्याचार होत असलेल्या जनतेला जाणले. एक लढा दिला. त्यांत ते अशस्वी झाले. पुढे भारतामधील कार्य तर त्याना जागतीक स्थरावर घेऊन गेले. जोहान्सबर्गने गांधीजींची य़ोग्यता, थोरवी जाणली. त्याना अजरामर अशी श्रधांजली अर्पिली.

    प्रसंगः- एक प्रसंग घडला. दक्षिण आफ्रिकेत त्यावेळी वर्णभेद, उचनीचता अतिशय प्रखरतेने मानली जात असे. एकदा ते रेल्वेने प्रवास करीत होते. गांधीजी प्रथम वर्गाच्या बोगीमध्ये रीतसर तिकीट काढून बसले होते. गाडीचा तिकीट तपासनीस तेथे आला. त्याने गांधीजीना त्या डब्यामध्ये बसण्यास हरकत घेतली. गांधीजीनी आपल्या जवळचे नियमाप्रमाणे घेतलेले प्रथम वर्गाचे तिकीट दाखविले. तरी त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. तो वर्णद्वेष्टा इंग्रज होता. तो तरुण गांधीजीवर खेकसला.

    . " Black passengers are not allowed to sit in this compartment with white persons ''

    असे गांधीजीना ब्ल्याक म्हणत, इंडीयन म्हणत, फॉरीनर्स म्हणत आरोप केले. गांधीजी गोऱ्या लोकांच्या सहवासाठी अयोग्य असल्याचे व्यक्त केले. गांधीजीना हे अत्यंत अपमानकारक वाटले. त्यानी त्याचा स्पष्ट शब्दांत निषेध केला. ही वर्ण भेदाची बाब उच्यायुक्ताकडे व त्यावेळच्या सकरारी दरबारांत निदर्शनास आणून देण्याचे सुचविले. त्या उर्मट उद्धट आणि मग्रुर अशा इंग्रज अधिकाऱ्याना जनाची वा मनाची लाज राखली नाही. त्याने गांधीजीना चक्क हात धरुन प्रथम वर्गाच्या डब्यातून खाली उतरुन दिले.

    गाधीजीनी Bar-At Law ची पदवी घेतलेली होती. ते साऊथ आफ्रिकेमध्ये २१ वर्षे राहीले. प्रखर देशाभिमान आणि कायद्याचे ज्ञान ह्यामुळे एक वेगळेच व्यक्तीमत्व त्याना प्राप्त झाले होते.

    कालाय तस्मै नमः काळाचा महीमा अगाध असतो. ते सत्य आहे. भारतातील अन्याय, वर्णभेद, उच्य-निचता, असत्य, हिंसक वृती, यांच्या विरोधांत गांधीजीनी प्रचंड झगडा दिला. जगभर शक्तीच्या जोरावर राज्य करणाऱ्या इंग्रजाना अहिंसा व सत्य ह्याच्या महामंत्राने भस्मसांत केले. इंग्रजांची जागतिक स्थरावर माघार होत गेली. हाती कोणतेही शस्त्र न घेतांच त्यांनी इंग्रजांचा पराभव केला. गांधीजी महान बनले. त्यांची योग्यता दक्षिण आफ्रिकेतील जनतेने, सरकारने तिव्रतेने जाणली. महात्माजींचा एके काळी त्यांच्याच भूमिवर करण्यांत आलेल्या अपमानाची पश्चातापपूर्ण भरपाई करण्यांत आली. ज्या वयांत गांधीजीनी दक्षिण आफ्रिकेंत वर्णभेद व उच्यनीचतेला आवाहन दिले, त्याच वयातील ( तिशीतील ) त्यांचा पुतळा जोहान्सबर्ग आणि दरबन ह्या दोन प्रमुख शहरांत उभारला जाऊन त्या चौकांना गांधी चौक (Gandhi Square.) हे नामकरण करुन सन्मानित केले.

    त्यांचा तारुण्यातील , तिशीच्या जवळपासचा पुतळा, तेजःपुंज चेहरा, उंचपुरा मात्र सडसडीत बांधेसुद अंगकाठी व्यक्त होत होता. वकीली पेहेराव घातलेला, दिसत होता. काळा मोठा कोट परिधान केलेला होता. अंगात सुटबुट टाय शर्ट चमकत होते.

    आम्ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा तारुण्यातील भव्य ब्रांझचा पुतळा बघून भाराऊन गेलो. आमचे डोळे आनंदाने, प्रेमाने, अभिमानाने, आणि आदराने भरुन आले. अश्रु स्वयंस्फूर्तीनेच आपली वाट काढीत होते. मन गहीवरुन आले होते.

    आम्ही भारतामध्यें महात्मा गांधीजींचे अनेक ठिकाणी, अनेक जागी भव्य दिव्य असे पुतळे बघीतले आहेत. त्यांच्या महान कर्तृत्वाचा, सत्य आणि अहिंसा यांचा मंत्र देत हे सारे पुतळे अजरामर झाल्याचा भास होत असतो. ज्येष्ठत्व-श्रेष्ठत्व यांचे भव्य दर्शन देत, वाकून गेलेले शरीर, हाती काठी, चष्मा, तुरळक केस आणि केवळ पंचा व धोतर हा पेहेराव, मनांत इतका बसला आहे की त्यांची महान भव्यता आणि वेगळेपणा केवळ भारतीयांनांच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये मा्यता पावलेले ते एक महान मानव समजले जातात.

    जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका येथील शासनाने गांधीजींचा भव्य ब्रॉन्झचा पुतळा शहराच्या मध्यवर्ती भागांत स्थापन केला.

    चौकाला गांधी चौक (Gandhi Square.) हे नामकरण करुण करुन पुतळ्या खालती एक स्तंभ ( शिलालेख ) कोरला होता. तो असा.

    M. K. Gandhi Attorney at law

    Mohandas K. Gandhi was a famous figure at Johannesburg’s first law courts located on Government Square, now renamed Gandhi Square. He kept offices near the law courts from 1903 to 1910, at the corner of Rissik and Anderson Streets, and challenged racially discriminatory enactments, both inside and outside of the courts. Gandhi’s legal work soon merged with his

    Satyagraha ( ‘Soul Force ‘ ) movement of passive resistance, putting his legal career behind him. Gandhi dedicated himself to a lifetime of public service.

    Gandhi returned to India in 1914 after 21 full and fruitful years in South Africa.

    Continuing the search for truth which he had begun in South Africa, he plunged in to India’s struggle for freedom and came to be hailed by his people as Mahatma, ‘ Great Soul ‘

    Sculptor : Tinka Christopher

    Unveiled by His Worship the Executive Mayor Councillor Amos Masondo,

    2 October 2003

    त्याच पुतळ्याच्या दुसऱ्या बाजूला स्थंभ ( शिलालेख ) कोरलेला असून त्यावरती त्यावेळचे गांधीजींचे विचार व्यक्त केलेले आहेत.

    I learn during all those years to love Johannesburg even though ir was a mining camp. It was in Johannesburg that I found my most precious friends. It was in Johannesburg that the foundation for the great struggle of Passive Resistance was

    Laid in the September of 1906…

    Johannesburg, therefore, had the holiest of all the holy associations that Mrs. Gandhi and I will carry back to India.

    M. K. Gandhi, 1914

    जगातींल सर्वांत श्रीमंत व बलशाली असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष श्री बराक ओबामा हे महात्मा गांधीजीना खूप आदरणीय स्थानावर मानतात. त्यांचे तैलचित्र हे आजही त्यांच्या भव्य कार्यालयांत दिमाखाने जगासमोर आहे.

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • पक्षाना मेजवानी

    मला एक भावनिक वैचारीक सवय होती. रोज सकाळी अंगणांत वाटीभर धान्य प्लास्टीकच्या चटईवर टाकींत असे. जमा होणाऱ्या पक्षांची ते टीपताना गम्मत बघणे व आनंद घेणे हा हेतू. कबुतर, चिमण्या तेथे नियमीत येत असत. धान्य त्या चटईवर पडतांच, क्षणाचा विलंब न करता ते येत असे. मात्र त्यांच्या येण्याचा व दाणे टीपण्याच्या सवईमध्ये एक नैसर्गिक पद्धत निश्चीतपणे दिसून येई. पक्षी प्रथम झाडावर, पत्र्यावर, खांबावर, दोरीवर इत्यादी ठिकाणी बसत. सर्व दिशेने चौफेर द्रष्टीने बघत. सभोवतालच्या परिस्थीतीचा मागोवा घेत असत. कोठे आपला शत्रु अर्थात, मांजर, कुत्रा वा कुणा नाहीत ना ? याची चाहूल घेत असत. संपुर्ण खात्री वाटल्यावरच चटईवर येऊन सतर्कतेचे भान ठेवीत दाने टिपीत. जगण्यातील पावलोपवलीचे धोके जाणत कसे सतर्कतेने जगावे हा नैसर्गिक संदेश ते देत होते. शिवाय एक दोन दाणे टिपले की परत सुरक्षीत जागी जाऊन बसणे, पुन्हा अवलोकन करणे, व परत दाणे टिपण्यासाठीच प्रयत्न. हे चक्र असे. त्यांच्या हलचाली खुप शिस्तभद्ध व मनाला मोहून टाकणाऱ्या वाटे. भूतदयेचा ओलावा त्यांत समाधान देई.

    मी एका मोठ्या पत्र्याच्या डब्यांत पक्षासाठीचे धान्य जमा ठेवित असे. व दररोज एक वाटीभरुन टाकी. कांही कारणास्तव मी दोन आठवडे बाहेर गांवी गेलो होतो. पक्षांना धान्य टाकणे ह्यांत खंड पडला. गावाहून आलो. सकाळी डब्बा उघडला तर दिसले की त्यांत खूप किडे, आळ्या, जळमटे झालेली आहेत. मी बेचैन झालो. लगेच सुप आणले व अंगणातच बसुन सर्व धान्य साफ केले. सर्व किडे आळ्या झटकून कचरा कोपऱ्यांत फेकून दिला. धान्य स्वच्छ केले. व नेहमी प्रमाणे एक वाटी भरुन ते चटईवर पसरुन टाकले. खुर्चीवर बसुन पक्षांची वाट बघत बसलो. थोड्याच वेळांत कांही चिमण्या तेथे आल्या. मात्र मला एकदम आश्चर्य वाटले. त्या चिमण्या तेथील धान्य टिपण्यापूर्वी, मी शेजीरीच फेकून दिलेल्या कचऱ्याकडे झेपावल्या. त्यातील किडे आळ्या याना वेचित त्याना खाण्याचा अस्वाद घेऊ लागल्या. मी त्या द्रष्यानी खुप प्रभावित झालो. त्या रोजच्या सवईप्रमाणेच खाण्याचा अर्थात टिपण्याचा आनंद घेत होत्या. मात्र ज्या प्रमाणे आपणास जेवणांत एखादा आवडीचा पदार्थ मिळाला तर त्यावर कसे तुटून पडतो, त्याप्रमाणे त्यानाही त्यांच्या आवडीनुसार व प्रकृती, निसर्गानुसार आवडते खाद्य प्राप्त झाले होते. निसर्गाची किमया आणि माझा दैनंदीन हिशोब ह्यातील तफावत माझ्या लक्षांत आली. अर्थात जे मला सहज व शक्य असेल तेच मी पक्षांना देणार. इतर त्यांच्या अवडीचे खाद्य, "वेगळा आहार एक ट्रीट" त्यानाच शोधू देत. हा देखील एक निसर्ग म्हणून मी त्याच्याकडे बघीतले.

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • रक्त आणि रोग निदान

    एक दिवस मी एका लहान मुलाला तपासत होतो. त्याला चांगलाच ताप भरला होता. खोकलत होता. बेचैन होता. तगमग करीत होता. त्याला हा त्रास तीन दिवसापासून होता. त्याच्या वडीलानी त्या मुलाचे रक्तही तपासून व क्ष किरण फोटो काढून आणले होते. सर्व रिपोर्ट्स मी व्यवस्थीत बघीतले. माझ्या वैद्यकीय तपासणी व रिपोर्ट्स वरुन मी ह्या मतास आलो की त्या मुलास निमोनीया ( Pneumonia ) झालेला असावा. तसे मी त्या मुलाच्या वडीलांना सांगीतले.

    आज काल पालक फार चोखंदळ व चिकीत्सक झालेले जाणवते. हे चांगले लक्षण आहे. फक्त डॉक्टर सांगतात म्हणून सर्व मान्य करावे हे त्यांच्या पचनी पडत नाही. मुलाच्या वडीलांनी चौकस बुद्धीने मला प्रश्न केला. " डॉक्टर तुम्ही रक्ताचा रिपोर्ट बघून कसा तर्क बांधू शकता? रक्ताचा रिपोर्ट हा निदान करण्यासाठी कशी मदत करतो. " त्यांचा प्रश्न हा साधा, योग्य व सर्वसाधारण व्यक्तीच्या मनांत येणाऱ्या शंकाच बोलून दाखवणारा होता. अर्थांत वैद्यकीय शास्त्र प्रचंड आहे. ज्या ज्या शक्यतेचे बारकावे आम्ही शिक्षण घेताना शिकलो ते सर्वच त्याना सांगणे शक्य नव्हते. व अयोग्यही होते. त्याना फक्त त्यांचा छोटासा तर्क –" रक्ताचा रिपोर्ट व निदान ह्याचा कसा संबंध ? " आणि ते मला त्याना त्यांच्या भाषेत समजेल ते सांगणे हीच मजसाठी परिक्षा होती.

    मी खिडकीवाटे बाहेर बघू लागलो. विचार करीत होतो. अचानक माझे लक्ष्य वेधले गेले ते एका पोलिस गाडी मुळे. एक पोलिस Vane व्हॉन व कांही पोलीस त्याच्या भोवती उभे होते. त्यांची आपसांत चर्चा चाललेली दिसत होती. अशी पोलिस गाडी पोलिसांसह त्या जागी मी पूर्वी बघीतली नव्हती. आज अचानक ते सारे बघीतले. मी किंचीत हासत त्या मुलाच्या वडीलांना प्रश्न केला. " बघीतल ती पोलिसांची गाडी व कांही पोलिस. ते आज अनपेक्षीत असे येथे दिसतात. काय तुमचा तर्क असावा ? "

    ते निरखून बघू लागले. " मला वाटते जवळपास कांहीतरी घटना घडली असावी. कदाचित् चोरी, मारामारी, आत्महत्या, खून, वा असलेच कांही असावे. "

    " बरोबर आहे तुमचा तर्क. असेच असते बघा दैनंदिन जीवनाच्या प्रसंगाचे. फायर ब्रिगेडची गाडी जर आली असेल तर तर्क करता येतो की कुठे आग लागली असावी. ऍम्बुलन्स (Ambulance) जर दिसली तर कोणीतरी रुग्ण मदतीच्या आपेक्षेत आहे असे वाटते. शववाहिका ( HEARSE ) त्याच वेळी दिसेल, जेंव्हा कुणातरी मृत व्यक्तीसाठी आलेली असेल. क्वचित प्रसंगी जर मिलीटरी वाहन वा सैनिक दिसले तर जवळपास आतंकवादी अथवा शत्रु गटातील कुणीतरी त्या भागांत असावा हा तर्क माणसे काढतात. ह्याचा अर्थ निर्माण झालेली परिस्थितीचे अवलोकन, तर्क, कल्पना ह्याचा अंदाज त्या त्या परिस्थितीला काबूत आणणारी यंत्रणा बघून करता येतो. हा जरी तर्क असला तरी तो त्या कारणाच्या खूपच जवळ नेण्यास मदत करतो.

    शरीराच्या आतील कार्यशाळे बद्दल असेच कांहीसे असते. रक्त शरीराचा अत्यंत महत्वाचा प्राथमिक भाग असतो. शक्ती, उर्जा, अन्न, रक्षण, सारे सारे रक्ताच्या मार्फतच होते. अनेक घटक पदार्थ असलेल्या रक्तामध्ये पांढऱ्या पेशी हा एक घटक पदार्थ. रक्षणाची प्राथमिक जबाबदारी सांभाळण्याची त्यांची क्षमता असते. ज्या पद्धतीचा रोग प्रादुर्भाव ( जंतू मार्फत ) शरीरावर होतो, त्याला ताब्यात आणण्यासाठी, त्या रोगाचा प्रतीकार करण्यासाठी रक्तामध्ये त्वरीत बदल होतो. शरीरांत असलेला Reserve Blood stock जो कांही अवयवांत असेल तो रक्त वाहीन्यामध्ये उतरतो. पांढऱ्या रक्तपेशीमध्ये त्या त्या रोगाला अनुसरुन त्वरीत वाढ होते. बस त्या ठराविक वाढलेल्या पेशी वा रक्त बदल हा कोणत्या रोगामुळे ते शक्य झाले असावे असा तर्क काढण्यास मदत करतो.

    चोरी, खून, मारामारी, इत्यादी तुम्ही प्रत्यक्ष न बघताच केवळ पोलीसांची गाडी व पोलीस याना बघून जसे अनुमान काढू शकतात, त्याच प्रमाणे रक्त लघवी इत्यादींचे रिपोर्ट आम्हास त्या रोगाचे अप्रत्यक्ष निदान करण्यास मदत करतात.

    मुलाच्या वडीलांनी हासत माझ्या तर्काला व निदानाला साथ दिली. मी त्याना लिहून दिलेले Prescription घेऊन ते औषधी आणण्यासाठी गेले.

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • सायको

    गेल्या काही महिन्या पासून आमच्या गावाचं नाव या पेपरात झळकतंय ! चार मुडदे पडलेत ! हो या रेल्वेस्टेशनच्या परिसरात ! कोणी तरी एकट्या दुकट्याला गाठून डोक्यात दगड घालून खून करतोय ! का ? माहित नाही. पोलीस पण चक्रावलेत .