नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
रेल्वे स्टेशनलगतच्या पाऊल वाटेवरुन जात होतो. एका वयस्कर माणसाने माझे लक्ष्य वेधून घेतले. त्याच्या हातात मोठी प्लास्टीकची थैली होती. तो रेल्वेच्या मार्गावर पडलेल्या प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या वेचून, त्या थैलीमध्ये जमा करीत होता.माझी ऊत्सुकता जागी झाली. त्या माणसाला थांबवून मी चौकशी केली. अनेक प्रवाशी आजकाल पाण्याच्या बाटल्या खरेदी करतात. रिकाम्या झालेल्या बाटल्या चक्क रेल्वे मार्गावर फेकून देतात. हा त्या रिकाम्या झालेल्या बाटल्या, भंगारच्या दुकानाला नेऊन विकत असे. त्याने सांगितल्या प्रमाणे, तो दुकानदार त्या बाटल्या, प्रति किलो प्रमाणे विकत घेतो. साधारण ११० ते ११५ बाटल्याना शंभर रुपये पर्यंत त्यांत उत्पन्न होते. टाकाऊ वस्तूंचे Recycle करुन पुन्हा त्याचा उपयोग केला जातो.
आपल्याकडे अशी अनेक धातू जसे तांबे, जस्त, लोखंड इत्यादी वस्तू टाकाऊ झाल्यास त्यानाही त्यांच्यापरी मोल असते. ते सामान्यजनाना मिळते. विकसीत झालेल्या परदेशांत ही संकल्पना नाही. भंगार खरेदी विक्री यांचे दुकान नसते. कोणतीही वस्तू नादुरुस्त झाली की ती पुन्हा वापरणे ही क्रिया तिकडे दिसून येत नाही. Use and Throw अर्थात वापरा आणि फेकून द्या. तेथील स्थानिक शासन अशा वस्तू एकत्र करुन त्याचे Recycle करीत. भंगारवाले वा मध्यस्ती नसल्यामुळे सामान्य माणसाना साऱ्या नादुरुस्त वस्तू चक्क टाकून द्याव्या लागतात. ह्या बाबतीत आपणाकडे बरे असते. असे म्हणावे लागेल. आपला विकसनशील देश आहे. गरीबी, बेरोजगारी, यांनी अनेक कुटुंबे हैराण झालेली आहेत. त्यामुळे हा भंगार व्यवसाय देखील गुंतवणूक व कामधंदा यांना पुरकच आहेत.
कांही दिवसांत मी ती घटना विसरुन गेलो. सकाळची वेळ होती. मी फिरावयास गेलो होतो. अचानक एक अनामिक इसम माझ्या समोर उभा राहून, खाण्यासाठी दोन तीन रुपये मागू लागला. त्याच्या कपड्यावरुन, अवतारावरुन तो कदाचित् भिकारी असावा. असे वाटले. तशी त्याची शरीर प्रकृती बऱयापैकी होती. परंतु परिस्थितीने गांजला असावा. बाहेर गांवचा दिसत होता.
मला एकदम कांही दिवसापुर्वी रेल्वेमार्गावर प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या जमा करणाराची आठवण आली. " मी तुला दहा रुपये देतो. पण त्यासाठी तुला एक काम करावे लागेल." तो एकदम तयार झाला. काम धंद्याच्या शोधांत होता. काम मिळत नव्हते. हतबल झालेला वाटला. परक्या ठिकाणी असल्याची जाणीव होती. " चल मज बरोबर. मी तुला एक काम देतो." तो मज बरोबर येऊ लागला. जवळच असलेल्या रेल्वेस्टेशनच्या परिसरांत आम्ही आलो. मज जवळ सामान आणण्यासाठी कांही पिशव्या होत्या. त्यातील एक मोठी पिशवी मी त्याला दिली.
मला रेल्वेमार्गांत कांही रिकाम्या प्लास्टीकच्या बाटल्या दिसल्या. त्याला त्या जमा करण्यास सांगीतले. ह्याच प्रमाणे सभोवतालच्या परिसरातील पडलेल्या रिकाम्या बाटल्या गोळा करुन आणण्यास सांगितले. मी तेथे एका दगडावर बसून त्याच्या हालचालीकडे बघत होतो. त्याला हे अपरिचित असावे असे वाटले. पण आपणास दहा रुपये मीळणार ह्या आशेने तो त्या बाटल्या जमा करु लागला. अर्धापाऊण तासाने तो परत आला. त्याने जमा केलेल्या बाटल्या घेऊन आम्ही जवळच असलेल्या भंगारच्या दुकानांत गेलो. एकूण ५६ बाटल्या जमा केल्या गेल्या होत्या. दुकानदाराने त्याचे ५० रुपये दिले. मी ते पैसे त्या वेळी त्याच्या हातीं ठेवले. दहा रुपयांची अपेक्षा मनी बाळगुन असलेल्या त्या माणसाला, हाती पन्नास रुपये मिळतांच त्याचे डोळे भरुन आलेले जाणवले.
खरा आनंद त्याला झाला होता, ते एवढे पैसे मिळाले म्हणून नव्हे. तर असे पैसे कसे कमवावे ह्याचे अत्यंत साधे मार्गदर्शन मिळाले ह्याबद्दल. परिस्थितीने तो गांजला होता. सामाजीक घडी त्याला उदरनिर्वाह करण्यास अक्षम झाली होती.
खाण्यासाठी त्याला इतरासमोर हात पसरण्याची वेळ आली होती. अचानक भाकरीसाठी अर्थात जगण्यासाठीचा एक मार्ग त्याला मिळाला. त्याच्या आशा पुलकित झाल्या होत्या. मला अभिवादन करीत तो निघून गेला.
-- डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
एक ज्येष्ठ नागरिक सकाळींच माझ्या घरी आले. मी त्यांचे स्वागत केले. त्यानी आपल्या पिशवीतून एक लहान कुंडी व रोपन केलेले तुळशीचे …..
शहापूर जिल्हा ठाणे. शासकिय ग्रामीण रुग्णातयांत वैद्यकीय अधिकारी असतानाचा प्रसंग. शवविच्छेदनासाठी एका पन्नाशीतील व्यक्तीचा मृतदेह आणला होता. पोलीस पंचनामा रिपोर्ट वाचला. त्या प्रमाणे घटनेचा तपशील अंतर्मुख करायला लावणारा खचितच असा होता.
भास्कर बहिर व त्याचा मित्र सुनील जाधव दोघेजण बागेतील एका बाकड्यावर बसले होते. मंद मंद वारे वाहत होते. भास्करला आळस आला होता. आळेपिळे देत शरिराला शिथील करण्यासाठी त्याने तोंड उघडून वर बघत जांभई दिली. अचानक त्याचक्षणी हवेमुळे उडत आलेली एक छोटी वस्तू त्याच्या तोंडात शिरली. बघता बघता ती गिळले जाऊन घशांत शिरली. त्याने भास्कराला श्वास घेणे कठीण करून टाकले. भास्करची तगमग झाली. खोकून ओकून ते काढण्याचा प्रयत्न झाला. तोंडात बोटे घालून ते काढणे व श्वास मोकळा करणे याची घडपड केली गेली. कांही मिनीटे तडफड झाली. सुनील जाधव भास्कराला त्याच्या श्वासोच्छास करण्यासाठी आपल्यापरी मदत करु लागला. जवळचे इतरही जमले होते. कुणी वारा घाल, कुणी त्याची छाती दाबून कृत्रिम श्वासोच्छास करण्यास मदत कर, हवा घाल, तोंडावर पाणी मार हे झाले. एकाने तर कांदा आणून फोडून नाकाला लावला. परंतु सारे सारे प्रयत्न व्यर्थ गेले. कांही हलचाली वा रुग्णालयीन मदत मिळण्यापूर्वीच , एक सशक्त आणि निरोगी भास्करचा,केवळ थोड्याश्या मिनीटांत अंत झाला.
खूप बारकाईने शवविच्छेदन ( Post Mortem ) केले गेले. विच्छेदनांत त्याच्या शवनलिकेच्या सुरवातीच्या तोंडावर, स्वरयंत्राजवळ Near the Vocal Cord एक झाडाचे छोटेसे पान दबून बसलेले सापडले. त्याला व्यवस्थीत काढून बाटली मधील फॉर्म्यालीनमध्ये (Formalin) सीलबंद केले.
एका मृत्युला कारणीभूत होणारे ते पान होते. मी बारकाईने त्या पानाचे निरीक्षण करु लागलो.
माझ्या डोळ्याना दिसले नाही. परंतु निश्चीत भासले की त्या पानांत काळपुरुष लपून बसला होता. वेळेची त्याला चाहूल लागतांच त्याने अलगदपणे झडप घातली.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
बास्केट बॉलच्या मैदानावर कुणीही नव्हते. सिमेंटचे साफ प्रशस्त मैदान, सर्व बाजूनी गवताची हिरवळ. नुकतेच पाण्याचे फवारे मारल्यामुळे टवटवीत वाटत होते. मी त्या मैदानावर शतपावली करीत होतो. गवताच्या कडेपासून सिमेंटच्या भागांत एक लांब आळी चालली होती. गवतापासून ती बरेच अंतर दूर गेली होती. त्या सिमेंटच्या भागांत तिला कांही खाण्यासारखे असेल असे वाटत नव्हते. तीच्या चालीप्रमाणे पलिकडचा गवताचा भाग बराच दुर अंतरावर दिसला. मी विचार करु लागतो. अन्न शोधण्याच्या प्रयत्न्यात ती आळी मार्ग भटकली असेल. तीला मदत करावी म्हणून एका काडीवर उचलले, व गवताच्या भागापर्यंत घेऊन चाललो.
मनाचाच आवाज ऐकू येऊ लागला.” काय करीत आहेस तू ? तू त्या आळीला मदत करतोस कां तीच्या दैनंदिन जीवनांत बाधा आणतोस ?” मानवाला बुद्धी दिलेली असल्यामुळे तो अन्नाच्या शोघार्थ दाही दिशा भटकत असतो. अन्न कोठे असेल ह्याचे ज्ञान त्याला केव्हांच येवू शकत नाही. अन्न दिसणे, चव घेणे, आणि नंतर समजणे की हे अन्न आहे. ह्या जाणिवांच्या प्रक्रियेतून त्याला जावे लागते. त्या आळ्याना वा किड्याना मेंदू वा बुद्धी अतीशय कमी असते. दुर अंतरावरील असलेले त्यांचे भक्ष ह्याची केवळ वासाने, गंधाच्या लहरीने त्याना जाणीव होत असते. हे इंद्रिय ज्ञान इतके तिव्र वा तिक्ष्ण असते की ते त्या भक्षाचा मागोवा बऱ्याच अंतरावरुन करतात. त्यांचा भक्ष हेरण्याचा मार्ग केव्हांच चुकत नसतो. खरे तर भक्ष कित्येक वेळा सजीव असेल, तर तेही सतत हालचाल करुन जागा बदलत असते. तरी देखील शिकारी भक्षासाठी मार्ग चुकत नसतात. तिक्ष्ण श्वास इंद्रिये व भक्षाचा मागोवा हे निसर्गाने त्याना बहाल केलेली प्रेरणा असते. माणसासारखी त्यांत भटकंती नसते.
कोपऱ्यात गुळाचा खडा ठेवा, थोड्याच वेळांत अनेक मुंगळे वेगवेगळ्या दिशेने त्या गुळाच्या खड्याभोवती जमतात. मधाचा एक थेंब वेगळाच गंध पसरवितो. ज्यामुळे अनेक माश्या उडत त्याच्या जवळ जमा होतात. कोठेतरी पडलेल्या मृत प्राण्या भवती असंख्य किडे आळ्या अशाच पद्धतीने जमा होतात. ते त्यांचे भक्ष असते.
मी माझ्या समजुतीप्रमाणे, त्या आळीच्या दैनंदिनीत बाधा आणत होतो. मी चटकन निर्णय बदलला. ज्या जागेवरुन त्या आळीला उचलले होते, तेथेच नेऊन ठेवले. त्या आळीला तीच्या भक्षाचे व दिशांचे स्वातंत्र्य देत मी घरी परतलो.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
परमेश्वराचे स्वरूप कसे असेल, त्याचा शोध आणि बोध ह्या विश्वात मानव अर्थात तथाकथीत बुध्दीवान प्राण्याचे अस्तित्व आले आणि तेव्हा पासून चालू आहे. अनेक तर्कवितर्क, धार्मिक मतमतांतरे निर्माण झाली. प्रत्येक विचारधारा आपापल्याशी वर्णन करत आहे. श्री. भगवद् गीतेमध्ये ईश्वराविषयी जे वर्णन श्री. कृष्णानी केले आहे ते सर्व हिंदू मानतात. तो एक शास्त्रीय दृष्टीकोन असल्यामुळे सर्वत्र मान्यता पावू लागला आहे. एक सत्य (ONE REALITY) हे सर्वोच्च कारण बनले आहे. यातूनच ह्या विश्वाची निर्मिती झालेली आहे. ही सर्वोच्च जाणीव (Supreme coneiousness) विश्वभर पसरलेली आहे. ही जाणीव हा चैतन्याचा भाग आहे. प्रत्येक निर्मित सजीव वा पदार्थांत सुक्ष्म वा स्थुल भागात एक सत्य जाणीव म्हणून तो सर्वत्र असतो. (Real conciousness)
एक मोठा हार बघा. अनेक फुले, विविध रंगाची, आकारांची, सुवासांची सारी एका दोऱ्याने गुंफून त्याचा हार बनला. सर्वांचा वेगळेपणा कायम ठेवून एकत्र बंदीस्त केले आहे त्या एका दोऱ्याने. हा बाहेरून दिसत नाही परंतू असतो, ते एक सत्य. विश्वामधील सर्व प्रकारच्या पदार्थाना, सजीवांना ह्याच प्रकारे त्या सत्य जाणीवेने भारून टाकलेले आहे. हारातील दोरा निराळा (सर्व गुण धर्माने) व त्यांनी बांधलेली फूले ही देखील निराळी होत. परंतू दोऱ्यामुळेच हाराचे अस्तीत्व दिसते. प्रत्येक सजीव व्यक्तीत देह-मन-बुध्दी ही कार्यांनी स्वतंत्र्य असली तरी त्याच सत्य जाणीवेने चैतन्यमय असते. देह व त्याचे कार्य वेगळे. त्याला मिळणारी उर्जा वेगळी. देह स्वत:च्या गुणधर्मानुसार जीवनचक्राचे कार्य करतो. सत्य जाणीव फक्त उर्जा असते. उर्जेमुळे कार्य होणे निराळे परंतू त्या कार्याच्या गुण-रूपांत, परिणांमात त्या सत्य जाणीवेचा (उर्जेचा) सहभाग नसतो.
जगातील प्रत्येक निर्मित पदार्थाचे वा जीवांचे निरनिराळे गुणधर्म असतात. त्याला अस्तित्वाचा गुणधर्म म्हणतात (Low of being) किंवा त्या वस्तूचा धर्म म्हणतात. ज्याच्यामुळे त्या पदार्थाची ओळख निर्माण होते. ह्यालाच ईश्वरी गुणधर्म, नैसर्गिक गुणधर्म संबोधले गेले आहे. उदा. सूर्य-चंद्रातील प्रकाश, अग्नीमधील दाहकता, पाण्यातील द्रवता, फुलातील सुगंधता, फळातील मधुरता, आकाशातील भव्यता, धबधब्यातील प्रचंडता, पुरुषातील पुरुषत्व, स्त्रीमधील मातृत्व इत्यादी सर्व काही ईश्वरमयच असते. कोणत्याही वस्तूमधील वस्तूओळख हीच परमेश्वराची ओळख समजली गेली आहे.
म्हणून त्याच्या विषयी म्हटले की,
रंग, गंध, रस, स्पर्शात, तुझ्या अस्तित्वाची जाण,
तू लपलास गुणांत, तुला शोधणे कठीण
त्याचे अस्तित्व कोठे तर संपूर्ण विश्वांत, जगांत सूक्ष्मातून व स्थूलांत देखील. ‘जे पिंडी तेच ब्रम्हांडी’.अतिशय सूक्ष्म असलेला बीजाचाच प्रचंड वृक्ष होतो. जे गुणधर्म संपूर्ण वृक्षात दिसून येतात तेच सूक्ष्मतेने त्या बीजात सुप्तावस्थेत असलेले जाणवले. जीवंत प्राण्याचे संपूर्ण गुणधर्म हे सुक्ष्मरीतीने त्याच्याच देह्यातल्या सेल्स वा पेशीत आढळून येतात. सेल्स देहाची प्रतिकृती म्हणून अथवा बीज झाडाची प्रतीकृती म्हणून अस्तित्वात असतात. परमेश्वरी गुणधर्म म्हणतात ते ह्यालाच. अणूमधील प्रचंड उर्जाशक्ती हे परमेश्वराचेच स्वरूप आहे.
जीवनाच्या चाकोरीमधले कित्येक प्रसंग असे येत जातात की जेव्हां त्या निसर्गाच्या भवव्यतेचे, दिव्यतेचे स्वरूप आम्हास जाणवते. आम्ही आनंदी, उल्हासीत होतो. काही क्षण तर आम्ही आम्हाला व सभोवतालच्या जगाला पूर्ण विसरून जातो. रिम-झिम पडणाऱ्या पावसांत दिसणारे नयन मनोहर इंद्रधनुष्य, गारांचा पडणाऱ्या पावसात गारा जमा करताना आनंद, प्रचंड पडणाऱ्या धबधब्याचा लयबध्द आवाज, जमीनीवर वेगाने पडणाऱ्या पाण्याचे उडणारे तुषार , समुद्रकिनारी सुर्यास्ताचे देखावे, समुद्राच्या खडकाळ किनारी आदळणाऱ्या पाण्याच्या लाटा, कोकीळेच्या मधूर ताना, मोराचे पसारा फुलवित थुई-थुई नाचणे, फुलांच्या ताटव्यात उमललेली रंगीबेरंगी फुले, जंगलामध्ये स्वैर बागडणारे वन्य प्राणी, उंच पर्वताच्या रांगा, नदीचे संथ वाहणे, सूर्य किरणांमुळे सोनेरी छटा प्राप्त झालेले निरनिराळ्या आकाराचे चमकणारे ढग. एक नाही अनेक-अनेक प्रसंग तुम्ही त्या अप्रतीम निसर्गाच्या अविष्कारामध्ये आनंदाने एकरूप होतात. विचार करा, कसले हे निसर्गाचं दिव्य स्वरूप. हेच तर तुम्हाला मिळालेले परमेश्वराचे दर्शन नव्हे काय? ह्यालाच (Reality of Consciousness) वा सत्याची जाणीव म्हणतात. तसे बघीतले तर आपणास प्रासंगीक वाटणारी नैसर्गीक भव्यता ही सर्व ठीकाणी आणि सदैव असते. फक्त आपल्या दृष्टीची जागृतता असावी.
2 बाह्य जगात नैसर्गिक प्रत्येक वस्तूमध्ये शोध घेतला तर तेथेच त्या महान शक्तीची वा परमेश्वराची जाणीव होते. तशीच देहांत वा अतंरमनात देखील ती होते. अनेक विद्वान व्यक्तीने केलेले भाष्य, त्यांचे सुविचार आपल्याला खूप आवडतात. पुष्कळ वेळा प्रत्येकाला अनेक चांगले विचार सुचतात. असे सुविचार आपल्याला खूप आवडतात. त्याचे आश्चर्य व समाधानही वाटते. आपण एवढे ज्ञानी नसून इतके चांगले विचार आपणास कसे सुचले, त्याचे देखील आश्चर्य वाटते. केव्हा कुणाला एखादे काव्य सुचते, त्यात चांगला आशय असतो. कुणी अचानक कथा लिहू लागतो, प्रवास वर्णने करू लागतो, त्याला विचार सुचू लागतात, तो त्याची ज्ञान मर्यादा नसतानाही लेखन करू लागतो. कुणी वाचण्यात रूची घेऊ लागतो. कुणी हाती कुंचली घेवून निरनिरीळे चित्र रंगवितो. त्याला चित्रकलेत आनंद निर्माण होतो. कुणी सुर-ताल-नाद ह्याकडे आपले मन गुंतवितो. मधुर-लयबध्द तान मारताना तो स्वत:ला विसरून जातो. विणकाम असो भरतकाम असो शिवणकाम असो की हस्तकला अथवा इतर कोणतीही कला असो व्यक्ती आपापल्या रूचीनुसार त्यामध्ये स्वत:ला गुंतवून घेतो. ह्या सर्व कला आविष्कारातच त्या परमेश्वराचे अस्तित्व दडलेले असते. नव्हे तेच परमेश्वराचे अंग असून तशी आपल्याला केव्हां केव्हां जाणीव देखील होते. प्रत्येकजण करणारा व्यवसाय म्हणजे काय? प्रथम ज्ञानाच्या सागरातूनच त्यानी त्या संबधीचे ज्ञान घेतलेले असते. व्यवहार म्हणून जीवन चक्र म्हणून ती व्यक्ती त्यात व्यस्त होते.. ह्यात आनंद, समाधान मिळवताना ईश्वरी आविष्काराची जाणीव येवू लागते.
हे सर्व ईश्वरमय आहे हे प्रत्येकजण समजतो. परंतु तरी देखील त्या परमेश्वराच्या दर्शनाची आशा बाळगुन असतो. “तुझे आहे तुजपाशी परी तू जागा विसरलाशी” म्हणतात ते हेच नव्हे का? परमेश्वर अनंत, अविनाशी , सर्वत्र अणूरेणूमध्ये आहे. तो फक्त शक्तीस्वरूप आहे. आपल्या चंचल मनाला, विचाराला त्याच्याशी एकरूप करण्यासाठी सगुण स्वरुपाची संकल्पना असते. दुर्दैवाने प्रत्येकजण फक्त त्या सगुण कल्पीलेल्या आकारातच त्याची दिव्यता जाणवू इच्छितो. स्वत:च्या आशा अपेक्षा पूर्ण करण्याची इच्छा बाळगतो. हेच त्याला अपूर्णते मध्येच ठेवणारे असेल. खरा आनंद, समाधान आणि शांतता ह्या पासून तो वंचित राहील. हे सारे विसरून म्हणजे मी हे जे बघतो, विचार करतो, कल्पना बाळगतो, ह्याला बाजूस सारावे लागेल. फक्त जगात आणि देहाच्या आत जो परमेश्वरी आविष्कार म्हणून अनुभवतो (Reality of Conseiousness) हाच तर परमेश्वर आहे. न मागणे, न घेणे, न देणे,फक्त अनुभवणे. जर मीच परमेश्वर असेल तर कोणत्या परमेश्वराकडे मी जावू?
त्या परमेश्वराचे स्वरूप कसे असेल ? हा सर्वसाधारण विचार येत होता. वाचन,मनन आणि चिंतन करीत गेलो. ध्यान धारणेत लक्ष दिले. जो अनुभव मिळाला, जे ज्ञान मिळाले त्याने सर्व प्रश्न तर सुटले नाहीत, परंतु बरेचसे समाधान- आनंद-व शांतता मिळाली.
परमेश्वर अनंत, अविनाशी, संपूर्ण आणि सर्वत्र चराचरामध्ये पसरलेला आहे. त्याचे हे वर्णन सर्वांनी एकमुखाने मानले आहे. त्याचे स्वरूप आकाराने वर्णन केलेले नाही. तो निराकार निर्गुण आहे. जे सगुण रूप वर्णन केले ते केवळ मनाच्या केंद्रीत होण्यासाठीचे लक्ष्य म्हणून. प्रचंड चंचल असलेल्या मनाला एका बिंदूत, ध्येयात वा लक्ष्यात स्थीर करण्यासाठी.
कोणताही पदार्थ सूक्ष्म वा स्थूल स्वरूपात त्याच्यामध्ये असलेल्या सुप्त अशा शक्तीसह (उर्जा) असतो. पदार्थ व त्यातील उर्जा हे एकरूप असतात. अवलंबून असतात आणि तरीही स्वतंत्र कार्य व अस्तित्वात असतात. घरामध्ये अनेक उपकरणे जसे दिवे, पंखे, हिटर, मॅक्रोवेव्ह, फ्रिज, ए.सी. टि.व्ही इत्यादी असतात. प्रत्येकाचे कार्य निराळे, परिणाम निराळा. परंतु सर्वांचे कार्य चालते ते त्याच्यातून जाणाऱ्या विजेमुळे. विज ही उर्जाशक्ती आहे. विजेला तीच्या अस्तित्वासाठी पदार्थ अर्थात माध्यम लागते. विज आणि पदार्थ हे एकमेकास पुरक असतात. विज उपकरणांना फक्त शक्ती देते. उपकरणांनी कोणते कार्य करावयाचे हे त्यांचे गुणधर्म होत. जसे हवा, थंडी, गरमी, उजेड, छाया इत्यादी कोणी कोणते कार्य करावे हे त्या कार्याची असलेली शक्ती (उर्जा) ठरवित नसते. परंतु कार्यकारण्यासाठी ती लागते हे सत्य.
मानवी देहांची अशीच संकल्पना आहे. अनेक उपकरणांप्रमाणेच देहांमध्येहही अनेक इंद्रिये आहेत. अवयवे आहेत. प्रत्येकाचे कार्य निराळे, परिणाम निराळा. उपकरणांच्या कार्यासाठी जशी विज वा शक्ती लागते. त्याचप्रमाणे देहाच्या इंद्रियाच्या कार्यासाठी देखील शक्ती (उर्जा) लागते. हीला जीव वा जीवातत्मा म्हटले गेले आहे. स्वतंत्र असून देखील दोन्ही देह आणि जीव हे निराळे. त्यांचे अस्तित्व एकमेकांच्या विना असू शकत नाही.
देह आहे तर जीव व जीवासाठी देह समजले जाते. तरीदेखील जीव वा जीवात्मा हा फक्त शक्ती, उर्जा, चैतन्य
3 शरीराला देतो. शरीरांनी कोणते कार्य करावयाचे त्याची योजना व परिणाम ह्यासाठी शरीर स्वतंत्र असते. जीवाचा शरीराच्या कार्याशी तसा संबध नसतो.
प्रत्येक मानवाला निसर्गाने जन्मत: अनेक इंद्रिये दिलेली आहेत. ती आपल्यापरी कार्यारत असतात. उदा. मेंदू. एक प्रमुख इंद्रिय. सर्व शरीरावर त्याचा ताबा असतो. मन, बुध्दी हे भाग मेंदूमध्येच. शारीरिक कार्य (physical activities) आणि मानसिक कार्य (psychological activities) ह्यावरचे संपूर्म नियंत्रण मेंदूमार्फतच होत असते. वासना (Desire ) आणि आसक्ती (Attachment)अर्थात दोन्ही एकच म्हणून (synonymous). हे गुणधर्म निसर्गानेच उत्पन्न केलेले आहेत. देहाला ज्या गोष्टीची ओढ ह्याला वासना ( Desire )म्हणतात व देहानी अंतरंगात अनुभवलेल्या गोष्टीची ओढ ह्याला (Attachment) आसक्ती म्हणतात. दोन्हीही गोष्टीचा संबंध मन-बुध्दी अर्थात त्या देहाच्या मेंदू ह्या प्रमुख अवयवाशी येतो. अतंरंग आणि बाह्यरंग ह्यात उत्पन्न होणाऱ्या चेतना मेंदू हा संपर्कात येताच ग्रहण करतो व त्याची साठवणूक करतो. ह्यालाच आम्ही विचारांच्या आठवणी म्हणतो.
कंप्युटरला ज्याप्रमाणे फीड केले जाते त्याप्रमाणे तो सर्व विचारांची फोल्डर वा फाईलमध्ये साठवणूक करतो. कंप्युटरचे कार्य चालण्यास प्रमुख मदत असते ती विजेची. कंप्युटर काय व कसे साठवणूक करतो, कसे कार्य करतो ह्याच्याशी विजेचा संबंध नसतो. देहसुध्दा वासना (वा आसक्ती) ह्यांच्यामुळे उत्पन्न होणाऱ्या विचारधारे प्रमाणे मेंदुमार्फत कार्य करतो. देहाच्या वा त्यातील इंद्रियाच्या गरजेनुसार वासना उत्पन्न होतात. परंतु मेंदु (अर्थात बुध्दी) ह्या वासनांचे विश्लेषन करून योग्य वा अयोग्य परिणामांचा विचार केला जातो. नंतर इंद्रियामार्फत ते कार्य होते. वासना-आसक्ती हे जरी नैसर्गीक गुणधर्म असले तरी त्याच्या उत्पन्नाचे परिणामाचे मार्गदर्शन बुध्दी अर्थात मेंदू करतो. निसर्गाचे वरदान व योजना आहे की कुणी काय करावे. तुमचा अनुभव, बुध्दी अर्थात conscionsness जागृतता यांत तुमची साथ देते आणि यालाच कार्य म्हणतात. त्यामुळे कर्माचे स्वरूप हा सर्वस्वी बुध्दी वा मेंदूचा अधिकार असतो. जीवात्मा देहाला उर्जा देतो, शक्ती देतो. ज्यामुळे देह कार्य करू शकतो. तो त्या कार्याच्या स्वरूपात व नंतर होणाऱ्या परिणामात (कार्यफळ) संबधीत नसतो. निसर्गाने देहाला त्याच्या इंद्रियाना आंतरबाह्य अनुभव घेणे व कार्य करणे ह्याचे परिपूर्ण स्वातंत्र्य दिलेले आहे.
जीव (जीवात्मा) ज्याला उर्जा म्हणतात तीच त्या परमेश्वराचे अंशात्मक स्वरूप आहे. सर्व विश्व, जगत हे त्याचे भव्य दिव्य स्वरुप आहे. त्याची अंशात्मक अस्थित्वाची जाणीव चराचरामध्ये पसरलेली अनुभवते. कम्पुटरवर काम करताना एक अनुभव आला, ५० फोल्डर्स स्क्रिनवर वेगवेगळे डिस्ल्पे झालेले होते. प्रत्येकाला ऍक्टीव्हेट करून सिलेक्ट केले गेले. प्रत्येक स्वतंत्र्य व वेगळ्याप्रमाणे ऍक्टीव्हेट झाला. कोपऱ्यात एक नवीन एम्टी फोल्डर तयार केलेले होते. त्या ५० फोल्डर्सपैंकी एकाला हलविताच सर्व फोल्डर्स एकमेकांशी बांधले गेलेले जाणवले. एकाला ड्र्याग करून Empty फोल्डरमध्ये टाकताच, सर्व ५० फोल्डर्स त्या नव्या फोल्डरमध्ये टाकले गेले. अशाच प्रकारे सर्व देहांचे जीवात्मे त्या परमात्म्याशी बांधले गेलेले असतात. किंवा परमात्म्याच्या विश्वात पसरलेल्या उर्जारूपी शक्तीमध्येच सर्व पदार्थ सजीव वा निर्जीव वास करतात. सर्व काही एक हेच ते परमेश्वरांचे स्वरूप नव्हे काय? इथे बघणे, जाणणे नव्हे तर फक्त अनुभवने हेच महत्त्वाचे. मला मीच अनुभवने म्हणजेच ते परमेश्वराचे दर्शन होय.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
वेळेच्या चक्राचा विचार करता कळते, की वेळ ही तीन भागांत वाटली गेली आहे. भविष्य भूत आणि वर्तमान ह्या संकल्पनात. भविष्य हा येणारा काळ. तो अनिश्चीत असतो. म्हणून असत्यात जमा होतो. भूतकाळ हा गेलेला, आता हाती न लागणारा. म्हणून अनिश्चीत होय. त्यालाही असत्य समजले गेले. वर्तमान काळ फक्त निश्चीत, अस्तित्वाची जाणीव देणारा, म्हणून सत्य समजला जातो.
वर्तमान काळाला वेळेत मोजता येते कां? वर्ष, महीना, आठवडा, दिवस, तास, मिनीटे, सेकंद, वा सुक्ष्म असे मायक्रो सेकंद यांत. नाही. कोणत्याही वेळेच्या परिमाणांत नाही. भविष्य येतो, वर्तमानाच्या सीमारेषा छलांग मारीत भूत काळांत जातो. फक्त वर्तमान काळाला सत्य समजले, परंतु त्याला वेळ नसते. त्य़ाचे म्हणजे वर्तमानाचे अस्तित्व असते. परंतु वेळेच्या बंधनात नाही. ज्याला म्हणतात एक सत्य- वेळ रहीत अस्तित्व. It is called Satya ( सत्य ) , The Timeless Reality. दुसऱ्या शब्दांत That Presence is Satya ( सत्य ) – Darshana ( दर्शन ). वेळेच्या बंधनात नसलेल्या काळाचे अस्तित्व.
जर वर्तमान काळ सत्य असून देखील वेळ रहीत होतो, तर त्याच तत्वाने भविष्य काळ, भूतकाळ आणि वर्तमान काळाचे अस्तित्व वेळेच्या बंधनात रहात नसते. दुसऱ्या शब्दांत अस्तित्वाला वेळेच्या मर्यादा नसतात. अस्तित्व हे वेळ रहीत असते. सदैव असते. काल होते, आज आहे, आणि उद्याही असेल. सदा सर्व वेळी, वेळ बंधन रहीत. वर्तमान म्हणजे अस्तित्वाच्या बाबतीत वेळेची संकल्पना फोल ठरते. काल (Past) आज (Present) आणि उद्या ( Future ) ह्या आस्तित्वाच्या कल्पनेनुसार वेळ ही विचारसरणी चुक ठरते. म्हणजे अस्तित्वाच्या विश्लेषणामध्ये वेळ नसते. There is no such thing as time म्हटले आहे.
परंतु वेळेची संकल्पना देह मनाचा विचार करता असते. कारण भूत, भविष्य, आणि वर्तमान काळ देहमनासाठी असतो. म्हणजे त्याना वेळेचे बंधन असते. आम्ही जर असूत तरच वेळेचा (Time) आणि जागेचा (Space )प्रश्न असतो. परंतु त्या अस्तित्वाला काळाचे, वेळेचे वा जागेचे बंधन नसते. जेव्हां मीची ओळख देह मन बुद्धी अहंकार इत्यादीनी केली जाते, तेव्हां माझे वेळ (Time ), जागा (Space)मध्ये अस्तित्व असते. परंतु जेव्हां जीवाला Reality consciousness सत्य जाणीव म्हणून बोलले जाते. तेव्हां ते वेळ (Time) व जागा (Space) ह्याच्या मर्यादेबाहेर जाते. ते Timeless and Space less असते. अर्थात नेहमी व सर्वत्र असते.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
आषाढी एकादशी. पंढरपूरची एक भव्य दिव्य यात्रा. पावसाळ्याची सुरवात. कदाचित् त्यावेळी मुसळघार पाऊस पडण्याची शक्यता असते. त्या वातावरणांत दिवस काढण्याची, राहण्याची अत्यंत गैरसोय, सर्वत्र ओलावा असतो. कॉलरा हगवण ह्या रोगांच्या फैलावाची भिती. सर्व कांही भयावह आणि निराशजनक परिस्थिती. तरी देखील ह्या सर्व बाबिना तोंड देत, प्रचंड जनसागर कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता पंढरपूरला जमा होतो. केवळ त्या विठोबाचे दर्शन घेण्यासाठी.
काय मिळते त्याना शरीराला एवढे कष्ट देवून ?. आणि कित्येक भक्तगण असे आहेत की जे त्या पंढरपूरची वारी दर वर्षी न चुकता करतात. हे केवळ मानसिक समाघान आहे कां ? कां ह्याला अंधश्रद्धा म्हणतां येईल ? विठोबा कोण ?, परमेश्वर कोण ? भक्ती म्हणजे काय ?, कशाने काय प्राप्त होते ?, असे एक नाही असंख्य प्रश्न आज तागायत अनुत्तरीत राहीलेले आहेत. ज्याला जसे ज्ञान प्राप्त झाले, जसे वातावरण मिळाले, त्या परिस्थितीप्रमाणे तो प्रश्नांची उकल करीत गेला. अनेक विचार, परंतु एक वाक्यता केंव्हांच झाली नाही. विज्ञानाच्या शोध बुद्धिने इंद्रियांना जे कळले, काहींनी त्याला महत्व दिले. कल्पनेच्या विचारांच्या झेपेमुळे सत्य काय असू शकेल. त्या अज्ञात शक्तींच्या अस्तित्वाला कांहीनी महत्व दिले. गम्मत म्हणजे ज्याचा शोध घेणे, ह्यात प्रगती करण्यापेक्षा, तथाकथीत विचरवंतच आपसांत संघर्ष करताना दिसतात.
माझ्या समोर आज तरी एक प्रश्न आला. जो मी वर व्यक्त केला. कां इतक्या प्रचंड संखेने लोक पंढरपूरला यात्रेसाठी जमा होतात ? पंढरपूरलाच नव्हे तर कोणत्याही घार्मिक स्थळ यात्रेला, कुंभमेळाला लोक भक्तीभावाने जमतात. पन्नास, शंभर लोक संख्या असेल तर कदाचित अंधश्रद्धा हे नाव देवून स्वतःचे भावनिक सांतवन केलेही असते. परंतु जेंव्हा संख्या लाखोच्या घरांत जाते, तेंव्हा आश्चर्य व कौतूक पण वाटू लागते. कित्येक उच्च शिक्षित, वैज्ञानिक दृष्टीकोण बाळगणारे, विद्वान मंडळी यामध्ये सहभागी होताना दिसतात. कांही तरी या मध्ये सत्य असेल, प्रेरणा असेल, जी इतक्या समुदायाला खेचून घेते.
पुंडलीक आणि विठ्ठोबाची जी घटना घडली, त्याचा मी गांभिर्याने विचार करु लागलो. निसर्गाचा सहभाग आणि मानवी योजना ह्यांत काय असतील ह्याची उकल करण्याचा प्रयत्न केला. सारे कांही घडत असते ते निसर्गाच्या नियमाना धरुनच.
निसर्गाच्या तीन गुणधर्म वा नियममांचा मी विचार केला.
१ निसर्ग सदा सर्वकाळ निश्चीत व सत्य स्वरुपांत असतो. ( Nature is always regular and definite )
२ निसर्गाचा मार्ग नेहमी चक्रमय ठरलेला असतो. म्हणूनच आपण जीवनाला जीवन चक्र म्हणतो. चक्र याचा अर्थ नैसर्गिक अविष्कार वा घटना घडतात, व त्याची पुनरावृत्ती होत राहते. जे घडले ते पुन्हा घडणे ही किमया ह्या निसर्ग चक्रामुळेच साधली जाते. ( Nature repeats itself )
3 अत्यंत महत्वाचा गुणधर्म निसर्गांत दिसून येतो, तो म्हणजे नैसर्गिक चमत्कार .
Miracle by Nature
काय अर्थ याचा ? केव्हां केव्हां निसर्ग- चाकोरीमध्ये अशी एखादी घटना घडते की त्याचा शोध बोध कदाचित् त्या झालेल्या क्षणी होत नसतो. सामान्यजन त्या घटनेला आश्चर्य समजतात. चमत्कार समजतात. दिव्यता भव्यता समजतात. परमेश्वराची अमर्याद शक्तीच हे करु शकते हे ठरवितात. थोडक्यांत चमत्कार आणि नमस्कार हे समिकरण जन्माला येवूं लागते. ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल निश्चीतता येवू लागते. इत्यादी इत्यादी. परंतु एक मात्र सत्य दिसून येते, ते म्हणजे निसर्ग एखाद्या घटनेमधून चमत्काराचे दर्शन घडवित असतो.
पौरानीक कथांचे ग्रंथ वाचताना भक्त पुंडलीकाची कथा वाचीत होतो. पुंडलीक एक महान व्यक्तीमत्व. एका प्रेरणेने भारुन गेलेले. आपल्या जन्मदात्या आई-वडीलाना आपल्या जीवनाचे सर्वस्व मानणारा. त्यांची सेवा हेच जीवनाचे ध्येय असल्याची जाणीव समजणारा. ईश्वरी अस्तीत्वाला देखील त्याने माता पित्याच्या समोर दुय्यम स्थान दिले होते. कित्येक वर्षे त्याची माता पिता सेवा चालू होती. जीवनातील सर्वस्व त्यागुन फक्त आईवडील सेवा हे वृत त्याने धारण केले होते. त्याचे हे श्रम व प्रेम एवढे महान होऊ तागले की ते ईश्वरी दरबारांत मान्यता प्राप्त होऊ लागले.
२
ईश्वर नेहमी चांगल्या गुणांची सदैव दखल घेत असतो. हा अध्यात्मिक इतिहास आहे. सती सावित्रीची पतीभक्ती व सेवा ह्यानी देखील ईश्वराला झुकावेंच लागले. पुंडलीकाने केवळ माता-पिता सेवा-भक्ती केली. हेच त्यांचे सामर्थ्य परमेश्वराच्या प्रसन्नतेत झाले.
पुंडलीकाची माता पिता सेवाभक्ती यानी प्रेरीत होऊन, परमेश्वराने त्याला श्री विठ्ठलाच्या रुपांत दर्शन देऊन धन्य केले. पुंडलीकाचे ह्रदय मन भरुन आले. त्याने सविनय नमस्कार केला.परंतु हाच त्याच्या भक्तीच्या कसोटीचा क्षण होता. ज्या क्षणी पांडूरंगाने पुंडलीकास दर्शन दिले, त्यावेळी पंढरपूर नजीक चंद्रभागेच्यातीरी, त्याचे आईवडील त्याच्या मांडीचा आसरा घेत झोपले होते. समोर उभा प्रत्यक्ष परमेश्वर श्री विठ्ठल आणि मांडीवर निद्रेत आईवडील. तो त्यांची झोप मोडू शकत नव्हता. शेवटी पुंडलीकाने विठ्ठलाला नमस्कार करीत, जवळ असलेली एक विट त्याच्या पुढ्यांत टाकली. त्याला त्यावर उभे राह्यण्याची विनंती केली. आईवडीलांची झोप चाळवली गेली. ते जागे झाले. त्याना ईश्वरी दर्शन होणे शक्यच नव्हते. कारण त्यांच्यात ते दिव्य सामर्थ्य नव्हते. त्यानी जाग येताच स्नानाला जाण्याची इच्छा व्यक्त केली. पुंडलीकाने त्यांना मान देवून, तो त्यांना चंद्रभागेतीरी घेऊन गेला. जाताना त्या परमात्म्याला श्री विठ्ठलाला विनंती केली की त्याने त्याच विटेवर उभे राहून पुंडलीक येण्याची वाट बघावी. तो आईवडीलांना स्नान घालून परत येईल. आजतागायत आठ्ठाविस युगे झालेली आहेत. श्री विठ्ठल आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून, त्याच महान आईबाप सेवक भक्ताची, पुंडलीकाची वाट बघत आहे. त्याच्या वाटेवर लागलेले विठ्ठलाचे डोळे आजही आम्ही बघून, ईश्वर दर्शनाचा आनंद लुटतो. लाखो लाखोच्या संखेने तेथे जमा होतो.
निसर्गाचे वर वर्णन केलेले तीन नियम आणि पुंडलीक-विठ्ठलाची पौरानिक कथा याची कांही सांगड असेल कां ? हा विचार डोकाऊ लागला. एक चमत्कार झाला. एक आश्चर्य सर्वानी बघीतले, जाणले, अनुभवले. ईश्वर स्वरुप तर बघण्याची भव्यता कुणातच असण्याची शक्यता नव्हती. ती फक्त पुंडलीकातच होती. तोच ते भव्य दिव्य बघू शकत होता. परंतु त्या वेळच्या, त्या सभोवतालच्या अनेकांना फक्त त्या ईश्वरी चमत्कारांची चाहूल लागली असेल. एक प्रकाश, एक शितल आल्हादकारक वातावरण, बेहोष करणारा दरवळणारा सुगंध, एक उत्साहाची चैतन्याची लाट, समाधान शांतता यांच्या लहरी, हे सर्व त्या ईश्वर आगमन प्रसंगी एक झलक, नितांत आनंद म्हणून झाले असेल. ज्याचे शब्दानी कुणालाही वर्णन करता येणार नाही. अशी वातावरण निर्मिती त्या क्षणी निर्माण झाली असावी. हा अनुभव कल्पनातीत व अप्रतीम असावा. पुंडलीकाने तो बघीतला, भोगला. इतरांनी कदाचित् त्यांचा संवाद, संपर्क, हाच एखादा नैसर्गिक चमत्कार वाटला असावा. जो की तो अनुभव इतर जन केंव्हाच विसरु शकणार नव्हते. क्षण शांत झाला, परंतु तो अनुभव कुणाच्याने सोडविना.
कालचक्राप्रमाणे वर्ष सरता, पुन्हा लोक त्याच ठिकाणी, त्याच वेळी जमा झाले. चाचपडत राहीले. शोध घेत राहीले. कारण जर तो आनंद चेतनामय चमत्कारी, विलक्षण अनुभवी क्षण नैसर्गिक असेल, तर निसर्ग चक्रानुसार तो पुन्हा बरसेल. पुन्हा मिळेल. ह्या आशेत. त्याच जागी त्याच वेळी जो पुंडलीकावर बरसला. तसा कदाचित् पुन्हा बरसेल. प्रत्येकजण त्या नितांत आनंदाचा Ecstasy of Joy चा एक साक्षिदार, भागीदार, होऊ इच्छितो. त्याच्या दयेचा एखादा शिंतोडा कदाचित् आपल्याही अंगावर पडेल ह्या अपेक्षेने. त्याच भावनेने लाखोंच्या संखेने जमतात. त्याच स्थळी म्हणजे पंढरपूरला त्याच वेळी म्हणजे आषाढी एकादशीला, ज्या काळी पुंडलिकाला विठ्ठोबानी दर्शन दिले असेल. सर्व भक्त शोध बोध घेत असतात.
निसर्गाच्या नियमित, चक्रमय, आणि पुनुरावृत्ती ह्या गुणधर्मच्या शोधांत. आम्ही सर्वजण तेथे जमतो. तो निश्चीत बरसेल आणि तो बरसतो देखील. जो तो आपले नशिब आजमावतो. कुणावर तो बरसला असेल हे समजण्यास आजतरी मार्ग वा साधन नाहीत. हेच त्या स्थळाचे ( पंढरपूर ) व वेळेचे ( आषाढी एकादशी ) महात्म्य असेल कां ? अशाच अनेक धार्मिक यात्रांच्या, कुंभमेळाच्या मागे दडलेली कारणमिमांसा व नैसर्गिक चक्ररचना कारणीभूत असू शकेल कां ?
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
एका थोर विचारवंताचे पुस्तक वाचत होतो. दया ह्या गुणधर्मावर त्यांचे भाष्य मनाचा ठाव घेणारे होते. सर्व प्राणीमात्र जीवजंतू झाडे झुडपे वृक्षलता इत्यादी. ज्यांच्यामध्ये जीवंतपणाचे लक्षण असते त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये दयाभाव खोलवर रुजला असतो. ह्य़ाच भावनेमधून प्रेम जिव्हाळा सख्य ह्यांचे अंकूरण होत असते. समाधान तेथेच मिळते.
अचानक एक प्रसंग डोळ्यासमोर आला. गावाकडे जात असतांना, आमची गाडी नादुरुस्त झाली. रस्त्याच्या एका झाडाखाली जवळ जवळ पांच तास थांबावे लागले. मेकँनिकलला जाऊन आणणे व गाडी पूर्वपदावर आणण्यास वेळ गेला.
एका झाडाखाली सतरंजी टाकून शांत बसलो होतो. माझे लक्ष जवळच असलेल्या एका मुंग्याच्या वारुळाकडे गेले. अनेक छिद्रे असलेले वारुळ होते. त्यातून बरय़ाच मुंग्यांची जा ये चालू होती. जवळ जवळ तीन फूटांच्या परिघामध्ये त्यांची वरदळ सारखी चालू असलेली जाणवली. मुंग्या सर्व दिशांनी फिरताना दिसत होत्या. कांही ग्रुप एका मागोमाग एक चालत होते. तर कांही निरनिराळ्या दिशांनी फिरत होते. मार्गांत आपआपसांत भेटणारय़ा मुंग्या क्षणभर थांबून, भेटून आपल्या मार्गावर पून्हा पूढे जाताना दिसत होत्या. कोणता संवाद त्या करीत असतील ते समजण्यास मार्ग नव्हता. परंतु ह्याची जाणीव होत होती की त्यांचे प्रमुख ध्येय व कार्य भक्ष शोधणे, व ते सर्वानी मिळून खाणे. कांही का असेना, परंतु त्यांची ही सर्व धावपळ दोन तासाहून जास्त काळ मी बघत होतो. त्यांचे दुर्दैव असे की त्याना भक्ष मात्र हाती लागल्याचे दिसले नाही.
माझी नजर एका लांबलचक आळीवर पडली. ती देखील त्याच वाटेने चालली होती. कदाचित् ती तीचे आपले भक्ष शोधीत असावे. एका जागेवर गवताच्या अडोशाला तीची हालचाल एकदम थांबलेली जाणवली. तेथे चार पांच मुंग्या होत्या. त्या मुंग्यानी तीला घेरले. तीच्या अवयवाच्या निरनिराळ्या भागास मुंग्यांनी गच्च धरलेले जाणवले. सर्व मुंग्या त्या अळीवर तुटून पडल्या. आळी बेचैन झाली. स्वतःला वाचविण्यासाठी तीच्या अवयवाच्या पायांच्या हालचाली वाढल्या. दोन्ही आघाडीवर द्वंद्व सुरु झाल्याचे दिसून येत होते. मुंग्यानी तीला भक्ष केले होते. आळी मात्र त्यावेळी आपला जीव वाचविण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र दिसत होते.
माहीत नाही, मुंग्यांची कोणती भाषा, कोणत्या हांका, कोणता गंध, तेथे पसरला जाऊन, अनेक मुंग्या वारुळातून त्यांच्या सहकारय़ाना मदत करण्यास येत असल्याचे दिसले. त्या आळीभक्षाच्या भोवती खूप संख्येने जमू लागल्या. सर्व एकत्रीत होऊन त्या तडफडणारय़ा आळीला खेचून वारुळाकडे नेण्याचा प्रयत्ल करीत होत्या. त्याचवेळी आपला जीव वाचविण्यासाठी त्या आळीकडून जबरदस्त हलचाली होत असल्याचे जाणवले. ती उलट सुलट होऊन मुंग्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसले. ह्या दोन्ही भक्ष व भक्षक यांच्या द्वंद्वात मुंग्याचे पारडे जड झाल्याचे जाणवले. ती आळी एक व ह्या मुंग्या प्रचंड संख्येने. हे मी सारे गंभीरतेने बघत होतो. माझ्या मनातील भूतदया जागी झाली. जो मृत्युच्या खाईत पडला त्याला वाचविणे, हा विचार मनात आला. ती आळी दयेस पात्र असल्याची जाणीव झाली.
त्या मुंग्या व ती आळी दोघांच्या संघर्षात एकाची भक्षासाठी धडपड तर दुसरा भक्ष होण्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रयत्नशील. हे चित्र दिसू लागले. मी चटकन उठलो. एक काडी घेऊन त्या आळीला सहज उचलले. त्या काडीचा स्पर्ष होताच, एखादे अनामीक संकट समजून सारय़ा मुंग्यांनी त्या आळीला सोडले व त्या मिळेल त्या दिशेने स्वतःचा जीव वाचवित सैरावैरा विखूरल्या गेल्या. मी त्या आळीला हलकेच थोड्याश्या अंतरावर, जवळपास कोणतीही मुंगी नाही, हे बघून सोडून दिले. त्या आळीचा जीव वाचविला असे समाधान व समज करीत पून्हा शांत बसलो.
कोणती भूमिका मी वठवली होती ह्या प्रसंगामध्ये ?.
एक नैसर्गिक ईश्वर रचित व निर्मीत जीवन चक्र चालू होते. माझ्या बुद्धीने, विचाराने व ऐकीव ज्ञानाने मी माझ्या विचारसरनीला मार्गदर्शन देत होतो. वारुळामधील अनेक मुंग्या त्यांच्या त्यांच्या जीवन चक्राला अनुसरुन एकत्र घर करुन रहात होत्या. भक्ष शोधण्यास बाहेर पडल्या होत्या. जगण्याचे प्रमुख साधन व गरज म्हणजे त्यांचे भक्ष. त्या सर्व दिशाने फिरुन ते मिळविण्याचा प्रयत्न करीत होत्या. जवळ जवळ दोन ते तीन तास त्यांच्या हाती कांही लागले नव्हते. हे मी बघीतले होते. हा काळ त्यांच्या आपल्या जीवनचक्रांत फार मोठा असू शकतो. त्यांच्या हाती कांहीच सापडले नव्हते. एक जीव सदा दुसरय़ा जीवावरच जगत असतो. हे तर निसर्गाचेच तत्व असते.
कुणी कस जगायच ? वा कसे मरायचे ? ह्या साठीची परिस्थिती निर्माण करण्याचे भाग्य वा दुर्भाग्य हे ज्याच्या त्याच्याच हाती ठेवलेले असते. त्यामुळे इतरानी त्याची खंत करण्याची वा त्यामध्ये दखल देण्याची मुळीच गरज नसते. ही ईश्वरी अपेक्षा असावी. परंतु बुद्धीप्राप्त, विचारविश्लेशन क्षमताप्राप्त मणूष्य प्रत्येक वेळी आपलेच सुत्र निर्माण करुन नैसर्गिक घडणारय़ा वा होऊ जात असलेल्या क्रियांमध्ये सहभागाचा विनाकारण ठेका दर्शवितो. माझी भूतदया, माझे प्राणी प्रेम हा त्यातलाच प्रकार तर नव्हे काय ? .
काय योग्य? व कोणते अयोग्य ? ह्याचाच विचर करीत मी बराच वेळ तेथेच बसलो. गाडी दुरुस्त होण्याची वाट बघत.
--डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
मेडिकल कॉलेजच्या आगदी सुरवातीचे दिवस आठवतात. १९६० सालचे. त्यावेळी M.B.B.S. पांच वर्षाचा कोर्स होता. पहिले दोन वर्षे प्राथमिक विषय ( Anatomy-Physiology ) व नंतरचे ३ वर्षे, क्लिनिकल विषय सर्जरी-मेडिसीन गायनिक इत्यादी. स्टेथॉसकोप प्रथमच गळ्यांत लटके. खऱ्या अर्थाने विद्यार्थ्याला आपण डॉक्टर होत असल्याचची जाणीव त्याक्षणीच होत असे.रोग, निदान, आणि उपाय ह्या मालिकांना आरंभ होत असे.
सर्जरी अर्थात शस्त्रक्रिया ह्या विषया बद्दल एक वेगळेच कुतूहल होते. डॉ. विक्रम मारवा हे सर्जरी ह्या विषयाचे प्राध्यापक होते. एक विषय तज्ञ व उत्कृष्ट शिक्षक देखील. त्यांची शिकवण्याची पद्धत वेगळीच होती. प्रश्न-उत्तरे यांची देवाण-घेवाण करीत ते शिकवायचे. समजण्यास सोपे, चांगले व पद्धतशीर. परंतु सामान्य विद्यार्थ्याला तसे नापसंत असे. विषयाची एकाग्रता, लक्ष लाऊन ऐकणे, तत्पर असणे, विषयाची समज झालेली असावी, थोडेसे प्राथमिक वाचन. ह्या अपेक्षा विद्यार्थ्यावर एक प्रकारचा मानसिक दबाव निर्माण करीत होत्या. लक्ष नसणे, अवांतर विचार, वहीपेन्सीलीचा चाळा, नसत्या गोष्टींचा विचार मनांत चालणे, नजर चुकवुन इतर वाचन, आणि केंव्हा केंव्हा तर चक्क डूलकी घेणे, ह्या प्रकाराला आपोआप आळा बसत असे. केंव्हा प्राध्यापक कुणाला उप प्रश्न विचारतील, व तो मुलगा कसा तोंडघाशी पडेल हे सांगता येत नसे.
सर्व मुले त्यामुळे नेहमी सतर्क (अलर्ट ) असत.
वर्गातल्या मुलांचे लहान लहान ग्रुप्स केले होते. आमचा ग्रुप १० विद्यार्थ्याचा. सर्जरी विषय, प्राध्यापक विक्रम मारवा यांच्याकडे. आज ऑपरेशन थियेटरचा १ लाच दिवस. थियेटरचा एक अँटेन्डन्ट होता. आम्ही सारे त्या वातावरणांत नवखे. व तो अशिक्षित असून १५-२० वर्षाचा अनुभवी. त्यामुळे त्याच्या प्रत्येक हलचाली, बोलण्याची तऱ्हा, सुचना करण्याची ठेवण, ही एखाद्या लेक्चररप्रमाणे भासत होती. आम्ही त्याक्षणी आमच्या विषय अज्ञानाला झाकून त्याच्या अरेरावी पद्धतीला थोडेसे वचकून होतो. थियेटरच्या बाहेरील वऱ्हान्ड्यात आम्ही जमा होताच तो आला व सूचना केली. सर्वानी आपली पादत्राणे काढून, थियेटरची घालावित. आतल्या खोलीतील थियेटरचे कपडे घालावे. डोके,तोंड झाकण्याचे मास्क बांधावे. ऑपरेशन थियेटर मधल्या कपाटातील वा ट्रालीवरील कोणत्याही वस्तूना स्पर्श करु नये. ह्या सुचना अती प्रभावी व खोचक पद्धतीने तो बोलून गेला. ऑपरेशन टेबल पासून एक फूट दुरीवर उभेराहून सर्व निरीक्षण करा हे सुचविले. आम्ही न बोलता, एकमेकाकडे बघीतले. सर्व त्याच्या सुचनेप्रमाणे केले. अर्थात त्या सुचना प्राध्यापकांच्या वा थियेटर इन्चार्जच्या असतील हे मान्य करीत त्याच्या वक्तीमत्वाकडे दुर्लक्ष केले.
एक अतीशय गंभीर भयावह, मनाचा थरकाप उडवणारे ऑपरेशन थियेटरचे वातावरण होते. सर्वांचे पेहेराव, हेच प्रथम दर्शनी भयानक वाटत होते. सर्वांचे झाकलेले शरीर, फक्त लुकलुकणारे डोळे चमकत होते. बोलण्याचे आवाज येत नव्हते. हातवारे करुन सुचना दिल्या जात होत्या. निरनीराळ्या मशीन्स ठेवलेल्या. कांही चालू. वेगवेगळे आवाज येत. गँस सिलेंडरची ने आण दिसत होती. लाईटचे फोकस गरजेप्रमाणे टाकले जात होते. टेबलावर पेशंटला कव्हरकरून झोपवले होते.
ज्या भागावर शस्त्रक्रिया होणार होती, तेवढाच भाग दृष्य होता. आम्ही कुणाचेच भळभळा वाहणारे रक्त आजपर्यंत बघीतले नव्हते. तेथे आज चिरफाड बघणार होतो. अर्थात औषधांच्या माध्यमातून हे सर्व कांही शारिरीक यातना, क्लेश, त्रासारहीत होणार होते. रोग्यासाठी हे जाणीवेविणा घडणार होते. ही त्यातील समाधानाची बाब होती. ऑपरेशन थियेटर तर आम्हाला त्या क्षणी ' यमपूरी ' च असावी असे वाटत होते. जन्म मृत्युचा एक प्रकारे झगडा, द्वंद्व आम्ही बघणार होतो. समजणार होतो. आणि मृत्युच्या विळख्याची पकड त्या क्षणी तरी कशी ढिली केली जाते, हे महान शास्त्रीय ज्ञान घेण्यासाठी आम्ही उत्सुक होतो. महान ज्ञान, परंतु तेथील मार्ग अर्थात ऑपरेशन थियेटरचे वातावरण मात्र आमच्या नवख्या मनाचा थरकांप उडवणारे, भयावह व अत्यंत गंभीर असल्याचे क्षणोश्रणी वाटत होते.
सहकारी डॉक्टर, परिचारीका सर्व आल्या. ते आपआपल्या जागी ऑपरेशन टेबला भोवती स्थानापन्न झाले. आमची उत्सुकता, व एक प्रकारची मनाची धीर गंभीर पकड हे शिगेला पोंहचली होती. अनुभवाच्या एका वेगळ्याच दालनात आम्ही आज प्रवेश करणार होतो.
प्रमुख सर्जन प्राध्यापक आले,
"अरे भाई यहां इतना सन्नाटा क्यु ?. Why so Silence here. ? Enjoy Surgery. I want study the Subject Sincerely in a Joyful mood".
मी मागे उभा होतो. माझ्याकडे बघत ते म्हणाले " Yes Doctor " ( प्राध्यापकांची ही पद्धत होती की ते विद्यार्थ्यालाही डॉक्टर संबोधीत बोलायचे) मी लगेच पुढे होत त्याना अभिवादन केले. " Will you do one thing for us. " मी चमकलो. ते Us अर्थात सर्वासाठी म्हणाले. मी त्यांच्या सुचनेची वाट बघत सकारात्मक हलचाली केल्या. "देखो आज न्युझीलंडके साथ आपना फायनल क्रिकेट मँच चल रहा है ना. I have forgotten my Transistor at home. Will you please get the same available here right now." एकदम सर्वांमध्ये हस्याची लाट दिसून आली. सर्वांचे चेहरे फुलले. जणू प्राध्यापकानी आमची मने व आवड यांची एकदम पकड घेतली. आमच्यापैकी एकाच्या बँगमध्येंच त्यानी ट्रानझेस्टर आणलेला होता, तो बाहेर बँगेत होता. त्याने चटकन जाऊन तो आणला.
निर्माण होऊ बघत असलेल्या अशा गंभीर व भयावह वातावरणाला इतका नाट्यमय परंतु बहारदार ट्विस्ट मिळेल हे कुणालाही स्वपनांत देखील वाटले नसेल. तीन तासाचे मोठे ऑपरेशन ( Major Abdominal Surgery ) त्या दिवशी आम्ही सर्व विध्यार्थी बँचने अनुभवला.
विषयाच्या गंभीरतेबरोबर खेळातील कॉमेंटरी ऐकत, त्यावरच्या टिका टीपणी करीत, त्यामध्ये मोकळेपणाने सहभाग घेत आनंद लूटला. वातावरण हे केंव्हाच गंभीर अथवा हलकेफुलके नसते. आम्ही ते आपल्या विचारांच्या ठेवणीमधून निर्माण करीत असतो. सर्जरी सारखा रुक्ष, तणाव निर्माण करणारा विषय, केवळ प्राध्यापकांच्या हसत खेळत फुलविण्याच्या कलेमुळे बऱ्याच विद्यार्थ्यामध्ये आवड निर्माण करु शकला.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
अकबर बादशाहच्या पदरी असलेल्या बिरबलाच्या चतुरपणांच्या गोष्टी प्रसिद्ध आहेत. त्यातीलच ही एक कथा.
अकबराच्या दरबारात एकदा एका गवयाचे गाणे झाले. ते गाणे अकबराला इतके आवडले, की त्याने त्या गाण्याला एक हत्तीच भेट दिला. ती भेट पाहून गवई आनंदी व्हायच्या ऐवजी दुःखीच झाला. कारण आधीच त्याच्या कुटुंबाचा चरितार्थ नीट चालत नव्हता. त्यात पुन्हा एवढ्या मोठ्या हत्तीला पोसणे त्याच्या दृष्टीने फारच अवघड होते. परंतु खुद्द बादशाहने हत्ती भेट दिल्यामुळे तो हत्ती नाकारू शकत नव्हता. शेवटी त्याने आपली अडचण बिरबलाला सांगितली. .बिरबलाने लगेच त्या गवयाला एक युक्ती सांगितली. त्याप्रमाणे गवयाने दुसऱ्याच दिवशी हत्तीच्या गळ्यात एक ढोलके व तंबोरा बांधला व त्याला राजधानीच्या मुख्य रस्त्यावर सोडले.
हत्ती जाताना इकडे तिकडे सोंड हलवी व ती ढोलक्यावर पडत असल्यामुळे ढोलके वाजत असे व तंबोराही अधूनमधून सूर देत असे. हत्तीचा हा अवतार पाहून बघ्यांची एकच गर्दी जमली. त्या गर्दीमुळे हत्ती बिथरला व मोकाट सुटला. शेवटी याची तक्रार बादशाहपर्यंत आली. बादशाहला खरा प्रकार
कळल्यानंतर त्याने गवयाला पकडून आणण्याचे आदेश दिला.
गवई आल्यावर अकबर बादशाह त्याला म्हणाला, 'मी तुला इनाम दिलेला हत्ती तू असा मोकळा का सोडलास!'त्यावर गवई हात जोडून बादशाहला म्हणाला, 'खाविंद माफ करा, मला या हत्तीचे पालनपोषण करणे अशक्य आहे. म्हणून मीच त्या हत्तीला सांगितले, की मी जसे गायन करून माझे पोट भरतो तसेच तूही गायन-वादन करून तुझे पोट भर. म्हणून मी त्याच्या गळ्यात ढोलके व तंबोरा अडकवून रस्त्यावर सोडला.
त्याचे उत्तर ऐकून बादशाहला त्याच्या या युक्तीमागे कोण आहे हे लगेच कळले. त्यामुळे त्याने त्या गवयाकडून तो हत्ती परत घेऊन त्याला सुवर्णमुद्राने भरलेली थैली दिली.
गवई मनापासून बिरबलाचे आभार मानत घरी परतला.
Copyright © 2025 | Marathisrushti