(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • जन्म-मृत्युचे चक्र

    खेळाच्या एका मैदानावर कोपऱ्यात बसलो होतो. समोर काहीं मुलांचे खेळ चालू होते. ते बघण्यात मी स्वतःची करमणूक करीत होतो. अचानक माझे लक्ष्य शेजारी गेले. बऱ्याच मुंग्यांची तेथे जा ये चालू होती. कदाचित् जवळपास कांहीतरी त्यांचे खाद्य पदार्थ पडलेले असतील. म्हणून ती मुंग्यांची वर्दळ असावी.
    माझ्या विचारांना एकदम खंड पडली, ती एका मुंगीने माझ्या हाताला कडकडून चावा घेतल्यामुळे. वेदना झाल्या व मी दुसऱ्या हाताने तीला मारले. मेलेली मुंगी मी झटकून टाकली. मी त्या मेलेल्या मुंगीकडे बघत होतो. तीच्याजवळ एक दुसरी मुंगी आली. नंतर तीसरी. बघता बघता बऱ्यांच मुंग्या निरनीराळ्या मार्गाने तेथे जमल्या. सर्वजणींची हलचाल त्या मेलेल्या मुंगीभोवती होत होती. मुंग्यांचा आपसातील संवाद, मृतमुंगीला स्पर्ष करणे, कदाचित् हूंगणे, तिच्या अवयवाचा लचका तोडणे, तीला तेथून हलविण्याचा प्रयत्न करणे. अशा अनेक लहानसहान गोष्टी होत होत्या. सर्वांचा अर्थ वा उद्देश समजणे, ह्याचे अकलन होत नव्हते. यामागची निसर्ग योजना, काय असावी हे कळले नाही.

    हां एक मात्र लक्षात आले. ज्या मुंगीला मारले व टाकले होते, ती मृत होता क्षणीच कोणती तरी प्रक्रिया सुरु झाली. कदाचित् एखादी गंध निर्मीती असेल, की ज्याच्या पसरण्याने संबंधीत जीवजंतूना त्याचे चटकन आकलन व्हावे. तो सजीव प्राणी मृत झाला, ह्याची सुचना मिळावी. त्या मृत देहावर निसर्ग प्रेरीत, वा योजीत सोपस्कार व्हावे. ह्याच साऱ्यांचा उद्देश फक्त एकच वाटला. आणि तो म्हणजे मृत झालेल्या देहाचे विश्लेषन Analysis होऊन त्याच्यामधल्या घटक पदार्थाचे पुनरुजीवन Recycling process व्हावी. कुणीही नाशवंत नाही. तो फक्त आपला आकार बदलत जातो. हे मनाला पटू लागते.

    जीवन जशी एक चक्रमय क्रिया असते, तशीच मृत्यु ही देखील चक्रमय क्रिया असते. म्हणूनच म्हणतात जन्म-मृत्युचे चक्र.

    -- डॉ. भगवान नागापूरकर

  • माईल स्टोन्स ( Mile Stones )

    श्री वसन्तराव व्यवसायाने शिक्षक होते. त्याना दोन मुले. एक दहा वर्षाचा व लहान चार वर्षाचा. स्वतः शिक्षकी वृत्तीचे. …..

  • शतशब्द कथा – विषकन्या

    आई ग! तिने डोळे मिटले. क्षणभरा करता तिला वाटले आपला चेहरा घामा एवजी रक्ताने डबडबलेला आहे. तिचे लक्ष सहजच पुस्तकाच्या कवरवर गेले. मोठ्या अक्षरात लिहिले होते ‘विषकन्या’.

  • अट्टाहास ?

    एक गमतीचा प्रसंग आठवला. छोटीशी गोष्ट. दैनंदीन जीवनांत घडणारी. तीला आपण सामोरे कसे जातो, ह्यातच अनुभवाची परीपक्वता दिसून येते. असेच प्रसंग आत्मचिंतन करावयास …..

  • प्रेम- अहंकाराचे अंकुरण

    संध्याकाळची वेळ होती. घराजवळच रेल्वे स्टेशन. तेथे रेल्वे रुळाच्या एका बाजूस असलेल्या दगडावर बसलो होतो. समोर रेल्वेचे ७-८ मार्ग आणि त्यावरुन जाणाऱ्या ….

  • एक आदर्श शिक्षिका

    डॉ.देशमुख हे आम्हास Physiology हा विषय शिकवणारे प्राध्यापक होते. अतिशय विद्वान. त्यांच्या विषयाचे प्रचंड ज्ञान संपादन केलेले. त्यांनी त्यांचे प्रबंध …..

  • जेव्हां शिष्य गुरुची भूमिका करतो.

    वैद्यकीय क्षेत्रातील अँलोपँथिक ( Allopathic Medical Science ) शास्त्राच्या डिगरय़ा व शासकीय रजिस्ट्रेषन झालेले होते. नुकताच मी दवाखाना सुरु केला होता. रोगांची हजेरी व वरदळ चांगला आकार घेऊ लागली. एक दिवस एक तरुण मुलगा माझ्या दवाखान्यांत आला. " माझ नांव तरुणकुमार तिवारी. माझे वडील येथे मॉडेला कंपनीत नोकरीला आहेत. मला तुमच्याकडे कंपाऊंडर म्हणून काम मिळेल कां ? " मी त्याच्याकडे बारीक नजरेने बघीतले. चेहरय़ावरुन मला तो अतिशय सज्जन, समजदार, कुटूंब वत्सल, उत्साही आणि सुस्वभावी वाटला. तशी मला कुण्यातरी सहकाऱयाची गरज होती. चर्चा करुन मी त्याला मज बरोबर काम करण्याची सम्मती दिली.

    आगदी अल्प काळांत तिवारीने माझे मन जींकून घेतले. त्याला कामाची हौस दिसली. त्याच्यासाठी वैद्यकीय विषय अपरीचित् होता. परंतु त्यांत त्यांने उत्साह व गोडी असल्याचे दाखवून दिले. त्याने एक नोटबुक बाळगले होते. माझा रोग्याशी होणारा संवाद, त्यांच्या तक्रारी, विकाराची वर्णने, रोग्याने आतापर्यंत केलेले उपाय, ह्या सर्व बाबींची तो अतिशय उत्सुकतेने एकाग्र चित्त करुन माहिती गोळा करीत असे. त्याच्या सर्व नोंदी तो वहीत लगेच टिपून घेई. रोग्याला दिलेली औषधी, त्यांची नांवे, घेण्याची पद्धत, ह्याची व्यवस्थीत नोंद तो करुन घेई. रोगी गेल्यानंतर तो त्याच्या शंका-कुशंका विचारीत असे. माझा देखील त्याला सहकार्य करण्याचा दृष्टीकोण असावयाचा. माझ्याच सल्ल्याने त्याने कांही प्राथमिक वैद्यकीय ज्ञानाची पुस्तके पण घेतली होती. प्रत्यक्ष अनुभवांत ( Practical Knowledge ) त्याच्या कल होता. औषधी देणे, तयार करणे, ड्रेसींग करणे, जखमांची काळजी घेणे, इन्जेक्क्षन देणे, हे त्याने शिकून घेतले होते. केंव्हा केंव्हा माझ्या गैर हजेरीत तोच माझा दवाखाना व्यवस्थीत चालवित असे.

    काळाचा एक प्रचंड महीमा असतो. ओघ आणि बदल ही काळाची वैशिष्ठे. तो निश्चीत असला तरी जगाला त्याच्या परिणामाचे मुळीच ज्ञान नसते. म्हणूनच त्यांत रोमांच आहे, शंका आहे, आणि आश्चर्य आहे. वय व विकलांगपणा नेहमी जीवनमार्ग बदलण्यास भाग पाडतो. वाकत जाणारे शरीर विचारांनादेखील वाकवित जाते. जो मेंदू, विचार, चेतना एकेकाळी शरीरावर ताबा करुन होता, तोच आता शरीराच्या आधीन झालेला जाणवतो. डॉक्टराची भूमिका बदलून आतां रोग्याच्या भूमिकेत राहण्याचा काळ आलेला होता. खोकल्याने हैरान केले होते.

    माहित असलेले सर्व उपाय संपले. तज्ञांचेही सल्ले निकामी ठरले.

    समवयस्क मित्रांनी सल्ला दिला की क्रॉनिक झालेल्या खोकल्यासाठी आयुर्वेद शास्त्रामधील उपचार करावेत. त्यांनी एका क्लिनीकचे नाव देखील सुचविले. मी त्याप्रमाणे तेथे गेलो. मला तेथे जाताच आश्चर्याचा धक्का बसला. त्या क्लिनीकचा प्रमुख होता तरुणकुमार तिवारी. एके काळचा माझा कंपाऊंडर सहकारी.

    माझ खूप आदरातिथ्य व स्वागत केल गेल, हे सांगणेच नको. तिवारीच्या अभ्यासू वृत्तीने त्याला शांत बसूच दिले नाही. वैद्यकीय विभागातील त्याची ओढ व रुची त्याला ज्ञानाच्या चक्रांत फिरवीत होती. त्यानी आयुर्वेद ह्या विषयाकडे आपले लक्ष केंद्रित केले. पुस्तके वाचली, सर्टीफिकीट कोर्स केला. ज्यामुळे तो स्वतंत्र व्यवसाय करु शकत होता. विषय वाचन, व त्याचे अद्यावत ज्ञान (Update Knowledge ) ह्या तत्वावर तो ठाम होता.

    ह्याच विषयावर लेखन करुन त्या त्या विषयांच्या संबंधातील मासिकांना लेख, उतारे, प्रश्नोत्तरे, पाठवू लागला. आपल्या ईच्छाशक्ती व प्रचंड मेहनत यानी एक प्रकारे साम्राज्य निर्माण केले होते. निरनिराळ्या आयुर्वेदिक कंपन्यानी त्याला मार्गदर्शक म्हणून देखील मान्यता दिली होती.

    वैद्यकिय शास्त्राची अ-आ-इ-ई जरी तो मजकडून शिकला, तरी य- क्ष- ज्ञ अर्थात वरच्या दर्जाचे ज्ञान हे त्याचे स्वतःचे होते. मजसाठी हे जरी नाविन्यमय होते, तरी माझ्याच अडचणीच्या काळांत मलांच आसरा देणारा तो ठरला. एक प्रकारे शिष्य म्हणून मजकडे आलेला तरुणकुमार तिवारी आता एका गुरुच्या – श्रेष्ठाच्या- भूमिकेत भासू लागला.

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    e-mail- bknagapurkar@gmail.com

  • दुर्वांच्या जुड्या

    संध्याकाळचे फिरणे झाल्यानंतर शेजारच्या बागेत जावून शांत बसणे हे नित्याचे झाले होते. एक प्रकारचा आनंद व समाधान मनाला त्यामुळे लाभत असे. शांत झोप मिळण्यासाठी ते गरजेचे वाटत होते.

    एक गोष्ट माझ्या दररोज बधण्यात येवू लागली होती. एक वयस्कर गृहस्थ नियमीत त्याच वेळी मला बागेत दिसत होते. ते सहसा कुणाशी बोलत नसत. एकटेच शांत बसून बागेतल्या गवतातील दुर्वा काढीत असत. पिशवीत एक दोऱ्याचे रिळ असे. जमविलेल्या दुर्वांची ते जुडी बांधून ती त्या पिशवीत टाकीत असत. जवळ जवळ एक तास पर्यंत दुर्वा काढणे, जुड्या बांधणे व जमा करणे हाच कार्यक्रम ते करीत असल्याचे दिसून येत होते. कदाचित् २१, ५१, वा १०१ दुर्वांच्या जुड्या ते बांधीत असावेत. पुजेमधला मिळणारा आनंद घेण्याचा त्यांचा तो प्रयत्न असावा. हा माझा अंदाज होता. पण मी त्याना तसे कांही विचारले नाही.

    एक दिवस अचानक त्यानी दुर्वा काढण्याचे थांबवून, ते माझ्याच शेजारी बाकावर येवून बसले. पिशवीतून पाण्याची बाटली काढून ते पाणी प्याले. मला त्यांचा परिचय करुन घेण्याचा अवसर मिळाला होता. " आपली प्रकृती तर बरी आहे ना ? " मी विचारणा केली.

    " हां, ठिक आहे. किंचीत् थकवा वाटला, म्हणून बसलो. ह्या वयांत सारे कांही अनिश्चीत. पाणी प्यालो. आता थोडी हूरहुरी वाटते. " ते माझ्याशी मोकळेपणाने बोलू लागले. ते एक वरिष्ठ निवृत्त शासकिय अधिकारी होते. छोटे कुटुंब. मुलीकडे रहात होते. फक्त दोन मुली त्यांना. एक परदेशांत स्थायीक झालेली. आनंदी व समाधानी वृत्तीने जीवन क्रम चालू होता. चौकस बुद्धी म्हणून मी त्याना त्यांच्या नियमीत दुर्वांच्या जुड्या जमाकरण्या बद्दल विचारणा केली.

    ते हसले. "खर सांगू. ह्या दुर्वा खोडणे, जमा करणे, त्याची जुडी बांधणे आणि अशा अनेक जुड्या पिशवीत जमा करणे हे सारे मी केवळ आनंदासाठी, समाधानासाठी करीत असतो. माझे वय सध्या ८० च्या पुढे गेलेले आहे. प्रकृति सध्यातरी टिकवून आहे. त्यामुळे शरिराच्या हलचाली व्यवस्थित व ताब्यात असलेल्या आहेत. फक्त ईश्वरी नामस्मरण करतो. चिंतन करतो. ध्यान करतो. कोणतेही कर्मकांड करीत नाही. पुजाअर्चा ह्यांत मन केव्हांच रमले नाही. म्हणून ती करीत नसतो. मनाला पटले वा भावले तेच करत गेलो. कुणी सांगतो, सुचवितो म्हणून अथवा पुस्तकांत वा कोणत्यातरी ग्रंथात मार्गदर्शन आहे म्हणून मी ते मान्य करीत नाही. हां ! ह्या दुर्वांच्या जुड्या कशासाठी ? हे सारे फक्त मानसिक समाधानासाठीच आहे. सर्व दुर्वा अंदाजाने मी जमवून त्याची जुडी बांधतो. त्याकडे माझे लक्ष नसते. त्या गणरायाचे मात्र सतत नामस्मरण चालू ठेवतो. ह्या साऱ्या जुड्या मी मंदिराशेजारच्या फुलवाल्याला देत असतो. तो मला त्याचे दहा रुपये देतो. बस. श्रमाच्या पैशाचा मिळणारा आनंद हा कांही वेगळाच असतो, नव्हे काय ? मंदिरा शेजारी कांही भिकारी बसलेले असतात. ते पैसे मी त्याना देवून टाकतो. त्या भिकाऱ्याची गरज, ही त्या क्षणी माझ्या आनंदाचा, समाधानाचा मार्ग निर्माण करणारी असते. ह्य़ातच माझ्या मनाची शांतता दडलेली आहे. त्याच शांततेच्या शोधांत मी उर्वरीत जीवन व्यतीत करतो. "

    एका छोट्याशा प्रसंगातून, एक रोमांचकारी भावनिक आणि जीवनाच्या महान तत्वज्ञानाचे विवरण मी त्या गृहस्थाकडून ऐकत होतो. त्यानी जे सांगीतले, त्यानी मी भारावून गेलो. जीवन म्हणजे काय ? जगायचे कसे व कां हे त्यानी जाणले असावे, हे मला उमगले. मी उठून त्याना अभिवादन केले. त्यांच्या चरणाला स्पर्ष केला.

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • सर्प आणि उंदीर यांचे द्वंद

    हैदराबाद येथे एक सर्पालय बघण्यास गेलो होतो. अनेक जातींचे सर्प कांच- घरात ठेवलेले होते. त्यांना खेकडे, बेडूक, उंदीर, वा छोटे जिवंत प्राणी खाण्यासाठी सापाच्या दालनात सोडले जात होते. फक्त भुकेला सर्प हा आपल्या भक्षावर तुटून पडतो. नसता तो भक्ष जीवना मारत नसतो. एक सर्प दालनात एका उंदराला सोडले होते. सर्प बराच मोठा होता. सापाचे हालके हालकेपुढे जाणे, उंदराच्या दिशेने झेप घेणे, उंदराला दंश करणे, त्याला जायबंद करणे, त्याच्यावर वेटोळे घालून त्याला खीळ खिळा करणे, व मग गिळणे ह्या क्रिया तो करतो. असाच प्रयत्न हा सर्प करीत होता. त्याच वेळी उंदीर जीव वाचवण्यासाठी चपळाईने पळणे, सापाची पकड चुकवणे, त्याचा नजरेच्या टापूतून हालने, ह्या प्रयत्नात होता.

    एक जीवन मरण्याचा संघर्ष चालू असलेला दिसत होता. निसर्गाने प्रत्येक प्राण्याला स्वत: चे रक्षण करण्याची कला दिलेली असते. तो एक दिलासा असतो. जो जगण्यासाठी धडपडेल तोच जगेल. Survival of the fittest म्हणतात ते हेच. निसर्ग तुमच्या प्रयत्नांना सतत सकारात्मक साथ देतो. कित्येकदा वाघ सिंह यांच्या तावडीत सापडलेल्या हरिणांनी आपली सुटका करून घातलेली आम्ही Discovery वा Animal Plannet ह्या दूरदर्शन चांनेलवर बघितले. पाण्यामध्ये प्रचंड मगरीने पकडलेला झेब्रा देखील आपल्या तडफदार धडपडीने ती मगरमिठी सोडू शकला हे पण बघितले. चंचलता, चपळाई, शिकारी प्राण्याचा लक्षवेध चुकवण्याची कला, प्रासंगिक आक्रमकता, धैर्य, चातुर्य हे सारे सुप्त रूपाने प्रत्येक प्राण्यात असतात. हे गुणधर्म संकट काळी जागृत होतात. नेहमीच्या अंग शक्ती पेक्षा कितीतरी पटीने त्याची शक्ती उत्येजीत होती. शरीराच्या प्रत्येक नस नसामधून त्याचा ओघ निर्माण होतो. हा परिणाम इच्छित ( Volentary action ) नसून आंतरिक चेतना अर्थात Instinct Relex Action असते. अपोआप उद्दुक्त होते. ही सारी निसर्गाची बचावात्मक योजना होय. कोंडून ठेवलेली भित्री वा पळपुटी मांजर तिच्यावर जीवघेणा हल्ला होत आहे हे समजताच तिच्यामध्ये विलक्षण शक्तीचा ओघ निर्माण होतो. ती झेप घेऊन त्या व्यक्तीचा गळा पकडून त्याचाच जीव घेण्यास सक्षम होते. ही स्व रक्षणाची किमया.

    शिकारी साप आणि शिकार उंदीर ह्यांचे द्वंद्द चालले. चुरस अत्यंत रोमांचकारी व उत्च्सुक्ता वाढवणारी होती. एक बलाढ्य मारक आणि समोर अशक्त अश्या दोन प्राण्याची लढत. उंदरासाठी जीवन मरणाचा संघर्ष. तो सापाच्या प्रत्येक सूक्ष्म हालचालीचा वेध घेत होता. सापाने दंश करण्यासाठी मारलेला टोला चपळाईने चुकवत होता त्याच वेळी सापाचे तोंड आपटून दुखवले जाई कांही वेळाने ते रक्त बमबाळ झाले. एक विस्मयकारक प्रकार घडला. उंदरावर सापांनी आपला जबडा उघडा करून एक दंश टोला मारण्याचा प्रयत्न केला. त्याच क्षणी उंदराने उलटवार केला. सापाचा उघडलेला खालचा जबडा झटकन आपल्या दातांनी गच्च पकडला. उंदराला छोटे छोटे दात असतात. त्याचा उपयोग पकडी मध्ये झाला.

    उलट सापाला तसे चावण्याचे दात नसतात. तो फक्त भाक्षाला गिळतो. येथे खालचाच जबडा उंदराच्या पकडीमध्ये गेल्यामुळे साप एकदम निष्क्रिय झाला.सापाची ह्या अनपेक्षित पकडीतून सुटका करून घेण्याची धडपड चालली , पण जमले नाही. उंदराने त्याची पकड ढिली केली नाही. बराच वेळाने तो साप हतबल होऊन मान टाकू लागला. त्याचा हालचाली थंडावल्या उंदराने शत्रूची पकड दिली करीत लगेच चेहऱ्याचा दुसरा भाग पकडला. जागा बदलणे, पुन्हा दात रोवणे, कुड्तरणे हे चालू ठेवले. सापाचे तोंड छीलुन काढले. घायाळ केले. शेवटी सपालाच मृतुच्या स्वाधीन व्हावे लागले.

    आम्ही जी घटना बघितली ती केवळ अतिशय आश्चर्यकारक घडलेली अशी. निसर्गाचा तो एक चमत्कार. कुणास विश्वास वाटणार नाही अशी. मलासुद्धा आपण हे सत्य बघतो आहोत कां ? का हा दृष्टीचा भ्रम आहे हे एका क्षणी वाटले पण आम्ही video चित्रण ही केले होते. अशा घटना निसर्गाच्या चक्रात अनेक वेळा घडत असतात. आम्हास ती बघण्यास मिळणे हे आमचे नशीब नव्हे काय?

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • चक्षु पटलावरील ती छबी

    पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान असतानाचा एक छोटासा परंतु माझ्या जीवनातला महान ऐतिहासिक प्रसंग आठवतो. गुलबर्ग्याला पंडितजी कोणत्यातरी भव्य वास्तूच्या संकल्पित इमारतीच्या पायाभरणी समारंभाच्या उद्घाटनासाठी आलेले होते. आजकालचा दहशतवाद तेंव्हा मुळीच नव्हता. कुणीही पंतप्रधानाच्या जवळ जाण्यास फारशी आडकाठी नसे. माझे वडील तेथे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी होते. फक्त निमंत्रीतानाच आत प्रवेश दिला जात होता. तीन स्त्रीयांना तीन रंगाच्या ( भगवा पांढरा नी हिरवा ) साड्या परिधान करून प्रवेश द्वाराजवळ फुले, बुके, आरतीचे ताट घेवून पंडीतजीच्या स्वागतासाठी उभे केले होते. त्या तिघीमध्ये माझी आई देखील होती. मी एक शाळकरी मुलगा होतो व थोडे अंतर सोडून मागे उभा होतो.

    पंडितजी आले. हसत त्यांनी सर्वाना अभिवादन केले. त्या तिघींनी दिलेली फुले, बुके, आणि ओवाळणी मान्य करीत चेहऱ्यावर समाधान व्यक्त करीत ते निघून गेले. एक क्षण , फक्त झलक, जशी आकाशातील वीज चमकून सारा आसमंत प्रकाशत व्हावा, तसाच. तो अतिशय क्षणिक व छोटा प्रसंग माझ्या डोळ्यांनी जो टिपला, तो माझ्या जीवनासाठी ऐतिहासिक म्हणून मन व हृदयावर कोरला गेला होता.

    माझ्या डोळ्यातही एक दैवी असा कॉम्पुटर (Computer ) आहे. असे मला वाटते. तो दैवी माऊस( Mouse ) क्लीक केल्यावर, माझ्या मनावर कोरल्या गेलेल्या साऱ्या आठवणीना उजाळा मिळतो. त्या काळाची त्यावेळची मी माझ्या डोळ्यांत सामावलेली ती छबी, आजही चटकन Display अर्थात प्रक्षेपित होते. माझ्या अंतर मनाला ते चित्रण दिसू लागते.

    मी आजही त्या प्रचंड वेगाने जाणाऱ्या, विज्ञान शास्त्राच्या त्या यशाची आतुरतेने वाट बघत आहे. जेंव्हा ते यांत्रिक पद्धतीने माझ्या चक्षुपटलावरची ती छबी कागदावर प्रक्षेपित करण्यात यश मिळवितील. ती माझ्यासाठीची अत्यंत दुर्मिळ परंतु महत्वाची घटना असेल. कदाचित मीच प्रथम त्या यंत्रणेचा उपभोक्ता असेन.

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com