नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
शांतता हा ईश्वरी गुणधर्म आहे. ईश्वरी देण आहे. जसे चैत्यन्य तशीच शांतता. ही मुळ शक्ती समजली जाते. प्रथम निर्माण झाली ती शांतता. नंतर आला तो आवाज (Sound). ह्याचा अर्थ आवाजाच्या निर्मीतीआधी शांतता होती. आवाजाच्या वा ध्वनीच्या नष्ट होण्यानंतर असेल ती पून्हा शांतता. दोन आवाजामधली विश्रांती भरुन काढते ती शांतता. आवाज ऐकण्यासाठी देखील हवी असते शांतता. शांत असाल तरच आवाज ऐकू शकाल. ध्यान धारणा ह्या प्रक्रियेमध्ये शांततेला अनन्यसाधारण महत्व असते. शांतता म्हणजे केवळ वातावरणातील शांतता नव्हे. ती लागते मनाच्या स्थरावर देखील. शांतता म्हणजे केवळ आवाज नसणे, हे अभिप्रेत नाही. त्या वातावरणात देखील खऱ्या शांततेचा मागोवा घ्यावा लागतो. शोध घ्यावा लागतो. तीलाच खरी मनाची शांतता म्हणता येईल. अर्थात " एक सत्य" " शांत मन " हेच ईश्वरी तत्व असेल. त्यालाच म्हणता येईल कr " स्वला " जाणणे. तेच असेल परिपूर्ण.
शांतता सदैव तुमच्या सभोवती अंतरबाह्य अंगाने असते. तीची साथ तुमच्या अस्तित्वामधून निर्माण होत असते. तीला फक्त जाणावे लागते. आवाज कमी करणे वा नष्ट करणे ह्याच क्रिया तुमच्या सान्नीध्यात असलेल्या शांततेला शांततेच्या अस्तीत्वाची जाणीव करुन देतात. ध्यान धरणा करणाऱ्याना हे अनुभवते की एक विचार उत्पन्न झाला, तो छलांग मारुन येतो व त्याच झेपेने जातो. त्याच्या येण्या व जाण्यामधली वेळ अर्थात Stop gap किंवा एक विचार जाऊन दुसरा विचार उत्पन्न होतो. त्या दोन्ही विचारांमधली वेळ ही अत्यंत महत्वाची असते. भले ती फारच क्षणीक मोजमाप करण्याच्या प्रक्रियेमध्ये अत्यंत कठीण असेल. परंतु त्या " मध्यंतराचे " वा दोन विचारामधले " विश्रांती स्थान " जीवन तत्वासाठी सर्वोच्य असे समजले गेले आहे. हीच " खरी शांततेची " वेळ. हीच खरी "स्व ला" जाणण्याची वेळ. हीच खरी ईश्वरी अस्तित्वाला समजण्याची वेळ. श्वासाची क्रिया ही नैसर्गिक असते. ती जशी नित्य, तशीच Involuntary असते. तुमच्या इच्छेची मात्रा तेथे लागु पडत नसते. ती एक स्वयंस्फूर्त सततची क्रिया निसर्गाने योजलेली आहे. जीवंत असे पर्यंत शरीराच्या कोणत्याही अवस्थेत ती अविरत चालू असते. म्हणूनच तीला जीवंतपणाचे लक्षण समजले गेले आहे. हां तुमच्या इच्छाशक्ती नुसार तुम्ही त्याच्या प्रक्रियेमध्ये क्षणीक तात्पुरता बदल करु शकता. ही क्षमता तुम्हाला दिलेली आहे. जसे श्वास दिर्घ करणे, लांबवणे, आखूड करणे, वा कांही क्षणासाठी थांबवणे. कांही वेगळ्या परिस्थितीमध्ये " प्राणायाम " अर्थात श्वासाच्या व्यायामाने, ह्याच तत्वाने बुद्धीच्या वैचारीक चक्राला प्रयत्न्याने वेगळेपणा निर्माण करता येतो. एक विचार उत्पन्न होतो, पसरतो, आणि लय पावतो. लगेच त्याच्यामागे दुसरा वेगळाच विचार उत्पन्न होतो. ही सततची क्रिया नैसर्गिक Involuntary बुद्धीमनाच्या जीवंतपणाचे लक्षण समजले जाते. विचार भरकटणारे व एक समान नसतात. एखाद्या विषयावर चिंतन करणे, हा भाग वेगळा. तो Voluntary ह्या सदरांत मोडतो. परंतु विविध विचार उत्पत्ती ही नित्याची व नैसर्गिक असते. दोन भिन्न विचारामध्यें क्षणीक विश्रांतीची वेळ टिपली जाते. हीच निर्विचार वा मनाच्या शांततेची वेळ.
तुम्ही योगीक प्रयत्न्याने, संकल्पना चिंतन शक्तीने, भावनीक स्थिरतेने, दिर्घ करु शकतात. कांही क्षणाचे, सेकंदाचे वा मिनीटाचे रुपांतर थोड्याश्या वाढीव वेळेमध्ये करु शकतात.
खऱ्या शांततेचा अनुभव केवळ त्याच क्षणी तुम्हास मिळू शकतो. ह्यालाच म्हणतात ' परम आनंदाचा क्षण ' (Ecstasy of Joy) ह्याचे वर्णन करणे केवळ अशक्य असेल. तो फक्त एक जीवंत सर्वोच्य अनुभव समजता येईल. गरज असते ती प्रयत्न्याची. ह्याचे कुणीही मार्गदर्शन करु शकत नाही. अध्यात्मिक बैठकी विषयी मात्र अनुभवसंपन्न आनंद मिळवायचा असतो. तो प्रत्येकाला स्वतःचें प्रयत्न करुन केवळ दोन विचारामधला शांततेचा काळ प्रयत्न्याने वाढवून. येणाऱ्या वा ऊत्पन्न होणाऱ्या विचाराला थोडेसे थोपवून. जो विचार आलेला आहे त्याला नाहीसा करण्याचा प्रयत्न करुन. ह्यात जबरदस्त ईच्छा शक्तीचा भाग असतो. अंतरमनाची शांतता प्रस्थापीत करणे ह्यालाच म्हणतात.
शांतता निर्माण करता येत नाही. जी सदैव असते, तीलाच फक्त अनुभवता येते. मनाला शिकवून मनाची ठेवण करुन आवाजा विरहीत अथवा आवाजाच्या सान्निध्यांत देखील खऱ्या शांततेचा अनुभव घेता येतो. खऱ्या योगाचे हेच लक्षण असेल.
विचारांची ऊत्पत्ती व लय ह्याप्रक्रियेची सतत जाणीव Awareness असावी. मात्र लक्ष्य केंद्रित विचारावर Thoughts वर न ठेवता त्याच्या प्रक्रियेच्या जाणीवेवर Awareness वर असण्याचा संकल्प असावा. हेच तुम्हास खऱ्या शांततेची जाणीव देत राहील. ह्यातच मनाला जे विचार विचलीत करीत असतात, त्यावर मात करणे, शक्य होते. विचारावर लक्ष्य असण्यापेक्षा लक्ष्य असणाऱ्या जाणीवेवर अर्थात स्व वर केंद्रित होणे, ह्यामध्ये डूबून जाणे, खऱ्या शांततेशी एकरुप होण्यासारखे असेल.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
आमच्या खामगाववरून आषाढी एकादशीला दरवर्षी विशेष यात्रा स्पेशल रेल्वे गाडी सोडण्यात येते. २००३ पासून रेल्वे प्रशासनाने खामगाव ते पंढरपूर ही गाडी सुरू केली आहे. सुरुवातीला एक फेरी सोडण्यात आली. परंतु नंतर दरवर्षी खामगाव, शेगावसह बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यातून वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रतिसाद पाहता आणि रेल्वेला मिळणारे उत्पन्न पाहता रेल्वे प्रशासनाने या फेऱ्या वाढवल्या आहेत. अाता चार फेऱ्या धावतात. बरे असो.
विशेष म्हणजे, ही यात्रा स्पेशल गाडी सुरू करण्यासाठी खामगाव-जलंब येथील प्रवासी संघटनेने खूप प्रयत्न केले. तसेच बुलडाणा मतदार संघाचे तत्कालीन खासदार आनंदराव आडसूळ यांनीही आमची मागणी रेटून धरली. त्यामुळेच ही गाडी सुरू झालेली आहे. सर्वसामान्य वारकऱ्याला स्वस्तात पंढरपूर जाण्याची संधी यामुळे मिळाली. फक्त दीडशे रुपयात जत्रा असल्याने अनेकांनी पंढरीची वारी सुरू केली. मलाही वाटले चला पंढरपूरला जावे. त्यामुळे दरवर्षी रेल्वेने पंढरपूर जात होतो. तेथे गेल्यानंतर श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावच्या भक्तनिवासात तर कधी श्री संत सोनाजी महाराज कवठा यांच्या मठात मुक्काम असायचा. कधी विठ्ठल रुख्मिणी मंदिराजवळील एखाद्या भाड्याच्या खोलीत थांबायचो. त्यामुळे पंढरपुरातील बहुतेक रस्ते ओळखीचे वाटायचे. तसे काही नाही. आपल्या शेगावसारखेच पंढरपूर आहे. पण गर्दी लाखात असते. त्यामुळे एकदा ओळखीची व्यक्ती भेटली की, यात्रेत ती दुसऱ्यांदा भेटणे कठीणच आहे. अशा परिस्थिती जर एखाद्याची बॅग हरवली तर मग काय सोय?
त्याचे असे झाले की, माझी बदली आकोटला झाल्यामुळे मी सन २००९ मध्ये वारीला जाऊ शकलो नाही. पण परिचयातील बरीच मंडळी खामगाव रेल्वेगाडीने पंढरपूरला निघाली होती. ही गाडी खामगाववरून निघत असल्यामुळे आपल्याकडचीच मंडळी जास्त असते. खामगाव, नांदुरा, जळगाव, शेगाव, बाळापूर, तेल्हारा, अकोला तालुक्यातील वारकरी खामगावहून बसतात, ते जागा मिळण्यासाठी. असेच अकोल्यातील दोन शिक्षक मित्र एका बोगीत बसले. हातरुणचे पांडुरंग चोपडे सर आणि अकोल्यातील महादेव शेगोकार हे साेबत असल्याने त्यांनी आपआपल्या बॅग प्रवासादरम्यान कॅरिअरवर ठेवल्या. सर्व वारकरी मंडळी आणि आपल्याकडची म्हटल्यावर चोरीचा धोका नव्हताच. प्रवासादरम्यान सर्वच निश्चिंत होते. मग २० तास जर पंढरपूरला जाण्यासाठी या गाडीने लागतात, तर सुरू झाल्या गप्पा. पीक पाणी काय म्हणते पासून तुम्ही कोण्या गावचे, कुठे असता, जमीन किती आहे, शेजारच्याचे आडनाव असे झाडून पुसून विषय प्रवासात एकमेकांशी शेअर केले गेले.
नंतर प्रवास संपला, उतरण्याची सर्वांची घाई. गडबडीत यातील शिक्षक महादेव शेगोकार यांची काळ्या रंगाची वर ठेवलेली बॅग कुणीतरी उचलून उतरताना घेऊन गेला. त्याच रंगाची आणि तशीच दुसरी बॅग तेथे होती. ती आपली समजून हे शिक्षकही उतरले. आणि गेले मुक्कामाच्या ठिकाणी सोनाजी महाराजांच्या मठात. तेथे गेल्यावर आंघोळीसाठी कपडे, मोबाईलचे चार्जर काढण्यासाठी बॅग उघडली तर उघडेना. कुलप लावलेले असल्याने वांदा झाला. आता कसं? आपली बॅग कुणीतरी अनावधानाने नेली. आणि त्याची आपल्या हाती आली. बग अदलाबदल झाल्याने आता एवढ्या लाखोच्या जनसागरात ती सापडणे महाकठीण काम. मग काय करायचे तर लावा एकमेकांना फोन, पण त्या पंढरपुरात गर्दीच एवढी की मोबाईल टॉवर जाम झालेले. कुणाशीच संपर्क करता येत नव्हता.
पण इकडून त्यांना फोन लागत होते. अशातच आकोटचे श्री संत वासुदेव महाराज यांचे निधन झाल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्याची खात्री करण्याच्या उद्देशाने मी आमच्या नात्यातील चोपडे सरांना थेट फोन लावला. आणि माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की, आमचे मित्र शेगोकार सरांची बॅग हरवली आहे. आता ४००- ५०० किमी अंतरावर मी आकोटला आणि यांच्या बॅगचे मी तरी काय करणार?
पण प्रयत्न करायला काय हरकत आहे, म्हणून मी माझ्या परीने शोध घेणे सुरू केले. त्यांना विचारले तुमच्या आजुबाजूला कोण बसलेले होते. कोणत्या गावाचे होते. त्यांच्याविषयी काही माहिती आहे का? त्यावर त्यांनी फक्त एवढेच सांगितले की, त्या माणसाच्या घरी दुकान असावे, कारण त्यांनी प्रवासादरम्यान आपल्या घरी फोन लावून चौकशी केली होती. बहुतेक नांदुरा तालुक्यातील असावे, आणि त्यांचे आडनाव घोराडे असण्याची शक्यता आहे. त्यांची बॅगही काळ्याच रंगाची होती. पण एवढे असून फायदा काय? म्हणून डोके चालवू लागलो.
आणि मला आठवले आमच्या वडी येथील वार्ताहराचे नाव. मुकुंदा घोराळे पाटील हे आता हयात नाहीत. त्यांचे अपघाती निधन झाले आहे. परंतु त्यांचा अतिरिक्त व्यवसाय मला माहीत होता. त्यांच्याकडे नांदुरा तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक्स वजन काटयांची एजन्सी होती, सर्व्हिसिंगसाठी ते ग्रामीण भागात जात होते. त्यामुळे जवळपास तालुक्यातील सर्वच दुकानदारांशी त्यांची ओळख होती. मी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि घोराळे अाडनाव असलेल्या व्यक्तीचे आणखी कोण्या गावात दुकान आहे, हे विचारून बॅग हरवल्याची माहिती दिली. त्यांनीही तत्काळ त्या दुकानदाराचा फोन नंबर दिला. मी थेट पंढरपूरला गेलेल्या त्या दुकानदाराच्या घरी लॅण्डलाइनवर संपर्क साधला. सर्व हकीकत सांगितली. त्यांनाही पंढरपूरहून फोन आला होता की, आमची बॅग हरवली आहे. त्यानुसार मोबाइल नंबर घेतला व थेट त्यांच्याशी संपर्क साधला. दोघांचेही मोबाइल नंबर माझयाकडे होते. एकमेकांना ते दिले. परंतु टॉवर जाम मुळे त्यांचा एकमेकांशी एकाच गावात संपर्क होत नव्हता. मी ४०० किमी अंतरावरून आकोटवरून लॅण्डलाईनवरून दाेघांशी संपर्क साधत होतो. त्यानुसार हरवलेली बॅग घेऊन तुम्ही श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मठाजवळ या, असे दोघांनाही सांगत गेलो, दोघेही तेथे पोहोचले. एकमेकांना ओळखले, बॅगही ओळखली. आणि सुटकेचा निश्वास सोडला.
यावर आमचे मित्र पांडुरंग चोपडे सर म्हणाले की, काय गड्या नऊ हजार लोकांच्या गर्दीत एकदा भेटलेला माणूस डबल भेटत नाही. अन तू ४०० किमी अंतरावर बसून आमची बॅग एकमेकांनाा परत मिळवून दिली. हे ऐकून मी धन्य झालो. पण बॅग हरवणारे शिक्षक महादेव शेगोकार माझ्या परिचयाचे नव्हते.
दरम्यान, सन २०१३ मध्ये मी अकोला शहरात राहायला आलो. एके दिवशी लग्न संबंधाच्या ठिकाणी शेगोकार सरही आले. परंतु ओळख नव्हती. आमच्या सोबतच्या पाहुण्यांना त्यांनी घरी नेण्याचे ठरवले, मलाही चला म्हटले. मी त्यांच्या घरी गेलो. मग एकमेकांचा परिचय सुरू झाला. माझा परिचय त्यांना नव्हता. मी माझा परिचय देताना सांगितले, जनार्दन गव्हाळे. दैनिक दिव्य मराठीला असतो. नाव ऐकताच अरे बापरे तुम्ही काय ? मी म्हटले काय झाले सर ? तर ते त्यांच्या वडिलांना सांगत म्हणाले, हे गव्हाळे साहेब. यांनीच माझी हरवलेली बॅग पंढरपूरच्या गर्दीत सापडून दिली होती. त्यावेळी मला मनात आले की, सांगा. आठवणी किती पक्क्या राहतात.
— जनार्दन गव्हाळे,
खामगाव जि. बुलढाणा, विदर्भ.
अमेरिकेतील एक - - Dating Center
(डेटींग --- मनाची उकल संकल्पना )
अमेरीकेत मुलाकडे सहा महीन्याचा मुक्काम होता. रोज सकाळी मुलगा ऑफिसला जाताना मला जवळच्या वाचनालयांत सोडून देत असे. माझी सून मला तीन तासाने घेण्यासाठी येई. दररोजचा हा कार्याक्रम शिस्तबध्द चालू होता. एक दिवस कादंबरी वाचून संपली. वाचण्याचा कंटाळा आला. आणखी एक तास तेथेच थांबणे गरजेचे होते. थोडेसे पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडलो. समोर बाग होती. तेथे फेर फटका मारला.
बागेच्या दुसऱ्या टोकाजवळ एक मॉल प्रमाणे वास्तू होती. बाहेरचा बोर्ड वाचला. Glee Dating Centre Club. मला त्या वास्तूचा व कार्यप्रणालीचा लगेच बोध झाला नाही. बराच वेळ दुरुन बघत राहीलो. क्वचित वेळी कांही स्त्री-पुरुषांची ये जा दिसून आली. आपण परकिय. त्या परिस्थितीबद्दल अज्ञानी. गम्मत म्हणून कशाचा आहे हा क्लब याची चौकशी करावी, माहिती घ्यावी हा विचार डोकावला. मनाशीच हासलो. वयस्कर असल्यामुळे जेष्ठत्वाचा फायदा घेत हिम्मत केली.
तेथे गेलो. एका भव्य टेबलाजवळ दोन कपाटे होती. तीन खुर्च्या व एक कंप्युटर, फोन इत्यादी गोष्टी दिसल्या. समोर भव्य हॉल, फर्नीचर, मासीके व वर्तमानपत्रे पडलेली दिसली. एक वयस्कर रिशेप्शनिस्ट बसली होती. कंप्युटरवरुन ती कांही रेकॉर्ड बघून नोंद वहीत नोंदी घेत होती. मी जवळ जाताच तीने माझे स्वागत केले. " May I help you Sir ? " तीने प्रश्न करीत मला मदत करण्याचे व्यक्त केले. मी नुसते स्मित केले. तीला काय विचारावे हे मलाच माहीत नव्हते. " What is this club ? " मी विचारले. " It’s a Dating Centre Sir " ती म्हणाली. मला डेटींग विषयी मुळीच माहिती नव्हती, फक्त इंग्रजी सिनेमातून थोडेसे कळले होते. पण माझे अज्ञान तिच्यासमोर व्यक्त होणे, हे पण खेदजनक वाटले. " Ya ! Ya! Is it that " म्हणत मी फक्त मान हालवली. असे का ? परंतु मी बघीतले की मी त्या वातावरणांत अपरिचीत होतो. परकिय होतो. तीने सहकार्य केले. मी जेथून आलो, त्या भागात, डेटींग ह्या संकल्पनेविषयी कमीच माहीती असते हे तीने जाणले.
तीच्याकडून जी माहीती मिळाली, त्याची खूप गम्मत वाटली. माझ्यासाठी तो एक चिंतनाचा विषय वाटला. सर्वांत महत्वाचे म्हणजे ती संकल्पना तेथील सामाजीक, कौटूंबीक, वातावरणात स्थिर झालेली होती. मान्यता पावली होती, रुळली होती. आज तरी तसल्या गोष्टी भारतीय संस्कृतीमध्ये आणणे केवळ कठीण नव्हे, तर अशक्य आहे. जसे ३ हा आकडा व ६ हा आकडा आपआपले वैशिष्टे बाळगून आहेत. परंतु दोघांचे अस्तित्व एकमेकाच्या एकदम विरुद्ध दिसते. ह्याची जाणीव ठेवणे फार महत्वाचे. दोन्हीही संस्कृतीमधली पाळमुळ, मुळतत्व, वैचारीक बैठक, यांचा आधारच भिन्न आहे.
त्या रिसेप्शनिस्टकडून कळले की तेथे अनेक स्वतंत्र खोल्या व खाण्यापिण्याच्या (विशेष करुन पिण्याच्या ) सोई होत्या. लोक फोन करुन खोल्या ठरलेल्या वेळेसाठी आरक्षित करीत. मित्रांनी, नातेवाईकांनी, अपरिचीतांनी, कुणीही, तेथे यावे ही संकल्पना. डेटींग ह्या नावाविषयी इंग्रजी सिनेमातून थोडेसे कळले होते.
तेथील कर्मचाऱ्याकडून कांही माहिती मिळविण्याचा मी प्रयत्न केला. थोडेफार त्यानी सांगीतलेले " Dating " बद्दलचे वर्णन आणि मला जे समजले ते असे होते. कदाचित् ती त्या संस्थेच्या कार्यप्रणाली व हालचाली संबंधी असेल.
Dating ची त्यांची प्रमुख संकल्पना होती
" जोडीदार आणि संवाद ".
निसर्गनिर्मीत जीवनचक्रांत केव्हांच बदल झालेला नाही. अथवा होणार नाही. मात्र जगण्याच्या संकल्पना, मार्ग, पद्धती, बदलतात. ती काळाची गरज असते. शिव पार्वती यांच्या विवाह पद्धतीपासून आजतागायत जोडीदार निवड व विवाह चालत आलेले आहेत. स्वयंवरा पासून आजपर्यंत जोडीदार पारख व निवड हे विविध पद्धतीने होत आलेले आहेत. धर्म- संस्कृती आणि समाज ह्यांचा ह्या पद्धतीवर प्रभाव पडत गेलेला आहे.
जोडीदाराची पारख, निवड आणि एकत्र सहजीवन घालवणे ह्या गोष्टी महत्वाच्या. पूर्वीच्या काळी सामाजीक संकल्पनेनुसार जोडीदार निवड ही आई-वडील, पालक, वा मित्रमंडळी यांच्या मार्फत होत असे. त्याकाळी घराणे व आर्थिक चौकट हे प्राधान्याचे पैलू होते. आज चित्र पूर्ण बदललेले दिसते. प्रत्येकजण आपला जोडीदार स्वतःच निवडतो व सहजीवन व्यतीत करतो. शिक्षण, बौद्धीक उंची, कर्तृत्व, योग्यता, व वैचारीक झेप ह्या बाबी महत्वाच्या होऊ लागल्या. पुर्वीचे कस आज दुय्यम झाले आहेत.
ह्याच वेळी एक अलिखीत परंतु अत्यंत महत्वाचा दृष्टीकोण दिसून येत आहे. जो आपला जोडीदार असेल त्याची विचारसरणी, स्वभाव ठेवण , आवडी निवडी, आपल्याशी मिळती जुळती असतील कां ? हे अत्यंत बारकाईने बघीतले जाते. समजुन घेतले जाते.
कसे साध्य व्हावे हे महत्वाचे परिक्षण ?. कारण हे स्वतःला दिसले पाहीजे, कळले पाहीजे, मान्य झाले पाहीजे. ह्यात कुणाचा दबाव, रद्-बदली नसावी. परिक्षण केवळ मानसिक समजावर न राहता, आत्मिक स्थरावर बिंबले पाहीजे.
जोडीदार - - म्हणजे नविन मित्र निर्माण करणे. ह्यात पुन्हा आगदी सख्यातले, जवळचे, ओळखीचे आशा चौकटी असत. सख्यातल्या कुणाची तरी निवड जन्मसाथीदार म्हणून असते. अर्थात त्याच्याशी विवाहाचे बंधन अडकवणे हे होत असे. परंतु हे सहज झाले व ठरले ही संकल्पना नव्हती. डेटिंग सेंटर मध्ये सभासद म्हणून नोंदणी नोंद केली जाई. एखाद्याची पारख जर मनाला पटली, भावली, आणि जोडीदाराचे स्वभाव गुणधर्म आपल्या स्वभावाशी जुळतील याची खात्री वाटली तर ती व्यक्ती अशाना आपला जन्मसाथीदार म्हणून निवडत असे. इच्छुक व्यक्ती तेथे सभासद होताना आपली संपुर्ण माहिती ( Bio-data in detail ) देत असत. त्याच प्रमाणे अपेक्षीत जोडीदार कसा असावा हे ही दिले जायी.
आपसातील भेटींचा गाभा हाच मुळी जोडीदार याची निवड व पारख ह्या ध्येयावर आधारलेला असतो. त्यात विश्वास आणि आपुलकी ह्याची निर्मिती होणे अत्यंत गरजेची अपेक्षा ठरते. कुणाचा कोणताही भावनीक अतीरेक त्या योजलेल्या भेटीला तडा देऊ शकतो. शिवाय समोरच्यामधील मानसिक, बौद्धीक, भावनीक आणि स्वभाव जाणून घेण्यासाठी एक नव्हे अनेक भेटी ह्या सहमतीने होतात. त्यामुळे परिस्थिती टिकवून ठेवण्यासाठी वागणूकीतील चांगुलपणाची काळजी घ्यावी लागते. अततायीपणा करुन चालत नाही.
परंतु त्या संस्कृतीमध्ये, संस्कारामध्ये, अधुनिकता, मोकळेपणा, हाच पाया ठरलेला आहे. तेथे भाव विचार व्यक्त होत असताना, शारीरिक हालचालीकडे सहजगत्या दुर्लक्ष केले जाते. कांहीजण तर सहविचाराने शारीरिक आवयवांची तपासणी वा चाचणी देखील करुन घेतात. अनेक वेळा
शरीरातील जन्म दोष, विकृती, Congenital Deformity वेळीच न कळल्यामुळे त्याचा भावी आयुष्यावर विपरीत परीणाम होऊ शकतो. योग्य तपासण्यामुळे हे टळू शकते.
" थोडासा संकोच आणि जीवनभर खंत सोसणे " हे त्यांच्या संस्कृतीला अमान्य असते.
जोडीदाराची जीवनसाथी म्हणून निवड हे Dating Centre मार्फत पुर्ण केले जाते.
संवाद - -
तसेच चांगले मित्र मिळवणे ही संकल्पना देखील तेथेच तयार होते. खरा मित्र, प्रिय मित्र ही बाब वेगळीच पडते. आगदी जीवनसाथी प्रमाणेच हा मित्रपण संपर्कांत हवा. आपल्या सुख दुःखातील प्रत्येक घटनेमध्ये सहभागी हवा. वैचारीक भावनीक वादळामध्ये खऱ्याअर्थाने सांत्वन करणारा, वा आनंदातही आपल्याला साथ देणारा असावा. त्या मित्राची जवळीक ही केवळ मानसिक स्थरावरची हवी. शारीरिक संपर्क त्यात येऊ नये. जीवनसाथीदाराच्या शारीरिक सुखाच्या अपेक्षा, त्या मित्राच्या वागण्यात नसाव्यात. ही काळजी, मित्र भेटीत Dating मध्ये घेतली जाते.
स्त्रीपुरुषांचा एकांतातील संपर्क, मोकळेपणा, भाव व्यक्त होण्याच्या प्रक्रियेत, अनेकदा वेगळे परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच वातावरणांत शारीरिक संबंध होण्याची दाट शक्यता असते. परंतु हे त्यांच्या मानसिक मान्यतेवर अवलंबून राहते. ह्यांत बळजरी होऊ शकत नाही. संस्था याची काळजी घेते. सतर्क नजर ठेऊन असते.
त्याच बरोबर पाश्चिमात्यांची स्वैर विचारसरणी वा वागणूक असते. त्यांची तयारी, बैठक इतकी रुजलेली असते की हे त्याना कांहीच वाटत नसते. जीवनाचा त्यानी हा एक भाग स्विकारलेला आहे. त्यामुळे कुणाबरोबर भेट झाली, Dating झाले, हे सारे ते अत्यंत सहजतेने घेतात.
जोडीने, स्त्री अथवा पुरुष, मित्रांनी. नुकतीच ओळख झालेली वा एकदंम अपरिचीत व्यक्तीं तेथे येतात. कांही काळ घालवावा, आपल्या मनातील विचार, भावना, दुसऱ्यासमोर मोकळेपणाने व्यक्त करावे. आपल्या मनातील वैचारीक तुफान अथवा आनंदी लाटा ह्या व्यक्त करुन त्या भावनाना मार्ग द्यावा. मन हलके करावे. हा प्रमुख भाग होता.
वैचारीक स्थरावर मन मोकळे करणे, ही संकल्पना आपल्याकडेही पुर्वापार चालत आलेली आहे. मानसिक स्थरावर वैचारीक देवाण घेवाण करीत आलेलो आहे. आज देखील कुणीही व्यक्ती जेंव्हा दुसऱ्या व्यक्तीला भेटतो, त्याच्या मधला जर संवाद जाणला तर ते विचार सांगणे व त्या योगे मन हलके करणे, हाच प्रकार असतो. --- हे अस झाल. --तो तसा म्हणाला.—तो तसा वागला.—त्यानी असे केले.—ही घटना अशी घडली.—त्याला हे जबाबदार.—त्याच वागण चुकल.—चांगल वाटल.—इत्यादी. संसारीक घटनांचाच उहापोह करतो. आपल्या समजण्यानुसार आपली मते व्यक्त करतो. हेच सर्व साधारण घडते. घटनेतील राग लोभ प्रेम इत्यादी भावनाना शाब्दिक आकार देत त्या व्यक्त करतो.
जर त्या कुण्या विचारांचा वा भावनेचा आपल्या मनावर आघात झाला असेल तर आपण ते सारे समोरच्या व्यक्तीकडे व्यक्त करतो. आशी समज की त्याने मन हालके होते. मनावरचा ताण कमी होतो. तणाव कमी झाला की मनामुळे जे मानसिक विकार शरीरावर होण्याची शक्यता असते, त्या पासून सुटका होते.
एका शेतकऱ्याची छोटीशी गोष्ट ऐकली होती. शेतात काम करताना एकदा दुर अंतरावर त्याने एक चमत्कारीक घटना बघीतली. तो चकीत झाला. कांहीतरी अघटीत झाल्याचे त्याच्या लक्षांत आले. तो ती गोष्ट सांगण्यासाठी पळतच शेजारच्या शेतात गेला. परंतु क्षणातच त्याच्या मनांत विचार चमकला की हे मी दुसऱ्यास कसे वा कां सागू . एक भिती, एक शंका, आणि अनिश्चीतता ह्या भावनेनी तो पुरता गोधळून गेला. कांही न बोलता तो परतला. त्या बघीतलेल्या घटनाचे तुफान त्याच्या मनात सतत उठू लागले. तो बेचैन झाला. परंतु वाच्यता करण्यात हातबल राहीला. विचारांची वादळे शांत होईनात. मन तगमगत राहीले. तो आजारी पडला. गांव वैद्यानी तपासले. हा मानसिक आजार आहे. त्यानी आपले मन सतत तणावात ठेवले आहे. ते मोकळे जेंव्हा होईल, त्याला बरे वाटेल.
त्याचे विचार कसे व्यक्त होणार. कारण कोणात्यातरी अनामिक भितीत, शंकेत, ते वावरत होते. त्याचे हे द्विधा झालेले मन त्याच्या एका मित्राने जाणले. त्यानी उपाय सुचविला.
शेतकरी नदीकाठच्या एका निर्मनुष्य जागी गेला. तेथे एक मोठे रोपटे होते. वृक्ष मित्र असतो ना.
त्याला जवळ केले. त्यानी जे बघीतले होते ते सारे त्याने त्या रोपट्याला सांगीतले.
बस चमत्कार झाला. शेतकऱ्याचे मन हालके झाले. तणावमुक्त झाले. तो आनंदून गेला. त्याच्या मनात घोंगावणारे विचारांचे तुफान निघून गेले. तो चांगला झाला.
आपल्या खेडवळ शब्दात सांगायच तर गप्पा मारणे, सटाके मारणे, पुड्या सोडणे, टर्रे उडवणे, इत्यादी. येथे शब्दांत विनोदबुद्धी, गमतीने वर्णन केले असेल. म्हणतात- - एक हात लाकूड तर नऊ हात धिलपी - - ही रचना असेल. तरी त्यातील थोडे का होइना, सत्य बाहेर येणे महत्वाचे ठरते. मग तो व्यक्त मार्ग कसा का असेना. मानसिक तणाव तुफान निर्माण करतो. व्याधीना कारण बनतो. ते मन हलके होत जाणे, तुमचे विचार कोंडून न राहता, प्रवाहीत होणे हीच मन मोकळे करण्याची संकल्पना.
मला बालपणीचा एक प्रसंग आठवतो. मी मामाबरोबर रेल्वेने जात होतो. समोरच्या बाकावर एक कुटूंब बसले होते. मामा बोलके. त्यानी त्या कुटूंबाचा परिचय विचारला. कोठे जाणार ? काय करता ? हे झाले. हवा, पाणी शेती पिके ह्या गोष्टी झाल्या. नंतर मामा गंभीर झाले. त्यांच्या लहान भावाचे नुकतेच निधन झाले होते. मामानी त्या भावाबद्दल, त्याच्या वागण्याबद्दल, कामाबद्दल, बरेच कांही त्या अपरिचीत कुटूंबाला सांगीतले. काय हेतू होता मामांचा हे सारे सांगुन ? कोणताही नाही. फक्त आपल मन हालक करण्याचा. कोणत्या तरी स्थरावर लपून बसलेला मानसिक तणाव कमी करण्याचा. मग ह्यात वर्णन करताना मिळालेला आनंद वा आठवणी, यानापण उजाळा दिला गेला.
कदाचित् हे एकतर्फी असेल. कारण त्या समोरच्या कुटुंबाला त्याचे कांही देणे घेणे नव्हते. परंतु ते ऐकणाराची भूमिका व्यवस्थीत पार पाडीत होते. मामाच्या बोलण्याकडे लक्ष देत होते. सहकार्य करीत होते. हाच तर त्यांच्या संवादाचा आत्मा होता.
बोलणे, विचार भावना व्यक्त करणे हे जेवढे गरजेचे, तेवढेच त्यांचा स्विकार कुणी तरी सतर्कतेने करावा, ही भावना अत्यंत महत्वाची. भाव- विचार व्यक्त होण्यास बोलणारा तसाच ऐकणारा असावा लागतो. पुर्वीच्या काळी प्रवासांत, बागेमध्ये, शेतात, समारंभात, कोठेही माणसे समोरच्या माणसाचा प्रथम थोडा परिचय करुन घेत. मग वैचारीक देवाण घेवाण होई. मन हालके होत असे. समाज वा कुटूंब जसजसे कार्यबाहूल्यांत व्यस्त होऊ लागले, मग्न होऊ लागले. ही विचार व्यक्त संकल्पना लोप पावू लागली. परिणामी मानसिक तणावामुळे उत्पन्न होणाऱ्या व्याधी वाढू लागल्या हे दुर्दैव.
सामान्यपणे माणसे गप्पाटप्पा, घटनांच्या विषयांची माहितीची देवाण घेवाण करतात. ह्यापेक्षा जास्त खोलवरच्या स्थरावर आपसातील संवाद ही फार मोठी मानसिक संकल्पना आहे. चंचल मनाकडून अनेक घटनांचा जन्म होत असतो. मन हे विचारावर, भावनांवर, बुद्धीवर, देखील आरुढ होत असते. आवडो वा न आवडो शेवटी ते माझेच, स्वताःचेच माझ्या शरीरांतील एक भाग असते. त्याला मान्यता द्यावीच लागते. मात्र मन मनालाच प्रश्ने विचारते. " हे असे कां ? " " हे योग्य आहे का ? " " हे अयोग्य आहे का ? " " हे जीवनाचे व्यक्तीमत्व वाढवेल का ? " " जीवन सुखकर वा दुःखकर होईल का ? " " कुणावर मी विश्वास करावा ? " " येत असलेले विचार बदलत कां राहतात ? " " मन नेहमी संशयाच्या चक्रांत का राहते ? " " कित्येक गोष्टी पटल्या, आवडल्या, तरी मन शासंक का असते ? " ---- इत्यादी अनेक अनेक मनाच्या वागण्याची उकल करताना व्यक्ती खुप उत्सुक असतो. त्याच्या ह्या व अशा प्रश्नांची सोडवणूक केवळ चर्च्या करुनच होऊ शकते. मानसिक संवाद हाच याचा प्राण असतो.
ह्याचाच एक भाग म्हणजे Dating ची कल्पना.
एक साहित्यीक, ज्ञानी कथा कादबऱ्या मासिके वृतपत्रे वाचून अनेकांचे विचार जाणून घेतो. तर अनेकजण ते गप्पा मारुन व्यक्त करीत असतात. ह्यांत एकच नैसर्गीक साम्य दिसते. दोघानाही मनाचा करिश्मा- अविष्कार जाणण्याची ओढ असते. गप्पाटपा विषयांची, प्रसंगांची माहिती हे सामान्य होय. ह्याच्यापेक्षा जास्त खोल स्थरावरच्या बाबी सांगणे वा एकणे वेगळे. तसा संवाद-प्रतिसाद अपेक्षीला जातो. मनामध्ये रुजलेल्या विचारना उद्युक्त केले जाते. ज्यात निर्माण झाल्या असतील आवडी निवडी, ओढ अत्मियता, तिरस्कार घृणा, प्रेम लोभ इत्यादी भावना. सहजगत्या ज्याचे वर्णन करणे सामान्याना शक्य नसते. त्या स्थरावर देखील ऊतरुन वैचारीक भावनीक देवाण घेवाण वा मार्ग दर्शनाची छुपी अपेक्षा त्यामध्ये असते. जीवन जगण्याच्या द्दष्टीकोणाचा तेथे उहापोह होतो. जवळचा जोडीदार वा लग्नासारख्या बंधनानी बांधला गेलेल्या व्यक्तीबरोबर देखील कांही चर्चाना मर्यादा ठरतात. तुमच्या प्रत्येक शब्दामधून अप्रत्यक्ष तुमची आवड, इच्छा, व्यक्त होत असते. त्या कदाचित् तुमच्या स्वभावाची ठेवण दाखवितात.
सर्वाना अशा प्रकारचे संवाद वा मनाचा सत्य मोकळेपणा आवडतो. परंतु ज्या वेळी समोरचा जोडीदार पती वा पत्नी ह्या भूमिकेत असतो, त्याला ह्या मोकळेपणाच्या बाबी पचनी पडत नसतात. त्याना ब्रेक लागतो. हा संस्काराचा वा धर्माचा कदाचित् प्रभाव असू असेल.
Dating ची संकल्पना ही वैचारीक आणि एका मर्यादेपर्यंत भावनिक स्वातंत्र्याला मान्यता देते.पाश्चिमात्य लोकानी त्यांच्या संस्कृती, सामाजिक, कौटूंबीक जडन घडन इतकी बदलून टाकली की त्या ठिकाणी कुणाच्याही विचारांना, भावनेला आणि म्हणून वागण्याला पायबंद राहात नाही. " मी काल माझ्या बालपणीच्या मित्राकडे Dating ला गेले होते. रात्री घरी येणे जमले नाही. " असे वाक्य स्वताःच्या नवऱ्यासमोर सांगते. नवरा देखील हासून "बरी आहेस ना तूं " अस हासून म्हणतो. कोठेही खंत व्यक्त करीत नाही. कारण हे त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक अंग झालेल आहे. तीकडे जर ज्यास्त चौकशीच्या मागे कुणी गेला तर एकमेकापासून ती कुटूंबे आलिप्त होण्याचा मार्ग लगेच घेतात. ही त्यांची स्वाभाविक मानसिकता झालेली असते. त्यांच्या समाजालाच नव्हे तर देशाला ते मान्य असते.
अमेरिकेतील Dating Centre चा उद्देश, तत्वज्ञान, मानसिक विचार स्वातंत्र्याला वाहून घेतलेली संकल्पना ही योग्य व खूप पुरोगामी ( अधुनीक ) वाटते. परंतु आजतरी त्याचे दृष्य परिणाम जे दिसून येतात ते भयानक व निराशजनक वाटतात. कारण Divorce rate in US and UK हा जवळ जवळ 90 % झालेला आहे असे म्हणतात. कदाचित् आपण त्यालाच उध्वस्त कौटूंबीक परिणाम म्हणतो ते योग्य नव्हे काय .
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
शरीर रचनेचा अभ्यास करताना बऱ्याच गोष्टी खूप मजेदार आणि ज्ञान देणाऱ्या वाटल्या. ह्या जगांत अनेक घटना घडत असतात. त्या स्थिर वा हलचालीयुक्त दिसून येतात. आपल्या शरीरांत देखील तशाच गोष्टी होत असतात. कदाचित् त्याचे रंग रुप वेगळे असतील. परंतु जगातील घडणाऱ्या आणि देहामध्ये घडणाऱ्या घटनामध्ये परिणामाच्या दृष्टीने विलक्षण साम्य असते.
एक आकाश आणि पोकळी सर्वत्र जाणवते. बाहेर घरांत पेटीत डबीत आणि सुक्ष्म अशा अणूमध्येही. पोकळी तेथे हवा अर्थात आकाश. विशाल वा सुक्ष्म. ह्याच माध्यमातून जगातल्या सर्व वस्तू एकमेकांच्या संपर्कात असून बांधल्या गेलेल्या आहेत. हा वायुरुप पोकळ्यांचा संपर्क असेल. माणसाच्या देहामध्ये देखील हवेचा संपर्क असतो. तसेच आकाशाच्या पोकळी असलेल्या अनेक जागा असतात. प्राणवायु तर जीवंतपणाचे लक्षण होय. वातावरणातील हवेचा सतत संपर्क येणे ह्या क्रिया फुफूसामार्फत देहात चालू असतात. अंतरदेहाचा बाह्य जगाशी ह्याच माध्यमाने संपर्क असतो.
महासागर समुद्र नदीनाले तलाव विहीरी ढग पाऊस आणि सुक्ष्म असा पाण्याचा थेंब. ह्या जगातील अस्तित्वात असलेल्या पाण्याच्या द्रवरुप माध्यमाची ही जाण आहे. जमीनीपेक्षाही प्रचंड प्रमाणात पाण्याची रचना केलेली दिसते. मानवाच्या शरिरांत देखील असेच पाण्याचे प्रमाण खूप असते. पाणी हेच जीवन समजले गेले आहे. प्रत्येक अवयवांत व त्याच्या सुक्ष्म पेशीत, सेल्समध्ये मुबलक पाण्याचे प्रमाण असते. देहाच्या जगण्यामधला पाणी हे महत्वाचे अंग असते.
पृथ्वी म्हणजे काय ? प्रचंड प्रमाणात जीचे अस्तित्व असते तो जगाचा भाग. केवळ माती व दगड ह्यानी व्यापलेला. हलकी भुसभुशीत ती माती, व ज्याचे स्वरुप कठीण वाटते तो दगड. तसे दोन्हीही एकच. माती म्हणजे काय असते ? अधुनिक शास्त्राने त्याचे विश्लेशन केले आहे. मातीमध्ये जवळ जवळ ११० मुळ घटक पदार्थ अर्थात Elements (धातू) सापडले आहेत. जसे सोने, चांदी, लोह, तांबे, जस्त, सोडीयम, पोट्याशियम, ऑक्सीजन, हैड्रोजन, क्लोरीन, इत्यादी. हे घटक पदार्थ निरनीराळ्या प्रमाणात मातीमध्येच असतात. वा त्याच्याच प्रमाण बद्धतेनुसार निरनीराळ्या प्रकारची माती बनत असते. माती दगडाचे दृष्य स्वरुप हे भिन्न वाटत असले तरी विश्लेशनात्मक दृष्टीने ते अन्तीमतः मुळ घटक elements याचेच मिश्रण वा संयुक्त होय. निरनीराळे नैसर्गिक गुणधर्म बाळगुन. मानवी देह हा काय आहे ? त्याचेही घटनात्मक विश्लेषन करु लागलो तर तो सुद्धा मातीचाच बनलेला लक्षांत येते. इंद्रिये, अवयव, रक्त , मास, हाडे, कातडी, ह्या सर्व भागांचे विश्लेषन दाखविते की त्याचे गुणधर्म फक्त मातीचेच असतात. ज्यात फक्त असतात मुळ घटक पदार्थ ( Elements). निरनीराळ्या प्रमाणे प्रमाणशील बांधलेले. मृत देह जाळला वा पुरला तर तो शेवटी मातीमध्येच एकरुप होतो. म्हणूनच विद्वानानी मानवी देहाला मातीचा घटाकार म्हटले आहे.
ह्या संपूर्ण घटक पदार्थाचे जर सुक्ष्म रितीने विश्लेषन केले तर आपण अणू (Atom ) ह्या संकल्पने पर्यंत जातो. मुळ घटक पदार्थ ( Elements) नैसर्गिक गुणानी भिन्न भिन्न असतात. आजच्या अद्यावत विज्ञानाप्रमाणे अणूचे विभाजन पून्हा परमाणू त्यांत धन (Positive ) व ऋण (Negative ) शक्ती इत्यादी वर्णने आहेत. ही अणूतील उर्जा शक्ती प्रचंड असते. जी उर्जा अणूत आहे तशीच ती पेशीत देखील सुप्त अवस्थेत असते. पेशीमधल्या एकत्रीत शक्तीमुळेच शरीर मनाचे कार्य़ चालू असते. मानव देहातले तेज म्हणतात ते हेच.
पंच महाभूतांचे म्हणजे आकाश वायु आप (पाणी) पृथ्वी आणि तेज ह्याचेच आस्तित्व ह्या संपूर्ण जगामध्ये , मानवामध्ये असल्याचे जाणवते. वस्तू निराळ्या, नांवे निराळी, गुणधर्म निराळे, परंतु सर्वाचे मुळतत्व एकच असल्याचे आम्हास जाणवू लागते. दिसणारा भासणारा पदार्थ आणि त्यांत असलेली शक्ती. कोणतेही कार्य ज्यातून केले जाते त्या माध्यमाला पदार्थ संबोधले गेले. ज्यामुळे ते कार्य होऊ शकते त्याला चेतना अथवा उर्जा वा शक्ती म्हटले गेले. त्यामुळे प्रत्येक पदार्थ आणि त्यातील उर्जा हे दोन दिसत असले तरी ते एकच समजले गेले आहे. विचारांच्या लाटेत, ज्ञानाच्या सागरांत, समजण्याच्या प्रांतात हे भिन्नतेने वर्णीले जाते. पदार्थ व शक्ती ह्याना एकच स्वरुपांत मानणारे अद्वैत संकलपनेत जातात. जे एकांतले दोन्ही गुणधर्म याना अलग अलग समजतात त्यांची द्वैत विचारसरणी असते. विचार सामान्यजनाला समजण्यासाठी असतात.
२
परंतु सत्य आपल्याच जागी राहते. ते केंव्हाच बदलणारे नसते. ह्यालाच तर म्हटले आहे सत्याची जाणीव Reality Consciousness. परमेश्वर जो आहे म्हणतात तो ह्याच्यापेक्षा वेगळा असू शकेल कां ?
कोणत्याही पदार्थाचे व्यक्तीचे वा तथाकथीत देवाचे वर्णन त्याच्या फक्त गुणांत असते. कदाचित वेगळेपणासाठी प्रत्येकजण त्याला आकाररुपांत जाणू इच्छीतो. मात्र खऱ्या अर्थानी त्याची ओळख पटते ती फक्त गुणवर्णनावरुन. अंटार्टीका ह्या बर्फाछादीत प्रदेशांत राहणारा मानव (एस्कीमो ) सर्व साधारण कुणी बघीतला नाही. वा कुणी सहजतेने तेथे जावून तो बघू शकत नाही. तरी देखील तेथे राहणारा मानव कसा असेल हे आम्हास त्याच्या केवळ गुणधर्मावरुनच कळते. कारण मुख्य गुण समजल्यावर आकार,रंग रुप इत्यादी दुय्यम ठरतात. त्या परमेश्वराचा आकार,रंगरुप इत्यादी गोष्टी समजणे जाणणे ओळखणे ह्या गोष्टी देखील दुय्यम स्वरुपाच्याच नव्हे काय ? परमेश्वराला कुणीही बघीतले नाही असे म्हणतात. ते सत्य असेल. करण गुणधर्म हे स्थीर, स्थीत, आणि सदैव असतात., म्हणूनच त्याला त्याचे हे गुणधर्म संबोधले गेले. मात्र रंग रुप आकार हे अस्थीर व बदलणारे असल्यामुळे असत्य वाटतात. पदार्थ बदलत गेला तरी मुळ गुणधर्म सदैव कायम असेल. हिंदू धर्मात ३३ कोटी देवांची संकल्पना आहे. ह्यात अनेक रंग रुप आकाराचे देव आहेत. हे जरी सत्य मानले तरी सर्वांत एक प्रमुख गुणधर्म अस्तीत्वात आहे, आणि त्याला आम्ही म्हटले " देवत्व, Devine Power, Real Consciousness " हे सर्वात एकच असते. तो सर्व व्यापी, अविनाशी, सर्वशक्तीमान, आणि निराकार असेल तर ह्याच गुणातील अविष्काराचे जाणीवेचे अनुभव मिळणे हा प्रयत्न असावा. सत्य समजण्याचा हाच मार्ग असेल. सगुण रुपाचे दर्शन मिळाले तरी ते अपूर्ण असेल. निराकार आणि सर्वत्र जाणलेले स्वरुप म्हणजे सुक्ष्म पदार्थात अणूरेणूमधली उर्जाशक्ती. जी प्रचंड तर आहेच परंतु सर्वत्र समावलेली आहे. सुक्ष्मापासून स्थुलात. ह्या जगाच्या संकल्पनेत जेंव्हा दोन्ही अर्थात पदार्थ व शक्ती एकच समजले गेले ते परमेश्वराचे स्वरुप. अद्वैत स्वरुप.
मानव आपल्याला चांगलाच समजला आहे. दैनंदीन जीवन चक्रांत आम्ही संपूर्ण जग देखील जाणले. तो महान परमेश्वर सर्वत्र चराचरांत, अणूरेणूत, महासागरांत, नदीतलावांत, डोंगरदऱ्यांत, वनश्रीमध्ये, वन्यप्राण्यात, आगदी तुमच्या आमच्या शरीरांत देखील पसरलेला आहे. त्या परमेश्वराचा अनंत स्वरुप पसारा जाणण्याची कोणतीही शक्यता आपल्या इंद्रियामध्ये नाही. मग तो परमेश्वर कसा दिसू शकेल.
पौरानीक कथा सांगते की श्री कृष्णानी फक्त अर्जुनाला ते ईश्वरी दिव्य स्वरुप दाखवण्याचा प्रयत्न केला. अर्जुनाला ते सहन झाले नाही. त्याने स्वतःचे डोळे एकदम मिटून घेतले.
हां एक मात्र शक्य आहे . त्या परमेश्वराचा अंशात्मक अनुभव तुम्हाला मिळू शकतो. जीवनचक्रामध्ये प्रत्येकाला मिळणारा आनंद – समाधान-शांतता अर्थात सत् चित् आनंद हेच तर त्या परमेश्वराचे स्वरुप होय. ह्यालाच म्हणतात Reality of Consciousness वा सत्याची जाणीव
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
एक माणूस स्वच्छतेचा फारच भोक्ता होता. मात्र त्याचा अतिरेक एवढा वाढला की, या स्वच्छतेच्या नादापोटी त्याला सगळ्या गोष्टी अमंगळ वाटू लागल्या. घरामध्ये दैनंदिन कामे करताना जी अस्वच्छता व्हायची तिलाही तो कंटाळला व एके दिवशी स्वतःचेच घर सोडून तो दुसऱ्या गावी गेला. परंतु तेथेही त्याला जिकडेतिकडे घाण दिसू लागली म्हणून तो जंगलात गेला. तेथे एका झाडाखाली बसला असता पक्ष्यांनी वरून त्याच्या अंगावर घाण केली. जंगलही घाण म्हणून तो मनुष्य नदीवर गेला. नदीतील पाण्याचा प्रवाह संथ होता म्हणून तो त्याच्यात पाय सोडून बसला. थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आले की, त्यातही घाण पाणी आहे व त्यामुळे आपले पाय खराब झाले आहेत.
जिथे जाईल तेथे घाण या कल्पनेने तो फारच वैतागला व जगण्यात काही अर्थ नाही म्हणून त्याने आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने होळी पेटविली. त्या होळीत तो शिरणार तेवढ्यात आजूबाजूला राहणारे काही लोक तेथे आले. त्यांनी त्या माणसाला विचारले की, हे काय चालले आहे? त्यावर तो माणूस म्हणाला, घाणीला वैतागून मी जीव देत आहे. त्यावर ते लोक म्हणाले, तू जाळून घेतले तर येथे किती घाण सुटेल? आम्ही जवळच राहतो. आम्ही जायचे तरी कोठे? तो मनुष्य पुन्हा वैतागला व म्हणाला, “या जगात सगळीकडेच घाण दिसते; मग मी एकट्याने मरून ही घाण दूर होईल असे वाटत नाही.”
त्याने थोडा वेळ विचार केला. जगात घाण जरी असली तरी इतर बऱ्याच गोष्टी चांगल्याही आहेत, असा विचार करून तो आपल्या घरी निघाला.
काही वेळाने जोरदार पाऊस सुरू झाला. सगळीकडे चिखल झाला. त्या चिखलातून तो वाट काढीत निघाला. त्यामुळे तो पुन्हा वैतागला होता. थोड्या वेळाने पाऊस थांबला आणि समोर त्याचे लक्ष गेले. आकाशात छान इंद्रधनुष्य तयार झाले होते. चिखलात थांबूनच इंद्रधनुष्य पाहताना त्याचे भान हरपून गेले होते. आता त्याला चिखलाचे काहीच वाटत नव्हते. कारण त्याने आपले मन कधीच स्वच्छ करून घेतले होते. त्या चिखलातच तो आनंदाने वाट तुडवित आपल्या घरी गेला.
……आणि तात्याला काय झालं असतं तर मग त्या डॉक्टरचं काय खरं नव्हतं
वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करीत असताना, प्राथमिक ज्ञान मिळाले. शरीरशास्त्राविषयी , निरनीराळे भाग व त्यांची मुळ रचना, ट्यिश्युचा समुह, त्यांच्या सुक्ष्म अशा सेल्स भागाची योजना जाणली. प्रत्येक आवयव व शेवटी सर्व देह सांघिक मदतीने आपआपले कार्य पूर्ण करीतो. त्याची वाढ कशी होते हे कळले. निसर्गाची एक अप्रतिम योजकता ह्या अभ्यासामुळे दिसून आली. ह्या अभ्यासांत मदत झाली ती विद्वान डॉक्टरांनी लिहीलेल्या पुस्तकांची, व मासिकांची. प्राध्यापकांनी केलेल्या मार्गदर्शनपर नोटसची. आम्ही बघीतलेल्या व स्वताः केलेल्या प्रयोगांमुळे. तशीच मदत झाली ती, शरीर विच्छेदनाची (Dissection ), सुक्ष्म दर्शक यंत्राची, चार्टसची, ग्राफसची, आणि अशाच अनेक साधनांची.
मला अध्यात्मिक विषयामध्ये रुची आहे. हा जीव (प्राण वा आत्मा ) ज्याला संबोधीले, तो ह्या देहांत कोठे असतो, कसा असतो, ह्याचा मी शोध घेतला. परंतु तो सापडला नाही. कोणत्याही वैद्यकीय पुस्तकांत, मासिकांत, त्याच्या स्वतंत्र अस्तित्वाबद्दल नोंद आढळून आली नाही. तरीही जेव्हां शरीरांतील टिश्युंचा वा सेल्सचा रचनात्मक उल्लेख होताना, ज्यामध्ये हलचाल दिसे त्याला जीवन्त असल्याची नोंद ' जीवमय ( प्राणमय ) live cells ' अशी होत असे. हलचाल नसलेल्याना ' मृत dead cells ' संबोधीत.
हलचालीचा मुख्य स्रोत, शक्ती, वा उर्जा हीच त्याचा जीव वा प्राण म्हणूनच ओळखली जाते.
यंत्राचे भाग निराळे, परंतु ते कार्यारत होण्यासाठी त्याला उर्जा लागते. ती विद्युत, उष्णता, इलेक्ट्रॉनिक वा दुसऱ्या कोणत्या प्रकारची असेल. जशी उर्जा यंत्रासाठी तसेच प्राण हा देहासाठी असतो. जरी प्राण दिसला नाही, तरी त्याचे अस्तित्व जिवंतपणासाठी गरजेचे. प्राण संपुर्ण देहामध्ये पसरला असतो. देहाचे प्रत्येक सुक्ष्म सेल्स जेव्हां जीवंतपणाचे लक्षण दाखवते, त्याचवेळी तीच्यामध्येंही आत्मा आहे. मेंदूपासून नखापर्यंत जे चैत्यन्य जाणवते. जी जीवंतपणाची लक्षणे दिसतात, ती त्या जीवात्म्यामुळेच. त्या उर्जा शक्तीसाठी, देहामध्ये स्वतंत्र, वेगळे अवयवा सारखे स्थान वा कार्य दिसून आले नाही. संपूर्ण शरीरावर शक्तीरुपाने ताबा ज्याचामुळे असतो, तो जीवात्मा. शरीर मृत होताच त्याच्यातील जीवात्म्याचे अस्तित्व नाहीसे होते. शरीराचे जेव्हां कांही कारणामुळे कार्य बंद पडते, त्याच क्षणी जीवात्म्याचे तेथील अस्तित्व नाहीसे होते. जीवाला शरीरांची एक प्रकारे ओढ असते. तो शरीरांत गुरफटून राहीलेला असतो. संपूर्ण शरीरांत पसरलेला असतो. जीव स्वतः शरीर त्यागीत नसतो. परंतु अवयवातून जे जे सेल्स निकामी होऊ लागतात, तेथून जीवात्मा लोप पावतो. शेवटी शरीराचे कार्य शिथील होता क्षणीच जीवात्मा ते शरीर सोडून देतो. शरीर व जीव दोघेही सदैव एकरुप असतात. फक्त कार्य करणे हे जीवामुळे तर कोणते कार्य करावे हे शरीर ठरवितो. दोन्हीही भिन्न बाबी आहेत. जसे घोडा फक्त घोडेस्वाराला वाहून नेण्याचे कार्य करतो. परंतु कोठे जायचे हे मात्र घोडेस्वारच जाणत असतो. त्याच प्रमाणे देहामधले जे अनेक इंद्रिये आहेत, त्याचे कार्य कसे चालावे हे त्यातील एक इंद्रिय मेंदू वा बुद्धी सतत ठरवित असते. मेंदूची चालक शक्ती जीव ही मेदूला जीवंत ठेवते. मेंदूने कसे व कोणते कार्य करावे हे मेंदूच स्वतंत्रपणे ठरवित असतो.
नैसर्गिक संसारीक घटनांचे पडसाद मेंदूवर सतत पडतात. त्याला जगाचे ज्ञान होत राहते. क्रियात्मक वा प्रतिक्रियात्मक गोष्टी मेंदू आपल्या देहाच्या अवयवाकडून करुन घेतो. संसाराचे चक्र चालत राहते.
मेंदूकडून घेतल्या गेलेल्या निर्णयाचे परिणाम सुख वा दुःख ह्या भावनिक अविष्कारांत होतात. त्या प्रमाणे परिस्थितीचा गुंता होत जातो. ह्या सर्व घटनामध्ये मेंदूचा सहभाग असतो. जीवाचा नव्हे. ह्यालाच केलेल्या कर्माचे फळ म्हणतात. कार्य कोणते व परिणाम कोणता ह्याच्याशी जीवाचा संबंध नसतो. म्हणजेच त्या ईश्वराचा संबंध नसतो. ईश्वर देहाशी एक रुप होऊन देखील नामानिराळा असतो. व्यक्ती अर्थात त्याच्या देहाशी संबंधीत त्याचा मेंदू , बुद्धी, मन, विचार, भावना इत्यादी होणाऱ्या कर्मात प्रत्यक्ष सहभागी असतात. जीव वा त्याची उर्जा नव्हे.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
रामायण वाचताना वा ऐकताना, रामाबद्दल आदर, प्रेम भाव निर्माण होतो. त्याच वेळी त्याच्या सावत्र आई कैकयी विषयी अनादर व राग मनांत उत्पन्न होतो. अर्थात ह्या दोन्ही भावनिक बाबी आहेत. हा ज्याचा त्याचा वैयक्तीक समजण्याचा भाग आहे. आपण ह्याच्या विश्लेशनाच्या मागे सतर्कतेने जात नसतो.
आगदी बाल वयांतच रामायणातील कथा आपणास सांगितल्या गेल्या. त्यांत भव्यता, दिव्यता, गोडवा, आदर्शता, बरीच करमणूक, अनेक गुंता गुंतीच्या घटनांची उकल होती. त्यातून सर्वास मिळणारा आनंद, ह्याची आमच्या मनावर प्रचंड पकड घेतली गेली. ती इतके वर्षे झाली, तरी आजतागायत कायमच आहे.
वाल्मिकी रामायण हे मूळ समजले गेले. त्यानी सांगीतलेले कथासार हे अजरामर झाले. सर्वानी त्यांत रुची व्यक्त केली. कांही त्याला कवीची कथा रम्यता समजले. कांही म्हणतात तो इतिहास होता. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. त्याप्रमाणे सर्वांनी आपआपल्या समजानुसार त्याला मान्यता दिली. मात्र मुळ कथेच्या गाभ्याला कुणीच धक्का पोहोंचविला नाही. निरनीराळे विचार व वर्णने निर्माण झाली. ती फक्त त्यातील व्यक्तीरेखा वर्णन करताना. त्यांच्या स्वभावांत त्याना जे दिसून आले ते सांगीतले गेले. घटना मात्र कायम ठेवल्या गेल्या.
हेच बघना. जर रामाला परमेश्वरी रुप दिले गेले तर त्यांच्यामध्ये सारे दिव्यत्वाचे, भव्यतेचे, उत्तमातील उत्तम गुणघर्म असणारच. शेवटी महानतेची सर्व पैलू वेगवेगळ्या दिशानी रामांत असणारच. व ती होतीही. त्याचमूळे श्री रामप्रभू हे सर्वांचे आदरणीय ठरले. त्यांना वनांत पाठवण्याचे दुष्कृत्य राणी कैकयीनेच केले, हे सर्वानी मान्य केले आहे. आणि त्याच क्षणी आरोप प्रत्यारोप, वाईटपणा, दुष्टतां, स्वार्थीपणा, हट्टीपणा, इत्यादी दुर्गुण कैकयीच्या माथी मारले गेले. कथानकाच्या ओघांत व प्रसंगाच्या गुंतागुतीमध्ये हे सारे योग्य वाटू लागले. प्रत्येकजण स्वतःच्या विचार टिपणीला समाधानाची चादर घालू बघत होता. कैकयीला तिच्या कृत्याबद्दल कोणती तरी, कांही तरी शिक्षा व्हावी ही सर्व सामान्याची मानसिकता. परंतु ती खूप जुन्या काळातील घटना. आज केवळ कैकयीला दुषणे देत, कांहीजण त्यांत समाधान बघतात.
रामाच्या काळांत व त्याच्या कथेत दिव्यत्वाला फार महत्व होते. रामाचा जन्म हाच मुळी दुष्टांचा संहार करण्यासाठी होता. रावण व त्याच्याप्रमाणे जे अनेक राक्षसी वा असूरी वृत्तीचे होते, त्याना नष्ट करणे गरजेचे होते. प्रजेला सामान्य जनाना सुख देणे हे महत्वाचे. जे रामाने केले. रावण तसा रामाच्या खूप आधीचा राजा होता. त्याचे दशरथाबरोबर देखाल युद्ध झाले होते. त्यामुळे रावणाविषयी संपुर्ण ज्ञान राणी कैकयीला होतेच. तीच फक्त राजा दशरथाला त्याच्या राजकारणांत सक्षमतेने मदत करीत असे. युद्धभूमिवर देखील अनेक प्रसंगी तीने हाती शस्त्र घेऊन लढा दिल्याचा ऊल्लेख आहे. एकदा राजा दशरथाबरोबर एका प्रसंगांत अतुलनीय शौर्य व चतुरता कैकयीने दाखविली. युद्धांत जन्म मरणाचा – मान सन्मानाचा महान प्रसंग. योग्य आणि प्रासंगीक साहस कैकयीने केले. दशरथाला यश मिळाले. राजाने खुश होऊन राणी कैकयीला दोन वरदान देऊं केले.
तीच्या कोणत्याही दोन इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले गेले. शब्दांना जीवापेक्षा जास्त जपण्याचा तो काळ होता. "ज्यान जाये पर वचन न जाये" म्हणतात ते यालाच. पण राणी फार चतूर होती. ते वरदान त्याच क्षणी घेण्याची ती वेळ अयोग्य होती. दुर दृष्टीने परीपूर्ण व जबरदस्त महत्वाकांक्षी कैकयी हीने नम्रतापूर्वक ती जणू दोन ब्रह्मास्त्रे भावी आयुष्य व योग्य प्रसंगाचा आराखडा घेत ठेवणीत ठेऊन दिली.
कैकयी ही राज कुमारी होती. एका राजाची मुलगी. नंतर राजा दशरथाबरोबर विवाहीत झाली. तीच्या रक्तांत- स्वभावांत राजकारण, चातूर्य, दुरदृष्टी, ही मुरलेली होती. निजी स्वार्थ, त्वरीत स्वार्थ, वैयक्तीक स्वार्थ असल्या क्षुद्र गोष्टींचा ती केव्हांच विचार करु शकणार नव्हती. आज पेक्षा उद्याचे भव्य दिव्य व टिकणारे सत्य बघण्याची, जाणण्याची तीची दूरदृष्टी क्षमता होती.
लंकेचा राजा रावण लंकेत दक्षिणेत होता. त्याच वेळी राम आयोध्येत उत्तरेत होते. इतक्या दुर अंतरावर रामाला पाठविणे ही फार मोठी कामगीरी होती. रामाच्या क्षमतेचा प्रश्नच नव्हता. सदा विजयी होणारी ती शक्ती होती. यश आणि विजय रामाच्या ललाटी विधात्यानेच कोरलेले होते. फक्त त्याला त्या कार्यांत जाण्यासाठी उद्युक्त करणे, चेतना देणे हे महत्वाचे होते. त्या काळी पायीं चालणे वा घोडा गाडी हीच संपर्काची साधने होती. त्यामुळे हजारो मैलांचा प्रवास करुन, दक्षिणेकडे जाऊन परत सर्वांनी येणे हे काम १२ ते १४ वर्षाचा काळ घेणारे असणारच. हा हिशोब आपण आजही करु शकतो. त्यामुळे राणी कैकयीने रामासाठी वनी जाण्याचा काळ जो सुचविला तो अत्यंत चतुरपणाने व तर्काला साजेल असाच वाटतो. रामाला वनांत अर्थात दक्षिणेकडे पाठविण्याचा हट्ट, हाच संपूर्ण कथानकातील प्रमुख गाभा वाटतो. बाकीच्या घटना ह्या फक्त प्रसंगाची जोड करणाऱ्या वाटतात. त्यांत कैकयीची इच्छा विशेष वाटत नाही.
कैकयीने रामाच्या राज्याभिषेकांचा अत्यंत महत्वाचा क्षण साधला. हा संपूर्ण रामायण जीवनाला कलाटणी देणारा ठरला. तिच्या दुरदृष्टीने रामाने राज्यावर बसून राज्य कारभार संभाळणे हे ध्येय तीला न पटणारे होते. रावण व इतर दक्षिणेतील असूर यांचा पाडाव करणे ह्याने कैकयी पछाडली होती. हे सारे वाटेल ती किमत देऊन. वेळ पडल्यास जीव धोक्यात घालून वा नष्ट होऊन करण्यास ती प्रेरीत झाली होती. रामाला अशा राज्याभिषेकाच्या भव्य दिव्य आनंदी प्रसंगी रोकणे, सिंहासना पासून त्याला दुर सारणे आणि त्याला वनांत जाण्यास भाग पडणे, हे सारे केवळ कल्पनेच्या बाहेरचे होते. अत्यंत अशक्यप्राय गोष्ट होती. राम सर्वांचा अत्यंत आवडता, प्रेमळ. कैकयीचा देखील आदरयुक्त प्रिय असा.
भरत जो कैकयीचा आपला मुलगा, तो देखील रामावर जीवापार प्रेम करीत असे. तो कदाचित् आईच्या रामास वनांत पाठविण्याच्या संकल्पनेस कडाडून विरोध करील. ऐकणार नाही. कांहीतरी विपरीत घडेल याचा तीला अंदाज होता. म्हणूनच तीने भरताला त्या महत्वाच्या समयी त्याच्या मामाकडे पाठवण्याची चाल खेळली. यांत ती त्या क्षणी तरी यशस्वी झाली. सर्व कौटूंबीक वातावरण जणू राममय झालेले होते. ह्यावर ब्रह्मास्त्र टाकून ते वातावरण उध्वस्त करावयाचे म्हणजे केवळ अशक्य होते.
कैकयीने रामप्रेमानी ओतप्रोत भरलेल्या ह्रदयावर, दगड ठेऊन अघात केला. राजा दशरथाला पूर्वी दिलेल्या वरदानाची आठवण देत कैकयीने पहीली मागणी केली.
" रामाला चौवदा वर्षे वनांत धाडा" हा तीचा अट्टाहासी परंतु दुरदृष्टीचा जबरदस्त वार होता. दुसरी मागणी होती, जी की पहील्या मागणीसाठी पुरक होती. निर्माण होत असलेल्या प्रसंगाला मदत करणारी होती. राज सिंहासन हे रिकामे राहूच शकत नाही. त्याची अशा प्रसंगी तात्पूरती योजना करावी लागते. ती होती रामाच्या गैरहजेरीत भरताला त्या सिंहासनावर स्थानापन्न करण्याची. ही योजना व रचना तात्पुरती होती. कारण शास्त्र धर्माप्रमाणे असलेल्या राज्याचे कुळच ती राजगादी चालवावी असे असते. राजा व त्याचा प्रथम पुत्र, त्यानंतर त्याचाही पुत्र ही संकल्पना होती. हे राजमान्य व जनमान्यही होते. आयोध्येची गादी त्यामुळे दशरथानंतर रामासाठीच होती. व त्याच वंशावळीत जाणारी. प्रसंगोचीत कांही काळासाठी भरत जरी त्यावर आरुढ झाला, तरी त्यावर काळाचे बंधन असणारचय. हे कैकयी जाणून होती. जरी हा फेरफार राजा दशरथाच्या इच्छेने, आज्ञाने होत असला तरी ते शास्त्र संमत नव्हते. त्याला म्हणता येइल प्रासंगीक बदल. एका योजनेने बांधलेला.
घटना घडत गेल्या. इच्छीत अपेक्षीत आणि योजलेले वेगवेगळ्या मार्गानी होत गेले. कैकयीला सर्वांच्या टिकेला सामोरे जावे लागले. परंतु ती अचल होती. धीर होती. सशक्त होती. गंभीर होती. प्रासंगीक भावनेने व निरनिराळ्या विचाराच्या दबावाने हदरुन जाणारी नव्हती. तीने सारे आरोप पचविले. सारा क्रोध सहन केला.
तीने प्रथम राजा दशरथाला सर्व दृष्टीकोणातून सत्य व परिस्थीतीची जाणीव करुन दिली. रावणाचे दुषकृत्य आणि जुलमी राजवट, सामान्य प्रजेला सहन करावा लागणारा अत्याच्यार ह्या गोष्टी दशरथाला संपूर्णपणे माहीत होत्या. त्याचा नायनाट करणे हे देखील दशरथ जाणून होता. आणि त्याच वेळी त्याला रामाच्या शक्तीची दिव्यत्वाची पूर्ण जाणीव होती. विश्वास होता. थोडीशीही शंका नव्हती. राणी कैकयीची योजना दुरदृष्टीकोण हे सारे तर्काला धरुनच असल्याची खात्री राजाला पटलेली होती. दिलेल्या शब्दाचा मान राखणे हे जरी असले, तरी तत्वतः दशरथाने कैकयीचे विचार त्या क्षणी मानले होते. अत्यंत कठीण असा निर्णय त्याला घ्यावा लागला. ह्यावेळी मात्र घटनेची तिवृता भयंकर होती. दुर्दैवाने रामपुत्र प्रेमामुळे दशरथाला रामवियोगाचे दुःख सहन झाले नाही. भावनेच्या चक्रांत तो अडकला. त्यांतच त्याचा अंत झाला.
पूर्वी असाच एक प्रसंग झाला होता. बालक राम-लक्ष्मण नुकतेच धनुर्विद्या शिकून गुरुकुलातून आयोध्येस परत आलेले होते. बाल वय त्यांच. खेळण्या उड्या मारण्याचे. त्याच वेळी अचानक श्रेष्ठ महर्शी विश्वामित्र राजदरबारी आले. दशरथानी त्यांचे स्वागत केले. परंतु राजाला त्यांच्या एक धक्कादायक विनंतीची सोडवणूक करावी लागली.
" राजा तुझे दोन शुर वीर पराक्रमी पुत्र राम व लक्ष्मण यांना माझ्या नियोजीत यज्ञाच्या सुरक्षतेसाठी पाठव " राजा दशरथ हादरुन गेला. प्रथम राजाने सारे सैन्य यज्ञ रक्षणासाठी देण्याचे सुचवीले. परंतु महर्शी विश्वामित्रानी ते अमान्य केले. कठोर अंतःकरणानी राम लक्ष्मणाला वनी पाठवले गेले.
रामराज्याभिषेकाच्या ऐन वेळी निर्माण केले गेलेले तुफान रामकथेला वा इतिहासाला कलाटणी देणारे ठरले. माता राणी कैकयीची केवळ राजकीय दुरदृष्टी. अर्थात दुर्दैवाने त्याघटनेत राजा दशरथाचे प्राण गमावले गेले.
कैकयीच्या दुरदृष्टीचा इतिहास येथेच थांबला नाही. तीच्या चाणाक्य दृष्टीने रामायण कथासारमध्ये आणखी एक मानाचा तुरा खोविला. राम रावण युद्ध संपले. रावण मारला गेला. रामाला विजय मिळाला. देवी सिता हीचा वनवास व बंधन संपले. रामाने तीला आणले. रावणाचा लहान बंधू बिभीषण ह्याला लंकेच्या राज सिंहासनावर बसविले. एक आनंदी व उल्हासीत विजय वातावरण निर्माण झाले होते. रामाने वीर हनुमानाला आज्ञा केली.
" हनुमंता तू आत्ताच आयोध्येला जा. राजा भरत आणि माता कैकयी ह्याना येथील यशाचा सर्व वृतांत सांग. आम्ही वचना प्रमाणे १४ वर्षे पूर्ण केलेले आहेत. आमची तेथील सर्वांची भेट घेण्याची तीवृ ईच्छा झालेली आहे. त्यांची मान्यता घेऊन, तो निरोप मला सांग. त्यानंतरच आम्ही परतीच्या प्रवासाला निघूत "
रामाची आज्ञा घेऊन, वीर हनुमानानी राम-सिता व लक्ष्मण याना अभिवादन करीत आकाशांत झेप घेतली. हनुमान थोड्या वेळांतच तो आयोध्यानगरी पोंहोचला. तो भरत राज्याच्या दरबारी आला. त्याचे राजा व इतरांनी प्रचंड स्वागत केले. हनुमानानी आदराने भरताला सारी यशोगाथा सांगीतली. राम व देवी सिता हे येथे परत येण्याची आपली अनुमती मागत असल्याचे सांगीतले. भरताच्या डोळ्यांत राम प्रेमाने अश्रु आले होते. गळा दाटून आला होता. त्यानी त्वरीत सहमती व्यक्त केली. सर्वानी लवकर आयोध्येस यावे ही आशा व्यक्त केली. सभागृहामध्ये गंभीर शांतता पसरली होती. एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. राजमातेच्या दालनांत माता कैकयी देखील होती. ती अचानक पुढे आली. हनुमानाशी ती बोलू लागली. " हे वीर हनुमंता, तुम्हा सर्वांच्या यशासाठी अभिनंद आणि आशिर्वाद देते. माझा एक मार्गदर्शक संदेश तू माझ्या रामाला पोहोंचता करशील कां ? "
" राम सर्वांसह परत येत आहे त्यांच स्वागत. परंतु माझी एक इच्छा आहे. रामाने परतीच्या प्रवासांत नागपावा ह्या प्रदेशामधून यावे " सर्व सभा स्तंभित झाली. राजा भरत तर फारच चकीत झाला. कारण कैकयीने सुचविलेला प्रस्ताव परतीच्या प्रवासाला हानीकारक होता. त्यामुळे प्रवासाचे अंतर बरेच वाढणारे असून कित्तेक दिवस घेणारे होते. आणि नागपावा ह्या प्रदेशांत राज्य होते ते कुलतुरा ह्या असूराचे. हा रावणाचाच नातेवाईक होता. तो शूर असून अहंकारी होता. ऋषीमुनी व सामान्य जनाचा छळ करीत असे. राम जर त्या प्रदेशातून जाण्याचा प्रयत्न करील, तर त्याला विरोध होईल. कदाचित् युद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निराशजनक वातावरण, परंतु माता कैकयीचा स्वतःचा हा प्रस्ताव. सर्वजन हातबल झाले.
" जशी माता कैकयीची आज्ञा " म्हणत हनुमंताने तीला अभिवादन केले. तसेच इतर मातांना, राजा भरताला आणि इतर राजदरबारातील व्यक्तीना अभिवादन केले. हनुमानाने सर्वांचा निरोप घेत आकाशांत छलांग मारली.
जसे अपेक्षिले तसेच घडले.
माता कैकयीचे आज्ञा रुपी मार्गदर्शन, रामाने आदरयुक्त मानले. राम व त्याच्या सैनाला नागपावा प्रदेशांतून जाण्यास राजा कुलतुरा याने प्रचंड विरोध केला. शेवटी त्याची परिणीती युद्धांत झाली. त्यांत राजा कुलतुरा मारला गेला. रामाने त्याच्या गादीवर तेथीलच एका योग्य व चांगल्या व्यक्तीला राज्याभिषेक करुन स्थानापन्न केले. आनंदाचा जल्लोश करीत राम आपल्या सर्व साथीदार व सैन्यासह आयोध्येस परतला.
जीवनाच्या नैसर्गिक चक्रांमध्ये अनेक घटना घडत असतात. त्यांचे परिणाम अभ्यासले जातात. सर्वांचे संकलन बनत असते. चांगल्या वाईटावर भाष्य होते, आणि इतिहास बनत असतो. कित्येकदा सक्षम व्यक्ती घटनाना वेगळीच कलाटनी देतात. ही ऐतिहासीक मंडळी समजली जातात. ती एक वेगळाच इतिहास बनवितात. कैकयीने इतिहास घडविला. रामकथेतील अत्यंत प्रभावी पात्र म्हणून तीची गणना होते. कथानकाप्रमाणे ज्या कार्यपुर्तीसाठी राम आवतार झाला ते पूर्ण करुन घेण्याचे महत्वाचे श्रेय कैकयीकडेच जाते.
रावण व इतर असुरांचा नाश करणे, हे ध्येय तीने मनांत बाळगले होते. त्यांतही कैकयीने कल्पलता दाखवली. रावणानंतर त्याच्या सहकारी, नातेसंबंधी, असूर प्रवृतीचा आणि सर्वांत महत्वाचे शेवटचा व्यक्ती राजा कुलतुरा याचा नायनाट करण्याची योजना केली. तीला संपूर्ण जाणीव होती की तो हटवादी, अहंकारी आहे. कुणालाही त्याच्या प्रदेशामधून जाऊ देणार नाही. राज्यात हस्तक्षेप करु देणार नाही. त्याच वेळी कैकयीला संपूर्ण विश्वास होता की राम अत्यंत शक्तीशाली, पराक्रमी सक्षम योद्धा आहे. जो रावणासारख्या बलाढ्य राजाचा नाश करु शकतो, तो इतर कुणाही असूर प्रवृतीचा नाश करणार. हीच माता कैकयीची यशस्वी योजना. ज्यांत आहे चतुरपणा आणि दुरदृष्टीचे आवाहन. ज्यात मुरले आहे राजकारण.
सामान्य व्यक्तीजन कोणत्याही घटनेकडे भावनीक दृष्टीने प्रथम बघत असतो. तो प्रासंगिकता व समयआधारीत मत व्यक्त करतो. त्यावेळी विचारांची प्रगल्भता तेथे नसते. कैकयीने आपल्या मुलाला भरताला आयोध्येचे राजसिंहासन मिळण्यासाठी प्रयत्न करावा. परिस्थीती तशी निर्माण करावी, शब्दवचनांचा खेळ करावा, आणि त्या सर्वांमधून वैयक्तीक स्वार्थ साधावा हे घडले. बऱ्याच जणानी रामाच्या प्रेमापोटी कैकयीला खूप नांवे ठेवली. निरनीराळी अपशब्द भाषा वापरली. कैकयी ही स्वार्थी होती असे एकदम ठरवून टाकले. हे सारे वेळेनुसार होते हे सत्य. आशाही भावनांची कदर केली जाते. परंतु कालांतरानंतर घटनांची उकल होते. शेवटचे परिणाम हाती येऊ लागतात. इतिहास उलगडू लागतो. तो बनू लागतो. त्याच वेळी वेगळे सत्य समोर येते. अप्रतीम असे प्रसंग, घटनांची गुंतागुंत व सोडवणूक. प्रत्येक व्यक्तीची भव्य रेखा आनंदी करते. रामायण हे त्याचमुळे महाकाव्य वा भव्य इतिहास समजला जातो.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
रामायण अप्रतीम कथानक आहे. आजतागायत ते अजरामर होऊन राहीले. काव्य असो वा इतिहास. प्रसंगाची गोडी केवळ अविट आहे. घडणाऱ्या घटनामध्यें दैवी चमत्कार ह्या बाबींचा शिरकाव करुन मनोरंजनाची सिमा खूप ऊंचावली गेली. कदाचित् आजच्या अधुनिक विज्ञान युगांत असल्या प्रसंगाना सत्याच्या मोजमापात मान्यता मिळणे कठीण आहे. परंतु जेव्हां कोणत्याही कथानकातील करमणूक व योजना हाच आनंदाचा गाभा असतो, तेंव्हाच त्या प्रसंगाना पुढे पुढे नेत जाणे योग्य ठरते. फक्त घटनेतील मानसिकता उलगडली पाहीजे.रामाला आपला उत्तराधीकारी करण्याचे राजा दशरथाने ठरविले. मुहूर्त निघाला. बातमी सर्व संबंधी व प्रजाजन याना कळली. आनंद व उल्हास याचे वातावरण पसरले.
स्वर्गांत सर्व देव जरी आनंदीत झाले, तरी त्यांच्यात चिंता निर्माण झाली होती.
देवांचा संभ्रम होता की
" रामाच्या अवताराच प्रयोजन हेच मुळी रावण व त्याच्या प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी होत. जर रामाचा राज्याभिषेक जर झाला तर तो आयोध्येचा राजा होईल. मग रावणा बरोबरच्या त्याच्या युद्धाची कल्पना बाजूस पडेल. राम हा आक्रमक नव्हता. तो इतर राजाशीं अकारण युद्ध करणार नाही. कोणाची खोडी करुन त्याचे राज्य घेणारा नव्हता. रावण भले दुष्ट असूर प्रवृत्तीचा असला, तरी राम त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याच्या स्वभावाचा होता. आपला राजधर्म तो अत्यंत सत्यबुद्धीने व विवेकाने पाळणारा होता.
जर कांही घडायचे असेल तर राम राजा बनण्यापूर्वीच होणे शक्य आहे. राम हा एक पराक्रमी योद्धा व उत्कृष्ठ धनुर्धर होता. योद्धा आणि राजा ह्या दोन भूमिका वेगळ्या होत्या. योद्धा म्हणून घडलेल्या अन्यायाविरुद्ध लढणे, व अन्याय करणाऱ्याला तसेच त्याच वेळी शासन करणे ही संकल्पना येते. योद्धा हा प्रत्यक्ष बघतो. व त्याच क्षणी योग्य ती शिक्षा अमलांत अणतो. राजा म्हणून त्याला घटनांचे सर्व पैलू, कार्यकारणभाव, याच्या खोलांत जाऊन विचार करावा लागेल. कारण अन्याय करणारा विरुद्ध , न्याय झाला पाहीजे ही प्रथम समज. नंतर भाग येतो तो शिक्षेचा. त्यामुळे राम राजा म्हणून होण्यापूर्वीच हे घडणे जरुरीचे होते. "
राज्याभिषेकासमयी कांहीतरी विपरीत घडणार ह्याची त्याना चाहूल होती. ते आपली शंका घेऊन ब्रह्मदेवाकडे गेले. त्याना विनंम्र अभिवादन केले.
सर्वांची शंका व व्यथा जाणून ब्रह्मदेव म्हणाले " मी काळ व वेळेला आज्ञा केलेली आहे. घटनांचे सुसुत्रीकरण त्यांच्या हाती दिलेले आहे. हे सारे करण्यास ते सक्षम असतात. माझ्या योजना विधीलिखीत म्हणून अचुक होत असतात. आपण जा व निश्चींत रहा. "
सर्व देव जाताच ब्रह्मदेवानी " विकल्प ह्याची " आठवण केली. तत्क्षणी विकल्प प्रकट झाला. "जा तू पृथ्वीवर जा व योग्य ती कार्यपुर्ती कर.".
ब्रह्मदेवाला अभिवादन करुन विकल्प अन्तर्धान पावला.
आयोध्येमधील राजवाड्यांत आनंदाचे वातावरण होते. जल्लोश चालू होता. माता कैकयी सुद्धा आनंदमग्न होती. " माझा राम हा राजा होणार. प्रजेच्या कल्यानासाठी झटणार. एक आनंदी पर्व सुरु होणार ".
तीने तीची वैयक्तीक सेवा करणारी दासी मंथरा हीला हाक दिली. " जा बागेंत जाऊन उमललेली ताजी सुंदर टपोरी फुले काढून आण. आज मी स्वतः हार करुन माझ्या रामाच्या गळ्यांत घालणार आहे. त्याच्या भाग्योदयासाठी आशिर्वाद देणार आहे. " दासी मंथरा जी कैकयीसाठी प्रिय व अत्यंत विश्वासू होती. ती लगेच फुले काढण्यासाठी बागेत गेली.
बागेत आधीच विकल्प फुलझाडावर बसला होता. तो अदृष्य परंतु प्रतापी होता. मंथरेने एक टपोरे फुल बघीतले. ते तोडले. फुलाचा आनंद घेण्यासाठी ती फार उत्सुक झाली. तीने त्या फुलाचा स्वाद घेत प्रदिर्घ गंध टिपला. विकल्प हा त्याच फुलांत विराजमान होता. त्याने दासी मंथरेच्या स्वासाबरोबर तीच्या शरीरांत प्रवेश मिळविला. मंथरा फुले तोडण्यास सुरवांत करणार, इतक्यांत तीच्या डोक्यांत एक भावनिक कल्पना आली.
" राम हा राजा होणार. हे ठीक आहे. परंतु माझ्या राणी कैकयीच्या, स्वतःच्या मुलाचे, भरताचे काय होणार? " भरत हा सुद्धा राजाचाच मुलगा आहे. वंशाचा तोही दिवा आहे. राजसिंहासन हा त्याचा पण हक्क आहे. भरत फक्त थोड्याशाच अंतराने जन्मलेला. राजा दशरथाचे सर्व पुत्र यज्ञ देवतेच्या आशिर्वादाने, कृपेने, झालेले होते. तीन्ही राण्यानी यज्ञाचे पवित्र पायस ग्रहण करुन त्याना पुत्रप्राप्ती झालेली होती. कां म्हणून मग भरत राजसिंहासना पासून वंच्छीत रहावा? "
विचारांची मालिका, मार्ग नेहमी एका दिशेने जात असतात. व्यक्तीच्या भावना विचारांना सतत वेगवेगळ्या मार्गने नेण्याचा प्रयत्न करतात. कित्येकदा एका दिशेने चाललेला विचार भावनेच्या प्रभावाने एकदम विरुद्ध दिशेला पण जाऊ शकतो. आवडणारे क्षणात नावडते होते, वा नावडणारे आवडते बनू शकते. हे सामान्य मानसिक तत्वज्ञान आहे.
रामाविषयी प्रेम व आदर हा दासी मंथरेमध्ये भरलेलाच होता. म्हणूनच ती प्रथम आनंदी झाली होती. रामासाठी फुले आणून हार करण्यास मदत करु लागली. परंतु त्याच क्षणी तीचा स्वार्थ अर्थात स्वतःचे हीत ही भावना चेतवली गेली. हे सर्व साधारण मानवी स्वभावाचेच चित्रण असते. ही तीच्या विचारांची धारणा अयोग्य वाटली, तरी व्यक्तीची मानसिकता ह्यात दडलेली असते. म्हणूनच व्यक्त आणि अव्यक्त विचार ह्यांच्या संघर्षात मनुष्य भरकटला जातो. हेच तर जगासाठी एक व मनासाठी दुसरे होऊ शकते. हे स्वाभाविक असते. मंथरेच्या ह्या विचाराला विक्षीप्त म्हणता येणार नाही.
राम आणि मंथरेमधले भावनीक सख्य अंतर , तीच्यापासून खूप खूप दुर होते. तेच तुलनात्मक भरत व तीच्यातील सख्य अंतर खूप जवळचे होते. तीच्या मालकीनीचा आपला पुत्र असणारा. दोन्हीहीमध्ये आदर व प्रेम भावना होती. भरताकडून रामापेक्षा हे सहजगत्या मिळणे दासी मंथरेसाठी सुलभ होते. स्वार्थाच्या ह्याच वैचारीक भावनेने मंथरेला झपाटले. विचारांचे चक्र सुरु झाले. तीला रामापेक्षा भरताला राजसिंहासनावर आरुढ होताना बघावे ही इच्छा उत्पन्न झाली. ह्यांत वाईट बुद्धी नव्हती. दुष्टता नव्हती. मात्र स्वार्थ पुर्णपणे भरलेला होता. मंथरा सुद्धा अत्यंत चाणाक्ष्य होती. हूशार होती. सर्व परिस्थितीचे अवलोकन करुन आपली मालकीन राणी कैकयी हीच्याकडून कांही जमेल कां? याचा अंदाज घेण्यासाठी उत्सुक होती. ती बागेतून फुले न आणता तशीच परत राजवाड्यांत आली.
कैकयी ही प्रथम राजकन्या होती. नंतर राजा दशरथाची राणी झाली. स्वतः कैकयी अत्यंत चतूर, दुरदर्शी व मुरलेली राजकारणी होती. राजा दशरथाला राज्यकारभारांत तीचे क्रियात्मक सहकार्य होते. अनेक युद्ध प्रसंगी देखील ती रणांगणावर गेली. तीने एका कसलेल्या योद्ध्याप्रमाणे योगदान दिले होते. एक युद्धांत तर कैकयीने राजाचे प्राण देखील वाचवले. युद्ध जिंकण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. राजा आनंदी व खूश झाला. त्याने तीला दोन वर दिले. ती मागेल त्यावेळी ते पूर्ण करण्याचे वचन दिले. ती राजा दशरथाच्या संपूर्ण विश्वास व योग्य मार्ग दर्शनासाठी पात्र ठरलेली होती. तीचा शब्द तोलामोलाचा समजला जायी.
अशा प्रभावी व्यक्तमत्वाच्या कुशल राणी कैकयीने, आपली निजी सेवक व जवळकी करण्यास योग्य असलेली व्यक्ती म्हणून दासी मंथरेला निवडावे ही साधी बाब नव्हती. ही पसंती, मंथरेच्या चाणाक्ष्य व कर्तबगारीला बघूनच. राजभवनातील सेवकांची निवड अत्यंत काळजीपूर्वक व योग्यतेचा कस लाऊनच केली जात असे. विशेषकरुन ज्यांचा संपर्क राजा राणी अथवा त्यांच्या जवळच्या नातेसंबंधात असावयाचा. एखाद्या सामान्य दासी स्त्रीप्रमाणे वा नोकरासारखे बडबड करणे, इकडच्या तीकडच्या गप्पा मारणे, बाहेर बघीतलेल्या बातम्या सांगत बसणे, खऱ्याखोट्याचा आधार घेत चकाट्या मारणे, कुणाच महत्व मोठ वा छोट करणे, असे खालच्या वैचारीक दर्जा असलेल्या व्यक्तीना राजा वा राण्यांच्या संपर्कामध्ये केव्हांच ठेवले जात नव्हते. दासी मंथरेची वैचारीक योग्यता उच्य कोटीतीलच असणार.
एक प्रसंगात मंथरेची वैचारीक झेप लक्षांत येते. भरताला राज्य मिळण्याचा प्रयत्न करावा, ही विनंती तीने कैकयीला केली. रामाबद्दल प्रेम व आदर व्यक्त करीत हे तीने सुचविले. राम हा सर्वांचा आवडता आहे, त्याच्या विषयी कोणताही उणा शब्द वा अनादर कैकयी सहन करणार नाही हे तीला जाणीव होती. त्याच वेळी जर कैकयीने मंथरेचे विचार एकदम धुडकावले वा फेटाळले तर निर्माण होणारा परिणाम निश्चीतच भयावह होईल. मंथराने आपल्या चाणाक्ष गुणधर्माचे योग्य प्रदर्शन केले. अतिशय हळूवारपणे व समजदारीने तीने भरताला राजसिहांसन मिळवे हा विचार राणी कैकयीसमोर व्यक्त केला.
कैकयीला मंथरेचा विचार ऐकून प्रथम गम्मत वाटली. हासू आले. पण ती रागावली नाही. कारण मंथरेच्या हूशारपणाची तीला जाणीव होती. मंथरेमध्ये स्वार्थी विचार असला तरी त्यांत कुणाचा द्वेश नव्हता. एखादी गोष्ट मिळावी ही अभिलाशा होती. कांहीही मल्लीनाथी न करता, कैकयी त्याक्षणी शांत बसली.
एका वेगळ्याच विचारांचे दालन दासी मंथरेने उघडले होते. कैकयीला त्यावर विचार करावयास लावले. राजा दशरथाच्या निर्णयांत फेरबदल करावयास भाग पाडणे, ही अत्यंत अवघड गोष्ट होती. एक प्रकारे जीवाशीच खेळण्याचा हा प्रकार होऊ शकतो. कैकयीला प्रथम राजा दशरथारला हे पटवावे लागणार. न पटल्यास परीणाम वेगळाही होऊ शकतो. राजा दशरथाचा राग, चौकशी आणि दासी मंथरेसह सर्वाना प्रचंड शिक्षेलाही सामोरे जाणारे होऊ शकते.
खरी भूमिका होती ती राणी कैकयीकडून. तीने राजा दशरथाबरोबर प्रदीर्घ चर्चा केली. आपला अनुभव. राजकारण, दुरदृष्टी, रावण व इतर आसूरांचा दक्षिणेकडे चाललेला अत्याचार, अशा निरनीराळ्या त्या काळच्या व परिस्थीतीवर भाष्य झाले. "रावणाचा नाश करणे" ही सर्वांत महत्वाची प्राथमिकता होती. आयोध्या ते लंका हे अंतर प्रचंड दुर होते. विशेषकरुन पायी चालून वा घोडागाडीने. कदाचित् ती योजना पू्र्ण करण्यासाठी १२ ते १४ वर्षे लागू शकतील. राणी कैकयीने बघीतले की राजा दशरथाला देखील हे मान्य होऊ लागले. त्याच क्षणी तीने सुचविले की रामाने त्यावेळी राजसिंहासन न घेता पुढील योजनेसाठी दक्षिणेकडे वनांत जावे. ज्या भागांत रावणाचे प्राबल्य असून त्याच्याशी संघर्ष होण्याची खूप शक्यता आहे. राम येईपर्यंत ती गादी राजाचा दुसरा पुत्र भरत सांभाळेल.
राजा दशरथाला ही योजना मान्य होती. परंतु स्वतःचे वाढते वय व रामा विषयी नितांत प्रेम ह्यामुळे तो अतिशय बेचैन झाला, हातबल झाला होता. कैकयीचा प्रस्ताव मान्य करावा की अमान्य करावा ह्या द्विधा विचारांत तो होता. राणी कैकयी मात्र आपल्या योजनेवर ठाम होती. त्याच क्षणी तीने अतिशय चतूरपणे पूर्वी तीला मिळालेल्या दोन वरदानांची आठवण करुन दिली. आणि मागणी केली. रामाचे दक्षिणेकडे १४ वर्षासाठी जाणे व त्या काळांत भरताने राज्य सांभाळणे. ह्या संकल्पना त्यामधूनच साकार झाल्या.
विकल्पाने दासी मंथरेच्या माध्यम रुपाने वैचारीक ठिणगी चेतवण्याचे प्रभावी कार्य केले. कैकयीने त्याचे रुपांतर प्रचंड आगीत केले. वैचारीक भडका उत्पन्न झाला. सत्तांतराची उलथापालथ झाली. रावणाचा वध व खऱ्या रामराज्याचा उदय झाला.
अनेक घटना अघटीत होत गेल्या. आणि सर्व रामायण रोमांचकारी झाले.
ज्याचा शेवट चांगला व समाधानी होतो, त्यालाच विधी लिखीत म्हणतात.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
सध्या मोदी सरकार ने काळ्या पैशाविरोधात जी नोटा बंदी ची मोहीम चालवलेली आहे त्यावरून अनेक नेते, तथाकथित पुरोगामी विचारवंत, जनतेच्या दु:खाचा कैवार घेऊन जो उर बडवत आहेत, घसा कोकलून बोंबलत आहेत ते पाहून का कोण जाणे हि गोष्ट आठवली.
Copyright © 2025 | Marathisrushti